✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 जुलै 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15tzvPrXJk/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या वर्षातील २०९ वा दिवस 🚩 महत्वाच्या घटना :-• १८२१: पेरू देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.• १९३४: पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.• १९७९: भारताच्या ५व्या पंतप्रधानपदी चौधरी चरणसिंग यांची नियुक्ती• १९९९: भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांना पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार प्रदान.• २००१: आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान🎂 जन्म :-• १९३६: वेस्ट इंडीजचे क्रिकेट कर्णधार आणि फलंदाज सरगॅरी सोबर्स• १९४५: अमेरिकन व्यंगचित्रकार जिम डेव्हिस• १९५४: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ • १९७०: झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू पॉल स्ट्रँग• १९३२: भारतीय कवी आणि लेखक - साहित्य अकादमी पुरस्कार विजेते हिरेन भट्टाचार्य • १९०९: आंध्र प्रदेशचे ३रे मुख्यमंत्री के. ब्रह्मानंद रेड्डी🌹 मृत्यू :-• १९६८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑटो हान • १९७५: चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर • १९७७: गायक आणि अभिनेते पंडित राव नगरकर • १९८१: नाटककार बाबूराव गोखले • १९८८: राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग ८ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी • २०२०: भारतीय तेलगू अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक रवी कोंडाला राव • २०१६: भारतीय बंगाली लेखक, सामाजिक-राजकीय कार्यकर्त्या - पद्म विभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महाश्वेता देवी••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आईचे पत्र हरवले .......!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठवाड्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ, छत्रपती संभाजीनगरसह 44 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, हिंगोलीत सर्वाधिक 52.4 मिमी पाऊस*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *PM मोदी तामिळनाडूतील गंगाईकोंडा चोलापुरम मंदिरात पोहोचले, चोल राजाच्या 1000 व्या जयंतीनिमित्त म्हणाले- जेव्हा ओम नमः शिवाय ऐकतो तेव्हा अंगावर काटा उभा राहतो*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लाडकी बहीण योजनेतून 26 लाख बहिणी अपात्र, जूनपासूनचे पैसे येणे बंद होणार, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आषाढ वारीनंतर श्रीक्षेत्र निवृत्तीनाथाची पालखी 48 दिवसाच्या पायी वारीनंतर त्र्यंबकेश्वरला दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *AI सक्षम अंगणवाडीची सुरुवात, नागपूरमध्ये मिशन बालभरारी उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाट्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अकलूज :- शंकरनगर येथे नागपंचमी महोत्सव, 25 हजार महिला येणार:28 व 29 जुलै रोजी आयोजन, पारंपारीक खेळांचे होणार सादरीकरण‎*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत वि. इंग्लंड सामना अनिर्णीत, कर्णधार शुभमन गिल, के एल राहुल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंगटन सुंदरने दिली कडवी झुंज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दिगंबर जैरमोड, समराळा👤 बालाजी गुट्टे 👤 अंकुश शिंदे👤 चंद्रकांत पिलाजी 👤 बालू उपलंचवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 37*संपूर्ण गावभर मी फिरते**पावसात-उन्हात रक्षण करते**तरीही मंदिरात जायला मी घाबरते**सांगा पाहू मी आहे तरी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - सायकल••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वृद्धांना खूप कमी गरजा असतात, पण कुटुंबीयांनी त्याकडे खूप कमी लक्ष देऊन चालत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सरपंच पदासाठी किमान वयाची अट किती वर्षे आहे ?२) आमदार होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावी लागतात ?३) खासदार होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावी लागतात ?४) पंतप्रधान होण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात ?५) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे किमान वय किती वर्षापेक्षा जास्त असावे ? *उत्तरे :-* १) २१ वर्षे २) विधानसभा - २५, विधान परिषद - ३० वर्षे ३) लोकसभा - २५, राज्यसभा - ३० वर्षे ४) लोकसभेचा सदस्य असल्यास २५ किंवा राज्यसभेचा सदस्य असल्यास ३० वर्षे ५) ३५ वर्षे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लोखंड व पोलाद* 📙भारताची आधुनिक तीर्थस्थाने म्हणून भिलई, जमशेदपूर यांचा उल्लेख केला जातो. एखाद्या देशात दरवर्षी किती पोलाद निर्माण होते, यावर त्या देशाची औद्योगिक प्रगती मोजली जाते. एवढेच नव्हे, तर देशाची सुबत्ता व मूलभूत तंत्रज्ञान अवगत करण्याचे ते एक परिमाणच मानले जाते.लोखंड कित्येक शतके वापरात आहे. अनेक लोखंडी अवजारे व हत्यारेसुद्धा माणूस वापरत आला आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या गावात लोहार काम चालतेच, पण लोखंड तयार करणे व त्यापासून पोलाद बनवणे हे मात्र अत्यंत खर्चिक व जोखमीचे काम आहे. खनिज लोहापासून प्रथम लोहरस बनवला जातो. हे काम प्रचंड आकाराच्या उंच भट्ट्यांमध्ये केले जाते. विटांनी खास बांधलेल्या भट्ट्यांत खनिज लोह वितळवुन शुद्ध लोखंडाच्या रसाचा थर वेगळा बाहेर काढला जातो. तळाशी राहिलेल्या चिकट थराचा डांबरासारखा वापर करतात.खनिज, लोह, कोक, चुनखडी यांचे बारीक केलेले मिश्रण तप्त वायूंच्या झोताने भट्टीत तापवून शुद्ध लोखंड तयार केले जाते. याला काठिण्य नसते. याला 'पिग आयर्न' असेही म्हटले जाते. हा तप्त रसच अनेकदा पोलाद बनवण्यासाठी वापरला जातो. दुसऱ्या भट्टीत शुद्ध लोखंडाचा रस घेऊन त्यात चुनकळी मिसळले जाते. त्यानंतर लगेच शुद्ध प्राणवायू या भट्टीत सोडला जातो. सर्व प्रकारच्या अशुद्ध कणांचे त्यात ज्वलन होऊन जाते व मोजके कार्बन व लोखंड यांचे मिश्रण असलेले कणखर पोलाद द्रवस्वरूपात शिल्लक राहते. जेव्हा स्टेनलेस स्टील बनवायचे असेल, तेव्हा त्यातच क्रोमियम घातले जाते. गंज न धरणे व चकचकीत दिसणे हे गुण त्यामुळे स्टीलमध्ये येतात. सर्वात महत्त्वाचा भाग यानंतरचा असतो. पोलादाच्या तप्त रसापासून पाहिजे त्या वस्तू, पाहिजे ते आकार देणे हे एक कौशल्याचे काम असते. त्यासाठी रोलिंग स्टील मिल हा प्रकार वापरला जातो. यामध्ये गरम म्हणजे जवळपास पांढरेशुभ्र तप्त पोलाद सरकत्या चाकांवरुन सरकवत पाहिजे त्या जाडीचे, आकाराचे होईतोवर हलवले जाते. या पद्धतीने पोलादी तक्ते, पत्रे बनतात, तर रूळ, गर्डर्स हे साच्यांमध्ये ओतुन बनवले जातात. ज्यावेळी पोलादी सळ्या बनवायच्या असतात, त्यावेळी लहान भोकातून ओघळणारा पोलादी रस ठराविक पद्धतीत खेचून सळ्या बनवल्या जातात.पोलाद बनवण्यासाठी जुन्या लोखंडी वस्तू, लोखंडी भंगार सामान यांचाही वापर केला जातो. या स्वरूपाचे काम छोटे कारखाने छोट्या प्रमाणात काम करू शकतात; पण खनिज लोहापासून लोखंड व पोलाद बनवणारे कारखाने मात्र मोठ्या प्रमाणावरच उभारावे लागतात. या सर्व प्रकारात अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तापमान नियंत्रण. यांमध्ये थोडीफार जरी गडबड झाली, तरीही पोलादाच्या गुणधर्मात लगेच फरक पडतो. जगभर पोलादनिर्मिती ही अधिकाधिक यांत्रिक पद्धतीने होत चालली आहे. कमीत कमी माणूसबळ व जास्तीत जास्त यांत्रिक मानव (रोबो) वापरून या भट्टय़ांचे काम चालते. जेथे मानवी आरोग्याला धोका आहे, तेथे आता यंत्रमानवाचा वापर केला जातो. या बाबतीत मात्र आपण खूपच मागे आहोत.जपानमध्ये आज घटकेस पोलादनिर्मितीसाठी व मोटारउद्योगात सर्वात जास्त यंत्रमानव वापरात आले आहेत. अद्ययावत तांत्रिक ज्ञानाचा फायदा माणशी वा दर कामगारामागे जास्त पोलाद निर्माण होण्यामध्ये मिळत जातो. यासाठी सुरुवातीला जरी मोठी गुंतवणूक करावी लागली, तरी ती फायद्याची ठरते.आकडेवारी व एकूण पोलादनिर्मिती या घोळात जास्त न शिरता एका ढोबळ पाहणीनुसार जपान : कोरिया : भारत या आशियाई देशांतील पोलादनिर्मिती कारखान्यात असलेले कामगार व त्यांची पोलादनिर्मितीची क्षमता यांचे गुणोत्तर १ : ३ : १९ असे व्यक्त होते. यंत्रमानवांचा वापर जपानमध्ये सर्वात जास्त झाल्यानेच हे शक्य झाले आहे.जगातील पोलाद व्यवसायावर भारतीयांचे वर्चस्व २००९ साली निर्माण झाले आहे. टाटा समूहाने रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली पोलादनिर्मिती करणारी 'कोरस' ही मोठी कंपनी विकत घेतली. टाटा स्टील या त्यांच्या कंपनीचे स्थान त्यामुळे पहिल्या पाचांत जाऊन पोहोचले आहे. भारतीय वंशाचे पण लंडनचे रहिवासी लक्ष्मी मित्तल यांचे सत्तर देशांत पोलादनिर्मितीचे कारखाने होतेच, पण त्यांनीही 'आर्सेलर' नावाची फार मोठी कंपनी ताब्यात घेऊन पहिल्या क्रमांकवर झेप घेतली आहे.असे असले, तरी दरमाणशी पोलादाचा वापर करण्यात मात्र आपण खूपच मागे आहोत.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आवडे हे रूप गोजिरे सगुणपाहता लोचन सुखावले || धृ ||आता द्रूष्टी पुढे एसाची तू राहेजो मी तुज पाहे वेळोवेळा || १ ||लाचावले मन लागलीस गोडीते जीव न सोडी ऐसे झाले || २ ||तुका म्हणे आम्ही मागावे लडिवाळीपुरवावी आळी माय बाप || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सौंदर्य मानव प्राण्याला मिळालेली निसर्गाची विशेष देणगी आहे. त्या सौंदर्याला प्रत्येकाने जपले पाहिजे. पण,त्या सौंदर्याचे प्रदर्शन केल्याने त्या सौंदर्याचे महत्व कमी होते.वाईट वागल्याने किंवा एखाद्याचे वाईट केल्याने शेवट त्याचा वाईटच होत असतो. म्हणून जे काही मिळालेले आहे त्यातच समाधान मानून आनंदात राहण्याचा प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *ज्ञानाचा गर्व* आगगाडीचा प्रवास करीत असताना, एका प्राध्यापकाला आपल्या शेजारी एक आडाणी शेतकरी बसला असल्याचं आढळून आलं. स्वत:च्या ज्ञानाची घमेंड बाळगणारा तो प्राध्यापक थोडय़ाच वेळात त्या आडाणी शेतकर्‍याची थट्टा करून आजूबाजूच्या बसलेल्या प्रवाशांची करमणूक करू लागला. थोडा वेळ ती थट्टा निमूटपणे सहन केल्यावर तो शेतकरी त्या प्राध्यापकाला म्हणाला, साहेब, काही झालं तरी तुम्ही ज्ञानी आणि मी अज्ञानी. तरीसुद्धा आपला गाडीतला वेळ चांगला जावा, म्हणून आपण एकमेकांना कोडी घालूया. मी आडाणी व गरीब असल्याने कोडं सोडवण्यात जर मी हरलो, तर मी तुम्हाला फक्त पाच रुपये द्यायचे आणि जर तुम्ही हरलात, तर तुम्ही मात्र मला पंचवीस रुपये द्यायचे. आहे कबूल? हे ऐकून तो प्राध्यापक आनंदला आणि अवतीभवतीच्या सहप्रवांशावर छाप मारायलाही सुसंधी आपल्याकडे आपणहून चालून आली आहे असा विचार करून त्या शेतकर्‍याला म्हणाला, तुझी कल्पना मला मान्य आहे. पहिलं कोड, तू मला घाल.शेतकर्‍यानं विचारलं, ज्याला उडताना तीन पाय, चालताना दोन पाय आणि बसला असता फक्त एक पाय असतो, असा पक्षी कोणता ? या कोडय़ाचं उत्तर देता न आल्यानं प्राध्यापक काहीसा ओशाळून म्हणाला, बाबा रे, मी हरलो. हे घे पंचवीस रुपये, आणि या कोडय़ाचं उत्तर तू मला सांग. प्राध्यापकानं दिलेल्या पंचवीस रुपयांपैकी वीस रुपये स्वत:च्या खिशात टाकून, उरलेले पाच रुपये त्या प्राध्यापकाच्या हाती देत तो शेतकरी म्हणाला, मला सुद्धा या कोडय़ाचं उत्तर देता येत नाही, म्हणून मी हरल्याचे पाच रुपये तुम्हाला देत आहे एक आडाणी शेतकर्‍याने हातोहात चकविल्यामुळे फजिती पावलेला तो प्राध्यापक झटकून तिथून उठला व दुसर्‍या डब्यात गेला.तात्पर्य - ज्ञानाचा गर्व करू नये.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment