✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 31/01/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-   ◆ १९५० - राष्ट्रपती म्हणून डॉ.राजेंद्रप्रसाद यांचे संसदेपुढे पहिले भाषण. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते. 💥 जन्म :-  ◆ १८९६ - दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड महाकवी.  ◆ १९३१ - गंगाधर महांबरे, ज्येष्ठ संगीतकार  ◆ १९७५ - प्रिती झिंटा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :-   ◆ १९९४ - वसंत जोगळेकर, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक.  ◆ २००० - के.एन.सिंग, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते.  ◆ २००४ - सुरैय्या, ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कोकणचा राजा हापूस आंबा नवी मुंबईतल्या एपीएमसीमध्ये दाखल झालाय. यावेळी आंबा दाखल व्हायला तब्बल २ महिने उशीर झाला. व्यापारी वर्गानं आंब्याचं पूजन करून कोकणच्या राजाचं केलंय स्वागत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - महाराष्ट्र सरकारने राज्यातील रिक्त असलेली 70 हजार पदे भरण्याचा घेतला निर्णय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, त्यात हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात 1 लाख 70 हजार पदे रिक्त आहेत. गेल्या 5 वर्षांपासून यावर भरती करण्यात आलेली नाही.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *भारतातील कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण केरळात, खास वॉर्डात उपचार सुरु, हुआन विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याची माहिती तर 'कोरोना'मुळे चीनमधील हुबे विद्यापीठात 27 भारतीय अडकले, 7 विद्यार्थी महाराष्ट्रातील, मदतीसाठी सरकारला विनंती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आर्थिक स्थिती पाहता जिल्ह्यांचं विभाजन शक्य नाही, अर्थमंत्री अजित पवारांकडून स्पष्ट, तर देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीडलाही ब्रेक लावण्याचे संकेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर, आता रेल्वेच्याच तिकीटदरात मिळणार विमानाचं तिकीट, मुंबईतील तरुणांच स्टार्टअप असलेलं 'रेलोफाय' अॅप लॉन्च* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि संपादक विद्या बाळ यांचं निधन, महिलांना पुरुषांबरोबरच्या समान हक्कांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची विशेष ओळख होती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह, सोहळ्याला राज्यभरातून हजारो भाविकांची पंढरपुरात गर्दी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *आरोग्यदायी चांगल्या सवयी* http://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_54.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *' आभाळ '* कवी ज्ञानेश्वर बा.शिंदे अंचलगाव, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर. 8308035082 बाप माझा रोज पाही निळ्या आभाळ छताला घाम पेरला शिवारी न्हावु घाल धरणीला. [१] दुःख बापाच्या मनीचं साऱ्या रानात पसरे कोणा गवसेल कसे ? घाव काळीज बोचरे [२] सारं आयुष्यच त्याचं उसवल मातीमधीं सांधायाला त्याला कधी नाही मिळालीच संधी. [३] नको करू हेळसांड तुझा भरवसा त्याला बरस तू मनसोक्त तुच आसरा एकला. [४] *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजची प्रश्नमंजुषा* 1) *अल्युमिनियम हा धातू कोणत्या खनिजपासून तयार केला जातो ?* बाक्सईट 2) *दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश कोणता ?* ब्राझील 3) *भांगडा हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?* पंजाब 4) *आयुर्वेदाचा उगम कोणत्या देशात झाला ?* भारत 5) *जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश कोणता ?* भारत *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विनायक हिरवे, सहशिक्षक, कोल्हापूर 👤 बालाजी पुलकंठवार, सहशिक्षक, धर्माबाद 👤 हिलाल पाटील *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निसर्गाच्या सानिध्यात घालविलेले क्षण मनाला प्रसन्न करतात. उमललेल्या नाजूक फुलांचा बहर, हिरव्यागार रानातून मंद शिळ घालणारा प्रसन्न वारा या सर्वांमध्ये निसर्गाचं एक दैवी रूप दडलेलं आहे. ही सुंदर कलाकृती पाहून अचंबित व्हायला होतं. निसर्गाचं निरीक्षण केल्यावर जाणवतं की, या नाजूक फुलांवर सुंदर रंगाची उधळण कोणी केली असेल ?* *हिरव्या रंगाने नटलेल्या धरणीवर निळं आकाश पसरलेलं आहे. या अथांग आकाशावर सर्व दिशांना उजळून टाकणारा अलौकिक रंगाचा मनमोहक चित्रण करणारा चित्रकार कोण आहे ? आपल्या आजूबाजूला पसरलेल्या निसर्गाचा चमत्कार व सुंदरता बघायला मानवाकडे फक्त एक नजर आहे. पण तो अनामिक चित्रकार असंख्य नजरेने क्षितिजा पलिकडे पाहात आहे. निसर्गाचे हे सगुण व प्रेरणेने भरलेलं भव्य सृष्टी चित्र सुंदरतेने चित्रित करणा-या चित्रकाराला माझा सलाम !!!* ••● *॥ रामकृष्णहरी ॥* ●•• ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *पोटापुरता पैसा पाहिजे* *नको पिकाया पोळी,* *देणाऱ्याचे हात हजारो* *दुबळी माझी झोळी.* *या दुनियेत देणारे खूप आहेत,त्यांची* *वानवा अजिबात नाही कारण तिरुपती बालाजी,आणि* *शिर्डीचे साईबाबा यांच्या दानपेटीत करोडो रुपयांचे रोज* *पडत असतात.* *या दानाच्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही पण निसर्गाचा एक* *नियम आहे आपण जे जे वाटाल,जे जे पेराल, जे जे* *दुसऱ्याला द्याल ते लाख गुणांनी आपल्याला परत* *मिळाल्याशिवाय राहत नाही,हा निसर्गाचा मोठा चमत्कार म्हणावा* *लागेल ना?* *चमत्काराच्या शोधात दुनियेची वाटचाल चालू आहे. _"गिरसप्पाच्या* *धबधब्यापेक्षा आकाशाच्या अथांग उंचीवरून* *कोसळणार्‍या पावसाच्या धारा हा अधिक मोठा चमत्कार आहे,"_ असे* *महात्मा गांधी म्हणाले. एखादी वस्तू, नसलेल्या जागी निर्माण करणे,* *हा चमत्कार असेल, तर चमत्काराची सुरूवात सृष्टीपासून* *झाली, असे* *म्हणण्याइतपत कोडे विज्ञानालाही पडले आहे. छोट्यातून मोठी गोष्ट* *निर्माण होण्याचा चमत्कार कुठल्याहीपेक्षा* *शेतातच अधिक होतो. तुम्ही एक दाणा शेताला द्या* *आणि त्यावर थेंबथेंब पाणी सोडा.* *थोड्या दिवसात फांदी फांदीला हजार लोंब्या लोंबलेले घड* *अन् मणभर दाणे तुम्हाला शेत परत करते.* *हा चमत्कार, मिळालेले देऊन टाकले, म्हणून 'चमत्काराचा* *धबधबा' पाऊस म्हणून बरसला.* *कुठल्यातरी अज्ञात शक्तीने कुठल्या तरी अज्ञात तर्‍हेने, हे विश्व साकार* *केले. तुम्ही मातीला दिलेला एक छोटा दाणा लाखो आरशांच्या* *प्रतिबिंबांनी आणि अनेक रसांच्या रूचींनी सृष्टीने* *तुम्हाला परत केला. म्हणजे शक्ती वाढवण्याचा संदेश एकच आहे, "देत* *राहा. मिळत राहील."_* *जे जे आपणासी ठावे* *ते ते दुसऱ्याशी द्यावे* *शहाणे करून सोडावे* *सकलजन।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात कोणताही जीव जन्माला आला की,त्याचा जीवनप्रवास ख-या अर्थाने सुरू होतो.त्याला त्याचे जीवन कसे जगायचे यासाठी परमेश्वराने त्यांच्यासोबत मन आणि बुद्धी ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी त्याला म्हणजे विशेष करुन मानवाला आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरेल अशी भेट म्हणून बहाल केली आहे. ह्याचा आधार घेऊनच जीवन कसे जगायचे याचे तंत्र तो शिकतो.त्यानंतर तो आपल्या मनाचा आणि बुध्दीचा चांगला सदुपयोग केला तर नक्कीच जीवनाचा प्रवास सुखावह करतो आणि जर का दुरुपयोग करायला लागला तर जीवनप्रवास दु:खमय व्हायला लागतो.ह्या दोन गोष्टी मन आणि बुद्धी यावरच अवलंबून आहेत.मग मानवरुपी जीवाने आपले जीवन कसे जगायचे आणि आपले जीवन जगण्यासोबत इतर जीवांना आपण न दुखवता कसे जगवायचे हे जरी कौशल्य मनाच्या आणि बुध्दीच्या सृजनशील कौशल्याने हाताळायला आले तरी परमेश्वराने दिलेल्या जन्माचे नक्कीच सार्थक झाल्याचे समाधान वाटेल.हा जन्म परत येणार नाही हे तर संत्र्याच्या आहेच.यानंतर आपले शरीररुपी अस्तित्व संपणार आहे पण आपण आपल्या जीवनात केलेले चांगले कार्य येणा-या जीवांच्या जीवनासाठी प्रेरणा ठेवून जाणार आहे अर्थात तुम्ही तुमच्या कार्याने अमर राहणार आहेत हे लक्षात असू द्यावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *युक्तिच सर्वश्रेष्ठ* नदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळ्याने विचार केला की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती. तात्पर्यः युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून मार्ग काढता येतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment