लेख..... अन्न हे पूर्णब्रह्म माणसाच्या जीवनात अन्न, वस्त्र व निवारा हे जगण्यासाठी चे मुख्य घटक आहेत. सजीवाला जिवंत राहण्यासाठी , पोट भरण्यासाठी अन्न खावे लागते. आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी माणूस काम करत असतो. केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी तो अनेक उद्योगधंदे करत असतो. या उद्योग धंद्यातून भरपूर पैसा कमवतो. व श्रीमंत होतो. धनसंचय केल्याने त्याच्याकडे भरपूर धनधान्य, अन्न असते. या धनधान्याच्या उपयोग तो भरपूर प्रमाणात करतो. समाजात तीन घटक आहेत श्रीमंत, मध्यम आणि गरीब. त्यापैकी श्रीमंत या पहिल्या घटकातील अवलोकन केले असता श्रीमंत माणसाचा जवळ असलेले पैसे तो अनेकदा वाजवी खर्चात उडवितो. हे पैसे उडवत असताना तो गरिबांचा विचारही करत नाही. लग्नप्रसंगी अवास्तव खर्च करतो. लग्न प्रसंगात किंवा अनेक कार्यक्रमात अन्नपदार्थ वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. अन्नपदार्थ पोटाला लागण्यापेक्षा नासाडीच जास्त करतो. अर्थातच काही मोजके अपवादात्मक श्रीमंत लोक याचा विचारही करत असतील .अन्नाची नासाडी होऊ नये अन्नाचा वापर व्यवस्थित व्हावा. व त्यानुसार त्यांचे योग्य नियोजन सुद्धा असू शकते.असते. समाजातील दुसरा घटक मध्यम स्वरूपाचा या मध्यम घटकातील लोकं आपले पोट भरण्यासाठी काही छोटे मोठे उद्योग धंदे करतात व छोटी-मोठी नोकरी सुद्धा करतात व आपला उदरनिर्वाह भागवतात. अन्नाचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी या घटकातील लोक आवर्जून घेतात. पोटाला लागेल तेवढेच अन्न खावे, पात्रात उष्टे अन्न टाकणार नाही , पडणार नाही हे सुद्धा काळजी घेतात. लग्न प्रसंगात व इतरही कार्यक्रमात आवाका पाहूनच खर्च करतात. अन्नपदार्थाची नासाडी होऊ नये तसेच सर्वांना पोटभर जेवण मिळेल याची काळजी घेतात. अतिशय भयानक परिस्थिती असलेला गरीब वर्ग.आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी वन वन भटकतो. मोलमजुरी करून एक वेळच अन्न तरी मिळेल की नाही ही शाश्वती त्यांना नसते. हातावरचे पोट असणाऱ्यांची व्यथा फार भयानक असते. पुरेसे अन्न जेवायला मिळेल की नाही आपल्या मुलाबाळांना पोटभर अन्न देऊ शकतील की नाही ही अवघड बाब त्यांच्यासाठी असते. अन्न पोटाला पोटभर नाही मिळाले तर जगायचं कसं? हा प्रश्नही त्यांच्यासमोर असतो आणि भुकेने व्याकूळ होऊन मरण्याची वेळ त्यांच्यावर येते. दिवसभर काबाडकष्ट करून मिळवलेल्या पैशात आपली रोजीरोटी, उदरनिर्वाह ते चालवतात. पोटाला अन्न मिळावे म्हणून उन्हातानात, थंडीवाऱ्यात, पावसात आपल्या जिवाची पर्वा न करता काम करतात. भाकरीच्या चंद्राचा शोध घेतात, जेवणाची सोय करतात. आपल्या पोटाची खळगी अन्नाने भरतात आणि आपले जीवन कसेबसे जगतात. अशाप्रकारे अन्न हे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला समजते. अन्नापेक्षा मोठं कोणीच नाही.म्हणून कोणी किती जरी मोठा असेल आणि कितीही लहान असेल तरीही त्याला आपली पोटाची भूक भागविण्यासाठी अन्न खावेच लागते. म्हणून माणसाने अन्नाचा दुरुपयोग करू नये. अन्नाची नासाडी करू नये. जेवढे लागेल तेवढेच अन्न आपल्या पात्रात घ्यावे व आपले पोट भरावे. परमेश्वराने नेिसर्गात सूर्य,चंद्र वारा व चोवीस तासाची वेळ ही सर्वांना सारखीच दिली आहे. या निसर्गनियमाप्रमाणे माणसाने आपले जीवन जगावे. वेळोवेळी इतरांना मदत करावी. कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये याची काळजी सर्वांनी घ्यावी. व ज्यांना जसे जमेल तसे इतरांना मदतीचा हात द्यावा. अन्नदान करावे. व जे उपाशीपोटी आहे त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या घासातला घास देण्याचा प्रयत्न करावा. याच अर्थ आपल्याजवळ जेवढे आहे त्यापैकी थोडेफार देऊन इतरांची पोट भरावे. आज निर्माण झालेल्या कोरोना या आजाराच्या वैश्विक संकटाचा विचार केला असता आजची परिस्थिती गरिबांसाठी हलाखीची निर्माण झालेली आहे. आजच्या निर्माण झालेल्या या संकटकाळात आपण सर्वांनी मिळून गरजूंपर्यंत गरज कशी पोहोचेल हा प्रयत्न करूया, भुकेल्यांना अन्न कसे मिळेल हा प्रयत्न केलेला अतिउत्तम राहील. हे उद्भवलेले कोरोना संकट मोठे आहे. परंतु या संकटाचापेक्षाही माणूस मोठा आहे. आणि या माणसाला वाचवण्यासाठी त्यांना योग्य प्रकारे सर्वतोपरी मदत करायला हवी. कारण माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्नाची फार गरज असते. म्हणूनच म्हटले आहे ' अन्न हे पूर्णपरब्रम्ह आहे.' 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि.नांदेड.

No comments:

Post a Comment