लेख..... गुरुची महती, गुरु महिमा मानवी जीवन सुसंस्कारित करण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. आज आपण अन्न, वस्त्र, निवारा यावर जगत असलो तरी, शिक्षण आपल्या जीवनाचा प्राणवायू आहे. ज्ञान, विज्ञान आणि संस्कार यांचा सुंदर मिलाफ म्हणजे शिक्षण होय. हे मानवी जीवन सुरक्षित व संस्कारशील बनवण्याचे काम गुरु करतात. गुरु म्हणजे माणसाच्या रूपात एक परमात्माच आहे. हा गुरुरूपी परमात्मा शिक्षणातून संस्कार घडविण्याची कार्य करतो. जिथे गुरु आहे तिथे ज्ञान आहे, जिथे ज्ञान आहे तिथे आत्मदर्शन आहे, आणि जिथे आत्मदर्शन आहे तिथेे सुख, समाधान आणि शांती नक्कीच आहे. जो आपल्याला ज्ञानाच्या गाभाऱ्यात घेऊन जातो आणि ज्ञानाशी एकरूप करून टाकतो त्यास आपण गुरु म्हणतो. जो सर्व भूतकाळ दाखवतो वर्तमान काळाची ओळख करून देतो भविष्यकाळाची दिशा सांगतो तो म्हणजे गुरु. गुरु म्हणजे ज्ञानाचा आगरच होय. आपल्या जीवनाचे भांडे जेवढे मोठे असेल त्या मानाने आपल्याला गुरूकडून ज्ञान घेता येते. गुरुहा बुद्धीने पाहिले तर माणसासारखा दिसते आणि हृदयाने पाहिले तर आपल्याला परमात्मा सारखा अनुभवते. शिक्षणातून संस्काराची गंगा आसेतु हिमालयापर्यंत पोहोचवायचे कार्य गुरु करतो. या जगात मानव हा सर्वश्रेष्ठ प्राणी मानला जातो. काही माणसे चांगले असतात तर काही वाईट असतात. चांगला आणि वाईट ठरवण्यासाठी आपल्याला शिक्षणाची गरज असते. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे , आणि या शिक्षणाच्या माध्यमातून चांगला संस्कार आणि शिक्षण यांची सांगड घालून देतो ते गुरु. माणसाच्या जीवनात प्रत्येकाला गुरु असणे आवश्यक असते. खरा गुरू स्वतः च सारं ज्ञान शिष्याला देत असतो. शिष्यापासून गुरु काही लपवून ठेवत नाही. गुरु तोच असतो जे आपल्या पुढे जाणाऱ्या शिष्याचे सदाही कौतुकच करत असतो. गुरूचा आनंद आपल्या शिष्याकडून पराजय होण्यातच असतो. खरा गुरू तोच जो आपल्या शिष्याच्या विजयातच आपला विजय मानत असतो. गुरु आणि शिष्य यांचे अतूट नाते असते. गुरु म्हणजे अनंत ज्ञानाची तळमळ असते. तर शिष्य म्हणजे ते ज्ञान ग्रहण करण्याचा उपासक असते. खरे बोलावे, नीतीने वागावे, राष्ट्रावर प्रेम करावे, आपापसात माया, ममता करावी हे सर्व गुरू आपल्याला शिकवते. आपली पहिली गुरु आपली आईच असते. त्यानंतर आपण शाळेत गेल्यावर शिक्षक म्हणजेच गुरु यांच्याकडून ज्ञान प्राप्त करतो. ज्यांच्या ज्यांच्या कडून आपणास काहीतरी शिकावयास मिळते ते सर्व आपले गुरु आहेत. शाळेतून घेतले जाणारे शिक्षण आपल्याला गुरूकडून प्राप्त होते. शिक्षणाचे ध्येय शिक्षणाचा उदात्त हेतू चांगला माणूस निर्माण करणे हेच असते. मानवी मनावर संस्कार घडवणे म्हणजे शिक्षण होय. शिक्षण म्हणजे विद्येचे दळण नव्हे, तर मनाला लावायचे ते एक वळण आहे. आणि हे वळण लावण्याचे काम गुरु करतात. माणसाला माणूसपण प्राप्त होण्यासाठी, योग्य गती , योग्य मती आणि त्यातून प्रगती साधण्यासाठी शिक्षणातून सुसंस्कार करण्याचे कार्य गुरु करतात. चांगला माणूस ज्ञानाने सुधारतो. आणि ही ज्ञानप्राप्ती करून समाजात चांगली . समाजबांधणी निर्माण करतो. गुरूचा महिमा अपार आहे. हा गुरु महिमा माझ्या स्वकाव्य निर्मितीतून मी खालील ओळीतून मांडलेला आहे. " चिखल मातीच्या गोळ्यास आकार तू देतोस ज्ञानदीपाची ज्योत पेटवून अंधकार दूर सारतोस शतशः नमन मी करिते गुरुवंदन करुनी आशीर्वाद मी घेते आयुष्यभर ऋणी राहूनी वंदन मी नित्यनेमाने करिते. गुरुवर्य आहे ज्ञानाचा भांडार अज्ञानाचा नाश करून होतील संहार घडवतील मनुष्यजीवना अपूर्ण जीवन आपले.... कर्तव्याचे बीजांकुरण करुनी पेटतील समाजमनाच्या उदरी ज्ञानार्जनाची शिदोरी वाटुनी वसतील शिष्यांच्या मनमंदिरी" गुरुमहिमा हा अपार असतो. गुरुहा आपल्याला सत्यसृष्टीत घेऊन जातो. आपल्या जीवनातील अंधकार दूर करतो. आपल्या जगण्याच्या दाही दिशा उजळून टाकतो. आपले जीवन सुंदर करतो. जीवनात कसं वागावं कसं राहावं कसं बोलावं कसं चालावं हे सर्व ज्ञान गुरूकडून मिळतं. अशा या अनंत ज्ञानाच्या तळमळीस मी वंदन करून शतशः नमन करते. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जि.नांदेड.

No comments:

Post a Comment