✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 एप्रिल 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18vT7xQqyo/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟤 *_जागतिक कला दिवस_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••••• 🟤 *_ या वर्षातील १०५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟤 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९७: मक्केपासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.**१९९४: भारताची गॅट करारावर स्वाक्षरी**१९५०: आचार्य विनोबा भावे यांनी आंध्र प्रदेशातील पंचमपल्ली येथून भूदान चळवळीस प्रारंभ केला**१९४०: दुसरे महयुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.**१८९२: जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली**१६७३: मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.**१८६५: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे निधन. अॅडयु जॅक्सन यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ* 🟤 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟤••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: हेमंत दिनकर सावळे -- लेखक**१९८१: स्मिता हर्डीकर -- कवयित्री**१९७६: प्रा. डॉ. संजय वाघोजी जगताप -- लेखक* *१९७३: अरुण झगडकर -- कवी, लेखक**१९७२: मंदिरा बेदी -- हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री**१९७१: प्रा. डॉ.मिलिंद भाऊरावजी साठे -- लेखक* *१९७०: सुभाष गंगाराम किन्होळकर -- लेखक**१९६९: दिलीप तुळशिरामजी काळे -- कवी**१९६३: मनोज प्रभाकर -- भारतीय क्रिकेटपटूआणि प्रशिक्षक**१९६३: नरेंद्र प्रभू -- लेखक**१९६०:अशोक भैय्याजी लेकुरवाळे-- लेखक* *१९५९: विष्णु गुराबसिंह सोळंके -- प्रसिद्ध ज्येष्ठ कवी, गझलकार, लेखक**१९५५: डॉ. राजा दांडेकर -- लेखक**१९५२: मधुकर आरकडे -- ज्येष्ठ कवी-गीतकार (मृत्यू: १५ मार्च २०१५ )**१९४४: लक्ष्मीनारायण बोल्ली -- मराठी लेखक, अनुवादक व संशोधक,यांनी तेलुगु आणि मराठी अशा दोन्ही भाषांतून लेखन.(मृत्यू: २३ फेब्रुवारी २०१८ )**१९३५: माधव राजाराम पोतदार -- प्रसिद्ध कवी, लेखक(मृत्यू: १६ एप्रिल २०२३ )**१९३२: सुरेश भट – लोकप्रिय गझलकार, कवी (मृत्यू: १४ मार्च २००३ )**१९२२: हसरत जयपुरी – गीतकार (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९९ )**१९१२: मल्हार सदाशिव तथा ’बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक (मृत्यू: १३ जानेवारी १९९७ )**१८९४: भालचंद्र लक्ष्मण पाटणकर -- संपादक, समीक्षक (मृत्यू: १४ सप्टेंबर १९७३ )**१८९३: नरहर रघुनाथ तथा न.र.फाटक – चरित्रकार,टीकाकार,इतिहास संशोधक,संत साहित्याचे अभ्यासक व लेखक (मृत्यू: २१ डिसेंबर १९७९ )**१८९२: पांडुरंग जीवाजी सबनीस -- वैचारिक निबंधलेखक, नाटककार (मृत्यू: २३ जून १९६९ )**१८७४: त्र्यंबक सीताराम कारखानीस -- मराठी नाट्यदिग्दर्शक(मृत्यू: ८ जानेवारी १९५६ )**१७०७:लिओनार्ड ऑयलर – स्विस गणितज्ञ (मृत्यू:१८ सप्टेंबर १७८३)**१४६९: गुरू नानक देव – शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू (मृत्यू: २२ सप्टेंबर १५३९ )* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: विलास गोविंद सारंग -- कवी, कथाकार,कादंबरीकार,समीक्षक (जन्म: ११ जून १९४२ )**२०१३: वि. रा. करंदीकर – संत साहित्याचे अभ्यासक (जन्म: २७ ऑगस्ट १९१९ )**१९९५: पंडित लीलाधर जोशी – तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री**१९९०: ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ’ग्रेटा गार्बो’ – हॉलिवूड अभिनेत्री (जन्म: १८ सप्टेंबर १९०५ )**१९८०: जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी,तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २१ जून १९०५ )**१९१२: एडवर्ड जे. स्मिथ – आर.एम.एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान (जन्म: २७ जानेवारी १८५० )**१८६५: अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची जॉन बूथ याने हत्या केली. (जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ )**१७९४: मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ ’मोरोपंत’ – पंडीतकवी(जन्म: १७२९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लेख - आहेर*लग्न, समारंभ म्हटले की डोळ्यासमोर उभं राहते ते म्हणजे आहेर............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मुंबईच्या चैत्यभूमीवर लाखो आंबेडकरी अनुयायी नतमस्तक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहचा शुभारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पॉप गायिका केटी पेरीसह सर्व सहा महिला अंतराळ प्रवास करून सुरक्षितपणे परतल्या आहेत. त्यांचा हा अंतराळ प्रवास जवळपास 11 मिनिटांचा होता.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *धावत्या एसटी बसला अचानक आग; सोलापुरात बर्निंग बसचा थरार; भीषण घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पाच दिवसांनंतर मुंबईतील टँकरचालकांचा संप मागे, 'आयुक्तांकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही', टँकरचालक संघटना सर्वोच्च न्यायालयात जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *2010 चे साहित्य नोबेल पुरस्कार विजेते लेखक मारियो वर्गास लोका यांचे वयाच्या 89 व्या वर्षी पेरू येथे निधन.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा 2025 च्या शुभंकर व बोधचिन्हाचे अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सारिका भालचिम, शिक्षिका, पुणे 👤 सुधीर गुट्टे, गटशिक्षणाधिकारी, भोकर, नांदेड 👤 प्रा. श्रीराम गव्हाणे, संपादक तथा साहित्यिक, एल. बी. एस. कॉलेज, धर्माबाद 👤 शिवाजी अंबूलगेकर, शिक्षक तथा साहित्यिक, नांदेड 👤 नविद अहमद, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 चंद्रकांत देवके, सेवानिवृत्त शिक्षक 👤 दत्ताहारी पाटील जाधव 👤 सुनील पलांडे, शिक्षक 👤 मुकुंद एडके, धर्माबाद👤 संदीप पारणे, धर्माबाद👤 बबन साखरे 👤 अंकुश दंडेवाड 👤 रामकिशोर झंवर, व्यापारी, धर्माबाद👤 योगेश बलकेवाड, येवती 👤 संतोष लक्ष्मण पाटील, येवती 👤 कालिदास भोगेवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 40*फळ आहे रसदार**पोषक घटकाचा भरमार**आंबट गोड चव माझी खास**त्यासोबत येतो सुवासिक वास**नावासारखा आहे सुंदर रंग माझा**मी तर आहे नागपूरचा राजा**ओळखा पाहू मी आहे कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - हत्ती ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शून्यातून दुनिया निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अमृतसर येथील ब्रिटिश कमिशनरच्या नोंदीनुसार जालियनवाला बाग हत्याकांडात किती व्यक्ती शहीद झाले ?२) 'जालियनवाला बाग स्मृती दिवस' केव्हा साजरा केला जातो ?३) जालियनवाला बाग येथील हत्याकांडास जबाबदार असलेला ब्रिटिश शासक जनरल डायरला कोणी ठार केले ?४) अमृतसर शहरातील जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा घडले ?५) सरदार उधमसिंग यांना जनरल डायरच्या हत्येच्या आरोपाखाली केव्हा फाशी देण्यात आली ? *उत्तरे :-* १) ४८४ २) १३ एप्रिल ३) सरदार शहीद उधमसिंह ( १३ मार्च १९४० ) ४) १३ एप्रिल १९१९ ५) ३१ जुलै १९४०*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *मुलाचा आवाज का फुटतो ?* 📒'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमानं मराठी माणसावर जणू गारूड केलं होतं. त्यातल्या त्या छोट्या छोट्या मुलांनी बड्या बड्या गायकांची गीतं इतक्या तयारीनं गायली होती, की सामान्य रसिक, जाणकार इतकंच काय, पण मान्यवर परीक्षकही भारावून गेले होते. नेहमीच्या परीक्षकांचं काय सांगावं? ते तर त्या मुलांमध्ये त्यांच्यातलेच होऊन मिसळून गेले होते. हसतखेळत त्यांना उत्तेजन देत ते त्यांना त्यांच्यामधल्या ज्या काही त्रुटी होत्या त्यांची जाणीव करून देत होते. ते करतानाही त्यांच्या उणिवांबद्दलच न बोलता कोणत्या बाबतीत सुधारणेला जागा आहे, हेच हळुवारपणे, केवळ वयानं लहान असणाऱ्या स्पर्धकांच्या ध्यानात आणून देत होते. म्हणूनच तर परीक्षकांच्या निर्णयावर त्यांचीच काय, पण त्यांच्या पालकांचीही प्रतिकूल प्रतिक्रिया उमटली नाही. हे नेहमीचेच यशस्वी काय किंवा मान्यवर परीक्षक काय त्या स्पर्धेतील सीनियर गटातील मुलांना परत परत सांगत होते, की आता तुझा आवाज फुटण्याची वेळ आली आहे. तेव्हा जरा जपून राहा. अनिवार्यपणे होणाऱ्या त्या बदलाला कसं सामोरं जायचं यासंबंधीच्या सूचनाही ते देत होते; पण या सूचना मुलींना दिल्या जात नव्हत्या. त्या फक्त मुलांनाच दिल्या जात होत्या. असं का? मुलांचा आणि मुलांचाच आवाज का फुटतो? वयात येताना मुलं आणि मुली, सर्वांच्याच शरीरामध्ये तसंच शरीरक्रियांमध्ये जे काही बदल होत असतात त्याचाच हा परिपाक आहे. त्या काळात काही संप्रेरकांचा स्राव शरीरात प्रथमच सुरू होतो. त्यांच्या प्रभावाखाली वयात येताना उंची, रुंदी यामध्ये तसंच काही अवयवांच्या आकारात आणि त्यांच्या कार्यपद्धतीत बदल होत असतात. मुलांच्या बाबतीत स्वरयंत्र हा त्यातलाच एक अवयव आहे. याचा आकार मोठा होतो. इतका मोठा, की गळ्याच्या बाहेरूनही ते स्वरयंत्र स्पष्टपणे दिसू लागतं. यालाच इंग्रजीमध्ये 'अॅडम्स अॅपल' असं म्हणतात. आवंढा गिळताना हे स्वरयंत्र वर-खाली होत असताना स्पष्ट दिसतं. या मोठ्या आकारामुळं त्यातून उठणारे स्वरही आपली बैठक बदलतात. आवाज खर्जाकडे जाऊ लागतो. त्यापायी तो भरदार होतो. त्यामुळे गाण्यासाठी आवाजाची पट्टी बदलते. यालाच 'आवाज फुटणं' असं म्हणतात. मुलींच्या शरीरातील स्वरयंत्राचा आकारही बदलतो; पण तो तितकासा लक्षणीय नसतो. त्यांचा आवाज अधिक वरच्या पट्टीतला होतो; पण त्या बदलत्या पट्टीशी जुळवून घेणं त्यांना तितकंसं कठीण जात नाही. मुलांच्या बाबतीत मात्र हा पट्टीतला फरक जास्त असतो. त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्यांना अधिक प्रयास करावे लागतात. फुटलेल्या आवाजात आपली मूळची गायकीची खुमारी राखून ठेवण्यासाठी त्यांना जास्त धडपड करावी लागते.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धरोनि हस्तक बैससी एकांतीं । भक्तासी श्रीपती सर्वकाळ ॥१॥ दाखवीं चरण दाखवीं चरण । दाखवीं चरण धांवे नेटें ॥२॥ सर्व आचरण दाविसी प्रकार । कल्पना अंधार निमित्याचा ॥३॥ नामा म्हणे होसी चतुर आपण । आमुचें निर्वान पाहूं नको ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भलेही माणसातील माणुसकी संपत चाललेली असेल तरी आजही काहींमध्ये थोडीतरी माणुसकी जिवंत असताना दिसून येते. म्हणून कोणी माणुसकीच्या नात्याने मदत करण्याचा प्रयत्न करतात तर कोणी न कळताच आधार देऊन जातात.जर असेच विचार आणि एकमेकांप्रती आदर राहिले तर पुन्हा एकदा माणुसकी धर्मात वाढ होऊ शकते. आणि आज या माणुसकी धर्माची खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खऱ्या खोट्याची पारख*एका सोनाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले होते. त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. एके दिवशी सोनाराच्या पत्नीने, आपल्या मुलाला नीलमणीचा एक हार दिला आणि म्हणाली- "बेटा, हा हार घेऊन तुझ्या काकांच्या दुकानात जा आणि त्यांना सांग की हा हार विका व आम्हाला काही पैसे द्या."मुलगा तो हार घेऊन काकांच्या दुकानात गेला. काकांनी त्या हाराकडे बारकाईने पाहिले आणि म्हणाले - "बेटा, आईला सांग की सध्या बाजारात खूप मंदी आहे. थोडे दिवस थांबून नंतर तो विकल्यास, तुम्हाला चांगला भाव मिळेल." त्याला थोडे पैसे देत त्याचे काका म्हणाले, “तू उद्यापासून माझ्याबरोबर दुकानात बसत जा.”दुसऱ्या दिवसापासून तो मुलगा रोज दुकानात जाऊ लागला आणि तिथे बसून हिर्यान्ची आणि रत्नांची पारख कशी करायची, ते शिकू लागला.थोड्याच दिवसात, तो हिऱ्यांचा मोठा पारखी झाला. आपल्या हिऱ्यांची पारख करवून घेण्यासाठी, दूर -दूरवरून लोकं त्याच्याकडे येऊ लागले.एके दिवशी त्याचे काका त्याला म्हणाले, "बेटा, तुझ्या आईकडून तो हार घेऊन ये आणि तिला सांग की आता बाजारात खूप तेजी आहे, त्याला चांगला भाव मिळेल."आईकडून तो हार घेऊन, त्याने स्वत:च त्याची पारख केली असता तो हार नकली असल्याचे त्याला आढळून आले. त्याला आश्चर्य वाटले, की काका स्वत: हिऱ्याचे व रत्नांचे मोठे पारखी आहेत... मग त्यांनी आम्हाला हे का सांगितले नाही?मुलगा तो हार घरीच ठेवून तसाच दुकानात परत आला.काकांनी विचारले, "अरे तू हार का आणला नाहीस?" तो म्हणाला, "काका, तो हार तर नकली आहे... परंतु तुम्ही माझ्यापासून हे का लपवून ठेवलेत?"तेव्हा काका म्हणाले, "जेव्हा तू पहिल्यांदा हार आणला होतास, तेव्हा जर मी तो हार नकली आहे असं सांगितलं असतं, तर तुला असं वाटलं असतं की आज आमच्यावर वाईट वेळ आली आहे, म्हणून काका मला असं सांगत आहेत.पण आज जेव्हा तुला खरं काय आणि खोटं काय, हे पारखण्याचे ज्ञान झाले आहे, तेव्हा तुला समजलेच असेल की तो हार खरोखरीच नकली आहे. त्यावेळी खरं बोलण्यापेक्षा, नातं सांभाळणं, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं."सत्य हे आहे की या जगात, खऱ्या ज्ञानाशिवाय आपण जो काही विचार करतो, पाहतो आणि जाणतो ते चुकीचे आहे. आणि म्हणूनच अशा गैरसमजुतींना बळी पडून आपल्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि आपलं आयुष्य भरकटायला लागतं.इंटरनेटवरून साभार •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment