जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

    *🌺जीवन विचार*🌺
〰〰〰〰〰〰〰 📚
शिकलेला समाजच देशाची सुधारणा करु शकतो. *देशाची शिकलेली , सुसंस्कृत ,स्वच्छ , सदाचारी, प्रामाणिक , शिष्टाचारी आणि शिस्तप्रिय लोक किती आहेत यावरुनच देशाची किंमत ठरत असते.*
 ' देशासाठी जगावं ' हा शिक्षणाचा महत्त्वाचा विचार आहे.म्हणूनच शिक्षणातून शीलसंपन्न आणि सामर्थ्यसंपन्न माणसं निर्माण करण्याच काम शिक्षणाचं असतं.
📚📚

    *तीन गुरू प्रमाणे माझी तीन उपास्थ दैवतही आहेत.*

📚माझे पहिले उपास्थ दैवत *विद्या.*
 विद्येशिवाय काही होऊ शकत नाही.
अन्नाप्रमाणेच माणसाला ज्ञानाची जरूरी आहे . खरा प्रेमी ज्या उत्कंठेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो ,तशा उत्कटतेने माझे पुस्तकांवर📚 प्रेम आहे .
 शत्रूलाही कबुल करणे भाग पडेल असे ज्ञान तुम्ही संपादिले पाहिजे.

  📚 माझे दुसरे उपास्थ दैवत *विनयशीलता* हे आहे. *विनय म्हणजे लीनता ,लाचारी नव्हे.*

माणसाने स्वाभिमानाने जगले पाहिजे  असे मला वाटते . *चरितार्थासाठी कोणावर अवलंबून राहण्याची कल्पना मला कधीच सहन झाली नाही.*
मी माझ्या बुध्दीप्रमाणे चालतो. 🙏 परमेश्वराला काय वाटेल याचा मी कधी विचार केलेला नाही.

📚 *शीलसंवर्धन* हे मी माझे तिसरे उपास्थ दैवत समजतो.

  📚📖- *डाॅ. बाबासाहेब आंबेडकर* 📚🖊
==================
*'सत्य आणि न्याय याहून कुठलाही धर्म मोठा नाही.'*
📚  📙  📖  📚  📝
*〰〰〰〰〰〰〰*
🙏🏼 *शब्दांकन/संकलन* 🙏🏼

🖊

No comments:

Post a Comment