✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 एप्रिल 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18Ahovfvti/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌍 *_जागतिक वसुंधरा दिन_*🌍•••••••••••••••••••••••••••••••••••• 🌍 *_ या वर्षातील ११२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌍 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌍•••••••••••••••••••••••••••••••••••• *_मानवाने केलेल्या पर्यावरणाच्या र्‍हासाकडे लक्ष वेधले जावे म्हणून अमेरिकेतील एका गटाने २२ एप्रिल रोजी "वसुंधरा दिन" साजरा करण्याची प्रथा १९७० मधे सुरू केली. आता जगभर हा दिवस ’जागतिक वसुंधरा दिन’ (World Earth Day) म्हणून विविध समारंभ आयोजित करुन साजरा केला जातो._**१९९७: राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ’ओमप्रकाश भसीन पुरस्कार’ जाहीर**१९९४: महाराष्ट्र विधानसभेने अखंडपणे २१ तास ५ मिनिटे कामकाज चालण्याचा विक्रम**१९४८: अरब-इस्त्रायल युद्ध - अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.**१०५६: क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट* 🌍 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌍••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: शिवकन्या प्रा.श्रध्दा नंदकुमार शेट्ये -- कवयित्री, लेखिका* *१९८५: सुव्रत जोशी -- भारतीय नाट्य आणि दूरदर्शन अभिनेता**१९७८: सुप्रिया पुरोहित हळबे - कवयित्री**१९७१: सुमीत राघवन -- भारतीय चित्रपट, दूरदर्शन आणि नाट्य अभिनेता आणि सूत्रसंचालक**१९७०: डॉ.श्यामल गरुड -- लेखिका, कवयित्री, संपादिका**१९६६: जयश्री कुलकर्णी अंबासकर-- कवयित्री, गीतकार, लेखिका**१९६३: केदार बोदास -- ग्वाल्हेर घराण्यातील एक भारतीय शास्त्रीय गायक(मृत्यू: २४ एप्रिल २०२३ )**१९६०: मनोज मुकुंद नरवणे -- भारतीय सेनेचे निवृत्त सेना प्रमुख* *१९५६: उदय विनायक भिडे -- कवी, अनुवादक, लेखक**१९४६: डॉ. राम माधव मुळे -- कवी* *१९४४: रवींद्र बेडकिहाळ -- प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार**१९३९: डॉ. गजानन पुरुषोत्तम फोंडके -- प्रसिद्ध विज्ञान कथा लेखक, नाटककार, संशोधक* *१९३८:निंबा कृष्ण ठाकरे -- जागतिक कीर्तीचे गणिती आणि जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरू* *१९३४: डॉ. शरदचंद्र गणेश घाटे -- प्रसिद्ध लेखक* *१९३४: कुमकुम -- हिन्दी व भोजपुरी चित्रपटातील अभिनेत्री* *१९३१: पद्मिनी बिनीवाले -- कवयित्री, लेखिका, बालगीतकार**१९३०: त्र्यंबक सपकाळे -- मराठी कवी (मृत्यू: १३ जानेवारी २०१४ )**१९२९: प्रा. अशोक केळकर – विख्यात भाषाशास्त्रज्ञ व साहित्य समीक्षक (मृत्यू: २० सप्टेंबर २०१४ )**१९२९: उषा मराठे-खेर ऊर्फ ’उषा किरण’ – शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर अभिनेत्री (मृत्यू: ९ मार्च २००० )**१९१९: मोरेश्वर दत्तात्रय ब्रम्हो -- नाटककार, नाट्यसमीक्षक**१९१६: काननदेवी – अभिनेत्री व गायिका (मृत्यू: १७ जुलै १९९२ )**१९१६: यहुदी मेन्युहीन – व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक (मृत्यू: १२ मार्च १९९९ )**१९१४: बलदेव राज चोप्रा(बी. आर.) -- बॉलीवूड उद्योग आणि दूरदर्शन मालिकांचे प्रसिद्ध भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००८ )**१९०४: जे. रॉबर्ट ओपेनहायमर – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९६७ )**१८८३: अंजनीबाई मालपेकर -- हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या भेंडीबाजार घराण्यातील प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका(मृत्यू: ७ ऑगस्ट १९७४ )**१८७०: व्लादिमीर लेनिन – रशियन क्रांतिकारक (मृत्यू: २१ जानेवारी १९२४ )**१८१२: लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे - डलहौसी – भारताचा गव्हर्नर जनरल (१८४८-१८५६)(मृत्यू: १९ डिसेंबर १८६० )**१७२४: एमॅन्युएल कांट – जर्मन तत्त्ववेत्ता (मृत्यू: १२ फेब्रुवारी १८०४ )* 🌍 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌍••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: श्रावण कुमार राठोड -- नदीम-श्रवण जोडीतील संगीतकार, गायक, गीतकार (जन्म: १३ नोव्हेंबर १९५४ )**२०१३: लालगुडी जयरामन – व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक (जन्म: १७ सप्टेंबर १९३० )**२०१३: जगदीश शरण वर्मा – भारताचे २७ वे सरन्यायाधीश (जन्म: १८ जानेवारी १९३३ )**२००३: बळवंत गार्गी – पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार, (जन्म: ४ डिसेंबर १९१६ )**१९९४: आचार्य सुशीलमुनी महाराज – थोर विचारवंत, द्रष्टे समाजसुधारक आणि पुरोगामी सेवाव्रती जैन आचार्य**१९९४: रिचर्ड निक्सन – अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ९ जानेवारी १९१३ )**१९८०: फ्रिट्झ स्ट्रासमान – जर्मन भौतिकशात्रज्ञ (जन्म: २२ फेब्रुवारी १९०२ )**१९७५: श्रीनिवास नारायण बनहट्टी -- संशोधक, समीक्षक, संपादक (जन्म: ६ मार्च १९०१ )**१९७३: विष्णू विनायक बोकील -- कथा-पटकथा-संवादलेखक, कादंबरीकार (जन्म: २ जून १९०३ )**१९५४: विनायक महादेव भुस्कुटे --- कथालेखक, चरीत्रकार, अनुवादक (जन्म: १८८९)**१९१८: जनार्दन विनायक ओक -- कोशकार*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वसुंधरा दिनानिमित्त एक रचना ..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *17 वा नागरी सेवा दिन साजरा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सनदी अधिकाऱ्यांना सेवेचा मंत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सुधीर रसाळ विशेषांकाचे प्रकाशन, साहित्य समीक्षेसाठी वाचकांची पूर्वतयारी आवश्यक - दिलीप माजगावकर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील कर्जमाफीसह सोयाबीन, कापूस दराच्या प्रश्‍नावर लक्ष द्या, क्रांतीकारी शेतकरी संघटनेची कृषीमुल्य आयोगाच्या अध्यक्षांकडे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कैलास मानसरोवर यात्रा लवकरच पुन्हा सुरू होणार - परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या 88 व्या वर्षी व्हॅटिकनमधील कासा सांता मार्टा येथे निधन, पोप फ्रान्सिस यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींसह जगभरातील नेत्यांनी व्यक्त केलं दुःख*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जम्मू काश्मीरला पावसाचा जबर तडाखा, शाळा बंद, वाहतूक कोलमडल्यामुळे जनजीवन विस्कळीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बीसीसीआयने यंदाच्या वर्षीच्या केंद्रीय वार्षिक कराराची 34 खेळाडूची यादी केली जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजेश्वर शंकरराव देशपांडे, शिक्षक, धर्माबाद👤 बालाजी मेहेरकर👤 मधुकर कुमारे, धर्माबाद👤 सचिन बाभळीकर👤 व्यंकटेश अबुलकोड, धर्माबाद👤 प्रवीण रब्बेवार, देगलूर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 44*शरीराला देती मी सुंदर आकार**दिसतीय कुरूप पण रंगाने शुभ्र फार* *वयानुसार मी नेहमी बदलणार**मजबूत व हलके कॅल्शिअमचे भांडार**ओळखा पाहू मी आहे कोण?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - मगर *कालच्या विज्ञान कोडेला प्रतिसाद नोंदविणारे वाचक* लालन्ना गुडलावार, अनिकेत सायबलू, दीपश्री वाणी, उज्वला इंगळे, सिद्धार्थ शिरसे, सौ. लिना सुपारे, माधव तनमुदले, अभिनंदन प्रचंड, सुनिता भुरे, सुरेश द्रोपतवार, श्याम ठाणेदार, राहुल वाघमारे, प्रतिक उकले, संगीता दरबस्तेवार, अर्चना नंदगावकर, धनश्री चेनापूरकर मनःपूर्वक अभिनंदन .........!••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सदासर्वदा, यश कुणालाच येत नाही. जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'जागतिक वसुंधरा दिवस' केव्हा साजरा केला जातो ?२) जागतिक वसुंधरा दिवस २०२५ ची थीम काय आहे ?३) भारतात सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोणत्या राज्यात आहेत ?४) 'किल्ल्याच्या सभोवतालची भिंत' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'मनमोहन' या टोपण नावाने कोणत्या कवी / लेखकाला ओळखले जाते ? *उत्तरे :-* १) २२ एप्रिल २) आमची ताकद, आमचा ग्रह ३) मध्यप्रदेश ४) तट ५) गोपाळ नरहर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पावसाळ्यातील आजार कोणकोणते ?* 📙पावसाळय़ातील आजारांचे स्वरूप मुख्यतः पाण्यावाटे पसरणारे आजार असे मानता येईल. पिण्याचे पाणी हे विविध कारणांनी दूषित बनण्याचा हा काळ असतो. विहिरीत बाहेरचे पाणी पडणे, मुरलेले दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या तलावात पसरणे, वाहते पाणी काठावरची घाण मिसळून प्रदूषित होणे, तरंगणाऱ्या गढुळ पदार्थांवर व त्यांबरोबर येणाऱ्या जंतूंवर नियंत्रण न राखता येणे ही त्याची सामान्य कारणे आहेत. यामध्ये उडणाऱ्या माश्या, त्यांच्यामुळे होणारा रोगजंतूंचा फैलाव, चिलटांचा याच काळात होणारा प्रादुर्भाव व विविध प्रकारच्या जंतांची अंडी याच काळात पाण्याद्वारे फैलावणे यांची भरच पडते.पटकी विषमज्वर, जुलाब, उलट्या, आव पडणे या नावाने होणारे आजार व विविध जंतांचा प्रादुर्भाव यांनाच आपण सहसा पावसाळी आजार असे म्हणतो. यापैकी पटकी म्हणजे काॅलरा हा व्हिब्रीओकाॅलरा या जंतूंमुळे होतो. दूषित खाद्यपेये हे त्याचे कारण. अर्थातच पटकीचा प्रादुर्भाव जेथे फार मोठ्या संख्येने जनसमुदाय जमतात, अशा यात्रा वगैरेंच्या ठिकाणी नेहमीच होऊ शकतो. भारताच्या पेजेप्रमाणे जुलाब व जोरदार विनासायास उलट्या यांची अचानक सुरुवात हे या आजाराचे प्रमुख लक्षण. यावर आता प्रतिजैविकांचा इलाज तातडीने केल्यास हा आजार पटकन आटोक्यात येतो. मात्र इलाजास उशीर झाल्यास शरीरातील द्रवपदार्थ कमी झाल्याने व जंतूंचे विष शरीरात पसरल्याने मृत्यूही ओढवू शकतो. याचे निदान सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे पटकन होते. रोग्याच्या वांती वा विष्ठेत स्वल्पविरामसारखे जंतू दिसतात. पूर्वी यावरची प्रतिबंधक लस टोचणे हा प्रमुख उपाय मानला जाई. आता मात्र रुग्णांवर तातडीने इलाज व स्वच्छ अन्नपदार्थांचा वापर यावर भर दिला जातो. कारण प्रतिबंधक लस जेमतेम चार ते सहा महिनेच उपयुक्त ठरते. यात्रा मात्र नेहमीच चालू असतात. फार मोठे पूर आलेला भाग सोडला, तर आता कॉलरा रोगाचे गांभीर्य फार राहिलेले नाही. विषमज्वर हा त्रासदायक आजार असून सालमोनेला टायफी व पॅराटायफी या जंतूंमुळे होतो. क्लोरोमायसेटीन या औषधाचा शोध लागून १९६० च्या दशकात त्याचा वापर सुरू होईतो या आजाराने असंख्य बळी घेतलेले आहेत. ठराविक दिवसांचा ताप असे याचे स्वरूप असल्याने यालाच 'मुदतीचा ताप' या नावानेही ओळखले जाते. लहान आतड्याच्या आतील पापूद्र्यांवर या जंतूंचा हल्ला होऊन तेथे दाह निर्माण होतो. याचा परिणाम अन्नपचनावर होतो. गंभीर अवस्थेत लहान आतड्याला दाहामुळे व पापुद्रे सुटल्याने भोकेही पडू शकतात. विषारी द्रव्यांमुळे ताप येत राहतो. आता या आजारावर अनेक प्रतिजैविके उपलब्ध आहेत. प्रतिबंधक लस व तोंडाने घ्यायच्या प्रतिबंधक कॅप्सूलचा वापर आजही केला जातो. त्याचा उपयोग जेमतेम २ वर्षे होतो. विशेषतः पोहण्यापूर्वी, लांबच्या प्रवासापूर्वी परदेशगमनासाठी हा वापर उपयुक्त ठरतो.विषमज्वराचा आजार न होता काही व्यक्तींच्या आतड्यात हे जंतू वास्तव्य करतात. आजार बरा झालेल्या व्यक्तीतही हा प्रकार होऊ शकतो. यालाच 'कॅरिअर' किंवा 'जंतूवाहक व्यक्ती' असे म्हटले जाते. त्या व्यक्तीला त्रास होत नसल्याने या व्यक्तीच्या संपर्कातील अन्य व्यक्तींना खाण्यापिण्याची भांडी इत्यादीमधून संसर्ग होऊ शकतो. जंतूवाहक व्यक्ती सार्वजनिक खाणावळ येथे आचारी वाढपी असेल तर मोठाच गोंधळ होऊ शकतो. या रोगाचे निदान विडाल या नावाच्या रक्त तपासणीतून होऊ शकते. आजारी रुग्ण व जंतूवाहक या दोन्हींची तपासणी होकारात्मक येते. त्यानुसार इलाज शक्य होतात.आमांश, आव पडणे हा आजार फार विस्तृत प्रमाणात आढळतो. अमिबामुळे होणारा एक प्रकार असतो. तर जंतूसंसर्गातून दुसरा होतो. शिगेला, सालमोनेला व इकोलाय या जंतूमुळे होणारा आमांश पाण्यासारखे जुलाब, ताप, उलट्या व पोटात मुरडा धरणे अशा लक्षणांनी सुरू होतो. मोठ्या आतड्याला सूज येऊन त्याचा दाह झाल्याने शौचावाटे चिकट पदार्थाच्या स्वरूपात त्याच्या अंतस्त्वचेचे पापुद्रे पडतात. अमीबामुळे होणाऱ्या अमांशात वरचेवर शौचाला होणे, अपचन व तीव्र मुरडा व थोडा ताप ही लक्षणे असतात. दोन्हींवर करण्याचे उपाय हे औषध स्वरूपातच करावे लागतात. पचनावर परिणाम झाल्याने रुग्णाचे वजन प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता विशेषत: वाढत्या वयात जास्त असते. अमांश हा आजार वरचेवर उद्भवून त्यातून दूरगामी स्वरूपाचा कोलायटिस हा मोठ्या आतड्याच्या दाहाचा आजार सुरू होऊ शकतो.विविध प्रकारचे जंत आतड्यात वाढतात. आपण खाल्लेले अन्न तेच खाऊन फस्त करतात. त्यामुळे शरीरक्रियाच मंदावते. मुलांच्या वाढीवर परिणाम होतो. उलट्या, पोटात दुखणे, झोपेत दात खाणे, रक्तक्षय ही लक्षणे दिसतात. पाण्यातील जंतांच्या अंड्यांमुळेही बाधा होते. सर्व प्रकारच्या जंतांवर सध्या औषधे उपलब्ध असून ती सहजपणे जंतांचा नायनाट करतात.पाणी उकळून व गाळून पिणे हा पारंपरिक उपाय पाण्यात टाकण्याच्या क्लोरीनच्या गोळ्या वा थेंब हाही एक उपयुक्त उपाय. अॅक्वागार्डसारख्या अत्याधुनिक आयनीकरणाने पाणी शुद्ध करण्याचा तिसराही उपाय. घरगुती फिल्टरेशनची पद्धत वापरणे हाही एक परिणामकारक उपाय अनेक प्रकारच्या पावसाळी आजारांना दूर ठेवू शकतो.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वीतभर पोट लागलेंसे पाठी । साधुसंगें गोष्टी सांगूं न देई ॥१॥पोट माझी माता पोट माझा पिता । पोटानें ही चिंता लाविलीसे ॥२॥पोट माझा बंधु पोट माझी बहीण । पोटानें हें दैन्य मांडिलेंसे ॥३॥विष्णुदास नामा पोटाकडे पाहे । अजून किती ठाये हिंडविसी ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• खऱ्या अर्थाने ज्याला काहीतरी करून दाखवायचे असते किंवा एखाद्याची मदत करायची असते ती व्यक्ती कधीच बहाणे करत नाही आणि मुळात खोटे बोलत नाही.अशाच व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास केला जातो. पण त्यातच जर एखाद्याचे काम करायचे नसेल किंवा मदत करायची नसेल तर करू नये पण,खोटे बोलून स्वतःलाही फसवू नये आणि दुसऱ्यालाही फसवू नये अशा वागणूकीमुळे एखाद्याचे मन दुखावत असते.ते दुखावलेले मन कधीच दिसत नाही. अशा वागणुकीने त्या व्यक्तिंमधील प्रेरकता कमी होण्याची शक्यता असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विचारी अमोल*काळा, बावळा वाटणारा, रोजचेच पण स्वच्छ कपडे घातलेला अमोल खुषीत होता. आज त्याला मोठ्या पाहुण्याच्या हस्ते खूप बक्षिसे मिळणार होती. त्या रकमेत आठवीची पुस्तकं, वह्या, फी सारा खर्च भागेल का याचा विचार करीत चालताना तो केव्हा पोचला, त्याचं त्यालाच कळलं नाही. मित्रांबरोबर सभास्थानी जात असताना शिक्षकांनी त्याला बक्षिसे घेणाऱ्या मुलांच्या गटात नेऊन बसविलं. समारंभ सुरू झाला. मुख्याध्यापकांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यंदा बक्षिसं देण्यासाठी मगनशेठनी मोठी रक्कम दिल्याचं जाहीर केलं. त्याचं औदार्य, व्यवसाय, सगळं सांगितले. मुलांची चुळबूळ सुरू झाली. म्हणून आवरतं घेतलं.बक्षिसांची यादी वाचली जाऊ लागली. मुलं क्रमाने बक्षीस घेऊ लागली. अमोलचं नाव पुकारलं गेलं. त्याला सर्वोत्तम विद्यार्थ्याला मिळणाऱ्या बक्षीसासह ५-६ बक्षिसे मिळाल्याचं सांगितलं. अमोल व्यासपीठाकडे जाऊ लागला. मित्रांच्या टाळ्या सुरू झाल्या. पाहुण्यांकडून बक्षीस स्वीकारण्यासाठी हात पुढे न करता ध्वनिवर्धक पुढे ओढला. म्हणाला “ही सर्व बक्षिसं मिळाल्यानं मला खूप आनंद झालयं. पण…. मगनशेठनी पैसा मिळविलाय ‘गुटखा’ विकून. त्यांच्या मुलानं माझा मित्र सुहासच्या भावाला गुटख्याची सवय लावली. जिभेचा कर्करोग झाला त्याला. त्यातच तो गेला. गुटखा वाईट असतो. मुलांना त्याची सवय लावणारे, तो उपलब्ध करून देणारे वाईट असतात. गुटख्यावर मिळविलेल्या पैशाचं बक्षीस मी स्वीकारू शकत नाही. मला माफ करा.” सगळे स्तब्ध झाले. अमोल परतला. पण पाहुण्यांनी त्याला परत बोलावले. शाबासकी दिली. ‘अमोल हिरा’ असं संबोधून त्यांनी स्वतःच्या खिशातून ५०० रुपये बक्षीस दिले.तात्पर्यः मुलांना, ‘अमोलसारखे विचारी व्हा’ असा संदेश दिला. टाळ्यांच्या गजरात मुलांनी सद्विचारी होऊ असे आश्वासन दिले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment