✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/01/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  = *पत्रकार दिन* 💥 ठळक घडामोडी :-  ● १९२४ - वि.दा. सावरकर यांची जन्मठेपेतून सुटका. 💥 जन्म :- ● १८१२ - दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ● १९५९ - कपिलदेव निखंज, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  ● १९७१ - जादूगार पी सी सरकार यांचा मृत्यू *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *गृह, अर्थ खातं अखेर राष्ट्रवादीकडेच, शिवसेनेच्या दादा भुसेंकडे कृषी खात्याची धुरा, आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांकडे सार्वजनिक बांधकाम खातं * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *आमदार वर्षा गायकवाड राज्याचे नवे शालेय शिक्षण मंत्री* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *एक रुपयात संपूर्ण आरोग्य चाचणी लवकरच सुरु करणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *एकाचवेळी ८३६ मुलींच्या नामकरणाचा सोहळा बीडमधील कीर्तन महोत्सवात काल रंगला. स्त्री भ्रूण हत्येचा डाग लागलेल्या जिल्ह्यत असे चित्र आशादायी वाटत होते. या अभूतपूर्व नामकरण सोहळ्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मांढरदेव (ता.वाई) येथील यात्रेत करणी करण्याच्या नावाखाली झाडाला खिळे बिबे, लिंबू व काळ्या बाहुल्या फोटोसह ठोकणाऱ्यांवर व जादूटोणा करणाऱ्यांवर कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारत-श्रीलंकेमधील पहिला टी20 सामना पावसाने धुतला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *न्यूझीलंडचा फलंदाज लिओ कार्टरने रविवारी क्रिकेटच्या इतिहासात विक्रम केला, एकाच षटकात सहा चेंडूवर सहा षटकार ठोकत लिओ कार्टरने आपलं नाव दिग्गज फलंदाजांच्या यादीत नोंदवलं आहे. अशी कामगिरी करणारा लिओ कार्टर क्रिकेटच्या इतिहासातला सातवा फलंदाज ठरला आहे. न्यूझीलंडमधील स्थानिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत कार्टरने हा विक्रम केला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *आचार्य बाळशास्त्री जांभेकर* बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर अर्थात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात. त्यांचा जन्म दिनांक ६ जानेवारी १८१२ रोजी कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभूर्ले या गावी एका गरीब ब्राम्हण घरात झाला. लहानपणापासूनच ते अतिशय हुशार, चुणचुणीत  व कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. म्हणूनच त्यांनी अगदी लहान वयातच अनेक विषयातील शिष्यवृत्ती मिळवली आणि संशोधन सुद्धा केले. त्यांना माहित होते कि, ब्रिटिशांना भारतातून हाकालायचे असेल तर लोकांना जागरूक करणे अत्यंत करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी वर्तमानपत्र हे माध्यम सर्वात चांगले आहे. म्हणून त्यांनी गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांच्या सहकार्याने वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण ‘ नावाचे वर्तमानपत्र प्रकाशन करण्यास सुरुवात केली........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://shopizen.page.link/R6jE9oYXT2h1vVdv9             वरील लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मशाल होऊन जग* ........©® सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद असंख्य वेळा होते भावनांची घुसमट लपवून दुःख सारे हसत जगते जीवनपट वर्तमानात नसले अस्तित्व तरी भविष्यात असेल बघ स्वप्न उडण्याची उद्या आकाश तुझे असेल टाळणारे टाळणारच आपण लढावे अस्तित्व आपले आपण कर्तव्य करून सिद्ध करावे ढाल होऊन नाहीतर मशाल होऊन जग सोबती नसेल कुणी आज पण नाव तुझे असेल बघ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *दोन नद्यांच्या दरम्यान असलेल्या भूमीस काय म्हणतात ?* दुआब 2) *भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप कोण करते ?* केंद्रीय सांख्यिकी संस्था 3) *भारतातील शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता ?* लॉर्ड कॅनिंग 4) *महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडले जातात ?* 19 5) *लोकसभेत महाराष्ट्रातून किती सदस्य निवडले जातात ?* 48 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अभिषेक अडकटलवार 👤 साईनाथ जगदमवार 👤 भगवान चव्हाण  👤 रितेश जोंधळे 👤 बजरंग माने 👤 सुदर्शन कोंपलवार 👤 श्रीनिवास गंगुलवार 👤 मोहन घोसले 👤 दत्तात्रय बंडावार 👤 अभिषेक नंदकिशोर अडकटलवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समाज ज्या कारणांनी अधोगतीला गेला ती नष्ट करून समाजातल्या घटकांत नवचैतन्य जागे करण्यास मदत होईल याकरीता धरलेला आग्रह, त्यासाठी उचललेलं आंदोलनाचं पाऊल म्हणजे 'क्रांती' संबोधावे लागेल. जे शांतीपथावर घेऊन जाईल. जेंव्हा क्रांती आंदोलनाची लक्षवेधी आरोळी उठते तेंव्हा नक्कीच कुठे न् कुठे काहीतरी दुखतंय हे दुर्लक्षून चालणारं नाही. आज बेरोजगारी, भूक, गरिबी, गुलामी, आत्याचार यामुळे बहुसंख्य समाजघटकांत असंतोष निर्माण झालायं. त्यासाठी क्रांतीचा आवाज उठलाच पाहिजे. पण माणसांना माणसांचीच भिती वाटावी, ही ख-या क्रांतीची अवस्था नसावी.* *अर्थात, स्वार्थाच्या सोंगात क्रांती होत नसते, तर विध्वंसच आधिक होतो. त्याचप्रमाणे आक्रोशांच्या आरोळ्यांनी तथागत बुद्धांला अपेक्षित असलेली शांती नांदत नसते. जर लढा न्यायासाठीचा असेल तर हरएक चांगल्या-वाईट, गोष्टींचा त्याग आणि स्विकाराची सुरूवात स्वत:पासून झाली पाहिजे. अशीच क्रांती शांतीकडे घेऊन जाईल. आज भोवतालच्या ढवळलेल्या पर्यावरणावर भाष्य करताना, न्यायासाठी आंदोलन उभारून आपलं अवघं जीवन खर्ची घातलेल्या नेल्सन मंडेलांचा विचार लागू पडतो. ते म्हणतात,'जर कुठे शांती नाहीये तर याचे कारण हे आहे की, आम्ही विसरून गेलोत की आम्ही एक-दुस-यांचे कुणीतरी आहोत.' जे माणूस म्हणून कधीच विसरता येणार नाही !* *॥ रामकृष्णहरी ॥* ❤❤❤❤❤❤❤❤❤ *श्री. संजय नलावडे,मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *अगुणस्य हतं रूपं दुःशीलस्य हतं कुलम्।* *असिद्धस्य हता विद्या अभोगेन हतं धनम्।।* *अंगात चांगले गुण नसले तर रूपाला काही अर्थ नसतो, माणसाचे शील* *शुद्ध नसले तर त्याच्या कुळाला बट्टा लागतो,* *शिकलेल्या विद्येचा उपयोग केला नाही तर ती कांही कामाची नाही* *आणि संपत्तीचा उपभोग घेतला नाही तर ती तशीच वाया जाते. थोडक्यात* *सांगायचे तर आपल्याकडे जे कांही असेल त्याचा चांगल्या कामासाठी उपयोग करता* *आला पाहिजे.* *आपल्या मुखावाटे आपल्या शरीरात जे अन्न जाते, त्यावर आपण खूप* *नियंत्रण ठेवतो. आपण आपला आहार सदोदित संतुलित* *ठेवायचा प्रयत्न करतो. वैद्यकिय सल्ल्यानुसार आवश्यक ते पथ्य पाळतो. जेवायच्या आधी* *आपण दररोज स्वच्छ हात धुतो. शुद्ध पाणी पितो. वेळोवेळी आपण उपवास* *करतो. आपल्या तोंडातून जे काही आत जाते ते पोटात जाते* *आणि शेवटी ते शरीराबाहेर टाकले जाते. हे* *आपल्याला माहित असूनसुद्धा ही सगळी काळजी आपण घेतोच.* *पण आपल्या मुखावाटे बाहेर पडणा-या शब्दांची तशाच प्रकारची काळजी आपण घेत नाही. ज्या मुखातून आपण परमेश्वराचे गुणगान करतो, त्याच मुखातून आपण खुशाल अपशब्द उच्चारतो. ज्या झ-यातून केवळ निर्मळ पाणी झरले पाहिचे, तो झरा आपणच प्रदूषित करतो. आपल्या अमंगल वाणीने तो झरा आपणच विटाळून टाकतो.*जिभेची इजा सगळ्यातलवकर बरी *होते असं सायन्स म्हणते...* *पण* *जिभेने झालेली इजा आयुष्यभर बरी होत नाही असं अनुभव म्हणतो...!..* *** *जीभ नरम असते, कोमल असते आणि लवचिक असते. म्हणूनच ती अखेरपर्यत तोंडात सुरक्षित राहाते।* *याउलट दात कठोर असतात, तीक्ष्ण असतात, धारदार असतात म्हणूनच त्यांच्यापैकी एकही अखेरपर्यत तोंडात शिल्लक राहत नाही।।* *म्हणूनच रोजच्या जीवनात सर्वांशी बोलताना कोमल शब्द वापरा. कठोर शब्दांनी माणसं दुरावतात।।।* *नम्र रहा, आणि लवचिक बना...।* *तुम्ही आयुष्यात नेहमीच यशस्वी व्हाल...।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपल्या दैनंदिन जीवनात काय केले आहे हे आपण जिथे नोंद करुन ठेवलेली असते.त्यात काल,आज आणि उद्या या तिन्ही काळाचा उलगडा केलेला असतो.आपण आपल्या जीवनात कसे वागलो आहोत त्याचीही नोंद केलेली असते.कधी आपल्याला विस्मरण झालेले असेल तर ते स्मरण करुन देण्याचे काम ती करते.आपण किती खरेखोटे जीवनात इतरांशी बोललो किंवा वागलो त्याचाही हिशोब ती आपणच नोंदवलेल्या शब्दांत आपल्यासमोर आरशासारखे काम करते.ती एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेली असते.तिला आपण कधीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरु शकत नाही.एवढे प्रेम ती आपल्यावर करते आणि आपण तिच्यावर करतो.ती आपल्याला आपल्या जीवनात सतत प्रेरणा देते आणि आपल्या जीवनाला तिला पाहून, वाचून सावरतो अशी प्राणप्रिय वस्तू म्हणजे डायरी अर्थात आपली रोजनिशी.जी माणसे जीवनात खरे यशस्वी होतात ती आपल्या जीवनात घडलेल्या, घडून गेलेल्या आणि घडणाऱ्या घटनांची सत्यतेची नोंद करतात आणि त्यासाठी ती डायरी अत्यंत मोलाचे काम करते.तीच आपल्यासाठी कोणत्याही काळात न बदलणारी,सत्य उलगडून आपल्यातील दोष दूर करण्यासाठी जाणीव करून देणारी खरी मैत्रीण असते ती आपल्या जीवनात असायलाच हवी नाहीतर आपल्या जीवनातले दुसरे कोणीही एवढे काम करणार नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 📚📝📚📝📚📝📚📝📚📝📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *न्याय* लोकांचे धान्य दळून देणार्‍या एका माणसाने एके दिवशी आपल्या धान्याच्या टोपलीत एक उंदीर पकडला व त्यास आपल्या आवडत्या मांजरास खाऊ घालण्याचा विचार केला. त्यावेळी तो उंदीर दीनवाणें तोंड करून त्याला म्हणाला, 'बाबारे लोकांचं धान्य चोरावं हा माझा धंदा नाही.' लोकांच्या घरातून मी जे अन्न घेतो, ते केवळ पोटापुरतेच घेतो,' ही सबब ऐकून तो माणूस म्हणाला, 'अरे, मी तरी तुला जी शिक्षा करणार आहे, ती सार्वजनिक हितासाठीच करतो आहे.  कारण तुझ्यासारख्या चोराला शिक्षा करणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे,' हे ऐकून उंदीर म्हणाला, 'बरं तर, तू आणि मी दोघंही एकाच वर्गात मोडतो याचा विचार कर. आपण दोघेही धान्यावरच आपला चरितार्थ चालवतो. अंतर इतकंच की दळायला आलेल्या धान्यातला एक दाणा जर मी चोरला तर त्यातले हजार दाणे तू चोरतोस.' तो माणूस रागावून त्यावर म्हणतो, 'प्रामाणिक माणसाने शांतपणे ऐकून घेण्याजोगे हे तुझे बोलणे नाही.' व लगेच त्याने त्या उंदरास आपल्या मांजरीस देऊन टाकले. तात्पर्य - ज्या व्यंगाबद्दल आपण दुसर्‍यास नावे ठेवतो, तेच व्यंग आपल्या अंगी आहे असे दाखवून दिले, तर त्याचा आपल्याला राग येतो, पण हा काही न्याय नव्हे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment