✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/01/2020 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *लाला लजपतराय जयंती* 💥 ठळक घडामोडी :-  ● २००३ :- मराठी कवी मंगेश पाडगावकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर 💥 जन्म :- ● १८६५ - लाला लजपतराय यांचा जन्म 💥 मृत्यू :- ● १९८४ - भारतीय चित्रपट दिग्दर्शक साहेबराव मोदी यांचे निधन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *प्रजासत्ताक दिनी पाच किल्ल्यांवर फडकवला तिरंगा रायगड जिल्ह्यातील उरणच्या भेंडखळ इथल्या हर्षितीने इतिहास घडवला, सर्वात कमी वयातील गिर्यारोहक म्हणून तिच्या पराक्रमाकडे पाहिलं जात आहे. म्हणूनच वर्ल्ड बुक, आशिया बुक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नेरूळ येथे उभे राहत असलेल्या मरिना सेंटर मधून सुटणाऱ्या बोटी अलिबागला फक्त एक तासात आणि मुंबईला अर्धा तासात पोहचणार आहेत. 111 कोटी रूपयांचा हा प्रकल्प असून एक वर्षात तो कार्यरत होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबईतील आझाद मैदानात शिक्षक समन्वय संघाच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलन, मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी दिलीए. आगामी दहावी आणि बारावी परीक्षांवर बहिष्कार घालत आहोत, त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल, असा पवित्रा आंदोलक शिक्षकांनी घेतलाय.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शिवभोजन केंद्राच्या उदघाटन करण्यात आलं...* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सर्व सुविधांनी युक्त अशा अत्याधुनिक बसस्थानकांचे आराखडा सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सरकारने शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याऐवजी चिंताग्रस्त केलं, गिरीश महाजनांची टीका, महाविकास आघाडी सरकारने अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम दिली. यावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी सरकारवर साधला निशाणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई: इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएल २०२० स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार असून या स्पर्धेतील अंतिम सामना २४ मे रोजी मुंबईत होणार आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामासंदर्भात झालेल्या गव्हर्निग काऊसिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••           *कमवा आणि शिका* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.  http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html    लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कविता - माकडाची शाळा* सौ.सविता जयंतराव धर्माधिकारी जि.प.कें.प्रा.शा.कासारखेडा ता.जि.लातूर मुले आली शाळेला घेऊन पाठीवर दप्तर माकड आले शाळेमध्ये झाडावरून चालत भरभर माकड म्हणाले, आज माझे ऐका तुम्ही मी सांगेन युक्त्या नामी माझ्या सारखी करा नक्कल बघा कशी वाढेल अक्कल दप्तर ठेवा बाजूला उड्या मारू चार मजा करू सारे यारे नाही मिळणार मार माझ्या मागे गाणी म्हणा हुप हुप हुप हुप हुप गाल कसे फुगले बघा आरशात बघा रूप झाडावरही चला सरसर फळे तोडू पटापट वही पेन पुस्तक पाटी कसलीच नव्हती कटकट *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" तुम्ही अपयशी झाले त्यापेक्षाही तुम्ही अपयशी झाल्यानंतर काय करतात याची मला जास्त काळजी वाटते."* ------------------------- अब्राहम लिंकन *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जर्मनीचे चलन कोणते ?* मार्क 2) *'मार्श गॅस' असे कोणत्या वायूला म्हणतात ?* मिथेन 3) *इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय कोण ?* मिहीर सेन 4) *मणिपूर राज्याचे लोकनृत्य कोणते ?* मणिपुरी 5) *श्रीकृष्णाची जन्मभूमी कोणती ?* मथुरा ( उत्तरप्रदेश ) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सोपान राव डोंगरे 👤 राम पाटील ढगे 👤 अनिल सोनकांबळे 👤 मोगलाजी मरकटवाड 👤 सलीम शेख 👤 श्रीनिवास सीतावार 👤 राजेश अर्गे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खात्या-पित्या घरातून उठून माणसे रस्त्यावर कशी येतात ? आणि रस्त्यावरची उठून वैभवाच्या शिखरावर कशी पोहचतात ? कोणी ढकलते की आपल्या पायांनी येतात जातात ? प्रश्नाचे उत्तर तसे कठीण असले तरी ढकलण्याचे ब-याचदा निमित्त होते. आर्थिक आघात, व्यसने, नादानी, जीवघेणे आजार, फसवणूक यातून माणसं विपन्नावस्थेत पोहचतात. पैसा यात मोलाची भुमिका बजावतो. त्याचे स्नोत वाहते असतील तर निभावता येते.* *एकदाच मिळणा-या आयुष्याची अशी वाताहत केव्हाही क्लेशदायी, पण ती ज्याची होते तोही ती रोखू शकत नाही. अंथरूण पाहून पाय पसरले, नमते घेतले तर असे प्रसंग टाळताही येतील, पण तशी बुद्धी व्हावी लागते. मग याच्या उलट घडून माणसे रस्त्यावरून वैभवाच्या शिखरावर जातात. "मानवी जीवनात दु:ख ऐसपैस असते तर सुख मुटकुळे करून असते."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥* ●•• ☘☘☘☘☘☘☘☘☘ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🙏सुप्रभात🙏* *मित्रांनो* *मैंने पुछ लिया जिन्दगी से, "क्यों* *इतना दर्द दिया ?" वो हंसी और* *बोली, "अरे पगले, मैं तो तुझे जीना* *सीखा रही थी.....!" लेकिन तु* *कल की फिक्र में हमेशा* *दर्द लेता रहा। याद रखना,* *आज से बेहतर कुछ नहीं* *क्योंकि कल कभी आता ही* *नहीं और आज कभी जाता* *नहीं....!* *मायकल जॅक्सनला हे पूर्ण द्यात होते,पण मरणावर विजय* *मिळविण्यासाठी त्याची धडपड चालू होती.* *ऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येतं दु:खाचं अन* *सुखाचं हेच नातं असतं.* *मृत्यू अटळ आहे.हे मान्य करायला तयार असणारा माणूस लढणं सोडत* *नाही.* *आणि मृत्यूला घाबरणारा रडणं सोडत नाही.* *मग दोन्हीपैकी काय निवडायचे ते आपणच ठरवायचे.* *महत्वकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करित नाही. आणि मेहनत* *केल्याशिवाय महत्वकांक्षा पुर्ण होत नाही…! मायकल जॅक्सनला १५० वर्षे* *जगायचं होतं. कोणाशी हात मिळवायचा तर तो आधी हातात* *मोजे घालत असे. जेव्हा त्याला लोकांमध्ये जावं लागत* *असे तेव्हा तोंडावर तो आधी मुखवटा घालत असे. त्याची काळजी* *घेण्यासाठी त्याने त्याच्या घरी १२ डॉक्टर नियुक्त केले* *होते. हे डॉक्टर त्याच्या केसांपासून ते अगदी पायाच्या* *नखांपर्यंत सगळ्या अवयवांची रोज तपासणी करीत* *असत. त्याचे जेवणखाण प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच त्याला* *खायला घातले जायचे. त्याच्याकडून व्यायाम करून* *घेण्यासाठी १५ लोक तैनात असायचे.* *मायकल जॅक्सन गोरा नव्हता. त्याने १९८७ मध्ये प्लॅस्टिक सर्जरी करवून* *घेत आपली त्वचा गोरी केली होती. गोरा झाल्यावर त्याने* *आपले काळे आईवडील, काळे मित्र यांना सोडलं आणि गोर्‍या* *आईवडिलांना भाड्याने घेतलं. मित्र जवळ केले ते ही त्यांचा गोरा रंग* *बघूनच. लग्न केलं ते ही गोर्‍या मुलींबरोबर.* *दीडशे वर्षे जगण्याचं उद्दिष्ट ठेवलेला मायकल नेहमी प्राणवायूच्या* *बिछान्यावर झोपत असे. त्याने स्वतःसाठी शरीराचे* *अवयव दान करणारे दाता तयार ठेवले होते. त्यांचा खर्च तो स्वतः करत असे* *म्हणजे त्याला गरज पडल्यावर मूत्रपिंड, फुप्फुस, डोळे* *किंवा इतर कुठलेही अवयव हे दाता येऊन त्याला देऊ शकतील.* *त्याला वाटायचं की तो पैसा आणि आपला प्रभाव यामुळे मृत्यूलाही* *चकवा देईल पण हे शक्य झालं नाही आणि २५ जून २००९ या* *दिवशी त्याची हृदयगती बंद पडू लागली. त्यावेळी त्याच्या घरी* *१२ डॉक्टर होते पण कोणीही परिस्थिती सावरू शकलं* *नाही. हे बघता शहरातील सगळे* *डॉक्टर त्याच्या घरी जमा झाले. या सगळ्यांनी प्रयत्न केले पण कोणीही* *त्याला वाचवू शकलं नाही.* *त्याने २५ वर्षे डॉक्टरांना विचारल्याशिवाय कधीही काहीही* *खाल्लं नाही. त्याचा शेवटचा काळ जसजसा जवळ येत गेला तसतशी* *त्याची शारीरिक स्थिती बिघडू लागली. ज्याला १५० वर्षे* *जगायचं होतं पण त्याची पन्नाशीतच शारीरिक अधोगतीकडे वाटचाल सुरू* *झाली. आयुर्मान* *वाढावं म्हणून त्याने जी काही सोय केली होती, त्याचा काहीही उपयोग* *झाला नाही.* *जेव्हा त्याच्या शवाचं विच्छेदन करण्यात आलं तेव्हा डॉक्टर म्हणाले* *की त्याचं शरीर म्हणजे फक्त हाडांचा सापळा झाला होता. तो* *टकला होता. त्याच्या बरगड्या, खांदा यांची हाडं तुटलेली होती.* *त्याच्या शरीरावर असंख्य सुई टोचल्याचे निशाण होते.* *प्लॅस्टिक सर्जरी केल्याने जो त्याला त्रास व्हायचा, त्यावर उपाय* *म्हणून त्याला रोजच्या रोज antibiotics ची अनेक injections* *घ्यावी लागत असे.* *मायकल जॅक्सनची अंत्ययात्रा २५० कोटी लोकांनी थेट प्रक्षेपणात* *पाहिली. ही आत्तापर्यंतची थेट प्रक्षेपणात सर्वात* *जास्त पाहिली गेलेली घटना आहे.* *मायकल जॅक्सन याच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजेच २५ जून २००९ या* *दिवशी दुपारी ३.१५ वाजता विकिपीडिया, ट्विटर आणि AOL चं* *instant messenger हे सगळं क्रॅश झालं होतं. याच्या मृत्यूची बातमी* *येताच ८ लाख लोकांनी गुगलमध्ये मायकल जॅक्सन* *म्हणून शोधाशोध केली आणि ही शोध मोहीम फारच सुरू* *झाल्याने गुगलवर सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम झाला आणि मग गुगलही* *क्रॅश झालं. त्यावेळी अडीच तास गुगल बंद राहिलं.* *मृत्यूला चकवा देण्याचा ज्यांचा विचार असतो, त्यांना मृत्यूच चकवतो, हेच* *खरं. चार दिवसांचा थाट, ऐश, पैसा, श्रीमंती आणि यामुळे* *येणारा माज..* *कशाला तो ! स्मशानात जाणार तेव्हा हाताची साधी मूठही रिकामीच* *असणार आहे. हे कधी समजणार लोकांना ! कदाचित कधीच* *नाही.* *जग जिंकणारा सिकंदर सुद्धा मरतेवेळी जमिनीवर मोकळे हात* *करून लोकांना संदेश देऊन गेला.* *खाली हात आया है,खाली हात जायेगा।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे एखाद्या गीताला सुमधुर संगीतात संगीतबद्ध करायचे असेल तर त्यासाठी अनेक वाद्यांचे सुर एकत्रित आणावे लागतील आणि त्या वाद्यांना वाजवणारे किंवा चालवणारे अनेक कलाकार एकत्रीत आणून गीताला तालबद्ध आणि स्वरबद्ध करावे लागेल तेव्हा कुठे सुमधुर गीत ऐकण्यासाठी तयार होईल.अर्थात इतरांना त्या गीताचा आस्वाद घेता येईल.त्याचप्रमाणे एखादी चांगली कृती करण्यासाठी किंवा ती कृती सर्वमान्य होण्यासाठी सर्वांच्याच सहभागाची गरज असते आणि त्यात सर्वांचेच सहकार्य असेल तर ते नक्कीच एखाद्या सुमधुर गीतासारखेच सुसंस्कारीत बनेल आणि नक्कीच लोक अनुकरण करायला लागतील.कोणत्याही चांगल्या गोष्टींसाठी अनेकांचे सहकार्य असणे गरजेचे आहे त्यासाठी सर्वांनी एकत्रित, एकोप्याने राहणे गरजेचे आहे आणि तसे राहिल्यास सा-यांनाच चांगला फायदा होईल.नाहीतर एकटे राहून एकाकी जीवन जगण्याचा अट्टाहास केला तर त्या जगण्याला मीठविरहित जेवन केल्यासारखेच जीवन चवहिन होईल हे लक्षात असू द्यावे.जीवनात चांगल्या गोष्टींसाठी एकी आणि एकोपा असणे गरजेचे आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड 📲 ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पाकोळी आणि कावळा* एक पाकोळी आणि एक कावळा स्वतःच्या सौंदर्यावरून आपआपसात भांडत होते. बोलता बोलता कावळा पाकोळीला म्हणाला, 'तुझं सौंदर्य फक्त उन्हाळ्यातच पहावं, माझं सौंदर्य सदासर्वदा सारखंच असतं त्यामुळे मी नेहमीच सुंदर दिसतो,' तात्पर्य - दोन सुंदर वस्तूंपैकी जिचे सौंदर्य जास्त टिकाऊ तीच अधिक उपयोगी म्हटली पाहिजे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment