लेख...... आनंद ,प्रसन्नता ,सुख माणसाने आनंदी वृत्ती ठेवून जगणे अतिशय महत्वाचे आहे. आनंदी वृत्ती ,समाधान ,सुख, शांती, प्रसन्नता ही फार मोठी आपली सौंदर्यवर्धक साधने आहेत. आपली आनंदी वृत्ती असणे म्हणजे आपल्यातील उत्साह व्दिगूणीत करणे होय. ही 'आनंदी वृत्ती आपल्या आरोग्याचा आधार आहे, तर औदासिन्य हे रोगाचे घर आहे' असे हेली बर्टन या विचारवंताने म्हटले आहे.आपल्या जीवनात उदासिनता ठेवायची नसेल तर आपण आनंदी, प्रसन्न राहायला हवे. आपल्या सुखाचे माहेरघर म्हणजे आनंदी वृत्ती होय. प्रसन्नता हे परमेश्वराने आपल्याला दिलेले औषध आहे आणि हे औषध आपण जर घेतले तर आपले जीवन सुखी समाधानी होईल. निसर्गात, सृष्टीत जिथे आपली नजर टाकू तिथे आपल्याला प्रसन्नता दिसेल. परंतु यासाठी आपल्याला स्वतःला प्रथमता प्रसन्न राहावे लागेल आणि इतरांना प्रसन्न ठेवावे लागेल. कारण खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नसतो. आपल जीवन यशस्वी करायचं असेल तर आपल्याला आपले मन प्रसन्न, आनंदी असले पाहिजे. माणसाच्या मुखावर झळकणार निर्मळ हास्य माणसाचं मन जिंकून जातं, आणि ह्या अशा आनंदी व्यक्तीच्या आठवणी माणसाच्या मनात रेंगाळतात. स्वकष्टातून खरा आनंद निर्माण होतो. आणि मनुष्याचं जीवन सुखी करतो. मनुष्याने सदैव कामात व्यस्त राहिले पाहिजे. मनन ,चिंतन करीत राहिले पाहिजे.कारण जो मनन करु शकतो त्याला मनुष्य म्हणतात.आपल्याला मननामुळेच सर्व ज्ञान प्राप्त होते.मनन हा जसा मनाचा गुण आहे.त्याप्रमाणेच माणसाच्या जीवनात प्रसन्नता ही मानवाला मिळालेली दैवी देणगी आहे.ज्या मानवात प्रसन्न वृत्ती आहे अशा प्रसन्न असणाऱ्या व्यक्तीची बुद्धी लवकर स्थिर होत असते.प्रसन्नतेमुळे आत्म्याला शक्ती मिळते.म्हणूनच कोणतेही कार्य हाती घेतले असता त्यात प्रसन्नता असले की ते कार्य हलके वाटते. प्रसन्नता ही माणसाच्या मनातून निर्माण होणारी क्रिया आहे.जसा दिव्यान दिवा लावता येतो तशी एका माणसाच्या मनातील प्रसन्नता अनेकांना हर्षउल्हासित करते.यशस्वी जीवनासाठी प्रथमतः आपले मन आनंदी व प्रसन्न असायला हवे.ज्याप्रमाणे पारिजातक आपल्या फुलांच्या पडलेल्या सडा सुगंधाने सुगंधीत करून दुसऱ्याला आनंदी करतो त्याप्रमाणे माणसाच्या चेहऱ्यावरील झळकणार निर्मळ हास्य हे मन जिंकून घेत. म्हणूनच आपल्या जीवनातील जीवन जगण्यासाठीच ध्येयवाक्य असाव.' प्रसन्नतेचा एक एक क्षण पुरेसा,जोपासावा '. 〰〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.

No comments:

Post a Comment