🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ➖➖➖➖➖➖➖ *🌺जीवन विचार*🌺 〰〰〰〰〰〰〰 संध्याकाळच्या संधीप्रकाशात ही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला. 'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणुस एकांताला जास्त घाबरतो. 'It is better to have loved and lost, than never to have loved at all!' अत्यंत महागडी,न परवडणारी खर्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य ". जोपर्यंत स्वतःच्या विचांराचा शोध स्वतःलाच लागलेला नसतो तोपर्यंत ठीक चाललेल असतं सगळ्यांचं. "आंब्याच्या झाडाला खुप मोहोर येतो; पण फळ थोडे लागते.आयुष्याचे झाडही तसेच आहे.त्याला आशेचा मोहोर खुप येतो". smt.pramilatai senkude म्हणूनच म्हणतात 'आयुष्य ही चैन नसुन एक कर्तव्य आहे'. आणि म्हणून जोपर्यंत आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत नाही, तोपर्यंत आपण आपले जीवन सार्थकी लागले असे म्हणूच शकत नाही. आपले कर्म , कर्तव्य आपण जर का प्रामाणिकपणे निभावले तर आपल्याला आपल्या जीवनात समाधानाचे आयुष्य लाभते.कोणत्याही कारणाने आपण जर का आपला स्वार्थ पाहून स्वार्थी प्रवृत्तीने वागलो तर ही स्वार्थी प्रवृत्ती दुसऱ्याला नुकसानकारक ठरते.पण आपल्यालाही कधीना कधीतरी हानीकारक ठरते. *ज्यांचे कर्म , कर्तव्य निस्वार्थीवृत्तीचे , प्रामाणिकपणा जोपासणारे असते अशांचे स्थान महान असते.* ' जीवन म्हणजे प्रेम, कर्तव्य आणि श्रमरुपी सरितांचा संगम होय'. =================== 🙏शब्दांकन /संकलन🙏🏻 ✍ प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता. हदगाव, जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह* 💐🍀💐🍀💐🍀💐

No comments:

Post a Comment