✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 25/01/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *राष्ट्रीय मतदार दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  ● १९७१ - हिमाचल प्रदेशला भारताचे १८वे राज्य म्हणून मान्यता. ● २००१ - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईवादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर. ● २००४ - लेखिका अमृता प्रीतम, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि माजी सरन्यायाधीश एम.एन. वेंकटचलय्या यांना पद्म विभूषण किताब जाहीर. तसेच दिग्दर्शक गुलजार, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, जपानचे पंतप्रधान योशिरो मोरी, पत्रकार एम.व्ही. कामत, व्हायोलिनवादक एन. राजम यांना पद्मभूषण किताब जाहीर. 💥 जन्म :- ● १९३१ - डीन जोन्स, अमेरिकन अभिनेता. ● १९३३ - कोराझोन एक्विनो, फिलिपाईन्सची राष्ट्राध्यक्ष. 💥 मृत्यू :- ● २००१ - विजयाराजे शिंदे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या. ● १९८०-लक्ष्मणशास्त्री दाते, सोलापूरचे 'दाते पंचाग कर्ते *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राज्य सरकारकडून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून राज्यात शासकीय-निमशासकीय सेवेतील मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीत आरक्षण लागू करण्यात येण्याचे संकेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *वंचितनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद, मुंबई औरंगाबादसह काही ठिकाणी हिंसक वळण, बंद यशस्वी तर दगडफेक करणारे कार्यकर्ते वंचितचे नसल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *केंद्र सरकारने शरद पवारांची सुरक्षा हटवली, केंद्र सरकारवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा घणाघात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पोलीस शिपाई आणि चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी म्हाडाची 10 टक्के घरे आरक्षित ठेवणार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *चीनमध्ये मृत्यूतांडवासाठी कारणीभूत कोरोना वायरसचा महाराष्ट्रात शिरकाव, परदेशातून आलेल्या दोन मुंबईकरांना संसर्ग, प्रादुर्भाव रोखण्याचं आव्हान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर 31 जानेवारीपसून गारेगार प्रवास, ठाणे-वाशी आणि ठाणे-पनवेल मार्गावर 16 फेऱ्या, एसी लोकलचं सारथ्य महिलांकडे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *टीम इंडियाने पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टीत न्यूझीलंडचा सहा विकेट्सनी उडवला धुव्वा, श्रेयस अय्यर सामनावीर, राहुल आणि विराटची धडाकेबाज खेळी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *राष्ट्रीय मतदार दिवस निमित्ताने* *मतदार राजा जागा हो .......!* इंग्रजांच्या दीडशे वर्षे गुलामगिरीच्या नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाले. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देश प्रजासत्ताक झाले. भारतात लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालविला जातो. जगात सर्वात यशस्वी लोकशाही देश म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते. ही लोकशाही यशस्वी करण्यामागे येथील नागरिकांचा म्हणजे मतदारांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालविलेले राज्य. येथे मतदार आपल्या मतदानाव्दारे लोकप्रतिनिधींची निवड करत असतात. त्यामुळे प्रत्येक मतदारांनी आपले अमूल्य मत व्यक्त करणे खूप महत्वाचे ठरते. ........... https://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_22.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आईचे ऐका* - भारती धुपद-सोळंके औरंगाबाद सखा तुका ऐंका रे जरा पोटभर जेवण घरचे करा वरण भात भाजी पोळी पिझ्झा बर्गरला मारा गोळी शेपू मेथी पालक भाजी खावी रोज ताजी ताजी आईचे भजी लय भारी खाऊ नका रे पाणीपुरी वडापाव खाऊन पोट दुखतं डॉक्टरकडे मग जावं लागतं डॉक्टर देतात औषधांचा डोस पाहून मग होता बेहोश आईचे सर्व काही ऐंकायचे बाहेरचे उघडे नाही खायचे आईच्या हाताला चवच न्यारी कधीच नाही पडणार आजारी *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *मुघल सत्तेचा संस्थापक कोण ?* बाबर 2) *वायुसेनेच्या प्रमुखाला काय म्हणतात ?* एअर चीप मार्शल 3) *जलसेनेच्या प्रमुखाला काय म्हणतात ?* एडमिरल जनरल 4) *अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष कोण होते ?* बराक ओबामा 5) *सस्तन प्राण्यांच्या हृदयात किती कप्पे असतात ?* 4 कप्पे *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रा. वैशाली देशमुख, कुही नागपूर साहित्य स्पंदन समूह, संचालिका 👤 दत्ताहरी पाटील आवरे, धर्माबाद 👤 ललेश पाटील मंगनाळीकर 👤 राजीव सेवेकर 👤 महेबूब पठाण 👤 अंबादास कदम 👤 राहुल आवळे 👤 नरेश दंडवते, पत्रकार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक तरुण आपल्या विधवा आईला सोडून पळून आला आणि एका मठात तंत्र मंत्र साधना करू लागला, अनेक वर्षे लोटली, एके दिवशी त्याने आपले वस्त्र सुकविण्यासाठी टाकले आणि ध्यान करू लागला, डोळे उघडल्यावर पाहतो ते काय! एक कावळा त्याचे वस्त्र ओढत असल्याचे त्याला दिसले, हे पाहून तरुणाने त्या कावळ्याकडे क्रोधाने पाहिले.त्याक्षणी तो कावळा जळून खाक झाला. आपल्या सिद्धीचे यश बघून तो खुश झाला आणि अहंकाराने भिक्षा मागायला गेला. त्याने एका दारावर जावून आवाज दिला. पण कोणीच बाहेर आले नाही. त्याला फार राग आला. त्याने अनेक वेळेला आवाज दिला तेंव्हा एका स्त्रीने म्हटले," महाराज! थोडा वेळ थांबा! मी साधना समाप्त होताच आपल्याला भिक्षा वाढते." तरुणाने हे ऐकले आणि त्याचा पारा चढला. त्याने म्हटले,"दुष्टे! तू आम्हाला ओळखत नाहीस. आमची परीक्षा बघतेस काय? याचे किती वाईट परिणाम होतील हे माहित आहे काय?"* *हे ऐकताच घरातील स्त्री म्हणाली," माहित आहे! तुम्ही शाप द्याल. परंतु मी काही कावळा नाही जो आपल्या क्रोधाग्नीत भस्म होईल. मातेला एकटी सोडून मुक्ती मिळवू पाहणाऱ्या अहंकारी संन्याशा! तू माझे काही बिघडवू शकत नाही." तरुणाने हे ऐकले आणि त्याचा सगळा गर्व चक्काचूर झाला. त्याने बाहेरूनच क्षमा मागितली तेंव्हा गृहस्वामिनी घराबाहेर आली तेंव्हा त्याने तिला तुम्ही कोणती साधना करता ? असा प्रश्न केला. तेंव्हा ती म्हणाली,"आपली साधना तीच असते , आपण जी कर्मे करतो ती कर्म सोडून मुक्तीच्या मागे धावलं तर मुक्ती मिळणे दुरापास्त होते व यातूनच अहंकार निर्माण होतो. मी गृहस्थ धर्माची उपासना करते आणि त्यात कसूर करत नाही." हे ऐकून त्याने अहंकाराचा त्याग करून व सन्यस्त जीवन सोडून मूळ कर्तव्याचे पालन करण्यासाठी आईकडे परतला. प्रत्येकाने आपले विहित कर्तव्य योग्यपणे करावे याची जाणीव त्याला झाली.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *माणस अपयश का आलं यासाठी वेगवेगळी संरक्षण कवच वापरतांना* *आपण सगळ्यांनी बघितली आहे.* *इंसान जब हथेली की रेखाओं में* *भविष्य ढूंढने लगे,* *तब समझ लेना कि,* *उसकी बाजुओं में ताकत,* *और* *मन में विश्वास खत्म हो गया है..* *कारणं’ देणाऱ्यांना चपखल ’ उत्तर* *जीवनात अपयश येणं चुकीच नाही. पण प्रयत्नच न करणं हे मात्र चुकीचं* *आहे. वेळोवेळी कारणं देवून* *वेळ निभावून नेणारी माणसे आपण पाहिलीच असतील. ती नेहमी* *माझ्याकडे ‘काय कमी’ आणि दुसऱ्याकडे ‘काय जास्त’* *यातच मशगुल असतात.* *अशा विचासरणी त्यांना जीवनात पुढे जावू देत नाही. जीवनात* *अनेक उणीव असताना त्याचा विचार न करता* *यशाचं शिखर सर करणाऱ्या व्यक्ति कोण आहेत? ते जाणून घेऊयात...*_ : *माझ्याकडे असलेल्या छोट्या नोकरीत मी काहीही करु शकत नाही.* : *रिलायन्स उद्योगसमूहाचे जन्मदाते धीरुभाई अंबानी पेट्रोल पंपावर तेल* *भरण्याची लहानशी नोकरीच करायचे. त्यांनी पुढे* *मिळवलेले यश आपल्याला माहिती आहेच.* *मला वर्गात काहीच येत नाही.* *जगाला सापेक्षतावादाचा सिध्दांत देणारे अल्बर्ट आईनस्टाईन यांना तर* *अभ्यासात अजिबात गती नव्हती.* *मी अपंग आहे.* *प्रसिध्द नृत्यांगणा सुध्दा चंद्रन कृत्रिम पायाने नाचून यशस्वी झाल्या.* *जेसिका कॉक्सला हात नव्हते. तिने पायाने विमान उडवले. शरीरात* *हालचाल करण्याची क्षमता नसताना स्टीफन हॉकिंग फार मोठे* *संशोधक झाले. मार्क* *इंग्लिसला पाय नव्हते व अरुनिम्मा सिन्हाला अपघात पाय गमवावे* *लागले होते. ते दोघेही जगातील सर्वात उंच शिखर माऊंट* *एव्हरेस्टवर चढले.* *लहानपणीच माझे वडील वारले.* *ऑस्करविजेते संगीतकार ए. आर. रहमान यांच्या लहानपणीच त्यांचे* *वडील वारले होते.* *लहानपणीच कुटुंबाची जबाबदारी त्यांना सांभाळावी लागली.* *गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सुध्दा त्यांच्या बालपणी त्यांच्या* *कुटुंबाची जबाबदारी सांभाळावी लागली होती.* *मला इंग्रजी येत नाही.* *प्रसिध्द उद्योगपती गौतम अदानी व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी* *इंग्रजीचा फार वापर करत नाही.* *तरीही ते यशस्वी आहेत.* *माझे शरीर खूप मोठे आहे.* *एकेकाळी अदनान सामीची ओळख त्याचे मोठे शरीर होते. आज त्याचा* *फिटनेस पाहून सर्वच अचंबित होतात.* *मी फारच किडकिडित आहे.* *महम्मद अली सुध्दा शरीराने* *किडकिडित होते. तरीही ते सात वेळा* *बॉक्सिंगचे विश्वविजेते झाले.* *मला कुणाचा वरदहस्त (गॉडफादर)* *नाही.* *वरील सर्व उदाहरणातील एकाही व्यक्तीला कोणीही वरदहस्त नव्हते.* *वरील उदाहरणे पाहिली तर कळते की, या लोकांनी आपल्या कमजोरीवर* *मात करुन यश मिळवले आहे. आपल्याकडे जे नाही* *त्याची ते व्यथा करत बसले नाहीत. जे आहे त्यात बेस्ट करण्याचा* *त्यांनी प्रयत्न केला. म्हणून आज त्यांचे नाव घेतले जाते.* *ग्रामीण, गरीब, श्रीमंत अशा* *सर्व प्रकारची माणसे यशस्वी* *होतात. ती शक्ती निसर्गाने* *त्यांना दिलेली आहे. त्या* *शक्तीला साकार करण्यासाठीचे मार्ग सापडले की झालं.* *प्रयत्न करा, यश तुमची वाट बघतय.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात सर्वात जास्त वेगवान आणि गतीमान जर कोण असेल तर या प्रश्नांचे उत्तर अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकतील.पण माझ्या मते सगळ्यात जास्त वेगवान आणि गतीमान जर कोणी असेल तर फक्त मानवी मनच आहे.पहा ह्या मनाची आतापर्यंत कुणीही वेग आणि गती मोजली नाही.बहिणाबाईंच्याच शब्दांत सांगायचे झाले तर मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं,किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर......मन पाखरू पाखरू तयाची काय सांगू मात आता व्हतं भूइवर गेलं गेलं आभायात... अशा या मनाची गती एवढी आहे की ती मोजता येणेच अवघड आहे.अशा या मनाला जर का आपण आपल्या जीवनात आपल्या वशमध्ये ठेवले तर तो यशस्वी होतो आणि नाही ठेवले तर जीवन जगण्यात अपयशी ठरतो. अशा सर्वश्रेष्ठ मनाला आपल्या वशमध्ये ठेवण्याचा अधिक प्रयत्न करायला हवा.म्हणजेच आपल्या जीवनाचा खरा अर्थही कळेल आणि सुखही मिळेल. *©व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🏹🌸🍃🏹🌸🍃🏹🌸🍃🏹🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महत्‍वाच्‍या तीन गोष्‍टी* एका गावाजवळ एक अरण्य होते. त्‍या अरण्यात अनेक सुंदर व गोड गळ्याने गाणारे पक्षी येऊन निरनिराळे सुंदर आवाज काढत असत. एके दिवशी एका शेतक-याने एका पक्ष्‍याला पकडले. तो पक्षी सुरेख असा दिसत असून त्‍याचा आवाजही छान होता. पक्ष्‍याला पकडल्‍यावर तो शेतकरी म्‍हणाला,’’ मी तुला पिंज-यात ठेवून चांगले चांगले खायला घालेन आणि त्‍या बदल्‍यात तू मला गोड आवाजात गाणे म्‍हणून दाखवित जा.’’ पक्षी म्‍हणाला,’’ पिंज-यात तर मी जास्‍त दिवस जगणारच नाही. तर मी तुला कसे काय गाणे ऐकवू?” शेतकरी म्‍हणाला,’’ तर मग मी तुला मारून खातो.जसा तुझा आवाज गोड आहे तसेच तुझे मांसही अतिशय चवदार असणार याची मला खात्री वाटते.’’ पक्षी म्‍हणाला,’’ एवढ्याशा मला खाऊन तुझी भूक कशी काय शमणार?, त्‍या पेक्षा मी तुला महत्‍वाच्‍या तीन गोष्‍टी सांगतो. त्‍या तू कधीही स्‍मरणात ठेव. त्‍याने तुझा अपार फायदा होईल.’’ त्‍या पक्ष्‍याच्‍या गोड बोलण्‍यावर शेतक-याने विश्‍वास ठेवला व त्‍याला सोडून दिले. शेतक-याने सोडताच पक्षी झाडाच्‍या एका टोकावर जाऊन बसला व म्‍हणाला,’’ शेतकरीदादा, पहिली महत्‍वाची गोष्‍ट म्‍हणजे बंदिवासातून सुटण्‍यासाठी कैदी जी आश्‍वासने देतो त्‍यावर कधीही विश्‍वास ठेवू नकोस, दुसरी महत्‍वाची गोष्‍ट म्‍हणजे आपल्‍या हाती आलेल्‍या गोष्‍टीला विचार केल्‍याशिवाय कधीही सोडून देऊ नकोस, आणि तिसरी महत्‍वाची गोष्‍ट म्‍हणजे हातातून गेलेल्‍या क्षणाचा, किंवा झालेल्‍या चुकांबद्दल कधीही शोक करत बसू नकोस यातून तुझा काहीच फायदा होणार नाही.’’ एवढे बोलून पक्षी उडून गेला.. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment