( 5) लेख समजदार नागरिक , सुजान नागरिक माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजात वावरताना माणसाने थोरामोठ्यांचा आदर करणे , सर्वांशी मानसन्मानाने वागणे, लहानास न दुखावणे, सर्वांशी प्रमाणिकपणे वागणे या समजदारी च्या गोष्टी माणसांमध्ये असणे आवश्यक आहे. व्यक्ती आणि समाज जेव्हा विविध चांगल्या गुणांनी युक्त होतात तेव्हा समाजाचा विकास साधतो. याउलट सद्गुण लोप पावून दुर्गुण शिरले की समाजाचे पतन होते व प्रगती खुंटते. सुजान नागरिक म्हणजे ज्या गुणांमुळे, तत्त्वामुळे व्यक्ती समाज आणि विश्व यामध्ये परस्पर सुसंवाद साधून मानवाचा विकास होतो. असे सुजनात्व ज्या नागरिकामध्ये आहे तो नागरिक म्हणजे समजदार नागरिक होय. आपण जीवनात कसं वागावं? तर सर्वांशी चांगलं वागावं. हे समजणे म्हणजे समजदार नागरिकाचे लक्षण होय. नम्रता ,सौजन्य , सभ्यता, शिष्टाचार आणि आर्जवता ही जीवनमूल्ये ज्याच्या अंगी असते ती व्यक्ती समजदार व्यक्ती होय. सभ्यता आणि सौजन्य हे समजदारीचे दोन चक्षू आहेत. आपल्या जीवनात सर्वांशी मर्यादशील वागणं हे शिष्टाचार होय. ह्या शिष्टाचाराचे सुवर्णसूत्र ज्याच्यामध्ये आहे ती व्यक्ती सुजान नागरिक होय.सुजाणता म्हणजे सदाचाराचे वळण.ज्या परिसरात आपण वाढतो व वावरतो त्या परिसरातील सामाजिक एकसंघता बाळगणे व टिकून ठेवणे तसेच निसर्ग प्राणी पक्षी यांचे संरक्षण व जोपासना करण्यासाठी प्रेरित होणे व साऱ्याबद्दल प्रेम,आपुलकी निर्माण होणे म्हणजे सुजान नागरिक होय. आपला आत्मसन्मान जागृत ठेवून आत्मोद्धारासाठी प्रयत्नशील राहून आपल्या व्यक्तिगत व सामाजिक जीवनाची जबाबदारी चांगल्याप्रकारे पेलणे म्हणजे समजदार नागरिक होय. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि. नांदेड.

No comments:

Post a Comment