लेख... मोबाईल सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल ही आजच्या काळाची गरज बनली आहे. संगणक, लॅपटॉप, मोबाईल हे माहिती तंत्रज्ञानाचे संप्रेषणाचे साधन आहेत. इंटरनेटचा वापर करून आपण मोबाईल, संगणकाद्वारेे आपणअनेक नवीन नवीन माहिती मिळू शकतो. संगणक ,मोबाईल, लॅपटॉप म्हणजे यंत्रयुगाने मानवाला दिलेला कल्पवृक्ष आहे. इंटरनेट प्रत्यक्षातील कल्पवृक्ष आहे. आजच्या जगात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मोबाईल हे वस्तू आवश्यक झालेली आहे. आपल्या मनात कोणत्या चिंता दुःख, सुख आनंदाच्या व इतर घडलेल्या घटना आपल्याला आपल्या नातेवाईकांना क्षणार्धात पोहोचण्यासाठी मोबाइल हे उत्तम साधन आहे. मोबाईल द्वारे आपण सर्व आवश्यक कामे करू शकतो तेही घर बसून. खरं तर मोबाईल ही फार आवश्यक गोष्ट आहे आणि महत्त्वाची सुद्धा आहे. जीवनाचे प्रत्येक तसेच व्यापाराचे प्रत्येक क्षेत्र मोबाईलशिवाय, संगणकाशिवाय अपूर्ण आहे. असे वाटते की आज मोबाईलचे अधिराज्य आले आहे. लहानापासून ते मोठ्यापर्यंतचा यांना मोबाईल ने वेडे लावलेले आहे. खरंतर मोबाईलचा योग्य आणि चांगलाच वापर केला पाहिजे. परंतु कोणी मोबाईलचा योग्य वापर करत नाही. मोबाईल वर असलेल्या विविध ॲप्स चा वापर प्रत्येक जण आपापल्या विचारसरणी नुसार करत असतो. मोबाईल द्वारे आपण अत्यावश्यक कामे एका क्षणात पार पाडू शकतो. व्हिडिओ कॉल करून आपण प्रत्यक्ष एकमेकांना बोलू शकतो. म्हणजे बघा मोबाईल हे किती महत्त्वाचे साधन आहे.मोबाईल या वस्तूचे सर्वात मोठे वैशिष्ट्य एक व्यक्ती जगातील दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीशी संपर्क प्रस्थापित करू शकते. ती व्यक्ती कुठेही असो . या मोबाईल मुळे आपण क्षणार्धात सहस्त्रावधी किलोमीटरचा प्रवास करून तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्याशी गप्पाही करू शकतो. आपले अनुभव आपली मते इतरांना कळवू शकतो किंवा आपल्या प्रश्नांची सोडवणूक सुद्धा करून घेऊ शकतो. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोबाईलचा किती मोठा वाटा आहे. काही तोटे विचारात घेतले तर फायद्याचे पारडे जडच आहे. म्हणून तंत्रज्ञानाने मोबाईलच्या माध्यमातून मानवाने जी प्रगती घडवून आणली ती मानवी जीवनाला खरोखरच लाभदायक आहे असं मला तरी वाटतं. कारण मोबाईल ही आजच्या काळाची गरज बनली आहे. मोबाईल ही अत्यावश्यक सेवा बनलेली आहे. आज प्रत्येकाजवळ मोबाईल आपल्याला दिसतो. मोबाईलचा वापर जवळजवळ शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंतची लोक करीत आहेत. माणसाला अन्न ,वस्त्र व निवारा या गरजा बरोबरच मोबाईलची ही गरज आजच्या युगात आहे. अगदी पाळण्यातल्या बाळापासून ते वयस्क असलेल्या व्यक्तीजवळ मोबाईल आपल्याला पाहायला मिळतो. काहीजण तर पाळण्यातल्या बाळाला मोबाईल वर गाणे लावून देतात , त्याच्या हातात मोबाईल देतात व त्यानंतर तो बाळ छान झोपतो. परंतु इतक्या लहान वयात लहान बालकास मोबाईल हातात दिला तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. ही विघातक सवय त्या बाळासाठी लहान वयापासून योग्य नाही. योग्य कामासाठी, चांगल्या व उपयुक्त माहितीसाठी , समज पूर्वक मोबाईलचा वापर करावा. मोबाईल ही आवश्यक सेवेसाठी वेळोवेळी चांगल्या कामासाठी वापरली जाणारी वस्तू आहे. आणि ह्या मोबाईलचा सर्वांनी उपयोग घ्यावा. चला तर मग “ विज्ञान-तंत्रज्ञानाची धरूया कासं, संगणक,मोबाईलचा वापर करूया खास.” 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जिल्हा नांदेड.

No comments:

Post a Comment