✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 जुलै 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Azu9jW9NP/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या वर्षातील २०७ वा दिवस 🚩 महत्वाच्या घटना :-1999 – कारगिल विजय दिवस, भारतीय सैन्याने कारगिल युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवला. दरवर्षी 26 जुलै हा "कारगिल विजय दिवस" म्हणून साजरा केला जातो.2008 – अहमदाबाद बॉम्बस्फोट, गुजरातमधील अहमदाबाद शहरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, यामध्ये अनेक निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला.🎂 जन्म :- • 1874 – जयकर एम.आर. (माधवराव जयकर):स्वातंत्र्यसैनिक, कायदेपंडित आणि शिक्षणतज्ज्ञ. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू🌹 मृत्यू :-• २००९ - भास्कर चंदावरकर, मराठी संगीतकार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वयंशिस्त हाच सर्वोत्तम उपाय*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या दौऱ्यात अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या घेतल्या भेटी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मी पदावरून रिटायर झाल्यानंतर कुठलंही शासकीय पद स्वीकारणार नाही; सरन्यायाधीश भूषण गवईंचं मोठं विधान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *काँग्रेस नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा लवकरच भाजप प्रवेश होण्याची शक्यता; काँग्रेसवर नाराजी उघड, शेरोशायरीतून संकेत, म्हणाले, बस बिखरना है मुझे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई, ठाणे, रायगडसह कोकणला ऑरेंज अलर्ट, विदर्भात पावसाचा जोर, तर मराठवाड्यातील अनेक जिल्हे मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सरकारने आता सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 30 दिवसांची अर्जित रजा घेण्याची दिली परवानगी, राज्यसभेत कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी यासंदर्भात घोषणा केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने डॉ.नीलम गोऱ्हे सन्मानित, हा पुरस्कार समाजातील प्रत्येक महिलेसाठी आहे - विधान परिषद उपसभापती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू वेदा कृष्णमूर्ती हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष वाघमारे, तंत्रस्नेही शिक्षक, धर्माबाद 👤 रमेश मस्के, नांदेड👤 वैभव भोसले, नांदेड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 36*नसते मला कधी इंजीन**नसते मला कसलेही इंधन**आपले पाय चालवा भरभर**तरच धावणार मी पटपट**सांगा मी आहे तरी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - टोपी ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशाकडे वाटचाल करण्यासाठी सदवर्तन हा पहिला टप्पा असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'तलाठी' या पदाचे नवीन नाव काय आहे ?२) कृत्रिम पावसाचे जनक कोण ?३) लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने २०२५ चा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' कोणाला जाहीर झाला आहे ?४) 'रोग्यांची सुश्रुषा करणारी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांची सीमा रेषा कोणती नदी ठरविते ? *उत्तरे :-* १) ग्राम महसूल अधिकारी २) व्हिन्सेंट जोसेफ शेफर, अमेरिकन शास्त्रज्ञ ३) नितीन गडकरी ४) परिचारिका ५) वैनगंगा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🧠 *वेड्या माणसाच्या मेंदूत काय बिघाड होतो ?* 🧠 वेडा म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर कपडे फाडणारी, दगड मारणारी, असंबद्ध बडबड करणारी व्यक्ती उभी राहते. एक तर आपल्याला तिची भीती वाटते किंवा किळस वाटते. आपण पाहिलेल्या अशा व्यक्ती म्हणजे वेडातील एक प्रकार आहे.मनोविकाराचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी काही व्यक्तींनाच वरील लक्षणे असतात. इतर प्रकारांमध्ये भ्रमिष्टपणा, उन्माद, अतिनैराश्य हे गंभीर आजार; तर तणावग्रस्त मानसिकता, नैराश्य, हिस्टेरिया हे कमी गंभीर आजार यांचा समावेश होतो. याशिवाय सदोष व्यक्तिमत्त्व - जसे संशयी स्वभाव, घुमेपणा, आत्मकेंद्रीपणा, हट्टीपणा, परावलंबित्व, तसेच समाजविघातक कृत्य करण्याची प्रवृत्ती; हे देखील सौम्य प्रकारचे मनोविकार समजले जातात. काही व्यक्ती घराला कुलूप लावल्यानंतर तीन तीनदा ओढून तर पाहतातच, पण थोडे अंतर गेल्यावर परत येऊन पाहतात. हा सुद्धा एक प्रकारचा मनोविकारच आहे. अंगात येणे, लैंगिक विकृती व व्यसनाधीनता; हे देखील मनोविकारच आहेत.वरील मनोविकार पाहिल्यावर आपल्याला साहजिकच असा प्रश्न पडतो की, या व्यक्तींच्या मेंदूत काही बदल होत असतील का ?आपल्या मेंदूमध्ये कोट्यवधी पेशी असतात. त्या पेशी अनेक धाग्यांसारख्या तंतूंनी एक दुसऱ्याशी जोडलेल्या असतात. एका पेशीतील संदेश दुसऱ्या पेशीपर्यंत जाण्यासाठी तर तंतूत असणारे रासायनिक द्रव्य व त्यातून जाणारा विद्युतसंदेश यांचा महत्त्वाचा वाटा असतो. या रासायनिक पदार्थांचे प्रमाण कमी जास्त झाले किंवा विद्युतसंदेशात बिघाड झाला, तर मेंदूचे कामकाज बिघडते. अर्थात मेंदूच्या रचनेत काही बदल होत नाही.मानसिक विकारांची कारणे बघितल्यास त्यात अनुवांशिकता (विशेषत: गंभीर मानसिक विकार), मातापित्याचे प्रेम व वागणूक, घरातील वातावरण, सामाजिक आर्थिक परिस्थिती, व्यसने व शारीरिक आजार, मेंदूच्या आवरणाचा दाह, गुप्तरोग, अपघातात मेंदूला इजा होणे; यांचा समावेश होतो.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आता बोला मुखाने हरि नाम जय जय रामआता बोला मुखाने जय जय राम, जय जय राम जय जय रामआता तरी बोला मुखाने जय जय राम || धृ ||राम नामाने वाल्या कोळी तरला, वाल्याचा वाल्मीकी झालाऐसे हरिनामाचे काम…. जय जय || १ ||राम नामाने आवडीत घडले, पाण्यावरती पाषाण तरलेऐसे हरिनामाचे काम…… जय जय || २ ||एकाजनार्दनी राम नाम, उद्धरिले भाविकातऐसे हरिनामाचे काम ….. जय जय || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनाला चंचल म्हणतात कारण ते एका विचारावर किंवा एका भावनेवर जास्त काळ लक्ष केंद्रित करू शकत नाही. ते सतत विचार, भावना आणि इच्छांमध्ये बदलत राहते. चंचल मन कुठं जाऊन स्थिरावेल हे सांगता येत नाही. चंचल मनामुळे नको त्या गोष्टी आपल्याकडून घडतात आणि अडचणी वाढायला सुरूवात होते म्हणून प्रत्येकाने अंतर्मनाचा विचार करावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *श्रेष्ठ कोण ?* ‍‍ एक माणूस अरण्यात फिरत असता तेथे त्याची एका सिंहाशी भेट झाली. त्यावेळी त्या दोघांनी निरनिराळय़ा विषयांवर बर्‍याच गप्पा मारल्या व त्यामुळे ते दोघे एकमेकांस आवडू लागले. शेवटी मात्र ते 'माणूस श्रेष्ठ की, सिंह श्रेष्ठ?' या विषयावर बोलू लागले व त्याचे वादात रूपांतर झाले. ते दोघेही भांडू लागले. नुसत्या बोलण्याने माणसाचे श्रेष्ठत्व त्या माणसास सिध्द करता येईना, तेव्हा त्याने आपल्याजवळ असलेले चित्र त्याला दाखविले. सिंहाची आयाळ हातात धरून त्याच्या पाठीवर एक माणूस आहे असे ते चित्र होते. ते पाहून सिंह त्याला म्हणाला, 'ज्याने हे शिल्प तयार केले तो मनुष्य होता, तोच जर सिंह असता तर माणसाच्या छातीवर बसून सिंह त्याला मारतो आहे, असे त्याने दाखविले असते.'तात्पर्य - प्रत्येक जण वाद घालताना स्वत:ला अनुकूल असतील अशीच प्रमाणे पुढे मांडतो. दुसर्‍या बाजूची प्रमाणे समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment