*🌹जीवन विचार*🌹 *〰〰〰〰〰〰〰* http://pramilasenkude.blogspot.in ➖➖➖➖➖➖➖ *मानसाची खरी विद्या तिच आहे की जिच्यामुळे आपण आपल्या अंतरात्म्यास स्वतः स,ईश्वरास आणि सत्यास ओळखू शकतो.काळाच्या गतीप्रमाणे चालणारे जग फार मोठे (अफाट) आहे.जगाच्या या ज्ञानसागरात सर्वत्र सभोवताली ज्ञान अफाट पसरलेले आहे.ज्ञानामुळ का जगाव आणि कसं जगाव हे जस कळत तसच मनुष्य निखळ ज्ञानातुन निर्भय होतो.*smt.pramilatai senkude. *ज्ञानाची उपासना आयुष्यभर जरी केली तरी सागरातील थेंबाप्रमाणे होईल.खिन्न मनावर ज्याप्रमाणे नव्याने जीवन जगण्याची प्रेरणा* *आपल्याला पुस्तकातील वाचन केलेल्या ज्ञानामुळे मिळते.त्याचप्रमाणे दुःखाचा संकटाचा प्रसंगी सुद्धा ह्या ज्ञानाचा आपल्याला आधार होतो. मदत होते.* *पण त्यासाठी आपल्याला आपले कान व डोळे सदैव खुले ठेवावे लागते.आपली जीवन ज्योत सतत तळपत तेवत ठेवायची असेल तर आपल्याला ज्ञानाचा* *स्नेहाची नितांत गरज असते.ज्ञान अनंत असते ,ज्ञानाला समुद्राची सखोलता असते,* *आकाशाची अफाटता असते.सूर्याच तेज असते.* *जग हे माहितीचे ,ज्ञानाचे व अनुभवाचे ज्ञानसागर असून हे ज्ञान मिळवणारे प्राप्त करणारे ज्ञानोपासक म्हणजेच ज्ञानसागरात पोहणारे राजहंस होत.* 〰〰〰〰〰〰〰 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 ✍शब्दांकन / संकलन 🙏श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (सह.शिक्षिका)🙏 जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments:

Post a Comment