गाव

         ।।गाव।

खरं खरं सांगतो राव,
उगीच न्हायी ठेवत नाव....

या मोबाइलनं बिघडवलं
आता सारं माझ गांव....

वडाचा मोठा पार होता,
वारा थंडगार होता.....

गप्पा ,निरोप,खुशाली,
कहाण्यांचा बाजार होता....

काय चाललंय?कसं चाललंय?
एकमेकांत संवाद हाेता....

कबड्डी होती,कुस्ती होती,
आट्या - पाट्या,लपा-छपी,

सुर-पारंब्यावरचे झोके होते,
ओढ्याच्या डोहात पोहणे हाेत.

आंब्याच्या झाडावरच बसून,
कच्चे-पिकलेले आंबे खायची मजा होती...

विटी-दांडु,खेळाचं मैदान होतं,
इतर अनेक मैदानी खेळ होते...

उनाडक्या होत्या,मस्ती होती,
आप-आपसात मेळ होता...

चिंचा होत्या,बोरं होती,
आंबे होते,ऊस होता...

गोठाभर ढोरं होती...
ढोरां बरोबर पाेर हाेती....

जिवाला जीव देणारे,
दिलदार मित्र होते......

किर्तन होतं,भजन होतं,
जात्यावरचं गाणं होतं.…

शाळेतल्या कवितेला,
आनंदाचं उधाण होतं...

पण..............

जसं गावात हा कोठून,
मोबाइल आला,नेट आलं....

चँनलच कनिक्शन,
घरा घरात थेट आलं...

गजबजलेलं गाव माझं,
आता निर्जन बेट झाले....

सकाळ संध्याकाळ सारी माणसं,
टीव्हीलाच चिकटून राहिली..

रस्त्यावर वर्दळ करणारी माणसे,
टी वी पुढंच सेट झालीत.....

मैदानावरील मुलं सारी,
देवळामागच्या अंधारात...

मोबाइल मध्येच गुंतली सारी......

सुने सुने झाले वडाचे पार,
मुके झाले देवळाचे ओटे....

दिवस-रात्र मोबाईल वर,
नुसती फिरवत राहतात बोटे.....

खरं-खरं सांगतो राव.....
या मोबाइलनंच बिघडवलं माझं सारं गाव !

No comments:

Post a Comment