✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 एप्रिल 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1DSatjcHbz/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌟 *_भारतीय नागरी सेवा दिवस_* 🌟•••••••••••••••••••••••••••••••••••• 🌟 *_ या वर्षातील १११ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌟 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌟•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०००: आई वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला.**१९९७: भारताचे १२ वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल (वय ७८ वर्षे) यांनी सूत्रे हाती घेतली.गुजराल हे वयाने ज्येष्ठ असलेले दुसर्या क्रमांकाचे पंतप्रधान या आधी मोरारजी देसाई यांनी ८१ व्या वर्षी पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतली होती.**१९९०: 'विभूती' या लढाऊ बोटीचे उद्घाटन**१९७२: ’अपोलो १६’ या अमेरिकन अंतराळयानातुन गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्युक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले.* 🌟 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌟••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: शशांक कुलकर्णी -- युवा लेखक आणि संशोधक, आंतरराष्ट्रीय युवा संशोधक पुरस्कारांनी सन्मानित**१९८३: हिरालाल बागुल (श्रीदासुत)-- कवी**१९८२: सई देवधर -- भारतीय अभिनेत्री**१९७३: पराग तुकाराम पाटील -- लेखक**१९६९: प्रा. जयसिंग होनाजी गाडेकर-- प्रसिद्ध कवी**१९६८: डॉ. संध्या पवार -- प्रसिद्ध लेखिका**१९६४: स्मिता अनंतराव गोरंटीवार -- कवयित्री**१९६४: रघुनंदन प्रभाकर देशपांडे -- लेखक**१९६२: संतोष राजाराम तेंडुलकर -- लेखक**१९५९: डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर -- इतिहास संशोधक व लेखिका* *१९५२: पुंडलिक नारायण नाईक -- प्रसिद्ध कवी, लघुकथा लेखक, कादंबरीकार,नाटककार आणि पटकथा लेखक**१९५०: शिवाजी साटम – भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेते**१९५०: उपेंद्र भट -- किराणा घराण्यातील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे गायक**१९५०: ज्ञानदा नाईक -- बालसाहित्यिकार (व्यंकटेश माडगूळकर यांची कन्या)**१९४५: श्रीनिवास वेंकटराघवन -- भारतीय माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि पंच* *१९४५: माधव नारायणराव रानडे -- कादंबरीकार, लेखक**१९३४: डॉ. गुंथर सोन्थायमर – महाराष्ट्र लोकधर्म व मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक(मृत्यू: २ जून १९९२ )**१९२६: एलिझाबेथ (दुसरी) – इंग्लंडची राणी. प्रदीर्घ कारकिर्दीच्या बाबतीत राणी व्हिक्टोरिया खालोखाल राणी एलिझाबेथचा दुसरा क्रमांक लागतो**१९२४: पी.भास्करन (पुल्लूटुपदाथु भास्करन) -- भारतीय मल्याळम भाषेतील कवी, मल्याळम चित्रपट गीतांचे गीतकार आणि चित्रपट निर्माता(मृत्यू: २५ फेब्रुवारी २००७ )**१९२२: अॅलिएस्टर मॅकलिन – स्कॉटिश साहसकथा लेखक (मृत्यू: २ फेब्रुवारी १९८७ )**१८८५: विष्णू वासुदेव आठल्ये -- इतिहासलेखक (मृत्यू: २८ ऑगस्ट १९५९ )**१८६४: मॅक्स वेबर – जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ (मृत्यू: १४ जून १९२० )* 🌟 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌟••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१३: शकुंतलादेवी – गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९ )**२०१२: बेबीताई कांबळे -- दलित चळवळीतील एक लढाऊ कार्यकर्ती, समाजसेविका आणि लेखिका (जन्म: १९२९ )**२००९: इक्बाल बानो -- पाकिस्तानमधील गझलमध्ये पारंगत असलेल्या अष्टपैलू गायिका (जन्म: २७ ऑगस्ट १९३५ )* *२०००: निगार सुलताना -- भारतीय अभिनेत्री (जन्म:२१ जून १९३२)**१९७८: विष्णू रामचंद्र वेलणकर -- कापड कारखानदार, दानशूर, उद्योगपती व लेखक (जन्म: ६ जानेवारी १८८७ )**१९५२: सर स्टॅफोर्ड क्रिप्स – इंग्लिश राजकारणी (जन्म: २४ एप्रिल १८८९ )**१९४६: जॉन मायनार्ड केन्स – ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ (जन्म: ५ जून १८८३ )**१९३८: सर मुहम्मद इक्बाल – प्रख्यात उर्दू कवी,तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते (जन्म: ९ नोव्हेंबर १८७७ )**१९१०: मार्क ट्वेन – विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार (जन्म: ३० नोव्हेंबर १८३५ )**१५०९: हेन्री (सातवा) – इंग्लंडचा राजा (जन्म: २८ जानेवारी १४५७ )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दृष्टी बदलली तर सृष्टी बदलेल*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २२-२३ एप्रिलला जाणार सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *येत्या 30 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील महाराष्ट्र सदनात होणार भव्य हापूस आंबा महोत्सवाचं उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *साहित्यभूषण पुरस्काराच्या रक्कमेत वाढ, यावर्षीपासून मिळणार 10 लाख रुपये - उदय सामंत*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हवामान विभागाने उष्णतच्या लाटेच्या दिला इशारा, नागपूर शहर ठरले देशातील सर्वात ‘हॉट सिटी’, नागपूरमध्ये सर्वाधिक 44.7 अंश तापमानाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईतील वांद्रे ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या ऋषीकेशने पटकावला वर्ष २०२३-२४ चा महाराष्ट्र शासनाचा मानाचा “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *CSMIA मुंबई विमानतळ 8 मे रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत मान्सूनपूर्व देखभालीसाठी राहणार बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ७ विकेट्सने पराभव करत मिळवला पाचवा विजय, विराट बनला आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतके करणारा फलंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. विरभद्र कोटलवाड, धर्माबाद👤 लक्ष्मण रच्चावार, पाळज 👤 एच. डी. पाटील👤 मारोती इबतवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 43*जमीन पाण्यातील मी उभयचर* *नाही निघत जीभ तोंडाच्या बाहेर* *दात स्वच्छ माझे करतात पक्षी* *अंगावर आहे खवलेदार नक्षी* *सर्वात शक्तिशाली माझाच जबडा* *ऊन खात पडतो तोंड ठेऊन उघडा*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - टोमॅटो ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शहाण्याने अविचाराला सुरुवात केली की, त्याला ताळतंत्र राहत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सलग नवव्यांदा बिजू जनता दलाचे ( BJD ) अध्यक्ष म्हणून बिनविरोध कोणाची निवड करण्यात आली ?२) घटक राज्य व केंद्रातील दुवा साधण्याचे कार्य कोण करतो ?३) जैन धर्माची तत्वे प्रकट करणाऱ्यास काय म्हणतात ?४) 'कादंबऱ्या लिहिणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? *उत्तरे :-* १) नवीन पटनायक, माजी मुख्यमंत्री, ओडिशा २) राज्यपाल ३) तीर्थकर ४) कादंबरीकार ५) एड. अनंत दारवटकर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पाणी केव्हा उकळतं ?* 📙 ************************हा काय प्रश्न झाला ? पाणी १०० अंशाला उकळतं. शाळकरी मुलगाही सांगेल. असेलही तुमचं उत्तर बरोबर. पण शिमला, लेह, लडाख किंवा कोडाईकनाल इथं राहणाऱ्या तुमच्या मित्राला विचारा. तो तुमच्याशी सहमत होईलच असं नाही. आणि तुम्हीही तिथ जाऊन पाहिलंत तर पाणी उकळत असताना तुमचंच थर्मामीटर त्या पाण्याचं तापमान शंभरापेक्षा कमी असल्याचं दाखवेल. खगोलशास्त्रज्ञांना विचाराल तर तेही सांगतील की मंगळावर तर दहा अंशालाच पाणी उकळतं. म्हणजे जेमतेम वितळत नाही तो उकळायलाही सुरुवात.पाणी हा तसा संकुचित मनोवृत्तीचा द्रवपदार्थ आहे. त्याच्या रेणूंना आपल्या भाईबंदांशी जखडून राहणं आवडतं. त्यांची साथसंगत सोडायला हे रेणू तयार नसतात. पण त्यांना ऊर्जा मिळाली की त्यांच्यामधले बंध थरथरायला लागतात. आणि कालांतराने तुटतातही. तेवढे रेणू स्वतंत्र होतात. म्हणजेच त्यांचं वाफेत रूपांतर होतं. असं रूपांतर तर कोणत्याही तापमानाला होतच असतं. तसं झालं नसतं तर बाहेर वाळत घातलेले आपले कपडे कधी सुकलेच नसते. तेव्हा कोणत्याही तापमानाला पाण्यामध्ये काही प्रमाणात वाफ असतेच. त्या वायूरूपातले रेणू स्वतंत्र होऊन उडून जाऊ पाहतात. त्यांचा दबाव निर्माण होतो. पण त्या पाण्यावर असलेला हवेचा दाब त्याच रेणूंना खालच्या दिशेने रेटून पाण्यातच ठेवू पाहतो. या दोन दाबांमध्ये तू तू मैं मैं होऊ लागते. जोवर हवेचा दाब वाफेच्या दाबापेक्षा जास्त असतो तोवर वाफेला निमूटपणे पाण्यातच राहावं लागतं. आता या पाण्याला अधिक उष्णता दिली तर त्याचं तापमान वाढतं. त्याचबरोबर त्याला अधिक ऊर्जाही मिळते. ती अधिकाधिक बंध तोडून टाकायला मदत करते. अधिकाधिक रेणू स्वतंत्र होऊन वाफेत रूपांतरित होतात. वाफेचा दाब वाढत जातो. ज्या क्षणी हा वाफेचा दाब हवेच्या दाबाइतका होतो तेव्हा वाफेच्या रेणूंना रेटून परत पाण्यात पाठवणे कठीण होत जातं. वाफ धसमुसळेपणाने उडून जाऊ लागते. त्या दंगामस्तीत पाण्यात विरघळलेले वायूही स्वतंत्र होऊन उडून जाऊ पाहतात. पाण्याला उकळी फुटते. म्हणजेच जेव्हा पाण्यातील वाफेचा दाब हवेच्या दाबाइतका होतो तेव्हा पाणी उकळतं. समुद्रसपाटीला ही पातळी १०० अंशाला गाठली जाते. म्हणून जेव्हा हवेचा दाब समुद्रसपाटीवरच्या दाबाइतका म्हणजे एक सेंटिमीटर वर्ग इतक्या क्षेत्रफळावर एक किलोग्रॅम इतका असतो तेव्हा पाणी १०० अंशाला उकळतं. पण जसजसं उंचावर जावं तसतशी हवा विरळ होते. तिचा दाब कमी होतो. आता वाफेचा दाब त्याच्या इतका होण्यासाठी कमी तापमान असलं तरी चालतं. उलट प्रेशरकुकरमध्ये वाढीव दाब निर्माण करण्याची व्यवस्था केलेली असते. तिथं १०० अंशाची मर्यादा ओलांडली तरी पाणी उकळत नाही. वाफेचा दाब इतका वाढतो की त्या कुकरमधून ती वाफ जोराने बाहेर पडते. शिट्टी वाजते. त्यावेळी पाणी उकळतं. पण तोवर त्याचं तापमान सहज १२०-३० अंशावर पोहोचलेलं असतं. म्हणून तर तुमची डाळ लवकर शिजते.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नमन करीन द्वारकानायका । पांडव पालका देवराया ॥१॥ आतां मी गाईन गुण नाम कीर्ति । जेणें चारी मुक्ति दासी होती ॥२॥ साधक लोकांसी हेंचि पैं साधन । ब्रह्म सनातन वश होय ॥३॥ नामा म्हणे सर्व सारांचें हें सार । जेणें निरंतर निरंतर सुख वाटे ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपली ओळख व्हावी आणि आपल्याला मानसन्मान मिळावा यासाठी जर आपण कार्य असतील तर त्यालाही काही अर्थ नाही. माणसाचा जन्म मिळाला त्यासाठी काहीतरी देणं लागतं हीच भावना आणि असेच विचार जर ठेवून आपण कार्य करण्याचा प्रयत्न करत राहिले तर त्यातून मिळालेला समाधान असतो. तोच समाधान आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थाने सार्थक करणारा असतो. म्हणून अपेक्षांचे ओझे घेऊन फिरू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• "एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतनाची गोष्ट आहे.स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते. त्यावेऴी नरेंद्र ची उद्या परीक्षा असते. पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात. तेवढ्यात तेथे त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो आणी म्हणतो.अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून विणा वाजवत बसलास. तू कसा पास होशील. तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे. मी आज काय करतो याची नाही. हे उत्तर ऐकून मित्र निरूत्तर झाला." तात्पर्यः "कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे. एका दिवसात यश प्राप्त होत नाही. " 🌹🌹🌹🌹🌹🌹•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment