*निरोप* दाटला मनीचा कंठ निरोप सर्वांचा घेतांना भेटणार काय पुन्हा सहवास त्यांचा परततांना अनमोल आठवणी घेऊन सख्या माझ्या भेटेन गेलेल्या क्षणा क्षणाचा विसर कसा पडेन निरोप घेत मैत्रीचा नयनअश्रु ओसरेल दाटल्या भावनांचा बांध मनी फुटेल हसून सारे जीवन मैत्रीत गेले विसरून सुखदुःखाचे धागेदोरे घेतले होते जुळवून सहा सोबतीनी आम्ही नजरेत प्रेम सदा बरसावे विखुरलेल्या पंखानसमवे जीवन गाणे गात जावे 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिलाताई सेनकुडे हदगाव जिल्हा नांदेड. 🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments:

Post a Comment