✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 जुलै 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Azu9jW9NP/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या वर्षातील २०७ वा दिवस 🚩 महत्वाच्या घटना :-1999 – कारगिल विजय दिवस, भारतीय सैन्याने कारगिल युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवला. दरवर्षी 26 जुलै हा "कारगिल विजय दिवस" म्हणून साजरा केला जातो.2008 – अहमदाबाद बॉम्बस्फोट, गुजरातमधील अहमदाबाद शहरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, यामध्ये अनेक निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला.🎂 जन्म :- • 1874 – जयकर एम.आर. (माधवराव जयकर):स्वातंत्र्यसैनिक, कायदेपंडित आणि शिक्षणतज्ज्ञ. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू🌹 मृत्यू :-• २००९ - भास्कर चंदावरकर, मराठी संगीतकार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वयंशिस्त हाच सर्वोत्तम उपाय*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या दौऱ्यात अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या घेतल्या भेटी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मी पदावरून रिटायर झाल्यानंतर कुठलंही शासकीय पद स्वीकारणार नाही; सरन्यायाधीश भूषण गवईंचं मोठं विधान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *काँग्रेस नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा लवकरच भाजप प्रवेश होण्याची शक्यता; काँग्रेसवर नाराजी उघड, शेरोशायरीतून संकेत, म्हणाले, बस बिखरना है मुझे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई, ठाणे, रायगडसह कोकणला ऑरेंज अलर्ट, विदर्भात पावसाचा जोर, तर मराठवाड्यातील अनेक जिल्हे मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सरकारने आता सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 30 दिवसांची अर्जित रजा घेण्याची दिली परवानगी, राज्यसभेत कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी यासंदर्भात घोषणा केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने डॉ.नीलम गोऱ्हे सन्मानित, हा पुरस्कार समाजातील प्रत्येक महिलेसाठी आहे - विधान परिषद उपसभापती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू वेदा कृष्णमूर्ती हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष वाघमारे, तंत्रस्नेही शिक्षक, धर्माबाद 👤 रमेश मस्के, नांदेड👤 वैभव भोसले, नांदेड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 36*नसते मला कधी इंजीन**नसते मला कसलेही इंधन**आपले पाय चालवा भरभर**तरच धावणार मी पटपट**सांगा मी आहे तरी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - टोपी ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशाकडे वाटचाल करण्यासाठी सदवर्तन हा पहिला टप्पा असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'तलाठी' या पदाचे नवीन नाव काय आहे ?२) कृत्रिम पावसाचे जनक कोण ?३) लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने २०२५ चा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' कोणाला जाहीर झाला आहे ?४) 'रोग्यांची सुश्रुषा करणारी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांची सीमा रेषा कोणती नदी ठरविते ? *उत्तरे :-* १) ग्राम महसूल अधिकारी २) व्हिन्सेंट जोसेफ शेफर, अमेरिकन शास्त्रज्ञ ३) नितीन गडकरी ४) परिचारिका ५) वैनगंगा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🧠 *वेड्या माणसाच्या मेंदूत काय बिघाड होतो ?* 🧠 वेडा म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर कपडे फाडणारी, दगड मारणारी, असंबद्ध बडबड करणारी व्यक्ती उभी राहते. एक तर आपल्याला तिची भीती वाटते किंवा किळस वाटते. आपण पाहिलेल्या अशा व्यक्ती म्हणजे वेडातील एक प्रकार आहे.मनोविकाराचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी काही व्यक्तींनाच वरील लक्षणे असतात. इतर प्रकारांमध्ये भ्रमिष्टपणा, उन्माद, अतिनैराश्य हे गंभीर आजार; तर तणावग्रस्त मानसिकता, नैराश्य, हिस्टेरिया हे कमी गंभीर आजार यांचा समावेश होतो. याशिवाय सदोष व्यक्तिमत्त्व - जसे संशयी स्वभाव, घुमेपणा, आत्मकेंद्रीपणा, हट्टीपणा, परावलंबित्व, तसेच समाजविघातक कृत्य करण्याची प्रवृत्ती; हे देखील सौम्य प्रकारचे मनोविकार समजले जातात. काही व्यक्ती घराला कुलूप लावल्यानंतर तीन तीनदा ओढून तर पाहतातच, पण थोडे अंतर गेल्यावर परत येऊन पाहतात. हा सुद्धा एक प्रकारचा मनोविकारच आहे. अंगात येणे, लैंगिक विकृती व व्यसनाधीनता; हे देखील मनोविकारच आहेत.वरील मनोविकार पाहिल्यावर आपल्याला साहजिकच असा प्रश्न पडतो की, या व्यक्तींच्या मेंदूत काही बदल होत असतील का ?आपल्या मेंदूमध्ये कोट्यवधी पेशी असतात. त्या पेशी अनेक धाग्यांसारख्या तंतूंनी एक दुसऱ्याशी जोडलेल्या असतात. एका पेशीतील संदेश दुसऱ्या पेशीपर्यंत जाण्यासाठी तर तंतूत असणारे रासायनिक द्रव्य व त्यातून जाणारा विद्युतसंदेश यांचा महत्त्वाचा वाटा असतो. या रासायनिक पदार्थांचे प्रमाण कमी जास्त झाले किंवा विद्युतसंदेशात बिघाड झाला, तर मेंदूचे कामकाज बिघडते. अर्थात मेंदूच्या रचनेत काही बदल होत नाही.मानसिक विकारांची कारणे बघितल्यास त्यात अनुवांशिकता (विशेषत: गंभीर मानसिक विकार), मातापित्याचे प्रेम व वागणूक, घरातील वातावरण, सामाजिक आर्थिक परिस्थिती, व्यसने व शारीरिक आजार, मेंदूच्या आवरणाचा दाह, गुप्तरोग, अपघातात मेंदूला इजा होणे; यांचा समावेश होतो.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आता बोला मुखाने हरि नाम जय जय रामआता बोला मुखाने जय जय राम, जय जय राम जय जय रामआता तरी बोला मुखाने जय जय राम || धृ ||राम नामाने वाल्या कोळी तरला, वाल्याचा वाल्मीकी झालाऐसे हरिनामाचे काम…. जय जय || १ ||राम नामाने आवडीत घडले, पाण्यावरती पाषाण तरलेऐसे हरिनामाचे काम…… जय जय || २ ||एकाजनार्दनी राम नाम, उद्धरिले भाविकातऐसे हरिनामाचे काम ….. जय जय || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनाला चंचल म्हणतात कारण ते एका विचारावर किंवा एका भावनेवर जास्त काळ लक्ष केंद्रित करू शकत नाही. ते सतत विचार, भावना आणि इच्छांमध्ये बदलत राहते. चंचल मन कुठं जाऊन स्थिरावेल हे सांगता येत नाही. चंचल मनामुळे नको त्या गोष्टी आपल्याकडून घडतात आणि अडचणी वाढायला सुरूवात होते म्हणून प्रत्येकाने अंतर्मनाचा विचार करावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *श्रेष्ठ कोण ?* एक माणूस अरण्यात फिरत असता तेथे त्याची एका सिंहाशी भेट झाली. त्यावेळी त्या दोघांनी निरनिराळय़ा विषयांवर बर्याच गप्पा मारल्या व त्यामुळे ते दोघे एकमेकांस आवडू लागले. शेवटी मात्र ते 'माणूस श्रेष्ठ की, सिंह श्रेष्ठ?' या विषयावर बोलू लागले व त्याचे वादात रूपांतर झाले. ते दोघेही भांडू लागले. नुसत्या बोलण्याने माणसाचे श्रेष्ठत्व त्या माणसास सिध्द करता येईना, तेव्हा त्याने आपल्याजवळ असलेले चित्र त्याला दाखविले. सिंहाची आयाळ हातात धरून त्याच्या पाठीवर एक माणूस आहे असे ते चित्र होते. ते पाहून सिंह त्याला म्हणाला, 'ज्याने हे शिल्प तयार केले तो मनुष्य होता, तोच जर सिंह असता तर माणसाच्या छातीवर बसून सिंह त्याला मारतो आहे, असे त्याने दाखविले असते.'तात्पर्य - प्रत्येक जण वाद घालताना स्वत:ला अनुकूल असतील अशीच प्रमाणे पुढे मांडतो. दुसर्या बाजूची प्रमाणे समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 जुलै 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9?mode=ac_t••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔹 महत्वाच्या घटना :• 1911 – अमेरिका आणि जपान दरम्यान व्यापार करार झाला.• 1927 – बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अॅन्ड ट्रामवेज कंपनीने मुंबईत पहिली डिझेल बस सेवा सुरू केली.• 1969 – अपोलो 11 अंतराळ मोहिमेतील नायक पृथ्वीवर परतले. नील आर्मस्ट्राँग, बज़ ऑल्ड्रिन आणि मायकल कॉलिन्स यांचे यशस्वी आगमन.🎉 जन्मदिवस :•|1899 – गोविंद तळवलकर, विख्यात मराठी पत्रकार आणि लेखक.• 1951 – लिंडा कार्टर, अमेरिकन अभिनेत्री (Wonder Woman साठी प्रसिद्ध).🕯️ पुण्यतिथी :• 1980 – पीटर सेलर्स, प्रसिद्ध ब्रिटिश विनोदी अभिनेता.• 2000 – अर्जुन सिंह, भारतीय राजकारणी🛰️ वैज्ञानिक/सांस्कृतिक माहिती :"सायन्स फिक्शन डे" काही ठिकाणी 24 जुलै रोजी साजरा केला जातो, कारण याच दिवशी विज्ञानकथांवर आधारित अनेक चित्रपटांची किंवा पुस्तकांची सुरुवात झाली होती.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••..... समूहात join होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना २०२५ चा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *क्रीडा सुधारणा, डोंपिंग कायदा आणि बुलेट ट्रेन प्रकल्प बाबत महत्वाची विधेयक आज लोकसभेत सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारतीय मजदूर संघाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त मोहन भागवत यांचं मार्गदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी गोड बातमी, 25 जुलैपासून मिळणार चितळे बंधूचा लाडूचा प्रसाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोळसा आयातीत देशाचे 60,000 कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले; मंत्री किशन रेड्डी यांची राज्यसभेत माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस पुन्हा सक्रिय, मुंबईसह कोकणातसुद्धा पावसानं लावली जोरदार हजेरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताची धावसंख्या 4 बाद 264*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गोविंद शेठ कोकूलवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड 👤 संतोष मुलकोड, LBS कॉलेज, धर्माबाद👤 शरयू देसाई, साहित्यिक, मुंबई 👤 राजेश पाटील मनुरकर, शिव व्याख्याते, नांदेड 👤 विष्णू रामोड, धर्माबाद👤 सचिन टेकाळे, माहूर 👤 संतोष लवांडे, शिक्षक, रायगड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 34*दिवसा झोप काढुनी मी**फिरतो बाहेर रात्रीला मी**आहे असा प्रवासी मी**पाठीला दिवा बांधून मी**ओळखा कोण आहे मी ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - लाल मिरची ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सूर्यदेखील सूर्यास्तानंतर दिसेनासा होतो, परंतु बुद्धिवंताच्यासारखे तारे कायम दैदीप्यमान असतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पाण्यासोबत कार्बन डायऑक्साइडची अभिक्रिया करून कोणते आम्ल तयार होते ?२) महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह कोणते ?३) कोतवालाची नेमणूक कोण करतो ?४) 'रात्रीचा पहारेकरी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट' ही संस्था कोठे आहे ? *उत्तरे :-* १) कार्बोनिक आम्ल ( Carbonic acid ) २) षन्मुखानंद सभागृह, मुंबई ३) तहसीलदार ४) जागल्या ५) भोसरी, पुणे *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *केस का गळतात ?* 📕केस निरोगी, चमकदार, दाट असण्यासाठी त्यांचे पोषण होणे आवश्यक असते. हे पोषण आहारातील स्निग्धांश, प्रथिने यांद्वारे होत असते. प्रथिनांचा उपयोग केसातील केरॅटीन, मेलॅनिन या प्रथिनांची झालेली झीज भरून काढण्यासाठी होतो. जीवनसत्त्व अ, इ, प्रथिने, स्निग्धांश यांमुळे तेथील त्वचेचे पोषण होऊन मुळे मजबूत राहण्यास मदत होते.तसे दररोजच आपले केस थोड्या प्रमाणात गळत असतात. ते नैसर्गिक असते; परंतु समतोल आहार न घेतल्यास, त्वचेचे काही आजार झाल्यास, केसात कोंडा झाल्यास, विंचरताना ओढाताण झाल्यास केस गळतात. वर सांगितल्याप्रमाणे आजारानंतर केस गळण्याचे कारण पोषण न होणे हे असते. आजारात आहार योग्य प्रकारे घेतला जात नाही. त्यासोबतच आजाराच्या प्रतिकारासाठी शरीरातील पोषक घटक वापरले जाऊन त्यांची कमतरता निर्माण होऊन केसांचे पोषणही खालावते व त्यांची मुळे सैल होऊन ते गळावयास लागतात. लहान मुलांमध्ये प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या क्वाशिओस्कार या आजारात केस भुरकट होतात आणि थोडे ओढले तरी पटकन उपटले जातात.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नाम घेता उठाउठी,होय संसाराची तुटी || धृ ||ऐसा लाभ बांधा गांठीविठ्ठल पायी मिठी || १ ||नामापरते साधन नाहीजें तू करिसी आणिक कांही || २ ||हाकरोनी सांगे तुकानाम घेता राहो नका || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यापेक्षा वयाने लहान असलेली व्यक्ती जर चांगले कार्य करत असेल तर त्याला प्रोत्साहन देणे मोठ्यांचे कर्तव्य आहे. पण,असे न होता त्याच्या वाटेत अडथळे निर्माण करून गंमत बघणारे असतील तर त्यांना मोठे म्हणता येणार नाही. माणसाचे विचार हे उच्च दर्जाचे तसेच एखाद्याला प्रोत्साहन देणारे असावेत. एखाद्याच्या जीवनात अडथळे निर्माण करणारे नसावेत. कारण या प्रकारची विचारसरणी असलेल्यांना लहान तर काय मुर्ख माणूस सुद्धा जवळ करत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" मी " चा त्याग करा*एका विख्यात संताला भेटण्यासाठी एक राजा आला आणि म्हणाला,’’ तुम्ही मला त्या स्थितीमध्ये घेऊन जा, ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात.’’ संताने म्हटले,’’ महाराज मी तुम्हाला त्या अवस्थेत निश्र्चित घेऊन जाईन, पण माझी एक अट आहे. उद्या पहाटे चार वाजता तुम्ही एकटे माझ्या कुटीवर या.’’ राजा म्हणाला,’’ ठीक आहे.’’ दुस-या दिवशी पहाटे राजा कुटीवर आला, राजाने कुटीच्या दारापाशी येताच संताच्या नावाने हाक मारली. त्याबरोबर आत जागे असणा-या संतांनी विचारले की कोण आले आहे, राजाने सांगितले,’’ मी राजा आलो आहे’’ संतांनी सांगितले की उद्या या. राजाला विचित्र वाटले पण तो तेथून निघून गेला. दुस-या दिवशी पहाटे चार वाजता राजा एकटा पुन्हा कुटीपाशी गेला, त्याने हाक मारली, संतांनी तोच प्रश्र्न विचारला, राजाने यावेळी उत्तरात सुधारणा केली कारण मी राजा आलो आहे हे वाक्य संतांना आवडले नसेल म्हणून राजाने सांगितले,’’ मी आलो आहे’’ संतांनी सांगितले, उद्या या. तिसरे दिवशी राजा पुन्हा गेला, दोन दिवसांप्रमाणेच घडले यावेळी राजाने उत्तर दिले, ‘’मी आहे’’ संतानी पुन्हा उद्या या असे सुनावले. राजा चौथ्या दिवशी मात्र विचारात पडला आता जावे की नको कारण संत काहीही उत्तर दिले हाकलून देतात, त्यापेक्षा न जाणेच बरे या विचारात होता. मात्र आता तीन दिवस हाकलून दिले आहे, आता चौथ्या दिवशी जाऊन बघु. चौथ्या दिवशी पण राजा गेला, त्याने संतांच्या नावाने हाक मारली, संतांनी आतूनच विचारले, कोण आहे, मात्र यावेळी राजाला काय उत्तर द्यावे हे सुचले नाही. तो गप्प राहिला. मग काही क्षणातच आतून संत बाहेर आले, त्यांनी राजाला जवळ घेतले, घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, ‘’राजन तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण झालात, पहिले तीन दिवसात तुमच्या उत्तरात तुम्ही ‘मी’ आलो असे उदगार काढले पण मी तर तुम्हाला एकट्यानेच बोलावले होते. तुम्ही तुमच्या मी पणाला बरोबर घेऊन आलात. मानवीजीवनात या मी पणाला काहीही स्थान नाही. मी पणा सोडला की खूप काही शिकावयास मिळते’’ तात्पर्य - मानवाने ‘’मी’’ पणा सोडल्यास खूप काही प्राप्त होते. ‘ मी’ पणाचा मृत्यू ज्यादिवशी मानवातून होतो तो त्यादिवशी संतत्वाकडे वाटचाल करू लागतो. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 जुलै 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1AQbSgPE5H/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📜 महत्वाच्या घटना :-• १९९५ - हेल-बॉप धूमकेतूचा शोध• १९२९ - इटलीमध्ये परभाषेतील शब्द वापरण्यास बंदी🎂 जन्म :- • १८५६ - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी.• १८८६ - वॉल्टर शॉट्की, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.• १९०६ - चंद्रशेखर आझाद, भारतीय क्रांतिकारक.• १९०६ - व्लादिमिर प्रेलॉग, नोबेल पारितोषिक विजेता क्रोएशियाचा रसायनशास्त्रज्ञ.• १९१७ - लक्ष्मीबाई यशवंत भिडे (ऊर्फ माई भिडे), मराठी नाट्य-चित्रपट अभिनेत्री.🌹 मृत्यू :- • १९९७ - वसुंधरा पंडित, भारतीय गायिका• २००४ - मेहमूद, हिंदी चित्रपट अभिनेता.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोंधळलेला पालक*आपल्या मुलांना नेमकं कोणत्या शाळेत आणि कोणत्या माध्यमातून शिक्षण द्यावं या संभ्रमात आजचा पालक अडकला आहे..........!..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा मंजूर, गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन अभियानाचा टप्पा पार, सहा कोटी लोकांची तपासणी पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मोतीबिंदू विरहित वर्धा जिल्हा अभियानास सुरुवात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 3.4 टक्के वाढ होण्याची शक्यता, सरकार रक्षाबंधनपूर्वी याबाबत निर्णय जाहीर करू शकते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आधार, मतदान ओळखपत्र किंवा रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्र नाहीत, निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बॉलिवूडच्या 'सैयारा' चित्रपटाचा सुपरस्टार्सना धोबीपछाड; मंडे टेस्टही पास, फक्त 4 दिवसांतच मिळवला 'हिट सिनेमा'चा टॅग; 101.82 कोटींची कमाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या T-20 सामन्यात पाकिस्तानाचा सलग दुसरा पराभव, बांगलादेशचा 8 धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 उदयकुमार शिल्लारे, तंत्रस्नेही शिक्षक, धर्माबाद 👤 अलका कुलकर्णी, शिक्षिका तथा साहित्यिक, बीड 👤 प्रदीप दळवी, इंजिनियर, पुणे 👤 जितेंद्र पाटील, धर्माबाद 👤 आनंदराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते, तेलंगणा👤 विकास पाटील, साहित्यिक 👤 शंकर बोईनवाड, धर्माबाद 👤 लक्ष्मण मलगिरे, लातूर👤 वैभव पाटील, आष्टा, बीड 👤 संतोष सुवर्णकार, सालेगाव, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 33*हरी झंडी लाल लाल कमान, तोबा तोबा करे इंसांन, कौन हूँ मै पहचान …. ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - कुलूप ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक व्यक्तीच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी निसर्गाने मानवाशी कुटुंबाद्वारे साहचर्य निर्माण केले आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) चीनने कोणत्या नदीवर जगातील सर्वात मोठ्या धरणाचे बांधकाम सुरू केले आहे ?२) भारताने मलेरियावरील पहिल्या स्वदेशी विकसित केलेल्या लसीचे नाव काय आहे ?३) ई-सिगारेटवर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते ?४) 'रक्षण करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) नुकतेच निधन झालेले सौदी अरेबियाचे ओळखले जाणारे 'झोपेचे राजकुमार' चे नाव काय ? *उत्तरे :-* १) ब्रह्मपुत्रा २) AdFalciVax ३) पंजाब ४) रक्षक ५) प्रिन्स अलवलीद बिन खालीद बिन तलाल बिन अब्दुल अजीज अल सौद*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ह्रदयाचे कार्य कसे चालते ?* 📙विहिरीवर पाणी उपसण्यासाठी बसवलेला पंप तुम्ही पाहिला असेल. या पंपामुळे विहिरीतील पाणी उपसले जाते व ते शेतात सोडले जाते. पंपाच्या शक्तीमुळे खोल असलेले पाणी वर खेचले जातेच, पण दाबाखाली नाळांवाटे दूरवर शेतात सोडलेही जाते. हृदय एखाद्या पंपासारखेच कार्य करते. हृदय स्नायूंचे बनलेले असते. हृदय सामान्यतः आपल्या डाव्या हाताच्या मुठीच्या आकाराइतके मोठे असते. हृदयाचे डावा व उजवा असे दोन भाग असतात. या दोहोंच्या मध्ये स्नायूंचा पडदा असतो. डाव्या बाजूला शुद्ध रक्त तर उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते. डाव्या व उजव्या भागाचे प्रत्येकी दोन कप्पे असतात. वरच्या कप्प्याला कर्णिका (Atrium), तर खालच्या भागाला जवनिका (Ventricle) असे म्हणतात. कर्णिका व जवनिका यांच्यामध्ये रक्त प्रवाहासाठी झडपा असलेला मार्ग असतो. या झडपांमुळे रक्त कर्णिकेतुन (Artium) जवनिकेत (Ventricle) जाऊ शकते, पण उलटे परत जाऊ शकत नाही.उजव्या कर्णिकेत (Atrium) शरीराच्या सर्व भागातील अशुद्ध रक्त जमा होते. ते नंतर उजव्या जवनिकेत (Ventricle) जाते. तेथून रक्तवाहिन्यांद्वारे हे रक्त फुप्फुसामध्ये शुद्धीकरणासाठी नेले जाते. फुफ्फुसात रक्त शुद्ध होते. शुद्ध झालेले हे रक्त डाव्या कर्णिकेत (Artium) येते व डाव्या कर्णिकेतून डाव्या जवनिकेत जाते. तेथून अनेक धमन्यांद्वारे वा रोहिण्यांद्वारे ते शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवले जाते.हृदय कायम आकुंचन व प्रसरण पावत असते. दर मिनिटाला सुमारे ७२ वेळा आकुंचन प्रसरण होत असते. हृदय प्रसरण पावल्यावर कर्णिकांमधील (Artium) रक्त जवनिकांमध्ये (Ventricle) येते. आकुंचन पावल्यावर जवनिकांतील रक्त फुफ्फुसात व शरीरभर पोहोचवले जाते. हृदयाचे हे कार्य न थकता, न थांबता अहोरात्र चालूच असते. हृदय काही मिनिटे बंद झाले तरी आपला मृत्यू होते होतो. असे हे हृदय !*डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे || १ ||डोळे तुम्ही घ्यारे सुख | पाहा विठोबाचे मुख || २ ||तुम्ही आइका रे कान | माझ्या विठोबाचे गुण || ३ ||मन तेथे धाव घेई | राही विठोबाचे पायी || ४ ||तुका म्हणे जीवा | नको सोडू या केशवा || ५ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सहसा आपल्याला झोप लागत नाही. पण एखादे स्वप्न जरी पडले की, लगेच गाढ झोप येत असते. आणि त्याच गाढ झोपेमुळे स्वप्नात आपण रमून जातो. स्वप्न बघणे आणि त्यात रमून जाणे हे तेवढ्यापुरते मर्यादित असते. पण आपण बघितलेले स्वप्न साकार करणे ही आपली जबाबदारी असते. गाढ झोपेत स्वप्न साकार होत नाही तर हिंमतीने, जिद्दीने तसेच स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवल्याने तो बघितलेला दिवस आपण स्वतः आणू शकतो म्हणून स्वतः तेवढेच जागे राहणे गरजेचे असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वामी रामतीर्थ आणि जपानी विद्यार्थी*स्वामी रामतीर्थ अमेरिकेला चालले होते तेव्हाची गोष्ट. ते ज्या जहाजात बसले होते त्यातून सुमारे दीडशे जपानी विद्यार्थी अमेरिकेला चालले होते. स्वामीजींचा त्यांच्याशी परिचय झाला. आणि ते विद्यार्थी स्वामीजींच्या ज्ञानाने फारच प्रभवित झाले. त्या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण श्रीमंत कुटुंबातील होते. स्वामीजींनी त्यांना बोलता बोलता विचारले, ‘ तुम्ही सर्व अमेरिकेला शिक्षणासाठी जात आहात का’ सर्वांनी स्वामीजींना विशेष अध्ययनासाठी जात असल्याचे सांगितले तेव्हा स्वामीजींनी त्या सर्वांना सहज प्रश्न केला, ‘ बरं, हे सांगा, बरेच दिवस तुम्ही अमेरिकेत राहणार आहात, तर त्यासाठी पैशाची व्यवस्था आपल्याकडे काय आहे’ स्वामीजींच्या त्या प्रश्नाचे उत्तर त्या विद्यार्थ्यानी दिले, ‘ स्वामीजी आम्ही तर या जहाजाचे भाडेही सोबत आणलेले नाही. जहाजात काही काम करून त्याचे भाडे देऊ आणि अमेरिकेतही आपल्या शिक्षणाचा खर्च एखादी नोकरी करून भागवू. आपल्या राष्ट्राचे धन व्यर्थ विदेशात का खर्च करावे, स्वामी रामतीर्थांनी पाहीले की सर्व विद्यार्थी जहाजात सफाई आणि छोटे मोठे काम करून जहाजाचे भाडे जमा करीत होते. त्यांचे देशप्रेम पाहून स्वामीजी फारच प्रसन्न झाले आणि मनात विचार करू लागले की, विदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यानीही असा विचार केल्यास भारताला संपन्न राष्ट्र बनायला वेळ लागणार नाही.तात्पर्य - देशातील साधनांचा, धनाचा सद्उपयोग अशी राष्ट्रसेवा आहे की ज्यामुळे राष्ट्र जलदगतीने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 जुलै 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16wA3MCvxM/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📜 ठळक घटना :• १७९३ – फ्रान्समध्ये पहिल्यांदाच मॅक्सिमिलियन रोबेस्पिअर यांनी "जनतेच्या सार्वभौमत्व" या कल्पनेचा पुरस्कार केला.• १९४७ – भारताच्या संविधान समितीने राष्ट्रीय ध्वज स्वरूपाला अंतिम मंजुरी दिली.• १९७२ – अमेरिकेचे उपाध्यक्ष स्पिरो आग्न्यू यांनी भारत भेट दिली.• २००३ – भारताची पहिली अंतराळवीर कल्पना चावला यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने टपाल तिकीट जारी केले.🎂 जन्म : • १८८७ - गुस्ताव लुडविग हेर्ट्झ, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.• १९१८ - गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार.• १९२१ - विल्यम रॉथ, अमेरिकेचा सेनेटर.• १९२३ - मुकेश, पार्श्वगायक.• १९३७ - वसंत रांजणे, भारताचा कसोटी क्रिकेट खेळाडू.• 1959 - अजित अनंतराव पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र • १९७० - देवेंद्र गंगाधर फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र 🕯️ पुण्यतिथी:• १९३३ – बिपिनचंद्र पाल, स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारक.• २००४ – सायरा बानो यांची आई नसीम बानो, प्रसिद्ध अभिनेत्री.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाचा आणि विचार करा " तुमची जात कंची .......?"..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जगभरातील 60 संशोधकांचे चरित्र मराठीत, 'जनक शोधांचे' पुस्तकाचे प्रकाशन, हे पुस्तक प्रत्येक शाळा आणि कॉलेज मध्ये पोहचले पाहिजे - वेणूगोपाल रेड्डी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुणे :- धर्मादाय संस्थांच्या वार्षिक उत्पन्नातून अंशदान वसुली होणार:उच्च न्यायालयाचे शासनाला निर्देश; उचित टक्केवारी निश्चित करण्यास सांगितले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा घेतला निर्णय, मध्य रेल्वेने २५०, तर पश्चिम रेल्वेने सोडल्या ५ गाड्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारती एअरटेलने टाटाच्या बड्या कंपनीला मागे टाकत प्राप्त केले तिसरे स्थान*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यातील तरुणांना चित्रपट, माध्यम व मनोरंजन क्षेत्रात व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने उचलले महत्त्वपूर्ण पाऊल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पहिल्या T-20 सामन्यात बांगलादेशने केला पाकिस्तानचा पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय कदम, पत्रकार, देशोन्नती धर्माबाद तालुका प्रतिनिधी 👤 प्रल्हाद तुमेदवार, शिक्षक, बिलोली 👤 अनुराधा हवेलीकर-पदमे 👤 श्रीनिवास वाघमारे👤 संतोष जाधव 👤 पद्माकर गोपाळराव मुळे 👤 अमोल बबनराव गायकवाड 👤 धनराज वाघ 👤 विश्वनाथ चित्रलवार 👤 दामोधर साळुंके *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 32*ना खातो मी अन्न, ना घेतो मी तुमच्याकडून पगार, तरीही देतो पहारा दिवस रात्र, सांगा पाहू मी आहे तरी कोण …?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - वर्ष ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जुन्यांनी नव्यांसाठी मार्ग मोकळा केला पाहिजे, हा सृष्टीचा क्रम आणि नियम आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या धातूला राजधातू असे म्हटले जाते ?२) 'गोल्डन बॉल पुरस्कार' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?३) 'घरचा पुरोहित' ह्या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण ?४) 'रणांगणावर आलेले मरण' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) महाराष्ट्र राज्याची पूर्व- पश्चिम लांबी किती किमी आहे ? *उत्तरे :-* १) सोने ( Gold ) २) फुटबॉल ३) भास्करराव जाधव ४) वीरमरण ५) ८०० किमी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *तोंडाला दुर्गंधी का येते ?*📒ही विकृती म्हणजे काही जिवाणूंची अवकृपा आहे. हवा नसतानाही ज्यांची वाढ होऊ शकते, अशा घ्या ऍनेरोबिक जातीच्या जीवाणूंच्या करणीपायी तोंडात काही सल्फरयुक्त संयुगांची निर्मिती होते. ही संयुगं सहजासहजी हवेत उडून जाऊ शकतात. म्हणजेच बाष्पनशील असतात. यातलं एक संयुग म्हणजे हायड्रोजन सल्फाईड हा वायू असतो. कुजक्या अंड्यांमधूनही हाच वायू बाहेर पडतो. तसंच मिथाईल मरकॅप्टन नावाचं दुसरं एक संयुगही या दुर्गंधीला कारणीभूत असतं.काही कारणांनी जेव्हा आपलं तोंड कोरडं पडतं तेव्हा अशा जीवाणूंच्या वाढीला पोषक वातावरण तयार होतं. त्यात अशा प्रसंगी तोंडातल्या लाळेच्या स्रावालाही आहोटी लागते. लाळ आपल्या जिभेवरचा, एकंदरीतच तोंडातला ओलावा राखण्यास मदत करते. शिवाय लाळेमधलं लायसोझाईम नावाचं विकर जीवाणूंना मारून टाकतं व त्यांच्या वाढीला त्यामुळे आळा बसतो; पण लाळेचा पाझर आटला की या दोन्ही प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडत नाहीत. त्यामुळे या जीवाणूंचं फावतं. त्यांच्या करणीपायी तयार होणारी दुर्गंधीयुक्त रसायने तोंडात साचून राहतात.आपल्या जीभेवरच्या वळकट्या, हिरड्यांच्या खालची जागा किंवा दातातल्या फटी या सहसा कोरड्या असतात. तसंच त्या थोड्याश्या अंधार्याही असतात. अशा जागी हे जिवाणु फोफावतात. त्यात जर दातांच्या फटीत अन्नाचे कण अडकून पडलेले असतील तर ते कुजतात. या जीवाणूंना ते पोषक ठरतात. त्यांच्या वाढीला मदतच करतात.आपल्या आहाराचीही कधी कधी या जीवाणूंच्या वाढीला मदत होते. आहारातील काही पदार्थांच्या सेवनामुळे या ऍनेरोबिक जीवाणूंच्या वाढीला आणि बाष्पनशील आणि दुर्गंधीयुक्त संयुगांच्या निर्मितीला हातभार लावला जातो. कॉफी हा असाच एक पदार्थ आहे. त्याच्या अतिसेवनामुळे त्यातील आम्लधर्मीय पदार्थ तोंडातील ओलावा कमी करण्यास कारणीभूत होतात. वातावरण मग या दुर्गंधीकारक जीवाणूंच्या वाढीस योग्य होतं. शर्करायुक्त पदार्थ किंवा चुइंगमसारख्या पदार्थांचं जेव्हा या जिवाणूंकरवी विघटन होतं तेव्हाही ही बाष्पनशील संयुगं निर्माण केली जातात. मसालेदार पदार्थ किंवा कांदे खाल्ल्यावर त्यांच्या पचनापोटी निर्माण होणारे वायू रक्तामध्ये शोषले जाऊन उच्छवासाच्या वेळी फुप्फुसातून बाहेर फेकले जातात. त्या वेळीही तोंडातून दुर्गंधी आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. अर्थात तो वास जरी काही जणांना सहन होत नसला तरी तो कुजक्या अंड्यासारखा नाक दाबून धरायला लावत नाही हे मात्र खरंच !डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हरी नाम जो जो विसरला, तया हसती लोक रे । कवडी मोल धन हे सारे, कमविले तु लाख रे ॥धृ॥कुणाची ही शेतीवाडी, बंगलामाडी कुणाची । कुणाची ही मोटारगाडी, बॆलगाडी कोणाची ।राहील सारे जाग्यावर, झाल्यावरती राख रे ॥१॥माय–बापाला छळणारा पुत्र तो नसावा । मेल्यामागे तुप–रोटी देणारा नसावा ।भुकेल्याची भुक जाण. लोभ सारा टाक रे ॥२॥थंडीमध्ये कुडकुडणारा देह पाहिला तु । झाकावया नाही गेला दुर राहिला तु ।मायेचा उबारा दे तु, लाज त्याची राख रे ॥३॥आज आहे उद्या नाही, क्षणिक ही काया रे । दत्त नामाविणा जाई, जन्म सारा वाया रे ।श्रीधरा परी भक्तीची, गोडी जरा चाख रे ॥४॥••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपलं जगणं आपल्याला चांगल्याप्रकारे माहित असते.आपल्या अडचणी आपल्यालाच माहित असतात. आपले व्यवहार कसे आहेत हेही आपल्यालाच माहित असते. ज्या काही समस्या, अडचणी असतात त्या आपल्याच असतात.म्हणून उगाचच कोणाला नाव ठेवून त्या अडचणींचा अपमान करू नये.कारण समस्या आणि अडचणीतूनच आपण शिकत असतो.प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अडचणी येत असतातच. यामुळे आपल्याला त्रास जरी होत असेल तरी अडचणी ,समस्या या प्रेरक असतात.त्यांचा सामना आपण केलाच पाहिजे.हिंमतवान व्यक्ती हिंमतीने त्याचा सामना करून जगण्याची तयारी ठेवत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राजा सूर्यसेन*राजा सूर्यसेनचे राज्य प्रतापगड इथपर्यंतच मर्यादित होते. आणखी काही राज्ये त्याच्या अधीन होती. राजाला एक मुलगी होती. ती दिसायला फार सुंदर आणि बुद्धिमान होती. ती लग्नाच्या वयाची झाल्यावर राजाने तिच्यासाठी वर पाहाणे सुरु केले. त्याची इच्छा अशी होती की, आपल्या मुलीचा विवाह वीर आणि बुद्धिमान मुलाशी व्हायला पाहिजे. जो आपल्यानंतर या राज्याचा योग्यप्रकारे सांभाळ करू शकेल. राजकुमारी आणि राज्यावर अनेक राजकुमारांची नजर होती. मात्र राजा सूर्यसेनने एक कठीण अट ठेवली होती. जेव्हा जो कोणी विवाहाचा प्रस्ताव ठेवित असे तेव्हा राजा त्याला संसारातील सर्वात मौल्यवान वस्तू घेऊन ये असे सांगत असे व लोभी व्यक्तींना धडा बसविण्यासाठी त्याने पुढे अट ठेवली होती की ती वस्तू मला आवडली नाही तर मी त्याला कारागृहात टाकणार.अनेक राजकुमार वेगवेगळ्या वस्तू घेऊन आले परंतु राजाने त्या वस्तूंना असहमती दर्शवत त्यांना कारागृहात टाकले. राजाला विश्वास होता की, एक ना एक दिवस कोणी ना कोणी बुद्धीमान वीर पुरुष आपल्या राजकन्येसाठी ही अट पूर्ण करेल. एके दिवशी त्याच्याच राज्यातील एका छोट्या खेडयातील एका शेतक-याचा तरूण मुलगा रघु तीन वस्तू घेऊन राजाकडे आला व अट मान्य करण्याची इच्छा व्यक्त करू लागला. राजाने अनुमती दिली. रघु म्हणाला,’’मी जगातील तीन अनमोल वस्तु आणल्या त्यापैकी पहिली म्हणजे माती, जी आपल्याला अन्न देते, दुसरे म्हणजे पाणी जे भेदाभेद न पाहता सर्वांची तृषा शांत करते, आयुष्य वाचवते आणि तिसरी वस्तू म्हणजे पुस्तक जे सर्वांना समान न्यायाने ज्ञानदान करते, ज्ञानाचा आधार म्हणजे पुस्तक. ज्ञानाची गरज भागविण्याचे काम याच्याकडून केले जाते.’’ राजा या तीनही वस्तू व त्याचे त्यामागचे विचार पाहून ऐकून भारावून गेला. त्याने त्याच्या मुलीचा विवाह रघुशी केला व राज्याचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. तात्पर्य - बुद्धिमान लोकांकडूनच जगातील कठिणातील कठीण प्रश्र्नांची उत्तरे प्राप्त केली जाऊ शकतात. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 जुलै 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/19SHStPent/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :• १९२५ – सुरत येथील पहिली रेडिओ सेवा सुरू झाली. यामुळे भारतात प्रसारण सेवेला सुरुवात झाली.• १९४७ – भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात आला. हा निर्णय घटनेच्या अंमलबजावणीपूर्वीच झाला.• १९६० - सिरिमावो भंडारनायके सिलोनची पंतप्रधान व जगातील पहिली महिला सरकारप्रमुख बनली.• १९६९ - अपोलो ११चे अंतराळयात्री नील आर्मस्ट्राँग व बझ आल्ड्रिन चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले.• २००२: वर्ल्ड कॉम - कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.• २००८: राम बरन यादव - यांना नेपाळचे पहिले राष्ट्रपती घोषित करण्यात आले.• २०१२: एर्डन एरुस - यांनी जगातील पहिली एकट्याने मानव-शक्ती प्रदक्षिणा पूर्ण केली.• २०२२: द्रौपदी मुर्मू - यांची भारताच्या १५व्या राष्ट्राध्यक्षा म्हणून निवड.🎂 जन्म:• १६९३ - थॉमस पेल्हाम-होल्स, ब्रिटनचा तिसरा पंतप्रधान.• १८९९ - अर्नेस्ट हेमिंग्वे, अमेरिकन लेखक व साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेता.• १९३० - आनंद बक्षी, भारतीय गीतकार.🌹 मृत्यू:• १७९६ - रॉबर्ट बर्न्स, स्कॉटिश कवी.• १९८७ – संजय गांधी, भारतीय राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र, विमान अपघातात निधन.• २००१ - शिवाजी गणेशन, प्रसिद्ध भारतीय अभिनेता••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वाढदिवसाची मेणबत्ती विझवण्यापूर्वी ......!*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 23 जुलै ते 26 जुलै कालावधीत इंग्लंड व मालदीवचा दौरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अमरावती :- फेस, बायोमेट्रिक हजेरीविना कर्मचाऱ्याला यापुढे वेतन नाही, 1 ऑगस्टपासून जिल्ह्यात अंमलबजावणी करा - चंद्रशेखर बावनकुळे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे - विज्ञान लेखक डॉ. दीपक शिकारपूर यांचा जीवन गौरवने सन्मान, जयंत नारळीकर स्मृती कार्यक्रमात तीन विज्ञान लेखकांना पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छ. संभाजीनगर - शिक्षक बदल्यांमध्ये गोंधळ, विन्सी कंपनीच्या चुकांमुळे अपात्र शिक्षकही अतिरिक्त ठरणार, प्रक्रिया थांबवण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पीओपी मूर्तींवरील बंदी उठल्यानंतर नवी चिंता, राज्य सरकार 23 जुलैला जाहीर करणार विसर्जन धोरण; पर्यावरणवाद्यांचा विरोध*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आता शाळेतूनच मिळणार करियरचे धडे, NCERT सज्ज, 500 प्रकारच्या रोजगारांची विद्यार्थ्यांना मिळणार माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलिया - भारतीय संघाची विक्रमी कामगिरी ! 66 व्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिंपियाडमध्ये जिंकली 3 सुवर्ण पदके*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय गंजगुडे, अध्यक्ष, बिलोली तालुका शिक्षक संघटना 👤 कवयित्री सोनाली चंदनशिवे 👤 शिवराज मोरडे 👤 विजय वाठोरे, पत्रकार, हिमायतनगर 👤 रविकांत कुलकर्णी 👤 वृषाली शिंदे, साहित्यिक, मुंबई 👤 चिंतामणी जाधव, मुंबई 👤 श्रीकांत विनायकराव *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 31*एका माणसाला बारा मुले, छोटी काही मोठी काही, काही तापट तर थंड काही, ओळखा पाहू मी कोण .....?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - लसूण ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज या क्षणास प्रत्यक्ष कार्य करा. उद्यावर भिस्त ठेवून जीवन निष्क्रिय बनवू नका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) RTI Act २००५ नुसार अतिशय तातडीच्या ( जीवन किंवा मृत्यूच्या ) परिस्थितीत किती कालावधीत माहिती देणे बंधनकारक आहे ?२) धातूंचे पत्रे बनवण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात ?३) 'इन्कलाब जिंदाबाद' ही घोषणा कोणी दिली होती ?४) 'योजना आखणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारतातील भूजल पातळी कमी होण्याचे महत्त्वाचे कारण कोणते आहे ? *उत्तरे :-* १) ४८ तास २) वर्धनीयता ( Ductility ) ३) भगतसिंग ४) योजक ५) अतिरिक्त उपसा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लाय डिटेक्टर* 📙नेहमीच्या जीवनात सकारण वा अकारण अनेकदा आपण खोटे बोलत असतो. काहीतरी दडवण्यासाठीही हे खोटेपण असते. पण दडवादडवी करताना मनावर एक प्रकारचा ताण असतोच. छोटेसे उदाहरण घ्या. गृहपाठ झाला नाही म्हणून शिक्षक रागावताना म्हणतात, 'टीव्हीवर सिनेमा बघितला असेल, म्हणून वेळ झाला नाही,' सिनेमा तर बघितलेला असतो, म्हणूनच वेळही झालेला असतो. पण हे कबूल करायला मात्र मन राजी होत नाही. मग उत्तर येते, 'नाही नाही घरी मला काम होते म्हणून गृहपाठ झाला नाही'. हे उत्तर देताना कुठेतरी हातपाय थरथरतात, डोळ्याला डोळा भिडणे चुकवले जाते, एखादाच खोल श्वास घेतला जातो. क्वचित हृदयाचा एखादा ठोकाही चुकतो.या होणाऱ्या बारीकसारीक शारीरिक बदलांची जाणीव बोलणाऱ्याला असते; पण बघणाऱ्याला होतेच, असे मात्र नाही. ही जाणीव सहज करून देणारे यंत्र म्हणजे लाय डिटेक्टर. या यंत्राचा शोध खरे म्हणजे फार पूर्वी म्हणजे १९२१ सालीच लागला. जॉन लार्सन यांनी अमेरिकेत हा शोध लावला. त्याला पॉलिग्राफ अशी तांत्रिक संज्ञा दिली जाते. वर्गात खोटे बोलणे, घरी फसवाफसवी करणे हे एक वेळ क्षम्य आहे; पण जर एखादा गुन्हेगार गंभीर गुन्हा करूनही कबुली द्यायचा नाकारत असेल, तर ? कोणीही साक्षीदार नसेल, तर यावेळी पॉलिग्राफ मशीन वापरण्याची सोय आहे. गुन्हेगार व साक्षीदाराच्या शारीरिक बदलांची कॉन्टॅक्ट लीडद्वारे पूर्ण नोंद करून हे यंत्र तो खरे बोलत आहे वा खोटे, याचा निवाडा करते. कायदेशीरदृष्ट्या या यंत्राचा निर्णय काही देशात पूर्ण प्रमाण मानला जातो, तर काही देशांत तो सहाय्यभूत मानला जातो.श्वसनाचा वेग, नाडीचे ठोके, रक्तदाब, त्वचेवरील येणारे घर्मबिंदू, जीभ कोरडी पडणे, अंगावरचे केस उभे राहणे, हातापायांना कंप, दृष्टीची स्थिरता अशा कित्येक गोष्टींची नोंद हे यंत्र करते व मग हा निर्णय दिला जातो. अर्थात अत्यंत निर्ढावलेला गुन्हेगार किंवा पूर्ण प्रशिक्षित तरबेज गुप्तहेर या चाचणीतूनही सहज सुटू शकतो. हे शास्त्रज्ञांनाही मान्य आहे. पण ही दोन्ही उदाहरणे फारच क्वचित सापडतात; कारण निर्ढावलेला गुन्हेगार हा ज्ञात असतो व गुप्तहेराच्या स्वरूपाचा पत्ता आधीच लागलेला असतो.लाय डिटेक्टरचा भारतात वापर अजून सरसकट केला जात नाही. ही यंत्रे आपल्या देशात थोडीच आहेत, हेही त्याचे महत्त्वाचे कारण आहे. 'सच का सामना' या रिअॅलिटी शोसाठी २००९ साली टीव्हीवर या मशिनचा सर्रास वापर आपण पाहिला आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नाम गाऊ नाम घेऊ | नाम विठोबाला वाहू || १ ||आम्ही दैवाचे दैवाचे | दास पंढरीरायाचे || २ ||टाळ विना घेऊनि हाती | विठ्ठल नाम गाऊ गीती || ३ ||नामा म्हणे लाखोली सदा | सहस्त्र नामाची गोविंदा || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या प्रकारे आपण, आपल्या घराची मन लावून दैनंदिन साफसफाई करतो त्याच प्रकारे आपल्या मनाची सुद्धा स्वच्छता त्याच प्रकारे केली तर कोणत्याही विकारांना मुळात स्थान मिळणार नाही. मनाची स्वच्छता अशीच निर्मळ, नि:स्वार्थी व प्रामाणिकपणाची असायला पाहिजे. जेथे स्वछता चांगली असते तेथे प्रसन्नता आणि शांतता मिळते तसेच ज्याचे मन स्वच्छ असते त्या माणसाकडे बघून मन प्रसन्न होते व गहिवरून येते आणि त्या माणसाविषयी सदैव आपुलकी वाटत असते. आज अशाच सकारात्मक विचाराची व माणसांची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दोन कवड्या*बादशहा अकबराच्या दरबारात कलाकारांना मानसन्मान दिला जात असे. तानसेनासारखा महान संगीतकार अकबराच्या दरबाराची शोभ होती. त्यावेळी तानसेनच्या तुलनेत दुसरा कोणीच संगीतकार नव्हता. त्यामुळे तानसेनला थोडा अहंकार झाला होता. त्यावेळी काही संगीतसाधकांनी आपल्या संगीत साधनेतून ईश्र्वराला लक्ष्य बनवले होते. हे लोक संगीताच्या माध्यमातून ईश्र्वराची उपासना लीन होऊन करत होते. यात अष्टछापचे कवी तसेच वल्लभ संप्रदायाचे काही आचार्य होते. एक दिवस तानसेन आचार्य विठ्ठलनाथ यांना भेटायला गेला. काही वेळ चर्चा केल्यावर तानसेनने विठ्ठलनाथांच्या सांगण्यावरून आपले गायन प्रस्तुत केले. विठ्ठलनाथांनी गायनाची स्तुती केली व तानसेनाला दहा सहस्त्र रूपये व दोन कवड्या इनामाच्या रूपात भेट दिल्या. तानसेनने कवडी देण्याचे कारण विचारले असता विठ्ठलनाथ म्हणाले,’’तुम्ही मुघल दरबाराचे प्रमुख गायक आहात त्यामुळे दहा हजारांचा इनाम देण्यात आला आहे आणि दोन कवड्या ही व्यक्तिगत माझ्या दृष्टीने तुमच्या गायनाची किंमत आहे.’’ तानसेनाला फार वाईट वाटले. तो जायला निघणार इतक्यात श्रीकृष्णाचे दुसरे भक्त गोविंद स्वामी तेथे आले आणि विठ्ठलनाथांच्या आग्रहावरून त्यांनी कृष्णाचे एक पद गायिले. ते ऐकून तानसेनच्या डोक्यात असलेला स्वत:च्या गायनाविषयीचा भ्रम कमी झाला व तो म्हणाला,’’ विठ्ठलनाथजी महाराज, माझ्या गायनाची वास्तवात खरेच किंमत दोन कवड्याइतकीच आहे. मी बादशहाला खुश करण्यासाठी गातो आणि तुम्ही ईश्र्वराला प्रसन्न करण्यासाठी गात असता. मखमल आणि गोणपाट यांची कधीच तुलना होऊ शकत नाही त्याप्रमाणे तुमचे गायन ईश्र्वरी आहे तर माझे मानवी आहे. आपण चांगले केले की माझा अहंकार तोडला’’ तात्पर्य - कोणतेही काम ईश्र्वरासाठी व ईश्र्वराचे कार्य मानुन केल्यास त्यात आपोआपच दैवी गुण प्रकट होतात. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 जुलै 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1EsDvuXq2U/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🗓️ महत्त्वाच्या घटना :-• १९६९ – अपोलो ११ चं यान चंद्राच्या कक्षेत पोहोचलं. नील आर्मस्ट्राँग, बज़ एल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स हे अंतराळवीर त्यामध्ये होते.• १९८० – मॉस्को (रशिया) येथे २२व्या ऑलिंपिक स्पर्धा सुरू.• १९९२ – किरण बेदी यांना "रॅमन मॅगसेसे पुरस्कार" जाहीर.🎂 जन्म :-• १८१४ - सॅम्युअल कॉल्ट, अमेरिकन संशोधक.• १८३४ - एदगा दगा, फ्रेंच चित्रकार.• १८७६ - जॉन गन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.• १८७७ - आर्थर फील्डर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.• १८९४ - ख्वाजा नझिमुद्दीन, पाकिस्तानचा दुसरा पंतप्रधान.• १८९६ - ए.जे. क्रोनिन, स्कॉटिश लेखक.१९०० - यशवंतराव चव्हाण – महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे माजी उपपंतप्रधान.• १९३४ - फ्रांसिस्को से कमेरो, पोर्तुगालचा पंतप्रधान.• १९३८ - डॉ. जयंत विष्णू नारळीकर, भारतीय अंतराळ-भौतिकशास्त्रज्ञ.• १९४६ - इली नास्तासे, रोमेनियन टेनिस खेळाडू.• १९५५ - रॉजर बिन्नी, भारतीय क्रिकेट खेळाडू.🌹 मृत्यू :- • १९४७ - ऑॅंग सान, म्यानमारचा स्वातंत्र्यसैनिक.• १९६५ - सिंगमन ऱ्ही, दक्षिण कोरियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.• १९८० - निहात एरिम, तुर्कस्तानचा पंतप्रधान.• २००४ - झेन्को सुझुकी, जपानचा पंतप्रधान.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मुलामंध्ये वाचनाची आवड कशी वाढवाल ........?*वाचन हे ज्ञानाचे दार उघडणारे एक महत्त्वाचे साधन आहे. वाचनामुळे माणसाचा बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि भाषिक विकास होतो. वाचनामुळे विविध विषयांवरील माहिती मिळवू शकतो. इतिहास, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य इत्यादी. वाचन करताना मेंदू कार्यरत राहतो. त्यामुळे एकाग्रता, विचारशक्ती, आणि स्मरणशक्ती वाढते. ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *NCERT च्या पुस्तकात शीख-मराठा राजांबद्दलचे प्रकरण जोडले, मराठा साम्राज्यावर आता 22 पाने, पूर्वी दीड पाने होती; आठवीच्या पुस्तकात बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नवी मुंबईने ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये महाराष्ट्रातील पहिलं स्थान पटकावत स्वच्छतेतील आपली ओळख सिद्ध केली. राष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारून शहराने राज्याचा गौरव वाढवला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबईकरांसाठी गुड न्यूज, लोकलचे सर्व डबे एसी असणार, तिकीट दरात रुपयाही वाढणार नाही, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई पावसाळी अधिवेशन समाप्त, 8 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *CGHS ( केंद्रीयआरोग्य योजना ) दरात लवकरच सुधारणा, आरोग्य केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांची ग्वाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्र हे भारतातील सर्वात श्रीमंत राज्य तर तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत राज्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *यंदाच्या दहीहंडी कार्यक्रमात दीड लाख गोविंदाना विमाकवच, मुख्यमंत्र्याचे क्रीडा विभागाला निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मनोज बढे 👤 माधव रेड्डी 👤 श्रीनिवास मुरके 👤 गजानन शिराळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 30*नाशकातून आली माझी सखी**तिच्या मानेवर दिली मी बुक्की**तिच्या घरभर पसरल्या लेकी**वापरण्यापूर्वी सालपट काढून फेकी**सांगा पाहू कोण …?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - बांगडी ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्तुत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्भुत कार्य घडतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ( सीडीएस ) जनरल कोण आहेत ?२) 'द वन : क्रिकेट, माय लाईफ अँड मोअर' हे पुस्तक कोणत्या क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित आहे ?३) हॉकी प्रो लीगच्या २०२४-२५ हंगामासाठी पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार कोणी पटकावला ?४) 'श्रेष्ठ ( महान ) ऋषी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) जगातील सर्वोत्तम विमान कंपनी २०२५ चा पुरस्कार कोणत्या विमान कंपनीने पटकावला ? *उत्तरे :-* १) अनिल चौहान २) शिखर धवन, भारत ३) दीपिका, भारत ४) महर्षी ५) कतार एअरवेज*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *घोळाणा फुटल्यास काय करावे ?* 📕उन्हातून खेळून आल्यावर काही वेळा लहान मुलांच्या नाकातून रक्त येते. हा प्रकार तुम्हीही केव्हातरी अनुभवला असेल वा पाहिला असेल. यालाच घोळाणा फुटणे असे म्हणतात. नाकाच्या पुढच्या भागात नाजूक केशवाहिन्या असतात. या ठिकाणी वेगवेगळ्या अशा रक्तवाहिन्यांतून रक्त येऊन या भागात अधिक रक्तपुरवठा होतो. या केशवाहिन्या उष्णतेने प्रसरण पावतात, प्रसरण पावून फुटतात व रक्त येते. या भागातच श्वसनावाटे घेतली जाणारी उष्ण हवा प्रथम संपर्कात येते. त्यामुळे या ठिकाणच्या रक्तवाहिन्यांवर उपरोक्त परिणाम होतो.नाकाला इजा, दुखापत होणे, सतत नाक कोरण्याची सवय, खूप जोरात नाक शिंकरणे अशा साध्या कारणांबरोबर बन्याच गंभीर कारणांमुळे नाकातून रक्त येऊ शकते. नाकातील वाढ, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयाच्या झडपेचे आजार, रक्ताचा कर्करोग, अॅस्पीरीन, क्वीनीन यांसारखी औषधे व रक्तश्राव होण्याची प्रवृत्ती यांचा समावेश होतो. अचानक कोणाचा घोळाणा फुटल्यास काय करावे? ते आता आपण पाहू. मानेखाली उशी द्यावी आणि झोपवून ठेवावे, श्वासावर नियंत्रण करत नाकानेच श्वास घ्यायला सांगावा. तरीही रक्त थांबत नसेल तर रक्तस्राव होत असताना नाकाचा पुढचा भाग दोन बोटात घट्ट धरून ठेवावा. त्यामुळे रक्तवाहिन्यांवर दाब येऊन रक्तस्राव थांबवता येतो. तसेच ज्या नाकपुडीतून रक्त येत असेल, त्यामध्ये कापसाचा किंवा गॉझचा कपडा असल्यास तो नाकपुडीत पुढच्या भागात घालून थोडा वेळ दाबून धरावा व तरीही रक्त येत असेल तर लगेच डॉक्टरांकडे न्यावे. वारंवार असा त्रास होत असेल, तर योग्य निदान करून घेणे व त्यानुसार उपचार करणे हेच योग्य ठरेल. उच्च रक्तवावामुळे असे होत असल्यास रक्तदाब कमी करणारी औषधे व्यावीत. नाकात काही वाढ असेल, लहान मुलांनी नाकात काही घालून घेतले असेल, तर ते काढून टाकावे इत्यादी.नाकातून रक्त येणे वा घोळाणा फुटणे १९ टक्के वेळा एक सौम्य स्वरूपाचे लक्षण असले, तरी क्वचित प्रसंगी (वयोमानानुसार) गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. त्यामुळे रक्तस्राव होताना घाबरून न जाता प्रथमोपचार करणे व नंतर तपासण्या करून जर काही आजार असेल, तर त्यावर उपचार करणे हेच श्रेयस्कर ठरेल. काही गंभीर आजार नसल्यास व बारंबार घोळाणा फुटण्याची सवय असल्यास आयुर्वेदातील अडुळसा व गुड़ या वनस्पतींचा चांगला उपयोग होतो. ताजी अडुळशाची पाने मिळाल्यास त्यांचा वाफवून रस काढून त्यात साखर घालून सकाळ-संध्याकाळ एक छोटा कप भरून प्यावा.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नाम घेता तुझे गोविंदा, मनी वाहे भरुनी आनंद || धृ ||ऋषीकेशी बन्सी बिहारी || गोकुळीचा कुंजविहारी ||कुणी म्हणती कृष्ण मुरारी | कुणी मिलिंद आणि मुकुंद || १ ||विश्वाचा नाथ म्हणोनी | हसते विश्व तव वदनी |तव नामे तुझिया चरणी | वाहते यमुना जल धुंद || २ ||तू शब्द ओळी ओळीत | तू अर्थ मधुर गीतेत |तू ताल भक्तिगीतात | तू सुरासुरास सुगंध || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••व्यक्ती मग कोणीही असो मनाने निर्मळ आणि स्वभावाने प्रेमळ असते सोबतच कोणाकडेही लक्ष न देता आपले कार्य नित्यनेमाने करत असते ती व्यक्ती स्वप्नात सुद्धा कोणाचा अपमान करण्याचा प्रयत्न करत नाही. तर ती प्रत्यक्ष सुद्धा असे कधीच वागू शकत नाही अशा व्यक्तीला सज्जन म्हटले जाते. म्हणून अशाच व्यक्तीच्या आपण सहवासात रहावे. भलेही अशा सज्जन व्यक्तीकडून काही मिळत नसेल तरी कधी न मिटणारी संपत्ती मिळते. त्या संपत्तीचा कधीही अंत होत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नेताजी सुभाषचंद्र बोस*नेताजी सुभाषचंद्र बोस हे जन्मजात हुशार होते. त्यांच्या वडील वकिलांची इच्छा होती की त्यांनी आयसीएस अधिकारी बनावे. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुभाषबाबू इंग्लंडला गेले आणि आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु त्यांचा इंग्रजांच्या गुलामीला विरोध होता. त्यांच्यात राष्ट्रसेवेची प्रबळ इच्छा होती. एकीकडे आयसीएसचे उच्च पद होते तर दुसरीकडे सेवेचा कठीण त्यागमय मार्ग होता. याचे त्यांच्या मनात अंतर्द्वंद्व चालू होते. शेवटी सेवेचा भाव जिंकला आणि नोकरी करायची नाही असा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी आपला राजीनामा मंत्री मॉंटेग्यू यांच्याकडे सोपविला. भारतीय कार्यालयात त्यांच्या वडिलांचे मित्र विल्यम ड्युक यांनी त्यांचा राजीनामा आपल्याजवळ ठेवून त्यांच्या वडिलांना सूचना पाठविली. वडिलांनी उत्तर पाठविले,’’ मी माझ्या मुलाच्या या कार्याकडे गौरव म्हणून पाहतोय. मी त्याची ही अट मान्य करण्यासाठी त्याला विलायतेला पाठविले होते.’’ विल्यम ड्युक या उत्तराने हैराण झाला. त्यांनी सुभाषचंद्र यांना विचारले,’’ तरूणा, तुझ्या उदरनिर्वाहाची तू काय सोय करणार आहेस ?’’ सुभाषबाबू पटकन उत्तरले,’’ मला लहानपणापासून दोन आण्यात भागवायची सवय आहे आणि दोन आणे मी कसेही मिळवीन.’’ विल्यम ड्युक अवाक् होऊन त्यांच्याकडे पाहू लागले. सुभाषचंद्रांना त्यांच्या वडिलांनी पत्र लिहीले, त्यात ते म्हणाले,’’ तू देशसेवेचे व्रत घेतले आहेस याचा मला अभिमान आहे. तुला या राष्ट्रकार्यात यश मिळो.’’ यावर सुभाषचंद्रांनी वडिलांना लिहीले,’’ बाबा, मला आज स्वत:वर गर्व होत आहे. याआधी इतका कधीच झाला नव्हता.’’ कथासार - राष्ट्रसेवेची आवड असणारे प्रत्येकजण अनुकूल प्रतिकुल परिस्थितीतही ते कार्य करतात. याला कुटुंबाचे सहकार्य व समर्थन ही राष्ट्रसेवा करण्यास उद्युक्त करते. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 जुलै 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1APLdwFWFH/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔹 महत्त्वाच्या घटना :• १८७० – व्हॅटिकन कौन्सिलने पोपी इन्फॅलिबिलिटी (Papal Infallibility) या सिद्धांतास मान्यता दिली.• १९४७ – ब्रिटिश संसदेत भारतीय स्वातंत्र्य अधिनियम १९४७ (Indian Independence Act) संमत.• १९६८ - इंटेल कंपनीची स्थापना• १९७६ – नाडाल (स्पेन) या प्रसिद्ध टेनिसपटूचा जन्म.• १९९२ – इंटरनॅशनल रेड क्रॉस ने नागरी युद्धातील अत्याचार थांबवण्याचे आवाहन केले.जन्म :-• १५५२ - रुडॉल्फ दुसरा, पवित्र रोमन सम्राट.• १८११ - विल्यम मेकपीस थॅकरे, इंग्लिश लेखक.• १८४८ - डब्ल्यु.जी. ग्रेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.• १८९० - फ्रँक फोर्ड, ऑस्ट्रेलियाचा १५वा पंतप्रधान.• १९०९ - आंद्रेइ ग्रोमिको, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.• १९०९ - मोहम्मद दाउद खान, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.• १९१८ - नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष.• १९२१ - जॉन ग्लेन, अमेरिकन अंतराळवीर.• १९४९ - डेनिस लिली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.• १९५० - सर रिचर्ड ब्रॅन्सन, इंग्लिश उद्योगपती.• १९६७ - व्हिन डीझेल, अमेरिकन अभिनेता.• १९८२ - प्रियांका चोप्रा, भारतीय अभिनेत्री🌹मृत्यू :- • १६२३ - पोप ग्रेगोरी पंधरावा.• १८६३ - रॉबर्ट गुल्ड शॉ, अमेरिकेच्या ५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंटचा सेनापती.• १८७२ - बेनितो हुआरेझ, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.• १८९२ - थॉमस कूक, इंग्लिश प्रवास-व्यवस्थापक.• १९६९ - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.• १९९० - यून बॉसिऑन, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.• २०१२ - राजेश खन्ना, हिंदी चित्रपट अभिनेते••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*माझा (अ) प्रिय चष्मा 😎....?*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *इयत्ता अकरावी प्रवेशाची दुसरी यादी जाहीर, 2 लाख 51 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंढरपुरातील 213 सफाई कामगारांना 600 चौरस फुटांची घरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा; 55 कोटी 61 लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आषाढी यात्रेनिमित्त सोडलेल्या 25 एसटी बसमधून दर्यापूर आगारला 15 लाखांचे उत्पन्न, 4 हजार 708 भाविकांना घडवले पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे-सिंगापूर विमानसेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद; सुरक्षा व दुरुस्ती कारणास्तव एअर इंडियाचा निर्णय. प्रवाशांना मुंबई किंवा दिल्लीहून प्रवास करावा लागत असून त्यांना मोठा फटका बसतोय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *निधी न मिळाल्याने कृषी विभागाची कामे रखडली, माणिकराव कोकाटेंची विधान परिषदेत कबुली; म्हणाले, 2023 च्या अधिवेशनात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर भर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मान्सूनची मराठवाड्यात विश्रांती, 10-12 दिवसांपासून पावसाचा खंड, पुढील 4 दिवसात हलक्या सरी कोसळण्याचा हवामान खात्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय महिला संघाने इंग्लंड विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत घेतली आघाडी.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीनिवास पुसा, बिलोली👤 राज राठोड, साहित्यिक जळगाव 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 29*माझे शरीर आहे गोल-गोल**प्रत्येक स्त्रीचे रूप मी निखारते**मी बनले आहे काचेची**प्रत्येक रंगात मी भेटते**ओळखा पाहू मी आहे कोण …?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - अंडा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अभ्यासामुळे आनंद वाढतो, भूषण प्राप्त होते व कार्यक्षमता वाढते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाऊन तेथे शास्त्रीय प्रयोग करणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण ?२) 'राणीगंज' ही प्रसिद्ध दगडी कोळशाची खाण कोणत्या खोऱ्यात वसली आहे ?३) विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा - २०२५ मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले ?४) 'मोजता येणार नाही असे' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'ग्लायकोमा' हा आजार शरीरामधील कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ? *उत्तरे :-* १) शुभांशू शुक्ला २) दामोदर खोरे ३) यानिक सिन्नर, इटली ४) असंख्य, अगणित ५) डोळा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ज्वालामुखीचा उद्रेक केव्हा होतो ?* 📙 *************************आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग टणक आणि स्थिर वाटला तरी हे धरतीचं कवच अनेक खंडांमध्ये विभागलं गेलेलं आहे. हे खंड पृथ्वीच्या पोटात असलेल्या द्रव पदार्थावर तरंगत असतात. पृथ्वीच्या गाभ्यामधलं तापमान अतिशय चढं असतं. त्यापायी तिथले कातळ, दगड वितळतात आणि त्यांचं द्रवरूप मॅग्मामध्ये रूपांतर होतं. हा मॅग्माही अतिशय तप्त अवस्थेत असतो. त्यापायी त्याचा दबाव वरच्या खंडांवर पडत असतो. ज्या वेळी हा दबाव एका मर्यादेपलीकडे जातो तेव्हा तो मॅग्मा वरवर चढू लागतो. ज्वालामुखीच्या पोटातल्या या मॅग्माला वर चढण्यासाठी एक नळीसारखी मोकळी जागा सापडते. हिलाच व्हेन्ट म्हणतात. व्हेंटचं वरचं टोक ज्वालामुखीच्या उघड्या तोंडाशी जोडलेलं असतं. हा तापलेला मॅग्मा वरवर चढत असताना वाटेत आलेल्या खडकांनाही वितळवतो. त्यामुळे त्यांचं प्रमाण व दबाव वाढत जातो. वरवर जातानाच त्याचं लाव्हामध्ये रूपांतर होतं. हा लाव्हा त्या मुखाशी पोचला की जोराने बाहेर फेकला जातो. यालाच ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतात. असा स्फोट झाल्यासारखा उद्रेक झाला की राख, धूळ आणि न वितळलेले खडकांचे तुकडे वातावरणात उंच फेकले जातात. राख व खडक परत जमिनीकडे ओढले जातात. पण बाहेर पडलेला लाव्हा मात्र द्रवरूप असल्यामुळे बहुतेक वेळा ज्वालामुखीच्या बाहेरच्या बाजुवरून ओघळत खाली उतरतो. त्याचा वेग जास्त असला तर तो झपाट्याने आसपासच्या प्रदेशात पसरतो. वाटेत आलेल्या सगळ्यालाच वितळवत, जाळत तो दूरदूरवर पसरत जातो. पुरातन पॉम्पे शहराजवळच्या व्हेसुव्हियस या ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा ते सर्व शहर बेचिराख होऊन त्या लाव्हाखाली गाडलं गेलं होतं. हा लाव्हा जसा थंड होतो तसं त्याचं अग्निजन्य खडकांमध्ये रूपांतर होतं. जर उद्रेक झालेला ज्वालामुखी सागराच्या पोटात असेल तर अशा थंड झालेल्या लाव्हापासून बेटं तयार होतात. हवाई बेटांचा उगम असा झाला आहे.ज्वालामुखीचा उद्रेक एकाएकी काहीही पूर्वसूचना न देता होऊ शकतो. पण उद्रेक होण्यासाठी पुरेसा मॅग्मा तयार होऊन व्हेन्टवाटे वरवर चढत जाण्याची आवश्यकता असते. ते होण्यासाठी काही कालावधी निश्चितच जातो. त्यामुळे काही पूर्वसूचना मिळू शकतात. त्यातल्या बहुतेक भूकंपाच्या छोट्या छोट्या धक्क्यांच्या स्वरूपातल्या असतात. तर काही वेळा तापलेल्या मॅग्माच्या हालचालीमुळे जमिनीचं तापमान वाढत जातं किंवा तिथं असलेल्या तसेच गरम पाण्याच्या झऱ्यांचं तापमानही वाढत जातं. काही वेळा जमिनीला फुगवटाही येतो. पण या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी संवेदनशील उपकरणांची गरज असते. सुप्त ज्वालामुखींच्या आसपासच्या प्रदेशात ठेवलेल्या अशा उपकरणांद्वारे पूर्वसूचना मिळाल्यास तेथील नागरिकांचं स्थलांतर करून जीवितहानी टाळता येते.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जन विजन झाले आम्हा, विठ्ठल नामा प्रमाणे || धृ ||पाहे तिकडे मायबाप, विठ्ठल आहे रखुमाई || १ ||वन पट्टण एक भाव, अवघा ठाव सरता झाला || २ ||आठव नाही सुख दु:खा, नाचे तुका कौतुके || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीला चिखलातून वर काढणारा असते त्या व्यक्तीचे नाव एक ना एक दिवस आदराने घेतले जाते.पण,त्यातच एखादी व्यक्ती, चिखलात गाडण्याचा प्रयत्न करते त्याला वरती काढणारा जवळ असेल तरी पण, त्याची मदत करू शकत नाही. म्हणून कधी, कधी आपण केलेले चांगले कार्यच आपली मदत करत असतात.शक्य झाले तर एखाद्याचे चांगले करण्याचा प्रयत्न करावा. त्या व्यक्तीला याची जाणीव जरी नसली तरी आपण केलेल्या कार्याचा आपल्याला व्यक्तिगत समाधान मिळत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उपदेश*एकदा गौतम बुद्ध भ्रमण करीत एका गावात आले. त्या गावातील मुख्य व्यक्ती बुद्धांना पसंत करत नसे. जेव्हा त्याला माहिती झाले की, बुद्ध आपल्या शिष्यांसोबत गावात येत आहे तेव्हा त्याने गावातील लोकांना आदेश दिला की, आपल्या घराची दारे बंद ठेवा आणि बुद्धांना भिक्षा देऊ नका. बुद्ध त्या व्यक्तिच्या स्वभावाला ओळखून होते. मार्गात जेव्हा त्याचे घर आले तेव्हा ते दरवाजात उभे राहून भिक्षा मागू लागले. बुद्धांचा आवाज ऐकून तो मुख्य व्यक्ती नाराज झाला आणि म्हणू लागला,’’ तुम्ही येथून निघून जा, कामधंदा काही करत नाही आणि भिक्षा मागून पोट भरता. कष्टाचे काम करायला शिका आणि पोट भरा.’’ बुद्ध गुपचुप त्याचे अपमानास्पद बोलणे ऐकत होते. त्याचे बोलणे संपल्यावर बुद्ध म्हणाले,’’ माझ्या एका शंकेचे आपण समाधान करा. आपल्या घरी येऊन जर काही खाण्यासाठी मागत असेल, आपण ताट सजवून आणले मात्र त्यानंतरही तो ते न स्वीकारताच निघून गेला तर तुम्ही त्या खाद्यपदार्थाचे काय कराल?’’ ती व्यक्ती म्हणाली,’’ मी ते नष्ट करणार नाही आणि घरात ठेवून देईन’’ तेव्हा बुद्ध म्हणाले,’’ त्या दशेनुसार आपले सामान आपल्याजवळच राहिले ना? त्याचप्रमाणे आपल्या घरी येऊन आम्ही भिक्षा मागितली आणि बदल्यात आपण आम्हाला अपशब्द वापरले. भिक्षेत दिलेले हे शब्द आम्ही अस्वीकार केले. त्यामुळे ते तुमच्याजवळच राहिले.’’ मुख्य व्यक्तीला आपली चूक उमगून आली. बुद्धांची त्याने क्षमा मागितली. तो त्यांचा शिष्य बनला. तात्पर्य - उग्रपणाने वागल्यास होणा-या कामात अडथळा निर्माण होतो आणि संयमाने वागल्यास न होणारे कामसुद्धा पटकन होऊन जाते. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 जुलै 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1CS6dP2Eo6/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔹 महत्त्वाच्या घटना :• १९०२ – विल्हेल्म रूंटजेन यांनी पहिल्यांदा एक्स-रे चा वापर वैद्यकीय तपासणीत केला.• १९५५ – डिज्नीलँड (Disneyland) चे अमेरिकेतील कॅलिफोर्नियात उद्घाटन झाले.• १९७६ – मॉन्ट्रियल (कॅनडा) येथे २१व्या ऑलिंपिक स्पर्धा सुरू झाल्या.• १९९६ – भारतातील पहिला 'इंटरनेट बँकिंग' सेवा सुरू झाली (ICICI बँकेद्वारे).🎂 जन्मदिवस :• १९१७ – बी. के. सावरकर, प्रसिद्ध समाजसुधारक आणि विनायक सावरकर यांचे बंधू.• १९१८ – नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष व शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते.• १९२० – डॉ. वसंतराव गोविंद सप्रे, मराठी भाषेतील लेखक व संपादक.🕯️ मृत्यू : • १७९० – अॅडम स्मिथ, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ व "The Wealth of Nations" चे लेखक.• २०१४ – एलेन हंट, नोबेल विजेते पदार्थविज्ञानतज्ज्ञ.📜 इतर उल्लेखनीय :• १७ जुलै हा दिवस नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केला आहे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मोबाईल बंदी असायला हवी ......?*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबईत अनधिकृत शाळा सुरु असल्याची शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत कबुली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सातारा - बोगस प्रमाणपत्राचे कारण देत 25 दिव्यांग शिक्षक अपात्र; आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जयंत पाटील पायउतार होताच रोहित पवारांना राष्ट्रवादीत प्रदेश सरचिटणीसची मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंकडून घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांचा निरोप समारंभ संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक जयंतराव टिळक यांचे निधन, वयाच्या 74 व्या वर्षी वृद्धापकाळाने घेतला अखेरचा श्वास; शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात योगदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर होणार जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *लियाम डॉसनचे 8 वर्षांनंतर कसोटी इंग्लंडच्या संघात पुनरागमन, चौथ्या सामन्यासाठी संघ जाहीर; दुखापतग्रस्त शोएब बशीर मालिकेतून बाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पुरुषोत्तम केसरे 👤 आनंद पा. पंगेवाड, धर्माबाद👤 मधुकर फुलारी *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 28*माझे पांढरे पांढरे पातेले**त्यात ठेवला पिवळा भात**ओळखेल मला जो कोणी**त्याला असेल माझी साथ*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - नारळ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याच्या योगाने माणूस जगण्याच्या लायक होतो ते म्हणजे शिक्षण होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश झालेल्या महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांची नावे सांगा.२) भारतीय चलन '₹' हे प्रतीक चिन्ह कोणी तयार केले आहे ?३) जगातील सर्वात लहान महासागर कोणता ?४) 'मूर्तीची तोडफोड करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) मुंबईमधील कर्नाल या पुलाचे नाव बदलून काय करण्यात आले आहे ? *उत्तरे :-* १) रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी २) डी. उदयकुमार ३) आर्टिक महासागर ४) मूर्तिभंजक ५) सिंदूर पूल*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⛈ *गार किती मोठी असते ?* ⛈ ************************'वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि' ही कवीकल्पना जरूर आहे; पण प्रत्यक्षात असे परस्परविरोधी गुणधर्म असणारा कोणताही पदार्थ नाही, असं मानण्याचं कारण नाही. आपल्या अतिशय परिचयाच्या, ज्याचं दुसरं नावच मुळी जीवन आहे अशा, पाण्याकडे पाहा ना ! अधिक नेमकेपणाने बोलायचं तर या पाण्याच्या घनरुपाकडे लक्ष केंद्रित करा ना ! हिवाळ्याच्या ऐन भरात जेव्हा हिमपाताच्या रूपात हे घन पाणी सामोर येतं, तेव्हा अतिशय हलक्या वाऱ्याच्या मंद झुळकीनंही इतस्तत: फेकल्या जाणाऱ्या हिमाच्या त्या पात्यांनी मन मोहरून येतं. अंगावर संक्रांतीच्या हलव्यासारखा सुखद काटा उभा राहतो; पण सरत्या हिवाळ्यात किंवा त्यानंतरही जेव्हा हेच घन पाणी गारांच्या रुपात वर्षाव करतं तेव्हा अक्षरश: ब्रह्मांड आठवतं. उघड्यावर जर गारपीटीच्या मारत सापडला तर हेच 'जीवन' अक्षरश: जीवावर उठतं. हिमाची हलकी पाती अाणि गारांचे वजनदार गोळे यात एक साम्य जरूर आहे. त्यांचा नेमका आकार कोणता आणि तो त्यांना कसा मिळतो, हे एक न सुटलेलं कोडं आहे. साधारण गारा आपण पाहतो त्या सामान्य गोलाकार किंवा फार फार तर अंड्याच्या आकाराच्या असतात. वाटाण्यापेक्षा त्यांचं आकारमान सहसा मोठं नसतं. म्हणजेच साधारणत: दीड ते दोन सेंटिमीटर व्यासाच्या या गारांचं वजन असतं दहा बारा ग्रॅम. वरून ओबडधोबड दिसणाऱ्या या गाराची अंतर्गत रचना तशी आतल्या गाठीची नसते. हळुवारपणे एखादी गार उभी कापली तर आता एखाद्या कांद्याप्रमाणे एकाआड एक पापुद्र्यांचे थर दिसतील. एक पापुद्रा स्वच्छ, नितळ बर्फाचा, त्यावर एक पापुद्रा धुसर दुधी बर्फाचा, परत एक स्वच्छ नितळ पापुद्रा. असे एकावर एक थर. तरीही ९ जून १८६७ साली ४५०० मीटर उंचीवरच्या बेलाईक्लिच गावात झालेल्या गारांच्या वर्षावात प्रा. अाबिच यांना एक गार मिळाली होती. तिचा आकार चक्क एखाद्या तार्यासारखा किंवा हिऱ्यामाणकांच्या हारातलं मध्यवर्ती पदकच जणू असा होता. ज्यांनी या गारांचा साग्रसंगीत अभ्यास केला आहे, त्यांना शंकूच्या, लाटण्याच्या, इतरही अनेक आकारांच्या गारा पाहावयास मिळाल्या आहेत. आकारमानही चक्क पंधरा सेंटिमीटर व्यासपर्यंत आढळलं आहे. अमेरिकेतील नेब्रास्का या मध्यवर्ती राज्यातील वॉटर या समर्पक नावाच्या गावात ६ जुलै १९२८ रोजी गारपीट झाली. त्यातल्या एका गारेचं वजन तब्बल साडेसहाशे ग्रॅम होतं. त्या गोलाकार गारेचा व्यास होता १५ सेंटीमीटर; पण उच्चांक वगैरेच्या गोष्टी करायच्या तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये एक नोंद आढळते. अमेरिकेतील तिथल्या कॉफव्हील नामक गावात तीन सप्टेंबर १९७० या दिवशी एक गार पडली होती. एकोणीस सेंटिमीटर व्यास आणि ४५ सेंटीमीटर परीघ असलेल्या या गारेचं वजन होतं साडेसातशे ग्रॅम. पाऊण किलो !*बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विठ्ठल आवडी प्रेमे भाव हो.. विठ्ठल नामाचा रे टाहोप्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेमे भाव || धृ ||तुटला हा संदेहभव मूळ व्याधेचा, भव मूळ व्याधेचा, विठ्ठल नामाचा || १ ||म्हणा नरहरी उच्चार, कृष्ण हरी श्रीधर,हेची नामा आम्हा सार, म्हणा नर हरीसंसार तरावया संसार तरावया,प्रेमे भव विठ्ठल आवडी || २ ||नेघो नामाविण काही, विठ्ठल कृष्ण लवलाही,नामा म्हणे तरलो पायी, विठ्ठल म्हणताची विठ्ठल,प्रेम भव, विठ्ठल आवडी प्रेम भव || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकता किंवा ऐक्य ही एखाद्याचे किंवा समाजाचे हीत ठेवून चांगले करण्यासाठी असेल तर त्याला सत्कर्म म्हणता येईल. पण, हीच एकता वाईट कार्य करण्याच्या हेतूने एकत्र येत असतील तर ते दुष्कृत्य ठरत असते. आजपर्यंत ज्यांनी, ज्यांनी असे दुष्कर्म केले आहेत ते वंदनीय झाले नाही. म्हणून कोणाचे चांगले व्हावे किंवा चांगले झालेले बघून आनंद होत नसेल तर त्या आनंदात सहभागी होऊ नये.पण,त्याचे वाईट करण्याआधी एकदा विचार करून बघावा. कारण जी व्यक्ती परिस्थितीवर मात करून घडत असते ती व्यक्ती, स्वंयम प्रकाशित असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बालहट्ट*एकदा बिरबलाला दरबारात यायला उशीर झाला, म्हणून बादशहानं त्याला विचारलं, ‘बिरबल ! तू एवढा शिस्तीचा माणूस असताना, तुला आज दरबारात यायला उशीर का झाला ?’बिरबल म्हणाला, ‘काय सांगू खाविंद ? आज माझा लहान मुलगा हट्ट धरुन बसला. काही केल्या त्याची समजूत म्हणून पटेना. अखेर कशीबशी समजूत घालून, मी तसाच घॊड्यावरून दौडत इकडे आलो.’‘बिरबल, पोराची समजूत घालण्यात वेळ गेला व म्हणून तुला दरबारात यायला उशीर झाला, हे तुझं म्हणणं पटण्यासारखं नाही. हे बघ, तुझी परिस्थिती चांगली आहे; तुझ्याकडे नोकरचाकर आहेत; तेव्हा मुलानं जरी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरला असला, तरी पैसे देऊन ती गोष्ट त्याला आणून द्यायला एखाद्या नोकराला सांगायचं, आणि तू पटकन इकडे निघून यायचं.’बिरबल म्हणाला, ‘ जहॉंपन्हा, आपली परिस्थिती तर माझ्यापेक्षा हजारपट चांगली आहे ना ? आपल्याकडे तर शेकडो नोकरचाकर आहेत ना ? मग आपण असं करु या; आपण माझे तात्पुरते वडील व्हा आणि मी तात्पुरता आपला लहान मुलगा हट्ट धरुन बसतो. मी धरुन बसेन तो माझा हट्ट तुम्ही पुरवा. अट एकच कुठल्याही परिस्थितीत आपण मला मारायचं नाही. नाहीतर आलेल्या संधीचा आपण तेवढाच फ़ायदा उठवाल. आहे कबूल ?’‘हात्तिच्या ! एवढंच ना ? होऊन जाऊ दे.’ बादशहा बोलून गेला. लगेच बिरबल एखाद्या लहान मुलाप्रमाणे हात-पाय झाडीत व रडत म्हणाला ‘आम्हाला ऊस हवा जा ऽ ऽ !’बादशहा – (सेवकाकडे बघून) अरे बझारसिंग ! माझ्या बाळासाठी ऊस आणून दे पाहू ? (ऊस येताच) हा बघ आणला ऊस. तो घे आणि चूप रहा.बिरबल – ( रडण्याचा सूर वरच्या पट्टीत नेत) आम्हाला ऊस असा नको जा ऽऽऽ! त्याचे खंड खंड करुन हवेत.बादशहा – ( दुसऱ्या सेवकास) अरे खंडोजी ! सुरा आणून, तू माझ्य चिमूरड्याला या उसाचे खंड खंड करुन दे पाहू ? (सेवकाने तसे करताच) हे बघ दिले तुकडे तुकडे करुन. कर आवाज बंद. काय रे ? आता का उगाच केकाटतोस ?बिरबल – (आवाज पूर्वीपेक्षा चढवून) आता आम्हाला अखंड ऊस हवा जा ऽऽऽ! असे तुकडे तुकडे केलेला नको !बादशहा – (सेवकास) अरे ऊसखॉं ! माझ्या छकुल्याला अखंड ऊस दे पाहू ? ( दिला जाताच) आदळला ना तुझ्या टाळक्यावर अखंड ऊस ? मग आता का बोंबलतोस ?बिरबल -(रडण्याचा सूर टिपेला नेत) आम्हाला नवा अखंड ऊस नको जा ऽऽऽ ! खंड खंड केले आहेत ना त्या खंडाचाच पुन्हा पहिल्यासारखा अखंड ऊस करुन हवा. ऑं ! ऑं ! ऑंबादशहा – (भडकून) आता मात्र रडलास, तर त्या उरलेल्या अखंड ऊसानंच झोडपून काढीन.बिरबल – (एकदम ठाकठीक बसून) खाविंद, मारण्याच्या गोष्टी न करता तुम्ही हट्ट पुरवायचा, असं ठरलं होत ना ? मग आता माराची धमकी का देता ?बादशहा – नाही रे बाबा, शरण आलो मी तुला. वाटल्यास दरबारात यायला दररोज उशीर कर; पण माझ्या डोक्याची शीर आता तू उठवू नकोस.’ बालहट्टापुढं शरणागती पत्करावी लागते,’ हे तुझं म्हणणं मी मान्य केलं; मग तर झालं?तात्पर्य - राजहट्ट, बाल हट्ट आणि स्त्री हट्ट यापुढे भले भले माथा टेकतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 जुलै 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1DqMy3HMBa/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌟 महत्त्वाच्या घटना :• 1969 – अपोलो 11 या अंतराळ मोहिमेची सुरुवात; नील आर्मस्ट्राँग, बज़ ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स यांनी चंद्रावर जाण्यासाठी अंतराळात प्रस्थान केले.• 1999 – भारताचे माजी पंतप्रधान चरण सिंग यांची जयंती. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस किसान दिन म्हणून साजरा केला जातो.🏆 जन्मदिवस :• 1872 – रोएल्ड अॅमंडसेन, आर्क्टिक-अंटार्क्टिक भागात मोहिमा करणारे नोर्वेजियन संशोधक.• 1901 – महादेवी वर्मा, हिंदीतील प्रसिद्ध कवयित्री आणि साहित्यिक (मरण: 1987).• 1909 – अरुणा आसफ अली, स्वातंत्र्यसैनिक व समाजसेविका• 1916 – नटराज रामकृष्ण, भारताचे प्रसिद्ध नृत्यकार.🕯️ मृत्यू :• 2008 – कृष्णकांत, भारताचे माजी उपराष्ट्रपती.• 2013 – कोरे मोंटेथ, कॅनडियन अभिनेता (Glee मालिकेतून प्रसिद्ध).🛰️ वैज्ञानिक महत्त्व:• 1994 – शूमेकर-लेवी 9 धूमकेतूचे तुकडे गुरू या ग्रहावर आपटले; हा एक ऐतिहासिक खगोलीय प्रसंग होता.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शनिवारची दप्तरमुक्त शाळा*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *२०३५ पर्यंत भारताची ऊर्जा मागणी दुप्पट होणार, अक्षय ऊर्जा गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी - प्रल्हाद जोशी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एससीओ परिषदेत भारताची स्पष्ट भूमिका, दहशतवादाविरोधात जयशंकर यांचा चीनमध्ये ठाम आवाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला तीन इतर साथीदारांसह पृथ्वीवर परतले, ड्रॅगन 'ग्रेस' अंतराळयान दक्षिण कॅलिफोर्नियातील सॅन दिएगोजवळ समुद्रात उतरले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आर आर पाटलांप्रमाणे संधीचे सोने करणार, प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, पक्ष बांधणी आणि विस्ताराचा निर्धार व्यक्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बिहार मतदार यादीतून 30 लाख नावे वगळली जाणार, पडताळणी दरम्यान BLO ना 14 लाख लोक आढळले नाहीत, 10.50 लाख जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *वीज क्षेत्रातील खासगीकरणाच्या विरोधात आता रस्त्यावरची लढाई, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचा इशारा, द्वारसभा घेत नोंदवला निषेध*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा रसायनशास्त्र ऑलिंपियाडमध्ये झेंडा फडकला ! २ सुवर्ण, २ रौप्य पदकांची कमाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जयवंत हंगरगे, पदोन्नत मुख्याध्यापक, धर्माबाद👤 हरिप्रसाद आरेवार, नांदेड 👤 मारोती गाडेकर 👤 सुरेश भाग्यवंत *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 27*कोकणातून आला एक भट, त्याला धर की आपट, सांगा मी आहे तरी कोण …?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - वांगे ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयशाच्या दगडाला लागलेली ठेच म्हणजे उद्याच्या यशाची ग्वाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथेची साक्ष देणारे राज्यातील किती किल्ल्यांच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे ?२) 'अफूचे युद्ध' म्हणून ओळखले जाणारे पहिले अफूचे युद्ध कोणत्या दोन देशात घडून आले ?३) पहिला स्वयंपेशी सजीव कोणता ?४) 'मूर्तीची पूजा करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) अष्टपैलू नाट्य अभिनेते निळू फुले यांचे पूर्ण नाव काय ? *उत्तरे :-* १) ११ किल्ले व तामिळनाडूतील एक २) चीन व इंग्लंड ( १८३९ ते १८४२ ) ३) अमिबा ४) मूर्तीपूजक ५) निळकंठ कृष्णाजी फुले*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 नखं कापतांना दुखत का नाही ? पण उपटल्यास दुखतात; असे का ? 📙 दर आठवड्याला तुम्ही नेलकटरने नखं कापत असाल. चांगलीच सवय आहे ही. पण केव्हा तरी नख कापतांना नख कापण्याऐवजी उपटले गेल्याने वा ओढले गेल्याने तुम्हाला नक्कीच दुखले असेल. अगदी ब्लेडने नख कापले तरी रक्त येत नाही दुखत नाही. मग उपटल्यावर वा ओढल्यावर ते का दुखते ? याचे उत्तर कळण्यासाठी नखाची रचना समजून घ्यायला हवी!नखे, केस, घामाच्या ग्रंथी, तैलग्रंथी हे त्वचेचेच भाग आहेत त्वचेतील पेशींपासून निर्माण होणाऱ्या केरॅटिनच्या जाडसर थराने नख तयार होते. वरची बाजू सोडल्यास उर्वरित तिन्ही बाजूंनी नखाभोवती त्वचेच्या घड्या असतात. केरॅटिनच्या थराला वेदनेची जाणीव नसते, कारण तो मृत भाग असतो. त्यात सजीव पेशी नसतात. नखात पोषणासाठी रक्तवाहिनी नसते किंवा संवेदना जाणवण्यासाठी मज्जातंतूही नसतात. त्यामुळे नख कापले तरी दुखत नाही. नखाच्या बोटाकडच्या भागाला नखाचे मूळ म्हणतात. येथूनच पेशींच्या थरापासून नखाची निर्मिती होत असते. या भागातील पेशी मात्र जिवंत असतात व त्यांना रक्तपुरवठा आणि मज्जातंतूचाही पुरवठा असतो. नखाचा आपल्याला न दिसणारा आतला भाग त्याखालील नाजूक त्वचेत गुंतलेला असतो. साहजिकच नख उपटल्यास वा ओढले गेल्यास वेदनेची जाणीव होते. नखे कापतांना मात्र आपण नखाचा निर्जीव भागच कापत असतो, त्यामुळे दुखत नाही.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुखाचे हे नाम आवडीने गावेवाचे आळवावे विठोबासी || धृ ||संसार सुखाचा होईल निर्धारनामाचा गजर सर्व काळ || १ ||कामक्रोधाचे चलेची काहीआशा मनशा पाही दूर होती || २ ||आवडी धरोनी वाचे म्हणे हरीहरीम्हणतसे महारी चोखियाची || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीकडे अफाट धनसंपत्ती नसेल म्हणजे ती व्यक्ती कमजोर असते असेही नाही. कारण बरेचदा धनसंपत्ती पेक्षा हिंमत आणि स्वतः वर असलेला विश्वास अफाड धनसंपत्तीपेक्षा कमी नसतो. एकदाची धनसंपत्ती संपून जाईल पण हिंमतीने बरेच काही कमावता येऊ शकते.म्हणून कोणाला लाचार समजून त्याची टिंगल, टवाळी करण्यात वेळ वाया घालवू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शौर्याचा पुरावा*बादशहा अकबराचा दरबार भरला होता. तेवढयात द्वारपालाने येऊन सांगितले की, बाहेर दोन राजपूत युवक आले आहेत. ते राजाला काही सांगू इच्छितात. अकबराने त्यांना दरबारात हजर करण्याची आज्ञा केली. ते दोन्ही युवक अगदी सुदृढ, पिळदार शरीरयष्टीचे होते. त्यांच्या हातात ढाल व तलवार होती. अकबराने त्यांना बोलण्याची परवानगी दिली. ते म्हणाले, ‘’ आम्ही राजपूत आहोत, आमची तुम्हाला विनंती आहे की, आम्हाला तुमच्या सैन्यात स्थान द्यावे. शौर्य व साहस दाखविता येईल अशी जबाबदारी सोपवावी.’’ अकबराने त्यांना विचारले, मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? तुम्ही शुरवीर आहात याचे काही प्रमाण आम्हाला द्याल काय? दोघेही म्हणाले, ‘’पुरावा, प्रमाण म्हणजे आम्हाला माहितच नाही. आम्ही केवळ काम करणे एवढेच जाणतो.’’हे ऐकल्यावर बादशहाचा रागाचा पारा चढला, संतापाने तो म्हणाला,’ तर मग तुम्ही शूर नाही आहात मुळी, आपण मोठे वीर असल्याचा आव आणत आहात पण खरे शूर नाहीत. शूर असल्याच्या बाता मारणा-यांसाठी हा दरबार नाही.’’ बादशहाचे हे आव्हानात्मक भाषण ऐकून त्या दोघांनी देवी भवानीचे स्मरण केले व आपल्या तलवारी बाहेर काढल्या. दोघांनीही बराच वेळ तलवारबाजीचे कसब दाखविले. दोघांच्याही तलवारीतुन अक्षरक्ष: ज्वाळा बाहेर पडत होत्या. दोघांपैकी कुणीच मागे हटत नाही असे दिसत होते.शेवटची चढाई करायची म्हणून दोघांनीही ‘जय भवानी’ चा जयघोष केला. एकमेकांच्या मानेवर वार करण्यासाठी तलवारी सरसावल्या. उपस्थित मंडळी श्वास रोखून पाहत होती. पहिल्याने दुस-याच्या मानेवर वार केला, तो पडण्याच्या बेतात असताना त्यानेही तसेच प्रत्युत्तर त्याला दिले. बादशहा जागेवरून उठून धावला, मरताना ते दोघे म्हणाले, राजन, आम्ही जन्म-मृत्युमध्ये काहीच अंतर मानत नाही. तुम्ही पुरावा मागितला, वीरांकडे शौर्याचा कसला पुरावा मागता? आम्ही तर संधी मिळताच तलवारीच्या टोकाला मरण बांधून जगत असतो. अकबराला त्याच्या कृतीचा पश्चाताप झाला. त्याने त्या दोघांच्या कलेवराला कुर्निसात केला. तात्पर्य - शूरवीर कर्माने नंतर, आधी वाणी, विचार व आचरणातून ओळखले जातात. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जुलै 2025💠 वार - मंगळवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Bku8jBJ6D/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔹 महत्त्वाच्या घटना:• १७९९ – फ्रान्समध्ये Rosetta Stone मिळाली. याच्या मदतीने प्राचीन इजिप्शियन लिपीचे भाषांतर करणे शक्य झाले.• १९४८ – भारताचे पहिले विमानतळ – मुंबई येथे सांताक्रूझ विमानतळाचे उद्घाटन झाले.• २००६ – मुंबईतील लोकल ट्रेन बॉम्बस्फोटातील संशयित आरोपींवर खटला सुरू झाला.🎂 जन्म:•;१६०६ – रेम्ब्रांट व्हॅन रिन, प्रसिद्ध डच चित्रकार.• १८५६ – जोसिया स्टँप, इंग्लंडचे अर्थशास्त्रज्ञ.• १९०३ – कुमार गंधर्व, महान भारतीय शास्त्रीय गायक.• १९७६ – दीया मिर्झा, हिंदी चित्रपट अभिनेत्री व समाजसेविका.🕯️ मृत्यू:• १९५७ – मनुबाई गांधी, महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांची सून.• २०१२ – राजेश खन्ना, हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार.🌍 महत्त्वाचे दिन 🌐 जागतिक युवा कौशल्य दिन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*माझ्या स्वप्नातील गाव*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महात्मा फुले वाडा-भिडे वाडा स्मारक प्रकल्पाला वेग:15 दिवसांत कार्यवाही सुरू करण्याचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *स्वप्नातील घराची वाट खुलेल ! गृहनिर्माण स्वयं-पुनर्विकासासाठी ऐतिहासिक शिफारशी"*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *"आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 : सहकारात 'हरित' क्रांतीची सुरुवात !"*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया-राहुल यांना समन्स ? कोर्टाचा निर्णय राखून, पुढील सुनावणी २९ जुलैला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शिवसेना नाव-चिन्ह प्रकरणात पुन्हा विलंब, सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जळगावच्या वैद्यकीय क्षेत्राला बळ ! ५० खाटांचं क्रिटिकल केअर युनिट उभारणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *लॉर्ड्स वरील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा विजय, रवींद्र जडेजाची एकाकी झुंज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजेश्वर डोमशेर, पदोन्नत मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख, नायगाव 👤 विठ्ठल हिमगिरे, शिक्षक, धर्माबाद 👤 गंगाधर v. बिज्जेवार, सेवानिवृत्त शिक्षक, नांदेड 👤 श्रीकांत जोशी, शिक्षक, धर्माबाद 👤 बालाजी हिवराळे, शिक्षक तथा पत्रकार, बिलोली 👤 संतोष इबितवार, येवती 👤 शुभम बतुलवार, धर्माबाद👤 विष्णूराज कदम, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 27*मुकुट माझ्या डोक्यावर आहे**जांभळा झगा माझ्या अंगावर आहे**आहेत मला काटे जरा सांभाळून**चविष्ट आहे मी खातात मला भाजून**सांगा पाहू मी आहे तरी कोण…*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - पतंग ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परिणामक कार्य हे नेहमीच पूर्वनियोजित ध्येयाच्या दिशेने जाणारे असावे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राज्यातील पहिले अंगणवाडी केंद्र कोणते ?२) विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले ?३) नायलॉनचा शोध कोणी लावला ?४) 'मूर्ती बनवणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'क्रिकेटची पंढरी' असे कोणत्या क्रिकेट मैदानाला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) धारणी, अमरावती व धारावी, मुंबई ( ०२ ऑक्टो. १९७५ ) २) इगा स्वियातेक, पोलंड ३) वॉलेस ह्युम कॅरोथर्स ४) मूर्तिकार ५) लॉर्ड्स, इंग्लंड *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लाकूड* 📙 अभ्यासाच्या पाटीपासून देवाच्या देव्हार्यापर्यंत, घराच्या वाशापासून ते दारापर्यंत, बसायच्या पाटापासून ते जेवणाच्या टेबलापर्यंत सर्वत्र लाकूड लागते. घरात लाकडी फर्निचरच असावे, ही प्रत्येकाची इच्छा असते. सर्व लाकूड वनस्पतींपासून मिळवले जाते. सागवान, देवदार, शिसम ही चांगल्या प्रतीची जगभर गाजलेली लाकडे. त्यानंतरचा क्रम ओक, पाइनचा. साध्या साध्या कामासाठी निलगिरी, आंबा, कडूनिंब यांचे लाकूड वापरले जाते. काही वनस्पती झपाट्याने वाढतात; पण उत्तम प्रतीचे लाकूड देणाऱ्या वनस्पती मात्र फार सावकाश वाढतात. चांगले लाकूड मिळण्यासाठी किमान पंधरा ते पन्नास वर्षे वाट पहावी लागते. सुबाभूळ, निलगिरी, आंबा, कडुनिंब ही झाडे जेमतेम चार पाच वर्षांत दहा फुटांपेक्षा जास्त उंच वाढतात; पण त्यांचे लाकूड वासे या स्वरूपातच वापरले जाते. सागवान, शिसम, देवदार, ओक यांची वाढ खूपच सावकाश असते. पण त्यांचे मिळणारे लाकूड घरातील सामान बनवण्यासाठी वापरता येते. ते टिकाऊ असते. त्याला पाहिजे तो आकार छिनून, कातून दिला की, कित्येक वर्षे ते तसेच राहते.लाकूड ओले असताना वापरले, तर ते जसजसे वाळत जाईल, तसतसा त्याचा आकार बदलू शकतो, त्याला चिरा पडू शकतात, बाक येऊ शकतो. यासाठी तोडलेले लाकूड पूर्ण वाळेपर्यंत तसेच ठेवण्याची पद्धत आहे. ही साठवणूक करताना नेहमीच अडचणी असतात. बंदिस्त जागा, पाऊस पाणी नको, वाळवीपासून दूर असे वाळवावे लागते. काही ठिकाणी सतत गरम हवेचे झोत सोडूनही ते वाळवले जाते. पण ही पद्धत भारतात वापरली जात नाही. या सार्या प्रकाराला म्हणजे लाकूड वाळवण्याला 'सिझनिंग' वा लाकूड जुने होऊ देणे म्हटले जाते.लाकडाची साल नेहमीच काढली जाते. आतल्या बाजूला झाडाच्या बुंध्यावर मध्ये थेट मुळापासून वर जाणाऱ्या गोलाकार असंख्य केशवाहिन्या वाहत असतात. लाकडावर दिसणारे लांबुडके छाप (ग्रेन्स) म्हणजे याच रेषा. त्यामुळेच लाकडांचे सौंदर्य वाढते. या रेषा जितक्या सलग, समान तितके लाकूड चांगले मानले जाते. जेथे या रेषा तुटून गोलाकार गाठ बनते वा त्यांचा सलगपणा तुटतो, तेथे लाकूड तुटण्याची शक्यता असते. असा भाग सहसा जास्त वजन पडेल, अशा भागी ठेवला जात नाही. लाकूड कापायला यांत्रिक करवत वापरली जाते. त्यामुळे सलग एकाच पातळीत लाकूड कापले जाते.पूर्वीच्या काळी जंगलात लाकूड तोडल्यावर त्यांचे ओंडके हत्तीकडून वाहून गावापर्यंत आणले जात. अलीकडे त्या जागीच सॅा मिलची म्हणजे लाकडाचे योग्य मापाचे ओंडके करण्याची व्यवस्था केली जाते. नंतरची वाहतूक ट्रकद्वारे होऊ शकते. हल्ली जंगलतोड कमी करण्यासाठी घर बांधणीत लाकूड वापरू नये, असा सरकारी फतवा निघत आहे. लाकडाच्या ओंडक्यांना पाहिजे त्या आकारात कापून त्यांच्या वस्तू बनवणे हे क्लिष्ट असते, महाग पडते व पाहिजे त्या मापाचे ओंडके व फळ्या मिळणे हे शक्यही होत नाही. यावर उपाय म्हणून प्लायवूड, विनियर, चिपवुड, ब्लॉकबोर्ड, मायका बोर्ड असे प्रकार वापरत आले. आज आपण सर्व प्रकारचे लाकडी सामान त्यातूनच बनवतो. दुय्यम प्रतीचे लाकूड, लाकडाचा भुस्सा, उत्तम प्रतीचे लाकूड, पण त्याच्या अत्यंत पातळ चकत्या या सर्वांचा वापर करून वरील प्रकार बनतात.लाकडाच्या विविध आकारांच्या चकत्या एकमेकांना अत्यंत घट्ट बसवणाऱ्या डिंकासारख्या रेझिन्सचा वापर करून सलग पृष्ठभाग बनवला जातो. गरजेप्रमाणे याचे आकार कापून चौरस बनवतात. प्रचंड दाबाखाली अन्य प्रक्रियाही केल्या जातात. पाण्याचा, वाफेचा, वाळवीचा, क्षारांचा परिणाम होऊ नये, अशी रसायने वापरून तयार केलेले हे कृत्रिम बोर्ड्स आज जगभर वापरले जातात.या बोर्डचा उपयोग म्हणजे उपयुक्त, गरजेचा आकार उपलब्ध असतो. उत्पन्न होणारे सर्व लाकूड त्यांच्या निर्मितीला वापरले जाते. वस्तू बनवणे फार सोपे असल्याने कामाचा वेग खूपच वाढतो. शिवाय थोडाफार बाक देणे (उदाहरणार्थ, खुर्चीची पाठ) पॉलिश करणे, रंग देणे यांसाठी या बोर्डाचा वापर सोयीचा ठरतो.झाडांचे वय हे कापलेल्या बुंध्यातील गोलाकार वर्तुळावरून सांगता येते. दरवर्षी एक वर्तुळ वाढत जाते, असा सर्वसाधारण संकेत आहे. फार मोठ्या वृक्षाच्या वर्तुळातील अंतरावरून या वर्षीचा पावसाळा वा दुष्काळ यांचाही वनस्पतीशास्त्रज्ञांना बोध होऊ शकतो. लाकूड वापरण्यासाठी मात्र बुंधा नेहमीच लांबीमध्ये वापरला जातो.स्वयंपाकघरातील हत्यारे म्हणजे सुरी, विळा नेहमीच लाकडी पृष्ठभागावर वापरली जाते. एवढेच काय, खाटीकही लाकडाचा मोठा बुंधाच त्याच्या कामाला वापरतो व मटण छाटतो. सर्वात गमतीचा भाग म्हणजे तंबाखू ओडायचा पाईप लाकडी असतो. जळती तंबाखू या लाकडी पाइपमध्ये ठेवूनच तिचा धूर ओढला जातो.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार ….. || १ ||मन बुद्धीची कातरी, राम नामे सोने चारी || २ ||नरहरी सोनार हरीचा दासभजन करितो रात्रंदिवस || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनात नको त्या विकारांचा ओझा धरून फिरत राहल्याने नेहमीच अस्वस्थता, चिंता जाणवत असते आणि एक सेंकद सुध्दा मनमोकळ्या पणाने जगता येत नाही. अशा प्रकारच्या परिस्थितीत व्यक्तीला समाधान मिळत नाही. म्हणून जीवन जगत असतांना कितीही दुःख, संकटे आले तरी हसतमुखाने रहावे व मनमोकळेपणाने जगणे स्वीकारावे. कारण हसत राहल्याने चेहरा खुलून दिसतो सोबतच मनावरचा ताण, तणाव कमी होतो.म्हणून म्हणतात की, हसणे सुद्धा एकप्रकारचे जीवन आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मुख्य गोष्टीकडे लक्ष द्यावं*राज्यकारभारापेक्षा इतर अवांतर गोष्टीत रस घेणाऱ्या एका राजाने आपल्या सेनापतीला दोन प्रश्न विचारले व उत्तरे देण्यासाठी त्याला एका आठवड्याची मुदत दिली. सेनापतीने आपल्याच चेहरामोहोऱ्याच्या आपल्या एका सेवकाला आपला पोषाख घालायला देऊन, आणि त्या प्रश्नांची उत्तरे पढवून, राजाकडे पाठविले. ‘हा आपला सेनापतीच आहे’ अशा समजुतीनं राजानं त्याला विचारलं, ‘काय सेनापतीसाहेब ? मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तयार आहेत का ?’ नकली सेनापती म्हणाला, ‘महाराज ! ते प्रश्न आपण पुन्हा विचारलेत तर बरे होईल.’ राजा – समोरच्या पर्वताची माती एकूण किती टोपल्या होईल ? नकली सेनापती – त्या पर्वताच्या एकूण क्षेत्रफ़ळाच्या एक दशांश आकाराची जर एक टोपली बनवली, तर त्या पर्वताची एकूण माती दहा टोपल्या होईल. राजा – वा: ! अगदी बरोबर आहे उत्तर. सेनापतीसाहेब ! आता माझ्या मनात काय आहे ते सांगा. नकली सेनापती – सध्या तुमच्या मनात तुम्ही सेनापतीशी बोलत आहात असं आहे; पण मी खरा सेनापती नसून, सेनापतीच्या सोंगात तुमच्याकडे आलेला सेनापतीसाहेबांचा नोकर आहे. राजा – मग तुम्ही दोघांनी मला असं का फ़सवलं ? नकली सेनापती – माझ्या धन्याचं असं म्हणणं आहे की, जे माणसं मोठ्या पदांवर आहेत, त्यांनी मनोरंजनाच्या भलत्यासलत्या गोष्टीत वेळ वाया घालवू नये. राजाचं कर्तव्य राज्य उत्तम त-हेनं चालविण हे आहे, तर सेनापतीचं कर्तव्य राज्याचं उत्तम त-हेनं रक्षण करणे हे आहे. अशा स्थितीत आपण त्यांना नसते प्रश्न विचारुन त्यांच मन त्यांच्यापुढे असलेल्या मुख्य प्रश्नांवरुन उडवून भलत्याच प्रश्नांकडे वेधता. त्यांना आपलं हे वागणं मान्य नसल्यामुळे, त्यांनी आपल्या मामुली प्रश्नांची उत्तर देण्यासाठी माझ्यासारख्या मामुली सेवकाला सेनापतीचं सोंग घेऊन पाठविलं.’ नकली सेनापतीच्या या खुलाशानं राजा वरमला आणि मनोरंजनाच्या बाबींतून लक्ष काढून त्याने ते राज्यकारभारात घातले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 जुलै 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1BpRqUu9Vn/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 195 वा दिवस 🌍 महत्त्वाच्या घटना :-• १७८९ – बास्तिल तुरुंगावर हल्ला झाला. ही घटना फ्रेंच क्रांतीची सुरुवात मानली जाते. त्यामुळे १४ जुलै हा फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो.• १९५८ – इराकमध्ये सैनिकी उठाव झाला आणि राजेशाहीची समाप्ती झाली.• १९६५ – मारिनर-४ या अमेरिकन अंतराळयानाने मंगळ ग्रहाच्या खूप जवळून जाऊन पहिल्यांदाच त्याचे छायाचित्र घेतले.• २००४ – नवी दिल्ली येथे फ्रेंच पाणबुडी स्कॉर्पीन करार भारताने स्वाक्षरी केला.👶 जन्म :-• १९१० – विलियम हॅना – अमेरिकन अॅनिमेटर (टॉम अँड जेरीचे निर्माते).• १९१३ – गेराल्ड फोर्ड – अमेरिकेचे ३८ वे राष्ट्राध्यक्ष.• १९२१ – जेम्स गुन – सुप्रसिद्ध अमेरिकन विज्ञानकथा लेखक.• १९३४ – अवतार गिल – भारतीय चित्रपट आणि रंगभूमी अभिनेते.• १९४५ – सुधा मूर्ती – सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका, आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या संस्थापिका.⚰️ पुण्यतिथी :-• १९५५ – प. भीमसेन जोशी यांचे गुरू पं. सवाई गंधर्व (रामभाऊ कुंदगोळकर) यांचे निधन.• १९९२ – पं. नरेंद्र शर्मा – हिंदी कवी व गीतकार.• २०१५ – श्रीकांत जोशी – मराठी लेखक.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पोशाखातून व्यवसायाची ओळख*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासह सी.सदानंदन मास्तर, हर्षवर्धन श्रृंगला अन् मिनाक्षी जैन यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *स्वच्छता सर्वेक्षण-2024, अहमदाबाद देशात नंबर एक, भोपाळ दुसऱ्या आणि लखनऊ तिसऱ्या क्रमांकावर; इंदूरसह 15 शहरे सुपर क्लीननेस लीगमध्ये*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे विधानसभेत निवेदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी सोनाली मिश्रा यांची नियुक्ती.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बिहारप्रमाणे देशभरात मतदार याद्या तपासल्या जातील, EC ची तयारी पूर्ण; 28 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणीनंतर होईल निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अजित पवारांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे निधन, त्यांच्या जाण्याने विश्वासू सहकारी गमावला, पवारांनी व्यक्त केल्या भावना*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *लॉर्ड्स :- तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचाडाव 192 धावावर संपला, भारतासमोर विजयासाठी ठेवले 193 धावाचे लक्ष्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मिलिंद व्यवहारे, जिल्हा परिषद नांदेड 👤 धनंजय गुम्मलवार, जिल्हा परिषद नांदेड 👤 भगवान अंजनीकर, जेष्ठ साहित्यिक, नांदेड 👤 दीपक बोरगांवे, साहित्यिक, निपाणी 👤 नंदकिशोर मोरे 👤 डॉ. अमान खान, धर्माबाद 👤 इरावंत जामनोर👤 नितीन काळे 👤 आकाश आनंद यडपलवार, जारीकोट 👤 शंकर कंदेवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 25*पंख नाही तरीही हवेत उडतो, हात नाहीत तरीही भांडतो…ओळखा पाहू मी कोण …? *उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - कंगवा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्तुत्वाची पूजा करताना गुणग्राहकतेची जरुरी लागते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अलीकडेच कोणत्या उत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून जाहीर केले आहे ?२) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे आयसीसीचे नवे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?३) ताप मोजण्यासाठी कशाचा वापर करतात ?४) 'मासे पकडणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) गोदावरी नदी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून वाहते ? *उत्तरे :-* १) गणेशोत्सव २) संजोग गुप्ता ३) तापमापी ( थर्मामीटर ) ४) कोळी ५) आठ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *इसीजी म्हणजे काय ?* 📙 *************************ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम, याला आपण 'हृदयस्पंदनालेख' असेही म्हणू शकू. आजकाल एखाद्या व्यक्तीला अचानक चक्कर आली, डोळ्यासमोर अंधारी आली वा छातीत धडधडले, तर इसीजी काढून घेण्याचा सल्ला दिला जातो. चाळीशी ओलांडल्यानंतर दर दोन वर्षांनी इसीजी काढून घेणे श्रेयस्कर, असेही म्हणतात. इसीजी काढण्याच्या या वाढत्या प्रमाणामुळे, हृदयाबद्दलच्या जिज्ञासेमुळे, हृदयविकाराच्या भीतीमुळे आपल्याला इसीजी म्हणजे नेमके काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची जिज्ञासा असेल. इसीजी म्हणजे काय हे आता पाहू. हृदयाच्या स्नायूंच्या आकुंचन प्रसारणात विद्युतलाटा व विद्युत प्रवाह तयार होतात. याची नोंद शरीराच्या विविध भागांवर (छाती, पाय इ.) संवेदनशील असे इलेक्ट्रोड ठेवून करता येते. कारण हे विद्युतप्रवाह हृदयापासून सर्व ठिकाणी पसरवले जातात. या विद्युतप्रवाहाच्या शक्तीनुसार एका यांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढता येतो. इसीजी हे डॉक्टरांसाठी वरदानच ठरले आहे. सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या हृदयस्पंदनालेखात P,Q,R,S व T या विद्युतलाटा (Waves) असतात. त्यांचे निरोगी लोकांसाठीचे आकार (उंची, रुंदी इ.) तसेच एकमेकांतील (त्या लाटांचे) अंतर ठरलेले असते. हृदयाच्या वेगवेगळ्या विकारांवरून या आलेखात बदल घडून येतात व त्यावरून रोगाचे निदान करता येते. हृदयाचा आकार, हृदयाची गती, जास्तीचे ठोके वा न पडणारे ठोके, हृदयातील जवनिका, कर्णिका या कप्प्यांमधील सुसंवाद, हृदयाच्या स्नायूंचा रक्तपुरवठा इत्यादी अनेक गोष्टींची माहिती यामुळे मिळू शकते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही बदल इसीजीमध्ये सापडू शकतात. अशा व्यक्तींनी वेळीच आहार, विहार यावर नियंत्रण ठेवले; तर पुढील अनर्थ टाळता येऊ शकेल. यावरून इसीजीचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. इसीजी काढण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता तो काढण्यापूर्वी खरेच तो काढण्याची गरज आहे काय, याचा साधकबाधक विचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे श्रेयस्कर ठरते.डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आधी रचिली पंढरी | मग वैकुंठ नगरी || १ ||जेव्हा नव्हते चराचर | तेव्हा होते पंढरपूर चंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी || २ ||जेव्हा नव्हत्या गोदा गंगा | तेव्हा होती चंद्रभागाचंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी || ३ ||नामा म्हणे बा श्री हरी, ते म्या देखिली पंढरी चंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गंमत बघणारे आणि गंमत करणाऱ्यामध्ये खूप फरक असतो. कारण गंमत करणारा कधी काळी दु:खात असणाऱ्या व्यक्तीला कसं हसवता येईल या प्रयत्नात असतो आणि गंमत बघणारा व्यक्ती, एखाद्याचे वाटोळे कधी होईल आणि ते सर्व होताना बघून आनंद कशाप्रकारे घेता येईल याची वाट बघत असतो. अशा विचारसरणीमुळे अनेकांची वाट लागत असते म्हणून कोणाला हसवता येत नसेल तर कोणाची गंमत बघण्यात आनंद घेऊ नये.आपली कधी, कोण गंमत बघणार आहे ती वेळ कधीच सांगून येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अपशकुनी*दिल्ली शहरात हिराचंद या नावाचा एक व्यापारी होता. सकाळी त्याच तोंड पाहिलं की दिवस वाईट जातो, असा त्याच्याविषयी लोकांचा दृढ समज झाला होता. अकबर बादशहाच्या कानी ही गोष्ट जाताच त्यानं या गोष्टीची प्रचीती घेण्यासाठी, एकदा त्याला सकाळी सकाळीच आपल्या वाड्यावर बोलावून घेतले. योगायोग असा की, हिराचंद राजवाड्यातून निघून जाताच बादशहाच्य बेगमला सणसणून ताप भरला. स्वत: बादशहालाही अधूनमधून चक्कर येऊ लागल्यासारखं वाटून, त्याचा तोल जाऊ लागला, आणि त्यामुळं हकिमानं त्याला लंघन करण्याचा सल्ला दिला. दुपारपर्यंतचा काळ असा निघून गेला, आणि उन्हं ओसरताच राजस्तानातल्या एका राजाची बादशहानं जिंकून घेतलेला प्रदेश, पुन्हा त्या राजानं जिंकून घेतल्याची वाईट बातमी एका जासुदानं येऊन बादशहाला दिली. ‘हा सर्व सकाळी सकाळीच झालेल्या हिराचंद व्यापाऱ्याच्या अपशकुनी दर्शनाचाच प्रताप आहे,’ असा समज होऊन, बादशहान त्याल फाशीची शिक्षा फर्माविली. हिराचंदने बिरबलाची घेतली व आपले रक्षण करण्याची त्याच्याकडे याचना केली. बिरबलाने त्याला निश्चींत रहायला सांगितले. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी वेषांतर करुन, रस्त्याच्या कडेला जाऊन बसला, नित्याप्रमाणे बादशहा त्या रस्त्याने फिरायला जाऊ लागला. बादशहाला दुरुन येताना पाहताच बिरबल पळून जाऊ लागला. सेवकांनी त्याला पकडून बादशहाकडे हजर केले. बादशहानं पळण्याचं कारण विचारताच बिरबल म्हणाला, ‘खाविंद, काल सकाळी त्या हिराचंद व्यापाऱ्याचं दर्शन झाल्यामुळं आपला व आपल्या बेगमसाहेबांचा नुसता दिवसच वाईट गेला, पण आपलं दर्शन सकाळी झाल्यामुळे, त्या बिचाऱ्या हिराचंदावर मात्र फ़ाशी जाण्याचा प्रसंग आला आहे. तेव्हा त्या हिराचंदच्या दर्शनापेक्षा, आपलं सकाळी होणारं दर्शन हे कितीतरी पटीनं अधिक वाईट असल्यामुळे, ते टाळण्यासाठी मी पळून जात होतो.’ बादशहाने बिरबलाचे हे शब्द ऎकून जसे त्याला ओळखले, तशीच त्याने आपली चूकही ओळखली व हिराचंदला फर्मावलेली फाशीची शिक्षा रद्द केली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 जुलै 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~समूहात join होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9?mode=ac_c••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌟 महत्वाच्या घटना :-• १९०९ – भारतात ‘काळ्या कायद्यांविरुद्ध’ लढा देणारे ‘हिंद स्वराज’ हे महात्मा गांधींचं पुस्तक प्रथमच प्रकाशित झालं.• १९६२ – अमेरिकेने पहिला दूरसंचार उपग्रह "टेलस्टार-1" यशस्वीरित्या प्रक्षेपित केला.• १९९३ – महाराष्ट्रात मुंबई येथे भीषण पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली.🎉 जन्मदिवस :-• १८९५ – बकुळा रिव्हा (बौद्ध भिक्षुणी व भारतीय संसदीय सदस्य)• १९०४ – पाब्लो नेरुदा, नोबेल पुरस्कार विजेते चिलीचे कवी.• १९२७ – विलासराव देशमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.🕯️ स्मृतिदिन :-• १९२० – जोसफ रॉक, प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ.• २००३ – बाळासाहेब देसाई, महाराष्ट्राचे शिक्षण व कायदा मंत्री.• २०१२ – राजेश खन्ना, बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••..... विशेष लेख वाचण्यासाठीhttps://nasayeotikar.blogspot.com येथे क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड, राजगड सह 12 किल्यांचा युनेस्कोच्या यादीत नाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *फिल्मफेअर 2025 च्या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून आदिनाथ कोठारे यांचा पाणी चित्रपटाची झाली निवड, तर अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' ने बाजी मारली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून १ जुलै ते १५ जुलै दरम्यान शोध मोहीम*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जागतिक मानव संसाधन विकास परिषदेमध्ये महावितरणला मिळाले सहा पुरस्कार; सीएमडी लोकेश चंद्र यांना दोन पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *टाटा पॉवर रिन्युएब्लने एप्रिल ते जून या तीन महिन्यात तब्बल ४५ हजार ५८९ घरांच्या छतावर उभारले रूफ टॉप सोलर पॅनल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अमरनाथ यात्रा: आतापर्यंत 1.45 लाख भाविकांनी घेतले दर्शन, 7,307 यात्रेकरूंचा एक नवीन गट रवाना; बालटाल, पहलगाम मार्गे यात्रा सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *लॉर्ड्स - तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी इंग्लंड सर्व बाद 387 धावा तर भारत 3 बाद 147 धावा, राहुलचे अर्धशतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिल्पा जोशी, जेष्ठ साहित्यिक, मुंबई 👤 प्रवीण दाबाडे पाटील, शिक्षक तथा साहित्यिक, कन्नड👤 हरिहर धुतमल, पत्रकार, लोहा 👤 अविनाश पांडे 👤 माधव उमरे👤 दादाराव जाधव 👤 नागेश पडकुटलावार 👤 अभिजित राजपूत 👤 नंदकुमार कौठेकर 👤 साईनाथ पाटील गादगे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 24*दात आहेत पण चावत नाही, गुंता होतो काळ्या शेतात, सगळे माझ्यावर सोपवतात, सांगा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - हत्ती ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणतेही ध्येय घेतले तरी त्याच्या सिद्धीसाठी उद्योग करावा लागतो. ध्येय आपण होऊन निरुद्योगी माणसाच्या हातात येत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२५ चा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) श्वसन क्रियेद्वारे दूषित हवा आत जात राहिल्याने कोणता रोग होतो ?३) उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती कोण आहेत ?४) 'कमी आयुष्य असलेला' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'कॅप्टन कूल' असे कोणत्या क्रिकेटपटूला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) महेश मांजरेकर, नामवंत अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता २) दमा ३) जगदीप धनखड ४) अल्पायू, अल्पायुषी ५) महेंद्रसिंग धोनी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लेसर* 📙 लेसर या प्रकाशकिरणांभोवती एक गूढ वलय सामान्य माणसाच्या मनात असते. काही वर्षांपूर्वीपर्यंत लेसरचा वापर अगदी मर्यादित होता; पण आज मात्र तो अगदी सामान्य माणसांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. एखाद्या वस्तूच्या वेष्टनावरची किंमत, पुस्तकाचा क्रमांक किंवा क्रेडिट कार्डवरची माहिती वाचण्यासाठी लेसर किरणांचा वापर केला जातो. एवढेच काय, पण बाजारात नवीन आलेल्या कॉम्पॅक्ट डिस्क स्टिरिओमध्येही लेसरच वापरलेला असतो. डोळे व लेसर यांचे तर अतूट असे समीकरण होण्याइतका डोळ्यांच्या आजारात लेसरचा वापर वाढत आहे. त्यामानाने मेंदूतील कर्करोगात लेसर वापरणे अजून तितकेसे सुलभ झालेले नाही. हा वापर करताना लेसरचा एक महत्त्वाचा गुण वापरला जातो, तो म्हणजे लेसरच्या लहरी ठराविक वेगाने, ठरावीक काळाने एका मागोमाग अत्यंत सुसंघटितपणे वाहत असतात. नेमक्या जागी पाहिजे त्या आकाराचे, पाहिजे तितक्या लहान व्यासाचे लेसरचे किरण सोडता येतात व हे किरण अन्य प्रकाशाप्रमाणे पसरत नाहीत. एकाच तरंगलांबीच्या विद्युतचुंबकीय लहरी लेसरमध्ये असतात. त्यामुळे लेसरचा रंगही ज्या उद्गमातून लेसर निर्माण केला जाईल, त्यावर अवलंबून असतो. पण एका वेळी एकच रंग असतो. लेसर हे नाव नसून तो एक शोर्टफॉर्म आहे. लेझर (LASER) म्हणजे 'लाइट अॅम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन'.लेसरच्या निर्मितीचे सध्या विविध प्रकार वापरले जातात. काहींमध्ये क्र्वार्ट्झचा वापर केला जातो, तर काहींमध्ये हवाबंद नळीतील इलेक्ट्रोड काही विशिष्ट वायूंमध्ये काम करतात. हेलियम, निऑन, कार्बन डायॉक्साइड यांचा वापर या ट्यूबमध्ये केला जातो. दोन इलेक्ट्रोड्समध्ये उच्चदाबाचा विजेचा प्रवाह खेळवल्यावर लेसर निर्माण करण्यासाठी वापरलेल्या द्रव्यातील अणुंना जी ऊर्जा मिळते, त्यामुळे त्यातून प्रकाशकिरण बाहेर टाकले जातात. दिलेली विद्युतऊर्जा बाहेर टाकल्या जाणाऱ्या प्रकाशकिरणांची एक साखळी प्रक्रियाच या द्रव्यात सुरू होते. या नळीच्या दोन्ही बाजूंना समोरासमोरच्या दोन आरशांतुन हे प्रकाशकिरण पुन्हापुन्हा पर परावर्तित होत असल्याने ही साखळीप्रक्रिया वाढतच जाते. या अारशांपैकी एका आरशाला ठेवलेल्या पाहिजे त्या व्यासाच्या छिद्रातुन लेसर बीम वा झोत नळीच्या बाहेर टाकला जातो. प्रत्येक अणूतून बाहेर पडणारे किरण हे एकाच तरंग लांबीचे असल्याने बाहेर पडणारा झोतही तसाच असतो. प्रकाशाचा झोत सलग जोडायचा की पुंजक्या पुंजक्यात, हे लेसरच्या निर्मिती प्रक्रियेवर अवलंबून ठेवता येते. बाहेर पडणाऱ्या सर्व किरणांचा संघटितपणा (coherence) हा लेसरला नेहमीच्या प्रकाशापेक्षा वेगळा ठरवतो. लेसरची वैशिष्टय़े या गुणधर्मातूनच संभवतात.लेसर किरणांचा विनाशक व उपयोगी असा दोन्ही प्रकारे भरपूर वापर केला गेला आहे. अनेक प्रकारची लष्करी अस्त्रे, आयुधे, विमाने लेसरचा वापर करतात, तर अनेक अत्याधुनिक कारखाने अत्यंत काटेकोरपणे कापाकापी वा जोडाजोडीसाठीही लेसरच वापरतात. डोळ्यांच्या आतील दृष्टीपटल निखळले असता ते पुन्हा चिकटवण्यासाठी लेसरचा वापर केला जातो. विविध कथा, सिनेमा व विज्ञान गोष्टींत मात्र लेसर काल्पनिक बंदुकीचा मुक्त वापर आढळतो. कसलाही आवाज न करणारी, पण पाहिजे त्याचा बळी घेणारी ही बंदूकच लेसरबद्दलचे गूढवलय सर्वांच्या मनात वाढत जाते.लेसरबद्दल एक विशेष बाब म्हणजे १९१७ साली आइन्स्टाइन यांनी या स्वरूपाचे किरण निर्माण होऊन त्यांचा वापर करता येईल, असे भाकीत वर्तवले होते. प्रत्यक्षात मात्र त्यासाठी १९६० साल उजाडले. थियोडोर मेमन यांनी पहिला लेसर त्या वर्षी वापरात आणला. त्यानंतरही अनेक वर्षांनंतर म्हणजे १९७५ सालच्या आसपास वैद्यकीय क्षेत्रात प्रगत देशात त्याचा वापर सुरू झाला. भारतात प्रमुख शहरात १९९० सालापासून लेसरचा वापर करून रुग्णांवर उपचार केले जातात. प्रामुख्याने ते डोळ्यांच्या बाबतीत असतात.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल | करावा विठ्ठल जीवभावे ||१||येणे सोसे मन झाले हावभरी | परत माघारी घेत नाही ||२||बंधनापासुनि उकलल्या गांठी | देता आले मिठी सावकाश ||३||तुका म्हणे देह भरीला विठ्ठले | कामक्रोध केले घर रिते ||४||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनात नको त्या विकारांचा ओझा धरून फिरत राहल्याने नेहमीच अस्वस्थता, चिंता जाणवत असते आणि एक सेंकद सुध्दा मनमोकळ्या पणाने जगता येत नाही. अशा प्रकारच्या परिस्थितीत व्यक्तीला समाधान मिळत नाही. म्हणून जीवन जगत असतांना कितीही दुःख, संकटे आले तरी हसतमुखाने रहावे व मनमोकळेपणाने जगणे स्वीकारावे. कारण हसत राहल्याने चेहरा खुलून दिसतो सोबतच मनावरचा ताण, तणाव कमी होतो.म्हणून म्हणतात की, हसणे सुद्धा एकप्रकारचे जीवन आहे. 🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌷🌹🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आई-वडिलांचे प्रेम*एक तरुण बागेत काम करीत होता. सुर्य डोक्यावर आला तरी त्याचे बागकाम संपत नाहिसे पाहून त्याची आई घरातून ओरडली, ‘अरे गोविंदा ! ऊनं कोण रणरणतं आहे ! घरात ये ना ? वाटल्यास उरलेलं काम संध्याकाळी कर.’ दोन तीन वेळा सांगूनही आपला मुलगा आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असं पाहून त्या बाईने आपल्या चार-पाच वर्षांच्या नातवाला-म्हणजे उन्हात बागकाम करणाऱ्या मुलाच्या मुलाला उचललं आणि बागेत असलेल्या आपल्या मुलापाशी नेऊन ठेवलं.आपल्या मुलाला उन्हात आणून ठेवल्याचं पाहून त्याचा पिता आपल्या आईवर भडकून म्हणाला, ‘आई ! अगं ऊन कोण तापलयं ! आणि चंदूला तू इथे उन्हात आणून ठेवलसं ? त्याला उन्हाचा त्रास नाही का होणार?’ त्या तरुणाची आई मुद्दाम म्हणाली, ‘ऊन लागलं तर लागलं; त्यात विशेष काय आहे?’तो तरुण म्हणाला, ‘आई ! तो माझा मुलगा आहे. त्याल ऊन लागतयं म्हणून नुसता त्यालाचा त्रास होत नाही, तर त्याला होणाऱ्या त्रासामुळं माझ्याही जिवाची तगमग होऊ लागली आहे.’ यावर आई म्हणाली, ‘मग गोविंदा, तू अस विचार कर की, तुझ्या या मुलाला ऊन लागताच जशी तुझ्या जिवाची तगमग सुरु झाली, तशीच तगमग तू मघापासून उन्हात काम करीत असल्यामुळे माझ्याही जिवाची तगमग होत नसेल का ?’ वृध्द व प्रेमळ आईचा हा बिनतोड युक्तीवाद ऎकून गोविंदा निमूटपणे कुदळ, कोयती उचलून, बागेतून हसत हसत घरात गेला.तात्पर्य - स्वत:पालकाच्या भूमिकेत गेल्याशिवाय आईवडिलांचे प्रेम, माया, काळजी कळत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 जुलै 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1989LZFxLJ/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 182 वा दिवस 🌍 महत्त्वाच्या घटना :- • १९७९ – अमेरिका देशाचे अंतराळ यान स्कायलॅब पृथ्वीवर कोसळले.• १९८७ – जगाची लोकसंख्या ५ अब्ज झाली, म्हणून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून घोषित करण्यात आला.🎉 जन्मदिवस :- • १८९७ – नारायण माळी, प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक व समाजसेवक.• १९३४ – ज्योतीर्मयी सिकदर, भारताच्या सुवर्णपदक विजेत्या धावपटू (१९९८ आशियाई क्रीडा स्पर्धा).🕯️ मृत्यू :- • १९९६ – गोविंद निहलानी, प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक व छायाचित्रकार.• २००६ – मुम्बईमध्ये लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये सुमारे २०९ लोकांचा मृत्यू झाला.🌐 महत्त्वाचे दिन :- 🌏 जागतिक लोकसंख्या दिन (World Population Day)१९८९ पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने साजरा केला जातो.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज जागतिक लोकसंख्या दिन त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख *लोकसंख्या शिक्षणात शिक्षकांची भूमिका*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विकसित भारतासाठी शैक्षणिक धोरण महत्वाचे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गणेशोत्सव महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून घोषित; भाजप नेते आशिष शेलारांची विधानसभेत घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्य जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर; शहरी नक्षलवादाला लगाम बसणार, सार्वजनिक सुव्यवस्थेस किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या संघटनांवर कडक कारवाई होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईत अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुपचूप दिल्ली गाठली, भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी; राजकीय वर्तुळात खळबळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेंच्या जिल्ह्यातच यशवंत विद्यार्थी योजनेत भ्रष्टाचार; आता सावेंकडून प्रकरणाची गंभीर दखल; म्हणाले, सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे निलंबित, SIT चौकशी होणार; 5 कोटी घेऊन विधानसभा परिसरात फिरत असल्याचा आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंड - लॉर्ड्सच्या मैदानावर क्रिकेटच्या देवाचं पोट्रेट अनावरण, सचिन तेंडुलकरला आठवले 1989 चे दिवस; म्हणाला, माझ्यासाठी शब्दात व्यक्त न होता येणारा क्षण*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रकाश नाईक, BDO, पंचायत समिती खुलताबाद👤 अनुपमा अजय मुंजे, शिक्षिका तथा साहित्यिक 👤 प्रभू देशमुख, मुख्याध्यापक, बिलोली 👤 स्वप्नील शिंदे 👤 इंजि. साईकिरण अवधूतवार, हैद्राबाद 👤 संतोष चव्हाण, शिक्षक👤 शिवाजी सूर्यवंशी, शिक्षक, हदगांव 👤 प्रमोद मंगनाळे, शिक्षक नेते, नांदेड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 23*असा कोण आहे, जो आपली सगळी कामे हाताऐवजी नाकाने करतो ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - कॅलेंडर••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञान हे बाहेरून आत ओतण्याची वस्तू नसून आतून बाहेरून अभिव्यक्त होणारी एक शक्ती आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताची पहिली अम्पुटी जलतरणपटू कोण ?२) २१ एप्रिल १९४७ ला भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांनी नवनियुक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधताना नागरी सेवकांना काय संबोधले ?३) पहिला नागरी सेवा दिवस कोणत्या वर्षापासून साजरा केला जातो ?४) 'कुस्ती खेळण्याची जागा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारतातील नागरी सेवांचा पाया कोणी घातला ? *उत्तरे :-* १) शाश्रुती विनायक नाकाडे, ताडगाव, अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया २) भारताची पोलादी चौकट ३) २१ एप्रिल २००६ ४) आखाडा, हौद ५) वॉरन हेस्टिंग्ज*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌍 *पृथ्वीचा परीघ किती आहे ?* 🌍 ************************या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी आपल्याला आपली पृथ्वी एखाद्या चेंडूसारखी गोल, गरगरीत, वाटोळी आहे हे गृहित धरायला हवं. वास्तवात ती तशी नाही. दोन्ही ध्रुवांच्या इथे ती जराशी दबल्यासारखी आहे. उलट विषुववृत्ताच्या ठिकाणी ती जराशी फुगल्यासारखी आहे. स्वतःभोवती सतत ती गरगर फिरत असते, त्यामुळे तिच्या आकारात हा फरक झालेला आहे. तरीही तिचा परीघ किती आहे हे समजून घेण्यासाठी आपण ती गरगरीत आहे, असं समजल्यास फारसा फरक पडणार नाही. आता परीघ म्हणजे कोणत्याही एका ठिकाणाहून आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाला धरून सरळ प्रवास करत निघालो तर परत त्याच ठिकाणी पोहोचेपर्यंत आपण किती मजल मारली असेल, याचं गणित आहे. तेव्हा अशा प्रवासासाठी असलेल्या साधनांवरूनच आपण या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकतो. पृथ्वीच्या काळी समुद्रावर प्रवास करणाऱ्या नावाड्यांना आपण कुठे आहोत, कुठे चाललो आहोत हे समजण्यासाठी फारशी साधने नव्हती. त्यामुळे आकाशातल्या ग्रहगोलांनाच विचारात त्यांची वाटचाल होत असे. उत्तर गोलार्धात ध्रुवतारा उत्तर दिशा दाखवत असे. त्याच्यानुसार मग इतर दिशा ओळखल्या जात. तसंच आपण किती मजल मारली आहे हे समजण्यासाठीही अशाच गणताची मदत घेतली जात असे. त्यातूनच नॉटिकल माईल म्हणजेच 'नौकायानातला मैल' मैल ही संकल्पना पुढे आली. याचंच संक्षिप्तीकरण होऊन 'नाॅट' हे एकक रूढ झालं आहे. त्यामुळे जहाजांचा वेग हा दर ताशी अमुक इतके नाॅट असा मोजला जातो. जमिनीवरून प्रवास करत असतानाही आपण मैल हे अंतर मोजण्याचे एक एकक पाळतो; पण नॉटिकल माईल आणि आपल्या नेहमीच्या ओळखीचा मैल यांच्यात फरक आहे, कारण त्या एककांची व्याख्याच वेगळी आहे. पृथ्वी गोलाकार असल्यामुळे त्या गोलाचे ३६० अंश संभवतात. या वर्तुळापैकी एक मिनिटाची आर्क म्हणजे एक नॉटिकल माईल अशी त्याची व्याख्या केली गेली आहे. म्हणजेच या वर्तुळाच्या एक अंशाच्या एक-साठांश इतक्या भागाचा प्रवास केल्यास एक नॉटिकल माईल अंतर कापलं जातं. तेव्हा संपूर्ण ३६० अंशांचा प्रवास करायचा झाल्यास ६० x ३६० म्हणजेच २१६०० नॉटिकल माईल इतकं अंतर होतं ; पण एक नॉटिकल मैल हा आपल्या जमिनीवरच्या मैलापेक्षा मोठा असल्यामुळे हेच अंतर २४८५७ मैल किंवा ४०००३ किलोमीटर इतकं भरतं.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातुन*👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेढा वेढा रे पंढरी | मोर्चेवला भीमातीरी || १ ||चला चला संतजन | करू देवासी भांडण || २ ||लुटा लुटा पंढरपूर | धारा रखुमाईचा वर || ३ ||तुका म्हणे चला चला | घाव निशाणी घातका || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याची वाट लावून आनंद घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. जो पर्यंत अंगात ताकद आणि हातात पैसे, धनसंपत्ती भरभरून असते तो पर्यंत ह्या सर्वच गोष्टी करायला ही जास्त वेळ लागत नाही. पण जेव्हा ह्या सर्वच व्यर्थ गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात तेव्हा मात्र मुखातून एक शब्द सुद्धा बाहेर पडत नाही. कारण असा एक कोणीतरी असते तो दिसत नाही मात्र योग्य वेळ आल्यावर त्याची चालते त्यावेळी कितीही शक्तीशाली माणूस असेल तरी त्याच्यासमोर कोणाचे चालत नाही. म्हणून कोणाची वाट लावून आनंद घेण्यात किंवा समाधान मानण्यात सुंदर असे आयुष्य गमावू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ऋषी अष्टावक्र*हिंदू धर्मशास्त्रामध्ये अष्टावक्र नावाचे एक विचारवंत होऊन गेले. असे म्हणतात की अष्टावक्र हे केवळ कुरुपच नव्हते तर त्यांचे शरीरही बेढब होते. त्यांचे शरीर आठ ठिकाणी वाकडे होते म्हणून त्यांना अष्टावक्र हे म्हटले जात होते. ही एक प्रसिद्ध कथा आहे. अष्टावक्र ऋषी एकदा राजा जनक यांच्या दरबारात गेले. दोन्ही बाजूंनी उंच आसनावर सभासद, ज्ञानी, पंडीत, ज्ञानकर्मी बसले आणि राजा जनकाचे सिंहासन होते. अष्टावक्र ऋषींना द्वारपालाने रोखले नाही. अष्टावक्र त्यावेळी किशोरवयीन होते. अष्टावक्राने जेव्हा राजा जनकाच्या मुख्य सभामंडपात प्रवेश केला तेव्हा त्याच्यावर नजर पडताच सर्वजण एकमेकांकडे पाहून हसू लागले होते. इतकेच नाही तर त्यांचे हसू थांबत नव्हते. हे पाहून अष्टावक्राला प्रथम काहीच समजले नाही, मात्र त्यानंतर त्याला आपल्यावर हे सर्वजण हसतात म्हणून लक्षात आले. हे पाहून तोही जोरजोरात हसू लागला. जनक राजाने सभेला शांत होण्याचे आवाहन केले, सभा शांत होताच राजा जनकाने अष्टावक्राला विचारले,'' हे साधू, हे लोक तुमच्यावर हसतात हे माझ्या लक्षात आले पण तुम्ही का हसता आहात हे समजले नाही'' अष्टवक्राने उत्तर दिले,'' महाराज, मला वाटले की राजा जनक जो ज्ञानी, विचारवंत आहे त्याच्या सभेत ज्ञानी, विचारवंत, हुशार लोक असतील पण इथे तर सर्वच जण कातडीकडे व बाह्य स्वरूपाकडे पाहणारे लोक आहेत. माझ्या रूपाकडे पाहून हे लोक मला हसत होते हे पाहून मला यांच्या बुद्धीची कीव आली व हसू फुटले.'' जनक राजासह सर्व सभा अष्टावक्र ऋषींच्या या उत्तराने शरमिंदी झाली. तात्पर्य - माणसाचे महत्व त्याच्या शरीरावर नाही तर त्याचे ज्ञान, परिश्रम आणि कर्मावर आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 जुलै 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link -https://www.facebook.com/share/p/1BFknE7oeM/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 181 वा दिवस 🗓️ महत्त्वाच्या घटना :-• १९२५ – महात्मा गांधींनी 'हरिजन सेवक संघ' स्थापन केला.• १९९१ – बोरिस येल्त्सिन रशियाचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष बनले.• २००२ – भारताचा ‘अग्नि-I’ क्षेपणास्त्राचा यशस्वी चाचणी झाली.🎉 जन्मदिन :-• १८७१ – मार्सेल प्रुस्त, प्रसिद्ध फ्रेंच कादंबरीकार.• १९२० – मुल्क राज आनंद, इंग्रजी लेखक (भारत).• १९४९ – सुनील गावसकर, भारतीय क्रिकेटपटू व प्रसिद्ध फलंदाज.• १९५१ – कौशल्या फडके, मराठी लेखिका.🕯️ पुण्यतिथी :-• १९२० – निकोला टेस्ला, महान शास्त्रज्ञ आणि संशोधक.• २००६ – राजेश पायलट, भारतीय राजकारणी.• २०१९ – गोपीनाथ मुंडे, भारतीय राजकारणी व महाराष्ट्रातील लोकप्रिय नेता.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रासंगिक लेख *आई माझा गुरु*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *टप्पा अनुदानाचा प्रश्न सुटणार, शिक्षकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपन्न, शिक्षकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक निर्णय घेणार - मंत्री गिरीश महाजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय गृह मंत्रालय मराठीतून आलेल्या पत्रांना आता मराठी भाषेतूनच उत्तर देणार; संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नामिबिया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यातील हॉटेल उद्योग धोक्याच्या उंबरठ्यावर, शासनाच्या करवाढीमुळे पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता, आहार संघटनेकडून चिंता व्यक्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारतीय वंशाचे सबीह खान होणार 'अँपल'चे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी, ते जेफ विल्यम्स यांची जागा घेतील*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शेत जमिनीचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *'आयर्नमॅन 2025' ही स्पर्धा स्वीडनच्या जोनकोपिंग येथे पार पडली, त्यात अभिनेत्री सैयामी खेरने ट्रायथलॉन यशस्वीरीत्या पूर्ण करून वर्षभरात दुसऱ्यांदा रचला जबरदस्त रेकॉर्ड*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 महेश पांडुरंग लबडे, शिक्षक, छत्रपती संभाजीनगर👤 युवराज माने, शिक्षक तथा साहित्यिक, अंबाजोगाई👤 दत्तात्रय धूळशेट्टे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी, नांदेड 👤 मिलिंद चवरे, शिक्षक, मनपा, नांदेड 👤 लक्ष्मण मुंडकर, शिक्षक, बिलोली 👤 नागनाथ वाढवणे, शिक्षक, नायगाव बा.👤 ज्ञानेश्वर जगताप, शिक्षक, नांदेड 👤 सुरेश सावरगावकर, शिक्षक, नांदेड 👤 दगडू गारकर, शिक्षक, लातूर 👤 चरणसिंह चौहान 👤 अभिजित वऱ्हाडे 👤 पिराजी चन्नावार 👤 भागवत गर्कल 👤 बालाजी दुसेवार 👤 संतोषकुमार यशवंतकर👤 गणेश अंगरवार 👤 प्रकाश येलमे, धर्माबाद👤 विठ्ठल रामलू चिंचलोड, हैद्राबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 22*अशी कोणती गोष्ट आहे, जी वर्षातून तुम्ही एकदाच विकत घेता, आणि वर्ष संपला कि फेकून देता ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - टाईपरायटर••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अज्ञानाची फळे नश्वर असतात. ती सकाळी जन्मतात आणि संध्याकाळी नष्ट होतात. - शंकराचार्य*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणते प्रदूषक जलप्रदूषणासाठी जबाबदार आहेत ?२) एका कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज कोण ?३) तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तो बोधिवृक्ष सध्या कोणत्या राज्यात आहे ?४) 'बातमी सांगणारा / सांगणारी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) जगातील सर्वात मोठा आईस्क्रीमचा निर्यातदार देश कोणता ? *उत्तरे :-* १) प्लॅस्टिक कचरा २) शुभमन गील, ४३० धावा ३) बिहार ४) वृत्तनिवेदक / वृत्तनिवेदिका ५) जर्मनी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔬 *सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते ?*🔬 जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पाहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्त्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रांमध्ये भिंगे अशा प्रकारे बसवलेली असतात की त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात.पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप १ मी.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारो पट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतुच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यातदेखील सूक्ष्मदर्शकद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते.असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज सोनियाचा दिनू | वर्षे अमृताचा धनु || १ ||हरी पहिला रे हरी पहिला रे |सबाह्यअभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी || २ ||दृढविटे मन मुळी | विराजित वनमाळी || ३ ||बरवा संतसमागमू | प्रगटला आत्मारामु || ४ ||कृपासिंधु करुणाकरू | बणररखुमादेवीवरू || ५ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समोर उभी दिसणारी व्यक्ती गरीब असेल म्हणजे ती लाचार असेलच असेही नाही. बरेचदा त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा आपला वेगळा असतो म्हणून ती तशीच दिसत असते आणि तिथेच श्रीमंत दिसणाऱ्या व्यक्तीकडे आपण मोठ्या आदराने बघून मानसन्मान देतो कधीकाळी आपल्या याच वागणुकीमुळे लाचार बनण्याची आपल्यावर वेळ येत असते. म्हणून गरीब असेल त्याला लाचार समजू नये आणि श्रीमंत दिसणाऱ्या व्यक्तीला डोक्यावर घेऊन फिरू नये.कारण ज्याला डोक्यावर घेऊन फिरल्याने लाचार बनण्याची वेळ येते अन् एखाद्याला हिनवल्याने आपल्यातील माणुसकी नावाची संपत्ती त्या क्षणातच संपत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरे दुःख*एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."तात्पर्य- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 जुलै 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1YHW8n3mJe/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📌 महत्त्वाच्या घटना :-🗓 १८१६ – दु:खद उन्हाळा दरम्यान अमेरिकेत बर्फवृष्टी झाली, जी जागतिक हवामानातील बदलामुळे झाली होती.🗓 १८७५ – बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची स्थापना झाली.🗓 १९९१ – भारताचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक उदारीकरण प्रक्रिया सुरू झाली.🎉 जन्मदिवस :-👨🔬 १८५६ – निकोला टेस्ला, प्रसिद्ध वैज्ञानिक आणि विद्युत अभियंता (जन्म: क्रोएशिया).🎬 १९४६ – अमृता प्रीतम, पंजाबी साहित्यिक लेखिका.🎵 १९६४ – सोनू निगम, भारतीय गायक व अभिनेते.🕯 मृत्यू :- ⚰️ १९७४ – गुरुनाथ बेडेकर, मराठी साहित्यिक, समीक्षक.⚰️ २००२ – केशवसुत यांच्या पत्नी शारदा, ज्यांनी त्यांच्या कविता प्रसिद्ध केल्या.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पावसाशी मारलेल्या गप्पा*जरूर वाचावे आणि आपल्या प्रतिक्रिया तेथेच comment करावे. ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात देशातील कामगार संघटनेने 9 जुलै रोजी केली भारत बंदची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एक देश-एक निवडणूक संविधानाच्या मूलभूत रचनेचे उल्लंघन नाही, माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे संसदीय समितीला लेखी मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत बसमध्ये मोफत प्रवास योजेनेत बदल, ट्रान्सजेंडर आणि दिल्लीचे रहिवाशी असलेले महिलाच बसमध्ये मोफत प्रवास करू शकतील*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *डोनाल्ड ट्रम्प यांनी आता 14 देशांवर लादला कर, म्यानमारकडून आकारले सर्वाधिक शुल्क, 1 ऑगस्टपासून होणार अंमलबजावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्रातील सर्वात मोठे APMC मार्केट नवी मुंबईतून स्थलांतरित करण्याचे आदेश; NMMC ने सुचवला 14 गावांचा पर्याय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भूषण गवई यांची सर न्यायाधीश पदी निवड झाल्या बद्दल त्यांचे विधानमंडळात सत्कार, भारताची राज्यघटना या विषयी ऐतिहासिक मार्गदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत विरुद्ध इंग्लंड - तिसरा कसोटी सामना उद्यापासून लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पंडित पवळे, सेवानिवृत्त, शिक्षक 👤 महेश जाधव 👤 साईनाथ विश्वब्रह्मा 👤 अनिल उडतेवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक *लिहतो पण पेन नाही, चालतो पण गाडी नाही, टिक टिक करतो पण घड्याळ नाही, सांगा बर मी कोण आहे?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - रस्ता ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मसमर्पणाच्या भावनेने जे आपले जीवन घालवितात, त्यांना आपल्या पुढील मार्ग स्वच्छ दिसतो. - महात्मा गांधी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात एकूण अण्वस्त्रधारी देश किती आहेत ?२) १९ वर्षाखालील वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडू शतक झळकविण्याचा विक्रम कोणी केला ?३) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे ( MPSC ) मुख्यालय कोठे आहे ?४) 'बातमी आणून देणारा / देणारी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) देशातील कोणते विद्यापीठ पहिले सहकार विद्यापीठ ठरणार आहे ? *उत्तरे :-* १) नऊ - रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन, उत्तर कोरिया, भारत, पाकिस्तान २) वैभव सूर्यवंशी, भारत, ५२ चेंडू ३) बेलापूर, नवी मुंबई ४) वार्ताहर ५) त्रिभुवन सहकारी विद्यापीठ, गुजरात*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 एनिमा म्हणजे काय ? 📕शौचास होत नसेल, तर कधी रुग्णास शस्त्रक्रियेपूर्वी पोट साफ होण्यासाठी गुदद्वाराच्या मार्गाने काही औषधी मोठ्या आतड्यात सोडतात, यास 'एनिमा' असे म्हणतात. जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नसल्यास व आहार समतोल नसल्यास बद्धकोष्ठाचा त्रास होतो. कधी कधी मळाचे खडेही तयार होतात. लहान मुलांना संडास होत नसेल, तर कागदाची पुंगळी करून त्याला साबण लावून ती गुदद्वारात सारल्यास संडास होते किंवा गोडेतेल सोडल्यासही मळाचे खडे सुटतात व न दुखता संडास होते. संडास होत नसल्यास पोटातून औषध घेण्यापेक्षा गुदद्वारातून उपचार करणे सोयीचे ठरते. एनिमामध्ये पाव लिटर, अर्धा लिटर साबणाचे पाणी रबरी नळीच्या साहाय्याने व्यक्तीच्या गुदद्वारातून आत सोडतात. नंतर मळाचे खडे सुटून संडास होते. विष्ठा गोळा करण्यासाठी भांड्याची सोयसुद्धा असते. आयुर्वेद चिकित्सापद्धतीमध्ये गुदद्वारावाटे औषधी प्रविष्ट करून चिकित्सा केली जाते. हथा चिकित्सेस बस्ती चिकित्सा म्हणतात. मळास बाहेर काढणे याशिवाय इतर अनेक व्याधींची चिकित्सा, औषधी काढे व तेल गुदद्वारावाटे देऊन केली जाते. एनिमाचा वापर वारंवार करण्यापेक्षा आहारात योग्य ते बदल घडवून आणणेच आरोग्यपूर्ण जीवनाच्या दृष्टीने चांगले.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिले आज || धृ ||भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद || १ ||प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखाशी || २ ||तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोंगे खरे माप || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मेहनतीचे फळ जेव्हा मिळते तेव्हा जगण्याचा खरा अर्थ कळत असतो. कारण मेहनत करताना आपला स्वाभिमान आणि सत्यता आपल्यात कायम असतो आणि यामुळेच समाधान तर मिळतोच सोबतच कोणासमोर मान खाली घालून राहण्याची आपल्यावर वेळ येत नाही म्हणून जे काही मिळवायचे असेल ते आपल्या मेहनतीने, स्वाभिमानाने मिळवावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*माणुसकी*इसाप हा एक गुलाम होता, पण आपल्या विद्वत्तेच्या जोरावर त्याने समाजात अत्युच्च स्थान निर्माण केले होते, ज्या धनाढ्याने इसापला विकत घेतले होते त्याचे नाव होते क्झेनथस, इसाप आपल्या आचरणातून क्झेनथसला सतत शिकवण देत असे.ज्या काळी रोममध्ये सार्वजनिक स्नानगृहे असत, सज्जन लोक सार्वजनिक स्नानगृहात जाऊन आंघोळ करत असत. एकदा क्झेनथसने इसापला स्नानगृहात गर्दी आहे की रिकामे आहे हे पाहून येण्यास सांगितले. इसापने जाऊन पाहिले तर तेथे बरेच लोक आंघोळीसाठी जमा झाले होते. तेवढयात त्याचे लक्ष स्नानगृहाच्या दारासमोर पडलेल्या एका मोठ्या दगडाकडे गेले. अनेक लोक त्या दगडाला अडखळून पडत होते, दगड रस्त्यात कसा म्हणून शिव्या देत होते. तेवढ्यात एक माणूस आला तोही त्या दगडाला अडखळून पडला, त्यानेही शिवी हासडली पण तो दगड त्याने उचलून दूर फेकला आणि मगच तो स्नानगृहात गेला.हे सर्व पाहून इसाप घरी गेला व मालकाला सांगितले की, स्नानगृहात फक्त एकच माणूस आंघोळीसाठी आला आहे. आंघोळीच्या पूर्ण तयारीनिशी क्झेनथस स्नानगृहात पोहोचला आणि पाहतो तर काय, तेथे तर प्रचंड गर्दी आहे. क्झेनथसने इसापला विचारले तू तर म्हणाला इथे फक्त एक माणूस आहे पण इथे तर प्रचंड गर्दी दिसते. इसाप उत्तरला,'' इथे रस्त्यात एक दगड पडला होता, येथे येणारा प्रत्येकजण दगडाला अडखळून पडत होता, शिव्या देत होता पण दगड उचलून टाकण्याचे शहाणपण फक्त एकानेच दाखविले. त्यामुळे फक्त एकच माणूस असल्याचे मी आपणास सांगितले.'' क्झेनथस निरूत्तर झाला.तात्पर्य - फक्त जीवंत असणे ही ओळख नसून जीवनाचा सदुपयोगच तुम्हाला स्वतंत्र ओळख देऊ शकते. आपल्या जीवनाचा इतरांनाही उपयोग व्हावा हेच खरे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 जुलै 2025💠 वार - मंगळवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16qqX9M8vD/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 189 वा दिवस 🔹 महत्वाच्या घटना :-• १४९७ – वास्को-द-गामा आपल्या पहिल्या भारतवारीसाठी पोर्तुगालमधून निघाला.• १८८९ – वॉल स्ट्रीट जर्नल या प्रसिद्ध आर्थिक वृत्तपत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.• १९६९ – भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपण केंद्र श्रीहरिकोटा येथे उभारण्यात आले.• २०११ – अमेरिकेच्या 'स्पेस शटल' कार्यक्रमाचा अंतिम (१३५ वा) उड्डाण 'अॅटलांटिस' द्वारे करण्यात आला.🔹 जन्म :-• १६२१ – जाँ द ला फाँतेन, प्रसिद्ध फ्रेंच कथालेखक.• १८३६ – जोसेफ चेंबरलेन, ब्रिटिश राजकारणी.• १९१८ – क्रेग स्टीन, अमेरिकन पदार्थवैज्ञानिक.• १९५८ – केविन बेकॉन, हॉलीवूड अभिनेता.• १९७२ – सौरव गांगुली, भारतीय क्रिकेटपटू व माजी कर्णधार.🔹 मृत्यू :-• १८२२ – पर्सी बिश शेली, इंग्रजी कवी.• १९९७ – चेतन आनंद, प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक.🔹 विशेष दिन :-• व्हिडिओ गेम डे••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सरकारी शाळेच्या व्यथेची कथा*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नागपूर व अमरावती जिल्ह्यातील वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधाचीकामे गतीने करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *तिरुपती येथे भाविकांना दररोज दोन वेळा वडा मिळणार मोफत, तिरुमला तिरुपती देवस्थानम TTD चा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, नागपूरसह इतर 24 जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *यंदाच्या आषाढी वारीने मोडले सर्व विक्रम, पंढरीत 27 ते 28 लाख भाविकांची गर्दी, AI च्या सहाय्याने केली मोजणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अकोला - मनपाच्या ३१ शाळा लवकरच होणार डिजिटल ! शाळांसाठी ४ कोटींचा निधी मंजूर; डिजिटल बोर्ड, स्मार्ट बोर्ड सुविधा मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 लघु पाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के क्षमतेने भरले असून, त्यातूनही पाण्याचा विसर्ग होत आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संजोग गुप्ता यांची नियुक्ती, ICC अध्यक्ष जय शहा यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मल्लेश भुमन्ना बियानवाड, धर्माबाद 👤 आनंदराव नारायणराव सूर्यवंशी 👤 अहमद मुजावर 👤 अनिल बेद्रे 👤 सुरेश तायडे👤 अशोक पवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 20*अशी कोणती गोष्ट आहे, जी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते, परंतु एका ठिकाणावरून हलत नाही ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - मीठ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्या पासून वेगळे सौंदर्य असू शकत नाही. सत्य हेच सौंदर्य, पण सर्व सौंदर्य सत्य स्वरूप असते असे मात्र नाही. - महात्मा गांधी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) इंग्लंडमध्ये सध्या सुरू असलेल्या भारत व इंग्लंड कसोटी मालिकेसाठी कोणाचे नाव देण्यात आले आहे ?२) देशाचे पहिले अंध आयर्न मॅन कोण होते ?३) कोकण रेल्वे कोणत्या चार राज्यातून जाते ?४) 'बसगाड्या थांबण्याची जागा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'हवा' कोणत्या प्रकारचे द्रव्य आहे ? *उत्तरे :-* १) अँडरसन - तेंडूलकर करंडक क्रिकेट मालिका २) निकेत श्रीनिवास दलाल ३) महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ ४) बस-स्थानक ५) मिश्रण*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💉 *रक्त केव्हा गोठतं ?* 💉जेव्हा जेव्हा एखादी रक्तवाहिनी तुटते तेव्हा तेव्हा तिच्यातला रक्त बाहेर वाहू लागतं. रक्तस्राव सुरू होतो. हे अपघातापोटी घडतं किंवा शस्त्रक्रिया करताना जाणून बुजून केलेलं असतं. असा रक्तस्त्राव अनिर्बंधरित्या होऊ देणं शरीरात परवडणारं नाही. त्यामुळे शल्यविशारद चिमटा लावून लगेच त्या रक्तवाहिन्यांची उघडी तोंड बंद करतात, रक्तस्रावाला अटकाव करतात. पण अपघातांमुळे जखम होते तेव्हा काय होतं ? तेव्हा निसर्गच मदतीला धावतो. अश्या रक्तस्रावाचा बंद बंदोबस्त करणारी शरीरातली निसर्गदत्त प्रणाली कामाला लागते.रक्तामध्ये असलेल्या प्लेटलेट्स या नावांना ओळखल्या जाणाऱ्या इटुकल्या पेशींची या रक्त गोठण्याच्या क्रियेत कळीची भूमिका असते. त्या तुटलेल्या रक्तवाहिनीच्या तोंडाजवळ तातडीनं धावून जातात. त्याच वेळी एका रासायनिक प्रक्रियेनं या पेशींच्या बाह्य आवरणात बदल होऊन त्या चिकट होतात. रक्तवाहिनीच्या आतल्या भागाला त्या चिकटुन बसतात. तसंच एकमेकींशी चिकटून एक गुठळी बनवतात. पण ही गुठळी स्थिर करण्यासाठी फायब्रिन या प्रथिनाचं एक जाळंही तयार होतं. रक्तातल्या द्रव पदार्थात असलेलं प्रोथ्राॅम्बिन नावाचं प्रथिन कामाला लागतं. त्याच्या पासुन थाॅम्बिन नावाचं प्रथिन तयार होतं आणि त्याच्यापासुन पायरी पायरीनं फायब्रीन या धाग्यासारख्या प्रथिनाची निर्मिती होते.या सगळ्यात क्लाॅटिन्ग फॅक्टर्स या नावानं ओळखल्या जाणार्या नऊ घटकांचीही महत्वाची भुमिका असते. हे नऊ घटक एका विशिष्ट क्रमानं काही जीव रासायनिक प्रक्रिया घडवुन अाणतात. पहिल्या घटकानं कार्यान्वित केलेली प्रक्रिया पार पडेपर्यंत दुसर्या पायरीवरची प्रक्रिया सुरूच होऊ शकत नाही. तिच्याशिवाय तिसरी नाही. अशा आखुन दिलेल्या क्रमानंच या प्रक्रिया पार पडतात. त्यातली सर्वात शेवटची प्रक्रिया पार पडल्याशिवाय रक्ताची गूठळी तयार होत नाही. यापैकी कोणत्याही पायरीवरची घटना व्यवस्थित पार पडली नाही तर त्यांची साखळी तुटते आणि रक्त गोठत नाही. रक्तगळीचा म्हणजेच हिमोफेलियाचा विकार झालेल्या व्यक्तिंच्या शरीरात आठव्या क्रमांकाचा घटक तयारच होत नाही. तो तयार करण्याचा आराखडा ज्या जनुकाजवळ असतो ते जनुकच त्यांच्या शरीरातुन बेपत्ता असतं. त्यामुळे मग जराशी जखम झाली तरी त्यांचं रक्त जे वाहायला लागतं ते थांबतच नाही. आता कृत्रिमरित्या हा आठवा घटक तयार करण्याची पद्धती विकसित झालेली असल्यामुळे तो बाजारात मिळू शकतो. त्याच्या मदतीने या विकाराने ग्रस्त झालेल्या व्यक्तींना दिलासा देता येतो.आवश्यकता नसताना रक्त गोठणे हेही शरीराला घातक असतं. त्यासाठी यकृतातून हेपॅरीन नावाच्या रसायनाचा पाझर होत असतो. ते रक्ताची गुठळी न होता त्याचा प्रवाह व्यवस्थित होत राहील याची दक्षता घेतं. पण ज्यावेळी जखम होते त्यावेळी रक्तप्रवाहातून वाहणारं थ्राॅम्बोकायनेज हे विकर हॅपेरीनच्या कामात तात्पूरती बाधा आणून रक्त गोठवायला मदत करतं.*बाळ फोंडके यांचा 'केव्हा ?' या पुस्तकातून*👆🏼*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझा माझा करे वैराकर देवा | दुःखाचे डोंगर दाखविसी || १ ||बळे बांधोनिया देशी काळाहाती | ऐसे काय चित्ती आले तुझ्या || २ ||आम्ही देवा तुझी केली होती आशा | बरवे ऋषिकेश काळो आले || ३ ||नामा म्हणे देवा करा माझी कीव | नाही तरी जीव माझा घ्याव्या || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याची वाट लावून आनंद घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. जोपर्यंत अंगात ताकद आणि हातात पैसे, धनसंपत्ती भरभरून असते तो पर्यंत ह्या सर्वच गोष्टी करायला ही जास्त वेळ लागत नाही. पण, जेव्हा ह्या सर्वच व्यर्थ गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात तेव्हा मात्र मुखातून एक शब्द सुद्धा बाहेर पडत नाही. कारण असा एक कोणीतरी असते तो दिसत नाही मात्र योग्य वेळ आल्यावर त्याची चालते त्यावेळी कितीही शक्तीशाली माणूस असेल तरी त्याच्यासमोर कोणाचे चालत नाही. म्हणून कोणाची वाट लावून आनंद घेण्यात किंवा समाधान मानण्यात सुंदर असे आयुष्य गमावू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कोंबडी आणि कोल्हा*एक कोल्हा एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येईना. खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.’ याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असता कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, ‘खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून माझ्यानं खाली येववत नाही. तरी आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील.’तात्पर्य – वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसर्याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 जुलै 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15s2mLnVD7/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 188 वा दिवस 🔹 महत्त्वाच्या घटना:• १९२८ – स्लाईस ब्रेड (स्लीस करून विकली जाणारी ब्रेड) प्रथमच विक्रीस आली. ही घटना "The best thing since sliced bread" या प्रसिद्ध वाक्याशी संबंधित आहे.• १९८३ – भारताने INS Virat या विमानवाहू नौकेची खरेदी केली.• २००५ – लंडनमध्ये चार आत्मघातकी बाँबस्फोट झाले, ज्यात ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.🎂 जन्मदिवस / जन्म:• १८६५ – डॉ. अन्बेसेन्ट – भारतात होऊन गेलेल्या प्रसिद्ध थिऑसॉफिस्ट, शिक्षणतज्ज्ञ व महिला हक्कांच्या समर्थक.• १९०१ – व्ही. बी. कांबळे – दलित चळवळीतील एक विचारवंत व नेते.• १९५२ – महेंद्र कपूर – प्रसिद्ध पार्श्वगायक. (तारीख कधी कधी ९ जानेवारीही नमूद केली जाते.)• १९८५ – रवींद्र जडेजा – भारतीय क्रिकेटपटू.⚰️ मृत्यू:• १९९९ – कॅ. विक्रम बत्रा – कारगिल युद्धातील शहीद वीर योद्धा, परमवीर चक्र सन्मानित.• २००१ – सत्यजित राय – प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक (जन्म: १९२१) – काही संदर्भांत तारीख वेगळी असते.🗓️ अन्य दिनविशेष:🌹 जागतिक चॉकलेट दिन ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गरिबांसाठी शिक्षण झाले महाग*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सपत्नीक महापूजा; राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *येत्या 8 आणि 9 जुलै रोजी, अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी हजारो शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यासाठी एकत्र येतील*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! PM किसान योजनेचा 20 वा हप्ता 18 जुलै रोजी जमा होण्याची शक्यता !*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दलाई लामा यांच्या 90 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सार्वजनिक वाहनामध्ये बसाविणार पॅनिक बटन, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एका आठवड्यात पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी होणार जाहीर - डॉ. महेश पालकर अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला 336 रणने हरवून मालिका 1-1 बरोबरीत आकाशदीपचे सहा बळी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* ● दत्ताहारी पाटील कदम बेलगुजरीकर, भाजपा तालुका उपाध्यक्ष, धर्माबाद● प्रज्ञा घोडके, साहित्यिक● रमेश चांडके, हैद्राबाद● ऋषीकेश देशमुख, साहित्यिक● सय्यद युनूस, मा. मुख्याध्यापक, उर्दू हायस्कुल● संदीप डोंगरे● महेश जोशी, पत्रकार, धर्माबाद ● श्रीकांत माने● प्रकाश गोरठकर● विजय पाटील रातोळीकर● माधव कांबळे● आशिद लाव्हाळे● ज्वालासिंह घायाळे● दिगंबर पांचाळ● हरी ओम राठोड● व्यंकट ताटेवाड● लक्ष्मण कांबळे● पिराजी कटकमवार● हणमंत जाधव● जगन्नाथ पुलकंठवार● बालासाहेब पेंडलोड● साईनाथ वाघळे● गजानन काठेवाडे, PSI, बरबडा ● साईनाथ हामंद, शिक्षक, धर्माबाद ● शंकर रामलू बलीकोंडावार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 19*पाण्यातून होतो माझा जन्म आणि पाण्यातच जातो मी मरून,जेवणाशी आहे माझं जवळच नातं. ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - कोळसा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ताठ उभे रहा, ताठ बसा आणि आपल्या एकूण एक कामात व्यवस्थित आणि निर्मळ रहा. ही सर्व कामे तुमच्या आंतरिक स्थितीचे निदर्शक होऊ द्या. - महात्मा गांधी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नऊ रंगाचा असलेला पक्षी कोणता ?२) एका कसोटीत द्विशतक आणि शतक झळकविणारे भारतीय फलंदाज कोण ?३) पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे ?४) 'विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) कोकण रेल्वे कोणत्या साली सुरू झाली ? *उत्तरे :-* १) भारतीय पिट्टा, नवरंग, Indian Pitta २) सुनील गावस्कर, शुभमन गील ३) H2O ४) पाणपोई ५) सन १९९८*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *रिएन्फोर्समेंट* 📙छपरावर टाकलेला पत्रा पन्हाळीचा का असतो ? स्कूटरच्या पत्र्याला विविध गोलांवर आतून जोड का दिला जातो ? ट्रकचा व मोटारचा पुढचा बंपर इंग्रज सी आकाराचाच का बनवतात ? घराच्या कॉलम व तुळ्यांमध्ये सिमेंट काँक्रिटमध्ये सळ्या का घालतात ? पोलादी गर्डरचा आकार इंग्रजी I प्रमाणे का असतो ?या सर्वाचे उत्तर एकच आहे. ताण सहन करण्यासाठी कमकुवत जागी विशेष आधार म्हणजेच रिएन्फोर्समेंट (reinforcement) द्यायला या गोष्टी केलेल्या असतात. घरावरचा पत्रा सरळ असता, तर त्यावर कोणी पाय दिला तर तो त्या जागी वाकला असता. पन्हाळीच्या आकाराने तो वाकू शकत नाही. तीच गोष्ट स्कूटरच्या पत्र्याची. अन्यथा साधी जोरात बुट्टी मारली, तरी त्याला कोच आला असता. बंपरचा आकार इंग्रजी सीप्रमाणे केल्याने कितीही जोरात धडक बसली तरी तो वाकू शकत नाही. 'आय'चा आकार असलेला पोलादी गर्डर तर कित्येक टनांचे वजन लीलया पेलू शकतो.काँक्रिटच्या बाबतीत जरा वेगळी परिस्थिती आहे. सिमेंट काँक्रीटचा ठोकळा केवळ वरून दाब दिला, तर कित्येक टनांचा दाब सहन करतो. पण समजा, काँक्रिटचा लांबुळका ठोकळा दोन बाजूंनी पकडून ओढायला सुरुवात केली; तर तो तडे जाऊन तुटायला वेळ लागत नाही. याउलट लोखंडाचे आहे. लोखंडावर प्रचंड दाब दिल्यास त्याचा आकार कदाचित बदलेल, पण लोखंड, सळई प्रचंड ताण सहन करू शकते. मग या दोन गोष्टी एकत्र केल्या तर ?नेमके तेच बांधकामशास्त्रात रिइन्फोर्स्ड काँक्रिट बनवून तयार केले आहे. सर्व प्रकारचा दाब काँक्रिट सहन करते, तर सर्व प्रकारचा ताण आतील लोखंडी सळ्या सहन करतात. कितीही उंच बांधकाम असो किंवा कितीही लांब अंतराची काँक्रिटची तुळई असो; रिएन्फोर्सड काँक्रिट वापरले असले की, चिंता करायचे कारणच राहत नाही.निसर्गातसुद्धा हे रिइन्फोर्समेंटचे तत्त्व कित्येक ठिकाणी अमलात आलेले दिसते. फक्त त्यादृष्टीने बघायची नजर मात्र पाहिजे. शंख बघा किंवा शिंपला; जिथे वक्राकृती आकार येतो, तिथे आतील बाजूने बारीक जाड रेषांनी रिइन्फोर्समेंट दिलेली असते.उंच वाढणारे मोठ्या बुंध्याचे कोणतेही झाड बघा, त्याच्या जमिनीपासून दोन तीन फूट उंचीचा बुंधा हा उलट्यासुलट्या दिशेने पन्हाळीप्रमाणे आकार घेऊन मगच जमिनीत शिरलेला दिसतो. म्हणजेच वाऱ्याचा ताण सहन करण्यासाठी या पन्हाळीमुळे बुंध्याला पूर्ण ताकद मिळत जाते.याच रिएन्फोर्समेंटच्या तत्त्वानुसार भरीव लोखंडी कांबीपेक्षा पोकळ लोखंडी कांब वजनाने हलकी असून जास्त ताकदवान असते, हे तुम्ही अनेकदा वाचले असेलच.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इंद्रायणी कांठी देवाची आळंदी | लागली समाधी ज्ञानेशाची || धृ ||ज्ञानियांची राजा भोगतो राणीव | नाचती वैष्णव मांगे पुढे || १ ||मागे पुढे दाते ज्ञानाचा उजेड | अंगणात झाड कैवल्याचे || २ ||उजेडी राहिले उजेड होऊन | निवृत्ती सोपान मुक्ताबाई || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगल्या विषयावर चिंतन व मनन करावे. चिंतन व मनन केल्याने विचारशक्तीला चालना मिळते.यामुळे आपले काहीच नुकसान होत नाही उलट चांगले विचार करण्याची आपल्याला सवय लागत असते आणि त्याच सवयीमुळे आपल्यात परिवर्तन सुद्धा तेवढेच होत असते. आणि नवीन दिशा सुद्धा सापडत असते. त्यामुळे आपलाच विकास होत नाही तर त्यामुळे इतरांना ही त्यातून प्रेरणा मिळत असते.म्हणून ह्या प्रकारची सवय लावावी जेणेकरून आपली लक्ष इकडे, तिकडे जाणार नाही. आणि आपला अनमोल वेळ ही वाया जाणार नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरुनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरुनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेवून आला. गुरुनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झरयातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये."तात्पर्य - भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्वच्छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहावे•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 जुलै 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Dy99TXq32/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 186 वा दिवस 🗓️ महत्त्वाच्या घटना :-• १६८७ – औरंगजेबाच्या हुकुमावरून मराठ्यांची सिद्दी जौहरविरुद्ध किल्ले पन्हाळगड येथील लढाई सुरू झाली.• १८११ – वेनेझुएला स्पेनपासून स्वतंत्र झाले.• १९४६ – फ्रान्समध्ये 'बिकिनी' या पोशाखाची पहिली झलक पॅरिसमध्ये प्रदर्शित झाली.• १९९४ – भारत सरकारने भारतातील खासगी रेडिओ स्टेशनसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला.👶 जन्मदिवस :-• १८२० – विलियम जॉन मॅकेनजी – स्कॉटिश गणितज्ञ• १९२७ – श्रीराम लागू – प्रख्यात मराठी नाट्य व चित्रपट अभिनेते• १९५१ – रामनाथ कोविंद – भारताचे १४वे राष्ट्रपती• १९७५ – अमर उपाध्याय – हिंदी टीव्ही व चित्रपट अभिनेता⚰️ मृत्यू :-• १९६९ – वसंत कानेटकर – मराठी नाटककार, लेखक• २०२० – आनंद शिंदे – मराठी गायक, अभंग गायक🌍 विशेष दिन :-• राष्ट्रीय शिक्षक दिवस (झेक प्रजासत्ताक)• राष्ट्रीय संस्कृती दिवस (अल्जेरिया)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*परिपाठच्या माध्यमातून संस्कार*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्पेनच्या विमानतळावर उत्साहात स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ड्युरंड कप 2025 स्पर्धेच्या चषकाचे केलं अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शालार्थ आय डी तातडीने देण्याचा प्रस्ताव विचारधीन मंत्री पंकज भोयर यांनी अधिवेशनात दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *वीस दिवस आधीच भंडारदरा धरणातून विसर्ग, 15 दिवसांत पाणी जायकवाडीकडे झेपावणार, जिल्हा प्रशासनाकडून प्रवराकाठी सतर्कतेचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पंढरपुरात वारकऱ्यांसाठी विशेष आरोग्य व्यवस्था, 120 रुग्णवाहिकांद्वारे 8643 भाविकांना 24 तास आरोग्यसेवा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मालवाहतूक व्यवसायिकांचे राज्यव्यापी आंदोलन, जेएनपीटीत 100 टक्के तर पुणे जिल्ह्यात 75 टक्के व्यावसायिकांचा सहभाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड सर्वबाद 407 धावा, मोहम्मद सिराजने घेतले सहा विकेट, हैरी ब्रुक व जेमी स्मिथचे शतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष कांबळे, सहशिक्षक महाराष्ट्र विद्यालय, निलंगा, लातूर👤 गजानन बुद्रुक, हिंगोली 👤 गिरीश कहाळेकर, नांदेड 👤 नरेश शिलारवार, धर्माबाद 👤 मारोती कदम, साहित्यिक, नांदेड 👤 नागनाथ भत्ते, विशेष शिक्षक, धर्माबाद 👤 गणपत बडूरकर, माध्यमिक शिक्षक, धर्माबाद 👤 संतोष शेळके, साहित्यिक, कर्जत 👤 बालकिशन कौलासकर, धर्माबाद 👤 डॉ. मनोज तानूरकर, हस्ताक्षर तज्ञ👤 रमेश आबूलकोडं, LIC प्रतिनिधी 👤 सुदर्शन जावळे पाटील 👤 सुधाकर चिलकेवार, शिक्षक, धर्माबाद 👤 अशोक पाटील, देगलूर 👤 विजय प्रकाश पाटील गाडीवान 👤 मोतीराम तोटलोड, धर्माबाद👤 अजय चव्हाण *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 18*खरेदी करताना काळा, जाळल्यावर लाल, फेकल्यावर पांढरा, ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - चुंबक ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोती होऊन सोन्याच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागविणे अधिक चांगले असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) "जानी हम तुम्हे मारेंगे और जरूर मारेंगे लेकिन तब, जब बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा" हा प्रसिद्ध डायलॉग कोणत्या चित्रपटातील आहे ?२) भारताची गुप्तहेर संस्था 'रॉ' च्या प्रमुख पदी कोणाची नियुक्ती झाली ?३) विम्बल्डन स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे ?४) 'फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) अणूच्या केंद्रकात कोणते कण असतात ? *उत्तरे :-* १) सौदागर ( १९९१ ) २) पराग जैन ३) टेनिस ४) सदावर्त, अन्नछत्र ५) प्रोटॉन आणि न्यूट्रॉन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦅 *पक्षी केव्हा स्थलांतर करतात ?* 🦅*************************रोटी, कपडा और मकान या मनुष्यप्राण्याच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. यातला कपडा ही केवळ मनुष्यप्राण्याचीच गरज आहे. पण रोटी व मकान यांच्या गरजा मात्र प्राणिसृष्टीच्या प्रत्येक सदस्याला भासतात. त्यामुळे त्यांची जिथे चांगली सोय होईल तिथेच जास्तीत जास्त वास्तव्य करण्याकडे प्रत्येक प्राण्याचा कल असतो. तो प्रदेश हा त्या प्राण्याचा नैसर्गिक अधिवास बनतो. त्या क्षेत्रात त्याला मुबलक अन्न मिळतं, पाण्याची सोय होते, राहण्याची गुहा मिळतात किंवा घरटी बांधता येतात. आपलं पुनरूत्पादन करून पुढची पिढी जन्माला घालण्यासाठी सर्व प्रकारे योग्य वातावरण लाभतं. आपला कळप वाढवता येतो. पक्षी हे प्राणीसृष्टीचाच अविभाज्य भाग असल्यामुळे त्यांनाही हे लागू पडतं. परंतु या अधिवासातील पर्यावरण सतत तसंच राहत नाही. ऋतुमानानुसार त्यात फरक पडत जातो. तापमान बदलतं. पावसाचं प्रमाण कमी जास्त होतं. फळांचाही हंगाम असतो. तो ओसरला की तीही मिळेनाशी होतात. किडामुंगीही या बदलत्या पर्यावरणाला अनुसरुन आपल्या बिळात गडप होण्याची धडपड करतात. अन्नाची चणचण भासू लागते. तापमानही सुसह्य राहत नाही. अशा परिस्थितीला तोंड देत तगून राहण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. अशा वेळी ते स्थलांतर करतात. तरीही या स्थलांतरासाठी इतर काही घटना घडण्याची आवश्यकता भासते. पर्यावरण प्रतिकूल होत चाललं की पक्ष्यांच्या शरीरात काही विशिष्ट संप्रेरकांचा स्त्राव होऊ लागतो. तो त्यांना उडत जात दूरचा पल्ला गाठण्यासाठी आवश्यक ती प्रेरणा आणि ताकद देतो. तसंच हा दूरचा पल्ला गाठण्यासाठी शरीरही बळकट करावं लागतं. दीर्घ काळपर्यंत उडत राहण्यासाठी स्नायूंना बळकटी यावी लागते. त्यासाठी जेव्हा अन्न मुबलक प्रमाणात मिळत असतं तेव्हा ते खाउन शरीर लठ्ठ करावं लागतं. चरबीचा साठा करावा लागतो. तो पर्याप्त झाल्याशिवाय स्थलांतर करता येत नाही. बहुतांश पक्षी स्थलांतर करताना सहा ते आठ हजार मीटर उंचीवरुन उडत राहणं पसंत करतात. कारण त्या उंचीवरचं घसरलेलं तापमान सतत उडत राहण्यामुळं शरीरात जी उष्णता निर्माण होते तिचा निचरा करण्यासाठी उपयोगी पडतं. तसंच पक्षी एकेकटे कधीच स्थलांतर करत नाहीत. त्यांचा कळपच्या कळप या प्रवासावर निघतो. काही पक्षी तर हजारो किलोमीटर दूरवरच्या तात्पुरत्या अधिवासाच्या प्रदेशात स्थलांतर करतात. तो आपल्या विणीच्या हंगामासाठीही उपयुक्त आहे याची खातरजमा त्यांनी करून घेतलेली असते. त्याचा शोध त्यांनी पूर्वीच घेतलेला असतो व तिथं जाण्याची वाटही त्यांच्या आठवणीत साठवून ठेवलेली असते. त्यामुळं नेहमीच्या नैसर्गिक अधिवासातली परिस्थिती प्रतिकूल बनली, शरीरातल्या चरबीचं प्रमाण पुरेसं वाढलं, अंगात संप्रेरकांचा पाझर पर्याप्त झाला आणि सगळ्या कळपाची तयारी झाली की पक्षी स्थलांतर करतात.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••येग येग विठाबाई, माझे पंढरीचे आई || धृ ||भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा || १ ||इतुक्यासाहित त्यां बा यावे, माझे रंगणी नाचावे || २ ||माझा रंग तुझे गुणी, म्हणे नामयाची जनी || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपली ओळख कितीही मोठ्या माणसांशी जरी असेल तरी ती ओळख आणि आपल्या कार्याची किंमत आपली आर्थिक परिस्थिती किंवा आपले आरोग्य चांगले राहते तोपर्यंतच असते. जेव्हा आपले आरोग्य आणि आर्थिक स्थिती हळूहळू कमी व्हायला लागते तेव्हा, कितीही जवळचे लोक का असेनात क्षणात अनोळखी होऊन जातात. म्हणून ह्या सर्व व्यर्थ गोष्टींच्या भ्रमात किंवा गर्वाच्या भोवऱ्यात पडून कोणाचा अपमान करू नये. वेळ आल्यावर गरीबाच्याच घरी प्यायला पाणी मिळते आणि तिथेच आपले कितीही ओळखीचे जरी लोक असतील तरी आपल्याला कमी लेखतात असे अनेक चित्र याच समाजात बघायला मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अहंकारी राजाला धडा*एक अहंकारी राजा होता. त्याला आपल्या ऐश्वर्याचा आणि राज्याचा गर्व होता. तसेच आपली शक्ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्याला गर्व चढायचा. आपल्यासमोर तो इतरांना तुच्छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. या कारणांमुळे लोक त्याच्यावर नाराज असायचे. त्याच राज्यात एका विद्वान पंडीताने त्याला वठणीवर आणण्याचे ठरविले. एके दिवशी तो पंडीत राजाच्या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला. राजाने उद्दामपणे प्रतिनमस्कारही केला नाही उलट त्याने पंडीताला गर्वाने विचारले,’’बोला पंडीत महाराज, तुम्हाला काय मदत पाहिजे. काय मागायचे असेल ते मागून घ्या, दान पाहिजे असेल तर दान घ्या किंवा धन पाहिजे, सोनेनाणे, जमीन, धान्य जे काही मागायचे ते तुम्ही माझ्याकडून मागून घ्या’’ पंडीतजीने राजाकडे एकवार पाहिले व तो मोठमोठ्याने हसू लागला. राजाला व दरबारातील लोकांना पंडीताच्या हसण्याचे कारण काही कळेना, हसण्याचा भर ओसरल्यावर पंडीत म्हणाला,’’राजन, तुम्ही मला काय दान देणार कारण तुमच्याकडे मला देण्यासारखे काहीच नाही.’’ पंडीताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला, राजाचे सैनिक पंडीताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडीताला पुढे काही बोलण्याची इच्छा आहे काय असे विचारले. त्यावर पंडीतजी म्हणाले,’’ महाराज, जरा थंड डोक्याने विचार करा, तुमचा जन्मच मुळी तुमच्या इच्छेने झाला नाही, मग रूप, सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्हाला कोठून मिळाले असते. आईवडीलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही जन्माला आलात. तुमचे धान्यभांडार हे धरतीमातेचे देणे आहे. तिने पिकवून तिच्या लेकरांसाठी अन्न पुरविले म्हणून तुम्ही ते सांभाळत आहात आणि खजिन्याचे म्हणाल तर धन हे करातून आलेले म्हणजेच प्रजेचे देणे आहे, राज्य हे तुम्हाला वाडवडीलांकडून मिळालेले वरदान आहे राहता राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्वराची कृपा आहे हे सगळेच जर तुम्हाला दुस-याने दिलेले असेल तर तुम्ही मला काय म्हणून देणार आणि दिलेल्या गोष्टीचा काय म्हणून गर्व बाळगणार.’’ एवढे बोलून पंडीताने राजदरबार सोडला व राजाने त्यादिवसापासून गर्व पण सोडून दिला.तात्पर्यः- जे आपले नाही त्यावर गर्व बाळगणे व्यर्थपणाचे आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 जुलै 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15cCQLzepG/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 185 वा दिवस 🔹 महत्त्वाच्या घटना:• १७७६ – अमेरिकेने ब्रिटिश सत्तेविरुद्ध स्वातंत्र्य जाहीर केले. हा दिवस "अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन" म्हणून साजरा केला जातो.• १९७५ – पोर्तुगालने केप व्हर्डे या देशाला स्वातंत्र्य दिले.• २००५ – नासाच्या Deep Impact यानाने टेम्पेल-१ धूमकेतूपर्यंत पोहोचून त्यावर संशोधनासाठी यंत्र पाठवले.🎂 जन्म:• १८०७ – ज्यूसेपे गारिबाल्दी, इटालियन क्रांतीकारक.• १९०१ – विल्यम स्टीनबर्ग, जर्मन-अमेरिकन संगीत संचालक.• १९२७ – गिना लोब्रीजिदा, इटालियन अभिनेत्री.• १९५९ – काल्विन फिश, ब्रिटिश रेसिंग ड्रायव्हर व समालोचक.🕯️ मृत्यू:•|१९३४ – मेरी क्युरी, नोबेल पुरस्कार विजेत्या भौतिकशास्त्रज्ञ व रसायनशास्त्रज्ञ.• १९६९ – अल्फ्रेड क्रेन्स, नोबेल पुरस्कार विजेते जर्मन लेखक.• २००३ – बेरी वाईट, प्रसिद्ध अमेरिकन गायक.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आईचं पत्र हरवलं*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी ठोस प्रयत्न होणार - शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाना येथील एनक्रूमा मेमोरीयल पार्कला दिली भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *थॅलेसेमिया रुग्णांसाठी महत्त्वाचा निर्णय, एचपीएलसी चाचणी सक्तीची करण्यासाठी नवी नियमावली येणार; विवाहपूर्व चाचणीचाही विचार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गोसेखुर्द धरणाची नऊ दारे उघडली:, भंडारा जिल्ह्यात संततधार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एक वृक्ष आईच्या नावे, हिंगोलीत अखिल भारतीय अग्रवाल महासभेचा उपक्रम, १ हजार वृक्षलागवडीचा केला संकल्प*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भेट संतबंधूंची, आभाळ आले भरून, संत ज्ञानेश्वर माऊली व संतश्रेष्ठ सोपान काका महाराजांच्या पालखीची भेट, भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार शुभमन गिलचे धडाकेबाज द्विशतक, 21 चौकार, 2 षटकारांसह 311 चेंडूत 200 धावा, भारत सर्वबाद 587*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कवी गोविंद कवळे, नांदेड 👤 प्रभाकर शेळके👤 श्याम उपरे 👤 बंडोपंत लोखंडे, पदवीधर शिक्षक, नांदेड 👤 बंडू आंबटकर, सामाजिक कार्यकर्ता, चांदुर 👤 कमलाकर जमदाडे, पत्रकार, बिलोली 👤 श्रीपाद वसंतराव जोशी, धर्माबाद👤 वृषाली सानप काळे, साहित्यिक, मुंबई 👤 राजकुमार बिरादार 👤 गणेश मंडाळे👤 बालाजी मंडलेकर 👤 परमेश्वर मेहेत्रे 👤 अविनाश खोकले 👤 प्रदीप यादव *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 17*लोखंडाला सुद्धा मी खेचू शकतो, पण रबरासमोर मी हरतो,ओळखा पाहू मी कोण ....?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - बसचा वाहक / कंडक्टर••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानाची भूक ही माणसाची मूलभूत गरज आहे, ती माणसास पशु कोटीतून वर काढते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय क्रिकेटर विराट कोहली यांच्या गुरुचे नाव काय ?२) रशियातील माउंट एल्ब्रस जिंकणारा जगातील सर्वात लहान गिर्यारोहक कोण बनला आहे ?३) महाराष्ट्राचे भाजपा प्रदेशाध्यक्ष पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली ?४) 'प्रेरणा देणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) कोणते उपकरण दाब मोजण्यासाठी वापरला जाते ? *उत्तरे :-* १) राजकुमार शर्मा २) तेगबीर सिंग, पंजाब ( ६ वर्षे ९ महिने ) ३) रवींद्र चव्हाण ४) प्रेरक ५) बॅरोमीटर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦖 *डायनासोरचा विनाश केव्हा झाला ?* 🦖 ************************** पृथ्वीचं पर्यावरण सतत बदलत असतं. निसर्गाचा तो नियमच आहे. सजीवसृष्टीवर या बदलांचा प्रभाव पडतच असतो. त्यामुळे या बदलांशी मिळतंजुळतं घेत तगून राहण्याची क्षमता या सजीवांच्या प्रजातींमध्ये असते त्यांची वाढ होते, विकास होतो. ती प्रजाती तगडी होते. नैसर्गिक साधनसंपत्तीचा जास्त वापर तिच्याकडून होतो. सहाजिकच तुलनेने दुबळ्या असणाऱ्या प्रजातींची हळूहळू पिछेहाट होत कालांतराने ती प्रजाती नष्ट पावते. आजवर अशा अनेक प्रजातींचा उदय झाला, विकास झाला, काही काळ या पृथ्वीतलावर नांदल्या आणि हळूहळू विनाश पावल्या. आपण ज्या मनुष्यजातीत मोडतो त्या होमो सपायन्स या प्रजातीचा उदय होण्यापूर्वीही होमो इरेक्ट्स, निआनडर्थल वगैरे मानवासारख्या प्रजाती या भूमितलावर नांदत होत्या. पण त्या होमो सपायन्सइतक्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या बाबतीत तगड्या नसल्यामुळे विनाश पावल्या. निरनिराळ्या प्रजातींची उत्क्रांती करण्याचे असे प्रयोग निसर्गाकडून नेहमीच होत आले आहेत. त्यातले जे यशस्वी झाले त्या प्रजाती आज आपल्याला सभोवार दिसतात. जे प्रयोग अयशस्वी झाले त्या प्रजाती आता नष्ट झाल्या आहेत. डायनोसॉर ही अशीच एक प्रजाती होती. तिचा उदय निसर्ग नियमांनुसार झाला. तब्बल साडेसोळा कोटी वर्ष ती प्रजाती या भूमितलावर नांदली. त्या वेळेची ती सर्वात प्रबळ प्रजाती होती. पण कालांतराने तिचा विनाश झाला तो मात्र उत्क्रांतीच्या नियमानुसार झाला नव्हता. एका विलक्षण अपघातापोटी ती दुर्घटना झाली. अवकाशातून एक अजस्त्र लघुग्रह पृथ्वीवर येऊन आदळला. आज जिथे मेक्सिको आहे साधारण त्या प्रदेशात हा अाघात झाला. तो आघात इतका भयानक होता की तो लघुग्रह पृथ्वीचं कवच फोडून तिच्या पोटात घुसला. त्यातून मोठ्या प्रमाणावर धूळ, कचरा आकाशात फेकला गेला, आगी लागल्या, ज्वालामुखींचे उद्रेक झाले, त्सुनामी आली, प्रचंड वादळं झाली, तीव्र अाम्लवर्षा कोसळली. पृथ्वीच्या पर्यावरणात उलथापालथ होत सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल यांचं प्रमाण वाढलं. स्फोटासारख्या त्या आघातामुळे उष्णतेची लाट पसरली. तिच्या मार्यात सापडलेले सजीव वाचू शकले नाहीत. त्याचबरोबर आकाशात पसरलेल्या धुळीच्या आवरणामुळे सूर्यप्रकाश अडवला गेला. पृथ्वीवरचं सरासरी तापमान घसरलं. वनस्पतींना वाढीसाठी सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज असल्यामुळे त्यांचा विनाश होत गेला. पर्यावरणातल्या या अचानक आलेल्या बदलांशी मिळतेजुळते घेण्यासाठी आवश्यक तितका वेळही मिळाला नाही. त्यामुळे त्यात तगून राहण्याची क्षमता असलेले सजीवही नष्ट होत गेले. या अस्मानीसुलतानीपुढे डायनासाॅरसारख्या तगड्या प्रजातीचा टिकाव लागला नाही. ही घटना धरतीच्या इतिहासातील क्रेटेशियस कालखंडाच्या अखेरीस आणि टर्शरी कालखंडाच्या आरंभाच्या सुमारास म्हणजे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झाली.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*👆🏼*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ये हंसावरती बसून शारदे मायुरावरती बसून || धृ ||नेसून शुभ्र पातळ | गळा घालून मुक्ताफळकटी कंबरपट्टा कसून | शारदे मायुरावरती || १ ||हाती घेवूनीया वीणा | करी मंजुळ गयानाये सभेमध्ये बसून शारदे मायुरावरती || २ ||तुका म्हणे ब्रम्हानंदिनी | मम हृदयी विराजुनीदे अंतजीत बसून शारदे मायुरावरती || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• आपण कोणाचाही सल्ला न घेता मेहनतीने सर्व काही मिळविलेले असते. हे सर्व बघून, स्वतःहून कोणी आपल्याला तू असं कर, तसं कर मी म्हणतो त्या प्रमाणे वाग असे जर कोणी लाडीगोडी लावून म्हणत असतील तर आधी त्या माणसाला वाचायला शिकले पाहिजे. या प्रकारचे बोलणे तेव्हाच येते जेव्हा, आपला मार्ग सत्याच्या वाटेवर असतो. एकदा माणूस या प्रकारच्या बोलण्यात आला की, एवढ्या वर्षांची केलेली तपस्या, प्रामाणिकपणा, मेहनत, संघर्ष आणि स्वाभिमान नष्ट होण्याची शक्यता असते. म्हणून कोणावर विश्वास ठेवण्याआधी स्वतः वर विश्वास ठेवून पुढे पाऊल टाकावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*घुबड आणि टोळ*एक म्हातारे घुबड झाडाच्या ढोलीत झोपले असता एका टोळाने झाडाखाली गाणे म्हणायला सुरुवात केली. त्याने गाणे म्हणू नये म्हणून घुबडाने त्याला विनंती केली, बाबा रे, तू येथून जा, मला विनाकारण त्रास देऊ नकोस. तुझ्या किरकीरीने माझी झोप मोडते.' यावर तो टोळ त्या घुबडाचा धिक्कार करून त्याला शिव्या देऊ लागला. तो म्हणाला, 'तू लबाड, चोर आहेस, रात्रीचा बाहेर जाऊन चोरी करून पोट भरतोस नि दिवसा झाडाच्या ढोलीत लपून बसतोस.' त्यावर घुबड म्हणाले, 'अरे तू आता आपलं तोंड सांभाळ, नाहीतर मग पस्तावशील.' तरीही टोळ ऐकून घेईना. घुबडाची निंदा करून तो पुन्हा गाऊ लागला, मग घुबडाने त्याची खोटी स्तुती करायला सुरुवात केली, 'बाबा रे, क्षमा कर. तुझं गायन अगदी गोड आहे. माझ्या इतका वेळ ते लक्षात आलं नाही. तुझ्यासारखा गाणारा तूच. तुझ्या गाण्यापुढे कोकीळाही लाजेल. तुझा स्वर सारंगीपेक्षा चांगला आहे. बरी आठवण झाली. माझ्याकडे एक अमृताची कुपी आहे. त्यातले थोडेसं मी तुला देतो. फार वेळ गात राहिल्याने तुझा गळा अगदी सुकून गेला असेल नाही का ?' टोळाला खरोखरच तहान लागली होती, तो घुबडाजवळचे अमृत घेण्यासाठी त्याच्याजवळ गेला. लगेच घुबडाने त्याला उचलून आपल्या तोंडात टाकले.तात्पर्य - आपल्याला जे आवडते ते सर्वांनाच आवडेल असे नाही, हे लक्षात घेऊन दुसर्याच्या आवडीनिवडीचा जे विचार करीत नाहीत ते शेवटी आपला नाश करून घेतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 जुलै 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1EJbRMpxqa/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 184 वा दिवस 🗓️ महत्त्वाच्या घटना :• १९०८ – युनायटेड स्टेट्समध्ये सॉफ्ट ड्रिंक "फ्रूट फ्लेवर पेय कोका कोला" प्रथम विक्रीस आले.• १९७९ – भारताने INS Viraat हे विमानवाहू युद्धनौकेचे बांधकाम सुरू केले.• १९८७ – कनिष्ठ वयाच्या वायूसेनेच्या पायलटचा पहिला उड्डाण दिवस.👤 जन्म :• १८८३ – फ्रांझ काफ्का, झेक लेखक, ‘द ट्रायल’, ‘द मेटामॉर्फोसिस’ या विख्यात कादंबऱ्यांचे लेखक.• १९०४ – सदानंद बखरे, प्रसिद्ध मराठी लेखक व नाटककार.• १९३८ – गुलजारीलाल नंदा, भारताचे हंगामी पंतप्रधान.⚰️ मृत्यू : • १९६९ – ब्रायन जोन्स, प्रसिद्ध ब्रिटिश गिटारिस्ट आणि The Rolling Stones बँडचे संस्थापक सदस्य.• २०२० – सर्वानंद सिंह, माजी भारतीय नेमबाज व राष्ट्रकुल पदक विजेता.📌 जागतिक विशेष दिन :• जागतिक प्लास्टिक बॅग मुक्त दिन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बदललेल्या सरकारी शाळा*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात पावसाचा जोर वाढणार, 24 तासांत कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस तर मराठवाड्यात यलो अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुण्यात आदिवासी साहित्य संमेलन, डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली 7 जुलैला होणार आठवे उलगुलान वेध साहित्य संमेलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *झाड तोडल्यास 50 हजारांच्या दंडाचा निर्णय मागे, सुधीर मुनगंटीवार आणि गणेश नाईकांमध्ये सभागृहात जुंपली, माजी वनमंत्री सरकारवर भडकले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोविडनंतर अचानक होणाऱ्या मृत्यूंवर अभ्यास, ICMR चा दावा- लसीशी याचा संबंध नाही, 18-45 वर्षे वयोगटातील लोकांवर संशोधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गडचिरोलीत स्टील हब होणार, जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक विधानसभेत मंजूर; 1000 कोटींची गुंतवणूक येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपुरात शालेय वारकरी दिंडी, १५०० विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत होणार सहभागी, शनिवारी सकाळी ९ वाजता प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवस अखेर भारत 310/5, कर्णधार शुभमन गिलचे शतक तर यशस्वी जैस्वाल 87 धावावर बाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विजय लक्ष्मण लंके 👤 संतोष नलबलवार, शिक्षक, परभणी 👤 लक्ष्मीकांत गिरोड 👤 साहेबराव कांबळे 👤 सविता सावंत👤 दिगंबर माने 👤 बालाजी मुंडलोड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 16*मी वेडा नाही तरीही कागद फाडतो, मी पोलिस नाही तरीही खाकी घालतो, मंदिरात नाही तरीही घंटा वाजवतो, सांगा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - कांदा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जे कार्य तडीस न्यायचे असते ते चिकाटीने केले तर त्यात नक्कीच यश मिळते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशातील पहिले डिजिटल शहर कोणते बनले आहे ?२) आयसीसीच्या तीन स्पर्धा जिंकणारा जगातील एकमेव कर्णधार कोण ?३) यूएस ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले ?४) 'पूर्वी कधी घडले नाही असे' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'डेंग्यू' या रोगाचे वाहक कोण आहे ? *उत्तरे :-* १) इंदूर, मध्यप्रदेश २) महेंद्रसिंग धोनी, भारत ३) आयुष शेट्टी, भारत ४) अभूतपूर्व ५) डास*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌧 *पाऊस केव्हा पडतो ?* 🌧 ************************पाऊस आपल्याला हवाहवासाही वाटतो आणि नकोनकोसाही वाटतो. वैशाख वणव्यापायी धरती सुकून गेलेली असली, पावसाविना डोळ्यांना पाणी येऊ लागलं की आपण 'येरे येरे पावसा' अशी त्याची आळवणी करतो. आणि तोच पाऊस रुद्रावतार धारण करत आला की नको नको रे पावसा, असा धिंगाणा म्हणून त्याला दटावतोही. जगाच्या पाठीवर आपल्या उपखंडांसारखे इतरही काही प्रदेश आहेत की जिथलं सारं जीवनचक्र, सारं अर्थकारण पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलं तरी तो वर्षभरातून तीन चार महिनेच आपली हजेरी लावून जातो. उलट काही प्रदेशांत वर्षभर त्याची उपस्थिती असते. त्यामुळं पाऊस केव्हा पडणार आहे, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं असतं.धरतीवर असलेलं एकूण पाणी कायम असतं. त्यात वाढही होत नाही की घटही होत नाही. पण त्याचं सतत अवस्थांतर सुरू असतं. समुद्र तसंच नद्या नाले यांच्यामधलं पाणी प्रदूषित झालेलं असतं. सूर्याच्या उष्णतेनं त्याची वाफ होते. तापलेल्या पाण्याच्या जवळ असलेली हवाही तापते. तापलेली हवा आणि वाफ हलकी असल्यामुळे ती आकाशात वरवर जाते. वर गेल्यावर तिथलं तापमान थंड असतं. त्यामुळे त्या वाफेचं पाण्याच्या छोट्या छोट्या थेंबामध्ये अवस्थांतर होतं. हे थेंब हवेत तरंगत राहतात. वाफ आणि हे जलबिंदू मिळून ढग तयार होतात. वाऱ्याने हे ढग इकडेतिकडे फिरत राहतात. त्यांना थंड हवा लागली की त्यातल्या आणखी वाफेचे जलबिंदूंमध्ये अवस्थांतर होते. हे जलबिंदूही वेडेवाकडे फिरत असतात. एकमेकांवर आपटतात. त्यातले काही एकत्र येऊन त्यांचं आकारमान वाढतं. असे ते मोठे आणि जड झाले की तरंगू शकत नाहीत. जमिनीच्या दिशेने झेपावतात. वारे त्यातल्या काही बिंदूंना परत वरच्या दिशेने ढगांमध्ये ढकलतात. ही चढाओढ चालू राहत ते जलबिंदू आणखी मोठे होतात. आता ते हवेत तरंगू शकत नाहीत. जमिनीकडे खेचले जातात. पाऊस पडतो. हे पावसाचं पाणी शुद्ध झालेलं असतं. त्यातले प्रदूषण नाहीसे झालेले असतात. परत एकदा शुद्ध आणि गोड्या पाण्याचे साठे पूर्ववत होतात. असं हे जलचक्र अव्याहत चालूच असतं.उत्तर गोलार्धात विषुववृत्ताच्या जवळपास असणारा प्रदेश जास्त तापमानाचा असतो. जसजसं अधिकाधिक उत्तरेला जावं तसतसं तापमान घसरत जातं. त्यामुळे दक्षिणेकडून उबदार हवेचे झोत उत्तरेकडे आणि उत्तरेकडून थंड हवेचे झोत दक्षिणेकडे प्रवास करत असतात. त्यांच्या तापमानांमध्ये लक्षणीय फरक असल्यामुळे जिथं ते दोन एकमेकांना भिडतात तिथं ते एकमेकांमध्ये मिसळू शकत नाहीत. त्यांच्या सीमेवर फ्रंटल सिस्टम तयार होते. पुढे पुढे सरकत राहते. गरम हवा हलकी असल्यामुळे तिला पुढे पुढे येऊ पाहणाऱ्या थंड हवेच्या झोतावर चढावं लागतं. तसं झालं की ती थंड होते. तिच्यातल्या वाफेचं पाण्यात अवस्थांतर होऊन पाऊस पडतो.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?" या पुस्तकातून*👆🏼*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उस डोंगा परी रस नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || १ ||कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || २ ||नदी डोंगी परी जल नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || ३ ||चोख डोंगी परी भाव नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती दुसऱ्यांच्या विषयी नको त्या शब्दात बोलत असेल किंवा सांगत असेल तर त्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास करू नये. आज ती व्यक्ती दुसऱ्या बद्दल बोलते कदाचित परवा आपल्या विषयी सुद्धा बिनधास्तपणे बोलू शकते.ज्याच्या डोक्यात चौफेर धावणारे नकारात्मकपणाचे किडे असतात ते दुसऱ्यांचे कधीच चांगले करू शकत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *" सत्याचा विजय "*एकदा एका गावात अर्जुन नावाचा एक छोटा मुलगा राहत होता. तो खूप हुशार, पण थोडा खोडकर होता. एक दिवस शाळेत खेळताना त्याच्या हातून शाळेच्या खिडकीची काच तुटली. सारे मुले घाबरली. शिक्षकांनी विचारले, "काच कोणी फोडली ?"सर्व मुले शांत होती, पण अर्जुनचे मन चुळबुळ करत होते. त्याला वाटत होते, "सांगितले तर शिक्षा मिळेल, पण खोटं बोलणं चुकीचं आहे." शेवटी त्याने धीर करून शिक्षकांसमोर उभा राहून म्हणाला, "सर, ती काच माझ्या हातून चुकून फुटली."शिक्षकांनी थोडा वेळ त्याच्याकडे बघितलं, आणि म्हणाले, "अर्जुन, तू चूक केलीस, पण सत्य बोलून तू मोठं धाडस केलंस. आम्ही तुझ्या प्रामाणिकपणाचं कौतुक करतो." शिक्षकांनी त्याला शिक्षा न देता सर्वांसमोर शाबासकी दिली. तेव्हापासून अर्जुन इतर मुलांसाठी आदर्श ठरला. त्याला एक मोठा धडा मिळाला, सत्य बोलणं हेच खरं धैर्य आहे.तात्पर्य :सत्य आणि प्रामाणिकपणा हेच खरे संस्कार आहेत. चूक झाली तरी तिची कबुली देणं हेच मोठेपणाचं लक्षण आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 जुलै 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Z2YQw5YVx/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📜 महत्वाच्या घटना -• १८९७ – गुघर फोर्टच्या लढाईत रणगडावर वीर बाजीप्रभु देशपांडे यांनी घातकी वाट अडवून शौर्य गाजवले.• इ.स. १९०० - जर्मनीच्या फ्रीडरिक्सहाफेन गावाजवळ झेपलिनचे पहिले उड्डाण• १९३७ – अमेरिकन वैमानिक अमेलिया एअरहार्ट विमानासह बेपत्ता.• १९७२ – भारत सरकारने बँका राष्ट्रीयीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६ बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.• इ.स. १९७६ - व्हियेतनाम युद्धाच्या १ वर्षानंतर उत्तर व्हियेतनाम व दक्षिण व्हियेतनामचे पुन्हा एकत्रीकरण.🌹 जन्म :• १८८० - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.• १९०८ – थोर बंगाली वैज्ञानिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सत्येंद्रनाथ बोस (Bose-Einstein statistics प्रसिद्ध).• १९५२ – विष्णुवर्धन, प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेता.• १९८६ – लिंडसे लोहान, अमेरिकन अभिनेत्री व गायक.🌹 मृत्यू :• १९२८ - नंदकिशोर बल, उडिया कवी, कादंबरीकार.• १९९६ - राज कुमार, हिंदी अभिनेता.• १९९७ – जेम्स स्टुवर्ट, प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता.• २०१५ – मनोज कुमार पांडे, कारगिल युद्धातील परमवीर चक्र विजेते शहीद.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पालकांचे मुख्यध्यापकास पत्र*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुढील 4 ते 5 दिवस राज्यात पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारतीय जनता पार्टीने रवींद्र चव्हाण यांना दिली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, यमुनोत्री धाममध्ये रस्ते खचले, महाराष्ट्राच्या 200 भाविकांसह 600 जण अडकले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पावसाळी अधिवेशन - विधानसभा अध्यक्षांचा राजदंड उचलण्याचा प्रयत्न केल्याने, काँग्रेस नेते नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अहिल्यानगर : शिक्षकांनी आता अधिक समृद्ध होण्याची गरज, शिक्षणाधिकारी पाटील यांचे मत, नवोदय परीक्षा पूर्वतयारीबाबत तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पंढरपूर वारीदरम्यान मृत्यू झाल्यास वारकऱ्याला 4 लाखांची आर्थिक मदत; शासनाचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून सुरु होणार दुसरा कसोटी सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पंडित दगडगावे, शिक्षक, धर्माबाद 👤 शिवानंद चौगुले, पुणे 👤 वसंत घोगरे पाटील 👤 जेजेराव सोनकांबळे👤 मारोती जाधव 👤 गोपाल पामसकर 👤 श्रीनिवास पुल्लावार 👤 शैलेश तरले👤 सतिश अवधूतवार 👤 विक्रांत दलाल, नांदेड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 15*नेहमीच असतो मी तुमच्या घरी, तरी काहींनाच मी आवडतो, एकावर एक कपडे मी घालतो, तरीही डोळ्यात पाणी तुमच्या येते, सांगा पाहू मी आहे तरी कोण …?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - मेणबत्ती / पेन्सिल ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या विद्येमध्ये स्वतंत्रपणे वस्तुनिष्ठ विचार करण्याची दृष्टी आहे कर्तव्यशक्ती आहे ती विद्या विज्ञानातून मिळते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय हवामान विभाग हवामानाशी संबंधित इशाऱ्यांसाठी कोणत्या चार रंगाच्या कोडचा वापर करतात ?२) समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू कोणता ?३) मलेरिया तपासणीसाठी कोणती रक्त चाचणी केली जाते ?४) 'पुरामुळे ज्याचे नुकसान झाले असे लोक' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) देशातील पहिली महिला तबलजी कोण आहे ? *उत्तरे :-* १) रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन २) सामाजिक कल्याण साधणे ( चीन, रशिया ) ३) R.D.T. ४) पूरग्रस्त ५) अनुराधा पाल*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लोकसंख्या* 📙साऱ्या जगाच्या पाठीवर लोकसंख्यावाढीचे भूत आरूढ झालेले आहे. अनेक भेडसावणारे प्रश्न त्यातून उभे राहिले आहेत व ते वाढतच जाणार आहेत. भल्याभल्यांची मती यामुळे कुंठित झाली आहे. भारताची प्रगती खूप झाली, अन्नधान्य उत्पादन वाढले, कारखानदारी वाढली; पण हे सर्व आज महाप्रचंड लोकसंख्येने कुठेतरी पार गिळुन टाकले आहे.पन्नास वर्षात भारताची लोकसंख्या तिप्पट वाढली. दर हजारी मृत्यूचे प्रमाण घटत गेले, साथीचे आजार आटोक्यात आले, बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले व बाळंतपणात मृत्यू ओढवून अकाली निधनाचे प्रमाण स्त्रियांत अल्प राहिले. याउलट जन्मप्रमाण मात्र तेवढेच राहिल्याने अत्यंत झपाट्याने लोकसंख्या वाढत गेली आहे. लोकसंख्यावाढीमध्ये आणखी एक घटक महत्त्वाचा ठरतो. प्रजननक्षम जोडप्यांची संख्या वाढते, तसे वाढीचे प्रमाण वाढत जाते.लोकसंख्यावाढीचा प्रमुख सिद्धांत माल्थस यांनी मांडला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने वाढत असते. यामुळेच अनेक शतके स्थायी असलेली लोकसंख्या १७५० साली जगभर वाढू लागली. या वाढीवर आरोग्यादायी सेवांचा अनुकूल परिणाम झाल्याने आज ७०० कोटींचा आकडा जगाने पार केला आहेच. लोकसंख्येच्या बाबतीत जगाचे उत्तर व दक्षिण असे उघडउघड मतभेद झालेले आढळतात. उत्तरेकडचे सर्व देश हे सध्या स्थिर लोकसंख्या असलेले बरेचसे प्रगत व प्रजननक्षम जोडप्यांना 'शिक्षित' करण्यात यशस्वी झालेले आढळतात. अन्न, वस्त्र, निवारा यांची सोय असल्याशिवाय घरात मूल जन्माला येऊ न देणे हे त्यांनी पटवून घेतले आहे.याउलट जन्माला येणारे मूल जगेल, मोठे होईल याची दक्षिणेकडील अप्रगत, आर्थिकद्रुष्ट्या मागास देशांना खात्री नसते. श्रमाची किंमतच त्यांना माहित असल्याने अधिक मुले म्हणजे श्रम करण्यासाठी अधिक हात, याच समीकरणाचा गोंधळ त्यांच्या डोक्यातून निघत नाही. दक्षिण अमेरिका, आफ्रिका, दक्षिण आशिया व मध्य आशिया हा साराच भाग दक्षिणेचा म्हणून मोडतो.लोकसंख्या मोजणे हा एक शास्त्रीय भाग आहे. जनगणना वा सेन्सस दर दहा वर्षांनी केली जाण्याची गेल्या शतकातील पद्धत आहे. शक्यतोवर एकाच दिवशी साऱ्या देशातली पाहणी व मोजणी करून मग त्याची आकडेवारी एकत्र केले जाते. जनगणनेची पद्धत अमेरिकेत प्रथम १७९० साली वापरली गेली; पण जनगणनेचा वापर व उपयोग शास्त्रोक्तदृष्ट्या होतो, अशा नोंदी प्राचीन चिनी उल्लेखातसुद्धा आढळतात.२०१८ च्या जनगणनेनुसार भारताची सध्याची लोकसंख्या अंदाजे १.३५ अब्ज इतकी आहे. दर हजारी पुरुषसंख्येमागे स्त्रियांचे प्रमाण फक्त ९३३ आहे. प्रजननक्षम जोडप्यांचा जननदर म्हणजेच फर्टिलिटी रेट २.७ इतका आहे. तो २.१ पर्यंत खाली आणण्याचे आपल्याला प्रयत्न करायचे आहेत म्हणजे लोकसंख्यावाढीवर आपण नियंत्रण आणू शकू. एक वर्षाच्या आत होणारे बालमृत्यू इन्फंट मॉरटॅलिटी या नावाने ओळखले जातात. त्यांचा आकडा दर हजारी ३०.१५ इतका मोठा आहे. गरोदरपणातून व बाळंतपणाच्या संदर्भातील आजारातून होणाऱ्या मातांच्या मृत्यूचे प्रमाणही एक लाखामागे ४४० आहे. तसेच स्त्रियांमधील साक्षरता आजही बहुतांश राज्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी आढळते. या साऱ्या आकड्यांना अपवाद फक्त केरळ या राज्याचा. भारतातील वृद्धांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ७ टक्के भरते. २० वर्षांखालील व्यक्तींची सध्या संख्या सुमारे ४८ टक्के आहे. यामुळेच सर्वात जास्त तरुण असलेले मोठे राष्ट्र म्हणून आपण २०३० साली मिरवू शकू.लोकसंख्या स्थिर असणे व कमी होणे हा प्रकार जगातील सर्व प्रगत देशात गेली २५ वर्षे घडत आहे. याचे विश्लेषण मात्र अनेक पद्धतीने केले जाते. युरोपमधून अमेरिकेत व जगभर युरोपियन सतत जात राहिले, अन्यथा युरोपमध्ये संख्याविस्फोट झाला असता, असेही काही तज्ज्ञ म्हणतात. यासाठी ते अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व भारतातील ब्रिटिश वसाहती यांची एकत्रित आकडेवारी मांडतात. नॉर्वे, स्वीडन, जर्मनी, स्वित्झर्लंड यांची लोकसंख्या कमी होत आहे. एक गोष्ट निश्चित आहे की, भारतातच काय पण जगातही लोकसंख्या सतत वाढत गेली, तर तिला पुरेसे अन्न पुरवणे व गरजा भागवणे हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही कठीणच आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नमन माझे गुरुराया |महाराजा दत्तात्रया || धृ ||तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवीची विश्रांती || १ ||माझ्या जीवीचे साकडेकोण निवारील कोडे कोडे || २ ||माझ्या अनुसूया सुतातुका म्हणे पाव आता || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तीनही ऋतूमध्ये थंडी, पाऊस आणि उन्ह जर सारखेच पडत राहिले तर पाहिजे तसं शेतात पीक निघणार नाही. एवढेच नाही तर मानवी जीवनाला व पशुपक्ष्यांना देखील धोका होऊ शकतो म्हणून ते तीनही ऋतू आपापल्या योग्य वेळेत बदलत असतात आणि ते सर्वांना फायदेशीर ठरत असतात. तसंच माणसानी सुद्धा परिस्थिती बघून आपल्यात थोडाफार बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण हे सर्व काही करताना मात्र आपले सकारात्मक विचार व आपला स्वाभिमान कधीच सोडू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*समाधान हेच सुख*एक श्रीमंत सावकार होते , अलोट संपत्ती होती , पुढील सातपिढ्या जरी बसून खाल्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती मिळवली होती, तरी पण हा श्रीमंत सुखी नव्हता . मनात काहीतरी विवंचना होती त्यामुळे रात्रभर झोप यायची नाही त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता.त्याने प्रत्येकाला विचारावे मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेन आणि मला सुखाची झोप लागेल ! त्याला कोणीतरी सांगितले तू संताना शरण जा म्हणजे संतचं यातून तुला सोडवतील .श्रीमंत संतांच्या शोधार्थ निघाला वाटेत एका झाडाखाली एक साधु महाराज बसले होते त्याना नमस्कार करून श्रीमंत म्हणाला महाराज मला काहीही कमी नाही पुढील सात पिढ्या बसुन खातील एवढं मिळवलं आहे तरी मी सुखी नाही, एक विवंचना मला झोप येवु देत नाही त्यामुळे मी सुखी नाही.साधु महाराज म्हणाले आधि विवंचना काय आहे ते सांग म्हणजे त्यातून कसे सुटायचे ते सांगतो , श्रीमंत म्हणाला महाराज तसं म्हणाल तर मला काहीही विवंचना नाही पण एकच विवंना आहे आणि ती म्हणजे माझ्या आठव्या पिढीचे काय होईल ? कारण सात पिढ्याचे कमवून ठेवले आहे चिंता आहे ती आठव्या पिढिची !साधु महाराज हसले आणि म्हणाले काळजी करु नकोस मी तुला यातून सोडवतो .साधुनि त्याला एक किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितले की त्या डोंगरावर एक म्हातारी एका झोपडीत राहते तिला हे तांदूळ देवून ये म्हणजे मी तुला तुझ्या विवंचनेतून मुक्त करतो .तांदूळ घेऊन श्रीमंत म्हातारीच्या झोपडीत आला ज्या झोपडीला दार सुद्धा नव्हते. ती भगवंताच्या भजनात दंग होती, तिची भावसमाधी लागली होती, श्रीमंताच्या पायाच्या आवाजाने आजीची भावसमाधी भंग पावली , तिने वर बघितले आणि म्हणाली का आलास बाबा ईथे ? तो म्हणाला म्हातारे तुला तांदूळ द्यायला आलो आहे हे घे मग मी जातो . ती म्हणाली कारे तुला मागीतले होते का ? तुझ्या समोर हात पसरला होता का ? नाही ना ? मग का आणलेस तांदूळ ? ही पिशवी उचल आणि चालायला लाग तो म्हणाला मला त्या झाडाखाली बसलेल्या साधुने पाठवले आहे म्हणून मी आलोय, ती म्हणाली त्या साधुला जाऊन सांग की अजून दोन दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत आहेत .श्रीमंताने आपली अक्कल चालवली तो म्हणाला म्हातारे तिसर्या दिवसाला होतील राहू दे.ती म्हणाली माझ्या तिसऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधुलाही नको त्याला सांग माझ्या तिसर्या दिवसाच्या तांदळाची चिंता मी ज्याच्यावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जन स्थळी भजन करत बसलेय त्याला आहे.हे ऐकून श्रीमंत पिशवी घेऊन परत आला आणि साधु समोर पिशवी ठेवून निघाला. साधुने त्याला हाक मारली अरे ! विवंचना घेऊन आला होतास ना ? मी तुला त्यातुन सोडवणार आहे. श्रीमंत खाली मान घालून म्हणाला महाराज मला उत्तर मिळाले तिसऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे तेवढा मी महामूर्ख दुःखी आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)