✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 एप्रिल 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://summerknowledgepark.blogspot.com/2023/04/03-ahmadnagar.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🏵️ *_जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन_* 🏵️•••••••••••••••••••••••••••••••••••• 🏵️ *_ या वर्षातील ११६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🏵️ *_महत्त्वाच्या घटना:_* 🏵️•••••••••••••••••••••••••••••••••••• *२००५: आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे सीरीयाने लेबाननमधुन सैन्य काढुन घेतले.**१९९५: आशियाई विभागीय बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वूमन मास्टर किताब मिळवला.हा किताब मिळवणारी निशा ही सर्वात लहान खेळाडू ठरली.**१९८९: बांगलादेशमधे एका भयंकर चक्रीवादळाने माजवलेल्या हाहा:कारात सुमारे १,३०० लोक ठार,१२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले**१९८६: रशियातील चेर्नोबिल येथील अणूभट्टीत भीषण स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात फेकले गेले. हा (तोपर्यंतचा) सर्वात मोठा आण्विक अपघात होता. यानंतरचा मोठा अपघात जपानमधील फुकुशिमा दाई इची अणूभट्टीत २०११ मध्ये आलेल्या त्सुनामीनंतर झाला.**१९७३: अजित नाथ रे यांनी भारताचे १४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला**१९६४: टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश उदयास आला.**१९६२: रेंजर-४ हे नासाचे यान चंद्रावर कोसळले**१९५६: मध्य प्रदेशातील नेपानगर कागद कारखान्याचे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन**१९३३: नाझी जर्मनीच्या ‘गेस्टापो‘ या गुप्त पोलिसदलाची स्थापना झाली.* 🏵️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🏵️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४: प्रा. डॉ. अरुण ठोके -- लेखक, समीक्षक* *१९७६: नागोराव सा.येवतीकर -- प्रसिद्ध स्तंभलेखक, कवी, शिक्षक**१९७३: श्यामसुंदर मिरजकर -- मराठीतील लेखक, कवी**१९७२: विद्या बयास-ठाकूर -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९६६: किरण नामदेव भिंगारदेवे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९६१: नंदिनी सुधीर थत्ते -- प्रसिद्ध लेखिका**१९५९: भारती बिर्जे-डीग्गीकर -- प्रसिद्ध कवयित्री**१९५३: मौशुमी चटर्जी – प्रसिद्ध अभिनेत्री**१९५२: डॉ. उषा खंदारे -- प्रसिद्ध लेखिका**१९५२: पुरुषोत्तम बेर्डे -- मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ दिग्दर्शक, लेखक**१९५२: प्रा. डॉ हरिश्चंद्र गणपत थोरात --ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक व विचारवंत**१९५१: टी. एन. परदेशी -- प्रसिद्ध कवी, लेखक तथा निवृत्त अभियंता**१९४८: कुमुदिनी श्रीधर फेगडे -- लेखिका* *१९४८: डी. बी. जगत्पुरिया -- प्रख्यात कवी, समीक्षक, वरिष्ठ पत्रकार, वक्ता* *१९४५: सुनंदा सुरेश साठे -- जेष्ठ रंगकर्मी, नाटककार* *१९४४: विद्याधर म्हैसाळकर -- प्रसिध्द लेखक**१९४२: मिनो मुमताज -- भारतीय अभिनेत्री (मृत्यू: २३ ऑक्टोबर २०२१ )**१९४०: प्रा. डॉ. श्रीराम देविदास चौधरी -- लेखक* *१९२७: हरि वामन लिमये ऊर्फ हरिभाऊ लिमये -- भारतीय स्वातंत्र्यचळवळीत योगदान देणारे क्रांतिकारक स्वातंत्र्यसेनानी (मृत्यू: १ जानेवारी २०१७ )**१९०३: सखाराम जगन्नाथ भागवत -- विचारवंत, लेखक (मृत्यू: ८ जानेवारी १९७३ )**१८९७: नितीन बोस - भारतीय चित्रपट दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, पटकथा लेखक (मृत्यू: १४ एप्रिल १९८६ )**१५६४: विल्यम शेक्सपियर -- इंग्रजी नाटककार, कवी आणि अभिनेता(मृत्यू: २३ एप्रिल १६१६ )* 🏵️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: उत्तम बंडू तुपे -- ज्येष्ठ लेखक 'झुलवा'कार (जन्म : १ जानेवारी १९४२ )**१९९९: मनमोहन अधिकारी – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान,कम्युनिस्ट नेते (जन्म: २० जून १९२० )**१९८७: शंकरसिंग रघुवंशी – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार (जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ )**१९७६: चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ ’आरती प्रभू’ – प्रसिद्ध साहित्यिक(जन्म: ८ मार्च १९३० )**१९७५: कृष्णाजी केशव कोल्हटकर --- ग्रंथकार,योग व वेदान्त अभ्यासक(जन्म: १४ जानेवारी १८८३ )**१९२०: श्रीनिवास रामानुजन – प्रसिद्ध थोर भारतीय गणिती (जन्म: २२ डिसेंबर १८८७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळी सुट्टी : ज्ञानाशी गट्टी*समर व्हॅकेशन उपक्रम *आजचा जिल्हा - अहिल्यानगर*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्लीत अटक, 24 वर्ष जुन्या प्रकरणात कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिक्षण विभागाच्या पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्यात उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा सुरु.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *NEET पेपर लीकचा मास्टरमाइंड संजीव मुखियाला अटक:पाटण्यातील एका फ्लॅटमध्ये लपला होता; 3 लाखांचे होते इनाम, 11 महिने फरार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या आदिलच्या कुटुंबाला एकनाथ शिंदेकडून आर्थिक मदत, घर देखील बांधून देणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गेल्या 2 दिवसांपासून केंद्रीय नागरी विमानवाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांतून 183 प्रवासी महाराष्ट्रात परतले*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यात पुढील चार ते पाच दिवसात उष्णतेची लाट अन् पावसाचा अंदाज, विदर्भ-मराठवाड्यात गडगडाटासह पावसाची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चे अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 ना. सा. येवतीकर, संयोजक फ्रेश मॉर्निंग बुलेटिन, स्तंभलेखक 👤 प्रदीप खपाटे बन्नाळीकर 👤 महेश शितोळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 48*शक्तीशाली वेगवान चपळ प्राणी* *बसत नाही कधीच जमिनीवर खाली* *पाळीव सस्तन आहे शाकाहारी* *जात आहे माझी एक काठेवाडी* *सवय आहे मला उभ्यानेच झोपण्याची**स्वारी आहे मी राजे महाराजे सैनिकांची**ओळखा पाहू मी आहे कोण?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - सिंह ~~~~~~~~~~~~~~~विज्ञान कोडेला प्रतिसाद नोंदविणारे वाचक श्रावणी भुसेवार, सौ. कांताबाई बिंगेवार, संगय्या शिवराज होनगुंटे, बालाजी पाटील चिरलीकर, नवीन आरगुलवार, उज्वला इंगळे, प्रथमेश येवतीकर, सुरेश द्रोपतवार, माधव तनमुदले, कवी दत्ताहरी कदम, , सौ. लिना सुपारे, दीपश्री वाणी, श्याम ठाणेदार, लालन्ना गुडलावार, सविता अवतिरक, अनिकेत सायबलू, प्रतिक उकले, सुनिता भुरे, सिद्धार्थ शिरसे मनःपूर्वक अभिनंदन .......!••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वकर्तव्यदक्ष राहिल्याने मनुष्य नेहमी सर्वोच्च आणि पूर्णावस्थेत पोचतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सिंधू जल करार कोणत्या दोन देशात झाला ?२) भारत व पाकिस्तान या देशातील सिंधू जल करार केव्हा झाला ?३) जागतिक मलेरिया दिवस २०२५ ची थीम काय आहे ?४) 'कैदी ठेवण्याची जागा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट या संस्थेनुसार २०२४ साठी 'जगातील टॉप स्मार्ट सिटी' कोणती ? *उत्तरे :-* १) भारत व पाकिस्तान २) सप्टेंबर १९६०, कराची ३) मलेरिया आपल्यासोबत संपतो, पुनर्गुंतवणूक करा, पुनर्कल्पना करा, पुनर्जागृत करा ४) कारागृह, बंदिशाळा, तुरुंग ५) झ्युरिक, स्वित्झर्लंड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पर्वत कसे निर्माण झाले ?* 📙 टेकडी, डोंगर, शिखरे व पर्वत या प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ आहे. सपाटीच्या मधील एखादा उंचवटा म्हणजे टेकडी बनते. वालुकामय प्रदेशात अनेक टेकड्या असतात. खडकाळ प्रदेशातील जास्त उंच भागातही टेकड्या असतात. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जर लाव्हारस एकाच मुखाभोवती साठला गेला तर हळूहळू उंच डोंगर बनू लागतो. क्वचित हा उद्रेक फार मोठा असेल, तर मैलोगणती पसरलेले डोंगरांचे स्वरूप असू शकते; पण शिखरे व पर्वत ही संज्ञा मात्र उंचच्या उंच पसरलेल्या पर्वतराजींनाच सहसा लावली जाते. याखेरीज पठार स्वरूपातही काही वेळा डोंगर आढळतात. ज्यावेळी एखादी भूगर्भीय हालचाल थोड्याच मर्यादेत खालीवर होऊन थांबते, तेव्हा ही अनाकलनीय पठारे तयार होतात. पाचगणीचे टेबललँडचे पठार हे असेच. तिबेटचे पठार याचीच फार मोठी आवृत्ती म्हणावी लागेल.जगातील खऱ्या पर्वतांत मोजक्यांचा समावेश होतो. सर्वात उंच, सर्वात लांबवर पसरलेली, सर्वात जास्त उंच शिखरे असलेली पर्वतराजी म्हणजे हिमालय काराकोरमची. याशिवाय आल्प्स, अँडीज व रॉकी या तीन पर्वतराजी या प्रकारात मोडतात. आंतरखंडीय भूकवचाच्या सरकण्याच्या प्रक्रियेत सरकणारा एक भूखंड (भारत) स्थिर भूखंडावर (आशिया) आदळला. हळूहळू जामीन वर उचलली गेली. त्यातून हिमालय पर्वत निर्माण झाला. अन्य पर्वतही असेच निर्माण झाले आहेत. चारही ठिकाणी ही प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या पर्वतराजींची उंची हळूहळू वाढतच आहे.लाव्हारसाच्या उद्भवातून निर्माण होणारे पर्वत म्हणजे इटलीतील व्हेसुव्हियस, जपानमधील फुजी, हवाईमधील मोनाक्रिआ ही प्रसिद्ध उदाहरणे. मोनाक्रिआबद्दल तर असे म्हणता येईल की, हा पाण्याखाली समुद्राच्या तळाशी सहा हजार मीटर खोल सुरू होतो व पाण्यावर चार हजार दोनशे पाच मीटर उंच आहे. उंची समुद्रसपाटीच्या वर मोजली जाते, अन्यथा याचीच उंची दहा हजार मीटरची भरावी. या प्रकारच्या पर्वतांचे वैशिष्ट्य म्हणजे महाकाय असे एकच शिखर व तेथून दूरवर पसरत गेलेला खडबडीत उतार. या उतारावर काही घळी आढळतात. पण त्या खूपच उथळ असतात.पर्वतांचे वैशिष्टय़ म्हणजे तेथील हवामान. पर्जन्यमान व वनराई. अफाट उंचीमुळे पावसाचे ढग अडतात. मोजक्या भागात खूप पाऊस पडतो. तो वेगाने वाहून जाताना स्वतःबरोबर खडकांचे कण व माती धुपून नेतो. या उलट दुसऱ्या बाजूला म्हणजे वाऱ्यांच्या उलट दिशेला उजाड वातावरण राहते. अल्प पर्जन्यमानाने हा भाग दुष्काळी बनतो. हिमालयामुळे अडणारे मान्सूनचे वारे गंगायमुना खोरे समृद्ध करतात, तर तिबेटचा पश्चिमेचा भाग अल्प पावसाचा, उजाडच ठेवतात. पर्वतांची उंची वाढते, तसे तापमान कमी होत जाते. एक वेळ अशी येते की त्या उंचीला सहसा शून्याच्या आसपास तापमान राहते. मग कायम ही शिखरे बर्फाच्छादित राहू लागतात. मग कितीही उष्ण प्रदेशात असली तरीही ही अवस्था कायम राहते. सहा ते सात हजार मीटरदरम्यान ही बर्फाची रेषा कायम बदलत राहते. यावरचे सर्वच भाग पूर्णतः उजाड असतात. वनस्पती व प्राणीजीवन या उंचीवर राहु शकत नाही.दोन पर्वतांमधील घळींमध्ये मात्र हिरवीगार जंगले, नद्यांचे प्रवाह व त्यांच्या आसपास मानवी वस्ती जगभर आढळते. मुख्यतः गुरे पाळणे, थोडीफार शेती, मेंढीपालन या जोडीला अलीकडच्या काळात वाढत चाललेला पर्यटन व्यवसाय हे या डोंगरखोऱ्यातील मुख्य जीवित साधन. भारतातील उत्तमोत्तम अशी पर्यटन स्थळे हिमालयाच्या कुशीत विसावलेली आहेत. अफाट उंचीवरून दूरवरचा दिसणारा निसर्गरम्य परिसर न्याहाळत मजेत वेळ घालवण्यापेक्षा दुसरा पर्यटनाचा आनंद तो कोणता ?‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अवघे निरंतर करा हा विचार । भवसिंधुपार तरीजे ऐसा ॥१॥अवघे जन्म वांयां गेले विषयसंगें । भुललेति वाउगे माया मोहा ॥२॥अवघा वेळ करितां संसाराचा धंदा । वाचे वसो सदा हरिचें नाम ॥३॥अवघ्या भावीं एका विठ्ठलातें भजा । आर्तें करा पूजा हरिदासांची ॥४॥अवघें सुख तुह्मां होईल आपैतें । न याला मागुते गर्भवासा ॥५॥नामा ह्मणे अवघे अनुभवूनि पाहा । सर्वकाळीं रहा संतसंगे ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या आयुष्यात जे काही आपल्यासोबत चांगले, वाईट घडून गेले आहे ते, कधीच विसरता येत नाही. उलट त्या प्रसंगाची आठवण काढून आपण सांगत असतो.पण, आपल्याच आयुष्यात पुढे काय होणार आहे या विषयी मात्र आपण सांगू शकत नाही हे सुद्धा तेवढेच सत्य आहे. म्हणून जे, काही आपल्यासोबत चांगले, वाईट घडून गेले आहे त्यातूनही शिकण्याचा प्रयत्न करावा. कारण समोर काय होणार आहे या विषयी पूर्णपणे कोणीच सागू शकत नाही म्हणून डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आई-वडिलांचे संस्कार*एका गावामध्ये एक प्रामाणिक मुलगा राहत होता. त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर खूप चांगले संस्कार केले होते.तो त्या संस्कारांना धरून वागत होता .तो एकदा शेजारच्या घरी काहीतरी कमा निमित गेला. घरी कोणी नव्हते फक्त नोकर होता. नोकराने त्याला बसायला सांगितले आणि नोकर भाजी आणण्या साठी गेला . मुलगा तेथेच बसून राहिला. त्याच्या समोर एका टोपलीत सफरचंद ठेवलेले होते.त्याला सफरचंद खूप आवडायचे परंतु त्याने त्याला हात न लावता तो शेजाऱ्यांची वाट पाहात बसला होता .ब-याच वेळाने शेजारी घरी परत आला त्याने पाहिले की मुलगा वाट बघत बसला आहे व त्याच्या शेजारी सफरचंदे असताणही तो त्यांना खात नाही.त्या मुलालाही सफरचंद आवडत हे त्यांना माहीत होते तरी त्याने त्यांना हात लावला नाही.शेजारी आले की त्याने त्यांना नमस्कार केला .शेजाऱ्यांनी त्याला विचारले,”तुला सफरचंद आवडतात ना, मग तरी तू एक ही सफरचंद का खाल्ले नाहीस” मुलगा म्हणाला,” इथेच कोणीच नव्हते, मी एक दोन सफरचंदे जरी खाले असती तरी कुणालाच काही कळले नसते,मला कोणीच पाहत नव्हते पण मी स्वत:ला पाहात होतो.म्हणून मी खले नाही मी स्वत:ला फसवू शकत नाही.शेजाऱ्याला त्याचे बोलणे ऐकून आनंद झाला.तो म्हणाला,”आपला आत्मा आपण काय करतो ते पाहात असतो, आपण आपल्या आत्म्याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला फसवू पण आपण आल्याला खोटे बोलयाचे फार अवघड आहे.तात्पर्य :- लहानपणीच मुलांना खोटे बोलणे अडवल्यास मुले भविष्यात योग्य दिशेने वाटचाल करतात . मुले वाईट वर्तनाची निघाल्यास त्याचा दोष आईवडीलांच्या संस्कारचा दोष येतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment