✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/01/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १७८० - जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कोलकाता येथे 'कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर' या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरु केले. हिकीज बेंगाल गॅझेट नावाने ओळखले जाणारे हे वर्तमानपत्र म्हणजे भारतीय पत्रकारितेची सुरुवात. ● २००६ - शेख सबाह अल-अहमद अल-जबर अल-सबाह कुवैतच्या अमीरपदी. 💥 जन्म :- ● १९७०-राज्यवर्धनसिंग राठोड,ओलीम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज ● १८७१ - चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे, बडोदा संस्थानचे राजकवी. 💥 मृत्यू :- ● २००१-राम मेघे ,महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री ● १९५० - अहमद अल-जबर अल-सबाह, कुवैतचा अमीर. ● १५९७-महाराणा प्रताप,मेवाडचे राजे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सर्व महाविद्यालयात यापुढे मराठी सूचना फलक अनिवार्य, सर्व महाविद्यालये विद्यापीठांच्या कार्यक्रमांची सुरुवात यापुढे राष्ट्रगीताने करणार - उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राज्य शासनाची बहुचर्चित शिवभोजन थाळी योजना मोठ्या उत्साहात सुरु झाली. पुण्यात सलग तिसऱ्या दिवशीही या थाळीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं समोर आलंय, मनपा शेजारी असणाऱ्या निशिगंधा व्हेज मध्ये शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली असून लोकांनी 10 रुपयात मिळणाऱ्या थाळीचं भरभरून कौतुक केलंय.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली : 1 फेब्रुवारी, 2020 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2020-21 या आर्थिक वर्षाचं बजेट देशासमोर सादर करतील. यावेळी अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नेहमी आपल्या देशातील प्रतिभा व तंत्रज्ञानावर विश्वास ठेवा. त्यातून आपल्याला बळकट राष्ट्र निर्माण करता येईल पद्मविभूषण सन्मानप्राप्त आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर यांचे प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *यवतमाळ : खासगी बाजारात कापसाचे भाव पडले, प्रती क्विंटल ४५०० चा दर. त्यामुळे यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस गाड्यांची आवक वाढली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सिडनी : युवा विश्वचषक (१९-वर्षांखीलील) स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियावर ७४ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत मारली धडक, भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे कार्तिकला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मध्यप्रदेश संघातील वेगवान गोलंदाज रवी यादवने रणजी सामन्यात उत्तर प्रदेश विरोधात खेळताना सामन्याच्या पहिल्याच षटकात करिअरचे पहिले षटक टाकताना पहिल्या तीन चेंडूंवर तीन विकेट्स घेतल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेणारा तो भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'अति क्रोध करू नये'* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/14.html         लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कविता - माझी शाळा* स्वप्नील प्रकाश धने (स्वप्नचर) वैजापूर (औरंगाबाद) 8698388096 इवल्या इवल्या फुलांची भरली बघा शाळा नानारंगी फुलांनी हा उजळला छान मळा छान छान शाळा आमची त्याला निसर्गाचे अलिंगन फुलांनी भरले बघा कसे आमच्या शाळेचे हे अंगण इकडून तिकडे उडती फुलपाखरे अन् भ्रमर स्वच्छंद उडतात बघा या फुलांवरून त्या फुलांवर किलबिलाट पक्ष्यांचा अन् वाहे ज्ञानाची ही गंगोत्री करतो ज्ञानार्जन आवडीने बनतो आवडीचा विद्यार्थी *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *”आपलं दु:ख पाहुन कोणी हसले तरी चालेल, पण आपल हसणं बघुन कोणी दु:खी होता कामा नये..”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *कोणता असा एकमेव अन्नपदार्थ आहे जो कधीच खराब होत नाही ?* मध 2) *छत्तीसगड हे राज्य कोणत्या राज्यापासून वेगळे झाले आहे ?* मध्यप्रदेश 3) *पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ?* ममता बॅनर्जी 4) *डास चावल्याने कोणता रोग होतो ?* मलेरिया 5) *महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी जंगले आढळणारा विभाग कोणता ?* मराठवाडा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•• ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील वानखेडे, 👤 दत्ताहरी कदम 👤 मधुसूदन जाधव 👤 नरेंद्र जोशी 👤 कोंडीराम केशव 👤 वीरभद्र करे 👤 राजेश्वर सुरकूटवार 👤 आनंद जगमारा 👤 कु. आकांक्षा गंगाधर तोटलोड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरंतर मरण्यासाठी शंभर बहाणे असले तरी जगण्यासाठी एक 'वजह' पुरेशी आहे. ही वजह सापडली की मनातील मळभ दूर होत जातं. इथेच संपतो माणसाच्या आत्मशोधाचा प्रवास. ही वजह उराशी कवटाळून जगणारी माणसं ख-या अर्थानं आनंदयात्रेमधील 'पाथेय' ठरतात. काळाच्या ओघात हे संदर्भ बदलतात नि पुन्हा सुरू होतो शोध नवीन कारणांचा नि जगण्याच्या नवीन वजहचा.* *ब-याचदा ती वजह सापडतही नाही हातात..... पण माणूस वाट पाहतो विवशतेतही एक नवा आशावाद साठवून आणि उभा राहतो या अक्षयी नि निरंतर  फिरणा-या चक्राच्या मध्यभागी........*             *जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत !* *एक कवी लिहून जातो.....*           *......सदियाॅ बित गयी टूटी*                      *हुई डोर को थामे*                     *शायद कोई वजह मिल*                      *जाए जिने की....!*                       ‼ *॥ रामकृष्णहरी ॥* ‼            🔶🔶🔶🔶🔶🔶    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *आई हवी,पत्नी हवी,बहीण हवी,* *आजी हवी,मावशी हवी,मैत्रीण हवी,* *पण मुलगी नको.असली तरी आपली आणि परक्याची हा भेद कधी* *संपणार. वरवर दिसलं तरी मनातून काय?* *दोन दिवसांपूर्वी पेपरमध्ये बातमी वाचली आणि पुन्हा ह्या भावना दाटून आल्या.* *गर्भात वंशाची पणती प्रवेशिता* *गर्भलिंगनिदानाचा धाक आहे.* *असलीस तू कळी उमलणारी* *जन्मा आधीच मृत्यूची हाक आहे.* *जन्मदाते आईबापच तुझे भक्षक आहेत .* *सांग सावित्रीच्या लेकी!!* *तू कूठे सूरक्षित आहेस?* *कारणही तसेच घडले आहे गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास* *लासलगाव रेल्वे स्थानकावर एका कोपर्‍यातील* *बाकड्यावर अज्ञात महिला की पुरुष हे देवाला माहिती यांनी* *आपली पोटची 7 दिवसाची मुलगी सोडून पलायन केले.* *नंदिग्राम एक्सप्रेस मधून उतरलेल्या 2 प्रवासी विद्यार्थ्यांनी या* *मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून* *रेल्वे पोलिसांना याची माहिती* *दिली या पोलिसांनीही तत्परता दाखवत या अवघ्या सात* *दिवसाच्या मुलीला लासलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले.* *लासलगाव येथील श्री संत जनार्दन स्वामी अनाथ आश्रमाचे संचालक* *दिलीप गुंजाळ व सौ संगीता गुंजाळ यादेखील तातडीने* *ग्रामीण रुग्णालयात हजर झाल्या.* *गोड ,गोंडस, गुटगुटीत, अत्यंत देखणी मुलगी ,पोटचा गोळा लोक टाकून निघून* *कसे जाऊ शकतात ? हा* *प्रश्न खूप* *सतावत होता. सौ संगीता गुंजाळ यांच्या मांडीवर अगदी गुपचूप पडून* *राहिलेली ही गोंडस कन्या खरोखर तिची काय चूक असेल* *का तीला आज रेल्वे स्टेशनवर सोडून तिच्या आई वडिलांना पळून जावे* *लागले असेल......* *फक्त ती एक...... मुलगी....... एवढेच* *ना.........* .. *सरकार यासंदर्भात खुप जनजागृती* *करतय ,मात्र तरीही* *असे प्रकार घडतच आहे याच खूप* *वाईट वाटतंय......अगदी हे* *लिहितानाही.......* *मुलींच्या बाबतीत असे का होते आहे,* *हाच मोठा प्रश्न* *जाणवतोय...... बस.......* *बाळ लडिवाळ, कोमल वाणी* *हास्याचे कारंजे, लेक माझी।।* *मायेचा पाझर,सुखाची झालर* *गोड निरागस, लेक माझी।।* *आईची छाया,बहिणीची माया* *घराची शोभा, लेक माझी।।* *लटके रूसणे,गालात हसणे* *आनंदी बागडे, लेक माझी।।* *मनी एक सपान,खूप मोठी व्हावी* *सूर्यापरी चमकावी,लेक माझी* *या ओळी फक्त बोलण्या, चालण्या* *साठी का?माणूस एव्हढा* *क्रूर कसा होऊ शकतो.* *एकीकडे डोळ्यासमोर येते ती सोडून* *जाणारी माता..... तर दुसरीकडे दिसते मांडीवर घेऊन* *बसलेली ती अनाथाश्रमातील सांभाळ* *करणारी माता.* *कुठे कुठे आर्त हाक मारावी तेच कळत नाही.* *विदयेचे पवित्र मंदीर आज ओंगळ वाटते आहे.* *आॅफीस, कार्यालयात तू गळाला लागते आहे.* *ऑटोरिक्षा, बस ,रेल्वेत जणू लपले तक्षक आहेत.* *सृष्टीची तू निर्माती आहेस* *तूच दुर्गा,तुच लक्ष्मी ,सरस्वती आहेस* *सावध रहा सदा या मायावी दुनियेत* *सावित्रीच्या सुजाण लेकी!!!* *तूच तुझी अंगरक्षक आहेस.* *काल तू होतीस म्हणून आज आम्ही* *आहोत माई..* *नाहीतर आम्हाला* *स्वयंपाकघर-न्हाणीघर-देवघर यापलिकडे अस्तित्वच नव्हतं..* *तू उंबरठा ओलांडला नसता तर आम्ही आजही उंबरठ्याआडच* *राहिलो असतो.. खिडकीतून* *दिसणार्‍या टीचभर आभाळात* *नशिबातील अमावस्या-पौर्णिमा मोजत बसलो असतो..* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जो माणूस जसा विचार करतो त्याच विचारानुसार जीवनात वागतो. जर चांगले विचार असतील तर त्यांचे परिणाम त्याच्या जीवनात आणि इतरांराच्याही जीवनात चांगलेच होतील. आपल्याला आणि इतरांना त्रास होणार नसतील, उपदेशात्मक असतील तर ते नक्कीच जीवनात फलदायी ठरु शकते.अशी माणसे स्वत:च्या आणि इतरांच्याही जीवनात नवे चैतन्य आणू शकतात.ते कधीही वाईट विचारांना आपल्या जीवनात थारा देत नाहीत, त्यांना कुणाचेही नुकसान होऊ नये असेच वाटते. परंतू वाईट विचार करणारी माणसे कधीच आपल्या जीवनात यशस्वी होत नाहीत आणि इतरांच्या चांगल्या चाललेल्या जीवनात बाधा आणल्याशिवाय राहत नाहीत. अशी माणसे दुष्ट प्रवृतीची असतात. त्यांना स्वत:चे आणि इतरांचे काय आणि किती नुकसान होत आहे याचे भान देखील राहत नाही. अशा वृत्तीच्या माणसांपासून केव्हाही दूरच राहिलेले बरे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. 📲 9421839590 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *💐कर्म सिद्धांत 💐* डोळ्यांनी झाडावरचा आंबा पाहीला आणि खाण्याची ईच्छा जाग्रुत झाली ,डोळेतर फळ तोडू शकत नाहीत म्हणून पाय गेले फळ तोडायला ,पण जवळ पोहोचूनही पाय आंबा तोडू शकले नाहीत ,मग हात गेले आंबा तोडायला ,हाताने आंबा तोडला पण हात पाय व डोळे तो खाऊ शकले नाहीत .आंबा खाल्ला तोंडाने पण तो तोंडात राहीला नाही ,तो गेला पोटात , आता माळ्याने ते पाहीले आणि त्याने दांड्याने मार दिला पाठीवर, पाठ म्हणाली मला का मारता ? मी कुठे आंबा खाल्ला ? दांड्याने मार मिळाला पण अश्रू आले डोळ्यात कारण पहिला दोष डोळ्यांचा होता ,डोळ्यानी प्रथम आंबा पाहिला होता हाच आहे कर्म सिद्धांत *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment