श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे लेख..... आईची महती आई ! आई हा शब्द ऐकला की प्रत्येकाला आठवते ती आपली जन्मदात्री आई ! काळजाला भिडणारा शब्द म्हणजे आई! आईची महती एवढी मोठी असते की कितीही सांगा ती अधुरीच! " आईची ही माया, शब्दात होणे नाही आईची ही ममता, शाईही पुरणार नाही आईची ही महती,काव्याला पेलणार नाही आईचा हा जिव्हाळा, लेखणीला झेपणार नाही" आई हा शब्द फक्त दोन अक्षरांचा नाही. या दोन अक्षरात ईश्वराच्या आत्मा सामावलेला आहे. ,आ, म्हणजे 'आत्मा' आणि ' ई' म्हणजे 'ईश्वर' ईश्वर प्रत्येकाच्या घरात आईचा रुपाने वास करत असतो. सर्वजण आईच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात. देवसुद्धा आईच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात. कारण आईच्या कुशीत माया, ममता ,लळा ,जिव्हाळा आणि प्रेम यांचा खजिना असतो, म्हणूनच आईला वात्सल्याचा महासागर म्हटले जाते.आईचं बाळ कितीही मोठ झाल तरी तिला तो लहानच असतं. म्हणून दूर कामासाठी , नोकरीसाठी गेलेला मुलगा घरी परत आला की आई त्याच्या तोंडावरुन हात फिरवते.त्याला कुरवाळते. आणि आईच्या पाया पडण्यासाठी मुलाने माथा टेकला की आईचा ऊर भरून येते. व ती भरभरून आपल्या मुलाला आशीर्वाद देते. 'सदा सुखी राहा !'बाळ असं म्हणते. केवढी ती माया केवढे ते अफाट प्रेम. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, अंगणातील पवित्र तुळस, भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, वाळवंटात प्याव अस थंड पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी पवित्र टाळी, आणी वेदनेनंतरची पहिली आरोळी. आई म्हणजे त्याग मुर्ती स्वतः उपाशी राहून आपल्या पिलास घास भरवते ती आई. खरंच ज्यांना आई असते ते किती नशिबवान असतात. एका कवीने म्हटले आहे ' स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी' म्हणूनच जोपर्यंत आई आहे तोपर्यंत जीवनात रस आहे. कारण आईशिवाय मुलं म्हणजे उदास, भकास,भयानक आणि कुरूप जीवन. आईचा विरहाच वर्णन करताना कवी गोसावी म्हणतात "आई तु गेली अन् घरी रिकाम झालं गावातल्या एखाद्या उद्ध्वस्त वाड्या सारखं, आई तू होतीस तेव्हा घर भरून वाहत होतं खळखळणाऱ्या नदीसारख! " आयुष्यभर आपली काळजी घेणारी आपली आई ही एक त्यागाची मूर्ती आहे. तिचं वर्णन कितीही केलं तरी थोडंच आहे.लेखणीत सामावणार नाही. आई खरंच महान आहे. माझासाठी वंदनीय, पुजनीय आहे. आईची महती सांगताना मला घेले या कवीचा कवितेच्या ओळी पुन्हा पुन्हा म्हणावयास वाटते. "काय सांगू आई, तुला तुझी ग महती, तुझ्यासारखी नाही , कुणीच या जगती रामकृष्ण आले गेले , मीही पामर जाईल तुझ्या महतीचा डंका , सार्या जगात गाईल." पुन्हा एकदा मी माझ्या आईला भावपूर्ण वंदन अभिवादन करते व तिचा असाच आशीर्वाद मिळावा हीच इच्छा बाळगते. शेवटी एकच सांगाव असं वाटते की आपली काळजी घेणाऱ्या आईची आपण म्हातारपणी तिला जपल पाहिजे तिची काळजी घ्यावी. आपण सर्वांनी आप आपल्या आई-वडिलांची सेवा करावी. कारण ज्या मुलाच्या मागे आई-वडिलांचा आशीर्वाद असतो त्यांची संकटे आपोआप दूर होतात. म्हणून पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांनी आईवडिलांची सेवा करावी. हीच ईश्वर सेवा आहे. 〰️〰️〰️〰️〰️〰️

No comments:

Post a Comment