✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 एप्रिल 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/QTphTzLxRqraanB1/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌈 *'जागतिक आवाज दिन (World Voice Day)'* 🌈 🌈 *_ या वर्षातील १०६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌈 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌈•••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९९: चालकरहित ’निशांत’ विमान व जमिनीवरुन हवेत मारा करणार्या ’त्रिशूल’ क्षेपणास्त्राची ऒरिसातील चंडीपूर येथे चाचणी**१९९५: देशातील लोकशाही टिकवुन ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन यांना ’ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान**१९७२:केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून ’अपोलो-१६’ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले**१९४८: राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना**१९२२: मुळशी सत्याग्रह सुरू झाला.**१८५३: भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे अशी प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली. ’ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (GIP Railway) या कंपनीने ही सेवा सुरू केली.* 🌈 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🌈 ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३: सिद्धार्थ शंकर महादेवन -- गायक* *१९८२: स्वप्ना पाटकर --भारतीय लेखिका, गीतकार, आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या एक फिल्म निर्माता* *१९७८: कविता मोरणकर -- कवयित्री, लेखिका* *१९७८: लारा दत्ता – मॉडेल, हिन्दी चित्रपट अभिनेत्री व निर्माती, मिस युनिव्हर्स (२०००)**१९७८: प्रा. डॉ विनायक पवार -- कवी, चित्रपट कथा लेखक**१९७५: वसंत सखाराम साळुंके -- कवी, लेखक**१९७१: प्रा. डॉ. जया जितेंद्र कदम -- कवयित्री, लेखिका**१९६३: सलीम मलिक – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९६०: प्रा. डॉ. संपदा सुधीर कुल्लरवार-- कवयित्री, लेखिका**१९५६: सलीम आबालाल शेख -- लेखक**१९५५: प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे -- लेखक**१९५३: ज्योत्स्ना श्रीकांत शिंत्रे -- लेखिका* *१९४८: सुहास विनायक सोहनी -- प्रसिद्ध लेखक**१९४८: ज. मो. अभ्यंकर -- विद्यमान आमदार, विचारवंत,लेखक**१९४४: सुहासिनी कीर्तीकर -- लेखिका* *१९४०: बनवारीलाल पुरोहित -- माजी राज्याचे राज्यपाल**१९३४: रामचंद्र दामोदर तथा राम नाईक – माजी केन्द्रीय पेट्रोलिअम मंत्री, माजी राज्यपाल तथा लेखक**१९२६: श्यामराव कांबळे -- संगीत संयोजक (मृत्यू:१७ ऑक्टोबर २०१८ )**१९२२: नीळकंठ पुरुषोत्तम जोशी -- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान आणि भारतीय मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक(मृत्यू: १५ मार्च २०१६ )**१८८९: चार्ली चॅपलिन – अभिनेता,दिग्दर्शक आणि संगीतकार.त्यांच्या ‘लाईम लाईट‘ या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळाले होते. ’कीड ऑटो रेसेस अॅट व्हेनिस’ या त्यांच्या दुसर्या चित्रपटातील डर्बी हॅट,घट्ट कोट ढगळ पँट,चौकोनी मिशा,बेढब जोडे आणि काठी या वेशभूषेमुळे चार्ली चॅप्लिन म्हणजे लोकांना मूर्तिमंत विनोद वाटू लागले. (मृत्यू:२५ डिसेंबर १९७७)**१८६७: विल्बर राईट – आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (मृत्यू: ३० मे १९१२ )**१८४८: कंदुकुरी वीरेसालिंगम-- मद्रास प्रेसिडेन्सी,ब्रिटिश भारतातील एक समाजसुधारक आणि लेखक(मृत्यू: २७ मे १९१९ )* 🌈 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌈••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: माधव राजाराम पोतदार -- प्रसिद्ध कवी, लेखक(जन्म: १५ एप्रिल १९३५ )**२०१९: गोपाळ मारुतीराव पवार(गो.मा) --महाराष्ट्रातील ख्यातनाम समीक्षक आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे चरित्रकार (जन्म: १३ मे १९३२ )* *२०००: दिनकर गोविंद तथा अप्पासाहेब पवार – ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेले कृषीतज्ञ, कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, शाहू महाराजांचे चरित्रकार (जन्म: १९३०)**१९९५: रमेश टिळेकर – अभिनेते व वकील, ’घाशीराम कोतवाल’ या नाटकातील भूमिकेसाठी प्रसिद्ध**१९८२: अच्युत महादेव बर्वे -- कथाकार, कादंबरीकार(जन्म: ३ फेब्रुवारी १९२७ )**१९६६: नंदलाल बोस -- जगविख्यात चित्रकार (जन्म: ३ डिसेंबर १८८२ )**१९२८: महादेव मल्हार जोशी -- संस्कृत भाषेचे व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक(जन्म: २ जानेवारी १८७३ )**१८५०: मेरी तूसाँ –’मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम’च्या संस्थापिका(जन्म: १ डिसेंबर १७६१ )**१७५६: जॅक्स कॅसिनी – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (जन्म: ८ फेब्रुवारी १६७७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंघोळ किंवा स्नान*अंघोळ केल्याने शरीरासोबत मनाचीही शुद्धता होते............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *संपूर्ण देशात एकही टोलनाका दिसणार नाही. आता देशभरातील टोल प्लाझा हटवले जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांना आता जुलै-ऑगस्ट २०२५ मध्येही परीक्षा देता येणार.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अस्तिक कुमार पांडे MMRDA चे नवे सहआयु्क्त, आर एस चव्हाण राज्य विमा योजनेच्या आयुक्तपदी; पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *स्टेट बँकेकडून गृह कर्जदारांना दिलासा, रेपो रेट घटताच व्याजदरात कपात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत 44 टक्के वेतन खात्यावर जमा, या आधी मार्च महिन्याचे केवळ 56 टक्के वेतन देण्यात आले होते*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *संभाजी भिडेंवर भटक्या कुत्र्याचा हल्ला, पायाला कडकडून चावला, तातडीने रुग्णालयात केलं दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *श्रेयस अय्यर ठरला ICC प्लेयर ऑफ द मंथ, दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाला; न्यूझीलंडच्या डफी आणि रचिन रवींद्रला मागे टाकले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बाबू जिंकलोड 👤 भद्रे स्वप्नील 👤 माधव गायकवाड 👤 अनिरुद्ध वंगरवार 👤 नितीन आंबेकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 41*सुगंधी आहे मी सुंदर पर्णी**घरोघरी लागते माझीच वर्णी**मदत करते ठेवण्यास शुद्ध वातावरण**देते मी रात्रीला प्राणवायू नि ओझोन* *औषधी आहे आजारावर बहुगुणी* *शोभत आहे जसे मांगल्य अंगणी*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - संत्री ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संकटांना सामोरे गेला तर धैर्य आणि सामर्थ्य दोन्हीही तुमच्या सहाय्यार्थ धावून येतील.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या वर्षी लॉस एंजलिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक खेळात टी-२० क्रिकेट खेळाचा समावेश झाला आहे ?२) न्यूयॉर्क शहरामध्ये १४ एप्रिल हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जाणार आहे ?३) लेझर किरणांनी हवेत विमान पाडणारा भारत हा कितवा देश ठरला आहे ?४) 'कविता करणारा, रचणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे उभारण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कशाचे प्रतीक ओळखला जातो ? *उत्तरे :-* १) सन २०२८ २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिन ३) चौथा ( अमेरिका, रशिया, चीन ) ४) कवी ५) स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *अनुवांशिकता म्हणजे काय ?* 📙 आमची वंशावळ' आमची जमात, अनुवांशिक रंगरूप व अनुवांशिक रोग इत्यादी गोष्टी सतत कानावर पडत असतात. काही वेळा चर्चेत येत असतात. अनुवांशिकी किंवा हेरिडिटी या संदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन अॅबेट ग्रेगर जोहनान मेंडेल यांनी केले. मेंडलचे नियम म्हणून त्यांनी केलेले संशोधन जनुकशास्त्रात आजही आधारभूत मानले जाते.मेंडलचा पहिला नियम सांगतो की, विरुद्धगुणी शुद्ध बीजांचा संकर घडवला, तर त्यातील आक्रमक बीजाचे गुणधर्म पुढच्या पिढीत उतरतात. दुसऱ्या नियमानुसार एकापेक्षा जास्त जनुकांच्या जोडय़ा जर यात सामील असतील तर प्रत्येक जोडीतील आक्रमक जोडीचे संयुक्त गुणधर्म प्राधान्याने पुढच्या पिढीत दिसतात. याचाच एक सोपा अर्थ म्हणजे जसेच्या तसे संक्रमण होत नाही, तर त्यात प्राधान्यक्रम ठरवला जातो.या साऱ्या गोष्टी विविध वनस्पतींच्या रंगसंकरातून, उंच बुटक्या जातींतून मेंडेल यांनी सिद्ध केल्या. यानुसार अनुवंशिकीचा विचार माणसाच्या संदर्भात करायचा झाला तर एकाच बीजांडांचे विभाजन होऊन झालेली जुळी भावंडेच फक्त सारखी असू शकतात. अन्यथा पहिल्या पिढीतील सर्व गुणधर्म दुसऱ्या पिढीत कधीही आढळणार नाहीत. स्त्रीबीजांडात व पुरुष शुक्रजंतुत जर प्रत्येक २३ क्रोमोसोमच्या जोड्या असतील, तर विविध गुणोत्तरातून २^२३ म्हणजेच ८३,८८,६०८ इतक्या विविध प्रकारे (पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा यांच्यात अनुवांशिकी गुणधर्म जसेच्या तसे येण्याची शक्यता ८३,८८,६०८ मध्ये एक एवढीच राहते.) अनुवंशिकी संक्रमण होऊ शकते.जगभरची सर्व माणसे जरी मूलतः आफ्रिकेत निवास करीत होती, तरीही चेहरेपट्टी, उंची, डोळ्यांचे रंग यात असंख्य बदल याच कारणाने विविध जाती जमाती आढळतात.याशिवाय हवामान, रहाणीमान, सूर्यप्रकाश यांचा परिणाम कातडीच्या रंगावर होत असतो, तो वेगळाच. त्यामुळेच जगातील असंख्य प्राणी, साडेसहाशे कोटी माणसे, विविध वनस्पती यांत विविध प्रकार आपल्याला सहजगत्या पाहावयास मिळतात.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धांउनियां मिठी घालीन संतचरणीं । सांगे वचनींचे गुज तुम्हां ॥१॥ विठोबाच्या गांवा यारे मनीं येकवेळां । फारा आहाळला जीव माझा ॥२॥ आनंदाचें जीवन पाहिन श्रीमुख । शोकमोहदुःख हरती माझे ॥३॥ विटेसहित चरण देईन आलिंगन । तेणें माझी तनु वोल्हावेल ॥४॥ तुम्ही माझे आवडते अंतरंग । माझे जिवलगा प्राणसखे ॥५॥ नामा म्हणे विठो कृपेची माउली । तेव्हां ते साउली करिल मजा ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतःसाठी जगताना आनंद तर वेळोवेळी मिळत असतो. पण,पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला समाधान मिळत नाही. कारण समाधान ही संपत्ती कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही. ती संपत्ती फक्त आपल्यापाशीच असते. जेव्हा, इतरांसाठी आपल्या हातून एखादे नि:स्वार्थ भावनेचे कार्य होत असतात त्यातून जो समाधान मिळतो तेच समाधान जगावेगळे असते म्हणून ती संपत्ती कशाप्रकारे मिळवता येईल यासाठी प्रयत्न करून बघावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रसंगाचे भान ठेवावे*एका सरोवरात कुबु ग्रीव् नावाचे कासव राहत होते. दोन हंस तिथे जलविहारासाठी येत. कासवाशी त्यांची मैत्री झाली. कासवाला ते चांगल्या चांगल्या कथा सांगत. एक वर्षी अवर्षणामुळे सरोवर आटले. हंस कासवाला म्हणाले, लवकरच राहिलेला चिखल सुद्धा आटेल. मग तुझं कसं होईल? सह विचारातून एक युक्ती सुचली. एक लांब काठी दोन बाजूंनी हंसाने तोंडात धरावी व मध्यभागी कासवाने पकडावे. हंसाने उडत उडत दुसऱ्या तलावात जावे. त्यांनी कासवाला उडत उडत दुसऱ्या तलावात घेऊन जावे. त्यांनी कासवाला बजावले, मधे कोणत्याही कारणासाठी तोंड उघडू नको. नाहीतर उंचावरून पडून प्राण गमावशील.उड्डाण सुरू झाले मधेच एका गावातील लोक आश्चर्याने पाहत म्हणाले, “हे हंस गोल गोल काय नेत आहेत?” कासव रागावले ते हंसाला म्हणणार होते. “या मूर्खांना एवढेही समजत नाही का?” त्यासाठी त्याने तोंड उघडले आणि कासव जमिनीवर पडले.तात्पर्य - समाजात वागत असताना आपल्याला प्रत्येक वेळी प्रसंगाचे भान ठेवूनच वागले पाहिजे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment