✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 एप्रिल 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://summerknowledgepark.blogspot.com/2023/04/01-akola.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💧 *_जागतिक जलसंपत्ती दिन'_*💧••••••••••••••••••••••••••••••••••••💧 *_भारतीय पंचायत राज दिवस_*💧•••••••••••••••••••••••••••••••••••• 💧 *_ या वर्षातील ११४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 💧 *_महत्त्वाच्या घटना:_* 💧••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३: ७३ वी घटना दुरुस्ती महिलांना ३३% आरक्षण**१९९३: इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणार्या विमानाचे ३ अतिरेक्यांनी अपहरण केले. ब्लॅक कॅट कमांडोजनी केलेल्या कारवाईत तिन्ही अतिरेकी ठार झाले व सर्व १४१ प्रवाशांची सुखरुप मुक्तता झाली**१९९०: डिस्कव्हरी या अंतराळयानातुन हबल ही दुर्बिण सोडण्यात आली.**१९७०: गाम्बिया प्रजासत्ताक बनले.**१९६८: मॉरिशस संयुक्त राष्ट्रांचा सदस्य बनला.**१९६७: वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमिर कोमारोव्ह हा मरण पावणारा पहिला अंतराळवीर ठरला.**१९२९: इंग्लंड आणि भारत दरम्यान पहिले विमान उड्डाण* *१९२०: पोलंच्या सैनिकांचे युक्रेनवर आक्रमण**१८००: अमेरिकेतील महाप्रचंड अशा लायब्ररी ऑफ काँग्रेसची (Library of Congress) स्थापना झाली. हे जगातील सर्वोत्तम ग्रंथालय आहे.**१७१७:खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला**१६७४: भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करुन जिंकला.*💧 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💧••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: वरुण धवन -- प्रसिद्ध भारतीय सिने-अभिनेता* *१९८१: मेघना सुधीर एरंडे -- भारतीय अभिनेत्री* *१९७८: प्रसाद रामचंद्र नामजोशी -- लेखक, दिग्दर्शक**१९७३: शीबा चड्ढा -- भारतीय चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन अभिनेत्री**१९७३: सचिन तेंडुलकर – महान क्रिकेटपटू, भारतरत्न**१९७०: डॅमियन फ्लेमिंग – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९६३: डॉ. सुरुची सुधीर डबीर -- लेखिका* *१९४७: अरुण काकतकर -- दूरदर्शनचे प्रयोगशील निर्माते व लेखक* *१९५५: दिलीप मुरलीधर देशपांडे -- लेखक, ज्येष्ठ पत्रकार ( विविध वृत्तपत्रामधून विविध विषयावर सातत्याने लेखन )**१९४३: पंडित श्रीराम शहापूरकर -- प्रसिद्ध हार्मोनियम वादक (मृत्यू: ८ ऑक्टोबर २०१४ )**१९४२: बार्बारा स्ट्रायसँड – अमेरिकन अभिनेत्री,गायिका, चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका**१९३९: मीरा कोसंबी -- प्रख्यात भारतीय समाजशास्त्रज्ञ (मृत्यू: २६ फेब्रुवारी २०१५ )* *१९३८: मॅक मोहन -- हिंदी चित्रपटांमधील अभिनेता(मृत्यू: १० मे २०१० )**१९३६: पद्माकर गोवईकर -- मराठी नाटककार व कादंबरीकार(मृत्यू: २२ जुलै २००१ )**१९३५: डॉ. बिंदुमाधव दत्तात्रय पुजारी -- व्यवसायाने डॉक्टर असलेले लेखक**१९३०: बाळ ठाकूर (भालचंद्र श्रीराम ठाकूर)-- महाराष्ट्रातील प्रख्यात मुखपृष्ठ चित्रकार (मृत्यू: ८ जानेवारी २०२२ )* *१९२९: राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक (मृत्यू: १२ एप्रिल २००६ )**१९२४: प्रल्हाद नरहर जोशी --- संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, कादंबरीकार (मृत्यू: ५ जून २००४ )**१९१०: राजा परांजपे –चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७९ )**१९०४: केशव नारायण काळे -- मराठीतील कवी, नाटककार, समीक्षक, चित्रपट निर्माते आणि नियतकालिकांचे संपादक(मृत्यू: २० फेब्रुवारी १९७४ )**१८८९: सर स्टॅफोर्ड क्रिप्स – इंग्लिश राजकारणी (मृत्यू: २१ एप्रिल १९५२ )**१८९६: रघुनाथ वामन दिघे – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार.’पाणकळा’,’सराई’,’पड रे पाण्या’,’आई आहे शेतात’,’गानलुब्धा’, ’मृगनयना’ वगैरे त्यांच्या कादंबर्या अतिशय गाजल्या.(मृत्यू: ४ जुलै १९८० )*💧 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*💧••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: केदार बोदास -- ग्वाल्हेर घराण्यातील एकभारतीय शास्त्रीयगायक( जन्म: २२ एप्रिल १९६३)**२०११: सत्यनारायण राजू ऊर्फ ’सत्य साईबाबा’ – आध्यात्मिक गुरू (जन्म: २३ नोव्हेंबर १९२६ )**२००६: गोविंद मोघाजी गारे -- आदिवासी संस्कृती,आदिवासी साहित्य,आदिवासी कला यांचे गाढे अभ्यासक(जन्म: ४ मार्च १९३९ )**२००४: इंदुमती गंधे -- विदर्भातील बालसाहित्यिक,अनुवादक(जन्म: २० नोव्हेंबर १९२० )**१९९९: सुधेन्दू रॉय – चित्रपट व कला दिग्दर्शक (जन्म: १९२१ )**१९९४: शंतनुराव किर्लोस्कर – पद्मभुषण पुरस्कार विजेते उद्योगपती,किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ (जन्म: २८ मे १९०३)**१९९२: अनंत महादेव मेहंदळे -- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नारदीय कीर्तनकार(जन्म: ७ फेब्रुवारी १९२८ )**१९७४: रामधारी सिंह ’दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक (जन्म: २३ सप्टेंबर १९०८ )**१९७२: जामिनी रॉय – चित्रकार (जन्म: ११ एप्रिल १८८७ )**१९६०: लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर – नामवंत वकील,महाराष्ट्र मंडळाचे एक संस्थापक,केसरीचे संपादक आणि हिंदू महासभेचे नेते (जन्म: १८६० )**१९४२: मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते (जन्म: २९ डिसेंबर १९०० )**१९३५: रघुनाथ पांडुरंग करंदीकर -- व्यासंगी कायदेपंडित,स्वातंत्र्य चळवळीतील प्रभावी नेते,साहित्यिक आणि लोकमान्य टिळकांचे सहकारी (जन्म: २१ ऑगस्ट१८५७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी* समर व्हॅकेशन उपक्रम या उपक्रमांत काय आहे ? ★ महाराष्ट्रातील जिल्ह्याची माहिती★ भारतातील घटकराज्याची माहिती★ केंद्रशासित प्रदेशाची माहिती★ माहितीच्या आधारे तयार केलेले 10 प्रश्न★ संपूर्ण उन्हाळा माहितीचा खजिना★ रोज सकाळी 07 वाजता माझं whatsapp status पाहावं. अन्यथा समुहात join होण्यासाठी " Plz add me " असा msg 9423625769 वर पाठवावे. हसत-खेळत आणि सहजपणे ह्या उपक्रमात सहभागी व्हावे. आज *अकोला जिल्ह्याची* माहिती दिली आहे. वरील लिंकवर क्लिक करा आणि सोप्या सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या.निर्मिती व संकल्पना :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड, 9423625769Z~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पहलगाम हल्यानंतर जम्मू-कश्मीर मध्ये रेड अलर्ट, श्रीनगर गुलमर्गमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक *•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पहलगाममधील दहशतवादी हल्ला प्रकरण, महाराष्ट्रातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत, जखमींना 50 हजारांची मदत जाहीर, अडकलेल्या पर्यटकांसाठी विशेष विमान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांनी नियोजित काश्मीर टूर केल्या रद्द, पर्यटनाला मोठा फटका, शेकडो कोटींचं नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील - मंत्री आदिती तटकरे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *किरण रिजिजु यांच्या उपस्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सवाला सुरुवात.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL च्या इतिहासात 130 डावात 5000 धावा करणारा K L राहुल पहिला फलंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भुमाजी मामीडवार 👤 सौरभ कोतापल्लीवर 👤 कवी विशाल मोरे 👤 अझीझ पटेल👤 अनिरुद्ध उत्तरवार 👤 महावीर जैन 👤 दत्ता फतेपुरे, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 46*वृक्ष आहे पानझडी**त्यावर लागलेत लाल मणी**पिकती मी थंड प्रदेशात**उपलब्ध होतो बाराही महिन्यात**आंबट-गोड बघा चाखून**निरोगी रहा रोज खाऊन**ओळखा पाहू मी आहे कोण?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - जीभ ~~~~~~~~~~~~~~~~विज्ञान कोडेला प्रतिसाद नोंदविणारे वाचक कवी दत्ताहरी कदम, उज्वला इंगळे, माधव तनमुदले, संगीता दरबस्तेवार, दीपश्री वाणी, श्याम ठाणेदार, अर्चना नंदगावकर, मनिषा जोशी, अभयकुमार वडकुते, अनिकेत सायबलू, संतोष कासराळीकर, सुनिता भुरे, भाग्यश्री बाभळीकर, सुरेश द्रोपतवार, अभिनंदन प्रचंड, सौ. लिना सुपारे, सौ. कांताबाई बिंगेवार, संगय्या शिवराज होनगुंटे, बालाजी पाटील चिरलीकर, सिद्धार्थ शिरसे, नवीन आरगुलवार, लालन्ना गुडलावार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेळेवर कामास येते ती खरी कुशल बुद्धिमत्ता.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताची पहिली अम्पुटी जलतरणपटू कोण ?२) २१ एप्रिल १९४७ ला भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांनी नवनियुक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधताना नागरी सेवकांना काय संबोधले ?३) पहिला नागरी सेवा दिवस कोणत्या वर्षापासून साजरा केला जातो ?४) 'कुस्ती खेळण्याची जागा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारतातील नागरी सेवांचा पाया कोणी घातला ? *उत्तरे :-* १) शाश्रुती विनायक नाकाडे, ताडगाव, अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया २) भारताची पोलादी चौकट ३) २१ एप्रिल २००६ ४) आखाडा, हौद ५) वॉरन हेस्टिंग्ज*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पॅथॉलॉजी म्हणजे काय ?* 📙 शरीरांतर्गत अनेक क्रिया प्रक्रिया जन्मल्यापासून चालू असतात. शरीरक्रियाविज्ञानामध्ये त्यांचा वेध घेतला जातो. या कोणत्याही क्रियेमध्ये बिघाड झाला म्हणजे तो बिघाड शोधण्याची प्रक्रिया पॅथालॉजीमध्ये सुरू होते. रक्त, लघवी, थुंकी, रक्ताचे विविध घटक व त्यांचे बदलते प्रमाण या साऱ्यांची तपासणी करून त्यावरून निदान करण्यासाठी या शास्त्राची मदत सारखीच लागत असते. एवढेच नव्हे तर वरवर निरोगी दिसणाऱ्या माणसाच्या पॅथॉलॉजिकल तपासण्या केल्यास अनेक गोष्टी उघडकीला येऊ शकतात. उदाहरणार्थ, नुकताच शरीरात प्रवेश केलेला मधुमेह किंवा सतत थकवा जाणवत असेल, तर आढळणारा रक्तक्षय हा सहसा तपासणीतून अचानक सामोरा येतो.शरीरातील विविध द्रवांच्या चाचण्या घेण्यासाठी सुमारे ३० वर्षांपूर्वी अनेक रासायनिक क्रिया करून मगच निष्कर्षाप्रत येता येत असे. या तंत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक बायोमेडिकल उपकरणांमुळे झपाट्याने प्रगती होत गेली. रक्तातील तांबड्या, पांढऱ्या पेशी मोजण्यासाठी आता सेलकाऊंटरसारखे उपकरण उपलब्ध झाल्याने काही मिनिटांत संपूर्ण तपासणी अचूक पद्धतीत पूर्ण होऊ शकते. रक्तातील साखर, अल्बुमिन किंवा अनेक घटक काही सेकंदात मोजू शकणारी उपकरणे आता रुग्ण स्वतःच्या घरीही वापरू शकतो.शरीरातील नलिकाविरहित ग्रंथींचे (एंडोक्राइन ग्लँड) स्रावांचे प्रमाण मोजणे, विविध हार्मोन्सची शरीरातील पातळी मोजणे हे काही वर्षांपूर्वी अत्यंत त्रासाचे व गुंतागुंतीचे होते. ते आता विविध उपकरणे व त्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या आधीच रासायनिक प्रक्रिया केलेल्या पट्ट्या किंवा द्रावांमुळे कोणत्याही शहरातील प्रशिक्षित तंत्रज्ञ करू शकतो. असे तंत्रज्ञ करा तयार करण्याचे (DMLT / BM Tech) अभ्यासक्रम जवळपास प्रत्येक जिल्ह्याच्या गावीही सुरू झाले आहेत. डॉक्टरी पदवी घेतल्यावर ३ वर्षांचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पॅथालॉजी व बॅक्टेरियॉलॉजी या विषयात तज्ज्ञ म्हणून काम सुरू करता येते. अधिक अनुभवानंतर शरिरातील कोणत्याही अवयवाचे सूक्ष्म तुकडे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासून त्यांतील दोष निश्चित करता येतात. पेशींच्या रचनेचे बदल होऊन कॅन्सरची सुरुवात असेल असेल तर त्याचेही निदान तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्टच करतात. शरीरातील द्रवात सापडणारे जंतू कृत्रिमरित्या वाढवून त्यांच्यावरील उपाययोजना सुचवणे हा बॅक्टेरियॉलॉजीचा भाग असतो.अनैसर्गिक मॄत्यू झाल्यास शवविच्छेदन करणे आवश्यक असते. अशा वेळी शरीरातील विविध भागांचे निरीक्षण करून मृत्यूचे कारण शोधून काढण्यासाठी तज्ज्ञ पॅथॉलॉजीस्टचीच मदत घेतली जाते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बाळपणीं हिची वर्षें गेलीं बारा । खेळतां दे पोरा नाना-मतें ॥१॥विटु दांडु चेंडु लगोर्या बाघोडे । चपे पेडखदे एकीबेकी ॥२॥सेलदोरे खेळी आणि सलवडी । उचलिती धोंडी अंगबळें ॥३॥कोंबडा कोंबडी आणि पाणबुडी । आणि सेलडी लिंबुठिंबु ॥४॥नामा म्हणे ऐसें गेलें बाळपण । मग आलें जाण तारुण्य तें ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांपाशी बळ असते. मग ते बळ पैशाचे असो किंवा जबरदस्त संगतीचे असो किंवा अफाट धन संपत्तीचे. त्या बळामुळे माणूस मनाप्रमाणेच सर्वच काही कमावू शकतो, वाटू शकतो.पण, ज्याच्याकडे खऱ्या दर्जेदार शब्दांची व सत्य समजून घेण्याची ताकद असते ती ताकद मात्र ह्या सर्व, व्यर्थ ताकद पेक्षा कितीतरी महान असते. ही ताकद पैशाने विकत मिळत नाही तर संघर्षातून अनुभव आल्यानेच येत असते. म्हणून तिचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अध्यात्म आणि व्यवहार*एकदा आद्यशंकराचार्य आपल्या शिष्यांसह चालले असता समोरून अचानकपणे एक पिसाळलेला हत्ती धावत येताना दिसला. अर्थातच इतरांच्याबरोबरच शंकराचार्यही हत्तीच्या मार्गातून दूर पळू लागले. त्यांच्या शिष्यवर्गात काही. खट्याळ, तरुण शिष्यही होते. त्यातील एकजण धाडस करून त्यांना म्हणाला, “तुम्हीच आजच्या प्रवचनात म्हणालात की केवळ ब्रह्म हे सत्य आहे व हे दृश्य जग मिथ्या आहे. म्हणजे हा हत्तीही मिथ्या आहे. मग आपण का पळताहात ?’शंकराचार्य लगेच म्हणाले, “पण माझं पळणं हेही मिथ्याच आहे ?” तो तरुण शिष्य ओशाळला. त्याने त्यांची क्षमा मागितली.होतं काय की, ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ याचा चुकीचा अर्थ घेतल्याने अनेक घोटाळे होतात. व्यवहारात अध्यात्म आणू नये व अध्यात्मात व्यवहार आणू नये.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment