✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 एप्रिल 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~समूहात join होण्यासाठी link- https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••♻️ *_ जागतिक वारसा दिन_* ♻️•••••••••••••••••••••••••••••••••••• ♻️ *_ या वर्षातील १०८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ♻️ *_महत्त्वाच्या घटना:_* ♻️•••••••••••••••••••••••••••••••••••• *_जागतिक वारसा दिन_**_आपल्या पूर्वजांनी प्राचीन काळी अनेक मंदिरे, गुहा,लेणी, किल्ले, स्मारके अशा गोष्टी बांधून ठेवल्या आहेत. त्यासंबंधात आस्था निर्माण करण्यासाठी व पुरातन गोष्टींचे जतन होण्यासाठी हा दिवस ’जागतिक वारसा दिन’ (World Heritage Day) म्हणून साजरा केला जातो._*••••••••••••••••••••••••••••••••••*२००१: भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक (GSLV- D1) वाहकाचे रशियन बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाच्या साहाय्‍याने श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण**१९९४: वेस्टइंडीजचा फलंदाज ब्रायन लारा यांच्या विक्रमी३७५ धावा**१९८०: झिंबाब्वेचा स्वातंत्र्य दिन**१९७१: एअर इंडियाचे पहिले बोईंग ७४७ जंबो जेट विमान ’सम्राट अशोक’ शाही दिमाखात सकाळी ८-२० वाजता सांताक्रूझ विमानतळावर दाखल.**१९५४: गामल अब्दल नासर याने इजिप्तची सत्ता ताब्यात घेतली.**१९५०: आंध्र प्रदेशातील तेलंगणा येथील पोचमपल्ली खेड्यातील ८० एकर जमीनीच्या भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली**१९३६: पेशव्यांची राजधानी असणार्‍या पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.**१९३०: क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटले.**१९३०: आज काहीही बातमी नाही असे बी. बी. सी. या नभोवाणी केंद्रावरुन सांगण्यात आले**१९२७: पहिले ख्रिस्ती साहित्य संमेलन डॉ. निकल मॅक्निकल यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे भरले**१९२४: सायमन व शूस्टर यांनी पहिले शब्दकोड्यांचे पुस्तक प्रकाशित केले.**१९१२: ’टायटॅनिक’ मधील वाचलेले ७०५ प्रवासी घेऊन ’कार्पेथिया’ हे जहाज न्यूयॉर्कला पोचले**१८९८: जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी**१८५३: मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.**१८३१: ’यूनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा’ ची स्थापना झाली.**१७२०: शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना कर्‍हाडनजीक मसूर येथे पेशवाईची वस्त्रे मिळाली.*♻️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ♻️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८५: प्रा. डॉ. पराग भास्करराव जोशी -- लेखक, संस्कृत विषयाचे अभ्यासक**१९८३: किरण प्रकाश मोरे --पक्षीप्रेमी, लेखक**१९७६: शेखर गिरी -- कवी,गझलकार* *१९७६: किरण शिवहर डोंगरदिवे -- प्रसिद्ध कवी,समीक्षक आणि ललित लेखक**१९७५: नेहा बाजपेयी -- भारतीय अभिनेत्री आणि निर्माती**१९७१: गणेश विठ्ठलराव कुंभारे -- कवी, लेखक**१९६७: विद्या बनाफर -- कवयित्री, लेखिका* *१९६६: अनिल सूर्या -- कवी, कथाकार**१९६५: प्रा. डॉ. निशा निळकंठ शेंडे -- लेखिका**१९६५: सविता प्रभुणे --- भारतीय अभिनेत्री* *१९५८: माल्कम मार्शल – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९९ )**१९५६: पूनम धिल्लन – अभिनेत्री**१९५०: विजय वाकडे -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९५०: अलका चंद्रकांत दराडे -- कवयित्री, लेखिका**१९४७: महेंद्र संधू -- भारतीय अभिनेता* *१९२३: मधुसूदन परशुराम पेठे -- संत साहित्याचे अभ्यासक, ग्रंथालयशास्त्र तज्ञ* *१९१७: वसुंधरा कृष्णाजी पटवर्धन -- कथाकार, कादंबरीकार, नाटककार, प्रवासवर्णनकार (मृत्यू:२ सप्टेंबर २०१०)**१९१६: ललिता पवार – अभिनेत्री (मृत्यू:२४ फेब्रुवारी १९९८ )**१८९९: काशीनाथ श्रीधर नायक -- कोंकणी कवी, प्रकाशक व मुद्रक**१८५८: महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे – स्त्रीशिक्षण व विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक, पद्मभूषण, भारतरत्‍न (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९६२ )**१७७४: सवाई माधवराव पेशवा -- यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म (मृत्यू: २७ ऑक्टोबर १७९५)* ♻️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ♻️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: अच्युत माधव गोखले -- नागालँडचे माजी मुख्य सचिव आणि केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव (जन्म: ३ जानेवारी १९४६ )**१९९९: रघूवीर सिंह – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार (जन्म: २२ ऑक्टोबर १९४२)**१९९५: पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते – पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक (जन्म: ३० मार्च १९२१)**१९७२: डॉ. पांडुरंग वामन काणे – विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय (जन्म: ७ मे १८८० )**१९६६: जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद – योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ,त्यांनी १९२४ मध्ये ’कैवल्यधाम’ नावाची योगशिक्षणसंस्था स्थापन केली.(जन्म: ३० ऑगस्ट १८८३ )**१९५५: अल्बर्ट आइनस्टाइन – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १४ मार्च १८७९ )**१८९८: दामोदर हरी चापेकर -- यांना फाशी देण्यात आली [चार्ल्स रँड याची हत्या केल्यामुळे] (जन्म: २४ जून १८६९ )**१८८६: बजाबा रामचंद्र प्रधान -- इंग्रजी कवितेचा अनुवाद-अनुकरण करणारे मराठी कवी (जन्म: १८३८)* *१८५९: १८५७ च्या राष्ट्रीय उठावातील सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा ’तात्या’ टोपे यांना फाशी देण्यात आले. (जन्म: १८१४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भुकेले पोट - (लघु कथा) एक दहा वर्षांचा मुलगा राधाच्या गेटजवळ खेळत होता. राधा बाहेर आली आणि ओरडली " हे काय आहे रे ?" "मावशी, मी तुमच्या बागेला स्वच्छ करू का?" "नाही, करू नको, काही गरज नाही." मुलगा हात जोडून अगदी करुणाजनक स्थितीमध्ये, "कृपया करून घ्या ना, मी ते चांगले स्वच्छ करीन." "बरे, ठीक आहे, किती पैसे घेशील ?" "पैसे वगैरे काही नको, मला खायला द्या." "ओह! ठीक आहे." "गरीब भुकेला दिसतोय, मी तुला प्रथम जेवण देतो." राधा म्हणाली"ए पोरा ! अगोदर जेवून घे, मग काम कर." "नाही, मावशी, सर्वप्रथम मी काम करतो, मग मला खायला दे." "ठीक आहे!" असे म्हणत राधा तिच्या कामाला गेली. एका तासांनंतर, "मावशी, पहा आपल्या बागेची स्वच्छता चांगली आहे की नाही". "ओह, वाह! तु उत्तम सफाई केली आहेस, आणि साहित्य देखील एकत्र गोळा केले आहेस" इथे बस, मी जेवण आणतो. " राधाने त्याला जेवण दिले. तेवढ्यात तो आपल्या खिशातून एक चिंधी काढली आणि त्यात बांधून घेऊ लागला. " मी एका भुकेल्या मुलाला काम दिले आहे, अरे इथेच खा जर तुला अजून लागत असेल तर मी अजून देईन" "नाही मावशी, माझ्या घरी माझी आई आजारी आहे, सरकारी हॉस्पिटलमधून मोफत औषध मिळाले, परंतु डॉ. म्हणाले की जेवल्याशिवाय गोळ्या-औषध घेता येणार नाही." हे ऐकून राधा रडू लागली .. आणि स्वत: च्या हातांनी, त्या मुलाची दुसरी आई बनून त्यास जेवू घातले. मग ... तिच्या आईसाठी भाकरी तयार केली .. आणि त्याच्याबरोबर घरी जाऊन त्याच्या आईकडे भाकरी दिली आणि ती म्हणाली ... "बहीण, तू खूप श्रीमंत आहेस .. तु तुझ्या मुलाला जे काही दिले आहे ते आम्ही आमचा मुलांनाही देऊ शकलो नाही स्वावलंबी जीवनाची शिकवण .....✍🏻 नासा येवतीकर, धर्माबाद~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार - शिक्षणमंत्री दादा भुसे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महेश मांजरेकरांना जीवनगौरव, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वे अन् भीमराव पांचाळांनाही पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार, आरोग्य खात्याचा मोठा निर्णय, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांकडून आरोग्य योजनांचा आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारताची स्मार्ट फोन निर्यात पहिल्या स्थानावर ! आश्विनी वैष्णव यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *क्रेडाई पुणे मेट्रोच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा:मनीष जैन यांची 2025-27 कालावधीसाठी अध्यक्षपदी निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *उत्तर प्रदेशात वीज आणि पावसामुळे 13 जणांचा मृत्यू:24 राज्यांमध्ये पावसाची शक्यता; राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा, हरियाणामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकून वर्षाची शानदार सुरुवात केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 हर्षवर्धन घाटे , पत्रकार, बिलोली👤 भक्ती जठार 👤 संदीप बोलचेटवार , धर्माबाद👤 संतोष पुरणशेट्टीवर, धर्माबाद👤 मनोज रामोड👤 अझर शेख👤 बालाजी पोरडवार👤 संदीप काटमवाड, बिलोली👤 सचिन कनोजवर 👤 कृष्णा राय*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 42*रंग माझा हिरवा पिकल्यावर लाल* *दिसतोय जसा गुबगुबीत गाल* *प्रत्येक भाजीत माझीच वर्णी**सलादाच्या चकत्यावर मिठाची फोडणी**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - डोळे ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सूर्य ज्याप्रमाणे आतून बाहेरून निर्मळ व तेजस्वी असतो, त्याप्रमाणे सज्जनांचे अंत:करण अंतर्बाह्य निर्मळ व तेजोमय असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२५ चा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) श्वसन क्रियेद्वारे दूषित हवा आत जात राहिल्याने कोणता रोग होतो ?३) उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती कोण आहेत ?४) 'कमी आयुष्य असलेला' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'कॅप्टन कूल' असे कोणत्या क्रिकेटपटूला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) महेश मांजरेकर, नामवंत अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता २) दमा ३) जगदीप धनखड ४) अल्पायू, अल्पायुषी ५) महेंद्रसिंग धोनी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *उन्हाळी लागणे म्हणजे काय ?* 📕************************बऱ्याचदा उन्हामुळे असा त्रास आपल्याला होत असतो. उन्हाळी लागणे म्हणजे लघवी करताना जळजळ होणे व मूत्रमार्ग दुखणे. लघवीतील पाण्याचे प्रमाण कमी झाले, तर मूत्रनलिकेतील आवरणास इजा होते. त्यामुळे लघवी करताना आग होते. मूत्रनलिकेत आवरणाचा दाह होत असल्याने साध्या लघवीमुळे जळजळ होते. मूत्रपिंडामध्ये लघवी तयार होत असते. मूत्र तयार होण्याचा मुख्य उद्देश म्हणजे शरीरातील पाणी, क्षार यांचे संतुलन राखणे व शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे हा आहे. साहजिकच पाणी कमी प्यायले, तर मूत्राचे प्रमाण कमी होते; परंतु मूत्रातील क्षारांचे व टाकाऊ पदार्थांचे प्रमाण तेवढेच राहते. साहजिकच त्यामुळे लघवी सौम्य न होता जळजळीत होते. अशावेळेस लघवी गडद पिवळी किंवा लालसर दिसते. यामुळे मूत्रनलिकेच्या आवरणाचा दाह होतो. पाणी कमी पिणे, या कारणाशिवाय जंतूसंसर्गामुळे, मूतखड्यामुळे मूत्रनलिकेला दाह होऊन लघवी करतेवेळी जळजळ होते.यावर उपाय म्हणजे नेहमीच विशेषत: उन्हाळ्यात जास्त पाणी पिणे. घामाचे प्रमाण लक्षात घेऊन दिवसभरात एक लिटर लघवी होईल इतके पाणी प्यावे. उन्हाळी लागलेली असल्यास लिंबूपाण्यात खाण्याचा सोडा टाकून प्यावे. १०० मिलीलिटर म्हणजे साधारणतः एक कप पाण्यात २.५ ग्रॅम धने भिजत ठेवून ते पाणी साखर टाकून १२-१२ तासांनी प्यायल्याने उतारा पडतो/ जळजळ कमी होण्यास मदत होते.*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नको गा मोकलूं दीना पंढरिनाथा । तुजविण आतां कोण पावे ॥१॥ अपराधाच्या पोटीं पाहूं नको कांहीं । ये गे विठाबाई झडकरी ॥२॥ माझ्या दोषासाठीं पाठमोरा होसी । पावन ब्रीदासी लागे बोल ॥३॥ नामा म्हणे जननी तूंचि चराचर । तारिले अपार जड जीव ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकच व्यक्ती वाईट नसते आणि दिसणारी प्रत्येक व्यक्ती तेवढीही चांगली नसते. बरेचदा माणसं ओळखताना आपली कुठेतरी चूक होत असते. म्हणून दुसऱ्याला चुकीचे ठरवताना स्वतः मधील चांगले, वाईट गुण शोधण्याचा प्रयत्न करावा. त्यातच ज्याला चांगले म्हणून आपण गुणगान करतो आणि डोळे झाकून विश्वास ठेवतो अशा व्यक्तीचे हावभाव आणि बोलण्याकडे बारीक लक्ष ठेवल्याने कदाचित चांगले, वाईट अनुभव येतील. अनुभव हा गुरू असतो तोच गुरू चांगले काय असते आणि वाईट काय असते यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपली चांगल्याप्रकारे मदत करू शकतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शास्त्राचा उपयोग कोणता ?*प्राचीन भारतात नागार्जुननावाचे एक महान रसायन शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांना एका सहाय्यकाची आवश्यकता होती.दोन तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला आले म्हणा ना – आचार्यांनी दोघात एक पदार्थदिला व त्यापासून एक विशिष्ट रसायन करून आणायला सांगितलं. तीन दिवसाचा अवधी दिला. दोघे उत्साहाने कामाला लागले. तीन दिवसांनी परत आले. आचार्यांनी विचारले, ‘कामात काही अडचणी तर आल्या नाहीत?’ पहिला अभिमानाने म्हणाला, “आईला ताप होता वडील पोटदुखींना हैराण झाले होते. भाऊ पडल्यामुळे हाडाला मार लागला होता. पण माझी साधना मी सोडली नाही व हे रसायन करून आणल आहे.” दुसरा म्हणाला, आचार्य, क्षमा असावी. मी घरी जात असता वाटेत एक वृद्ध रुग्ण दिसला. निर्धनही होता बिचारा. त्याला औषधोपचार करून त्याचे व्यवस्था लावण्यातवेळ गेला. आपण दिलेलं काम पूर्ण करू शकलो नाही. कृपया आणखी दोन दिवसाची सवड द्यावी.आचार्यांनी त्याचीच निवड केली. ते म्हणाले, ‘रसायन शास्त्राचा उपयोग जीवन रक्षणासाठी झाला पाहिजे, समाजविन्मुख ज्ञानाचा काय उपयोग?’ तात्पर्यः ज्ञानाचा/शिक्षणाचा उपयोग समाजात झाला तर खऱ्या अर्थाने शिक्षणाचा उपयोग झाला असे समजावे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment