(5) लेख.... *प्रदूषण एक भीषण समस्या* परिसरातील अहितकारक बदलांना 'प्रदूषण 'असे म्हणतात. हे प्रदूषणाचे अहितकारक बदल आजच्या बुद्धिमान माणसाने स्वतः च्या समोर स्वतः हे प्रदूषणाचे संकट निर्माण केले आहे. प्रदूषणाचे हे संकट काही प्रमाणात कमी करता येईल. मर्यादा ठेवता येईल पण त्यासाठी पृथ्वीवरील प्रत्येक मानव जागरूक झाला पाहिजे. 'झाडे लावा, झाडे जगवा' ही मोहीम फक्त मोहीमच न राहता ते प्रत्यक्षात उतरून झाडे लावली पाहिजे आणि जगवलीच पाहिजे. पर्यावरणातील झाडे न कापता अधिकाधिक लावून जगवणे हे ध्येय ठेवले तरच प्रदूषणाची ही भीषण समस्या कमी करता येईल. संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' झाडे हे आपल्याला सावली, फुले ,फळे देतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे व जगविणे आवश्यकच आहेत. हे जग निर्माण करताना परमेश्वराने माणूस व पर्यावरण यात सुंदर समतोल साधला आहे. निसर्ग व मानव एकमेकांना पूरक होते. परंतु औद्योगिक क्रांती झाली आणि हा सर्व समतोल बिघडला. प्रदूषणाचे विविध प्रकार आहेत. त्यात प्रामुख्याने ध्वनिप्रदूषण वायुप्रदूषण , जलप्रदूषण हे जास्त प्रमाणावर निर्माण झालेली भीषण समस्या आहे. प्रदूषणाचा परिणाम होत असल्यामुळे वातावरण दूषित झालेले आहे. (वायू प्रदूषणामुळे होणारे परिणाम) माणसाची गती वाढली हवेचे प्रदूषण निर्माण झाले. हवेच्या प्रदूषणामुळे माणसाला श्वासोच्छवासला त्रास होतो. विविध आजार होतात. आकाशातील दूषित हवेचे ढग, पावसाळी ढगांवरही मात करतात. माणसाने गिरण्या कारखाने सुरू केले. आणि मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण , जल प्रदूषण निर्माण झाले. (जल प्रदूषण) कारखान्यामुळे दूषित पाणी नदीत सोडण्यात आले. नद्यांचे सारे पाणी दूषित झाले. या जलप्रदूषणामुळे माणसाला नाना प्रकारच्या आजाराला , रोगराईला आणि साथीच्या आजाराला बळी पडावे लागले. पाण्याची अवस्था किंवा त्यामधील घटक द्रव्य यांच्यामधील माणसाने अहितकारक बदल घडून आणून जलप्रदूषण निर्माण केले आहे. (ध्वनी प्रदूषण) वातावरणातील अनावश्यक, असुविधाजनक ,अप्रिय, प्रतिकूल यांच्या हानिकारक परिणाम होऊन ध्वनी प्रदूषण निर्माण झाले. माणसाने लावलेले विविध शोध स्वतःसाठी निर्माण केलेल्या अनेक गोष्टी ध्वनिक्षेपक, दूरचित्रवाणी अशा कितीतरी गोष्टी ध्वनिप्रदूषण निर्माण करीत आहेत. सतत मोठे मोठे आवाज कानावर पडल्याने कर्णबधिरता येण्याची मोठी शक्यता आहे. या ध्वनिप्रदूषणामुळे माणसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन मानसिक ताण निर्माण होतो, रक्तदाबावर ही विपरीत परिणाम होतो.पोट भरण्यासाठी पोटाच्या मागे लागलेला ग्रामीण समाज शहराकडे धावू लागला . त्यामुळे शहरातील झोपडपट्टी वाढली आणि प्रदूषणही वाढले. यांत्रिकीकरणाचा दुष्परिणामांच्या अनेक संकटापैकी वातावरणातील ओझोन वायू नष्ट होण्याचे संकट आता वसुधेवर कोसळले आहे.म्हणजे प्रदूषणाचा भस्मासुर माणसानेच निर्माण केला आहे. आणि आज तो माणसाच्या जीवावर उठला आहे. या सर्वच्या सर्व प्रदूषणामुळे वातावरणाचा तोल ढासळला असून तो समतोल ठेवण्याकरिता प्रदूषणावर नियंत्रण ठेवावयास तसेच प्रदूषण होणाऱ्या गोष्टींची दक्षता पाळावयास पाहिजे. त्यामुळे प्रदूषणास सहाय्य होते अशा व्यवस्थेवर प्रतिबंध घातले पाहिजे. कारण माणसासाठी प्रदूषण ही भीषण समस्या होऊन बसलेली आहे. ही समस्या नष्ट करायची असेल तर पर्यावरण विषयाच्या दृष्टिकोन लहानपणापासूनच मानवी मनावर बिंबवायला सुरुवात केली पाहिजे. कारण उद्याचा नागरिक हा पर्यावरण जागरूक नागरिक हवा, तरच मानवजातीची धडगत आहे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ लेखिका ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ( सहशिक्षिका) ता. हदगाव जि. नांदेड.

No comments:

Post a Comment