मैत्री (कविता )

मैत्री काय आहे राव..

पोटच्या पोराचं लग्न टाकून
कोंढाण्या वरून थेट स्वर्ग जिंकणारी..

मैत्री "शिवराय - तानाजीची"

शरीराच्या चिंध्या झाल्यावर पण
या मातीसाठी तळमळणारी...

मैत्री शंभूराजे - कवी कलशांची.!

जीवापाड प्रेम आणि जीवघेनी
दुष्मनी करणारी..

मैत्री "संताजी - धनाजींची"

फासाचा दोर पहिला माझ्या
गळ्यात घाला म्हणून भांडणारी.!

मैत्री "भगतसिंग राजगुरू, सुखदेवची"

कसली नाती होती ओ ती ?

शेवटचा श्वास घेतानाही हातातला
हात घट्ट धरण्याचं घेतल हे वचन..

ही खरी मैत्री ही खरी नाती..

मी मराठा मी सोनार मी धनगर
असं जर चालूच राहिले तर हे
हिंदवी_स्वराज्य‬ आणि ‪हिंदूराष्ट्र
कधीच होऊ शकणार नाही..

जेव्हा आपण सगळे ‪हिंदू‬ म्हणून
एकञ होऊ तेव्हाच आपले हे
हिंदवी स्वराज्य आणि हिंदूराष्ट्र
स्थापण होईल..


जय शिवराय जय जिजाऊ

No comments:

Post a Comment