✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 एप्रिल 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1EMnQRkpp5/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📘 *_जागतिक पुस्तक दिन_* 📘•••••••••••••••••••••••••••••••••••• 📘 *_ या वर्षातील ११३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 📘 *_महत्त्वाच्या घटना:_* 📘••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१३: इंडियन प्रीमियर लीगमध्ये ख्रिस गेलच्या ६६ चेंडूत नाबाद १७५ धावा**१९९९: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना* *१९९०: नामिबिया संयुक्त राष्ट्रांत प्रवेश होऊन तो १६० वा सदस्य देश बनला.**१८१८: दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले.* 📘 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*📘 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: अविनाश अरुणा मधुकर जगदेव -- लेखक* *१९८७: प्रिया मराठे -- मराठी अभिनेत्री**१९८६: डॉ. पवन अशोकराव कोरडे -- कवी**१९८१: निलेश बळीराम गोरे -- लेखक* *१९७४: श्वेता मेनन -- भारतीय टेलिजन अँकर आणि अभिनेत्री**१९७२: माधुरी महेंद्र चौधरी -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९६९: मनोज बाजपेयी -- भारतीय अभिनेता**१९६८: किशोरी शहाणे-विज -- शास्त्रीय आणि लोकनृत्य नृत्यांगना, चित्रपट अभिनेत्री आणि चित्रपट निर्मात्या**१९६६: रमेश पांडुरंग जाधव -- कवी**१९६३: योगीराज वसंत माने -- कवी, लेखक* *१९५७: जयदेव डोळे -- मराठीतले वैचारिक लिखाण करणारे समाजवादी विचारसरणीचे लेखक, संपादक* *१९५६: प्रा. अनिरुद्ध गोपाळ बनहट्टी -- लेखक* *१९५६: विश्वास विष्णू देशपांडे -- प्रसिद्ध लेखक, कवी* *१९५६: कार्व्हालो सिसिलिया फ्रान्सिस -- प्रसिद्ध कवयित्री, कथाकार**१९५४: यशोधरा काटकर -- लेखिका**१९५४: धनंजय सोळंकर -- प्रसिद्ध कवी**१९५१: प्रा. अविनाश सप्रे -- इंग्रजी भाषा साहित्याचे व्यासंगी प्राध्यापक आणि मराठीचे नामवंत समीक्षक**१९४५: प्रा. डॉ. अरुण दत्तात्रेय वेलणकर -- लेखक, समीक्षक* *१९३८: एस. जानकी – शास्त्रीय गायिका**१९१३: अनंत विठ्ठल कीर उर्फ धनंजय कीर' -- चरित्रकार (मृत्यू: १२ मे १९८४ )* *१९०८: विनायक रामचंद्र हंबर्डे -- वैदर्भीय मराठी नाटककार,कादंबरीकार व संपादक.(मृत्यू: १९ नोव्हेंबर १९६३ )**१८९७: लेस्टर बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: २७ डिसेंबर १९७२ )**१८९३: दत्तात्रेय बाबूजी पद्माकर -- कवी* *१८७३: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक (मृत्यू: २ जानेवारी १९४४ )**१८५८: पंडिता रमाबाई – विधवा, परिक्त्यक्ता आणि स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक आणि’आर्य महिला समाज’च्या संस्थापिका,संस्कृत पंडित (मृत्यू: ५ एप्रिल १९२२ )**१८५८: मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ (मृत्यू: ४ ऑक्टोबर  १९४७ )**१७९१: जेम्स बुकॅनन – अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १ जून १८६८ )* 📘 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 📘••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: ललित बहल -- भारतीय अभिनेता, निर्माता, लेखक (जन्म: १५ ऑगस्ट १९४९ )**२०१६: जोगिंदर पॉल -- उर्दू लेखक होते. त्यांनी अनेक लघुकथा, कादंबऱ्या लिहिल्या (जन्म: ५ सप्टेंबर १९२५ )**२०१३: शमशाद बेगम – पार्श्वगायिका (जन्म: १४ एप्रिल १९१९ )**२००७: बोरिस येलत्सिन – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष (जन्म: १ फेब्रुवारी १९३१ )**२००१: गंगाधर नारायण कोपरकर -- कीर्तनकार, लेखक (जन्म: २१ ऑक्टोबर १९२० )**२००१: जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते, गोवा मुक्ती संग्रामातील एक झुंजार सेनापती,महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष  व केसरीचे संपादक (जन्म: १२ ऑक्टोबर १९२१ )**२०००: यशवंत सदाशिव ऊर्फ बाबासाहेब भोपटकर -- मराठी चित्रपटांना आधार मिळावा या ध्येयाने प्रेरित होऊन गेली ४० वर्षे लालबागमधील ’भारतमाता’ चित्रपटगृह चालवणारे* *१९९७: डेनिस कॉम्पटन – इंग्लिश क्रिकेटपटू, ’गोल्डन बॉय’ (जन्म: २३ मे १९१८ )**१९९२: सत्यजित रे – ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न. ’पथेर पांचाली’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला देशविदेशात अनेक गौरव मिळाले. त्यांना विशेष ऑस्कर पुरस्कारही देण्यात आला होता. (जन्म: २ मे १९२१ )**१९२६: हेन्‍री बी. गुप्पी – ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ (जन्म: २३ डिसेंबर १८५४ )**१९८६: जिम लेकर – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (जन्म: ९ फेब्रुवारी १९२२ )**१९५८: शंकर श्रीकृष्ण देव – निष्ठावान समर्थभक्त,समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक (जन्म: १० ऑक्टोबर  १८७१)**१८५०: विल्यम वर्डस्वर्थ – काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी. त्यांची ’डॅफोडिल्स’ ही अतिशय गाजलेली कविता आहे. (जन्म: ७ एप्रिल १७७० )**_१६१६: विल्यम शेक्सपिअर – इंग्लिश नाटककार आणि अभिनेता. युनेस्कोने घेतलेल्या पुढाकारामुळे विल्यम शेक्सपिअर यांच्या सन्मानार्थ १९९५ पासून आजचा दिवस हा ’जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. (जन्म: २६ एप्रिल १५६४ )_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक पुस्तक दिनानिमित्त नासा येवतीकर लिखित " ललाटरेषा " पुस्तकाचा जेष्ठ साहित्यिक अरुण वि. देशपांडे यांनी करून दिलेला पुस्तक परिचय......... वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1) *मौजे नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय. स्मारकासाठी 142.60 कोटी तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 67.17 लाख रुपयांच्या तरतूदीस मंजूरी.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *UPSC कडून 1009 उमेदवारांचा निकाल जाहीर, त्यात महाराष्ट्रातील 95 विद्यार्थ्यांचा समावेश, प्रयागराज येथील शक्ती दुबे देशात पहिली तर पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आता १० वर्षांवरील अल्पवयीन मुले देखील त्यांचे बचत आणि एफडी खाते स्वतः उघडून हताळू शकतील, रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचा ‘पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार २०२३’ ने सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारचं एक पाऊल मागे, मोठ्या विरोधानंतर हिंदी'अनिवार्य' शब्द हटणार, पण त्रिसूत्री शिक्षण पद्धतीत दुसरी भारतीय भाषा निवडावीच लागणार, विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांचा हल्ला, दोन पर्यटकांचा मृत्यू तर 12 जण जखमी, सुरक्षा यंत्रणांकडून सर्च ऑपरेशन सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *गुजरातचं प्लेऑफमधील स्थान निश्चित, मुंबईचं पुनरागमन, चेन्नई बाहेर; गुणतालिकेत मोठे उलटफेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤अमृता आनप, पत्रकार व निवेदक👤 तेजस मार्कंडेय👤 अभिषेक संगम👤 देविदास गुडलोड, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 45*हाडांशिवाय बनले लवचिक मी**लाळ मिसळविते अन्नात मी*करतो पदार्थाच्या चवीची फोड**भावनांना देतो आवाजाची जोड**ओळखा पाहू मी आहे कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - हाडे विज्ञान कोडेला प्रतिसाद नोंदविणारे वाचक कवी दत्ताहरी कदम, सुरेश द्रोपतवार, माधव तनमुदले, रोहित मुधोळकर, श्याम ठाणेदार, अभिनंदन प्रचंड, सुनिता भुरे, अर्चना नंदगावकर, दीपश्री वाणी मनःपूर्वक अभिनंदन .......!••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••“पुस्तके आणि चांगली माणसं लगेच काळात नाही त्यांना वाचावे लागते.”*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *गोट्या* ही कादंबरी कोणी लिहिली ?२) चिऊताईचे गाणे बालकविता संग्रह कोणी लिहिले ? ३) *एक होती झाडू* ही बाल नाटिका कोणी लिहिली ?४) *श्यामची आई* हे पुस्तक कोणी लिहिले ?५) *छावा* ही कादंबरी कोणी लिहिली ?*उत्तरे :-* १) शंकर पाटील २) कवी सुरेश भट ३) रत्नाकर मतकरी ४) साने गुरुजी ५) शिवाजी सावंत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *जीवाचा अंत केव्हा होतो ?* 📙*************************पूर्वी कसं सगळं साधं सोपं होतं. एखाद्या व्यक्तीला अखेरची घरघर लागली आणि त्यानं मान टाकली की नाकापुढे सूत धरलं जायचं. त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास चालू आहे की नाही हे तपासण्यासाठी. आणि तो चालू नसला तर त्यानं अखेरचा श्वास घेतल्याचं जाहीर व्हायचं. किंवा नाडी तपासली जायची. त्यावरून हृदयाची धडधड तपासली जायची. स्टेथस्कोप आल्यानंतर त्याच्या मदतीने हृदयाचे ठोके मोजले जायचे. आणि ते बंद पडले आहेत अशी का खात्री झाली की व्यक्ती मृत झाल्याचं डॉक्टर घोषित करायचे.पण वैद्यकीय तंत्रज्ञानांनं एकदम झेप घेतली आणि सारंच बदलून गेलं. श्वासोच्छ्वास बंद पडल्यानंतर, हृदयाच्या तबलजीनं हात आखडता घेतल्यानंतरही कृत्रिम मार्गांनं त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास परत चालू करणं शक्य झालं. हृदयाला विजेचे झटके देऊन हृदयाला नाठाळ घोड्यासारखं मारून परत दौडवता येणं शक्य झालं. आणि जीवाचा अंत केव्हा होतो हा प्रश्न परत ऐरणीवर आला. त्यात भर घातली ती *ख्रिश्चियान बर्नार्ड* यांनी. त्यांनी तर थेट हृदयरोपणाची शस्त्रक्रियाच यशस्वी करून दाखवली. मृत म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीच्या शरीरातलं हृदय काढून घेऊन ते दुसऱ्याच एखाद्याच्या शरीरात स्थापन करून त्या व्यक्तीला दुसरं आयुष्य देण्याची किमया त्यांनी साध्य केली. त्याच वेळी हा सवाल उपस्थित केला गेला होता. जर ते बंद पडलेले हृदय दुसर्‍या व्यक्तीच्या शरीरात बिनबोभाट काम करू शकतं तर मग त्या मृत म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीलाच ते चालू करून जीवनदान का दिलं जाऊ नये ? ते हृदय जर असं दुसरीकडे व्यवस्थित चालू होतं तर मग तेच बंद पडल्याच्या निकषावर पहिल्याला मृत म्हणून घोषित करणं कितपत योग्य आहे ? या परिस्थितीचा गैरफायदा कोणी धनदांडगा कशावरून घेणार नाही ? सहाजिकच मृत्यूची, जीवाच्या अंताची व्याख्याच परत नव्याने करण्याची गरज भासू लागली. त्या वेळेस मग ब्रेन डेथची संकल्पना पुढे आली. रक्ताभिसरण म्हणजेच हृदयाची धडधड, श्वासोच्छ्वास यासकट इतर साऱ्या अनैच्छिक क्रिया सरतेशेवटी मेंदूच्या नियंत्रणाखाली चालू असतात. तो परिस्थितीवर सतत लक्ष्य ठेवून निरनिराळय़ा अवयवांना त्यांना नेमून दिलेलं काम त्यांनी योग्यरित्या करावं म्हणून सतत संदेश पाठवत असतो आणि त्याचं स्वतःचं काम सुरळीत चालू आहे याची ग्वाहीही तो आपल्या विद्युतलहरींच्या मार्फत देत असतो. म्हणूनच हृदयाचं काम कसं चाललं आहे याची तपासणी करण्यासाठी जसा ईसीजी कामाला येतो तसाच मेंदूच्या कामाचा लेखाजोगा ईईजीच्या मार्फत मिळू शकतो. तेव्हा त्या लहरींच्या मदतीने जेव्हा मेंदूचं कामच थंडावलं असल्याचं स्पष्ट होईल तेव्हाच जीवाचा अंत झाला असं घोषित करावं असं ठरलं. यालाच ब्रेन डेथ असं म्हणतात. आता न्यायालयातही जीवाच्या अंताच्या याच व्याख्येला प्रमाण मानलं जातं.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुख दु:ख जिवाचें सांगेन आपुलें । ह्लदय फुगलें फुटों पाहे ॥१॥धरूनि पीतांबर नेईन एकांतीं । सांगेन जिवींची खंती तया पुढां ॥२॥संतसमागमें खेळवील कौतुकें । प्रेमाचें भा-तुकें देऊनियां ॥३॥अंतरींची आवडी तोचि जाणे एक । जिवलग जनक पंढरीरावो ॥४॥नामा ह्मणे ऐसा आहे पैं भरंवसा । मना तूं विश्वासा दृढ धरीं ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कधीच न दिसणारी शुद्ध हवा आपल्याला प्राणवायू देऊन जाते. न दिसणारा फुलांचा सुंगध मन अगदी प्रसन्न करून जाते. कारण त्यांच्यात स्वार्थ नसतो. तसंच जो कोणी नकळत आपल्याला मदत करते. व परोपकाराची जाणीव देखील ठेवत नाही पण, माणुसकीच्या नात्याने आपला माणुसकी धर्म निभावून दाखवते त्याला कधीही विसरू नये. व जे, मदत तर करत नाही पण, वाटेत काटे पेरण्यासाठी सज्ज असतात त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेऊ नये. कारण ते इतरांचे कधीच चांगले बघू शकत नाही तर उलट बिघडविण्याच्या तयारीत असतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *फळ्याचे महत्त्व*मध्य प्रदेशातील बस्तर जिल्हा फार मागासलेला आहे. आदिवासींची वस्ती तेथे जास्त आहे. अशा भागात “श्री शिवानंद” नावाचा आश्रम आहे. तेथे श्री सदाप्रेमानंदसरस्वती नावाचे तत्त्वनिष्ठ स्वामी मुलांना, मोठ्यांना शिकवीत. त्यांच्यामुळे तेथील लोकांवर चांगले संस्कार झाले.तेथील शाळा पहाण्यास एकदा त्या विभागाचे कमिशनर आले. शाळेचे कार्य पाहून ते प्रभावित झाले. त्यांनी स्वामीजींना म्हटले, “या आश्रमाला काय साहाय्य करू?” स्वामीजींनी मागितला एक फळा. कमिशनरांना मोठे आश्चर्य वाटले. “एवढेच ? ही तर अत्यंत किरकोळ गोष्ट झाली. अधिक काहीतरी मागा.” स्वामीजी मंदपणे हसून म्हणाले, “माझी ही मागणी फार क्षुल्लक वाटते काय ? अहो, या फळ्यावर लिहून, त्यावरून वाचूनच ना तुम्ही मोठे झालाय, कमिशनर झाला, नाही का ?’स्वामींच्या प्रश्नानें कमिशनर प्रभावित झाले. त्यांनी शाळेला उपयुक्त वस्तू व बरीच सुंदर पुस्तके भेट म्हणून दिली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment