✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 एप्रिल 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://summerknowledgepark.blogspot.com/2023/04/07.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛑 *_आंतरराष्ट्रीय जॅझ दिवस_* 🛑•••••••••••••••••••••••••••••••••••• 🛑 *_ या वर्षातील १२० वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛑 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛑••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९: ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली. (स्थापना:१९२५)**२००७: दिलीप कुमार यांना फाळके रत्न पुरस्कार**१९९६: थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उद्‍घाटन झाले.**१९९५: ऊत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.**१९७७: ९ राज्यांमधील विधानभा बरखास्त. जनसंघ, समाजवादी पक्ष,संघटना कांग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी ‘जनता पक्ष‘ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.**१९३६: वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.**१७८९: जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले.**१६५७: शिवाजी महाराजांनीमोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नरवर हल्ला केले*🛑 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛑 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: रोहित शर्मा – प्रसिद्ध क्रिकेटपटू भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार**१९७०: पुष्कर श्रोत्री -- चित्रपट अभिनेते, सूत्रसंचालक**१९७०: सुवर्णा व्यंकट मुळजकर -- कवयित्री**१९६७: जयंत कमलाकर झामरे -- लेखक**१९६४: इयान अँड्र्यू हीली -- ऑस्ट्रेलियन माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू**१९६१: दिवाकर शेजवळ -- ज्येष्ठ पत्रकार, लेखक**१९५८: अरुण शेवते -- मराठी भाषेतील साहित्यिक, संपादक व प्रकाशक**१९५५: प्रदीप सरकार -- बॉलीवूडमध्ये काम करणारे भारतीय लेखक आणि दिग्दर्शक (मृत्यू: २४ मार्च २०२३ )**१९५०: डॉ. ह. ना.जगताप -- प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, लेखक* *१९५०: प्रा.अर्जुन बळीराम जाधव -- प्रसिद्ध लेखक**१९४८: डॉ. श्रीराम वसंत गीत -- संशोधक, लेखक**१९२६: श्रीनिवास खळे – प्रसिद्ध संगीतकार (मृत्यू: २ सप्टेंबर २०११ )**१९२४: रामचंद्र सोवनी -- जीवशास्त्रज्ञ,विज्ञान लेखक (मृत्यू: १ मे २००७ )**१९१०: श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ’श्री श्री’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलगु कवी व गीतकार (मृत्यू: १५ जून १९८३ )**१९०९: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ ’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’(मृत्यू: ११ ऑक्टोबर १९६८ )**१८७०: धुंडिराज गोविंद ऊर्फ ’दादासाहेब’ फाळके – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक, लेखक,छायाचित्रकार, दिग्दर्शक, संकलक, वेशभूषाकार, कलादिग्दर्शक (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९४४ )**१८४३: रामचंद्र भिकाजी गुंजीकर --- मराठी ग्रंथकार आणि संपादक (मृत्यू: १८ जून १९०१ )**१७७७: कार्ल फ्रेड्रिक गाऊस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ(मृत्यू: २३ फेब्रुवारी १८५५ )*🛑 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛑••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: ऋषी कपूर- सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते(जन्म: ४ सप्टेंबर १९५२ )**२०१२: अचला सचदेव -- भारतीय चित्रपट अभिनेत्री (जन्म: ३ मे १९२० )**२०१०: डॉ. रमेश शास्त्री -- गीतकार (जन्म: २ ऑगस्ट १९३५)**२००३: वसंत पोतदार – मराठी लेखक, कथाकथनकार आणि स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार (जन्म: २० नोव्हेंबर १९३९ )**२००१: श्रीपाद अच्युत दाभोळकर – ‘प्रयोग परिवार‘ या संकल्पनेचे प्रवर्तक,गणितज्ञ आणि जमनालाल बजाज पुरस्काराने गौरवण्यात आलेले कृषीशास्त्रज्ञ (जन्म: २१ ऑगस्ट १९२४ )**१९४५: नाझी जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर याने आत्महत्या केली (जन्म: २० एप्रिल १८८९ )**१९१३: मोरो केशव दामले – व्याकरणकार व निबंधकार (जन्म: ७ नोव्हेंबर १८६८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळी सुट्टी : ज्ञानाशी गट्टी*समर व्हॅकेशन उपक्रम *आजचा जिल्हा - गडचिरोली*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची तीनही सैन्यदलाच्या प्रमुखांसोबत बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्र देशातील पहिले स्वतंत्र शिप बिल्डिंग धोरण जाहीर करणारे राज्य; जहाज बांधणीमध्ये मोठी क्रांती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 71 जणांचा पद्म पुरस्काराने सन्मान, ज्यामध्ये 4 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक संपन्नटोल माफी ते पीक विमा योजना बाबत घेतले 11 महत्त्वाचे निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कलाविश्वात शोककळा ! प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते, अभिनेते प्रकाश भेंडे यांनी घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *1 मे 2025 पासून एटीएममधून पैसे काढणे महागणार, प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी 23 रुपये द्यावे लागतील*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 - कोलकताने दिल्लीला 14 धावाने हरविले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सौ. अर्चना नागोराव येवतीकर, धर्माबाद👤 गजानन काठेवाड, PSI, नांदेड 👤 शिवाजी भाटापूरकर 👤 श्रीकांत चैनपूरकर 👤 रविकुमार कमलाकर👤 अभिजित नाईनवाड 👤 ओम कांबळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 51*दिसतोय पाण्यासारखा रंग माझा लाल**प्रत्येक प्राण्यात आहे माझा संचार**घेतले आहे स्वतःला चार गटात वाटून**पुढे चालवितो जीवन प्राणवायू मिसळून**जर कराल मला दान**तर वाचवाल इतरांचे प्राण**ओळखा पाहू मी आहे कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - सूर्यफूल ~~~~~~~~~~~~~~~~विज्ञान कोडेला प्रतिसाद नोंदविणारे वाचक माधव तनमुदले, सिद्धार्थ शिरसे, बालाजी पाटील चिरलीकर, सौ. लिना सुपारे, उज्वला इंगळे, दीपश्री वाणी, हरिदास रामदिनवार, श्रावणी भुसेवार, सौ. कांताबाई बिंगेवार, अनिकेत सायबलू, भाग्यश्री बाभळीकर, संगीता दरबस्तेवार, प्रतिक उकले, लालन्ना गुडलावार, अर्चना नंदगावकर, संगय्या शिवराज होनगुंटे, सुरेश द्रोपतवारमनःपूर्वक अभिनंदन .......!••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरी विद्या तीच की ; जिच्यामुळे आपण आपल्या आत्म्याला, स्वतःला, ईश्वराला आणि सत्याला ओळखू शकतो. - महात्मा गांधी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) बीग बेन नावाचे प्रसिध्द मनोरा कोणत्या देशात आहे?२) ई मेल चा अर्थ काय आहे ?३) राष्ट्रीय भाला फेक दिवस केंव्हा असतो?४) "जय जिनेंद्र" या एका अभिवादनाचा अर्थ काय?५) मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केंव्हा झाली आहे?*उत्तरे :-* १) इंग्लंड २) इलेक्ट्रॉनिक मेल . ३) ७ ऑगस्ट. ४) तीर्थंकारास नमस्कार. ५) 14 ऑगस्ट 1962*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌫 *हिमालयाचा जन्म केव्हा झाला ?* 🌫 ************************'उत्तरम् यत्समुद्रस्य । हिमाद्रेश्चैव दक्षिणम् । वर्षं तद् भारतं नाम । भारती यंत्र संतत.' भारतवर्षांची - आपल्या देशाची अशी ओळख सांगितली आहे. म्हणजे सागराच्या उत्तरेस आणि हिमालयाच्या दक्षिणेस असणारा देश. यावरून आपला देश अस्तित्वात आला तेव्हापासून उत्तरेला हिमालयाचा कोट आपलं संरक्षण करत आला आहे अशी आपली समजूत होईल. पण ती बरोबर नाही. कारण हिमालयाचा जन्म आपली भूमी अस्तित्वात आल्यानंतर कितीतरी शतकांनी झाला आहे. किंबहुना धरतीतलावरच्या एकूण उत्तुंग पर्वतांपैकी हिमालय हा सर्वात कमी वयाचा पर्वत आहे.फार फार पूर्वीचं म्हणजे साधारण पृथ्वीचा धगधगता गोळा थंड झाल्यावरचं पृथ्वीचं भौगोलिक रूप फार वेगळं होतं. तिच्या पृष्ठभागापैकी जवळजवळ सारा भाग पाण्यानं व्यापलेला होता. जी काही कमी होती ती आग्नेय कोपऱ्यात म्हणजे आज जिथं साधारणपणे ऑस्ट्रेलिया आहे तिथं एकच एक मुटकुळं करून चुपचाप पडून राहिली होती. तिचं नाव होतं पॅनगाईया. या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे समस्त भूमी. त्यानंतरचा कितीतरी काळ अशीच परिस्थिती राहिली. साधारण साडेबावीस कोटी वर्षांपूर्वी या भूमीच्या गाठोड्याला जात आली. तिच्यात हालचाल सुरू झाली आणि तिचे दोन प्रचंड तुकडे झाले. पुढच्या अडीच कोटी वर्षांमध्ये हे तुकडे एकमेकांपासून पूर्णपणे अलग झाले. उत्तरेचा लॉरेशिया आणि दक्षिणेला गोंडवनालँड. लाॅॆशियाचं वायव्य दिशेनं भ्रमण सुरू झालं. आजची उत्तर अमेरिका आणि युरोप खंडं त्यात समाविष्ट होते. गोंडवनालँडमध्ये आजची आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका वगैरेंचा समावेश होतो. हे दोन्ही भूखंड एकमेकांपासून अलग होत पुढची साडेतेरा कोटी वर्षे दूर दूर जात राहिले. पृथ्वीच्या गाभ्यात तप्त शिलारस असून त्यावरच्या घन कवचाचे हे तुकडे तरंगत असतात. त्यांचं भटकणं अविरत चालूच असतं. यालाच आता वैज्ञानिक भाषेत प्लेट टेक्टॉनिक्स असं म्हणतात. या भूखंडांच्या भटकण्यातून या दोन प्रचंड भूखंडांचेही तुकडे झाले. त्यातूनच उत्तर अमेरिका आणि युरोपही एकमेकांपासून वेगळे झाले. गोंडवनालँडचे तर तीन चार तुकडे झाले. एकात दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका होते. ते पश्चिमेकडे सरकू लागले. दुसऱ्यात ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका होते. त्याचेही दोन तुकडे होऊन अंटार्क्टिका दक्षिण दिशेनं तर ऑस्ट्रेलिया थोडा अाग्नेयाकडे सरकला. एक दुसरा मोठा तुकडा बाजूला होऊन त्याचं एक बेट झालं. ते टेथिस महासागरात तरंगू लागलं. हेच भारतीय उपखंड. कालांतराने तेही वायव्येकडे सरकत राहिलं. आणि साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी त्यानं जाऊन आशिया खंडाला धडक दिली. त्यावेळी भारतीय उपखंडाच्या सरकण्याचा वेगही एका शतकात ९ मीटर एवढा होता. धडकीनंतर तो निम्म्यावर आला. आणि पाच कोटी वर्षांनंतर तो आताच्या एका वर्षांत २-३ सेंटीमीटर एवढा कमी झाला. जमिनीवरून आपण एखादा कागद सरकवत नेला तर तो सरकत राहतो. पण जेव्हा तो भिंतीला भिडतो तेव्हा पुढे सरकू शकत नाही. तरीही सरकण्याचा रेटा चालूच राहिला तर त्याला घड्या पडून तो तिथंच उंचावतो. भारतीय खंडाच्या आशिया खंडाला भिडलेल्या सीमारेषेवर तसाच प्रकार घडला आणि त्यातूनच हिमालयाचा जन्म झाला. टप्प्याटप्प्यानं त्याची उंची वाढत राहिली. ती अजूनही वाढतेच आहे. सर्वात उत्तुंग शहर एव्हरेस्टची उंची गेल्या शंभर वर्षांमध्ये ८-९ मीटरनी वाढली आहे. या रेट्यापायी तिबेटच्या पठाराचाही जन्म झाला. तो भूभाग पाच हजार मिटरने उंचावला गेला. तेव्हा हिमालयाचा जन्म हा गेल्या पाच कोटी वर्षांपूर्वीचा आहे. भारतवर्ष मात्र त्यापूर्वी कितीतरी कोटी वर्षं अस्तित्वात आलं होतं.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जन्मा येऊनियां काय पुण्य केलें । बाळपण गेलें वांयांविण ॥१॥संतसंगें सुख हुंडारलें जाणा । नामसंकीर्तना ओळखत ॥२॥तरुणपणोंहि नाठवेचि देवा । वृद्धपणीं सेवा अंतरली ॥३॥यापरी जन्मुनि गेलसिरे वांयां । पंढरीच्या राया नोळखतां ॥४॥आलों मी संसारीं गुंतलों व्यापारीं । आझूनि कां श्रीहरि नोळखली ॥५॥सहस्र अपराध जरी म्यांरे केले । तारिलें विठ्ठलें म्हणे नामा ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिवसेंदिवस माणसाचे वय वाढत जाते. तसतसे त्याच्यात बदल आलेला दिसून येतो. पण, वाढत्या वयाबरोबरच किंवा परिस्थिती नाजूक असताना सुद्धा ज्यांचे सकारात्मक विचार बदलत नाही हीच खऱ्या अर्थाने त्याच्यांकडे असलेली संपत्ती असते. अशा संपत्तीचा कधीही अंत होत नाही. म्हणून आपल्यासोबत कोणी कसेही वागले तरी चालेल पण,आपण मात्र आपल्यात असलेल्या मौल्यवान संपत्तीला कायमस्वरूपी जपावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••• *मुंगी आणि टोळा*एकदा एक हिरवळीत मुंगी आणि टोळा राहत होते. उन्हाळ्याचे दिवस होते. मुंगी दररोज सकाळी उठून अन्न गोळा करत असे. ती आपल्या घरट्यात धान्याचे कण, लहानसे अन्न साठवायची. ती फार कष्ट करून दिवसभर अन्न साठवायची. पण टोळा मात्र दिवसभर गाणी गात बसायचा. तो मुंगीला हसून म्हणायचा, “अगं, तू इतकी मेहनत का करतेस ? उन्हाळा आहे, मजा कर ! नाच, गा, मोकळा वेळ घालव !”मुंगी म्हणायची, “आपण आता मेहनत केली नाही, तर पावसाळ्यात उपासमारीची वेळ येईल. अन्न साठवणे गरजेचे आहे.”टोळा हसत राहिला आणि मजा करत राहिला. काही महिन्यांनी पावसाळा आला. सर्वत्र पाणीच पाणी झाले. टोळ्याला अन्न मिळेना. त्याला उपासमारीची वेळ आली. शेवटी तो मुंगीच्या घराकडे गेला आणि मदत मागितली. मुंगी म्हणाली, “मी मेहनत केली, म्हणून आज माझ्याकडे अन्न आहे. तू वेळ वाया घालवलीस.”तात्पर्य : "मेहनत करणाऱ्याचे नेहमी चांगले भविष्य असते, तर आळशीपणा संकटात टाकतो."•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 एप्रिल 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://summerknowledgepark.blogspot.com/2023/04/05.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🧿 *_आंतरराष्ट्रीय नृत्य दिन_* 🧿•••••••••••••••••••••••••••••••••••• 🧿 *_ या वर्षातील ११९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🧿 *_महत्त्वाच्या घटना:_* 🧿•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१३: मध्यप्रदेशमध्ये मलखांबाला राज्य खेळाचा दर्जा देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय* *१९९१: बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यात आलेल्या एका भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,००० लोकांचा बळी घेतला तर सुमारे १ कोटि लोक बेघर झाले.**१९४५: दुसरे महायुद्ध – इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली**१९३३: ’प्रभात’चा ’सिंहगड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.* 🧿 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🧿 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०: प्रियदर्शन जाधव -- मराठी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक* *१९७९: आशिष नेहरा -- भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज तथा प्रशिक्षक**१९७२:तुषार जोशी-- कवी* *१९७१: आनंद भाटे -- किराणा घराण्याचे भारतीय शास्त्रीय गायक**१९७०: स्वानंद किरकिरे -- मराठी व हिंदीतील गीतकार, गायक तसेच लेखक* *१९७०: आंद्रे आगासी – अमेरिकन लॉनटेनिस खेळाडू**१९६६: फिल टफनेल – इंग्लिश फिरकी गोलंदाज**१९६५: हेमंत मधुकर डांगे -- प्रसिद्ध कवी,गझलकार, लेखक* *१९६३: डॉ.सुधीर राजाराम देवरे -- प्रसिद्ध कवी, कथाकार, संपादक, अहिराणी भाषा संशोधक**१९५७: दीपक शिर्के -- भारतीय अभिनेता* *१९५२: माधुरी बळवंत पुरंदरे --भाषांतरकार, चरित्रकार, संपादक, नृत्य, नाटक, लेखन, गायन आणि चित्रकला अशा चौफेर क्षेत्रांमध्ये स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान* *१९५०: अनिलकुमार तुळशीरामपंत काटकर -- लेखक**१९४६: अजित जोगी -- काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते,छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री (मृत्यू: २९ मे २०२० )* *१९४६: रवींद्र वसंत गुर्जर -- ज्येष्ठ साहित्यिक, मराठी अनुवादक-लेखक* *१९४६: पं. प्रदीप नाटेकर -- ज्येष्ठ गायक**१९४३: चंद्रकांत मेहेंदळे -- नव्या रंगकर्मींना मार्गदर्शन करणारे, अनेक नाट्य स्पर्धांसाठी परीक्षण करणारे ज्येष्ठ रंगकर्मी (मृत्यू: ३० मे २०२० )**१९३६: झुबिन मेहता – भारतीय संगीतकार**१९२४: पुरुषोत्तम रामचंद्र बेहरे -- मराठी लेखक, संपादक**१९१५: सीताराम किसन उके -- भक्ती गीते (मृत्यू: ६ जून १९५० )**१९११: अनंत हरी लिमये -- लेखक (मृत्यू: २३ जानेवारी १९७४ )**१९१०: अरविंद गंगाधर मंगरूळकर --- संपादक, संशोधक, समीक्षक (मृत्यू: २७ मे १९८६ )**१९०१: मिचेनोमिया हिरोहितो – दुसर्‍या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट (मृत्यू: ७ जानेवारी १९८९ )**१८६७: डॉ.शंकर आबाजी भिसे – भारताचे 'एडिसन' (मृत्यू: ७ एप्रिल १९३५ )**१८४८: राजा रवि वर्मा – भारतीय चित्रकार आणि कलाकार (मृत्यू:२ ऑक्टोबर १९०६)* 🧿 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🧿••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: इरफान खान - चित्रपट अभिनेता (जन्म: ७ जानेवारी १९६७ )**२००६: जे. के. गालब्रेथ – कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ (जन्म: १५ ऑक्टोबर १९०८ )**१९९९: मोहन वसंत गोखले -- मराठी अभिनेते-दिग्दर्शक (जन्म: ७ नोव्हेंबर १९५३ )**१९८०: श्रीकृष्ण केशव क्षीरसागर – लेखक, विचारवंत, समीक्षक (जन्म: ६ नोव्हेंबर १९०१ )**१९८०: सर अल्फ्रेड हिचकॉक – चित्रपट दिग्दर्शक (जन्म: १३ ऑगस्ट १८९९ )**१९६०: पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ ’नवीन’ – हिन्दी कवी.हिन्दीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्‍न केले. (जन्म: ८ डिसेंबर १८९७ )**१९४५: हाइनरिक हिमलर – जर्मन नाझी अधिकारी (जन्म: ७ ऑक्टोबर १९०० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळी सुट्टी : ज्ञानाशी गट्टी*समर व्हॅकेशन उपक्रम *आजचा जिल्हा - धाराशिव*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नवी दिल्ली : शेखर कपूर, अजित कुमार, नंदामुरी बालाकृष्ण यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशातील किनारी राज्याची मत्स्य व्यवसाय परिषद संपन्न, मासेमारी क्षेत्रातील सुधारणा व गुंतवणूक वाढणार.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिल्लीतील वृद्धांसाठी मोफत उपचार, 70+ वयाच्या लोकांना 10 लाख रुपयांपर्यंत उपचार; 5 लाख रुपयांचा विमा देखील उपलब्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ST महामंडळाची श्वेतपत्रिका, मेडिक्लेम योजना, हॉटेल थांब्यासाठी नवं धोरण; परिवहन मंत्र्यांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे शंकर महादेवन अन् सोनाली कुलकर्णीं ठरले ब्रँड ॲम्बेसिडर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सातवीच्या एनसीईआरटीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास हद्दपार !*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 : वैभव सूर्यवंशीच्या दमदार शतका मुळे राजस्थानचा गुजरातवर विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नीलम गायकवाड, उपक्रमशील शिक्षिका, पुणे 👤 राजू गजरे👤 मनोजसिंग चव्हाण, पत्रकार 👤 पांडुरंग डोबडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 50*माझ्यात बघा सूर्याचा आकार**त्यामध्ये मिळतील बिया हजार**खायला येतो पक्षाचा थवा**रंगाने आहे केसरी पिवळा**सूर्याचे करतो पहिले दर्शन**खाऊन होईल मेदांचे पोषण**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - मधमाशी~~~~~~~~~~~~~~~~ विज्ञान कोडेला प्रतिसाद नोंदविणारे वाचक श्रावणी भुसेवार, सौ. कांताबाई बिंगेवार, अर्चना नंदगावकर, संतोष कासराळीकर, कवी दत्ताहरी कदम, सुरेश द्रोपतवार, दीपश्री वाणी, श्याम ठाणेदार, लालन्ना गुडलावार, माधव तनमुदले, भाग्यश्री बाभळीकर, संगीता दरबस्तेवार, सिद्धार्थ शिरसे, बालाजी पाटील चिरलीकर, सौ. लिना सुपारे, उज्वला इंगळे, मनिषा जोशी, हरिदास रामदिनवारमनःपूर्वक अभिनंदन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मातेच्या ममतेचा एक बिंदूही अमृताच्या समुद्रापेक्षा मधुर असतो. - जयशंकर प्रसाद*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२५ मधील जगातील सर्वात सुंदर महिलेचा किताब कोणी पटकावला ?२) पुणे येथील शनिवारवाडा कोणी बांधला ?३) ज्योतिबांना सावित्री कोणत्या नावाने हाक मारीत असे ?४) 'खूप मोठा विस्तार असलेले' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) पहिले बाजीराव पेशवे यांचे मूळ नाव काय होते ? *उत्तरे :-* १) डेमी मूर, अमेरिकन हॉलीवुड अभिनेत्री, वय ६२ वर्षे २) पहिले बाजीराव पेशवा ( सन १७३६ ) ३) शेठजी ४) विस्तीर्ण, ऐसपैस ५) विसाजी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक नृत्य दिवस निमित्ताने लेख**नाचता येईना अंगण वाकडं......*नृत्य कोणाला आवडत नाही ? लहानांपासून थोरापर्यंत सर्वानाच नृत्य आवडते. व्यायामाचा सर्वांगसुंदर प्रकार म्हणजे नृत्य. नृत्य केल्याने आपल्या शरीराच्या सर्वच अवयवाची नकळत हालचाल होते आणि त्यातून आपल्या शरीराची जडणघडण देखील होते. नृत्य करण्यासाठी त्याला संगीताची जोड असावी लागते त्याशिवाय नृत्य करण्यात काही मजा नसते. कुठून तरी बँडचा आवाज कानावर पडला की आपले पाय थिरकायला लागतात. एखादे संगीत ज्यात नृत्य आहे ते ऐकायला मिळाले की मनातून वाटतं की जरा नाचावं. काहीजण मनसोक्त नाचतात तर काहीजण नाचण्यासाठी संकोचतात. प्रत्येकजण मनसोक्त कुठे नाचतो ? तर ते एखाद्या लग्न कार्यात किंवा मिरवणुकीत. त्याठिकाणी कोणाच्याही मनाची पर्वा न करता बेधुंदपणे नाचल्या जाते. मेरे यार की शादी है म्हणत मित्राच्या लग्नात पहिल्यांदा नाचणारे अनेकजण असतात. उत्सवाच्या मिरवणुकीत देखील पहिल्यांदा नाचणारे अनेकजण सहभागी होतात. लाजणारे आणि मनात जराशी शंका बाळगणारे मंडळी घरात एकटे असतांना दारं खिडक्या बंद करून आपल्या आवडत्या गाण्यावर मनसोक्त नाचण्याचा आनंद घेतात. लहान मुलं नाचताना पाहून घरातील सर्वानाच विशेष आनंद होतो. मग ते बाळ नुसते हातपाय हलवले तरी बरं वाटतं. प्रत्येक राज्याची, प्रांताची, धर्माची विशेष अशी पारंपरिक नृत्यकला असते. आदिवासी लोकांची नृत्यकला एक वेगळी प्रकारची असते. गुजरातचा गरबा नृत्य संपूर्ण देशात विशेष करून प्रसिद्ध आहे. तर पंजाबचा पंजाबी नृत्य म्हटले की कानावर ऐकू येतो एक शब्द हाडीप्पा. दक्षिणेत विविध प्रकारचे नृत्य विशेष आकर्षण निर्माण करणारे मनोरंजक आहेत. महाराष्ट्र मध्ये लावणीचा नृत्य प्रकार विशेष करून प्रसिद्ध आहे. जुने मराठी चित्रपट म्हटले त्यात लावणी असणारच. त्याच सोबत आपल्या राज्यात कोळी नृत्य देखील खूप प्रसिद्ध आहे. फक्त नृत्याच्या जोरावर पुढे आलेले कलाकार म्हणून आपण अनेक कलाकारांना ओळखतो त्यात विशेष करून मिथुन चक्रवर्ती, गोविंदा, प्रभुदेवा, चिरंजीवी. यांची नृत्याची शैली आकर्षक आणि सर्वांपेक्षा भिन्न आहे म्हणूनच ते आपले नृत्य जपून आहेत. अभिनेत्रीला नृत्य आल्याशिवाय सिनेमा करता येत नाही. तरीदेखील काही ठळक अभिनेत्री ज्यांनी आपल्या नृत्यावर अनेकांना फिदा केले त्यात हेलन केलर, मीनाकुमारी, हेमामलिनी, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या रॉय असे अनेक नावाची लांबलचक यादी तयार करता येऊ शकेल. आपल्या जीवनात जरासे आनंद मिळवायचे असेल तर मनमुराद नृत्य करता यायला हवं. ज्याप्रकारे बाथरूम सिंगर असतात तसे बेडरूम डान्सर देखील व्हायला पाहिजे. उगीच मला नाचता येत नाही म्हणून नाक मुरडण्यात काही अर्थ नाही. नाचण्यासाठी काही लोकं शिकवणी देखील लावतात. अवश्य लावायला पाहिजे. कोणतेही ज्ञान गुरू शिवाय मिळत नाही. क्रमशः- नासा येवतीकर, धर्माबाद9423625769••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोडी । वासनेची बेडी पडाली पाथीं ॥१॥सोडवण करा आलेनो संसारा । शरण जा उदारा विछोबासी ॥२॥लटकी माया देवी गर्भवासीं गोंवी । नरक भोगवी नानायोनी ॥३॥नामा ह्मणे तुह्मी विचारावें मनीं । सोयरा निर्वाणीं पांडुरंग ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निसर्गाने प्रत्येकालाच तोंड नावाची अनमोल संपत्ती दिली आहे. त्या संपत्तीचा योग्य रितीने वापर केला तर ती संपत्ती अजरामर होऊन जाते. अन् चुकूनही एक शब्द जरी तिच्यातून बाहेर पडल्यावर एखाद्याचे मन तर दुखतोच पण, त्याचे परिणाम सुद्धा स्वतःला ही तेवढेच भोगावे लागतात. म्हणून म्हणतात की, तोंड सांभाळून बोलावे.कदाचित हे खरे असावे म्हणून कोणासोबत किंवा कोणाच्या बाबतीत बोलताना जरा विचार करून बोलावा.कारण चांगले बोलण्याने आपलेही वाईट होणार नाही. अन् नको त्या शब्दात बोलल्याने आपलाही पाहिजे तेवढ्या प्रमाणात सन्मान होणार नाही. कारण ऐकणारे प्रत्येक माणसं बुध्दीहीन नसतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वीर प्रताप आणि स्वावलंबन*प्राचीन भारतात, एका दूरच्या राज्यात प्रताप नावाचा एक तरुण रहात होता. त्याचा जन्म एका सरदाराच्या घरात झाला होता, त्यामुळे सर्व सुखसोयी त्याला मिळाल्या होत्या. पण प्रतापला नेहमीच वाटायचं की यश म्हणजे केवळ वडिलांची पदवी नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वावर मिळालेली प्रतिष्ठा असते.एक दिवस, राज्यावर शत्रूंचा हल्ला झाला. राजा आणि सर्व सरदार रणांगणावर गेले. प्रतापही युद्धात गेला, पण अपघाताने तो एका दूर डोंगराळ भागात हरवला. जवळ न सैनिक होते, न शस्त्रं. फक्त त्याचा धीर होता.अशा कठीण परिस्थितीत प्रतापने स्वतः ठरवलं — "मी इथेच थांबून मदतीची वाट पाहणार नाही. माझ्या बुद्धीने आणि श्रमाने स्वतःच मार्ग शोधेन."त्याने डोंगरातली झाडं वापरून साधी शस्त्रं तयार केली. स्थानिक लोकांना एकत्र करून, त्यांना युद्धाचं शिक्षण दिलं. काही महिन्यांतच प्रतापने एक छोटी पण शिस्तबद्ध सेना उभी केली. जेव्हा राजाला शत्रूंशी झुंजताना अडचण आली, तेव्हा प्रताप आणि त्याच्या सेनेने अचानक युद्धभूमीत प्रवेश केला आणि विजय मिळवून दिला.राजा फारच प्रभावित झाला आणि सगळ्यांसमोर प्रतापचं कौतुक केलं."हा तरुण राजपुत्र आहे, पण त्याचं खरं सामर्थ्य आहे — स्वतःच्या श्रमावर, बुद्धीवर आणि धैर्यावर उभं राहणं," राजा म्हणाला, प्रतापने सर्वांना एक शिकवण दिली - "स्वावलंबन म्हणजे संकटांतही हार न मानता स्वतः मार्ग तयार करणं !"•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 एप्रिल 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://summerknowledgepark.blogspot.com/2023/04/04.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🪻 *_ या वर्षातील ११८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🪻 *_महत्त्वाच्या घटना:_* 🪻••••••••••••••••••••••••••••••••••••*२००२: ब्रम्हा या सुपरसैनिक क्रुझ क्षेपणास्त्राची चाचणी* *१९६९: चार्ल्स द गॉलने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.**१९२०: अझरबैजानचा सोविएत युनियनमधे समावेश झाला.**१९१६: होम रुल लीगची स्थापना*🪻 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🪻••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: डॉ. सुनीता सावरकर -- लेखिका**१९८१: सुजाता वसंत घाटगे -- लेखिका, कवयित्री**१९८०: श्याम राघोजी माळी -- कवी, गीतकार**१९७९: शर्मन जोशी -- भारतीय अभिनेता**१९७५: सुवर्णा अनिल पाटुकले -- प्रसिद्ध कवयित्री* *१९६८: अँडी फ्लॉवर – झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू**१९६१: प्रा. रसिका विठ्ठल देशमुख -- लेखिका आहारतज्ज्ञ**१९५६: पंडीत नयन घोष -- भारतीय तबला आणि सतार वादक**१९५४: उषाकिरण सुन्हेरसिंह आत्राम -- प्रसिद्ध कवयित्री, कथाकार, बालगीतकार**१९५०: स्मिता जोशी- जोहरे -- कवयित्री**१९४९: गीतांजली अविनाश जोशी -- लेखिका, कवयित्री, संपादिका**१९४९: विठ्ठल बुधाजी लांजेवार -- ६व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, कवी, लेखक**१९४२: माईक ब्रेअर्ली – इंग्लिश क्रिकेटर**१९३७: सद्दाम हुसेन – इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्यक्ष (मृत्यू: ३० डिसेंबर २००६ )**१९३१: मधू मंगेश कर्णिक – सुप्रसिद्ध मराठी कथाकार, कादंबरीकार, कवी, संवाद लेखक,६४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष**१९२९: भानू अथैया -- भारतीय पोशाख डिझाइनर आणि चित्रकार(मृत्यू: १५ ऑक्टोबर २०२० )**१९२८: वसंत नरहर फेणे -- कथाकार, कादंबरीकार (मृत्यू: ६ मार्च २०१८ )**१९०६: भवानीशंकर श्रीधर पंडित -- कवी, समीक्षक (मृत्यू: २१ जानेवारी १९७८ )**१९००: विष्णू प्रभाकर लिमये -- लेखक (मृत्यू: २८ मार्च १९८४ )**१७५८: जेम्स मोन्‍रो – अमेरिकेचे ५ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ४ जुलै १८३१ )* 🪻 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🪻••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: सलीम घौस -- भारतीय चित्रपट, दूरदर्शन आणि नाट्य अभिनेते, नाट्य दिग्दर्शक आणि मार्शल आर्टिस्ट (जन्म: १० जानेवारी १९५२ )**२०२१: शेखर ताम्हाणे -- नाट्यलेखक (जन्म:१७ जानेवारी १९५३ )**२०१५: शांता भास्कर बिंबा मोडक -- मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री व गायिका (जन्म: १ एप्रिल १९१९ )**१९९८: रमाकांत देसाई – जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष (जन्म: २० जून १९३९ )**१९९२: डॉ. विनायक कृष्ण गोकाक – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक (जन्म: ९ ऑगस्ट १९०९ )**१९८९: पिंचू कपूर -- भारतीय अभिनेता (जन्म: १९२७ )**१९४५: बेनिटो मुसोलिनी -- इटलीचा हुकूमशहा (जन्म: २९ जुलै १८८३ )**१७४०: थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदातीरी रावेरखेडी या ठिकाणी निधन झाले. (जन्म: १८ ऑगस्ट १७०० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळी सुट्टी : ज्ञानाशी गट्टी*समर व्हॅकेशन उपक्रम *आजचा जिल्हा - छत्रपती संभाजीनगर*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पीडित कुटुंबांना न्याय मिळेल आणि दोषींना व कट रचविणाऱ्याना कडवं प्रत्युत्तर दिलं जाईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुणे :- एकही व्यक्ती बेघर राहणार नाही; केंद्र आणखी १० लाख घरांना देणार मान्यता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पैठण : जायकवाडी धरण निर्मितीला पुढील वर्षी 24 फेब्रुवारीला ५० वर्षे पूर्ण होत असल्याने केंद्र शासन व राज्य शासनाने ‘ड्रीप टू’ योजनेअंतर्गत धरणाचे पुनरुज्जीवन, या कामासाठी ७८ कोटी रुपये निधी मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ येथे दोन हेलिपॅड व आठ वाहनतळे उभारण्यास व विमानतळाच्या विस्तारीकरणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत दिली मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भिवंडीत आगडोंब, चार मजली इमारत कोसळली, कोणतीही जीवितहानी नाही, घटनास्थळी अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या चार जिल्ह्यांना हवामान विभागाचा पावसाचा ऑरेंज अलर्ट.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय महिला क्रिकेट संघाचा दमदार विजय, कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध विजयी सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 निलेश गोधने, शिक्षक, नांदेड 👤 रवींद्र जांबकर 👤 नामदेव पांचाळ 👤 गंगाधर तिपनोड, चिरली, बिलोली 👤 विवेक बैसकर 👤 गोविंद राखेवार 👤 गौतम वाघमारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 49*मी उडते थाटात, सुंदर फुलांच्या घाटात**घर माझे षटकोनी, भरले त्यात गोड पाणी**इवले इवले पंख, स्पर्श करता मारेल डंख**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - घोडा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम उपाय नाही. - महात्मा गांधी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणता असा एकमेव अन्नपदार्थ आहे जो कधीच खराब होत नाही ?२) छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणत्या दोन प्रधानांना सोडून बाकी सर्वांना प्रसंग पडल्यास मोहिमेवर जावे लागे ?३) सत्यशोधक समाजाच्या संदेशाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी कोणते साप्ताहिक सुरू करण्यात आले ?४) 'खूप आयुष्य असलेला' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) ज्या विकारांमध्ये शारीरिक व मानसिक वाढ होत नाही त्या विकारास काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) मध २) पंडितराव व न्यायाधीश ३) दिनबंधू ४) दीर्घायू, दीर्घायुषी ५) क्रेटिनिजम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌎 *पृथ्वीचा जन्म केव्हा झाला ?* 🌎 आपण कोणालाही त्याची जन्मतारीख विचारतो तेव्हा अप्रत्यक्षपणे आपण त्यांचं वय किती आहे, हेच विचारात असतो. पृथ्वीचा जन्म केव्हा झाला हे विचारताना पृथ्वीचं आजमितीचं वय काय आहे हेच आपल्याला जाणून घ्यायचं असतं. ते आता वैज्ञानिक प्रणालींच्या मदतीने जवळजवळ अचूकपणे सांगणे शक्य झालं आहे.पहिली प्रणाली ज्याला भूगर्भशास्त्रज्ञ स्ट्रॅटिग्राफिक अॅनॅलिसिस म्हणतात त्याची आहे. भूगर्भात आणि धरतीच्या पृष्ठभागावरही निरनिराळे कातळांचे थर सापडतात त्यांची चिकित्सा करून ते किती पुरातन आहेत याचा छडा लावण्याची प्रक्रिया या प्रणालीत अंतर्भूत आहे. त्यासाठी उपयोगात आणलेले बहुतेक कातळ रूपांतरित म्हणजेच मेटॅमाॅर्फिक जातीचे आहेत. या कातळांच्या रूपांचं तसंच त्यांच्या वेगवेगळ्या थरात सापडलेल्या जीवाश्मांचं परीक्षण करून त्या कातळांचं वय ठरवलं जातं. ते साधारण साडेतीन अब्ज वर्षे एवढं असल्याचं निदान केलं गेलं आहे. म्हणजेच पृथ्वीचं वय किमान तेवढं असलं पाहिजे. परंतु रूपांतरित खडक अग्निजन्य तसंच गाळांच्या खडकांचं रूपांतर होत होत तयार होत असतात. याचाच अर्थ असा की पृथ्वीचं वय त्याहीपेक्षा जास्त असलं पाहिजे. त्यासाठी रेडिओमेट्रिक डेटिंग प्रणालीचा अवलंब केला गेला. रेडिओकार्बन डेटिंगमध्ये कोणत्याही पदार्थातील कार्बनच्या बारा अणुभाराच्या आणि चौदा अणुभाराच्या अशा दोन समस्थानकांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण तपासलं जातं. यापैकी चौदा अणुभाराचं समस्थानक किरणोत्सारी आहे. निसर्गात या दोन रुपांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण निश्चित आहे. जेव्हा वनस्पती हवेतून कार्बनडायआॅक्साईड शोषून घेतात तेव्हा या दोन रुपांचं वनस्पतींमधील प्रमाणही निसर्गात जेवढं असतं तेवढंच भरतं. पण एकदा का वनस्पती मृत झाली की त्यात त्या वेळी असलेल्या किरणोत्सारी कार्बनच्या रूपाचं प्रमाण घटत जातं. त्यामुळे वनस्पतींच्या किंवा प्राण्यांच्या अवशेषांमधील या दोन रूपांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण मोजून त्या जीवाश्मांचे वय निश्चित करता येते. याच तत्त्वावर आधारित पण कोट्यवधी वर्षे पुरातन असलेल्या वस्तूंचं, खडकांचं वय निश्चित करण्यासाठी युरेनियम शिसं, थोरियम शिसं, रुबिडियम स्ट्रॉन्शियम यासारख्या मूलतत्त्वांच्या जोड्यांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण मोजण्याची पद्धत विकसित केली गेली आहे. तिसरी प्रणाली भूगर्भातील शिशाचं निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या तसंच सौरमालिकेत इतरत्र असलेल्या त्याचं प्रमाण मोजण्याची आहे. या पद्धतीनुसारही पृथ्वी किमान साडेचार अब्ज वर्षांपूर्वी प्रस्थापित झाल्याचं निदान झालं आहे. म्हणजेच पृथ्वीचा जन्म साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाला असं आपण म्हणू शकतो.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जळीं बुडबुडे देखतां देखतां । क्षण न लागतां दि-सेनाती ॥१॥तैसा हा संसार पाहतां पाहतां । अंत:काळीं हासां काय नाहीं ॥२॥गारुडयाचा खेळ दिसे क्षणभर । तैसा हा संप्तार दिसे खरा ॥३॥नामा म्हणे तेथें कांहीं नसे बरें । क्षणाचें हें सर्व खरें आहे ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• माणूस जसा रंग आणि रूपाने वेगळा दिसतो. तसेच त्याचे विचार, राहणीमान, बोलीभाषा, खाद्यपदार्थ हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणून एखाद्याच्या रूपाकडे बघून किंवा त्याच्या बोलीभाषेकडे बघून त्याला नाव ठेवू नये. कोणती वेळ कशी येईल ? हे सांगता येत नाही. रंग, रूप, राहणीमान जरी वेगळे असतील तरी शेवटी तो एक मानव आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बुडत्याला काठीचा आधार*एकदा काही व्यापारी समुद्रातून प्रवास करत होते. अचानक वादळ उठलं. त्यांची नौका भरकटली आणि बुडायला लागली. व्यापाऱ्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. तेवढ्यात समोरून त्यांना एक छोटी नौका येताना दिसली. ती नौका फार मोठी नव्हती, पण तिने व्यापाऱ्यांना एक एक करून वाचवलं. सर्व व्यापारी सुखरूप किनाऱ्यावर पोचले. तात्पर्य - संकटात एखादी छोटी नौका देखील "बुडत्याला काठीचा आधार" ठरते. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 एप्रिल 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://summerknowledgepark.blogspot.com/2023/04/03-ahmadnagar.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🏵️ *_जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन_* 🏵️•••••••••••••••••••••••••••••••••••• 🏵️ *_ या वर्षातील ११६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🏵️ *_महत्त्वाच्या घटना:_* 🏵️•••••••••••••••••••••••••••••••••••• *२००५: आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे सीरीयाने लेबाननमधुन सैन्य काढुन घेतले.**१९९५: आशियाई विभागीय बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वूमन मास्टर किताब मिळवला.हा किताब मिळवणारी निशा ही सर्वात लहान खेळाडू ठरली.**१९८९: बांगलादेशमधे एका भयंकर चक्रीवादळाने माजवलेल्या हाहा:कारात सुमारे १,३०० लोक ठार,१२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले**१९८६: रशियातील चेर्नोबिल येथील अणूभट्टीत भीषण स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात फेकले गेले. हा (तोपर्यंतचा) सर्वात मोठा आण्विक अपघात होता. यानंतरचा मोठा अपघात जपानमधील फुकुशिमा दाई इची अणूभट्टीत २०११ मध्ये आलेल्या त्सुनामीनंतर झाला.**१९७३: अजित नाथ रे यांनी भारताचे १४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला**१९६४: टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश उदयास आला.**१९६२: रेंजर-४ हे नासाचे यान चंद्रावर कोसळले**१९५६: मध्य प्रदेशातील नेपानगर कागद कारखान्याचे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन**१९३३: नाझी जर्मनीच्या ‘गेस्टापो‘ या गुप्त पोलिसदलाची स्थापना झाली.* 🏵️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🏵️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४: प्रा. डॉ. अरुण ठोके -- लेखक, समीक्षक* *१९७६: नागोराव सा.येवतीकर -- प्रसिद्ध स्तंभलेखक, कवी, शिक्षक**१९७३: श्यामसुंदर मिरजकर -- मराठीतील लेखक, कवी**१९७२: विद्या बयास-ठाकूर -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९६६: किरण नामदेव भिंगारदेवे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९६१: नंदिनी सुधीर थत्ते -- प्रसिद्ध लेखिका**१९५९: भारती बिर्जे-डीग्गीकर -- प्रसिद्ध कवयित्री**१९५३: मौशुमी चटर्जी – प्रसिद्ध अभिनेत्री**१९५२: डॉ. उषा खंदारे -- प्रसिद्ध लेखिका**१९५२: पुरुषोत्तम बेर्डे -- मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ दिग्दर्शक, लेखक**१९५२: प्रा. डॉ हरिश्चंद्र गणपत थोरात --ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक व विचारवंत**१९५१: टी. एन. परदेशी -- प्रसिद्ध कवी, लेखक तथा निवृत्त अभियंता**१९४८: कुमुदिनी श्रीधर फेगडे -- लेखिका* *१९४८: डी. बी. जगत्पुरिया -- प्रख्यात कवी, समीक्षक, वरिष्ठ पत्रकार, वक्ता* *१९४५: सुनंदा सुरेश साठे -- जेष्ठ रंगकर्मी, नाटककार* *१९४४: विद्याधर म्हैसाळकर -- प्रसिध्द लेखक**१९४२: मिनो मुमताज -- भारतीय अभिनेत्री (मृत्यू: २३ ऑक्टोबर २०२१ )**१९४०: प्रा. डॉ. श्रीराम देविदास चौधरी -- लेखक* *१९२७: हरि वामन लिमये ऊर्फ हरिभाऊ लिमये -- भारतीय स्वातंत्र्यचळवळीत योगदान देणारे क्रांतिकारक स्वातंत्र्यसेनानी (मृत्यू: १ जानेवारी २०१७ )**१९०३: सखाराम जगन्नाथ भागवत -- विचारवंत, लेखक (मृत्यू: ८ जानेवारी १९७३ )**१८९७: नितीन बोस - भारतीय चित्रपट दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, पटकथा लेखक (मृत्यू: १४ एप्रिल १९८६ )**१५६४: विल्यम शेक्सपियर -- इंग्रजी नाटककार, कवी आणि अभिनेता(मृत्यू: २३ एप्रिल १६१६ )* 🏵️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: उत्तम बंडू तुपे -- ज्येष्ठ लेखक 'झुलवा'कार (जन्म : १ जानेवारी १९४२ )**१९९९: मनमोहन अधिकारी – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान,कम्युनिस्ट नेते (जन्म: २० जून १९२० )**१९८७: शंकरसिंग रघुवंशी – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार (जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ )**१९७६: चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ ’आरती प्रभू’ – प्रसिद्ध साहित्यिक(जन्म: ८ मार्च १९३० )**१९७५: कृष्णाजी केशव कोल्हटकर --- ग्रंथकार,योग व वेदान्त अभ्यासक(जन्म: १४ जानेवारी १८८३ )**१९२०: श्रीनिवास रामानुजन – प्रसिद्ध थोर भारतीय गणिती (जन्म: २२ डिसेंबर १८८७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळी सुट्टी : ज्ञानाशी गट्टी*समर व्हॅकेशन उपक्रम *आजचा जिल्हा - अहिल्यानगर*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्लीत अटक, 24 वर्ष जुन्या प्रकरणात कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिक्षण विभागाच्या पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्यात उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा सुरु.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *NEET पेपर लीकचा मास्टरमाइंड संजीव मुखियाला अटक:पाटण्यातील एका फ्लॅटमध्ये लपला होता; 3 लाखांचे होते इनाम, 11 महिने फरार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या आदिलच्या कुटुंबाला एकनाथ शिंदेकडून आर्थिक मदत, घर देखील बांधून देणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गेल्या 2 दिवसांपासून केंद्रीय नागरी विमानवाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांतून 183 प्रवासी महाराष्ट्रात परतले*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यात पुढील चार ते पाच दिवसात उष्णतेची लाट अन् पावसाचा अंदाज, विदर्भ-मराठवाड्यात गडगडाटासह पावसाची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चे अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 ना. सा. येवतीकर, संयोजक फ्रेश मॉर्निंग बुलेटिन, स्तंभलेखक 👤 प्रदीप खपाटे बन्नाळीकर 👤 महेश शितोळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 48*शक्तीशाली वेगवान चपळ प्राणी* *बसत नाही कधीच जमिनीवर खाली* *पाळीव सस्तन आहे शाकाहारी* *जात आहे माझी एक काठेवाडी* *सवय आहे मला उभ्यानेच झोपण्याची**स्वारी आहे मी राजे महाराजे सैनिकांची**ओळखा पाहू मी आहे कोण?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - सिंह ~~~~~~~~~~~~~~~विज्ञान कोडेला प्रतिसाद नोंदविणारे वाचक श्रावणी भुसेवार, सौ. कांताबाई बिंगेवार, संगय्या शिवराज होनगुंटे, बालाजी पाटील चिरलीकर, नवीन आरगुलवार, उज्वला इंगळे, प्रथमेश येवतीकर, सुरेश द्रोपतवार, माधव तनमुदले, कवी दत्ताहरी कदम, , सौ. लिना सुपारे, दीपश्री वाणी, श्याम ठाणेदार, लालन्ना गुडलावार, सविता अवतिरक, अनिकेत सायबलू, प्रतिक उकले, सुनिता भुरे, सिद्धार्थ शिरसे मनःपूर्वक अभिनंदन .......!••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वकर्तव्यदक्ष राहिल्याने मनुष्य नेहमी सर्वोच्च आणि पूर्णावस्थेत पोचतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सिंधू जल करार कोणत्या दोन देशात झाला ?२) भारत व पाकिस्तान या देशातील सिंधू जल करार केव्हा झाला ?३) जागतिक मलेरिया दिवस २०२५ ची थीम काय आहे ?४) 'कैदी ठेवण्याची जागा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट या संस्थेनुसार २०२४ साठी 'जगातील टॉप स्मार्ट सिटी' कोणती ? *उत्तरे :-* १) भारत व पाकिस्तान २) सप्टेंबर १९६०, कराची ३) मलेरिया आपल्यासोबत संपतो, पुनर्गुंतवणूक करा, पुनर्कल्पना करा, पुनर्जागृत करा ४) कारागृह, बंदिशाळा, तुरुंग ५) झ्युरिक, स्वित्झर्लंड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पर्वत कसे निर्माण झाले ?* 📙 टेकडी, डोंगर, शिखरे व पर्वत या प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ आहे. सपाटीच्या मधील एखादा उंचवटा म्हणजे टेकडी बनते. वालुकामय प्रदेशात अनेक टेकड्या असतात. खडकाळ प्रदेशातील जास्त उंच भागातही टेकड्या असतात. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जर लाव्हारस एकाच मुखाभोवती साठला गेला तर हळूहळू उंच डोंगर बनू लागतो. क्वचित हा उद्रेक फार मोठा असेल, तर मैलोगणती पसरलेले डोंगरांचे स्वरूप असू शकते; पण शिखरे व पर्वत ही संज्ञा मात्र उंचच्या उंच पसरलेल्या पर्वतराजींनाच सहसा लावली जाते. याखेरीज पठार स्वरूपातही काही वेळा डोंगर आढळतात. ज्यावेळी एखादी भूगर्भीय हालचाल थोड्याच मर्यादेत खालीवर होऊन थांबते, तेव्हा ही अनाकलनीय पठारे तयार होतात. पाचगणीचे टेबललँडचे पठार हे असेच. तिबेटचे पठार याचीच फार मोठी आवृत्ती म्हणावी लागेल.जगातील खऱ्या पर्वतांत मोजक्यांचा समावेश होतो. सर्वात उंच, सर्वात लांबवर पसरलेली, सर्वात जास्त उंच शिखरे असलेली पर्वतराजी म्हणजे हिमालय काराकोरमची. याशिवाय आल्प्स, अँडीज व रॉकी या तीन पर्वतराजी या प्रकारात मोडतात. आंतरखंडीय भूकवचाच्या सरकण्याच्या प्रक्रियेत सरकणारा एक भूखंड (भारत) स्थिर भूखंडावर (आशिया) आदळला. हळूहळू जामीन वर उचलली गेली. त्यातून हिमालय पर्वत निर्माण झाला. अन्य पर्वतही असेच निर्माण झाले आहेत. चारही ठिकाणी ही प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या पर्वतराजींची उंची हळूहळू वाढतच आहे.लाव्हारसाच्या उद्भवातून निर्माण होणारे पर्वत म्हणजे इटलीतील व्हेसुव्हियस, जपानमधील फुजी, हवाईमधील मोनाक्रिआ ही प्रसिद्ध उदाहरणे. मोनाक्रिआबद्दल तर असे म्हणता येईल की, हा पाण्याखाली समुद्राच्या तळाशी सहा हजार मीटर खोल सुरू होतो व पाण्यावर चार हजार दोनशे पाच मीटर उंच आहे. उंची समुद्रसपाटीच्या वर मोजली जाते, अन्यथा याचीच उंची दहा हजार मीटरची भरावी. या प्रकारच्या पर्वतांचे वैशिष्ट्य म्हणजे महाकाय असे एकच शिखर व तेथून दूरवर पसरत गेलेला खडबडीत उतार. या उतारावर काही घळी आढळतात. पण त्या खूपच उथळ असतात.पर्वतांचे वैशिष्टय़ म्हणजे तेथील हवामान. पर्जन्यमान व वनराई. अफाट उंचीमुळे पावसाचे ढग अडतात. मोजक्या भागात खूप पाऊस पडतो. तो वेगाने वाहून जाताना स्वतःबरोबर खडकांचे कण व माती धुपून नेतो. या उलट दुसऱ्या बाजूला म्हणजे वाऱ्यांच्या उलट दिशेला उजाड वातावरण राहते. अल्प पर्जन्यमानाने हा भाग दुष्काळी बनतो. हिमालयामुळे अडणारे मान्सूनचे वारे गंगायमुना खोरे समृद्ध करतात, तर तिबेटचा पश्चिमेचा भाग अल्प पावसाचा, उजाडच ठेवतात. पर्वतांची उंची वाढते, तसे तापमान कमी होत जाते. एक वेळ अशी येते की त्या उंचीला सहसा शून्याच्या आसपास तापमान राहते. मग कायम ही शिखरे बर्फाच्छादित राहू लागतात. मग कितीही उष्ण प्रदेशात असली तरीही ही अवस्था कायम राहते. सहा ते सात हजार मीटरदरम्यान ही बर्फाची रेषा कायम बदलत राहते. यावरचे सर्वच भाग पूर्णतः उजाड असतात. वनस्पती व प्राणीजीवन या उंचीवर राहु शकत नाही.दोन पर्वतांमधील घळींमध्ये मात्र हिरवीगार जंगले, नद्यांचे प्रवाह व त्यांच्या आसपास मानवी वस्ती जगभर आढळते. मुख्यतः गुरे पाळणे, थोडीफार शेती, मेंढीपालन या जोडीला अलीकडच्या काळात वाढत चाललेला पर्यटन व्यवसाय हे या डोंगरखोऱ्यातील मुख्य जीवित साधन. भारतातील उत्तमोत्तम अशी पर्यटन स्थळे हिमालयाच्या कुशीत विसावलेली आहेत. अफाट उंचीवरून दूरवरचा दिसणारा निसर्गरम्य परिसर न्याहाळत मजेत वेळ घालवण्यापेक्षा दुसरा पर्यटनाचा आनंद तो कोणता ?‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अवघे निरंतर करा हा विचार । भवसिंधुपार तरीजे ऐसा ॥१॥अवघे जन्म वांयां गेले विषयसंगें । भुललेति वाउगे माया मोहा ॥२॥अवघा वेळ करितां संसाराचा धंदा । वाचे वसो सदा हरिचें नाम ॥३॥अवघ्या भावीं एका विठ्ठलातें भजा । आर्तें करा पूजा हरिदासांची ॥४॥अवघें सुख तुह्मां होईल आपैतें । न याला मागुते गर्भवासा ॥५॥नामा ह्मणे अवघे अनुभवूनि पाहा । सर्वकाळीं रहा संतसंगे ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या आयुष्यात जे काही आपल्यासोबत चांगले, वाईट घडून गेले आहे ते, कधीच विसरता येत नाही. उलट त्या प्रसंगाची आठवण काढून आपण सांगत असतो.पण, आपल्याच आयुष्यात पुढे काय होणार आहे या विषयी मात्र आपण सांगू शकत नाही हे सुद्धा तेवढेच सत्य आहे. म्हणून जे, काही आपल्यासोबत चांगले, वाईट घडून गेले आहे त्यातूनही शिकण्याचा प्रयत्न करावा. कारण समोर काय होणार आहे या विषयी पूर्णपणे कोणीच सागू शकत नाही म्हणून डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आई-वडिलांचे संस्कार*एका गावामध्ये एक प्रामाणिक मुलगा राहत होता. त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर खूप चांगले संस्कार केले होते.तो त्या संस्‍कारांना धरून वागत होता .तो एकदा शेजारच्या घरी काहीतरी कमा निमित गेला. घरी कोणी नव्हते फक्त नोकर होता. नोकराने त्याला बसायला सांगितले आणि नोकर भाजी आणण्या साठी गेला . मुलगा तेथेच बसून राहिला. त्याच्या समोर एका टोपलीत सफरचंद ठेवलेले होते.त्याला सफरचंद खूप आवडायचे परंतु त्याने त्याला हात न लावता तो शेजाऱ्यांची वाट पाहात बसला होता .ब-याच वेळाने शेजारी घरी परत आला त्‍याने पाहिले की मुलगा वाट बघत बसला आहे व त्‍याच्‍या शेजारी सफरचंदे असताणही तो त्‍यांना खात नाही.त्‍या मुलालाही सफरचंद आवडत हे त्यांना माहीत होते तरी त्‍याने त्‍यांना हात लावला नाही.शेजारी आले की त्याने त्यांना नमस्कार केला .शेजाऱ्यांनी त्याला विचारले,”तुला सफरचंद आवडतात ना, मग तरी तू एक ही सफरचंद का खाल्‍ले नाहीस” मुलगा म्‍हणाला,” इथेच कोणीच नव्‍हते, मी एक दोन सफरचंदे जरी खाले असती तरी कुणालाच काही कळले नसते,मला कोणीच पाहत नव्‍हते पण मी स्‍वत:ला पाहात होतो.म्हणून मी खले नाही मी स्‍वत:ला फसवू शकत नाही.शेजाऱ्याला त्याचे बोलणे ऐकून आनंद झाला.तो म्‍हणाला,”आपला आत्‍मा आपण काय करतो ते पाहात असतो, आपण आपल्या आत्म्याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला फसवू पण आपण आल्याला खोटे बोलयाचे फार अवघड आहे.तात्‍पर्य :- लहानपणीच मुलांना खोटे बोलणे अडवल्यास मुले भविष्‍यात योग्‍य दिशेने वाटचाल करतात . मुले वाईट वर्तनाची निघाल्‍यास त्‍याचा दोष आईवडीलांच्या संस्कारचा दोष येतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 एप्रिल 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://summerknowledgepark.blogspot.com/2023/04/02.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌼 *_जागतिक मलेरिया दिवस_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••••••🌼 *_राष्ट्रीय डीएन दिन _* 🌼••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_ या वर्षातील ११५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००: वादग्रस्त आलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत (सध्याची उंची ५०६ मीटर) वाढविण्यास सर्वोच्‍च न्यायालयाने परवानगी दिली.यामुळे २५ वर्षे चालू असलेला न्यायालयातील वाद संपुष्टात आला**१९९२: मॉरिशसमध्ये दुसरी जागतिक मराठी परिषद भरविण्यात आली**१९८९: श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३,३०,००० तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.**१९८३: पायोनिअर-१० हे अंतराळयान सूर्यमालेच्या पलीकडे गेले.**१९६६: एका भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर विनाश झाला.**१९५३: डी.एन.ए.रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध ’नेचर’ मासिकात प्रकाशित झाला.**१९०३: बॅरिस्टर मोहनदास गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत वकिली व्यवसाय सुरू केला तसेच ब्रिटिश इंडियन असोसिएशनची स्थापना केली**१९०१: स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले**१८५९: सुएझ कालव्याची पायाभरणी झाली.* 🌼 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: श्रीया सचिन पिळगांवकर -- सिने-अभिनेत्री* *१९८८: अनिकेत जयंतराव देशमुख -- कवी, स्तंभलेखक* *१९८७: सुरुची अडारकर -- भारतीय मराठी अभिनेत्री**१९७४: दयासागर बाबुराव बन्ने -- कवी, लेखक, समीक्षक* *१९७४: वैशाली सामंत -- भारतीय संगीतकार, गीतकार आणि पार्श्वगायिका**१९७३: बंडूकुमार श्रीरामजी धवणे -- लेखक, संपादक, प्रकाशक* *१९६८: डॉ. मार्तंड दिनकरराव कुळकर्णी -- संत साहित्याचे अभ्यासक,लेखक* *१९६५: अरुण शिवचरण मोडक -- कथा लेखक, वृत्तपत्रांतून नियमित लेखन* *१९६३: प्रा. डॉ. नंदा जयंत पुरी -- लेखिका, संस्कृत भाषा विषयतज्ञ* *१९६१: करण राझदान – अभिनेता, लेखक, दिग्दर्शक**१९५२: अरुण काळे --- मुक्त छंदात काव्य रचना करणारे मराठी कवी (मृत्यू: २० फेब्रुवारी २००८ )* *१९५१: नारायण गोविंदराव अंधारे -- प्रसिद्ध कवी**१९४५: मनोहर रणपिसे -- ज्येष्ठ गझलकार, कवी व लेखक* *१९४३: इ. मो. नारनवरे -- ज्येष्ठ कवी, आंबेडकरी विचारवंत**१९४०: अल पचिनो – हॉलिवूडमधील अभिनेता**१९२९: डॉ. विठ्ठलराव रामजी जीभकाटे -- ज्येष्ठ योगतज्ज्ञ तथा लेखक**१९२४: डॉ.वसंत कृष्ण नाईक -- चरित्रकार, लेखक* *१९१९: हेमवतीनंदन बहुगुणा -- उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री (मृत्यू: १७ मार्च १९८९ )**१९१८: शाहू मोडक – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते (मृत्यू: ११ मार्च १९९३ )**१९१०: शंकर नारायण बर्वे -- सूचिकार (मृत्यू: २३ डिसेंबर १९९६ )**१८७४: गुग्लिएल्मो मार्कोनी – रेडिओचे संशोधक (मृत्यू: २० जुलै १९३७ )* 🌼 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: राजन मिश्रा -- बनारस घराण्याचे ज्येष्ठ गायक (जन्म: २८ ऑक्टोबर १९५१ )* *२००५: विश्वनाथ बागुल -- संगीत रंगभूमीवरील गायक,नट**२००३: लिन चॅडविक – ब्रिटिश शिल्पकार, लोखंड,पोलाद,पितळ,प्लॅस्टर,काच आदी माध्यमांचा उपयोग करुन त्यांनी शिल्पे घडविली. (जन्म: २४ नोव्हेंबर १९१४ )**२००२: इंद्रा देवी – लाटव्हियाच्या योगशिक्षिका (जन्म: १२ मे १८९९ )**१९९९: पंढरीनाथ रेगे – कथाकार, साहित्यिक (जन्म: २३ सप्टेंबर १९१८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळी सुट्टी : ज्ञानाशी गट्टी*समर व्हॅकेशन उपक्रम *आजचा जिल्हा - अमरावती*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द; पुढील तीन दिवसांत सोडावा लागणार भारत देश, CCS चा कठोर निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पुढे ढकलला; पहलगामच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पहलगामच्या दोषींना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होईल, दहशतवाद्याना मातीत गाडण्याची वेळ आली आहे - पंतप्रधान मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग शक्तिपीठ महामार्गाला जोडले जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मेंढ्या चारताना अभ्यास अन् फिरत फिरत शिकला; UPSC परीक्षेत मेंढपाळ बिरदेव सिध्दापा डोणे झाला IPS*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रातील 500 पर्यटक मायभूमीत उतरले; उर्वरीत 232 प्रवाशांसाठी आणखी एका विमानाचे उड्डाण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *RCB ने राजस्थानला 11 धावाने हरवले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीकृष्ण कतूलवार, शिक्षक, ढाणकी👤 अनिकेत देशमुख👤 शादुल्ला शेख, धर्माबाद👤 अनिल इबितदार 👤 पंडित कदम 👤 कांतराव राजरवार 👤 श्रीनिवास नरडेवाड, शिक्षक, धर्माबाद 👤 राजेश अवधूतवार 👤 चंद्रकांत तनमुदले*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 47*मांसभक्षक प्राणी विक्राळ रूप**गळ्याभोवती माझ्या असतात केस खूप* *शक्तीशाली पाय मजबुत जबडा* *खेचत नेतो प्राणी तगडा* *भोजनासाठी करतो शिकार ताजा* *संकटात आहे जंगलचा राजा*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - सफरचंद~~~~~~~~~~~~~~~~विज्ञान कोडेला प्रतिसाद नोंदविणारे वाचक उज्वला इंगळे, सिद्धार्थ शिरसे, भाग्यश्री बाभळीकर, प्रथमेश येवतीकर, सुरेश द्रोपतवार, लालन्ना गुडलावार, सुंदरसिंग साबळे, माधव तनमुदले, अर्चना नंदगावकर, सुनिता भुरे, श्रावणी भुसेवार, सौ. लिना सुपारे, प्रतिक उकलेमनःपूर्वक अभिनंदन ......!••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्व उदात्त कार्यामागे त्याहून उदात्त विचार व विचारप्रणाली हवी; प्रत्यक्ष कृती ही विचार व विचारप्रणालींहून अधिक उदात्त ठरते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २२ एप्रिल २०२५ ला पहलगाम मध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किती पर्यटक मृत्युमुखी पडले ?२) बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता ?३) महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी कोणत्या ग्रंथाची रचना केली ?४) 'केलेले उपकार विसरणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) टेबल लँड या नावाने कोणता भाग ओळखला जातो ? *उत्तरे :-* १) २६ पर्यटक २) त्रिपीटक ३) शेतकऱ्यांचा आसूड ४) कृतघ्न ५) पाचगणी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पर्वत कसे निर्माण झाले ?* 📙 टेकडी, डोंगर, शिखरे व पर्वत या प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ आहे. सपाटीच्या मधील एखादा उंचवटा म्हणजे टेकडी बनते. वालुकामय प्रदेशात अनेक टेकड्या असतात. खडकाळ प्रदेशातील जास्त उंच भागातही टेकड्या असतात. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जर लाव्हारस एकाच मुखाभोवती साठला गेला तर हळूहळू उंच डोंगर बनू लागतो. क्वचित हा उद्रेक फार मोठा असेल, तर मैलोगणती पसरलेले डोंगरांचे स्वरूप असू शकते; पण शिखरे व पर्वत ही संज्ञा मात्र उंचच्या उंच पसरलेल्या पर्वतराजींनाच सहसा लावली जाते. याखेरीज पठार स्वरूपातही काही वेळा डोंगर आढळतात. ज्यावेळी एखादी भूगर्भीय हालचाल थोड्याच मर्यादेत खालीवर होऊन थांबते, तेव्हा ही अनाकलनीय पठारे तयार होतात. पाचगणीचे टेबललँडचे पठार हे असेच. तिबेटचे पठार याचीच फार मोठी आवृत्ती म्हणावी लागेल.जगातील खऱ्या पर्वतांत मोजक्यांचा समावेश होतो. सर्वात उंच, सर्वात लांबवर पसरलेली, सर्वात जास्त उंच शिखरे असलेली पर्वतराजी म्हणजे हिमालय काराकोरमची. याशिवाय आल्प्स, अँडीज व रॉकी या तीन पर्वतराजी या प्रकारात मोडतात. आंतरखंडीय भूकवचाच्या सरकण्याच्या प्रक्रियेत सरकणारा एक भूखंड (भारत) स्थिर भूखंडावर (आशिया) आदळला. हळूहळू जामीन वर उचलली गेली. त्यातून हिमालय पर्वत निर्माण झाला. अन्य पर्वतही असेच निर्माण झाले आहेत. चारही ठिकाणी ही प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या पर्वतराजींची उंची हळूहळू वाढतच आहे.लाव्हारसाच्या उद्भवातून निर्माण होणारे पर्वत म्हणजे इटलीतील व्हेसुव्हियस, जपानमधील फुजी, हवाईमधील मोनाक्रिआ ही प्रसिद्ध उदाहरणे. मोनाक्रिआबद्दल तर असे म्हणता येईल की, हा पाण्याखाली समुद्राच्या तळाशी सहा हजार मीटर खोल सुरू होतो व पाण्यावर चार हजार दोनशे पाच मीटर उंच आहे. उंची समुद्रसपाटीच्या वर मोजली जाते, अन्यथा याचीच उंची दहा हजार मीटरची भरावी. या प्रकारच्या पर्वतांचे वैशिष्ट्य म्हणजे महाकाय असे एकच शिखर व तेथून दूरवर पसरत गेलेला खडबडीत उतार. या उतारावर काही घळी आढळतात. पण त्या खूपच उथळ असतात.पर्वतांचे वैशिष्टय़ म्हणजे तेथील हवामान. पर्जन्यमान व वनराई. अफाट उंचीमुळे पावसाचे ढग अडतात. मोजक्या भागात खूप पाऊस पडतो. तो वेगाने वाहून जाताना स्वतःबरोबर खडकांचे कण व माती धुपून नेतो. या उलट दुसऱ्या बाजूला म्हणजे वाऱ्यांच्या उलट दिशेला उजाड वातावरण राहते. अल्प पर्जन्यमानाने हा भाग दुष्काळी बनतो. हिमालयामुळे अडणारे मान्सूनचे वारे गंगायमुना खोरे समृद्ध करतात, तर तिबेटचा पश्चिमेचा भाग अल्प पावसाचा, उजाडच ठेवतात. पर्वतांची उंची वाढते, तसे तापमान कमी होत जाते. एक वेळ अशी येते की त्या उंचीला सहसा शून्याच्या आसपास तापमान राहते. मग कायम ही शिखरे बर्फाच्छादित राहू लागतात. मग कितीही उष्ण प्रदेशात असली तरीही ही अवस्था कायम राहते. सहा ते सात हजार मीटरदरम्यान ही बर्फाची रेषा कायम बदलत राहते. यावरचे सर्वच भाग पूर्णतः उजाड असतात. वनस्पती व प्राणीजीवन या उंचीवर राहु शकत नाही.दोन पर्वतांमधील घळींमध्ये मात्र हिरवीगार जंगले, नद्यांचे प्रवाह व त्यांच्या आसपास मानवी वस्ती जगभर आढळते. मुख्यतः गुरे पाळणे, थोडीफार शेती, मेंढीपालन या जोडीला अलीकडच्या काळात वाढत चाललेला पर्यटन व्यवसाय हे या डोंगरखोऱ्यातील मुख्य जीवित साधन. भारतातील उत्तमोत्तम अशी पर्यटन स्थळे हिमालयाच्या कुशीत विसावलेली आहेत. अफाट उंचीवरून दूरवरचा दिसणारा निसर्गरम्य परिसर न्याहाळत मजेत वेळ घालवण्यापेक्षा दुसरा पर्यटनाचा आनंद तो कोणता ?‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मिथ्या मायाजाळ मृगजळ बाधा । लागलासे धंदा संसारीया ॥१॥आलेंरे आलेंरे हाकित टाकित । मूढा गिवसीत काळचक्रीं ॥२॥बंधनापासूनि बांधलासे पायीं । बुडतों मी डोहीं निर्जळा ये ॥३॥कोण भरंवसा धरिलासे जिवीं । बळीया सोडवी कदा काळीं ॥४॥पुत्रपत्नी बंधु म्हणसील झणी । धांवोनि निर्वाणीं पाव आतां ॥५॥नामा ह्मणे वेगीं सावधान व्हावें । शरणही जावें पांडुरंगा ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लाख, करोड रुपयाच्या बंगल्यात जरी पंचपक्कवानाचे चविष्ट पदार्थ बणवले जात असले तरी त्याच पदार्थाचा डब्बा तयार करून जंगलात एखाद्या वृक्षाखाली निवांत बसून मोठ्या आवडीने जेवणाचा आनंद घेतला जातो. विशेष म्हणजे मनाला समाधान मिळते. कदाचित त्या वृक्षाची किंमत शानदार बंगल्यापेक्षा जास्त असू शकते. कारण ते स्थळ आणि वृक्ष जगावेगळे असू शकतात. ते कोणाच्याही मदतीविना कशाप्रकारे जगून दाखवतात व आपलेसे करतात त्या वृक्षाकडून शिकण्यासारखे बरेच काही असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शपथ*कोकणातले लोक देवभोळे, श्रद्धावान खऱ्या खोट्याचा निर्णय देवळात लावणारे, देवापुढे शपथ घेऊन कोणी खोटे बोलू शकणार नाही असा विश्वास बाळगणारे त्या विश्वासास जागणारे.कोकणातल्या एका शेतकऱ्याची अवजारे गेली. शेतकऱ्याला वाटत होतं. ती चोरली शेतकामावर येणाऱ्या मजुरांनीच. पण चोरी केल्याचं कोणीच कबूल करीत नव्हतं. शेवटी देवळात देवासमोर शपथेवर तसं प्रत्येकानं सांगावं असं गावकऱ्यांनी ठरविलं. शेजारच्या गावात जागृत देवस्थान होतं. तिथं जाऊन शपथ घेण्याचा निर्णय सगळ्यांना मान्य झाला.प्रमुख गावकऱ्यांसह शेतकरी शेतकामगारांना घेऊन शेजारच्या गावात पोचला. त्यांना दवंडी पिटलेली ऐकू येऊ लागली. जवळ गेल्यावर सगळं स्पष्ट ऐकू आलं.‘एकाऽ हो ऐका, आपल्या गावातल्या देवळातील सुप्रसिद्ध घंटा चोरीला गेली आहे. जो कुणी चोर पकडून देईल, चोरी कुणी केली सांगेल त्याला मोठं बक्षीस दिलं जाईल.दवंडी ऐकून शहाणा शेतकरी बरोबरच्या लोकांना म्हणाला, आपण इथूनच परतू. देवासमोरची घंटा चोरीला गेली. तिचा शोध लागत नाही. चोर सापडत नाही. मग माझी अवजारं चोरणाऱ्या चोराचा पत्ता कसा लागणार ?देवावर कितीही श्रद्धा असली तरी आपले प्रश्न सोडविण्यात अंधश्रद्धा उपयोगी पडत नाहीच.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 एप्रिल 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://summerknowledgepark.blogspot.com/2023/04/01-akola.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💧 *_जागतिक जलसंपत्ती दिन'_*💧••••••••••••••••••••••••••••••••••••💧 *_भारतीय पंचायत राज दिवस_*💧•••••••••••••••••••••••••••••••••••• 💧 *_ या वर्षातील ११४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 💧 *_महत्त्वाच्या घटना:_* 💧••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३: ७३ वी घटना दुरुस्ती महिलांना ३३% आरक्षण**१९९३: इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणार्‍या विमानाचे ३ अतिरेक्यांनी अपहरण केले. ब्लॅक कॅट कमांडोजनी केलेल्या कारवाईत तिन्ही अतिरेकी ठार झाले व सर्व १४१ प्रवाशांची सुखरुप मुक्तता झाली**१९९०: डिस्कव्हरी या अंतराळयानातुन हबल ही दुर्बिण सोडण्यात आली.**१९७०: गाम्बिया प्रजासत्ताक बनले.**१९६८: मॉरिशस संयुक्त राष्ट्रांचा सदस्य बनला.**१९६७: वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमिर कोमारोव्ह हा मरण पावणारा पहिला अंतराळवीर ठरला.**१९२९: इंग्लंड आणि भारत दरम्यान पहिले विमान उड्डाण* *१९२०: पोलंच्या सैनिकांचे युक्रेनवर आक्रमण**१८००: अमेरिकेतील महाप्रचंड अशा लायब्ररी ऑफ काँग्रेसची (Library of Congress) स्थापना झाली. हे जगातील सर्वोत्तम ग्रंथालय आहे.**१७१७:खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला**१६७४: भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करुन जिंकला.*💧 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💧••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: वरुण धवन -- प्रसिद्ध भारतीय सिने-अभिनेता* *१९८१: मेघना सुधीर एरंडे -- भारतीय अभिनेत्री* *१९७८: प्रसाद रामचंद्र नामजोशी -- लेखक, दिग्दर्शक**१९७३: शीबा चड्ढा -- भारतीय चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन अभिनेत्री**१९७३: सचिन तेंडुलकर – महान क्रिकेटपटू, भारतर‍त्‍न**१९७०: डॅमियन फ्लेमिंग – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९६३: डॉ. सुरुची सुधीर डबीर -- लेखिका* *१९४७: अरुण काकतकर -- दूरदर्शनचे प्रयोगशील निर्माते व लेखक* *१९५५: दिलीप मुरलीधर देशपांडे -- लेखक, ज्येष्ठ पत्रकार ( विविध वृत्तपत्रामधून विविध विषयावर सातत्याने लेखन )**१९४३: पंडित श्रीराम शहापूरकर -- प्रसिद्ध हार्मोनियम वादक (मृत्यू: ८ ऑक्टोबर २०१४ )**१९४२: बार्बारा स्ट्रायसँड – अमेरिकन अभिनेत्री,गायिका, चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका**१९३९: मीरा कोसंबी -- प्रख्यात भारतीय समाजशास्त्रज्ञ (मृत्यू: २६ फेब्रुवारी २०१५ )* *१९३८: मॅक मोहन -- हिंदी चित्रपटांमधील अभिनेता(मृत्यू: १० मे २०१० )**१९३६: पद्माकर गोवईकर -- मराठी नाटककार व कादंबरीकार(मृत्यू: २२ जुलै २००१ )**१९३५: डॉ. बिंदुमाधव दत्तात्रय पुजारी -- व्यवसायाने डॉक्टर असलेले लेखक**१९३०: बाळ ठाकूर (भालचंद्र श्रीराम ठाकूर)-- महाराष्ट्रातील प्रख्यात मुखपृष्ठ चित्रकार (मृत्यू: ८ जानेवारी २०२२ )* *१९२९: राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक (मृत्यू: १२ एप्रिल २००६ )**१९२४: प्रल्हाद नरहर जोशी --- संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, कादंबरीकार (मृत्यू: ५ जून २००४ )**१९१०: राजा परांजपे –चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७९ )**१९०४: केशव नारायण काळे -- मराठीतील कवी, नाटककार, समीक्षक, चित्रपट निर्माते आणि नियतकालिकांचे संपादक(मृत्यू: २० फेब्रुवारी १९७४ )**१८८९: सर स्टॅफोर्ड क्रिप्स – इंग्लिश राजकारणी (मृत्यू: २१ एप्रिल १९५२ )**१८९६: रघुनाथ वामन दिघे – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार.’पाणकळा’,’सराई’,’पड रे पाण्या’,’आई आहे शेतात’,’गानलुब्धा’, ’मृगनयना’ वगैरे त्यांच्या कादंबर्‍या अतिशय गाजल्या.(मृत्यू: ४ जुलै १९८० )*💧 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*💧••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: केदार बोदास -- ग्वाल्हेर घराण्यातील एकभारतीय शास्त्रीयगायक( जन्म: २२ एप्रिल १९६३)**२०११: सत्यनारायण राजू ऊर्फ ’सत्य साईबाबा’ – आध्यात्मिक गुरू (जन्म: २३ नोव्हेंबर १९२६ )**२००६: गोविंद मोघाजी गारे -- आदिवासी संस्कृती,आदिवासी साहित्य,आदिवासी कला यांचे गाढे अभ्यासक(जन्म: ४ मार्च १९३९ )**२००४: इंदुमती गंधे -- विदर्भातील बालसाहित्यिक,अनुवादक(जन्म: २० नोव्हेंबर १९२० )**१९९९: सुधेन्दू रॉय – चित्रपट व कला दिग्दर्शक (जन्म: १९२१ )**१९९४: शंतनुराव किर्लोस्कर – पद्मभुषण पुरस्कार विजेते उद्योगपती,किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ (जन्म: २८ मे १९०३)**१९९२: अनंत महादेव मेहंदळे -- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नारदीय कीर्तनकार(जन्म: ७ फेब्रुवारी १९२८ )**१९७४: रामधारी सिंह ’दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक (जन्म: २३ सप्टेंबर १९०८ )**१९७२: जामिनी रॉय – चित्रकार (जन्म: ११ एप्रिल १८८७ )**१९६०: लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर – नामवंत वकील,महाराष्ट्र मंडळाचे एक संस्थापक,केसरीचे संपादक आणि हिंदू महासभेचे नेते (जन्म: १८६० )**१९४२: मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते (जन्म: २९ डिसेंबर १९०० )**१९३५: रघुनाथ पांडुरंग करंदीकर -- व्यासंगी कायदेपंडित,स्वातंत्र्य चळवळीतील प्रभावी नेते,साहित्यिक आणि लोकमान्य टिळकांचे सहकारी (जन्म: २१ ऑगस्ट१८५७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी* समर व्हॅकेशन उपक्रम या उपक्रमांत काय आहे ? ★ महाराष्ट्रातील जिल्ह्याची माहिती★ भारतातील घटकराज्याची माहिती★ केंद्रशासित प्रदेशाची माहिती★ माहितीच्या आधारे तयार केलेले 10 प्रश्न★ संपूर्ण उन्हाळा माहितीचा खजिना★ रोज सकाळी 07 वाजता माझं whatsapp status पाहावं. अन्यथा समुहात join होण्यासाठी " Plz add me " असा msg 9423625769 वर पाठवावे. हसत-खेळत आणि सहजपणे ह्या उपक्रमात सहभागी व्हावे. आज *अकोला जिल्ह्याची* माहिती दिली आहे. वरील लिंकवर क्लिक करा आणि सोप्या सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या.निर्मिती व संकल्पना :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड, 9423625769Z~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पहलगाम हल्यानंतर जम्मू-कश्मीर मध्ये रेड अलर्ट, श्रीनगर गुलमर्गमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक *•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पहलगाममधील दहशतवादी हल्ला प्रकरण, महाराष्ट्रातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत, जखमींना 50 हजारांची मदत जाहीर, अडकलेल्या पर्यटकांसाठी विशेष विमान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांनी नियोजित काश्मीर टूर केल्या रद्द, पर्यटनाला मोठा फटका, शेकडो कोटींचं नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील - मंत्री आदिती तटकरे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *किरण रिजिजु यांच्या उपस्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सवाला सुरुवात.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL च्या इतिहासात 130 डावात 5000 धावा करणारा K L राहुल पहिला फलंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भुमाजी मामीडवार 👤 सौरभ कोतापल्लीवर 👤 कवी विशाल मोरे 👤 अझीझ पटेल👤 अनिरुद्ध उत्तरवार 👤 महावीर जैन 👤 दत्ता फतेपुरे, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 46*वृक्ष आहे पानझडी**त्यावर लागलेत लाल मणी**पिकती मी थंड प्रदेशात**उपलब्ध होतो बाराही महिन्यात**आंबट-गोड बघा चाखून**निरोगी रहा रोज खाऊन**ओळखा पाहू मी आहे कोण?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - जीभ ~~~~~~~~~~~~~~~~विज्ञान कोडेला प्रतिसाद नोंदविणारे वाचक कवी दत्ताहरी कदम, उज्वला इंगळे, माधव तनमुदले, संगीता दरबस्तेवार, दीपश्री वाणी, श्याम ठाणेदार, अर्चना नंदगावकर, मनिषा जोशी, अभयकुमार वडकुते, अनिकेत सायबलू, संतोष कासराळीकर, सुनिता भुरे, भाग्यश्री बाभळीकर, सुरेश द्रोपतवार, अभिनंदन प्रचंड, सौ. लिना सुपारे, सौ. कांताबाई बिंगेवार, संगय्या शिवराज होनगुंटे, बालाजी पाटील चिरलीकर, सिद्धार्थ शिरसे, नवीन आरगुलवार, लालन्ना गुडलावार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेळेवर कामास येते ती खरी कुशल बुद्धिमत्ता.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताची पहिली अम्पुटी जलतरणपटू कोण ?२) २१ एप्रिल १९४७ ला भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांनी नवनियुक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधताना नागरी सेवकांना काय संबोधले ?३) पहिला नागरी सेवा दिवस कोणत्या वर्षापासून साजरा केला जातो ?४) 'कुस्ती खेळण्याची जागा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारतातील नागरी सेवांचा पाया कोणी घातला ? *उत्तरे :-* १) शाश्रुती विनायक नाकाडे, ताडगाव, अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया २) भारताची पोलादी चौकट ३) २१ एप्रिल २००६ ४) आखाडा, हौद ५) वॉरन हेस्टिंग्ज*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पॅथॉलॉजी म्हणजे काय ?* 📙 शरीरांतर्गत अनेक क्रिया प्रक्रिया जन्मल्यापासून चालू असतात. शरीरक्रियाविज्ञानामध्ये त्यांचा वेध घेतला जातो. या कोणत्याही क्रियेमध्ये बिघाड झाला म्हणजे तो बिघाड शोधण्याची प्रक्रिया पॅथालॉजीमध्ये सुरू होते. रक्त, लघवी, थुंकी, रक्ताचे विविध घटक व त्यांचे बदलते प्रमाण या साऱ्यांची तपासणी करून त्यावरून निदान करण्यासाठी या शास्त्राची मदत सारखीच लागत असते. एवढेच नव्हे तर वरवर निरोगी दिसणाऱ्या माणसाच्या पॅथॉलॉजिकल तपासण्या केल्यास अनेक गोष्टी उघडकीला येऊ शकतात. उदाहरणार्थ, नुकताच शरीरात प्रवेश केलेला मधुमेह किंवा सतत थकवा जाणवत असेल, तर आढळणारा रक्तक्षय हा सहसा तपासणीतून अचानक सामोरा येतो.शरीरातील विविध द्रवांच्या चाचण्या घेण्यासाठी सुमारे ३० वर्षांपूर्वी अनेक रासायनिक क्रिया करून मगच निष्कर्षाप्रत येता येत असे. या तंत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक बायोमेडिकल उपकरणांमुळे झपाट्याने प्रगती होत गेली. रक्तातील तांबड्या, पांढऱ्या पेशी मोजण्यासाठी आता सेलकाऊंटरसारखे उपकरण उपलब्ध झाल्याने काही मिनिटांत संपूर्ण तपासणी अचूक पद्धतीत पूर्ण होऊ शकते. रक्तातील साखर, अल्बुमिन किंवा अनेक घटक काही सेकंदात मोजू शकणारी उपकरणे आता रुग्ण स्वतःच्या घरीही वापरू शकतो.शरीरातील नलिकाविरहित ग्रंथींचे (एंडोक्राइन ग्लँड) स्रावांचे प्रमाण मोजणे, विविध हार्मोन्सची शरीरातील पातळी मोजणे हे काही वर्षांपूर्वी अत्यंत त्रासाचे व गुंतागुंतीचे होते. ते आता विविध उपकरणे व त्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या आधीच रासायनिक प्रक्रिया केलेल्या पट्ट्या किंवा द्रावांमुळे कोणत्याही शहरातील प्रशिक्षित तंत्रज्ञ करू शकतो. असे तंत्रज्ञ करा तयार करण्याचे (DMLT / BM Tech) अभ्यासक्रम जवळपास प्रत्येक जिल्ह्याच्या गावीही सुरू झाले आहेत. डॉक्टरी पदवी घेतल्यावर ३ वर्षांचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पॅथालॉजी व बॅक्टेरियॉलॉजी या विषयात तज्ज्ञ म्हणून काम सुरू करता येते. अधिक अनुभवानंतर शरिरातील कोणत्याही अवयवाचे सूक्ष्म तुकडे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासून त्यांतील दोष निश्चित करता येतात. पेशींच्या रचनेचे बदल होऊन कॅन्सरची सुरुवात असेल असेल तर त्याचेही निदान तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्टच करतात. शरीरातील द्रवात सापडणारे जंतू कृत्रिमरित्या वाढवून त्यांच्यावरील उपाययोजना सुचवणे हा बॅक्टेरियॉलॉजीचा भाग असतो.अनैसर्गिक मॄत्यू झाल्यास शवविच्छेदन करणे आवश्यक असते. अशा वेळी शरीरातील विविध भागांचे निरीक्षण करून मृत्यूचे कारण शोधून काढण्यासाठी तज्ज्ञ पॅथॉलॉजीस्टचीच मदत घेतली जाते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बाळपणीं हिची वर्षें गेलीं बारा । खेळतां दे पोरा नाना-मतें ॥१॥विटु दांडु चेंडु लगोर्‍या बाघोडे । चपे पेडखदे एकीबेकी ॥२॥सेलदोरे खेळी आणि सलवडी । उचलिती धोंडी अंगबळें ॥३॥कोंबडा कोंबडी आणि पाणबुडी । आणि सेलडी लिंबुठिंबु ॥४॥नामा म्हणे ऐसें गेलें बाळपण । मग आलें जाण तारुण्य तें ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांपाशी बळ असते. मग ते बळ पैशाचे असो किंवा जबरदस्त संगतीचे असो किंवा अफाट धन संपत्तीचे. त्या बळामुळे माणूस मनाप्रमाणेच सर्वच काही कमावू शकतो, वाटू शकतो.पण, ज्याच्याकडे खऱ्या दर्जेदार शब्दांची व सत्य समजून घेण्याची ताकद असते ती ताकद मात्र ह्या सर्व, व्यर्थ ताकद पेक्षा कितीतरी महान असते. ही ताकद पैशाने विकत मिळत नाही तर संघर्षातून अनुभव आल्यानेच येत असते. म्हणून तिचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अध्यात्म आणि व्यवहार*एकदा आद्यशंकराचार्य आपल्या शिष्यांसह चालले असता समोरून अचानकपणे एक पिसाळलेला हत्ती धावत येताना दिसला. अर्थातच इतरांच्याबरोबरच शंकराचार्यही हत्तीच्या मार्गातून दूर पळू लागले. त्यांच्या शिष्यवर्गात काही. खट्याळ, तरुण शिष्यही होते. त्यातील एकजण धाडस करून त्यांना म्हणाला, “तुम्हीच आजच्या प्रवचनात म्हणालात की केवळ ब्रह्म हे सत्य आहे व हे दृश्य जग मिथ्या आहे. म्हणजे हा हत्तीही मिथ्या आहे. मग आपण का पळताहात ?’शंकराचार्य लगेच म्हणाले, “पण माझं पळणं हेही मिथ्याच आहे ?” तो तरुण शिष्य ओशाळला. त्याने त्यांची क्षमा मागितली.होतं काय की, ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ याचा चुकीचा अर्थ घेतल्याने अनेक घोटाळे होतात. व्यवहारात अध्यात्म आणू नये व अध्यात्मात व्यवहार आणू नये.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 एप्रिल 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1EMnQRkpp5/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📘 *_जागतिक पुस्तक दिन_* 📘•••••••••••••••••••••••••••••••••••• 📘 *_ या वर्षातील ११३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 📘 *_महत्त्वाच्या घटना:_* 📘••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१३: इंडियन प्रीमियर लीगमध्ये ख्रिस गेलच्या ६६ चेंडूत नाबाद १७५ धावा**१९९९: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना* *१९९०: नामिबिया संयुक्त राष्ट्रांत प्रवेश होऊन तो १६० वा सदस्य देश बनला.**१८१८: दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले.* 📘 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*📘 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: अविनाश अरुणा मधुकर जगदेव -- लेखक* *१९८७: प्रिया मराठे -- मराठी अभिनेत्री**१९८६: डॉ. पवन अशोकराव कोरडे -- कवी**१९८१: निलेश बळीराम गोरे -- लेखक* *१९७४: श्वेता मेनन -- भारतीय टेलिजन अँकर आणि अभिनेत्री**१९७२: माधुरी महेंद्र चौधरी -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९६९: मनोज बाजपेयी -- भारतीय अभिनेता**१९६८: किशोरी शहाणे-विज -- शास्त्रीय आणि लोकनृत्य नृत्यांगना, चित्रपट अभिनेत्री आणि चित्रपट निर्मात्या**१९६६: रमेश पांडुरंग जाधव -- कवी**१९६३: योगीराज वसंत माने -- कवी, लेखक* *१९५७: जयदेव डोळे -- मराठीतले वैचारिक लिखाण करणारे समाजवादी विचारसरणीचे लेखक, संपादक* *१९५६: प्रा. अनिरुद्ध गोपाळ बनहट्टी -- लेखक* *१९५६: विश्वास विष्णू देशपांडे -- प्रसिद्ध लेखक, कवी* *१९५६: कार्व्हालो सिसिलिया फ्रान्सिस -- प्रसिद्ध कवयित्री, कथाकार**१९५४: यशोधरा काटकर -- लेखिका**१९५४: धनंजय सोळंकर -- प्रसिद्ध कवी**१९५१: प्रा. अविनाश सप्रे -- इंग्रजी भाषा साहित्याचे व्यासंगी प्राध्यापक आणि मराठीचे नामवंत समीक्षक**१९४५: प्रा. डॉ. अरुण दत्तात्रेय वेलणकर -- लेखक, समीक्षक* *१९३८: एस. जानकी – शास्त्रीय गायिका**१९१३: अनंत विठ्ठल कीर उर्फ धनंजय कीर' -- चरित्रकार (मृत्यू: १२ मे १९८४ )* *१९०८: विनायक रामचंद्र हंबर्डे -- वैदर्भीय मराठी नाटककार,कादंबरीकार व संपादक.(मृत्यू: १९ नोव्हेंबर १९६३ )**१८९७: लेस्टर बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: २७ डिसेंबर १९७२ )**१८९३: दत्तात्रेय बाबूजी पद्माकर -- कवी* *१८७३: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक (मृत्यू: २ जानेवारी १९४४ )**१८५८: पंडिता रमाबाई – विधवा, परिक्त्यक्ता आणि स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक आणि’आर्य महिला समाज’च्या संस्थापिका,संस्कृत पंडित (मृत्यू: ५ एप्रिल १९२२ )**१८५८: मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ (मृत्यू: ४ ऑक्टोबर  १९४७ )**१७९१: जेम्स बुकॅनन – अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १ जून १८६८ )* 📘 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 📘••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: ललित बहल -- भारतीय अभिनेता, निर्माता, लेखक (जन्म: १५ ऑगस्ट १९४९ )**२०१६: जोगिंदर पॉल -- उर्दू लेखक होते. त्यांनी अनेक लघुकथा, कादंबऱ्या लिहिल्या (जन्म: ५ सप्टेंबर १९२५ )**२०१३: शमशाद बेगम – पार्श्वगायिका (जन्म: १४ एप्रिल १९१९ )**२००७: बोरिस येलत्सिन – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष (जन्म: १ फेब्रुवारी १९३१ )**२००१: गंगाधर नारायण कोपरकर -- कीर्तनकार, लेखक (जन्म: २१ ऑक्टोबर १९२० )**२००१: जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते, गोवा मुक्ती संग्रामातील एक झुंजार सेनापती,महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष  व केसरीचे संपादक (जन्म: १२ ऑक्टोबर १९२१ )**२०००: यशवंत सदाशिव ऊर्फ बाबासाहेब भोपटकर -- मराठी चित्रपटांना आधार मिळावा या ध्येयाने प्रेरित होऊन गेली ४० वर्षे लालबागमधील ’भारतमाता’ चित्रपटगृह चालवणारे* *१९९७: डेनिस कॉम्पटन – इंग्लिश क्रिकेटपटू, ’गोल्डन बॉय’ (जन्म: २३ मे १९१८ )**१९९२: सत्यजित रे – ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न. ’पथेर पांचाली’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला देशविदेशात अनेक गौरव मिळाले. त्यांना विशेष ऑस्कर पुरस्कारही देण्यात आला होता. (जन्म: २ मे १९२१ )**१९२६: हेन्‍री बी. गुप्पी – ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ (जन्म: २३ डिसेंबर १८५४ )**१९८६: जिम लेकर – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (जन्म: ९ फेब्रुवारी १९२२ )**१९५८: शंकर श्रीकृष्ण देव – निष्ठावान समर्थभक्त,समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक (जन्म: १० ऑक्टोबर  १८७१)**१८५०: विल्यम वर्डस्वर्थ – काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी. त्यांची ’डॅफोडिल्स’ ही अतिशय गाजलेली कविता आहे. (जन्म: ७ एप्रिल १७७० )**_१६१६: विल्यम शेक्सपिअर – इंग्लिश नाटककार आणि अभिनेता. युनेस्कोने घेतलेल्या पुढाकारामुळे विल्यम शेक्सपिअर यांच्या सन्मानार्थ १९९५ पासून आजचा दिवस हा ’जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. (जन्म: २६ एप्रिल १५६४ )_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक पुस्तक दिनानिमित्त नासा येवतीकर लिखित " ललाटरेषा " पुस्तकाचा जेष्ठ साहित्यिक अरुण वि. देशपांडे यांनी करून दिलेला पुस्तक परिचय......... वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1) *मौजे नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय. स्मारकासाठी 142.60 कोटी तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 67.17 लाख रुपयांच्या तरतूदीस मंजूरी.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *UPSC कडून 1009 उमेदवारांचा निकाल जाहीर, त्यात महाराष्ट्रातील 95 विद्यार्थ्यांचा समावेश, प्रयागराज येथील शक्ती दुबे देशात पहिली तर पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आता १० वर्षांवरील अल्पवयीन मुले देखील त्यांचे बचत आणि एफडी खाते स्वतः उघडून हताळू शकतील, रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचा ‘पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार २०२३’ ने सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारचं एक पाऊल मागे, मोठ्या विरोधानंतर हिंदी'अनिवार्य' शब्द हटणार, पण त्रिसूत्री शिक्षण पद्धतीत दुसरी भारतीय भाषा निवडावीच लागणार, विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांचा हल्ला, दोन पर्यटकांचा मृत्यू तर 12 जण जखमी, सुरक्षा यंत्रणांकडून सर्च ऑपरेशन सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *गुजरातचं प्लेऑफमधील स्थान निश्चित, मुंबईचं पुनरागमन, चेन्नई बाहेर; गुणतालिकेत मोठे उलटफेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤अमृता आनप, पत्रकार व निवेदक👤 तेजस मार्कंडेय👤 अभिषेक संगम👤 देविदास गुडलोड, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 45*हाडांशिवाय बनले लवचिक मी**लाळ मिसळविते अन्नात मी*करतो पदार्थाच्या चवीची फोड**भावनांना देतो आवाजाची जोड**ओळखा पाहू मी आहे कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - हाडे विज्ञान कोडेला प्रतिसाद नोंदविणारे वाचक कवी दत्ताहरी कदम, सुरेश द्रोपतवार, माधव तनमुदले, रोहित मुधोळकर, श्याम ठाणेदार, अभिनंदन प्रचंड, सुनिता भुरे, अर्चना नंदगावकर, दीपश्री वाणी मनःपूर्वक अभिनंदन .......!••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••“पुस्तके आणि चांगली माणसं लगेच काळात नाही त्यांना वाचावे लागते.”*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *गोट्या* ही कादंबरी कोणी लिहिली ?२) चिऊताईचे गाणे बालकविता संग्रह कोणी लिहिले ? ३) *एक होती झाडू* ही बाल नाटिका कोणी लिहिली ?४) *श्यामची आई* हे पुस्तक कोणी लिहिले ?५) *छावा* ही कादंबरी कोणी लिहिली ?*उत्तरे :-* १) शंकर पाटील २) कवी सुरेश भट ३) रत्नाकर मतकरी ४) साने गुरुजी ५) शिवाजी सावंत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *जीवाचा अंत केव्हा होतो ?* 📙*************************पूर्वी कसं सगळं साधं सोपं होतं. एखाद्या व्यक्तीला अखेरची घरघर लागली आणि त्यानं मान टाकली की नाकापुढे सूत धरलं जायचं. त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास चालू आहे की नाही हे तपासण्यासाठी. आणि तो चालू नसला तर त्यानं अखेरचा श्वास घेतल्याचं जाहीर व्हायचं. किंवा नाडी तपासली जायची. त्यावरून हृदयाची धडधड तपासली जायची. स्टेथस्कोप आल्यानंतर त्याच्या मदतीने हृदयाचे ठोके मोजले जायचे. आणि ते बंद पडले आहेत अशी का खात्री झाली की व्यक्ती मृत झाल्याचं डॉक्टर घोषित करायचे.पण वैद्यकीय तंत्रज्ञानांनं एकदम झेप घेतली आणि सारंच बदलून गेलं. श्वासोच्छ्वास बंद पडल्यानंतर, हृदयाच्या तबलजीनं हात आखडता घेतल्यानंतरही कृत्रिम मार्गांनं त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास परत चालू करणं शक्य झालं. हृदयाला विजेचे झटके देऊन हृदयाला नाठाळ घोड्यासारखं मारून परत दौडवता येणं शक्य झालं. आणि जीवाचा अंत केव्हा होतो हा प्रश्न परत ऐरणीवर आला. त्यात भर घातली ती *ख्रिश्चियान बर्नार्ड* यांनी. त्यांनी तर थेट हृदयरोपणाची शस्त्रक्रियाच यशस्वी करून दाखवली. मृत म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीच्या शरीरातलं हृदय काढून घेऊन ते दुसऱ्याच एखाद्याच्या शरीरात स्थापन करून त्या व्यक्तीला दुसरं आयुष्य देण्याची किमया त्यांनी साध्य केली. त्याच वेळी हा सवाल उपस्थित केला गेला होता. जर ते बंद पडलेले हृदय दुसर्‍या व्यक्तीच्या शरीरात बिनबोभाट काम करू शकतं तर मग त्या मृत म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीलाच ते चालू करून जीवनदान का दिलं जाऊ नये ? ते हृदय जर असं दुसरीकडे व्यवस्थित चालू होतं तर मग तेच बंद पडल्याच्या निकषावर पहिल्याला मृत म्हणून घोषित करणं कितपत योग्य आहे ? या परिस्थितीचा गैरफायदा कोणी धनदांडगा कशावरून घेणार नाही ? सहाजिकच मृत्यूची, जीवाच्या अंताची व्याख्याच परत नव्याने करण्याची गरज भासू लागली. त्या वेळेस मग ब्रेन डेथची संकल्पना पुढे आली. रक्ताभिसरण म्हणजेच हृदयाची धडधड, श्वासोच्छ्वास यासकट इतर साऱ्या अनैच्छिक क्रिया सरतेशेवटी मेंदूच्या नियंत्रणाखाली चालू असतात. तो परिस्थितीवर सतत लक्ष्य ठेवून निरनिराळय़ा अवयवांना त्यांना नेमून दिलेलं काम त्यांनी योग्यरित्या करावं म्हणून सतत संदेश पाठवत असतो आणि त्याचं स्वतःचं काम सुरळीत चालू आहे याची ग्वाहीही तो आपल्या विद्युतलहरींच्या मार्फत देत असतो. म्हणूनच हृदयाचं काम कसं चाललं आहे याची तपासणी करण्यासाठी जसा ईसीजी कामाला येतो तसाच मेंदूच्या कामाचा लेखाजोगा ईईजीच्या मार्फत मिळू शकतो. तेव्हा त्या लहरींच्या मदतीने जेव्हा मेंदूचं कामच थंडावलं असल्याचं स्पष्ट होईल तेव्हाच जीवाचा अंत झाला असं घोषित करावं असं ठरलं. यालाच ब्रेन डेथ असं म्हणतात. आता न्यायालयातही जीवाच्या अंताच्या याच व्याख्येला प्रमाण मानलं जातं.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुख दु:ख जिवाचें सांगेन आपुलें । ह्लदय फुगलें फुटों पाहे ॥१॥धरूनि पीतांबर नेईन एकांतीं । सांगेन जिवींची खंती तया पुढां ॥२॥संतसमागमें खेळवील कौतुकें । प्रेमाचें भा-तुकें देऊनियां ॥३॥अंतरींची आवडी तोचि जाणे एक । जिवलग जनक पंढरीरावो ॥४॥नामा ह्मणे ऐसा आहे पैं भरंवसा । मना तूं विश्वासा दृढ धरीं ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कधीच न दिसणारी शुद्ध हवा आपल्याला प्राणवायू देऊन जाते. न दिसणारा फुलांचा सुंगध मन अगदी प्रसन्न करून जाते. कारण त्यांच्यात स्वार्थ नसतो. तसंच जो कोणी नकळत आपल्याला मदत करते. व परोपकाराची जाणीव देखील ठेवत नाही पण, माणुसकीच्या नात्याने आपला माणुसकी धर्म निभावून दाखवते त्याला कधीही विसरू नये. व जे, मदत तर करत नाही पण, वाटेत काटे पेरण्यासाठी सज्ज असतात त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेऊ नये. कारण ते इतरांचे कधीच चांगले बघू शकत नाही तर उलट बिघडविण्याच्या तयारीत असतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *फळ्याचे महत्त्व*मध्य प्रदेशातील बस्तर जिल्हा फार मागासलेला आहे. आदिवासींची वस्ती तेथे जास्त आहे. अशा भागात “श्री शिवानंद” नावाचा आश्रम आहे. तेथे श्री सदाप्रेमानंदसरस्वती नावाचे तत्त्वनिष्ठ स्वामी मुलांना, मोठ्यांना शिकवीत. त्यांच्यामुळे तेथील लोकांवर चांगले संस्कार झाले.तेथील शाळा पहाण्यास एकदा त्या विभागाचे कमिशनर आले. शाळेचे कार्य पाहून ते प्रभावित झाले. त्यांनी स्वामीजींना म्हटले, “या आश्रमाला काय साहाय्य करू?” स्वामीजींनी मागितला एक फळा. कमिशनरांना मोठे आश्चर्य वाटले. “एवढेच ? ही तर अत्यंत किरकोळ गोष्ट झाली. अधिक काहीतरी मागा.” स्वामीजी मंदपणे हसून म्हणाले, “माझी ही मागणी फार क्षुल्लक वाटते काय ? अहो, या फळ्यावर लिहून, त्यावरून वाचूनच ना तुम्ही मोठे झालाय, कमिशनर झाला, नाही का ?’स्वामींच्या प्रश्नानें कमिशनर प्रभावित झाले. त्यांनी शाळेला उपयुक्त वस्तू व बरीच सुंदर पुस्तके भेट म्हणून दिली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 एप्रिल 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18Ahovfvti/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌍 *_जागतिक वसुंधरा दिन_*🌍•••••••••••••••••••••••••••••••••••• 🌍 *_ या वर्षातील ११२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌍 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌍•••••••••••••••••••••••••••••••••••• *_मानवाने केलेल्या पर्यावरणाच्या र्‍हासाकडे लक्ष वेधले जावे म्हणून अमेरिकेतील एका गटाने २२ एप्रिल रोजी "वसुंधरा दिन" साजरा करण्याची प्रथा १९७० मधे सुरू केली. आता जगभर हा दिवस ’जागतिक वसुंधरा दिन’ (World Earth Day) म्हणून विविध समारंभ आयोजित करुन साजरा केला जातो._**१९९७: राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ’ओमप्रकाश भसीन पुरस्कार’ जाहीर**१९९४: महाराष्ट्र विधानसभेने अखंडपणे २१ तास ५ मिनिटे कामकाज चालण्याचा विक्रम**१९४८: अरब-इस्त्रायल युद्ध - अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.**१०५६: क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट* 🌍 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌍••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: शिवकन्या प्रा.श्रध्दा नंदकुमार शेट्ये -- कवयित्री, लेखिका* *१९८५: सुव्रत जोशी -- भारतीय नाट्य आणि दूरदर्शन अभिनेता**१९७८: सुप्रिया पुरोहित हळबे - कवयित्री**१९७१: सुमीत राघवन -- भारतीय चित्रपट, दूरदर्शन आणि नाट्य अभिनेता आणि सूत्रसंचालक**१९७०: डॉ.श्यामल गरुड -- लेखिका, कवयित्री, संपादिका**१९६६: जयश्री कुलकर्णी अंबासकर-- कवयित्री, गीतकार, लेखिका**१९६३: केदार बोदास -- ग्वाल्हेर घराण्यातील एक भारतीय शास्त्रीय गायक(मृत्यू: २४ एप्रिल २०२३ )**१९६०: मनोज मुकुंद नरवणे -- भारतीय सेनेचे निवृत्त सेना प्रमुख* *१९५६: उदय विनायक भिडे -- कवी, अनुवादक, लेखक**१९४६: डॉ. राम माधव मुळे -- कवी* *१९४४: रवींद्र बेडकिहाळ -- प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार**१९३९: डॉ. गजानन पुरुषोत्तम फोंडके -- प्रसिद्ध विज्ञान कथा लेखक, नाटककार, संशोधक* *१९३८:निंबा कृष्ण ठाकरे -- जागतिक कीर्तीचे गणिती आणि जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरू* *१९३४: डॉ. शरदचंद्र गणेश घाटे -- प्रसिद्ध लेखक* *१९३४: कुमकुम -- हिन्दी व भोजपुरी चित्रपटातील अभिनेत्री* *१९३१: पद्मिनी बिनीवाले -- कवयित्री, लेखिका, बालगीतकार**१९३०: त्र्यंबक सपकाळे -- मराठी कवी (मृत्यू: १३ जानेवारी २०१४ )**१९२९: प्रा. अशोक केळकर – विख्यात भाषाशास्त्रज्ञ व साहित्य समीक्षक (मृत्यू: २० सप्टेंबर २०१४ )**१९२९: उषा मराठे-खेर ऊर्फ ’उषा किरण’ – शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर अभिनेत्री (मृत्यू: ९ मार्च २००० )**१९१९: मोरेश्वर दत्तात्रय ब्रम्हो -- नाटककार, नाट्यसमीक्षक**१९१६: काननदेवी – अभिनेत्री व गायिका (मृत्यू: १७ जुलै १९९२ )**१९१६: यहुदी मेन्युहीन – व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक (मृत्यू: १२ मार्च १९९९ )**१९१४: बलदेव राज चोप्रा(बी. आर.) -- बॉलीवूड उद्योग आणि दूरदर्शन मालिकांचे प्रसिद्ध भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००८ )**१९०४: जे. रॉबर्ट ओपेनहायमर – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९६७ )**१८८३: अंजनीबाई मालपेकर -- हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या भेंडीबाजार घराण्यातील प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका(मृत्यू: ७ ऑगस्ट १९७४ )**१८७०: व्लादिमीर लेनिन – रशियन क्रांतिकारक (मृत्यू: २१ जानेवारी १९२४ )**१८१२: लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे - डलहौसी – भारताचा गव्हर्नर जनरल (१८४८-१८५६)(मृत्यू: १९ डिसेंबर १८६० )**१७२४: एमॅन्युएल कांट – जर्मन तत्त्ववेत्ता (मृत्यू: १२ फेब्रुवारी १८०४ )* 🌍 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌍••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: श्रावण कुमार राठोड -- नदीम-श्रवण जोडीतील संगीतकार, गायक, गीतकार (जन्म: १३ नोव्हेंबर १९५४ )**२०१३: लालगुडी जयरामन – व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक (जन्म: १७ सप्टेंबर १९३० )**२०१३: जगदीश शरण वर्मा – भारताचे २७ वे सरन्यायाधीश (जन्म: १८ जानेवारी १९३३ )**२००३: बळवंत गार्गी – पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार, (जन्म: ४ डिसेंबर १९१६ )**१९९४: आचार्य सुशीलमुनी महाराज – थोर विचारवंत, द्रष्टे समाजसुधारक आणि पुरोगामी सेवाव्रती जैन आचार्य**१९९४: रिचर्ड निक्सन – अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ९ जानेवारी १९१३ )**१९८०: फ्रिट्झ स्ट्रासमान – जर्मन भौतिकशात्रज्ञ (जन्म: २२ फेब्रुवारी १९०२ )**१९७५: श्रीनिवास नारायण बनहट्टी -- संशोधक, समीक्षक, संपादक (जन्म: ६ मार्च १९०१ )**१९७३: विष्णू विनायक बोकील -- कथा-पटकथा-संवादलेखक, कादंबरीकार (जन्म: २ जून १९०३ )**१९५४: विनायक महादेव भुस्कुटे --- कथालेखक, चरीत्रकार, अनुवादक (जन्म: १८८९)**१९१८: जनार्दन विनायक ओक -- कोशकार*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वसुंधरा दिनानिमित्त एक रचना ..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *17 वा नागरी सेवा दिन साजरा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सनदी अधिकाऱ्यांना सेवेचा मंत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सुधीर रसाळ विशेषांकाचे प्रकाशन, साहित्य समीक्षेसाठी वाचकांची पूर्वतयारी आवश्यक - दिलीप माजगावकर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील कर्जमाफीसह सोयाबीन, कापूस दराच्या प्रश्‍नावर लक्ष द्या, क्रांतीकारी शेतकरी संघटनेची कृषीमुल्य आयोगाच्या अध्यक्षांकडे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कैलास मानसरोवर यात्रा लवकरच पुन्हा सुरू होणार - परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या 88 व्या वर्षी व्हॅटिकनमधील कासा सांता मार्टा येथे निधन, पोप फ्रान्सिस यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींसह जगभरातील नेत्यांनी व्यक्त केलं दुःख*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जम्मू काश्मीरला पावसाचा जबर तडाखा, शाळा बंद, वाहतूक कोलमडल्यामुळे जनजीवन विस्कळीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बीसीसीआयने यंदाच्या वर्षीच्या केंद्रीय वार्षिक कराराची 34 खेळाडूची यादी केली जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजेश्वर शंकरराव देशपांडे, शिक्षक, धर्माबाद👤 बालाजी मेहेरकर👤 मधुकर कुमारे, धर्माबाद👤 सचिन बाभळीकर👤 व्यंकटेश अबुलकोड, धर्माबाद👤 प्रवीण रब्बेवार, देगलूर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 44*शरीराला देती मी सुंदर आकार**दिसतीय कुरूप पण रंगाने शुभ्र फार* *वयानुसार मी नेहमी बदलणार**मजबूत व हलके कॅल्शिअमचे भांडार**ओळखा पाहू मी आहे कोण?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - मगर *कालच्या विज्ञान कोडेला प्रतिसाद नोंदविणारे वाचक* लालन्ना गुडलावार, अनिकेत सायबलू, दीपश्री वाणी, उज्वला इंगळे, सिद्धार्थ शिरसे, सौ. लिना सुपारे, माधव तनमुदले, अभिनंदन प्रचंड, सुनिता भुरे, सुरेश द्रोपतवार, श्याम ठाणेदार, राहुल वाघमारे, प्रतिक उकले, संगीता दरबस्तेवार, अर्चना नंदगावकर, धनश्री चेनापूरकर मनःपूर्वक अभिनंदन .........!••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सदासर्वदा, यश कुणालाच येत नाही. जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'जागतिक वसुंधरा दिवस' केव्हा साजरा केला जातो ?२) जागतिक वसुंधरा दिवस २०२५ ची थीम काय आहे ?३) भारतात सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोणत्या राज्यात आहेत ?४) 'किल्ल्याच्या सभोवतालची भिंत' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'मनमोहन' या टोपण नावाने कोणत्या कवी / लेखकाला ओळखले जाते ? *उत्तरे :-* १) २२ एप्रिल २) आमची ताकद, आमचा ग्रह ३) मध्यप्रदेश ४) तट ५) गोपाळ नरहर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पावसाळ्यातील आजार कोणकोणते ?* 📙पावसाळय़ातील आजारांचे स्वरूप मुख्यतः पाण्यावाटे पसरणारे आजार असे मानता येईल. पिण्याचे पाणी हे विविध कारणांनी दूषित बनण्याचा हा काळ असतो. विहिरीत बाहेरचे पाणी पडणे, मुरलेले दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या तलावात पसरणे, वाहते पाणी काठावरची घाण मिसळून प्रदूषित होणे, तरंगणाऱ्या गढुळ पदार्थांवर व त्यांबरोबर येणाऱ्या जंतूंवर नियंत्रण न राखता येणे ही त्याची सामान्य कारणे आहेत. यामध्ये उडणाऱ्या माश्या, त्यांच्यामुळे होणारा रोगजंतूंचा फैलाव, चिलटांचा याच काळात होणारा प्रादुर्भाव व विविध प्रकारच्या जंतांची अंडी याच काळात पाण्याद्वारे फैलावणे यांची भरच पडते.पटकी विषमज्वर, जुलाब, उलट्या, आव पडणे या नावाने होणारे आजार व विविध जंतांचा प्रादुर्भाव यांनाच आपण सहसा पावसाळी आजार असे म्हणतो. यापैकी पटकी म्हणजे काॅलरा हा व्हिब्रीओकाॅलरा या जंतूंमुळे होतो. दूषित खाद्यपेये हे त्याचे कारण. अर्थातच पटकीचा प्रादुर्भाव जेथे फार मोठ्या संख्येने जनसमुदाय जमतात, अशा यात्रा वगैरेंच्या ठिकाणी नेहमीच होऊ शकतो. भारताच्या पेजेप्रमाणे जुलाब व जोरदार विनासायास उलट्या यांची अचानक सुरुवात हे या आजाराचे प्रमुख लक्षण. यावर आता प्रतिजैविकांचा इलाज तातडीने केल्यास हा आजार पटकन आटोक्यात येतो. मात्र इलाजास उशीर झाल्यास शरीरातील द्रवपदार्थ कमी झाल्याने व जंतूंचे विष शरीरात पसरल्याने मृत्यूही ओढवू शकतो. याचे निदान सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे पटकन होते. रोग्याच्या वांती वा विष्ठेत स्वल्पविरामसारखे जंतू दिसतात. पूर्वी यावरची प्रतिबंधक लस टोचणे हा प्रमुख उपाय मानला जाई. आता मात्र रुग्णांवर तातडीने इलाज व स्वच्छ अन्नपदार्थांचा वापर यावर भर दिला जातो. कारण प्रतिबंधक लस जेमतेम चार ते सहा महिनेच उपयुक्त ठरते. यात्रा मात्र नेहमीच चालू असतात. फार मोठे पूर आलेला भाग सोडला, तर आता कॉलरा रोगाचे गांभीर्य फार राहिलेले नाही. विषमज्वर हा त्रासदायक आजार असून सालमोनेला टायफी व पॅराटायफी या जंतूंमुळे होतो. क्लोरोमायसेटीन या औषधाचा शोध लागून १९६० च्या दशकात त्याचा वापर सुरू होईतो या आजाराने असंख्य बळी घेतलेले आहेत. ठराविक दिवसांचा ताप असे याचे स्वरूप असल्याने यालाच 'मुदतीचा ताप' या नावानेही ओळखले जाते. लहान आतड्याच्या आतील पापूद्र्यांवर या जंतूंचा हल्ला होऊन तेथे दाह निर्माण होतो. याचा परिणाम अन्नपचनावर होतो. गंभीर अवस्थेत लहान आतड्याला दाहामुळे व पापुद्रे सुटल्याने भोकेही पडू शकतात. विषारी द्रव्यांमुळे ताप येत राहतो. आता या आजारावर अनेक प्रतिजैविके उपलब्ध आहेत. प्रतिबंधक लस व तोंडाने घ्यायच्या प्रतिबंधक कॅप्सूलचा वापर आजही केला जातो. त्याचा उपयोग जेमतेम २ वर्षे होतो. विशेषतः पोहण्यापूर्वी, लांबच्या प्रवासापूर्वी परदेशगमनासाठी हा वापर उपयुक्त ठरतो.विषमज्वराचा आजार न होता काही व्यक्तींच्या आतड्यात हे जंतू वास्तव्य करतात. आजार बरा झालेल्या व्यक्तीतही हा प्रकार होऊ शकतो. यालाच 'कॅरिअर' किंवा 'जंतूवाहक व्यक्ती' असे म्हटले जाते. त्या व्यक्तीला त्रास होत नसल्याने या व्यक्तीच्या संपर्कातील अन्य व्यक्तींना खाण्यापिण्याची भांडी इत्यादीमधून संसर्ग होऊ शकतो. जंतूवाहक व्यक्ती सार्वजनिक खाणावळ येथे आचारी वाढपी असेल तर मोठाच गोंधळ होऊ शकतो. या रोगाचे निदान विडाल या नावाच्या रक्त तपासणीतून होऊ शकते. आजारी रुग्ण व जंतूवाहक या दोन्हींची तपासणी होकारात्मक येते. त्यानुसार इलाज शक्य होतात.आमांश, आव पडणे हा आजार फार विस्तृत प्रमाणात आढळतो. अमिबामुळे होणारा एक प्रकार असतो. तर जंतूसंसर्गातून दुसरा होतो. शिगेला, सालमोनेला व इकोलाय या जंतूमुळे होणारा आमांश पाण्यासारखे जुलाब, ताप, उलट्या व पोटात मुरडा धरणे अशा लक्षणांनी सुरू होतो. मोठ्या आतड्याला सूज येऊन त्याचा दाह झाल्याने शौचावाटे चिकट पदार्थाच्या स्वरूपात त्याच्या अंतस्त्वचेचे पापुद्रे पडतात. अमीबामुळे होणाऱ्या अमांशात वरचेवर शौचाला होणे, अपचन व तीव्र मुरडा व थोडा ताप ही लक्षणे असतात. दोन्हींवर करण्याचे उपाय हे औषध स्वरूपातच करावे लागतात. पचनावर परिणाम झाल्याने रुग्णाचे वजन प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता विशेषत: वाढत्या वयात जास्त असते. अमांश हा आजार वरचेवर उद्भवून त्यातून दूरगामी स्वरूपाचा कोलायटिस हा मोठ्या आतड्याच्या दाहाचा आजार सुरू होऊ शकतो.विविध प्रकारचे जंत आतड्यात वाढतात. आपण खाल्लेले अन्न तेच खाऊन फस्त करतात. त्यामुळे शरीरक्रियाच मंदावते. मुलांच्या वाढीवर परिणाम होतो. उलट्या, पोटात दुखणे, झोपेत दात खाणे, रक्तक्षय ही लक्षणे दिसतात. पाण्यातील जंतांच्या अंड्यांमुळेही बाधा होते. सर्व प्रकारच्या जंतांवर सध्या औषधे उपलब्ध असून ती सहजपणे जंतांचा नायनाट करतात.पाणी उकळून व गाळून पिणे हा पारंपरिक उपाय पाण्यात टाकण्याच्या क्लोरीनच्या गोळ्या वा थेंब हाही एक उपयुक्त उपाय. अॅक्वागार्डसारख्या अत्याधुनिक आयनीकरणाने पाणी शुद्ध करण्याचा तिसराही उपाय. घरगुती फिल्टरेशनची पद्धत वापरणे हाही एक परिणामकारक उपाय अनेक प्रकारच्या पावसाळी आजारांना दूर ठेवू शकतो.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वीतभर पोट लागलेंसे पाठी । साधुसंगें गोष्टी सांगूं न देई ॥१॥पोट माझी माता पोट माझा पिता । पोटानें ही चिंता लाविलीसे ॥२॥पोट माझा बंधु पोट माझी बहीण । पोटानें हें दैन्य मांडिलेंसे ॥३॥विष्णुदास नामा पोटाकडे पाहे । अजून किती ठाये हिंडविसी ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• खऱ्या अर्थाने ज्याला काहीतरी करून दाखवायचे असते किंवा एखाद्याची मदत करायची असते ती व्यक्ती कधीच बहाणे करत नाही आणि मुळात खोटे बोलत नाही.अशाच व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास केला जातो. पण त्यातच जर एखाद्याचे काम करायचे नसेल किंवा मदत करायची नसेल तर करू नये पण,खोटे बोलून स्वतःलाही फसवू नये आणि दुसऱ्यालाही फसवू नये अशा वागणूकीमुळे एखाद्याचे मन दुखावत असते.ते दुखावलेले मन कधीच दिसत नाही. अशा वागणुकीने त्या व्यक्तिंमधील प्रेरकता कमी होण्याची शक्यता असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विचारी अमोल*काळा, बावळा वाटणारा, रोजचेच पण स्वच्छ कपडे घातलेला अमोल खुषीत होता. आज त्याला मोठ्या पाहुण्याच्या हस्ते खूप बक्षिसे मिळणार होती. त्या रकमेत आठवीची पुस्तकं, वह्या, फी सारा खर्च भागेल का याचा विचार करीत चालताना तो केव्हा पोचला, त्याचं त्यालाच कळलं नाही. मित्रांबरोबर सभास्थानी जात असताना शिक्षकांनी त्याला बक्षिसे घेणाऱ्या मुलांच्या गटात नेऊन बसविलं. समारंभ सुरू झाला. मुख्याध्यापकांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यंदा बक्षिसं देण्यासाठी मगनशेठनी मोठी रक्कम दिल्याचं जाहीर केलं. त्याचं औदार्य, व्यवसाय, सगळं सांगितले. मुलांची चुळबूळ सुरू झाली. म्हणून आवरतं घेतलं.बक्षिसांची यादी वाचली जाऊ लागली. मुलं क्रमाने बक्षीस घेऊ लागली. अमोलचं नाव पुकारलं गेलं. त्याला सर्वोत्तम विद्यार्थ्याला मिळणाऱ्या बक्षीसासह ५-६ बक्षिसे मिळाल्याचं सांगितलं. अमोल व्यासपीठाकडे जाऊ लागला. मित्रांच्या टाळ्या सुरू झाल्या. पाहुण्यांकडून बक्षीस स्वीकारण्यासाठी हात पुढे न करता ध्वनिवर्धक पुढे ओढला. म्हणाला “ही सर्व बक्षिसं मिळाल्यानं मला खूप आनंद झालयं. पण…. मगनशेठनी पैसा मिळविलाय ‘गुटखा’ विकून. त्यांच्या मुलानं माझा मित्र सुहासच्या भावाला गुटख्याची सवय लावली. जिभेचा कर्करोग झाला त्याला. त्यातच तो गेला. गुटखा वाईट असतो. मुलांना त्याची सवय लावणारे, तो उपलब्ध करून देणारे वाईट असतात. गुटख्यावर मिळविलेल्या पैशाचं बक्षीस मी स्वीकारू शकत नाही. मला माफ करा.” सगळे स्तब्ध झाले. अमोल परतला. पण पाहुण्यांनी त्याला परत बोलावले. शाबासकी दिली. ‘अमोल हिरा’ असं संबोधून त्यांनी स्वतःच्या खिशातून ५०० रुपये बक्षीस दिले.तात्पर्यः मुलांना, ‘अमोलसारखे विचारी व्हा’ असा संदेश दिला. टाळ्यांच्या गजरात मुलांनी सद्विचारी होऊ असे आश्वासन दिले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 एप्रिल 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1DSatjcHbz/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌟 *_भारतीय नागरी सेवा दिवस_* 🌟•••••••••••••••••••••••••••••••••••• 🌟 *_ या वर्षातील १११ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌟 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌟•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०००: आई वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्‍च न्यायालयाने निर्णय दिला.**१९९७: भारताचे १२ वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल (वय ७८ वर्षे) यांनी सूत्रे हाती घेतली.गुजराल हे वयाने ज्येष्ठ असलेले दुसर्‍या क्रमांकाचे पंतप्रधान या आधी मोरारजी देसाई यांनी ८१ व्या वर्षी पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतली होती.**१९९०: 'विभूती' या लढाऊ बोटीचे उद्घाटन**१९७२: ’अपोलो १६’ या अमेरिकन अंतराळयानातुन गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्युक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले.* 🌟 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌟••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: शशांक कुलकर्णी -- युवा लेखक आणि संशोधक, आंतरराष्ट्रीय युवा संशोधक पुरस्कारांनी सन्मानित**१९८३: हिरालाल बागुल (श्रीदासुत)-- कवी**१९८२: सई देवधर -- भारतीय अभिनेत्री**१९७३: पराग तुकाराम पाटील -- लेखक**१९६९: प्रा. जयसिंग होनाजी गाडेकर-- प्रसिद्ध कवी**१९६८: डॉ. संध्या पवार -- प्रसिद्ध लेखिका**१९६४: स्मिता अनंतराव गोरंटीवार -- कवयित्री**१९६४: रघुनंदन प्रभाकर देशपांडे -- लेखक**१९६२: संतोष राजाराम तेंडुलकर -- लेखक**१९५९: डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर -- इतिहास संशोधक व लेखिका* *१९५२: पुंडलिक नारायण नाईक -- प्रसिद्ध कवी, लघुकथा लेखक, कादंबरीकार,नाटककार आणि पटकथा लेखक**१९५०: शिवाजी साटम – भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेते**१९५०: उपेंद्र भट -- किराणा घराण्यातील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे गायक**१९५०: ज्ञानदा नाईक -- बालसाहित्यिकार (व्यंकटेश माडगूळकर यांची कन्या)**१९४५: श्रीनिवास वेंकटराघवन -- भारतीय माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि पंच* *१९४५: माधव नारायणराव रानडे -- कादंबरीकार, लेखक**१९३४: डॉ. गुंथर सोन्थायमर – महाराष्ट्र लोकधर्म व मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक(मृत्यू: २ जून १९९२ )**१९२६: एलिझाबेथ (दुसरी) – इंग्लंडची राणी. प्रदीर्घ कारकिर्दीच्या बाबतीत राणी व्हिक्टोरिया खालोखाल राणी एलिझाबेथचा दुसरा क्रमांक लागतो**१९२४: पी.भास्करन (पुल्लूटुपदाथु भास्करन) -- भारतीय मल्याळम भाषेतील कवी, मल्याळम चित्रपट गीतांचे गीतकार आणि चित्रपट निर्माता(मृत्यू: २५ फेब्रुवारी २००७ )**१९२२: अ‍ॅलिएस्टर मॅकलिन – स्कॉटिश साहसकथा लेखक (मृत्यू: २ फेब्रुवारी १९८७ )**१८८५: विष्णू वासुदेव आठल्ये -- इतिहासलेखक (मृत्यू: २८ ऑगस्ट १९५९ )**१८६४: मॅक्स वेबर – जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ (मृत्यू: १४ जून १९२० )* 🌟 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌟••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१३: शकुंतलादेवी – गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९ )**२०१२: बेबीताई कांबळे -- दलित चळवळीतील एक लढाऊ कार्यकर्ती, समाजसेविका आणि लेखिका (जन्म: १९२९ )**२००९: इक्बाल बानो -- पाकिस्तानमधील गझलमध्ये पारंगत असलेल्या अष्टपैलू गायिका (जन्म: २७ ऑगस्ट १९३५ )* *२०००: निगार सुलताना -- भारतीय अभिनेत्री (जन्म:२१ जून १९३२)**१९७८: विष्णू रामचंद्र वेलणकर -- कापड कारखानदार, दानशूर, उद्योगपती व लेखक (जन्म: ६ जानेवारी १८८७ )**१९५२: सर स्टॅफोर्ड क्रिप्स – इंग्लिश राजकारणी (जन्म: २४ एप्रिल १८८९ )**१९४६: जॉन मायनार्ड केन्स – ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ (जन्म: ५ जून १८८३ )**१९३८: सर मुहम्मद इक्‍बाल – प्रख्यात उर्दू कवी,तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते (जन्म: ९ नोव्हेंबर १८७७ )**१९१०: मार्क ट्वेन – विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार (जन्म: ३० नोव्हेंबर १८३५ )**१५०९: हेन्‍री (सातवा) – इंग्लंडचा राजा (जन्म: २८ जानेवारी १४५७ )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दृष्टी बदलली तर सृष्टी बदलेल*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २२-२३ एप्रिलला जाणार सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *येत्या 30 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील महाराष्ट्र सदनात होणार भव्य हापूस आंबा महोत्सवाचं उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *साहित्यभूषण पुरस्काराच्या रक्कमेत वाढ, यावर्षीपासून मिळणार 10 लाख रुपये - उदय सामंत*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हवामान विभागाने उष्णतच्या लाटेच्या दिला इशारा, नागपूर शहर ठरले देशातील सर्वात ‘हॉट सिटी’, नागपूरमध्ये सर्वाधिक 44.7 अंश तापमानाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईतील वांद्रे ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या ऋषीकेशने पटकावला वर्ष २०२३-२४ चा महाराष्ट्र शासनाचा मानाचा “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *CSMIA मुंबई विमानतळ 8 मे रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत मान्सूनपूर्व देखभालीसाठी राहणार बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ७ विकेट्सने पराभव करत मिळवला पाचवा विजय, विराट बनला आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतके करणारा फलंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. विरभद्र कोटलवाड, धर्माबाद👤 लक्ष्मण रच्चावार, पाळज 👤 एच. डी. पाटील👤 मारोती इबतवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 43*जमीन पाण्यातील मी उभयचर* *नाही निघत जीभ तोंडाच्या बाहेर* *दात स्वच्छ माझे करतात पक्षी* *अंगावर आहे खवलेदार नक्षी* *सर्वात शक्तिशाली माझाच जबडा* *ऊन खात पडतो तोंड ठेऊन उघडा*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - टोमॅटो ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शहाण्याने अविचाराला सुरुवात केली की, त्याला ताळतंत्र राहत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सलग नवव्यांदा बिजू जनता दलाचे ( BJD ) अध्यक्ष म्हणून बिनविरोध कोणाची निवड करण्यात आली ?२) घटक राज्य व केंद्रातील दुवा साधण्याचे कार्य कोण करतो ?३) जैन धर्माची तत्वे प्रकट करणाऱ्यास काय म्हणतात ?४) 'कादंबऱ्या लिहिणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? *उत्तरे :-* १) नवीन पटनायक, माजी मुख्यमंत्री, ओडिशा २) राज्यपाल ३) तीर्थकर ४) कादंबरीकार ५) एड. अनंत दारवटकर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पाणी केव्हा उकळतं ?* 📙 ************************हा काय प्रश्न झाला ? पाणी १०० अंशाला उकळतं. शाळकरी मुलगाही सांगेल. असेलही तुमचं उत्तर बरोबर. पण शिमला, लेह, लडाख किंवा कोडाईकनाल इथं राहणाऱ्या तुमच्या मित्राला विचारा. तो तुमच्याशी सहमत होईलच असं नाही. आणि तुम्हीही तिथ जाऊन पाहिलंत तर पाणी उकळत असताना तुमचंच थर्मामीटर त्या पाण्याचं तापमान शंभरापेक्षा कमी असल्याचं दाखवेल. खगोलशास्त्रज्ञांना विचाराल तर तेही सांगतील की मंगळावर तर दहा अंशालाच पाणी उकळतं. म्हणजे जेमतेम वितळत नाही तो उकळायलाही सुरुवात.पाणी हा तसा संकुचित मनोवृत्तीचा द्रवपदार्थ आहे. त्याच्या रेणूंना आपल्या भाईबंदांशी जखडून राहणं आवडतं. त्यांची साथसंगत सोडायला हे रेणू तयार नसतात. पण त्यांना ऊर्जा मिळाली की त्यांच्यामधले बंध थरथरायला लागतात. आणि कालांतराने तुटतातही. तेवढे रेणू स्वतंत्र होतात. म्हणजेच त्यांचं वाफेत रूपांतर होतं. असं रूपांतर तर कोणत्याही तापमानाला होतच असतं. तसं झालं नसतं तर बाहेर वाळत घातलेले आपले कपडे कधी सुकलेच नसते. तेव्हा कोणत्याही तापमानाला पाण्यामध्ये काही प्रमाणात वाफ असतेच. त्या वायूरूपातले रेणू स्वतंत्र होऊन उडून जाऊ पाहतात. त्यांचा दबाव निर्माण होतो. पण त्या पाण्यावर असलेला हवेचा दाब त्याच रेणूंना खालच्या दिशेने रेटून पाण्यातच ठेवू पाहतो. या दोन दाबांमध्ये तू तू मैं मैं होऊ लागते. जोवर हवेचा दाब वाफेच्या दाबापेक्षा जास्त असतो तोवर वाफेला निमूटपणे पाण्यातच राहावं लागतं. आता या पाण्याला अधिक उष्णता दिली तर त्याचं तापमान वाढतं. त्याचबरोबर त्याला अधिक ऊर्जाही मिळते. ती अधिकाधिक बंध तोडून टाकायला मदत करते. अधिकाधिक रेणू स्वतंत्र होऊन वाफेत रूपांतरित होतात. वाफेचा दाब वाढत जातो. ज्या क्षणी हा वाफेचा दाब हवेच्या दाबाइतका होतो तेव्हा वाफेच्या रेणूंना रेटून परत पाण्यात पाठवणे कठीण होत जातं. वाफ धसमुसळेपणाने उडून जाऊ लागते. त्या दंगामस्तीत पाण्यात विरघळलेले वायूही स्वतंत्र होऊन उडून जाऊ पाहतात. पाण्याला उकळी फुटते. म्हणजेच जेव्हा पाण्यातील वाफेचा दाब हवेच्या दाबाइतका होतो तेव्हा पाणी उकळतं. समुद्रसपाटीला ही पातळी १०० अंशाला गाठली जाते. म्हणून जेव्हा हवेचा दाब समुद्रसपाटीवरच्या दाबाइतका म्हणजे एक सेंटिमीटर वर्ग इतक्या क्षेत्रफळावर एक किलोग्रॅम इतका असतो तेव्हा पाणी १०० अंशाला उकळतं. पण जसजसं उंचावर जावं तसतशी हवा विरळ होते. तिचा दाब कमी होतो. आता वाफेचा दाब त्याच्या इतका होण्यासाठी कमी तापमान असलं तरी चालतं. उलट प्रेशरकुकरमध्ये वाढीव दाब निर्माण करण्याची व्यवस्था केलेली असते. तिथं १०० अंशाची मर्यादा ओलांडली तरी पाणी उकळत नाही. वाफेचा दाब इतका वाढतो की त्या कुकरमधून ती वाफ जोराने बाहेर पडते. शिट्टी वाजते. त्यावेळी पाणी उकळतं. पण तोवर त्याचं तापमान सहज १२०-३० अंशावर पोहोचलेलं असतं. म्हणून तर तुमची डाळ लवकर शिजते.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नमन करीन द्वारकानायका । पांडव पालका देवराया ॥१॥ आतां मी गाईन गुण नाम कीर्ति । जेणें चारी मुक्ति दासी होती ॥२॥ साधक लोकांसी हेंचि पैं साधन । ब्रह्म सनातन वश होय ॥३॥ नामा म्हणे सर्व सारांचें हें सार । जेणें निरंतर निरंतर सुख वाटे ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपली ओळख व्हावी आणि आपल्याला मानसन्मान मिळावा यासाठी जर आपण कार्य असतील तर त्यालाही काही अर्थ नाही. माणसाचा जन्म मिळाला त्यासाठी काहीतरी देणं लागतं हीच भावना आणि असेच विचार जर ठेवून आपण कार्य करण्याचा प्रयत्न करत राहिले तर त्यातून मिळालेला समाधान असतो. तोच समाधान आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थाने सार्थक करणारा असतो. म्हणून अपेक्षांचे ओझे घेऊन फिरू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• "एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतनाची गोष्ट आहे.स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते. त्यावेऴी नरेंद्र ची उद्या परीक्षा असते. पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात. तेवढ्यात तेथे त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो आणी म्हणतो.अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून विणा वाजवत बसलास. तू कसा पास होशील. तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे. मी आज काय करतो याची नाही. हे उत्तर ऐकून मित्र निरूत्तर झाला." तात्पर्यः "कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे. एका दिवसात यश प्राप्त होत नाही. " 🌹🌹🌹🌹🌹🌹•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 एप्रिल 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~समूहात join होण्यासाठी link- https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••♻️ *_ जागतिक वारसा दिन_* ♻️•••••••••••••••••••••••••••••••••••• ♻️ *_ या वर्षातील १०८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ♻️ *_महत्त्वाच्या घटना:_* ♻️•••••••••••••••••••••••••••••••••••• *_जागतिक वारसा दिन_**_आपल्या पूर्वजांनी प्राचीन काळी अनेक मंदिरे, गुहा,लेणी, किल्ले, स्मारके अशा गोष्टी बांधून ठेवल्या आहेत. त्यासंबंधात आस्था निर्माण करण्यासाठी व पुरातन गोष्टींचे जतन होण्यासाठी हा दिवस ’जागतिक वारसा दिन’ (World Heritage Day) म्हणून साजरा केला जातो._*••••••••••••••••••••••••••••••••••*२००१: भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक (GSLV- D1) वाहकाचे रशियन बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाच्या साहाय्‍याने श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण**१९९४: वेस्टइंडीजचा फलंदाज ब्रायन लारा यांच्या विक्रमी३७५ धावा**१९८०: झिंबाब्वेचा स्वातंत्र्य दिन**१९७१: एअर इंडियाचे पहिले बोईंग ७४७ जंबो जेट विमान ’सम्राट अशोक’ शाही दिमाखात सकाळी ८-२० वाजता सांताक्रूझ विमानतळावर दाखल.**१९५४: गामल अब्दल नासर याने इजिप्तची सत्ता ताब्यात घेतली.**१९५०: आंध्र प्रदेशातील तेलंगणा येथील पोचमपल्ली खेड्यातील ८० एकर जमीनीच्या भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली**१९३६: पेशव्यांची राजधानी असणार्‍या पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.**१९३०: क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटले.**१९३०: आज काहीही बातमी नाही असे बी. बी. सी. या नभोवाणी केंद्रावरुन सांगण्यात आले**१९२७: पहिले ख्रिस्ती साहित्य संमेलन डॉ. निकल मॅक्निकल यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे भरले**१९२४: सायमन व शूस्टर यांनी पहिले शब्दकोड्यांचे पुस्तक प्रकाशित केले.**१९१२: ’टायटॅनिक’ मधील वाचलेले ७०५ प्रवासी घेऊन ’कार्पेथिया’ हे जहाज न्यूयॉर्कला पोचले**१८९८: जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी**१८५३: मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.**१८३१: ’यूनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा’ ची स्थापना झाली.**१७२०: शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना कर्‍हाडनजीक मसूर येथे पेशवाईची वस्त्रे मिळाली.*♻️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ♻️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८५: प्रा. डॉ. पराग भास्करराव जोशी -- लेखक, संस्कृत विषयाचे अभ्यासक**१९८३: किरण प्रकाश मोरे --पक्षीप्रेमी, लेखक**१९७६: शेखर गिरी -- कवी,गझलकार* *१९७६: किरण शिवहर डोंगरदिवे -- प्रसिद्ध कवी,समीक्षक आणि ललित लेखक**१९७५: नेहा बाजपेयी -- भारतीय अभिनेत्री आणि निर्माती**१९७१: गणेश विठ्ठलराव कुंभारे -- कवी, लेखक**१९६७: विद्या बनाफर -- कवयित्री, लेखिका* *१९६६: अनिल सूर्या -- कवी, कथाकार**१९६५: प्रा. डॉ. निशा निळकंठ शेंडे -- लेखिका**१९६५: सविता प्रभुणे --- भारतीय अभिनेत्री* *१९५८: माल्कम मार्शल – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९९ )**१९५६: पूनम धिल्लन – अभिनेत्री**१९५०: विजय वाकडे -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९५०: अलका चंद्रकांत दराडे -- कवयित्री, लेखिका**१९४७: महेंद्र संधू -- भारतीय अभिनेता* *१९२३: मधुसूदन परशुराम पेठे -- संत साहित्याचे अभ्यासक, ग्रंथालयशास्त्र तज्ञ* *१९१७: वसुंधरा कृष्णाजी पटवर्धन -- कथाकार, कादंबरीकार, नाटककार, प्रवासवर्णनकार (मृत्यू:२ सप्टेंबर २०१०)**१९१६: ललिता पवार – अभिनेत्री (मृत्यू:२४ फेब्रुवारी १९९८ )**१८९९: काशीनाथ श्रीधर नायक -- कोंकणी कवी, प्रकाशक व मुद्रक**१८५८: महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे – स्त्रीशिक्षण व विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक, पद्मभूषण, भारतरत्‍न (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९६२ )**१७७४: सवाई माधवराव पेशवा -- यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म (मृत्यू: २७ ऑक्टोबर १७९५)* ♻️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ♻️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: अच्युत माधव गोखले -- नागालँडचे माजी मुख्य सचिव आणि केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव (जन्म: ३ जानेवारी १९४६ )**१९९९: रघूवीर सिंह – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार (जन्म: २२ ऑक्टोबर १९४२)**१९९५: पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते – पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक (जन्म: ३० मार्च १९२१)**१९७२: डॉ. पांडुरंग वामन काणे – विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय (जन्म: ७ मे १८८० )**१९६६: जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद – योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ,त्यांनी १९२४ मध्ये ’कैवल्यधाम’ नावाची योगशिक्षणसंस्था स्थापन केली.(जन्म: ३० ऑगस्ट १८८३ )**१९५५: अल्बर्ट आइनस्टाइन – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १४ मार्च १८७९ )**१८९८: दामोदर हरी चापेकर -- यांना फाशी देण्यात आली [चार्ल्स रँड याची हत्या केल्यामुळे] (जन्म: २४ जून १८६९ )**१८८६: बजाबा रामचंद्र प्रधान -- इंग्रजी कवितेचा अनुवाद-अनुकरण करणारे मराठी कवी (जन्म: १८३८)* *१८५९: १८५७ च्या राष्ट्रीय उठावातील सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा ’तात्या’ टोपे यांना फाशी देण्यात आले. (जन्म: १८१४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भुकेले पोट - (लघु कथा) एक दहा वर्षांचा मुलगा राधाच्या गेटजवळ खेळत होता. राधा बाहेर आली आणि ओरडली " हे काय आहे रे ?" "मावशी, मी तुमच्या बागेला स्वच्छ करू का?" "नाही, करू नको, काही गरज नाही." मुलगा हात जोडून अगदी करुणाजनक स्थितीमध्ये, "कृपया करून घ्या ना, मी ते चांगले स्वच्छ करीन." "बरे, ठीक आहे, किती पैसे घेशील ?" "पैसे वगैरे काही नको, मला खायला द्या." "ओह! ठीक आहे." "गरीब भुकेला दिसतोय, मी तुला प्रथम जेवण देतो." राधा म्हणाली"ए पोरा ! अगोदर जेवून घे, मग काम कर." "नाही, मावशी, सर्वप्रथम मी काम करतो, मग मला खायला दे." "ठीक आहे!" असे म्हणत राधा तिच्या कामाला गेली. एका तासांनंतर, "मावशी, पहा आपल्या बागेची स्वच्छता चांगली आहे की नाही". "ओह, वाह! तु उत्तम सफाई केली आहेस, आणि साहित्य देखील एकत्र गोळा केले आहेस" इथे बस, मी जेवण आणतो. " राधाने त्याला जेवण दिले. तेवढ्यात तो आपल्या खिशातून एक चिंधी काढली आणि त्यात बांधून घेऊ लागला. " मी एका भुकेल्या मुलाला काम दिले आहे, अरे इथेच खा जर तुला अजून लागत असेल तर मी अजून देईन" "नाही मावशी, माझ्या घरी माझी आई आजारी आहे, सरकारी हॉस्पिटलमधून मोफत औषध मिळाले, परंतु डॉ. म्हणाले की जेवल्याशिवाय गोळ्या-औषध घेता येणार नाही." हे ऐकून राधा रडू लागली .. आणि स्वत: च्या हातांनी, त्या मुलाची दुसरी आई बनून त्यास जेवू घातले. मग ... तिच्या आईसाठी भाकरी तयार केली .. आणि त्याच्याबरोबर घरी जाऊन त्याच्या आईकडे भाकरी दिली आणि ती म्हणाली ... "बहीण, तू खूप श्रीमंत आहेस .. तु तुझ्या मुलाला जे काही दिले आहे ते आम्ही आमचा मुलांनाही देऊ शकलो नाही स्वावलंबी जीवनाची शिकवण .....✍🏻 नासा येवतीकर, धर्माबाद~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार - शिक्षणमंत्री दादा भुसे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महेश मांजरेकरांना जीवनगौरव, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वे अन् भीमराव पांचाळांनाही पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार, आरोग्य खात्याचा मोठा निर्णय, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांकडून आरोग्य योजनांचा आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारताची स्मार्ट फोन निर्यात पहिल्या स्थानावर ! आश्विनी वैष्णव यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *क्रेडाई पुणे मेट्रोच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा:मनीष जैन यांची 2025-27 कालावधीसाठी अध्यक्षपदी निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *उत्तर प्रदेशात वीज आणि पावसामुळे 13 जणांचा मृत्यू:24 राज्यांमध्ये पावसाची शक्यता; राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा, हरियाणामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकून वर्षाची शानदार सुरुवात केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 हर्षवर्धन घाटे , पत्रकार, बिलोली👤 भक्ती जठार 👤 संदीप बोलचेटवार , धर्माबाद👤 संतोष पुरणशेट्टीवर, धर्माबाद👤 मनोज रामोड👤 अझर शेख👤 बालाजी पोरडवार👤 संदीप काटमवाड, बिलोली👤 सचिन कनोजवर 👤 कृष्णा राय*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 42*रंग माझा हिरवा पिकल्यावर लाल* *दिसतोय जसा गुबगुबीत गाल* *प्रत्येक भाजीत माझीच वर्णी**सलादाच्या चकत्यावर मिठाची फोडणी**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - डोळे ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सूर्य ज्याप्रमाणे आतून बाहेरून निर्मळ व तेजस्वी असतो, त्याप्रमाणे सज्जनांचे अंत:करण अंतर्बाह्य निर्मळ व तेजोमय असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२५ चा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) श्वसन क्रियेद्वारे दूषित हवा आत जात राहिल्याने कोणता रोग होतो ?३) उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती कोण आहेत ?४) 'कमी आयुष्य असलेला' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'कॅप्टन कूल' असे कोणत्या क्रिकेटपटूला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) महेश मांजरेकर, नामवंत अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता २) दमा ३) जगदीप धनखड ४) अल्पायू, अल्पायुषी ५) महेंद्रसिंग धोनी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *उन्हाळी लागणे म्हणजे काय ?* 📕************************बऱ्याचदा उन्हामुळे असा त्रास आपल्याला होत असतो. उन्हाळी लागणे म्हणजे लघवी करताना जळजळ होणे व मूत्रमार्ग दुखणे. लघवीतील पाण्याचे प्रमाण कमी झाले, तर मूत्रनलिकेतील आवरणास इजा होते. त्यामुळे लघवी करताना आग होते. मूत्रनलिकेत आवरणाचा दाह होत असल्याने साध्या लघवीमुळे जळजळ होते. मूत्रपिंडामध्ये लघवी तयार होत असते. मूत्र तयार होण्याचा मुख्य उद्देश म्हणजे शरीरातील पाणी, क्षार यांचे संतुलन राखणे व शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे हा आहे. साहजिकच पाणी कमी प्यायले, तर मूत्राचे प्रमाण कमी होते; परंतु मूत्रातील क्षारांचे व टाकाऊ पदार्थांचे प्रमाण तेवढेच राहते. साहजिकच त्यामुळे लघवी सौम्य न होता जळजळीत होते. अशावेळेस लघवी गडद पिवळी किंवा लालसर दिसते. यामुळे मूत्रनलिकेच्या आवरणाचा दाह होतो. पाणी कमी पिणे, या कारणाशिवाय जंतूसंसर्गामुळे, मूतखड्यामुळे मूत्रनलिकेला दाह होऊन लघवी करतेवेळी जळजळ होते.यावर उपाय म्हणजे नेहमीच विशेषत: उन्हाळ्यात जास्त पाणी पिणे. घामाचे प्रमाण लक्षात घेऊन दिवसभरात एक लिटर लघवी होईल इतके पाणी प्यावे. उन्हाळी लागलेली असल्यास लिंबूपाण्यात खाण्याचा सोडा टाकून प्यावे. १०० मिलीलिटर म्हणजे साधारणतः एक कप पाण्यात २.५ ग्रॅम धने भिजत ठेवून ते पाणी साखर टाकून १२-१२ तासांनी प्यायल्याने उतारा पडतो/ जळजळ कमी होण्यास मदत होते.*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नको गा मोकलूं दीना पंढरिनाथा । तुजविण आतां कोण पावे ॥१॥ अपराधाच्या पोटीं पाहूं नको कांहीं । ये गे विठाबाई झडकरी ॥२॥ माझ्या दोषासाठीं पाठमोरा होसी । पावन ब्रीदासी लागे बोल ॥३॥ नामा म्हणे जननी तूंचि चराचर । तारिले अपार जड जीव ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकच व्यक्ती वाईट नसते आणि दिसणारी प्रत्येक व्यक्ती तेवढीही चांगली नसते. बरेचदा माणसं ओळखताना आपली कुठेतरी चूक होत असते. म्हणून दुसऱ्याला चुकीचे ठरवताना स्वतः मधील चांगले, वाईट गुण शोधण्याचा प्रयत्न करावा. त्यातच ज्याला चांगले म्हणून आपण गुणगान करतो आणि डोळे झाकून विश्वास ठेवतो अशा व्यक्तीचे हावभाव आणि बोलण्याकडे बारीक लक्ष ठेवल्याने कदाचित चांगले, वाईट अनुभव येतील. अनुभव हा गुरू असतो तोच गुरू चांगले काय असते आणि वाईट काय असते यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपली चांगल्याप्रकारे मदत करू शकतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शास्त्राचा उपयोग कोणता ?*प्राचीन भारतात नागार्जुननावाचे एक महान रसायन शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांना एका सहाय्यकाची आवश्यकता होती.दोन तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला आले म्हणा ना – आचार्यांनी दोघात एक पदार्थदिला व त्यापासून एक विशिष्ट रसायन करून आणायला सांगितलं. तीन दिवसाचा अवधी दिला. दोघे उत्साहाने कामाला लागले. तीन दिवसांनी परत आले. आचार्यांनी विचारले, ‘कामात काही अडचणी तर आल्या नाहीत?’ पहिला अभिमानाने म्हणाला, “आईला ताप होता वडील पोटदुखींना हैराण झाले होते. भाऊ पडल्यामुळे हाडाला मार लागला होता. पण माझी साधना मी सोडली नाही व हे रसायन करून आणल आहे.” दुसरा म्हणाला, आचार्य, क्षमा असावी. मी घरी जात असता वाटेत एक वृद्ध रुग्ण दिसला. निर्धनही होता बिचारा. त्याला औषधोपचार करून त्याचे व्यवस्था लावण्यातवेळ गेला. आपण दिलेलं काम पूर्ण करू शकलो नाही. कृपया आणखी दोन दिवसाची सवड द्यावी.आचार्यांनी त्याचीच निवड केली. ते म्हणाले, ‘रसायन शास्त्राचा उपयोग जीवन रक्षणासाठी झाला पाहिजे, समाजविन्मुख ज्ञानाचा काय उपयोग?’ तात्पर्यः ज्ञानाचा/शिक्षणाचा उपयोग समाजात झाला तर खऱ्या अर्थाने शिक्षणाचा उपयोग झाला असे समजावे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 एप्रिल 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://drive.google.com/drive/folders/1KDsAv4CuLXO815elox387khtBQUN1lRd••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक हिमोफिलिया दिवस_* 🩸•••••••••••••••••••••••••••••••••••• 🩸 *_ या वर्षातील १०७ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🩸 *_महत्त्वाच्या घटना:_* 🩸•••••••••••••••••••••••••••••••••••• *२००१: अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलॉजी मधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला ’माल्कम - आदिशेषय्या पुरस्कार’ जाहीर**१९७५: ख्मेर रुजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह जिंकली.**१९५२: पहिली लोकसभा अस्तित्त्वात आली**१९४६: सिरीयाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले**१९४१: दुसरे महायुद्ध – युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.**१६७५: शिवाजी महाराजांनी कोंडा काबीज केला व कारवार प्रांत जिंकला* 🩸 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🩸 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८५: दुशांत बाबुराव निमकर -- कवी**१९७१: धनश्री किशोर पाटील -- कवयित्री, लेखिका, गझलकार* *१९७७: दिनेश मोंगिया – क्रिकेटपटू**१९७२: मुथैय्या मुरलीधरन – श्रीलंकेचा क्रिकेटपटू**१९६८: प्रा. डॉ. सुभाष बागल -- कवी, लेखक* *१९६५: माधव बाजीराव सावंत -- लेखक, कवी**१९६१: दीपक कुलकर्णी -- लेखक**१९६१: गीत श्रीराम सेठी -- बिलियर्ड्सचा व्यावसायिक खेळाडू**१९६०: प्रा. डॉ. संपदा कुल्लरवार -- कवयित्री, लेखिका**१९५७: यशवंत लक्ष्मण भालकर -- मराठी चित्रपट दिग्दर्शक व लेखक (मृत्यू: १९ डिसेंबर २०१८ )**१९५२: रमेश रामचंद्र भिडे -- लेखक**१९५१: बिंदू – चित्रपट अभिनेत्री**१९४५: प्रा.श्रीकांत कुलकर्णी -- कवी**१९४०: पद्मा सचदेव -- भारतीय कवयित्री आणि कादंबरीकार (मृत्यू: ४ ऑगस्ट २०२१ )**१९३९: शशिकांत वामन काळे -- प्रसिद्ध कथाकार**१९३३: चंद्रशेखर दत्तात्रय जोशी -- कवी* *१९३०:सचिन भौमिक -- भारतीय हिंदी चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक (मृत्यू : १२ एप्रिल २०११)**१९१६: सिरीमाओ बंदरनायके – श्रीलंकेच्या ६ व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान (मृत्यू: १० ऑक्टोबर  २००० )**१९०३: शंकर बळवंत चव्हाण -- मराठीतील निसर्गकविता, शृंगारिक प्रेमकविता आणि सामाजिक व ऐतिहासिक नाटके लिहिणारे लेखक**१९०४: वासुदेव शिवराम कोल्हटकर -- ध्येयवादी कीर्तनकार, कवी (मृत्यू: १० ऑगस्ट १९७७ )**१८९७: निसर्गदत्त महाराज – अद्वैत तत्त्वज्ञानी (मृत्यू: ८ सप्टेंबर १९८१ )**१८९१: यशवंत रामकृष्ण दाते – कोशकार. चिं.ग.कर्वे यांच्या साहाय्‍याने त्यांनी ’महाराष्ट्र मंडळ कोश’ स्थापन करून आठ खंडांचा ’महाराष्ट्र शब्दकोश’ तयार केला. (मृत्यू: २१ मार्च १९७३ )**१८३७: जे. पी. मॉर्गन – अमेरिकन सावकार (मृत्यू: ३१ मार्च १९१३ )**१४७८: संत सूरदास – हिन्दी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य (मृत्यू: १५७३ )* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*🩸••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२४: मिना चंदावरकर -- ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका (जन्म: २२ फेब्रुवारी १९३९ )**२०२०: रा. सू बच्चेवार -- विशेष पोलीस महानिरीक्षक म.रा.(जन्म: २३ सप्टेंबर १९४३ )**२०११: विनायक आदिनाथ तथा ’वि.आ.’बुवा – विनोदी साहित्यिक (जन्म: ४ जुलै १९२६ )**२००४: सौंदर्या – कन्‍नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिन्दी चित्रपट अभिनेत्री (जन्म: १८ जुलै १९७२ )**२००१: डॉ. वामन दत्तात्रय तथा ’वा.द.’वर्तक – वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक (जन्म: १९ ऑक्टोबर  १९२५ )**१९९८: विजय सिप्पी -- चित्रपट निर्माते**१९९७: बिजू पटनायक – ओरिसाचे माजी मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री (जन्म: ५ मार्च १९१६ )**१९९०: दिनकर गंगाधर केळकर -- कवी, संपादक, संग्रहालयकार(जन्म: १० जानेवारी १८९६ )**१९७५: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन – भारताचे दुसरे राष्ट्रपती,पहिले उपराष्ट्रपती आणि तत्त्वज्ञ,(जन्म: ५ सप्टेंबर १८८८ )**१९४७: तात्या नेमिनाथ पांगळ -- लेखक, चरीत्रकार (जन्म: १८८५ )**१९४६: व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री – कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष आणि इंग्रजी वक्ते (जन्म: २२ सप्टेंबर १८६९ )**१७९०: बेंजामिन फ्रँकलिन – अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी (जन्म: १७ जानेवारी १७०६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रश्नमंजुषा - PDF मध्ये*..... पूर्ण PDF पाहण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचे उद्घाटन संपन्न; मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच मामाच्या घरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 8 पदरी होणार; 'मिसिंग लिंक' प्रकल्प अंतिम टप्प्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई : महाराष्ट्र शासन आणि आयबीएम यांच्यात मुंबईतील मंत्रालयात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) द्वारे प्रशासनात अमुलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे ५२ वे सरन्यायमूर्ती म्हणून 14 मे रोजी घेणार शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास चैत्रीत 2 कोटी 56 लाख उत्पन्न:मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मंदिर समितीला मिळालेल्या उत्पन्नात दुप्पट वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जळगाव : सोन्याच्या दरात 1300 रुपयांनी वाढ झाली असून सोन्याचे दर Gst सह 97 हजार 500 रुपयांवर पोहोचले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *जिथं जमीन अधिग्रहणाची घोषणा झालीय तिथल्या जमिनी विकू नका, मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकऱ्यांना भावनिक साद*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिवकन्या पटवे, उपक्रमशील शिक्षिका, biloli👤 मोईन शेख 👤 दुशांत निमकर, साहित्यिक तथा शिक्षक 👤 प्रा. अनुज मुंडकर, ITI, धर्माबाद👤 सुभाष टेकाळे, माहूर👤 जया इगे 👤 शरद पुजरवार 👤 विनायक shinde👤 आनंद त्रिभुवन👤 विश्वनाथ तुपसमुद्र *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 42*दिसायला सुंदर अवयव नाजूक**माझ्यामुळे कळते वस्तूंचे रंगरूप**करून देतो मी प्रकाशाची जाणीव**श्वेतपटल दृष्टीपटल बाहुली रेखीव**अदभूत नैसर्गिक कॅमेऱ्याची रचना* *सुख दुःखात मी व्यक्त करतो भावना*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - तुळस ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अभ्यासात येणारे यश हे दैवी देणगीचे किंवा चमत्कारांचे नसून कष्टाने साध्य होणारे यश असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) तेलंगणातील 'ट्री मॅन' म्हणून कोणाला ओळखले जाते ?२) 'वनजीवी रामय्या' या नावाने कोणाला ओळखले जाते ?३) दरीपल्ली रामय्या यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?४) 'गाणे गाणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) जागतिक आवाज दिवस २०२५ ( १६ एप्रिल ) ची थीम काय आहे ? *उत्तरे :-* १) पद्मश्री दरीपल्ली रामय्या ( १ कोटी झाडे लावली. ) २) दरीपल्ली रामय्या ३) सन २०१७ ४) गायक ५) तुमच्या आवाजाचे सशक्तीकरण करा.*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बारकोड काय करतं ?* 📙 ***********************विक्रीसाठी असलेल्या कोणत्याही वस्तूंची किंमत त्या वस्तूवरच छापण्याचं बंधन आता कायद्यानंच उत्पादकांवर घातलेलं आहे. त्यामुळे पॅक केलेल्या प्रत्येक पदार्थांवर त्याची किंमत छापलेली असते. ग्राहकाच्या हिताच्या दृष्टीने हे योग्य असंच पाऊल आहे. तरीही छापलेल्या किमतीवर वेगळंच लेबल चिटकवून ग्राहकाला जास्त किंमत द्यावी लागण्याची फसवणूकही केली जाते. त्यामुळेच आता बहुतांश पदार्थांवर काळ्या पांढऱ्या उभ्या रेषा असलेलं एक चित्र छापलेलं असतं. त्यालाच बारकोड म्हणतात. हे बारकोड म्हणजे त्या पदार्थाची निर्विवाद ओळख पटवणारी सांकेतिक भाषाच असते. जसा एखाद्या व्यक्तीचा पासपोर्ट किंवा काही दिवसांनी प्रत्येकाला मिळणारा नॅशनल युनिक आयडेन्टिफिकेशन नंबर त्याची आणि त्याचीच निर्विवाद ओळख पटवतो, तसाच बारकोड त्या पदार्थाची निर्विवाद ओळख पटवतो. त्या पदार्थाची सर्व माहिती संगणकात साठवलेली असते. त्यामुळे एकदा का त्या पदार्थाची ओळख पटली, की त्या माहितीचा उपयोग करून त्याची निर्धारित केलेली किंमतही समजते आणि तीही संगणकामार्फत तयार होणाऱ्या बिलात समाविष्ट केली जाते. किंवा संगणकाच्या पडद्यावर वाचता येते. ही ओळख पटवणारं बारकोड उत्पादक कंपनीनंच तयार केलेलं असल्यामुळे त्यात हेराफेरी करण्याची शक्यता नगण्यच असते. बारकोडमध्ये उभ्या काळ्या आणि पांढऱ्या रेषा तसंच काही आकडे असतात. या रेषांची जाडी व लांबी यावरून सांकेतिक भाषेत त्या पदार्थाची ओळख पटवणारं कोडं तयार होतं. त्यात त्या आकड्यांचाही सहभाग असतो. ते कोडं वाचण्यासाठीही खास रिडरचा वापर करावा लागतो. लेझर प्रकाशाचा वापर करणाऱ्या या रीडरमधून प्रकाशाचा एक ठिपका या रेषांवरून फिरवला जातो. तो त्या रेषांची लांबी, जाडी आणि त्यांच्यामधलं अंतर वगैरे सर्वांची नोंद करून ती संगणकाकडे पाठवतो. त्याबरोबर संगणकाकडून त्या पदार्थाची माहिती व किंमत पडद्यावर दाखवली जाते. एकाच वेळी अनेक पदार्थ विकत घेतले गेले असतील, तर तयार केल्या जाणाऱ्या बिलावर त्या किंमतीची नोंद होते. केवळ खाद्यपदार्थांसाठीच नाही तर औषधं, साबू, टूथपेस्ट यासारख्या नेहमीच्या उपयोगातील वस्तूंसाठी आता बारकोडचा वापर केला जातो. पुस्तकांसाठीही तो केला जातो. त्यामुळे पुस्तकाच्या मलपृष्ठांवर आता किमतीऐवजी त्या पुस्तकाची ओळख पटवणारा बारकोड छापलेला असतो. भाज्या, फळफळावळ, मांस, मासे यासारख्या ताज्या पदार्थांसाठी त्याचा वापर होत नाही. पण हेच पदार्थ जर वजन करून प्लास्टिकच्या पिशव्यांत पॅक केलेले असतील, तर त्यांच्यावरही बारकोड छापलेला आढळतो.बारकोड निर्माण करणाऱ्या दोनशे प्रणाली आज उपलब्ध आहेत. त्यातल्या दोन तीनचाच वापर जास्त होतो. या प्रणालीतील सॉफ्टवेअरचा वापर करू बारकोड तयार केला जातो. बारकोड तयार करणाऱ्या सॉफ्टवेअरमध्येच त्याची छपाई करणाऱ्या सॉफ्टवेअरचा समावेश असतो. त्यामुळे सहजगत्या त्याची निर्मिती आणि छपाई करणं शक्य झालं आहे. ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार जवळजवळ टाळले गेले आहेत.*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धांवुनि जाईन श्रीमुख पाहीन । इडापिडा घेईन विठोबाची ॥१॥ तया सुखा दृष्टि लागेल वो झणीं । मग मी साजणी काय करूं ॥२॥ म्हणोनि माझें चित्त व्यापिलें उद्वेगें । सिणलें मी उबगें जन्मोजन्मीं ॥३॥ धरोनियां घालीं जीवाचे अंतरीं । आंतोनि बाहेरी जाऊं नेदीं ॥४॥ वासना पापिणी करील पायरव । मग हा अनुभव कोठें पाहूं ॥५॥ वृत्तिसहित करीन मनाचें सांडणें । न विसंबें प्राणें म्हणे नामा ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काट्यातून फुलणारा गुलाब बघून आपल्याला खूप आनंद होत असतो आणि क्षणात आपण, आपल्या स्वार्थासाठी त्याला तोडून घेत असतो. तरीही त्या गुलाबाला आपल्या रूपाचा गर्व आणि अभिमान नसतो आणि तोडणाऱ्याचा सुद्धा त्याला राग येत नाही. पण, एखादी व्यक्ती सुंदर असेल तर त्या व्यक्तीला आपल्या सुंदरतेविषयी अफाट घमंड आणि अभिमान असतो. अशा व्यक्तींनी त्या निसर्गाच्या सान्निध्यात व संघर्षातून फुललेल्या गुलाबाकडून शिकून घेण्याचा प्रयत्न करावा. कारण सुंदरता कितीही असेल तरी काही वेळात किंवा वयानुसार कमी होत जाते. सुंदर दिसण्यासाठी काही साधनाचा कितीही उपयोग करून सुंदरता तात्पुरता साठी मिळवता येऊ शकते पण कायमस्वरूपी नाही. म्हणून मनाची तसेच विचाराची सुंदरता असायला पाहिजे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकदा *एका उंदराने हिरा* गिळला. हिऱ्याच्या मालकाने त्या *उंदिराला मारण्यासाठी* एका शिकाऱ्याला कंत्राट दिले. शिकारी जेव्हा त्या उंदिराला मारण्यास पोहचला तेव्हा *सगळे उंदिर एक घोळका* करून एका दुसऱ्यावर *चढून दाटीवाटीने* बसले होते, पण एक उंदिर त्यांच्यापासून *वेगळा बसला* होता. शिकाऱ्याने सरळ जाऊन त्या वेगळ्या बसलेल्या त्याच *उंदिराला पकडले ज्याने हिरा गिळला होता.*हिरामालक आश्चर्यचकित झाला त्याने शिकाऱ्यास विचारले, तुम्ही हजारो उंदरातून ज्याने हिरा गिळलाय त्याच *उंदराला कसे काय ओळखले?*शिकाऱ्याने उत्तर दिले खूप सोपं काम होत, *जेव्हा मूर्ख धनवान बनतो तेव्हा तो इतरांशी संपर्क तोडतो..!*आयुष्यात *धन, दौलत, ऐश्वर्य, संपत्ती, नाव आणि सगळं काही कमवा* पण *आपण ज्या समाजात वाढलो, जगलो, मोठे झालो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो.* आपण ह्या *समाजामुळेच मोठे झालो हे कधीच विसरू नका..* नाहीतर त्या *मूर्ख उंदिरामध्ये* आणि *आपल्यात* काहीच *फरक* उरणार नाही..!*माणसे जोडा मानवता हाच धर्म*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 एप्रिल 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/QTphTzLxRqraanB1/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌈 *'जागतिक आवाज दिन (World Voice Day)'* 🌈 🌈 *_ या वर्षातील १०६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌈 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌈•••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९९: चालकरहित ’निशांत’ विमान व जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या ’त्रिशूल’ क्षेपणास्त्राची ऒरिसातील चंडीपूर येथे चाचणी**१९९५: देशातील लोकशाही टिकवुन ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्‍नांचा गौरव म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन यांना ’ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान**१९७२:केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून ’अपोलो-१६’ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले**१९४८: राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना**१९२२: मुळशी सत्याग्रह सुरू झाला.**१८५३: भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे अशी प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली. ’ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (GIP Railway) या कंपनीने ही सेवा सुरू केली.* 🌈 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🌈 ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३: सिद्धार्थ शंकर महादेवन -- गायक* *१९८२: स्वप्ना पाटकर --भारतीय लेखिका, गीतकार, आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या एक फिल्म निर्माता* *१९७८: कविता मोरणकर -- कवयित्री, लेखिका* *१९७८: लारा दत्ता – मॉडेल, हिन्दी चित्रपट अभिनेत्री व निर्माती, मिस युनिव्हर्स (२०००)**१९७८: प्रा. डॉ विनायक पवार -- कवी, चित्रपट कथा लेखक**१९७५: वसंत सखाराम साळुंके -- कवी, लेखक**१९७१: प्रा. डॉ. जया जितेंद्र कदम -- कवयित्री, लेखिका**१९६३: सलीम मलिक – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९६०: प्रा. डॉ. संपदा सुधीर कुल्लरवार-- कवयित्री, लेखिका**१९५६: सलीम आबालाल शेख -- लेखक**१९५५: प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे -- लेखक**१९५३: ज्योत्स्ना श्रीकांत शिंत्रे -- लेखिका* *१९४८: सुहास विनायक सोहनी -- प्रसिद्ध लेखक**१९४८: ज. मो. अभ्यंकर -- विद्यमान आमदार, विचारवंत,लेखक**१९४४: सुहासिनी कीर्तीकर -- लेखिका* *१९४०: बनवारीलाल पुरोहित -- माजी राज्याचे राज्यपाल**१९३४: रामचंद्र दामोदर तथा राम नाईक – माजी केन्द्रीय पेट्रोलिअम मंत्री, माजी राज्यपाल तथा लेखक**१९२६: श्यामराव कांबळे -- संगीत संयोजक (मृत्यू:१७ ऑक्टोबर २०१८ )**१९२२: नीळकंठ पुरुषोत्तम जोशी -- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान आणि भारतीय मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक(मृत्यू: १५ मार्च २०१६ )**१८८९: चार्ली चॅपलिन – अभिनेता,दिग्दर्शक आणि संगीतकार.त्यांच्या ‘लाईम लाईट‘ या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळाले होते. ’कीड ऑटो रेसेस अ‍ॅट व्हेनिस’ या त्यांच्या दुसर्‍या चित्रपटातील डर्बी हॅट,घट्ट कोट ढगळ पँट,चौकोनी मिशा,बेढब जोडे आणि काठी या वेशभूषेमुळे चार्ली चॅप्लिन म्हणजे लोकांना मूर्तिमंत विनोद वाटू लागले. (मृत्यू:२५ डिसेंबर १९७७)**१८६७: विल्बर राईट – आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (मृत्यू: ३० मे १९१२ )**१८४८: कंदुकुरी वीरेसालिंगम-- मद्रास प्रेसिडेन्सी,ब्रिटिश भारतातील एक समाजसुधारक आणि लेखक(मृत्यू: २७ मे १९१९ )* 🌈 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌈••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: माधव राजाराम पोतदार -- प्रसिद्ध कवी, लेखक(जन्म: १५ एप्रिल १९३५ )**२०१९: गोपाळ मारुतीराव पवार(गो.मा) --महाराष्ट्रातील ख्यातनाम समीक्षक आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे चरित्रकार (जन्म: १३ मे १९३२ )* *२०००: दिनकर गोविंद तथा अप्पासाहेब पवार – ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेले कृषीतज्ञ, कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, शाहू महाराजांचे चरित्रकार (जन्म: १९३०)**१९९५: रमेश टिळेकर – अभिनेते व वकील, ’घाशीराम कोतवाल’ या नाटकातील भूमिकेसाठी प्रसिद्ध**१९८२: अच्युत महादेव बर्वे -- कथाकार, कादंबरीकार(जन्म: ३ फेब्रुवारी १९२७ )**१९६६: नंदलाल बोस -- जगविख्यात चित्रकार (जन्म: ३ डिसेंबर १८८२ )**१९२८: महादेव मल्हार जोशी -- संस्कृत भाषेचे व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक(जन्म: २ जानेवारी १८७३ )**१८५०: मेरी तूसाँ –’मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम’च्या संस्थापिका(जन्म: १ डिसेंबर १७६१ )**१७५६: जॅक्स कॅसिनी – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (जन्म: ८ फेब्रुवारी १६७७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंघोळ किंवा स्नान*अंघोळ केल्याने शरीरासोबत मनाचीही शुद्धता होते............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *संपूर्ण देशात एकही टोलनाका दिसणार नाही. आता देशभरातील टोल प्लाझा हटवले जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांना आता जुलै-ऑगस्ट २०२५ मध्येही परीक्षा देता येणार.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अस्तिक कुमार पांडे MMRDA चे नवे सहआयु्क्त, आर एस चव्हाण राज्य विमा योजनेच्या आयुक्तपदी; पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *स्टेट बँकेकडून गृह कर्जदारांना दिलासा, रेपो रेट घटताच व्याजदरात कपात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत 44 टक्के वेतन खात्यावर जमा, या आधी मार्च महिन्याचे केवळ 56 टक्के वेतन देण्यात आले होते*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *संभाजी भिडेंवर भटक्या कुत्र्याचा हल्ला, पायाला कडकडून चावला, तातडीने रुग्णालयात केलं दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *श्रेयस अय्यर ठरला ICC प्लेयर ऑफ द मंथ, दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाला; न्यूझीलंडच्या डफी आणि रचिन रवींद्रला मागे टाकले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बाबू जिंकलोड 👤 भद्रे स्वप्नील 👤 माधव गायकवाड 👤 अनिरुद्ध वंगरवार 👤 नितीन आंबेकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 41*सुगंधी आहे मी सुंदर पर्णी**घरोघरी लागते माझीच वर्णी**मदत करते ठेवण्यास शुद्ध वातावरण**देते मी रात्रीला प्राणवायू नि ओझोन* *औषधी आहे आजारावर बहुगुणी* *शोभत आहे जसे मांगल्य अंगणी*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - संत्री ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संकटांना सामोरे गेला तर धैर्य आणि सामर्थ्य दोन्हीही तुमच्या सहाय्यार्थ धावून येतील.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या वर्षी लॉस एंजलिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक खेळात टी-२० क्रिकेट खेळाचा समावेश झाला आहे ?२) न्यूयॉर्क शहरामध्ये १४ एप्रिल हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जाणार आहे ?३) लेझर किरणांनी हवेत विमान पाडणारा भारत हा कितवा देश ठरला आहे ?४) 'कविता करणारा, रचणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे उभारण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कशाचे प्रतीक ओळखला जातो ? *उत्तरे :-* १) सन २०२८ २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिन ३) चौथा ( अमेरिका, रशिया, चीन ) ४) कवी ५) स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *अनुवांशिकता म्हणजे काय ?* 📙 आमची वंशावळ' आमची जमात, अनुवांशिक रंगरूप व अनुवांशिक रोग इत्यादी गोष्टी सतत कानावर पडत असतात. काही वेळा चर्चेत येत असतात. अनुवांशिकी किंवा हेरिडिटी या संदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन अॅबेट ग्रेगर जोहनान मेंडेल यांनी केले. मेंडलचे नियम म्हणून त्यांनी केलेले संशोधन जनुकशास्त्रात आजही आधारभूत मानले जाते.मेंडलचा पहिला नियम सांगतो की, विरुद्धगुणी शुद्ध बीजांचा संकर घडवला, तर त्यातील आक्रमक बीजाचे गुणधर्म पुढच्या पिढीत उतरतात. दुसऱ्या नियमानुसार एकापेक्षा जास्त जनुकांच्या जोडय़ा जर यात सामील असतील तर प्रत्येक जोडीतील आक्रमक जोडीचे संयुक्त गुणधर्म प्राधान्याने पुढच्या पिढीत दिसतात. याचाच एक सोपा अर्थ म्हणजे जसेच्या तसे संक्रमण होत नाही, तर त्यात प्राधान्यक्रम ठरवला जातो.या साऱ्या गोष्टी विविध वनस्पतींच्या रंगसंकरातून, उंच बुटक्या जातींतून मेंडेल यांनी सिद्ध केल्या. यानुसार अनुवंशिकीचा विचार माणसाच्या संदर्भात करायचा झाला तर एकाच बीजांडांचे विभाजन होऊन झालेली जुळी भावंडेच फक्त सारखी असू शकतात. अन्यथा पहिल्या पिढीतील सर्व गुणधर्म दुसऱ्या पिढीत कधीही आढळणार नाहीत. स्त्रीबीजांडात व पुरुष शुक्रजंतुत जर प्रत्येक २३ क्रोमोसोमच्या जोड्या असतील, तर विविध गुणोत्तरातून २^२३ म्हणजेच ८३,८८,६०८ इतक्या विविध प्रकारे (पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा यांच्यात अनुवांशिकी गुणधर्म जसेच्या तसे येण्याची शक्यता ८३,८८,६०८ मध्ये एक एवढीच राहते.) अनुवंशिकी संक्रमण होऊ शकते.जगभरची सर्व माणसे जरी मूलतः आफ्रिकेत निवास करीत होती, तरीही चेहरेपट्टी, उंची, डोळ्यांचे रंग यात असंख्य बदल याच कारणाने विविध जाती जमाती आढळतात.याशिवाय हवामान, रहाणीमान, सूर्यप्रकाश यांचा परिणाम कातडीच्या रंगावर होत असतो, तो वेगळाच. त्यामुळेच जगातील असंख्य प्राणी, साडेसहाशे कोटी माणसे, विविध वनस्पती यांत विविध प्रकार आपल्याला सहजगत्या पाहावयास मिळतात.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धांउनियां मिठी घालीन संतचरणीं । सांगे वचनींचे गुज तुम्हां ॥१॥ विठोबाच्या गांवा यारे मनीं येकवेळां । फारा आहाळला जीव माझा ॥२॥ आनंदाचें जीवन पाहिन श्रीमुख । शोकमोहदुःख हरती माझे ॥३॥ विटेसहित चरण देईन आलिंगन । तेणें माझी तनु वोल्हावेल ॥४॥ तुम्ही माझे आवडते अंतरंग । माझे जिवलगा प्राणसखे ॥५॥ नामा म्हणे विठो कृपेची माउली । तेव्हां ते साउली करिल मजा ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतःसाठी जगताना आनंद तर वेळोवेळी मिळत असतो. पण,पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला समाधान मिळत नाही. कारण समाधान ही संपत्ती कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही. ती संपत्ती फक्त आपल्यापाशीच असते. जेव्हा, इतरांसाठी आपल्या हातून एखादे नि:स्वार्थ भावनेचे कार्य होत असतात त्यातून जो समाधान मिळतो तेच समाधान जगावेगळे असते म्हणून ती संपत्ती कशाप्रकारे मिळवता येईल यासाठी प्रयत्न करून बघावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रसंगाचे भान ठेवावे*एका सरोवरात कुबु ग्रीव् नावाचे कासव राहत होते. दोन हंस तिथे जलविहारासाठी येत. कासवाशी त्यांची मैत्री झाली. कासवाला ते चांगल्या चांगल्या कथा सांगत. एक वर्षी अवर्षणामुळे सरोवर आटले. हंस कासवाला म्हणाले, लवकरच राहिलेला चिखल सुद्धा आटेल. मग तुझं कसं होईल? सह विचारातून एक युक्ती सुचली. एक लांब काठी दोन बाजूंनी हंसाने तोंडात धरावी व मध्यभागी कासवाने पकडावे. हंसाने उडत उडत दुसऱ्या तलावात जावे. त्यांनी कासवाला उडत उडत दुसऱ्या तलावात घेऊन जावे. त्यांनी कासवाला बजावले, मधे कोणत्याही कारणासाठी तोंड उघडू नको. नाहीतर उंचावरून पडून प्राण गमावशील.उड्डाण सुरू झाले मधेच एका गावातील लोक आश्चर्याने पाहत म्हणाले, “हे हंस गोल गोल काय नेत आहेत?” कासव रागावले ते हंसाला म्हणणार होते. “या मूर्खांना एवढेही समजत नाही का?” त्यासाठी त्याने तोंड उघडले आणि कासव जमिनीवर पडले.तात्पर्य - समाजात वागत असताना आपल्याला प्रत्येक वेळी प्रसंगाचे भान ठेवूनच वागले पाहिजे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 एप्रिल 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18vT7xQqyo/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟤 *_जागतिक कला दिवस_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••••• 🟤 *_ या वर्षातील १०५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟤 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९७: मक्‍केपासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.**१९९४: भारताची गॅट करारावर स्वाक्षरी**१९५०: आचार्य विनोबा भावे यांनी आंध्र प्रदेशातील पंचमपल्ली येथून भूदान चळवळीस प्रारंभ केला**१९४०: दुसरे महयुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.**१८९२: जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली**१६७३: मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.**१८६५: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे निधन. अॅडयु जॅक्सन यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ* 🟤 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟤••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: हेमंत दिनकर सावळे -- लेखक**१९८१: स्मिता हर्डीकर -- कवयित्री**१९७६: प्रा. डॉ. संजय वाघोजी जगताप -- लेखक* *१९७३: अरुण झगडकर -- कवी, लेखक**१९७२: मंदिरा बेदी -- हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री**१९७१: प्रा. डॉ.मिलिंद भाऊरावजी साठे -- लेखक* *१९७०: सुभाष गंगाराम किन्होळकर -- लेखक**१९६९: दिलीप तुळशिरामजी काळे -- कवी**१९६३: मनोज प्रभाकर -- भारतीय क्रिकेटपटूआणि प्रशिक्षक**१९६३: नरेंद्र प्रभू -- लेखक**१९६०:अशोक भैय्याजी लेकुरवाळे-- लेखक* *१९५९: विष्णु गुराबसिंह सोळंके -- प्रसिद्ध ज्येष्ठ कवी, गझलकार‎, लेखक**१९५५: डॉ. राजा दांडेकर -- लेखक**१९५२: मधुकर आरकडे -- ज्येष्ठ कवी-गीतकार (मृत्यू: १५ मार्च २०१५ )**१९४४: लक्ष्मीनारायण बोल्ली -- मराठी लेखक, अनुवादक व संशोधक,यांनी तेलुगु आणि मराठी अशा दोन्ही भाषांतून लेखन.(मृत्यू: २३ फेब्रुवारी २०१८ )**१९३५: माधव राजाराम पोतदार -- प्रसिद्ध कवी, लेखक(मृत्यू: १६ एप्रिल २०२३ )**१९३२: सुरेश भट – लोकप्रिय गझलकार, कवी (मृत्यू: १४ मार्च २००३ )**१९२२: हसरत जयपुरी – गीतकार (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९९ )**१९१२: मल्हार सदाशिव तथा ’बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक (मृत्यू: १३ जानेवारी १९९७ )**१८९४: भालचंद्र लक्ष्मण पाटणकर -- संपादक, समीक्षक (मृत्यू: १४ सप्टेंबर १९७३ )**१८९३: नरहर रघुनाथ तथा न.र.फाटक – चरित्रकार,टीकाकार,इतिहास संशोधक,संत साहित्याचे अभ्यासक व लेखक (मृत्यू: २१ डिसेंबर १९७९ )**१८९२: पांडुरंग जीवाजी सबनीस -- वैचारिक निबंधलेखक, नाटककार (मृत्यू: २३ जून १९६९ )**१८७४: त्र्यंबक सीताराम कारखानीस -- मराठी नाट्यदिग्दर्शक(मृत्यू: ८ जानेवारी १९५६ )**१७०७:लिओनार्ड ऑयलर – स्विस गणितज्ञ (मृत्यू:१८ सप्टेंबर १७८३)**१४६९: गुरू नानक देव – शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू (मृत्यू: २२ सप्टेंबर १५३९ )* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: विलास गोविंद सारंग -- कवी, कथाकार,कादंबरीकार,समीक्षक (जन्म: ११ जून १९४२ )**२०१३: वि. रा. करंदीकर – संत साहित्याचे अभ्यासक (जन्म: २७ ऑगस्ट १९१९ )**१९९५: पंडित लीलाधर जोशी – तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री**१९९०: ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ’ग्रेटा गार्बो’ – हॉलिवूड अभिनेत्री (जन्म: १८ सप्टेंबर १९०५ )**१९८०: जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी,तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २१ जून १९०५ )**१९१२: एडवर्ड जे. स्मिथ – आर.एम.एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान (जन्म: २७ जानेवारी १८५० )**१८६५: अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची जॉन बूथ याने हत्या केली. (जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ )**१७९४: मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ ’मोरोपंत’ – पंडीतकवी(जन्म: १७२९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लेख - आहेर*लग्न, समारंभ म्हटले की डोळ्यासमोर उभं राहते ते म्हणजे आहेर............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मुंबईच्या चैत्यभूमीवर लाखो आंबेडकरी अनुयायी नतमस्तक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहचा शुभारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पॉप गायिका केटी पेरीसह सर्व सहा महिला अंतराळ प्रवास करून सुरक्षितपणे परतल्या आहेत. त्यांचा हा अंतराळ प्रवास जवळपास 11 मिनिटांचा होता.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *धावत्या एसटी बसला अचानक आग; सोलापुरात बर्निंग बसचा थरार; भीषण घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पाच दिवसांनंतर मुंबईतील टँकरचालकांचा संप मागे, 'आयुक्तांकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही', टँकरचालक संघटना सर्वोच्च न्यायालयात जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *2010 चे साहित्य नोबेल पुरस्कार विजेते लेखक मारियो वर्गास लोका यांचे वयाच्या 89 व्या वर्षी पेरू येथे निधन.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा 2025 च्या शुभंकर व बोधचिन्हाचे अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सारिका भालचिम, शिक्षिका, पुणे 👤 सुधीर गुट्टे, गटशिक्षणाधिकारी, भोकर, नांदेड 👤 प्रा. श्रीराम गव्हाणे, संपादक तथा साहित्यिक, एल. बी. एस. कॉलेज, धर्माबाद 👤 शिवाजी अंबूलगेकर, शिक्षक तथा साहित्यिक, नांदेड 👤 नविद अहमद, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 चंद्रकांत देवके, सेवानिवृत्त शिक्षक 👤 दत्ताहारी पाटील जाधव 👤 सुनील पलांडे, शिक्षक 👤 मुकुंद एडके, धर्माबाद👤 संदीप पारणे, धर्माबाद👤 बबन साखरे 👤 अंकुश दंडेवाड 👤 रामकिशोर झंवर, व्यापारी, धर्माबाद👤 योगेश बलकेवाड, येवती 👤 संतोष लक्ष्मण पाटील, येवती 👤 कालिदास भोगेवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 40*फळ आहे रसदार**पोषक घटकाचा भरमार**आंबट गोड चव माझी खास**त्यासोबत येतो सुवासिक वास**नावासारखा आहे सुंदर रंग माझा**मी तर आहे नागपूरचा राजा**ओळखा पाहू मी आहे कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - हत्ती ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शून्यातून दुनिया निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अमृतसर येथील ब्रिटिश कमिशनरच्या नोंदीनुसार जालियनवाला बाग हत्याकांडात किती व्यक्ती शहीद झाले ?२) 'जालियनवाला बाग स्मृती दिवस' केव्हा साजरा केला जातो ?३) जालियनवाला बाग येथील हत्याकांडास जबाबदार असलेला ब्रिटिश शासक जनरल डायरला कोणी ठार केले ?४) अमृतसर शहरातील जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा घडले ?५) सरदार उधमसिंग यांना जनरल डायरच्या हत्येच्या आरोपाखाली केव्हा फाशी देण्यात आली ? *उत्तरे :-* १) ४८४ २) १३ एप्रिल ३) सरदार शहीद उधमसिंह ( १३ मार्च १९४० ) ४) १३ एप्रिल १९१९ ५) ३१ जुलै १९४०*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *मुलाचा आवाज का फुटतो ?* 📒'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमानं मराठी माणसावर जणू गारूड केलं होतं. त्यातल्या त्या छोट्या छोट्या मुलांनी बड्या बड्या गायकांची गीतं इतक्या तयारीनं गायली होती, की सामान्य रसिक, जाणकार इतकंच काय, पण मान्यवर परीक्षकही भारावून गेले होते. नेहमीच्या परीक्षकांचं काय सांगावं? ते तर त्या मुलांमध्ये त्यांच्यातलेच होऊन मिसळून गेले होते. हसतखेळत त्यांना उत्तेजन देत ते त्यांना त्यांच्यामधल्या ज्या काही त्रुटी होत्या त्यांची जाणीव करून देत होते. ते करतानाही त्यांच्या उणिवांबद्दलच न बोलता कोणत्या बाबतीत सुधारणेला जागा आहे, हेच हळुवारपणे, केवळ वयानं लहान असणाऱ्या स्पर्धकांच्या ध्यानात आणून देत होते. म्हणूनच तर परीक्षकांच्या निर्णयावर त्यांचीच काय, पण त्यांच्या पालकांचीही प्रतिकूल प्रतिक्रिया उमटली नाही. हे नेहमीचेच यशस्वी काय किंवा मान्यवर परीक्षक काय त्या स्पर्धेतील सीनियर गटातील मुलांना परत परत सांगत होते, की आता तुझा आवाज फुटण्याची वेळ आली आहे. तेव्हा जरा जपून राहा. अनिवार्यपणे होणाऱ्या त्या बदलाला कसं सामोरं जायचं यासंबंधीच्या सूचनाही ते देत होते; पण या सूचना मुलींना दिल्या जात नव्हत्या. त्या फक्त मुलांनाच दिल्या जात होत्या. असं का? मुलांचा आणि मुलांचाच आवाज का फुटतो? वयात येताना मुलं आणि मुली, सर्वांच्याच शरीरामध्ये तसंच शरीरक्रियांमध्ये जे काही बदल होत असतात त्याचाच हा परिपाक आहे. त्या काळात काही संप्रेरकांचा स्राव शरीरात प्रथमच सुरू होतो. त्यांच्या प्रभावाखाली वयात येताना उंची, रुंदी यामध्ये तसंच काही अवयवांच्या आकारात आणि त्यांच्या कार्यपद्धतीत बदल होत असतात. मुलांच्या बाबतीत स्वरयंत्र हा त्यातलाच एक अवयव आहे. याचा आकार मोठा होतो. इतका मोठा, की गळ्याच्या बाहेरूनही ते स्वरयंत्र स्पष्टपणे दिसू लागतं. यालाच इंग्रजीमध्ये 'अॅडम्स अॅपल' असं म्हणतात. आवंढा गिळताना हे स्वरयंत्र वर-खाली होत असताना स्पष्ट दिसतं. या मोठ्या आकारामुळं त्यातून उठणारे स्वरही आपली बैठक बदलतात. आवाज खर्जाकडे जाऊ लागतो. त्यापायी तो भरदार होतो. त्यामुळे गाण्यासाठी आवाजाची पट्टी बदलते. यालाच 'आवाज फुटणं' असं म्हणतात. मुलींच्या शरीरातील स्वरयंत्राचा आकारही बदलतो; पण तो तितकासा लक्षणीय नसतो. त्यांचा आवाज अधिक वरच्या पट्टीतला होतो; पण त्या बदलत्या पट्टीशी जुळवून घेणं त्यांना तितकंसं कठीण जात नाही. मुलांच्या बाबतीत मात्र हा पट्टीतला फरक जास्त असतो. त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्यांना अधिक प्रयास करावे लागतात. फुटलेल्या आवाजात आपली मूळची गायकीची खुमारी राखून ठेवण्यासाठी त्यांना जास्त धडपड करावी लागते.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धरोनि हस्तक बैससी एकांतीं । भक्तासी श्रीपती सर्वकाळ ॥१॥ दाखवीं चरण दाखवीं चरण । दाखवीं चरण धांवे नेटें ॥२॥ सर्व आचरण दाविसी प्रकार । कल्पना अंधार निमित्याचा ॥३॥ नामा म्हणे होसी चतुर आपण । आमुचें निर्वान पाहूं नको ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भलेही माणसातील माणुसकी संपत चाललेली असेल तरी आजही काहींमध्ये थोडीतरी माणुसकी जिवंत असताना दिसून येते. म्हणून कोणी माणुसकीच्या नात्याने मदत करण्याचा प्रयत्न करतात तर कोणी न कळताच आधार देऊन जातात.जर असेच विचार आणि एकमेकांप्रती आदर राहिले तर पुन्हा एकदा माणुसकी धर्मात वाढ होऊ शकते. आणि आज या माणुसकी धर्माची खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खऱ्या खोट्याची पारख*एका सोनाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले होते. त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. एके दिवशी सोनाराच्या पत्नीने, आपल्या मुलाला नीलमणीचा एक हार दिला आणि म्हणाली- "बेटा, हा हार घेऊन तुझ्या काकांच्या दुकानात जा आणि त्यांना सांग की हा हार विका व आम्हाला काही पैसे द्या."मुलगा तो हार घेऊन काकांच्या दुकानात गेला. काकांनी त्या हाराकडे बारकाईने पाहिले आणि म्हणाले - "बेटा, आईला सांग की सध्या बाजारात खूप मंदी आहे. थोडे दिवस थांबून नंतर तो विकल्यास, तुम्हाला चांगला भाव मिळेल." त्याला थोडे पैसे देत त्याचे काका म्हणाले, “तू उद्यापासून माझ्याबरोबर दुकानात बसत जा.”दुसऱ्या दिवसापासून तो मुलगा रोज दुकानात जाऊ लागला आणि तिथे बसून हिर्यान्ची आणि रत्नांची पारख कशी करायची, ते शिकू लागला.थोड्याच दिवसात, तो हिऱ्यांचा मोठा पारखी झाला. आपल्या हिऱ्यांची पारख करवून घेण्यासाठी, दूर -दूरवरून लोकं त्याच्याकडे येऊ लागले.एके दिवशी त्याचे काका त्याला म्हणाले, "बेटा, तुझ्या आईकडून तो हार घेऊन ये आणि तिला सांग की आता बाजारात खूप तेजी आहे, त्याला चांगला भाव मिळेल."आईकडून तो हार घेऊन, त्याने स्वत:च त्याची पारख केली असता तो हार नकली असल्याचे त्याला आढळून आले. त्याला आश्चर्य वाटले, की काका स्वत: हिऱ्याचे व रत्नांचे मोठे पारखी आहेत... मग त्यांनी आम्हाला हे का सांगितले नाही?मुलगा तो हार घरीच ठेवून तसाच दुकानात परत आला.काकांनी विचारले, "अरे तू हार का आणला नाहीस?" तो म्हणाला, "काका, तो हार तर नकली आहे... परंतु तुम्ही माझ्यापासून हे का लपवून ठेवलेत?"तेव्हा काका म्हणाले, "जेव्हा तू पहिल्यांदा हार आणला होतास, तेव्हा जर मी तो हार नकली आहे असं सांगितलं असतं, तर तुला असं वाटलं असतं की आज आमच्यावर वाईट वेळ आली आहे, म्हणून काका मला असं सांगत आहेत.पण आज जेव्हा तुला खरं काय आणि खोटं काय, हे पारखण्याचे ज्ञान झाले आहे, तेव्हा तुला समजलेच असेल की तो हार खरोखरीच नकली आहे. त्यावेळी खरं बोलण्यापेक्षा, नातं सांभाळणं, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं."सत्य हे आहे की या जगात, खऱ्या ज्ञानाशिवाय आपण जो काही विचार करतो, पाहतो आणि जाणतो ते चुकीचे आहे. आणि म्हणूनच अशा गैरसमजुतींना बळी पडून आपल्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि आपलं आयुष्य भरकटायला लागतं.इंटरनेटवरून साभार •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 एप्रिल 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2021/04/19042021-hanuman.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔴 *_ या वर्षातील १०२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔴 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९८: गेल्या शतकातील साठच्या दशकात हरितक्रांती घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावणारे सी. सुब्रम्हण्यम यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान**१९९७: पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांनी राजीनामा दिला.**१९९७: पूर्व प्राथमिक प्रवेशाकरता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर**१९६७: कैलाश नाथ वांछू यांनी भारताचे १० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला**१९६१: रशियाचा युरी गागारिन हा अंतराळात भ्रमण करणारा पहिला मानव बनला. त्याने अंतराळात १०८ मिनिटे भ्रमण करुन पृथ्वीप्रदक्षिणा केली**१९४५: अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले.**१६०६: ग्रेट ब्रिटनने ’यूनियन जॅक’ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.* 🔴 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔴••••••••••••••••••••••••••••••••*१९८२: रेवती राहुल जोशी --पत्रकार, लेखिका, संपादिका* *१९७५: डॉ. सच्चिदानंद शंकर बिचेवार -- लेखक* *१९७५: आसाराम लोमटे -- प्रसिद्ध लेखक* *१९७२: रवी वसंत सोनार -- कवी, लेखक गीतकार**१९६७: प्रा. डॉ. मनोहर नाईक -- कवी, लेखक**१९६४: प्रकाश दिनकर सकुंडे -- कवी* *१९६१: शशिकांत हिंगोणेकर -- सुप्रसिद्ध कवी, निवृत्त शिक्षण उपसंचालक**१९६०: मेघना हेमंत साने -- कवयित्री, लेखिका**१९५८: चरणदास वैरागडे -- कवी* *१९५६: रामचंद्र अनंत देखणे - कथाकार, कादंबरीकार, लोककलांचे अभ्यासक (मृत्यू: २६ सप्टेंबर २०२२ )**१९५४: विनय नारायणराव मिरासे (अशांत) -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५४: सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार,लेखक, दिगदर्शक,कवि आणि गीतकार (मृत्यू: २ जानेवारी १९८९ )**१९५०: विजयेंद्र घाटगे -- हिंदी चित्रपट आणि भारतीय दूरचित्रवाणी अभिनेते**१९४९: छाया महाजन -- मराठीतील प्रसिद्ध साहित्यिका* *१९४९: सुभाष त्र्यंबक अवचट -- चित्रकार, लेखक, कवी**१९४५: डॉ. यशवंत शंकर साधू -- संत साहित्यांचे अभ्यासक (मृत्यू: १४ एप्रिल २०२० )**१९४३: सुमित्रा महाजन –भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशमधील वरिष्ठ नेत्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित**१९४२: सुनीती जयंत आफळे -- कथाकार**१९४१: शरद आत्माराम काथवटे -- लेखक**१९३८: गुलशन बावरा(मेहरा) -- चित्रपट गीतकार (मृत्यू: ७ ऑगस्ट२००९ )**१९३२: लक्ष्मण कादिरमगार – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते (मृत्यू: १२ ऑगस्ट २००५ )**१९२०: शैलजा प्रसन्नकुमार राजे -- कथाकार, कादंबरीकार, चरित्रकार(मृत्यू: १६ ऑक्टोबर २००६ )**१९१७: विनू मांकड – सलामीचे फलंदाज व डावखुरे मंदगती गोलंदाज (मृत्यू: २१ ऑगस्ट १९७८ )**१९१४: कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव – चित्रपटासाठी कथा, संवाद व गीतलेखन करणारे.(मृत्यू: २८ फेब्रुवारी १९९५ )**१९१०: पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे – अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक (मृत्यू: १३ ऑगस्ट १९८० )**१८७१: वासुदेव गोविंद आपटे – लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार (मृत्यू: २ फेब्रुवारी १९३० )*🔴 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••• *२०१४: शरद् पाटील --महाराष्ट्रातील एक विख्यात प्राच्यविद्यापंडित व सत्यशोधक मार्क्सवादी विचारवंत.(जन्म: १७ सप्टेंबर १९२५ )* *२०११: सचिन भौमिक -- हिंदी चित्रपटांचे पटकथा लेखक (जन्म: १७ जुलै १९३० )* *२००६: राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक (जन्म: २४ एप्रिल १९२९ )**२००१: देवांग मेहता -- भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीजचे अध्यक्ष(जन्म: १० ऑगस्ट १९६० )**१९७७: भानुदास बळिराम शिरधनकर ऊर्फ भानू शिरधनकर -- मराठी लेखक (जन्म: १६ ऑक्टोबर १९१५ )**१९४५: फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ३० जानेवारी १८८२ )**१९०६: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र ’न्यायरत्‍न’ भट्टाचार्य (जन्म: २२ फेब्रुवारी१८३६ )**१८१७: चार्ल्स मेसिअर – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (जन्म: २६ जून १७३० )**१७२०: बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा (जन्म: १ जानेवारी १६६२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हनुमान जयंती विशेष लेख...मनोजवं मारुततुल्य वेगंजिंतेंद्रियम बुद्धीमतां वरीष्ठमवातात्मजं मारुततुल्यवेगमश्रीराम दूतम शरणम प्रपद्ये..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उष्माघाताचा पहिला बळी विदर्भात; 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू, प्रशासन अलर्ट मोडवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *15 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर 16/11च्या हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा भारताच्या ताब्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्रात गडकिल्ल्यांचे पर्यटन, 10 दिवसांची आयकॉनिक रेल्वेटूर सुरू होणार, रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्यासह पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महिन्याच्या 7 तारखेला ST कर्मचाऱ्यांचा पगार, महामंडळाला 120 कोटी तातडीने; मंत्री सरनाईकांच्या बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळून ६ जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'बामू'मध्ये आजपासून ग्रंथ महोत्सव:संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन; शिरसाटांच्या मिश्किल टिप्पणीने सर्वजण खळखळून हसले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 - कोलकाताने चेन्नईला 8 विकेटने हरवले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अरुणा कलेपवार, उपक्रमशील शिक्षिका, नांदेड👤 गंगाधर पेंडपवार👤 आकाश वाघमारे👤 बालाजी चुनुपवार, येवती👤 गजानन कुरेवाड, विषय शिक्षक, 👤 मिनाज सय्यद👤 कलीम शेख👤 आसिफ शेख*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 39*खांबासारखे पाय माझे सुपासारखे कान**दात बाहेर आहेत माझे नाक आहे शान* *मेहनती आहे मी प्राणी बुद्धीमान* *सर्कशीत भेटतो मी जरी असले डोळे लहान*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - मेंढी ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हाताची पाचच बोटे हजारो कामे करतात, कारण त्यांच्यात ऐक्य असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ४० मी उंचीचा जगातील सर्वात उंच इनडोअर धबधबा कोणता ?२) इंग्रजांविरुद्ध पहिलं पाऊल उचलणारे क्रांतिकारक कोण ?३) 'ई - कॅबिनेट' प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य झाले ?४) 'कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) जैन धर्माचे २४ वे/शेवटचे तीर्थकर कोण होते ? *उत्तरे :-* १) रेन व्हर्टेक्स ( चांगी विमानतळ, सिंगापूर ) २) मंगल पांडे ३) सातवे ४) कर्तव्यदक्ष ५) भगवान महावीर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *डोळे मिटून चालताना तोल का जातो ?* 📕********************काय म्हणता? तुमचा तोल जात नाही? मग करूनच पाहा हा प्रयोग. रूमालाने डोळे बांधा आणि चालायला लागा! काय पडलात का ठेच लागून? डोळे उघडून चालतानाही ठेच लागते, पण ती आपल्या निष्काळजीपणामुळे डोळे मिटल्यानंतर मात्र सर्वांना थोडाफार त्रास होतो. याचे कारण आता पाहू.शरीराचा समतोल राखणे जनावरांना अगदी सोपे असते. कारण त्यांना चार पाय असतात. माणसाला मात्र दोन पायांवर शरीराचा तोल सांभाळावा लागतो. तोल सांभाळता येण्यासाठी लहान मेंदूचे कार्य खूप महत्वाचे असते. सर्कशीत तारेवर चालणारी मुलगी जसा शरीराचा तोल सांभाळत असते, त्याचप्रमाणे आपणही आपल्या नकळत शरीराचा तोल सांभाळत चालत असतो किंवा इतर हालचाली करत असतो. त्यामुळेच पार्किन्सन रोग किंवा सेरेबेलार सिन्ड्रोनसारख्या रोगांमध्ये माणूस नीट चालू शकत नाही. डोळे उघडे असूनही त्याचा तोल जातो. लहान मेंदूखेरीज शरीराच्या हात, पाय, मान या अवयवांच्या सुयोग्य हालचाली देखील तोल सांभाळण्यासाठी आवश्यक असतात.तोल सांभाळण्याच्या प्रक्रियेत डोळ्यांचाही काही प्रमाणात सहभाग असतो. दृष्टीमुळे आपल्याला जगाचे ज्ञान होते. आपण त्यामुळेच आत्मविश्वासाने पावले टाकतो. डोळे बंद केल्यानंतर एक प्रकारची असुरक्षिततेची भावना निर्माण होते. न दिसल्यामुळे अंतराचा, खोलीचाही अंदाज येत नाही. त्यामुळे आपण अडखळत यवकत थवकत चालू लागतो. एक गंमत तुम्ही अनुभवली असलेच.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देशीं परदेशीं जालों तुजविण । माझें समाधान कोण करी ॥१॥ चातक चकोरापरी पाहे वास । तूं कां गे उदास पांडुरंगे ॥२॥ नामा म्हणे चित्त देईं माझ्या बोला । जीउ हा उरला तो निघों पाहे ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कपड्याला स्वतः हून लागलेले डाग एकवेळचे धुतल्याने निघत असते. पण एखाद्या माणसाला मुद्दामहून डाग लावल्या जाते ते डाग कशानेही धुतले तरी जन्मभर निघत नाही. कारण त्या लावलेल्या डागात कपट, कारस्थान, स्वार्थ, छळ, निंदा, चुगली आणि बरेच काही व्यर्थ विकार मिसळवून ते बनविलेले असते म्हणून कोणाचे चांगले करायचे नसेल तर करू नये. पण, कोणाचे जीवन अशा व्यर्थ गोष्टींच्या नादी लागून उद्धस्त करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विद्येची किंमत*एकदा रामकृष्ण परमहंस गंगास्नानासाठी शिष्यासह गंगेवर गेले. त्यावेळी एक सिद्ध पुरुषही तिथे होते. त्यांनी एक चादर पाण्यावर पसरली व त्यावर उभे राहून नदी पार केली, तसेच परत आले व रामकृष्णांच्या एका शिष्याला म्हणाले तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतील का ? बारा वर्षे तप करून मी ही सिद्धी मिळवली आहे.शिष्याने रामकृष्णांना हे सांगितले ते म्हणाले,” त्यांना सांग तुझा हा चमत्कार दोन आणे किमतीचा आहे.” शिष्याने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला. तो भलताच भडकला मनाला,” पुन्हा असे म्हणाला तर तुमचे भस्म करून टाकेन.” ‘रामकृष्णाने पुन्हा तसेच म्हटलं तेव्हा प्रत्यक्ष त्यांनाच सिद्ध पुरुषांनी त्याचा अर्थ विचारला रामकृष्ण म्हणाले, ‘नावाडी सुद्धा दोन आण्यात पैलतिराला नेतो. त्याचा इतरांना उपयोग होतो पण तुमची विद्या फक्त तुमच्या पुरतीच आहे. त्या विद्येचा लोकांना उपयोग होत. नाही तिची किंमत शून्य आहे.तात्पर्य - माणसाने आपल्या विद्येचा कर्तृत्वाचा समाजाला उपयोग करून द्यावा.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 एप्रिल 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://sahityasevak.blogspot.com/2020/04/blog-post_20.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔵 *_विश्व पार्किंसंस दिवस_* 🔵••••••••••••••••••••••••••••••••••🔵 *_शिक्षक हक्क दिन_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_ या वर्षातील १०१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••••• *_महाराष्ट्र शासनाने 'शिक्षक हक्क दिन' हा ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे.महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो._**१९९९: अण्वस्त्रमारा करू शकणार्‍या ‘अग्नी-२’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी**१९९२: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर**१९८६: हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडे सहा कोटी किलोमीटर अंतरावरुन गेला. आता हा धूमकेतू २८ जुलै २०६१ रोजी परत पृथ्वीच्या एवढ्या जवळून जाणार आहे* *१९७९: युगांडाचा हुकूमशहा इदी अमीन पदच्यूत. युगांडाचा कसाई (Butcher of Uganda) या नावाने तो कुप्रसिद्ध होता.**१९७०: फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर वरून 'अपोलो-१३' या चांद्रयानाचे प्रक्षेपण झाले.चंद्रावर उतरणारे हे तिसरे यान असणार होते.पण सर्व्हिस मोड्यूलच्या ऑक्सिजन टाकीत बिघाड असल्याचे प्रक्षेपणानंतर दोन दिवसांनी लक्षात आल्यामुळे चंद्रावर न उतरताच त्याला परत यावे लागले.**१९३०: पंडित मोतीलाल नेहरू यांनी आनंद भवनचे स्वराज भवन असे नामकरण करून जनतेला दिले* *१९१९: आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना* 🔵 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८१: शुभांगी अत्रे -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री* *१९७९: प्रशांत दामोदर भरवीरकर -- कवी, लेखक* *१९७६: प्रा. डॉ. प्रमोद भीमराव गारोडे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९६६: प्रा. डॉ. चंद्रकुमार तेजराम राहुले -- लेखक* *१९६२: प्रा. डॉ. विश्वनाथ मुरलीधरराव रत्नाळीकर -- कवी, लेखक**१९६२: सुबोध श्रीकृष्ण कथाकार रिसबूड (सुमेध वडावाला)-- श्रेष्ठ कथाकार* *१९५७: जयंत भास्कर देशपांडे -- कवी, लेखक**१९५३: भानू काळे -- प्रसिद्ध मराठी लेखक, संपादक* *१९५१: रोहिणी हत्तंगडी – अभिनेत्री**१९५०: अंजली प्रभाकर मुळे -- लेखिका, संपादिका**१९५०: प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे -- सुप्रसिद्ध मराठी हिंदी भाषेतील लेखक, कवी, समीक्षक, संपादक, विविध पुरस्काराने सन्मानित**१९४९: डॉ. शेषराव नरवडे -- लेखक**१९४५: विश्वास देवमनराव दामले -- कवी, लेखक* *१९४४: अशोक चंदनमल जैन -- मराठी पत्रकार व लेखक(मृत्यू: १८ फेब्रुवारी २०१४ )* *१९३७: रामनाथन कृष्णन – पद्मभूषण व अर्जुन पुरस्कार विजेते लॉनटेनिस खेळाडू**१९३५: वसंत ला सावंत --मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी (मृत्यू: २३ डिसेंबर १९९६ )**१९३३: राम गोविंद ताकवले -- भौतिकशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, माजी कुलगुरू (पुणे विद्यापीठ)(मृत्यू: १३ मे २०२३ )**१९३०:डॉ. विदुला जवळगेकर -- लेखिका**१९०६: डॉ. सुमित्र मंगेश कत्रे – संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक.(मृत्यू:३१ ऑक्टोबर १९९८)**१९०४: कुंदनलान सैगल – गायक व अभिनेते (मृत्यू: १८ जानेवारी १९४७ )**१८८७: जामिनी रॉय – पद्मभूषण पुरस्कार विजेते चित्रकार (मृत्यू: २४ एप्रिल १९७२ )**१८६९: कस्तुरबा गांधी (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९४४ )**१८२७: जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ ’महात्मा फुले’ – श्रेष्ठ समाजसुधारक,विषेशत: समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९० )**१७७०: जॉर्ज कॅनिंग – ब्रिटनचे पंतप्रधान (मृत्यू: ८ ऑगस्ट १८२७ )**१७५५: डॉ. जेम्स पार्किन्सन – कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे,हे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ (मृत्यू: २१ डिसेंबर १८२४ )* 🔵 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१४: नंदू आत्माराम भेंडे (मूळ नाव सदानंद) -- मराठीतील पहिले रॉकस्टार(जन्म:२७ नोव्हेंबर १९५२ )**२००१: कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे – कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित (जन्म: ८ नोव्हेंबर १९१७ )**१९३८: कासीनाधुनी नागेश्वरराव -- भारतीय पत्रकार,राष्ट्रवादी,राजकारणी, व्यापारी(जन्म: १ मे १८६७ )**१९२६: ल्यूथर बरबँक – अमेरिकन वनस्पतीशास्त्रज्ञ व कृषीतज्ञ (जन्म: ७ मार्च १८४९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणसात दिसला देव*याविषयावर अनेक साहित्यिकांचे लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *तब्बल 78 देशांमधील 'आदर्श गाव' या जागतिक सर्वेक्षणात धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात वसलेलं बारीपाडा हे गाव दुसऱ्या क्रमांकावर झळकत आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दूरसंचार नियामकाने अलीकडेच दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या वेबसाइट किंवा अॅपवर त्यांच्या नेटवर्क कव्हरेजचा तपशीलवार नकाशा प्रकाशित करण्याचे दिले निर्देश, 120 कोटी नागरिकांना होणार फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *प्रताप सरनाईक ST महामंडळाचेनवे अध्यक्ष, ST ला आर्थिक बळकटी देण्याचा संकल्प*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोल्हापूर – सांगली राष्ट्रीय महामार्गातील भूसंपादनासंदर्भात नव्याने प्रस्ताव सादर करा; महसूल मंत्रीचंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नंदूरबारमध्ये तापमानाचा पारा तब्बल 45.3 अंशांवर, जळगाव व अकोल्यात 43.7 अंशांची नोंद, संपूर्ण राज्यात उष्णतेचा दाह वाढला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *2028 च्या ऑलिम्पिक मध्ये दिसणार क्रिकेटचा थरार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऋतुराज गायकवाडला दुखापत, धोनी पुन्हा सीएसकेचा कर्णधार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रामदास वाघमारे, संपादक👤 देविदास बसवदे, शिक्षक नेते, नांदेड 👤 युवराज पाटील👤 प्रवीण कोडम, संपादक 👤 विनोद चिलकेवार, नांदेड 👤 सिद्धेश रेवंतवार 👤 संजय नागरे 👤 सुरेश द्विदेवार 👤 साईनाथ हवालदार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 38*अंगावर असते कातडी केसाळ* *अन्न माझे वनस्पती गवताळ**उपजाऊ होते शेत माझ्या खताने**पहिला क्लोन बनविला माणसाने**निर्माण करतो लोकराचे**खातात मांस बोलाईचे*ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - कुत्रा••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशस्वी माणूस तो म्हणवला जातो की, जो आपल्यावर इतरांनी फेकलेल्या दगडापासून पायाबांधणी करतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे कितवे छत्रपती होते ?२) गावातील अतिक्रमण हटविण्याचा प्राथमिक अधिकार कोणाला असतो ?३) "फडक्याला जसा फासावर चढवतील तसा मलाही चढवतील, यापेक्षा जास्त काही करणार नाहीत ना ?" असे निर्भय उद्गार कोणी काढले ?४) 'कर्तव्याकडे पाठ फिरवणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) क्रांतिकारक मंगल पांडे यांना इंग्रजांनी फाशी केव्हा दिली ? *उत्तरे :-* १) तिसरे २) ग्रामसेवक ३) सार्वजनिक काका ( गणेश वासुदेव जोशी ) ४) कर्तव्यपरांडमुख ५) ८ एप्रिल १८५७ ( बराकपूर, कोलकाता )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *प्रथिने म्हणजे काय ?* 📙 प्रथिनांची आवश्यकता आपण अनेक वेळा ऐकलेली असते. पेशींची रचना प्रथिनांशिवाय होत नाही, हे ज्ञात असते. पण प्रथिने म्हणजे काय, याचे नेमके उत्तर मात्र अनेकदा माहीत नसते. अॅमिनो अॅसिड या प्रकारची वीस द्रव्ये प्रथिने बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यांचे अजूनही प्रकार आहेत, पण ते सजीव पेशी तयार होण्यासाठी उपयोगी पडत नाहीत.या वीस प्रकारच्या अमिनो अॅसिड्सच्या रेणूंची साखळी बनत जाते व विविध स्वरूपांची प्रथिने निर्माण होऊ लागतात. प्रथिनाच्या रचनेप्रमाणे त्याचे काम ठरते, कार्यकक्षा आखली जाते, उपयुक्तताही ठरते. स्नायूंच्या रचनेसाठी तीन लागतात, त्यावेळी त्यांच्यामुळे पेशी बनतात. याउलट शरीरात काम करणारी असंख्य प्रकारची वितंचके (Enzymes) ही सुद्धा प्रथिने असतात. तोंडातील लाळ, पोटातील पाचक रसातील पदार्थ, रक्तातील काही द्रव्ये, मज्जासंस्थेतील संदेशवहनास उपयोगी पडणारी रसायने हे सर्व प्रथिनांचेच प्रकार आहेत.वीस प्रकारच्या अमिनो अॅसिड्सच्या विविध पद्धतींनी जुळणाऱ्या जोड्यांतून असंख्य प्रथिने होतात. पण यांतील सर्वच अमिनो अॅसिड्स शरीरात तयार होतातच, असे मात्र नाही. ती अन्नातून मिसळावी लागतात. मग त्यांचे दोन प्रकार केले जातात - आवश्यक व अनावश्यक. यांतील आवश्यक प्रकार योग्य प्रमाणात मिळाले नाहीत, तर वाढीवर परिणाम होऊ लागतो, आजार निर्माण होऊ शकतात.आवश्यक प्रकारची अमिनो अॅसिड्स सर्व प्रकारच्या अन्नांत एकत्रित असतातच, असे नाही. कसलीतरी कमतरता असतेच. यासाठीच एकच एक पदार्थ खाऊन कोणीही प्राणी राहू शकत नाही. फक्त मांसावर जगणाऱ्या प्राण्यांना मात्र सर्व आवश्यक अमिनो अॅसिड्स मिळतात. याउलट शाकाहारी माणसाला जरी तांदळात, गव्हात, ज्वारी बाजरी प्रथिने मिळत असली, तरीही त्याबरोबर द्विदलांचा म्हणजे डाळींचा आसरा घ्यावाच लागतो. त्यातूनच आहारपद्धती ठरत गेल्या आहेत.रोजच्या पदार्थातील सर्वात जास्त प्रथिने सोयाबीनमध्ये आढळतात. त्याची टक्केवारी चाळीसपर्यंत असू शकते. यामुळेच शाकाहारी आहारात सोयाबीनला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेवढेच काय, पण पाश्चात्य देशांत मांसाची कमतरता भरून काढण्यासाठीही सोयाचा वापर केला जातो. शेंगदाने, चीज यांचा क्रमांक त्यानंतरचा व त्यांतील प्रथिनांची टक्केवारी पंचवीस असते. मांसात २३ टक्के, तर अंड्यांमध्ये १२ टक्के प्रथिने असतात. गहू वा तांदळात ६ ते ८ टक्केच प्रथिने आढळतात. प्रथिनांबद्दल बोलताना अनेकदा प्रथम दर्जाची व दुय्यम दर्जाची अशी वर्गवारी केली जाते. याचा अर्थ ज्यात सर्व आवश्यक अमिनो अॅसिड्स आढळतात, ती प्रथम दर्जाची व अन्य सर्व दुय्यम समजली जातात. थोडक्यात प्राणिज प्रथिने प्रथम दर्जाची असतात. लहान मुले, गर्भावस्था, आजारपण यांमध्ये पेशींची झीज भरून काढणे व वाढीसाठी आवश्यक म्हणून प्रथिनांची गरज असते. मुळात ही गरज या काळात जास्तच असल्याने प्रमाण २० टक्के इतके वाढलेले असते. केवळ प्रथिनयुक्त अन्नाची चव मात्र काहीशी उग्र वासाची असते. थोडीशी कडवटही असते. क्वचित काहींना ती आवडतही नाही. यासाठीच प्रथिनयुक्त अन्न पिष्टमय वा वनस्पतिज पदार्थांबरोबर खाण्याची पद्धत पडली आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देवा माझें मन करोनि स्वाधीन । निमोले स्वामीपण भोगिसीना ॥१॥ फुकाचा कामारा वोळगे निरंतर । न घाली तुज भार कल्पनेचा ॥२॥ तुज नलगे देणें मज नलगे मागणें । असेन अनुसंधानें चरणाचेनि ॥३॥ नामा म्हणे केशवा तूं सर्व जाणता । समयींच्या उचिता चुकों नको ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपमान करण्याचे ठरवणारा अपमानच करत असते.निंदा करणाऱ्याला कोणतेही मुहूर्त बघावे लागत नाही, मदत करणारा आपला माणुसकी धर्म पूर्णपणे निभावत असतो आणि माणूस म्हणून जन्म मिळाला त्यासाठी काहीतरी देणं लागतं यासाठी जो कार्य करत असते ही त्याला लागलेली चांगली सवय आणि आवड असते. या चौघांकडे समाज कोणत्या दृष्टीने बघते हे त्यांच्या कर्मावर अवलंबून असते म्हणून कर्मालाच श्रेष्ठ म्हटले गेले आहे आपणही त्याचे महत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कष्टाची कमाईच श्रेष्ठ*एका गावात दोन चोर राहत होते. ते प्रत्‍येक दिवशी चोरी करत आणि आलेले धन तीन हिस्‍से मध्ये वाटून घेत. आपापला हिस्‍से स्‍वत:साठी व एक हिस्‍सा ईश्‍वराला ठेवतात.असे खूप दिवस चालत होते .एका रात्री ते चोरीसाठी दुसऱ्या गावात निघाले. बरीच वेळ भटकंती करूनहीसुद्धा त्‍यांना काही चोरी करण्‍याची संधी मिळाली नाही.ते दोघेही थकून एका मंदिरात बसले. तेथे त्‍यांना एक साधू संत मादिरामध्ये झोपलेले दिसले. त्‍यांनी संताला उठवले व म्हणाले कि काही असेल तर द्या नाही तर मारून टाकले जाऊ.संताने त्यांना विचारला तर त्या चोरांनी सांगितले कि आम्ही चोर आहोत.आम्ही चोरी करतो .हे ऐकून संत म्‍हनाले, तुम्‍ही करता ते चांगलेआहे की वाईट याचा कधी विचार केला ?चोर म्‍हणाले,” आम्‍ही चांगलेच करतो कारण आम्ही चोरी करून जे धन मिळवतो ते आम्‍ही तीन हिस्‍से मध्ये वाटतो. एक एक भाग आम्‍ही घेतो आणि तिसरा भाग ईश्‍वराला चरणी अर्पण करतो.हे सगळे ऐकल्यावर संत त्यांच्या जवळील एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना दिला व म्हणाले ”आज तुम्ही काहीही चोरी करू शकले नाहीत त्यामुळे तुम्हीला हा कोंबडादेऊ शकतो बाकी माझ्याकडे काही नाही.पण आता चोरापुढे प्रश्न पडला कि आता याचे हिस्‍से कसे करायचे. ते दोघेही चोर आश्‍चर्यचकित झाले.संताने त्यांना आशय समजावून म्हाणाले कि चोरी हा जगण्याचा पर्याय नाही. तुम्ही कष्‍टाची कमाई करून त्‍यातील एक हिस्‍सा ईश्‍वरचरणी ठेवा. ते खरे सार्थक आहे .हे सगळे म्हणणे त्या चोराला पटले आणि ते दोघेही संताला नमस्‍कार करूनचोरी सोडून द्यायचा निर्णय करून तेथून निघून गेले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 एप्रिल 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_7.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛟 *_जागतिक कोंकणी भाषा दिन_* 🛟•••••••••••••••••••••••••••••••••••• 🛟 *_ या वर्षातील ९९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛟 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛟•••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९५: लता मंगेशकर यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल मोतीलाल व्होरा यांच्या हस्ते ’अवधरत्‍न’ व साहू सूरसम्मान’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले**१९९४: सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना ’आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान**१९६७: बोइंग-७६७ ने पहिले उड्डाण केले.**१९४०: दुसरे महायुद्ध : जर्मनीने नॉर्वे व डेन्मार्क पादाक्रांत केले.**१८६७: रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत ’एक’ मताने मंजुरी मिळाली.*🛟 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛟 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: शरयू जीवन खाचणे -- कवयित्री* *१९८०: शेख पीरपाशा ईसाक -- कवी**१९७६: प्रा. डॉ. वैजनाथ सोपानराव अनमुलवाड -- कवी, लेखक* *१९६६: कविता आमोणकर -- लेखिका,कवयित्री* *१९६२: भारत मुरलीधर सातपुते -- लोकप्रिय कवी* *१९५४: अनिता कंवर -- हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री* *१९५४: जयराम रमेश -- भारतीय अर्थतज्ज्ञ आणि माजी पर्यावरणमंत्री**१९५१: तुकाराम दासराव गंगावणे -- लेखक* *१९४८: जया बच्चन(भादुरी) – सुप्रसिद्ध अभिनेत्री**१९४६: डॉ. नंदकुमार नाईक -- कवी* *१९३५: बिंदू माधव पाठक -- रुद्र वीणा आणि सतार वादक (मृत्यू: ४ फेब्रुवारी २००४ )* *१९२५: लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका (मृत्यू: २१ ऑक्टोबर  १९९५ )**१९०४: सुलभा गोपाळ पाणंदीकर -- शिक्षणशास्त्रज्ञ, निबंधकार* *१९०२: नारायण रामचंद्र मोरे(अशोक) -- कवी, संपादक**१८८७: विष्णू गंगाधर तथा ’दादासाहेब’ केतकर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९५० )**१८७१: केशव विश्वास फणसे -- कवी* *१८२८: गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते (मृत्यू: २५ जुलै १८८० )**१३३६: तैमूरलंग – मंगोल सरदार (मृत्यू: १८ फेब्रुवारी १४०५ )* 🛟 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛟•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१८: अच्युत अभ्यंकर -- किराणा घराण्याचे गायक( जन्म: २ जानेवारी १९३७)**२०१५: हृषीकेश मुळगावकर -- भारताचे भूतपूर्व वायुसेनाध्यक्ष.(जन्म: १४ ऑगस्ट १९२० )* *२००९: शक्ती सामंत – हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते (जन्म: १३ जानेवारी १९२६ )**२००९: अशोकजी परांजपे – महाराष्ट्रातील लोककला संशोधक, गीतकार, नाटककार (जन्म: ३० मार्च १९४१ )**२००१: बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ ’बिझी बी’ – पत्रकार व स्तंभलेखक, ’आफ्टरनून डिस्पॅच अँड कुरियर’ या सायंदैनिकाचे संपादक (जन्म: ११ ऑक्टोबर १९३० )**२००१: शंकरराव खरात – साहित्यिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: ११ जुलै १९२१ )**१९९४: चंद्र राजेश्वर राव – स्वातंत्र्यसैनिक, तेलंगणाच्या लढ्याचे प्रवर्तक,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस (जन्म: ६ जून १९१४ )**१९९०: कमलाकर तोरणे -- मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक,अभिनेते आणि निर्माते(जन्म: १२ नोव्हेंबर १९२५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जन्म मृत्यूची नोंदणी*युनिसेफच्या एव्हरी चाईल्ड ब्राईट ईनेकविट्स अँड बर्थ रजिस्ट्रेशन या नुकतेच प्रकाशित करण्यात आलेल्या 161 देशातील आकडेवारी विश्लेषणाचा अहवालानुसार भारतात प्रत्येक तीन मुलामागे एकाच्या जन्माचे कोणतीही नोंद नसते. पाच वर्षाखालील अशा अनोंदणीकृत मुलांची संख्या तब्बल 71 दशलक्ष असून जागतिक पातळीवर हीच संख्या दोनशे तीस दशलक्ष अशी आहे. यानुसार भारतात जन्म नोंदणीचे प्रमाण 41 टक्के आहे जी की जगात सर्वात कमी आहे. भारतातील हिंदू व मुस्लिम या दोन सर्वाधिक लोकसंख्येच्या समुदायात जन्म नोंदणीचे प्रमाण सर्वांत कमी असून याच्या तुलनेत अल्पसंख्यांक जैन व शीख समुदायात प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वाढलेले तापमान पाहता विदर्भातील शाळांच्या परीक्षा लवकर घेण्याचे नागपूर खंडपीठाने संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यां दिले आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त पदी अभिनव गोयल यांची निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत जळगावचे महेश कोल्हे बनले यशस्वी उद्योजक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई : ‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा नियमित व तांत्रिक देखभालीसाठी १० ते १४ एप्रिल २०२५ अशी पाच दिवस राहील बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात यापुढे M सँड धोरण, सरकारी बांधकामांमध्ये कृत्रिम वाळू वापरणार, घरकुलासाठी 5 ब्रास मोफत; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *क्रिकेटपटू केदार जाधवची भाजपसोबत नवी इनिंग, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित केला प्रवेश; राजकीय मैदान गाजवणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 - पंजाबने चेन्नईला 18 धावाने हरवले, प्रियांश आर्य चे 39 चेंडूत वेगवान शतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजेश मनुरे, संपादक, धर्माबाद👤 राष्ट्रपाल सोनकांबळे, येवती👤 शेख राजू पटेल👤 व्यंकट केक👤 वैभव जाधव👤 मारुती फाळके👤 रमेश कदम👤 दिनेश रेडे👤 श्रीनिवास सैबी, पुणे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 37*मी करतो घराचे रक्षण**चोरापासून देतो संरक्षण**काही जण म्हणती मला श्वान**गुन्हेगारांना देतो शोधून**पोलीस खात्याचा मी शान**ओळखा पाहू मी आहे कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - मांजर ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुप्त चैतन्य व निद्रिस्त शक्ती जागृत करण्याचे एक साधन म्हणजे शिक्षण होय !*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सन १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातील आद्य क्रांतिकारक कोण ?२) लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने व विरोधात किती मते पडली ?३) राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने व विरोधात किती मते पडली ?४) 'कल्पना नसताना आलेले संकट' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) SIM चा फुल फॉर्म काय आहे ? *उत्तरे :-* १) मंगल पांडे २) बाजूने २८८, विरोधात २३२ मते ३) बाजूने १२८, विरोधात ९५ मते ४) घाला ५) Subscriber Identify Module*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 टेलिस्कोप म्हणजे काय ? 📙 खगोलदर्शनासाठी टेलिस्कोप वापरतात. अगदी सहज गंमत म्हणून गच्चीवरून तारे बघायचे असोत किंवा खगोलशास्त्राचा सखोल अभ्यास करावयाचा असो, यासाठीचे मुख्य माध्यम टेलिस्कोपच आहे. टेलिस्कोपचे दोन महत्त्वाचे प्रकार वापरले जातात. प्रकाश किरणांच्या भिंगातून वक्रीकरण करून बनवलेले टेलिस्कोप हे आकाराने खूपच लहान असतात व ते वापरणे सुटसुटीत असते. अर्थात यालाही अपवाद आहेतच. तब्बल एक मीटर व्यासाची बहिर्गोल भिंग वापरून अमेरिकेतील वेधशाळेतील टेलिस्कोप बनला आहे. मोठ्या भिंगातून एकत्रित केलेल्या किरणांची प्रतिमा प्रमाणबद्ध रीतीने दुसऱ्या डोळ्याजवळच्या भिंगातून बघितली जाते. डोळ्याजवळची भिंगे बदलून, त्यांची क्षमता वाढवून प्रतिमा लहान व मोठीही करता येते.प्रकाशकिरणांचे परावर्तन करणारे अंतर्गोल आरसे वापरणे हे जास्त सोयीचे पडते. आरशात प्रकाशाचे विश्लेषण होत नाही. प्रतिमा स्पष्ट राहते; कारण भिंगाची जाडी, वजन व त्यांना द्यावयाचा आधार यापेक्षा आरशाला आधार देऊन त्यातून परावर्तीत प्रतिमा दुसऱ्या आरशातून पुन्हा बघणे हे सोयीचे वाटते. यासाठी प्रचंड अंतर्गोल आरसे वापरले जातात व त्यातून परावर्तीत प्रतिमा साध्या अारशाद्वारे पुन्हा डोळ्याजवळील भिंगाकडे परावर्तित केली जाते. येथेही गरजेप्रमाणे डोळ्याजवळचे भिंग कमी जास्त ताकदीचे वापरता येते. रशियामध्ये सहा मीटर व्यासाचा आरसा वापरून जगातील सर्वात मोठा टेलिस्कोप बसवलेला आहे.मोठाले टेलिस्कोप हे यांत्रिक पद्धतीने हलविण्याची व्यवस्था केली जाते. नेमकी दिशा रोखण्यासाठी पूर्ण यांत्रिक व्यवस्था येथे आवश्यक असते. निरीक्षणासाठी बसणाऱ्या शास्त्रज्ञाला सोयीची बैठक व त्याच्या नजरेला समोरच दिसू शकेल, अशी दृश्य भिंगांची रचना यासाठी गरजेची ठरते. आकाशाकडे बघून निरीक्षण करणे येथे शक्यही नसते व अपेक्षितही नसते.काचेच्या भिंगांचा चष्मा करायचा वापर सुरू झाला, त्यानंतर टेलिस्कोपचा जन्म झाला असावा. नेमका कधी, कसा ते ज्ञात नाही, पण या बाबतीत *हॅन्स लिप्परशे* याचे नाव जनक म्हणून घेतले जाते. *गॅलिलिओ गॅलिली* यांनी व्हेनिसमध्ये १६०९ सालच्या सुमाराला टेलिस्कोप वापरला. यानंतरचा मुख्य शोध होता १६७२ मध्ये सर आयझॅक न्यूटनने परावर्तीत अंतर्गोल आरसा वापरून बनवलेल्या टेलिस्कोपचा.पृथ्वीवरून टेलिस्कोपद्वारे खगोलसंशोधन करताना वातावरणाच्या अडचणी येतात. मग यासाठी अंतराळात जाऊन निरीक्षण करणे जास्त सोयीचे, असे विचार मांडले गेल्याने त्या दिशेने संशोधन पुढे सरकत गेले. याच देशाची एक अवाढव्य निर्मिती म्हणजे हबल टेलिस्कोपची. २.४ मीटर व्यासाचा आरसा असलेला हा टेलिस्कोप १९९० साली अवकाशात पाठवला गेला आहे. पृथ्वीवरील निरीक्षणात दिसणारी अगदी स्पष्ट तारका यातून तब्बल पंचवीस पटींनी स्वच्छ बघता येते. हबमधील दुरुस्त्या करीत, तांत्रिक अडचणींवर मात करीत त्याने पाठवलेल्या असंख्य निरीक्षणांचे विश्लेषण सतत चालू असते. हे काम शास्त्रज्ञांना काही वर्षे पूरुन उरणार आहे.टेलिस्कोपचेच तत्त्व वापरून रेडिओलहरी गोळा करून त्याद्वारे खगोल संशोधन करण्याचाही प्रकार वापरला जातो. रेडिओलहरी, प्रकाशलहरी, क्ष-किरण, इन्फ्रारेड या साऱ्यांची 'जातकुळी' एकच असल्याने हे तत्त्वही सध्या वापरले जाते. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळच्या खोडद येथे या स्वरूपाचा एक मोठा जीएमआरटी प्रकल्प कार्यरत आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देवा माझें मन आणि तुझे चरण । एकत्र करोन दिधली गांठी ॥१॥ होणार तें हो गा सुखें पंढरीनाथा । कासया शिणतां वायांविण ॥२॥ माझिया अदृष्टीं ऐसेंचि पैं आहे । सेवावे तुझे पाय जन्मोजन्मीं ॥३॥ असतां निरंतर येणें अनुसंधानें । प्रारब्ध भोगणें गोड वाटे ॥४॥ ह्रदयीं तुझें रूप वदनीं तुझें नाम । बुद्धि हे निष्काम धरिली देवा ॥५॥ नामा म्हणे तुझीं पाउलें चिंतितां । जाली कृतकृत्यता जन्मोजन्मीं ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीच्या विषयी सर्व काही माहीत असताना सुद्धा नको त्या शब्दात बोलणे तसेच त्याच ठिकाणी एखाद्या व्यक्ती विषयी माहिती नसताना किंवा त्याला न वाचता जसं तोडांला आलं त्याच शब्दात बोलून मोकळे होणे या दोघांमध्ये काहीच फरक नसतो. त्यामुळेच अशा या आपल्या विचारामुळे त्या व्यक्तीला दु:ख तर होतोच पण, समोर असलेल्या काही व्यक्ती समोर आपल्या विषयी किंवा आपल्या विचारांचा आदर असेलच असेही नाही. कारण प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या परिस्थितीतून गेलेली असते त्यामुळे माणसं ओळखण्याची कुठेतरी त्यांना दिव्यदृष्टी असतेच म्हणून कोणालाही न वाचता किंवा त्याच्याविषयी माहीती नसताना स्वतः च्या मनाचे समाधान करण्यासाठी कोणत्याही शब्दात बोलू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शेरास सव्वाशेर*एका शेतकर्‍याने पक्षी धरण्यासाठी एक जाळे मांडून ठेवले होते. त्यात एका पारव्यामागे लागलेली एक घार सापडली. जाळ्यातून सुटून जाण्यासाठी ती पंख फडफडावून धडपड करीत आहे, तोच शेतकरी त्या ठिकाणी आला व तिला धरून ठार मारू लागला. तेव्हा ती त्याची विनवणी करून म्हणाली, 'दादा, मला मारू नको, मी तुझा काही अपराध केलेला नाही. मी त्या पारव्याच्या मागे लागले होते. हे ऐकून शेतकरी तिला विचारू लागला, 'अग, मग त्या पारव्याने तरी तुझा कोणता अपराध केला होता?' असे म्हणून त्याने तिला ठार मारले.*तात्पर्य :-* जे लोक निरपराधी लोकांना विनाकारण त्रास देतात, त्यांना त्रास देणारा त्यांच्यापेक्षा बलिष्ठ असा भेटला म्हणजे ते अगदी दीन होऊन साधूत्वाचा आव आणतात, पण त्याचा काही उपयोग न होता, त्यांच्या वाईट कर्माची फळे त्यांना भोगावीच लागतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 एप्रिल 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18qbDBQv9j/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🏵️ *_ या वर्षातील ९८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🏵️ *_महत्त्वाच्या घटना:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••••••*२००५: पोप जॉन पॉल (दुसरे) यांच्या अंत्ययात्रेत अंदाजे ४० लाख लोक सहभागी झाले**१९२९: भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.**१९११: डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा (superconductivity) शोध लावला.**१८३८: ’द ग्रेट वेस्टर्न’ हे वाफेचे इंजिन असलेले जहाज इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथून निघून पंधरा दिवसांनी न्यूयॉर्क येथे पोचले.* 🏵️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🏵️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१: ऋतुजा शांतीलाल पाटील -- कादंबरी लेखिका* *१९९८: राजेश्वरी खरात -- मराठी चित्रपट अभिनेत्री* *१९८५: निलेश श्रीकृष्ण कवडे -- कवी, गझलकार* *१९८३: सुशीलकुमार एकनाथ खापर्डे -- कवी**१९७७: समीर लक्ष्मण चव्हाण -- कवी**१९७२: सुप्रिया पाठारे -- मराठी टेलिव्हिजन, थिएटर आणि चित्रपट अभिनेत्री**१९६५: डॉ. मेघा आनंद भावे -- कवयित्री**१९५३: प्रा. सु. म. तडकोर -- कवी, लेखक* *१९५२: डॉ. राजेश्वर शंकर बालेकर -- लेखक, संपादक तथा निवृत्त सहाय्यक संचालक (ग्रंथपाल)**१९४४: मंदा आचार्य -- लेखिका**१९४४: प्रा. डॉ. कृष्णचंद्र भालचंद्र ज्ञाते -- कवी, लेखक* *१९४०: राम सोना नेमाडे -- प्रसिद्ध कवी, लेखक (मृत्यू: १० जानेवारी २०२४ )**१९३८: कोफी अन्नान – संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) चे ७ वे प्रधान सचिव**१९२८: रणजित देसाई – सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक,’स्वामी’कार (मृत्यू: ६ मार्च १९९२ )**१९२४: माधव दत्तात्रय नावडीकर -- लेखक* *१९२४: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ’कुमार गंधर्व’- संगीतकार (मृत्यू: १२ जानेवारी १९९२ )**१९१२: गोपाल सीताराम पंचभाई -- जुन्या पिढीतील लेखक (मृत्यू: ८ ऑगस्ट २००४ )**१८४४: पुरुषोत्तम गोविंद नाडकर्णी -- ' विविधज्ञानविस्तार' मासिकाचे संपादक (मृत्यू: ११ ऑगस्ट१९०० )*🏵️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🏵️•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१३: मार्गारेट थॅचर – ब्रिटनच्या महिला पंतप्रधान (जन्म: १३ ऑक्टोबर १९२५ )**२०१२: नितीन आखवे -- मराठी गीतकार (जन्म: ७ फेब्रुवारी १९६४ )**२०१०: शैलजा काळे -- कांदबरी,कथासंग्रह, चरित्र,नाटकं लेखन व बालसाहित्यिक लेखिका (जन्म: १८ ऑगस्ट १९४४ )**२०१०: अनंत चापोरकर -- कांदबरीकार, संपादक अनेक विषयांचे गाढे अभ्यासक (जन्म: मार्च १९३४ )**१९९८: डॉ. विष्णू भिकाजी कोलते -- सुप्रसिद्ध मराठी लेखक, महानुभाव साहित्याचे संशोधक व कवी माजी कुलगुरू, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म: २२ जून १९०८ )**१९९७: श्रीकृष्ण लक्ष्मण (भैयाजी) पांढरीपांडे -- प्राचार्य, संस्थापक (जन्म: १४ जुलै १८९९ )**१९७४: नटवर्य गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक – रंगभूमीवरील कलाकार (जन्म: २४ जून १८९९ )**१९७३: पाब्लो पिकासो – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार(जन्म: २५ ऑक्टोबर १८८१ )**१९५३: वालचंद हिराचंद दोशी – उद्योगपती (जन्म: २३ नोव्हेंबर १८८२ )**१९२२: ’गायनाचार्य’ पं. भास्करबुवा बखले – अष्टपैलू व चतुरस्त्र शैलीचे ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभावान गायक,’भारत गायन समाज’ या संस्थेचे संस्थापक (जन्म: १७ ऑक्टोबर १८६९ )**१८९४: बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार,कवी,लेखक आणि पत्रकार (जन्म: २७ जून १८३८ )**१८५७: १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामची सुरूवात करणारा मंगल पांडे याला फाशी देण्यात आली (जन्म: १९ जुलै १८२७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विकासात शिक्षकांचे योगदान*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सीमा सुरक्षा दलासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान - जम्मू दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दहावी-बारावी बोर्डाची वेबसाईट सायबर सुरक्षित करा, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची सूचना; 7 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बीडची ऋचा कुलकर्णीने पहिल्याच प्रयत्नात मिळवले मोठे यश, न्यायाधीश परीक्षेत आली राज्यातून पहिली, पालकांच्या कष्टाचे केले चीज*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जपानमध्ये रूग्णांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले; तिघांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यानंतर आता गॅस सिलेंडर ही 50 रुपयांनी झाला महाग, मध्यरात्रीपासून लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार अकोल्यात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद, अकोल्यात तापमानाचा पारा 44.2 अंशांवर तर चंद्रपूरमध्ये 43.6 अंश तापमानाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 - मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बंगळूरूचा मुंबईवर 12 धावाने विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जगन्नाथ लाभशेटवार, शिक्षक, उमरी👤 कौडेवार गंगाधर लक्ष्मण, शिक्षक, धर्माबाद👤 निलेश कवडे, शिक्षक तथा साहित्यिक, अकोला👤 श्री झगरे गुरुजी वाकदकर , शिक्षक तथा कीर्तनकार👤 बद्रीनाथ कुलकर्णी 👤 मनोज पाटील बन्नाळीकर 👤 बालाजी पांचाळ *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 36*मला सर्वात जास्त आवडते दूध**मला म्हणतात वाघाची मावशी**प्रत्येकाच्या घरात माझे वास्तव्य**उठावदार दिसते माझी मिशी**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - गाय••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बुद्धिमान व्यक्तीबरोबर एक वेळेस स्पर्धा केली तरी चालेल, पण मुर्खा बरोबर मित्रत्वही योग्य नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात सर्वाधिक पवन ऊर्जा निर्माण करणारे राज्य कोणते ?२) कर आणि इमिग्रेशन कन्सल्टन्सी नोमॅड कॅपिटलिस्टनुसार जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे ?३) देशातील पहिली हायड्रोजन ट्रेनमध्ये इंधन म्हणून कोणत्या वायूचा वापर करण्यात आला आहे ?४) 'कथा लिहिणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) पहिला राष्ट्रीय सागरी दिवस केव्हा साजरा केला गेला ? *उत्तरे :-* १) तामिळनाडू २) आयर्लंड ३) हायड्रोजन वायू ४) कथाकार, कथालेखक ५) ५ एप्रिल १९६४*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *प्रवाळ म्हणजे काय ?* 📙 समुद्राचे सारे सौंदर्य नेमके कशात एकवटले आहे, असे कोणी विचारले, तर त्याचे उत्तर फक्त एका शब्दात देता येईल - प्रवाळ खडकात. समुद्रकिनाऱ्याला लागून समुद्राच्या पोटात खोलवर दडलेल्या उभ्या खडकांच्या रांगा अनेक ठिकाणी अस्तित्वात आहेत. काही ठिकाणी तर या रांगा कित्येक मैलांच्या आहेत. अर्धवट तुटलेली दरड असो वा सलग खोलवर ज्वालामुखीच्या लाव्हाने तयार झालेली रांग असो, या खडकांवर चित्रविचित्र आकाराच्या प्रवाळांचेच राज्य वसले आहे. सुंदर रंग, चित्रविचित्र आकार, दाटीवाटीने वाढलेल्या या प्रवाळांमुळे खडकांचा अनेक ठिकाणी पत्ताही लागत नाही. झिरपणाऱ्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात ही निसर्गसंपत्ती स्वतःचे सौंदर्य उधळत छोट्या मोठ्या माशांना आसराही देत असते. खेकड्यांसारखे प्राणी तर तेथे हमखास वस्तीलाच असतात.प्रवाळालाच 'कोरल' असे नाव आहे. कित्येक वर्षे प्रवाळ ही वनस्पतीच आहे, असे समजले जाई. पण प्रवाळ हे प्राणीराज्यात मोडतात. हे आता निःसंशय सिद्ध झाले आहे. प्रत्येक प्रवाळप्राणी हा एखाद्या खडकाला पक्का चिकटून असतो. याचे कारण म्हणजे एखाद्या लहान फुग्यासारखा हा प्राणी स्वतःच्या शरीरातून चुनखडीसारखा पदार्थ बाहेर टाकत असतो. त्याचेच कडक कवच त्याच्या शरीराभोवती निर्माण होते. त्याचा तोंडाकडचा भाग नेहमी पाण्यात मोकळाच असतो. त्यातून सतत पाणी शोषून घ्यायचे व त्यातून मिळणारे छोटे प्लांक्टन व अन्य सूक्ष्म कीटक गिळंकृत करायचे काम चालूच असते. तोंडाभोवतीच्या भुजा एखादा प्राणी पकडुन तोंडात ढकलण्यासाठी मदत करतात. अनेकदा पाण्यात एखाद्या प्राण्याची हालचाल जाणवली, तर या भुजा बाह्य कडक कवचाच्या आत ओढून लपवल्या जातात. यामुळेच वरवर बघणाऱ्याला प्रवाळ हा जिवंत प्राणी आहे. यावर विश्वास बसणेही कठीण आहे.हा कीटक मृत झाला, तरी कवच तसेच राहत असते. प्रवाळप्राणी दोन प्रकारे वाढतात. पहिली सोपी पद्धत म्हणजे अस्तित्वातील प्रवाळावरच नवीन प्राणी स्वतःचे बस्तान बसवतो. म्हणजेच त्याच्या कवचाच्या आधाराने स्वतःची वाढ सुरू करतो. या प्रकारात एखाद्या मूळ कवचाला फांद्या फुटत गेल्यासारखे मनोरम दृश्य दिसते. दुसऱया प्रकारात फलित अंडी बाहेर पडतात. त्यातून लहान लहान अळ्या बाहेर पडून त्यांपासून नवीन प्रवाळप्राणी निर्माण होतात व प्रवाळ पसरत जाते.जेथवर सूर्यप्रकाश पोहोचतो, तेथवरच प्रवाळाची वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्यातही खडकांवर वाढणाऱ्या प्रवाळांना आधार निर्माण करण्यासाठी सुरुवातीस अल्गी वा शेवाळाची गरज असते. शेवाळ्याला सूर्यप्रकाश आवश्यक असतो. त्याशिवाय ते जगूच शकत नाही. पाण्यामध्ये साधारणपणे साठ मीटरपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचू शकतो. प्राण्याच्या स्वच्छतेवरही हे प्रमाण थोडेसे अवलंबून असते. या सगळ्या कारणांमुळे प्रवाळ खडकांचा आढळ जास्तीत जास्त साठ मीटरपर्यंतच होतो. प्रवाळ खडकांच्या कपारीचे व रांगांचे मुख्यत: तीन प्रकार आढळतात. पहिला - उथळ समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या खडकांवरील प्रवाळ, दुसरा म्हणजे मुख्य समुद्राच्या बाजूला काढलेल्या एखाद्या डोंगरकड्याने तयार केलेल्या, शांत तळ्याच्या काठाला असलेले प्रवाळ व तिसरा प्रकार म्हणजे पाण्यात बुडालेल्या एखाद्या जुन्या बेटाच्या कडेने तयार झालेले प्रवाळ खडक. हा प्रकार ज्वालामुखी निद्रिस्त झाल्याने तयार झालेल्या खडकांच्या आधारे भरसमुद्रात आढळतो. एखाद्या शीतल शांत समुद्री सरोवरात (Lagoon) प्राणवायूच्या साहाय्याने बुडी मारली, तर तेथील प्रवाळ खडक पाहून व प्रवाळांच्या प्रकारातील वैविध्य पाहून माणूस अक्षरश: वेडावून जातो.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देवा निढळावरी हात दोन्ही । पाहें चक्रपाणि वाट तुझी ॥१॥ धांव गा धांव सख्या पांडुरंगा । जीवीं जिवलगा मायबापा ॥२॥ तुजविण ओस दिसती दाही दिशा । आणि धांव जगदीशा मजसाठीं ॥३॥ नामा म्हणे काय बैसलों निवांत । धांवतो अनंत भक्तांसाठीं ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती ज्या परिस्थितीतून जात असते ती व्यक्ती, परिस्थितीला चांगल्याने ओळखत असते व त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात त्या अश्रूंची भाषा समजत असते ती व्यक्ती,कोणाच्याही डोळ्यातील अश्रू बघून आनंदीत होत नाही. कारण, परिस्थितीचे येणे किंवा जाणे कोणाच्याही हातात नसते. म्हणून कोणावर आलेल्या परिस्थितीवर हसू नये व आनंद घेऊ नये. शक्य झाल्यास माणुसकीच्या नात्याने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चंदनाची बाग**एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे ज्ञान नव्हते. त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला. हळूहळू संपूर्ण बाग रिकामी झाली.**एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्षात पाहिल्यावर लोहाराची परिस्थिती पहिल्या सारखीच आहे असे दिसले, राजाला आश्चर्य वाटले.**सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले, तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का.? तेव्हा लोहाराने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला.**राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कडे पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रडू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली, तेंव्हा राजा म्हणाला "अशी भेट वारंवार भेटत नाही."**मित्रांनो आपले आयुष्य त्या लोहारासारखेच आहे. मानवी जीवनाच्या मुल्यांचे महत्व, आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते. पण... त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते. मानवी जीवन अनमोल आहे. असे सुंदर जीवन परत मिळणार नाही.**तात्पर्य - या जगात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे, मनुष्य देह त्या देहाचा कोळसा करायचा की, चंदन हे आपले आपण ठरवायचे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 एप्रिल 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_6.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••♦️ *_जागतिक आरोग्य दिन_* ♦️•••••••••••••••••••••••••••••••••••• ♦️ *_ या वर्षातील ९७ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ♦️ *_महत्त्वाच्या घटना:_* ♦️•••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९६: सिंगर करंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा फलंदाज सनत जयसूर्या याने केवळ १७ चेंडुत अर्धशतक झळकावण्याचावि विश्व विक्रम केला**१९८९: लठ्ठा नावाची विषारी दारू प्यायल्याने बडोदा येथे १२८ जणांचा बळी गेला.विषारी दारुच्या बळींची ही मोठी दुर्घटना होती.**_१९४८: जागतिक स्तरावर स्वास्थ्य आणि आरोग्याचं संवर्धन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे (United Nations) जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना झाली. व्यक्तिगत आणि सामाजिक आरोग्याची लोकांना जाणीव करुन देण्यासाठी हा दिवस ’जागतिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो._**१९४०: पोस्टाचे तिकीट निघणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्ण्वर्णीय अमेरिकन ठरले.**१९३९: दुसरे महायुद्ध – इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.**१९०६: माऊंट व्हेसुव्हियस या ज्वालामुखीचा उद्रेक होऊन नेपल्स शहर बेचिराख झाले.**१८७५: आर्य समाजाची स्थापना झाली.*♦️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ♦️•••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९५: निलम कृष्णा ठोंबरे -- कवयित्री**१९८९: ज्ञानेश्वर बाबासाहेब शिंदे -- कवी**१९८७: डॉ.राजकुमार तरडे -- लेखक* *१९८०: प्रा. डॉ. राजेंद्र अशोक गवळी -- कवी, लेखक**१९७७: विनोद सूर्यनारायण कुलकर्णी -- लेखक**१९७३: अतुल कहाते -- प्रसिद्ध लेखक, माहिती तंत्रज्ञान, जागतिक घडामोडी, अर्थशास्त्र, संगणकशास्त्र,इ. विषयावर लेखन* *१९६८: डॉ.राम देशपांडे -- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणारे गायक* *१९६२: राम गोपाल वर्मा -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता**१९६१: सुनील छत्रपाल केदार -- माजी मंत्री* *१९५७: प्रवीण प्र. वाळिंबे -- लेखक, 'स्वरप्रतिभा' दिवाळी अंकाचे संपादक**१९५४: दिवाकर मधुकरराव चौकेकर -- कवी, लेखक* *१९५३: प्रभाकर सोपानराव सुर्वे -- कवी, लेखक* *१९५१: राहुल रवैल --- हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक**१९४९: शरद भास्करराव गायकवाड -- लेखक, प्रकाशक* *१९४२: जितेंद्र – सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता**१९४०: महादेवराव सुकाजी शिवणकर --- माजी मंत्री,माजी खासदार**१९३९: रजनी भास्कर कविमंडन -- कवयित्री, लेखिका (मृत्यू: २४ ऑगस्ट २०१० )**१९३८: काशीराम राणा – भाजपाचे माजी लोकसभा सदस्य (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०१२ )**१९३८: अरुण सावळेकर -- प्रसिद्ध साहित्यिक**१९२५: चतुरानन मिश्रा – माजी केंद्रीय कृषी मंत्री, कामगार नेते, कम्युनिस्ट पक्षाचे नेते (मृत्यू: २ जुलै २०११ )**१९२०: पण्डित रवी शंकर – सतार वादक, ’भारतरत्‍न’ (मृत्यू: १२ डिसेंबर २०१२ )**१९१७: प्रा. दत्तात्रेय केशव बर्वे -- मराठी कथालेखक आणि बालसाहित्यकार(मृत्यू: २४ डिसेंबर १९८१ )* *१९११: वामन लक्ष्मण कुलकर्णी -- समीक्षक, टीकाकार ( मृत्यू: २५ डिसेंबर १९९१ )**१९०६:कृष्णाजी विठ्ठल सोमण -- प्रख्यात ज्योतिषतज्ज्ञ आणि गणित अभ्यासक (मृत्यू: ३ जुलै १९७२)**१८९१: सर डेविड लो – जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार (मृत्यू: १९ सप्टेंबर १९६३ )**१८६०: विल केलॉग – ’केलॉग्ज’ चा मालक (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९५१ )**१७७०: विल्यम वर्डस्वर्थ – काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी.त्यांची ’डॅफोडिल्स’ ही अतिशय गाजलेली कविता आहे. (मृत्यू: २३ एप्रिल १८५० )**१५०६: सेंट फ्रान्सिस झेविअर – ख्रिस्ती धर्मप्रसारक.(मृत्यू: ३ डिसेंबर १५५२ )*♦️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ♦️•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२००४: केलुचरण महापात्रा – प्रसिद्ध ओडिसी नर्तक (जन्म: ८ जानेवारी १९२६ )**२००१: गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ.जी.एन.रामचंद्रन – संशोधक,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ (जन्म: ८ ऑक्टोबर १९२२ )**१९७७: राजा बढे -- संपादक, चित्रपट अभिनेते, नाटककार कादंबरीकार, गायक, कवी, गीतकार (जन्म: १ फेब्रुवारी १९१२ )**१९४७: हेन्‍री फोर्ड – फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक (जन्म: ३० जुलै १८६३ )**१९३५: डॉ.शंकर आबाजी भिसे – भारताचे 'एडिसन' (जन्म: २९ एप्रिल १८६७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक आरोग्य दिनानिमित्त प्रासंगिक लेख*... आरोग्यम धनसंपदा ....*मनुष्य पृथ्वी तलवार जन्म घेतल्यापासून तर मरेपर्यंत मानवाच्या शरीराचा आरोग्याशी संबंध येतो. शरीर सुदृढ असेल तर त्याचे आरोग्य देखील सुदृढ असते. आरोग्य सुदृढ असेल तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप सोईस्करपणे पार पडत असतात. इंग्रजीत एक म्हण आहे Sound in Body is Sound In Mind अर्थात शरीर मजबूत तर मन मजबूत. मात्र आपले आरोग्य चांगले नसेल तर आपल्या जवळ सर्व काही असून ते काहीच कामाचे नसते. म्हणून प्रत्येक जण............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देशात नवा वक्फ कायदा लागू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विधेयकाला मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अयोध्या, काशी, दिल्ली, नागपूरसह देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शेतकरी नेते डल्लेवाल यांनी 131 दिवसांनंतर उपोषण सोडले, महापंचायत बोलावून केली घोषणा; केंद्रीय कृषी मंत्री शिवराज यांनी आवाहन केले होते*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूत पहिल्या उभ्या लिफ्ट रेल्वे समुद्री पूलाचा – ‘न्यू पंबन ब्रिज’ चे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गृहपाठ न केल्याने आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना अमानुष शिक्षा, पालघरमध्ये पालकवर्गात संताप*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्याकडून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, उपचार चालू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 - गुजरात टायटनने सनरायजर्स हैद्राबादला सात विकेटने हरविले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रामदास धडेकर, शिक्षक, उमरी 👤 पृथ्वीराज काळे 👤 मदन पोखरे 👤 मोसीन खान 👤 गिरीश देशपांडे 👤 संदीप कंजे👤 चैतन्य मोहिते पाटील 👤 मारोती बनेवार 👤 प्रदीप वसंत शिंदे 👤 गंगाप्रसाद इरलोड 👤 निहार घनश्याम पटले, गोरेगाव, जि. गोंदिया*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 35*सर्व प्राण्यात पविन्न स्थान* *दुध आहे माझे आयुर्वेदाची खान* *उपयूक्त आहे मी कामधेनू म्हणून* *प्राचीन ग्रंथात ठेवले आहे नोंदून* *करतात गौरव माता म्हणून**अन्न पचवितो रवंथ करून**ओळखा पाहू मी आहे कोण?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - दूध ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनात जर विश्वास व विजयाची भावना असेल तर यश मिळविता येईल. जर विचार दुर्बल असतील तर अपयश पदरी पडेल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'जागतिक आरोग्य दिवस'* केव्हा साजरा केला जातो ?२) जागतिक आरोग्य दिवस २०२५ ची थीम काय आहे ?३) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?४) 'सतत काम करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) WHO चे फूल फॉर्म काय आहे ? *उत्तरे :-* १) ७ एप्रिल २) निरोगी सुरूवात, आशादायक भविष्य ३) जिनिव्हा ( स्वितझर्लंड ) ४) दीर्घोद्योगी ५) World Health Organization*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌞 *सौर वारा म्हणजे काय ?* 🌞 *************************हलत्या हवेला वारा म्हणतात. आपण शाळेतच हे शिकतो. पण सूर्यावर तर हवाच नाही हेही आपण शिकतो. मग तिथून वारा कसा काय वाहू लागेल ? हे खरं आहे. पण सौरवारा याचा शब्दश: अर्थ न घेता त्याचा भावार्थ समजून घ्यायला हवा. सूर्याच्या अंतरंगात अणुमिलनाच्या अणुभट्ट्या सतत धडधडत असतात. तिथलं तापमानही त्यामुळे कोट्यवधी अंशांइतकं वाढलेलं असतं. त्यापायी मग या ताऱ्याभोवती असलेलं वायूचं वातावरणही तापतं. या बाहेरच्या प्रभावळीतल्या वायूंचं प्लाझ्मा रूपात अवस्थांतर होतं. म्हणजेच त्या वायूच्या रेणूंचे घटक असलेले विद्युतभारधारी मूलकण स्वतंत्र होतात. त्यांच्याठायी असलेल्या प्रकार ऊर्जेमुळे वेगवानही होतात. सूर्यापासून दूरवर जाऊ पाहतात. जेव्हा पोटातल्या आगीपायी खदखदणाऱ्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्या वेळी त्यातून राख, राळ आणि लाव्हा दूरदूरवर फेकला जातो. त्याचप्रकारे सूर्याच्या प्रभावळीतील प्लाझ्मा दूरदूरवर, संपूर्ण सौरमालिकेवर फेकला जातो. *या वेगवान मूलकणांच्या बहुतांश प्रोटॉनच्या, झोतालाच सौरवारा असं म्हणतात.* तसा हा सतत वाहतच असतो. पण अधूनमधून सूर्यावर काही वादळी घटना घडतात. सोलर फ्लेअर्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तुफानांच्या वेळेस सौरवाराही वेगांनं वाहतो. त्याचा वेग सेकंदाला ९०० किलोमीटरपर्यंतही वाढतो.या झोताचा मारा संपूर्ण सौरमालिकेवर होत असतो. कोणताही ग्रह किंवा उपग्रह त्याच्या तावडीतून सुटत नाही. तरीही सूर्याला जवळ असणाऱ्या ग्रहांना त्याचा अधिक फटका बसू शकतो. वेगानं जाणाऱ्या प्रोटॉनच्या अंगी चुंबकीय बलही असतं. त्यामुळे त्या झोताचा प्रसार झालेल्या सर्वच प्रदेशावर चुंबकीय क्षेत्रही फैलावतं. सूर्य स्वतःभोवती गिरकी मारत असल्यामुळे या चुंबकीय क्षेत्राचा आकार एखाद्या स्प्रिंगसारखा किंवा गोलगोल जिन्यासारखा होतो. त्या क्षेत्राचा एक बुडबुडा तयार होऊन तो साऱ्या सौरमालिकेला गवसणी घालतो.ज्या ग्रहांना स्वतःचं चुंबकीय क्षेत्र नसतं त्यांना मग या चुंबकीय क्षेत्राच्या हमल्याच्या परिणामांना तोंड द्यावं लागतं. पृथ्वीचं स्वतःचं चुंबकीय क्षेत्र असल्यामुळे त्यावर आदळून हे मूलकण इतरत्र विखुरले जातात. पृथ्वीचा बचाव होतो. धरतीचं चुंबकीय क्षेत्र आणि सौरवारा यांच्यामध्ये होणाऱ्या या अभिक्रियेपोटीच धरतीच्या अतिउत्तरेच्या आणि अतिदक्षिणेच्या आकाशात नयनरम्य रंगांची उधळण करणाऱ्या आॅरोरांचा आविष्कार बघावयास मिळतो. आज आपण अवकाशात अनेक उपग्रह स्थापित केलेले आहेत. त्यांना चुंबकीय संरक्षक आवरण नसतं. त्यामुळे सौरवाऱ्याच्या झोतात सापडून त्यांच्या कामात बाधा येऊ शकते.*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देवा तूं प्रथम कर्म भोगिसी । सगरीं जळचरूं मछ जालासी । कमठे पाठीं न संडी कैसी । मर्में कावाविसी केलेंज तुज ॥१॥ अपवित्र नाम आधीं वराह । याहुनि थोर कूर्म कांसव । अर्ध सावज अर्ध मानव । हे भवभाव कर्मांचे ॥२॥ खुजेपणीं बळीसी पाताळीं घातलें । तेणें कर्में तयाचें द्वार रक्षिलें । पितयाचेम वचनीं मातेसी वधिलें । तें कर्में भोगविलें अंतरली सीसा । भालुका तीर्थीं वधियेलें अवचिता । नाम अच्युता तुज जाहलें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना अनेकदा आपल्याला त्रास सहन करावा लागतो. पण त्याच त्रासामधून कधीकधी आपल्याला नवी दिशा सुद्धा मिळत असते.पण काही त्रास आपण स्वतःहून करवून घेतो. विनाकारण इतरांच्याकडे लक्ष देऊन आपली वेळ वाया घालविण्यात आणि आनंद शोधण्यात आपण.स्वतःला. धन्य समजून घेत असतो. त्यामुळे त्याचा कुठेतरी त्रास होत असतो. म्हणून नको त्या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःला त्रास करून घेऊ नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• आद्यगुरु शंकराचार्य हिमालयाकडे यात्रेसाठी चालले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व शिष्य हि होते. प्रवास करता करता ते अलकनंदा नदीच्या पात्रापाशी येवून थांबले. तेंव्हा एका शिष्याने शंकराचार्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली. शिष्य म्हणू लागला,"आचार्य ! आपण किती महान आहात, आपले ज्ञान किती मोठे आहे जणू या अलकनंदा नदीच्या पात्राप्रमाणे. हे पात्र जितके विस्तीर्ण आहे तितके तुमचे ज्ञान असावे असे मला वाटते. कदाचित यापेक्षा महासागराइतकेही तुमचे ज्ञान असू शकेल."त्याचवेळी शंकराचार्यांनी आपल्या हातातील दंड पाण्यात बुडवला आणि बाहेर काढला, शिष्य या कृतीकडे पाहत होता. पाण्यातून बाहेर काढलेला दंड शिष्याला दाखवून शंकराचार्य म्हणाले," बघ, किती पाणी आले या दंडावर? एक थेंब इतकेच ना! अरे! मला किती ज्ञान आहे ते सांगू का? जगातील ज्ञान म्हणजे अलकनंदा नदीचे पात्र आहे असे समज आणि दंड बुडवून बाहेर काढल्यावर त्यावर आलेला थेंब म्हणजे माझे ज्ञान." जगात प्रचंड ज्ञान आहे आणि त्यातील केवळ एक थेंब ज्ञान माझ्याकडे आहे असे आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 एप्रिल 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/12H7wso5zHu/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌐 *_राष्ट्रीय सागरी दिवस_* 🌐 •••••••••••••••••••••••••••••••••••• 🌐 *_ या वर्षातील ९५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌐 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌐••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००: अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. - १० या मराठी उपग्रह वाहिनीचे ’सह्याद्री’ असे नामकरण करण्यात आले.**१९५७: कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस.नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.**१९५५: प्रकृती अस्वास्थ्यामुळे विन्स्टन चर्चिल यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला**१९४९: भारत स्काऊट आणि गाईडची स्थापना झाली**१९३०: २४१ मैल प्रवास करुन महात्मा गांधी यांनी दांडीयात्रा संपविली.**१६७९: राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेले. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले. [चैत्र व.१०]**१६६३: दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात आक्रमण केले. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्‍नात त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत ’जिवावरचे बोटावर निभावले’ हा शब्दप्रयोग रुढ झाला.*🌐 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌐••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००: मुग्धा वैशंपायन -- झी मराठी वाहिनी वरील सारेगमपा लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातील आघाडीची गायिका**१९९३: प्रा. केशरचंद नारायण राठोड -- लेखक, कवी* *१९८५: आरती सिंग -- अभिनेत्री* *१९८०: नरेंद्र पाटील --- कवी**१९७९: प्रज्ञाधर ढवळे -- कवी**१९७७: रुपाली गांगुली -- भारतीय अभिनेत्री**१९७५: प्रा. डॉ. विनोद देवचंद राठोड -- लेखक, कवी तथा कादंबरी सूचीकार**१९७१: संदीप नारायण राक्षे -- कवी, लेखक, चित्रपट निर्माता**१९६९: महेश रामराव मोरे -- कवी, कादंबरीकार* *१९६३: उषा नाईक -- भारतीय अभिनेत्री, मराठी चित्रपटांमध्ये काम* *१९६१: प्रशांत पुरुषोत्तम दामले -- प्रसिद्ध मराठी अभिनेता**१९६०: महावीर शाह -- हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम करणारे प्रसिद्ध भारतीय टेलिव्हिजन आणि रंगमंच अभिनेता (मृत्यू: ३१ ऑगस्ट २००० )* *१९५३: अनुराधा कौतिकराव पाटील -- सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका व विविध पुरस्काराने सन्मानित**१९५१: डॉ. सर्जेराव जयवंतराव भामरे -- लेखक**१९४९: डॉ. राम पंडित-- प्रसिद्ध मराठी गझलकार**१९४७: प्रकाश देशपांडे -- इतिहास-साहित्य संस्कृतीचे गाढे अभ्यासक* *१९४७: शाहीर विजय रामचंद्र जगताप -- प्रसिद्ध शाहीर, लेखक, संपादक**१९४६: आनंद बाबू हांडे -- प्रसिद्ध लेखक**१९४६: ललिता इनामदार -- लेखिका**१९४२: मधुकर सीताराम जोशी (मधू जामकर) -- प्रतिभावंत कवी व उत्तम समीक्षक**१९४०: वासंती अरुण मुझुमदार -- ललितलेखिका, कवयित्री (मृत्यू: ७ नोव्हेंबर २००३ )**१९३६: वसंत कोकजे -- लेखक, कवी**१९३०: राम विठ्ठल नगरकर -- विनोदी नट, रामनगरी प्रसिद्ध आत्मचरित्र (मृत्यू: ८ जून १९९५ )**१९२३: शांता मुकुंद किर्लोस्कर -- कथाकार, कादंबरीकार, संपादक(मृत्यू: १५ सप्टेंबर २००७ )**१९२०: डॉ. रफिक झकारिया – महाराष्ट्राचे माजी नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य (मृत्यू: ९ जुलै २००५ )**१९२०: आर्थर हॅले – इंग्लिश कादंबरीकार (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००४ )**१९०९: अल्बर्ट आर.ब्रोकोली – ’जेम्स बाँड’ पटांचे निर्माते (मृत्यू: २७ जून १९९६ )**१९०८: बाबू जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक,राजकारणी,माजी केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान (मृत्यू: ६ जुलै १९८६ )**१८९०: आनंदराव कृष्णाजी टेकाडे -- कवी, गीतकार (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९६४ )**१८७७: माधवराव विनायक किबे (सरदार) -- संशोधक, लेखक (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९६३ )**१८५६: बुकर टी.वॉशिंग्टन – अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९१५ )**१८२७: सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद (मृत्यू: १० फेब्रुवारी १९१२ )*🌐 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌐••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: सुधीर सखाराम नाईक -- भारतीय क्रिकेटपटू(जन्म: २१ फेब्रुवारी १९४५ )**२०२१: अनिस चिस्ती -- इस्लाम धर्माचे व तत्त्वज्ञानाचे, तसेच उर्दू भाषेचे ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखक**२०१३: राम उगावकर -- कवी, शाहीर, गीतकार (जन्म: ५ मार्च १९२९ )**२००२: मनोहर राजाराम तथा मनू छाबरिया – दुबईस्थित भारतीय उद्योगपती, जम्बो ग्रुपचे संचालक (जन्म: १९४६ )**१९९८: रुही बेर्डे – चित्रपट व नाट्य अभिनेत्री**१९९६: भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन – बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक**१९९३: दिव्या भारती – हिन्दी,तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री (जन्म: २५ फेब्रुवारी १९७४ )**१९९२: सॅम वॉल्टन -- वॉलमार्टचे संस्थापक (जन्म: २९ मार्च १९१८ )**१९६४: गोपाळ विनायक भोंडे – नकलाकार**१९४०: चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते (जन्म: १२ फेब्रुवारी १८७१ )**१९२२: पंडिता रमाबाई – विधवा,परिक्त्यक्ता आणि स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक आणि ’आर्य महिला समाज’ च्या संस्थापिका,संस्कृत पंडित (जन्म: २३ एप्रिल १८५८ )**१९१७: शंकरराव निकम – स्वातंत्र्यशाहीर*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तोडणे सोपे पण जोडणे अवघड*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यसभेतही वक्फ विधेयक झाले मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्रातल्या गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला केंद्र शासनाची मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई :- गोराई येथे नवीन 'बर्ड पार्क' सुरू ! 70 प्रजातींच्या 500 हून अधिक पक्षांना पाहता येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई : नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील ८ मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई - ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या ८७व्या वर्षी निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *शिक्षकांच्या सिंगापूर दौऱ्यामुळे अध्यापन पद्धती अधिक प्रभावी होण्यास मदत होईल - शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संग्राम निलपत्रेवार , नांदेड👤 हणमंत पवार👤 काझी मुजाहिद सय्यद👤 मोहमंद अफजल शेख👤 गोविंद दळवी👤 लोकेश शिंदे👤 गोविंद सोनपीर👤 गणेश सावंत , शिक्षक, भोकर👤 ईश्वर वाडीकर, शिक्षक, देगलूर👤 सुरेश घाळे👤 अनिल ईबीतदार👤 राजश्री संगपवाड👤 निलेश चंदेकर👤 लक्ष्मण सिरमलवार, धर्माबाद👤 नागेश यमेवार👤 संतोष पाटील चंदनकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 34*रंग आहे माझा श्वेत**ज्यात जीवनसत्व अनेक**प्रथिनांचा आहे मी राजा**पूर्णान्न खाऊन येईल मजा**ओळखा पाहू मी कोण*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - साप ( नाग )••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची खरोखरच कसोटीच असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?२) १९९१ मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान श्रीलंकेतील कोणत्या संघटनेने राजीव गांधींची हत्या केली ?३) कोणाच्या प्रयत्नांमुळे १ जानेवारी १८८२ पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून एक दिवस 'रविवार' सुट्टी देण्यात आली ?४) 'अंग राखून काम करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) १९ जुलै १८६९ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी किती बँकांचे राष्ट्रीयीकरण केले ? *उत्तरे :-* १) पं. जवाहरलाल नेहरु २) लिट्टे LTTE ३) नारायण मेघाजी लोखंडे ४) अंगचोर ५) १४ बँक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *फंगस / बुरशी* 📙एखादा अन्नपदार्थ उघडा राहिला, तर त्यावर बुरशी धरू लागते. एखादे लाकूड पावसात भिजत राहिले, तर त्यावर सुद्धा झपाट्याने बुरशी धरते. या बुरशीमुळे अनेक गोष्टींचा वापर करणे अशक्य होऊन बसते. एवढेच नव्हे तर या बुरशीमुळे मानवांत, प्राण्यांत, वनस्पतीत कित्येक आजारांचाही उद्भव झालेला दिसतो.पिकांवर पडणारे बुरशीजन्य रोग बघताबघता सर्व पीक नष्ट करतात. ज्वारी - बाजरीवर पडणारा काळा बुरा, आंब्याच्या मोहरावर धरणारा चिकटा, मक्यावर पडणारी कोळशी ही बुरशीजन्य रोगांची काही उदाहरणे. पावसाळ्याच्या दिवसांत कातडीचे होणारे विकार, पायाला होणाऱ्या चिखल्या, डोक्यातील कोंडा, प्राण्यांचे झडणारे केस हेही आजार बुरशीजन्य. म्हणजे बुरशी ही वाईटच असते, असे मानायची गरज मात्र नाही. खरे सांगायचे म्हणजे बुरशीकडे निसर्गाने एक फार मोठे काम सोपवलेले आहे. नको असलेली प्रत्येक गोष्ट नष्ट करायला, पुन्हा जमीन समृद्ध करायला सर्व प्रकारची बुरशी मदत करत असते.फंगस ही वेगळी जीवसृष्टी आहे. आता सजीवांच्या सहा सृष्टी मानल्या जातात. अशा या वनस्पतीला स्वतःच्या पोषणासाठी कोणत्यातरी जिवंत वा मृत सजीवावर अवलंबून राहावे लागते. तिचे अस्तित्व त्यामुळेच फक्त सजीव वा त्यांचे अवशेष यांच्याशी संबंधित राहते. बुरशी एकपेशीय असेल व बहुपेशीय. एकपेशीय म्हणजे आपल्या माहितीचे यिस्ट वा किण्व. बहुपेशीय बुरशीचे उदाहरण कुत्र्यांच्या छत्र्या किंवा मशरूम. यालाच अळंबी पण म्हणतात. अळंबी खायला चविष्ट लागतात. म्हणून त्यांची लागवडही केली जाते. मोठाल्या तंतुरूप पेशींनी अळंबी वाढतात. एखाद्या मेलेल्या झाडाच्या खोडावर पावसाळ्यात बघता बघता अळंबी वाढलेली दिसतात. पण याआधी त्या खोडाच्या आतील चहूबाजूंनी बुरशीचे प्रवेश करून ते खोड पोखरलेले असते.बुरशीच्या असंख्य जाती निसर्गात आढळतात. मोजदाद अशक्य व्हावी एवढ्या जाती आज ज्ञात आहेत; पण नवीन जातींचा पत्ता ज्या वेगाने लागतो, तो लक्षात घेतला तर किमान 'तीन एक लाख प्रकारच्या जाती' पृथ्वीवर असाव्यात. बुरशीचे सर्व पुनरुत्पादन साध्या द्विभाजन पद्धतीने होत जाते. जेव्हा प्रतिकूल हवामान असेल तेव्हा स्पोअर जमिनीवर विखुरली जातात. बुरशीचा सलग पसरत गेलेला थर कित्येक मीटरपर्यंत जमिनीवर आढळतो. तसेच काही मीटर खोलवर ही बुरशी आढळते. बुरशीचा एखादा तंतू किंवा एखादे स्पोअर अनुकूल हवामानात इतक्या प्रचंड वेगाने तंतूनिर्मिती करते की या वेगापुढे अन्य कशाचीही पुनरुत्पादनाची गती कमीच पडावी. एखाद्या बुरशीच्या कणापासून जेमतेम चोवीस तासांत एक किलोमीटर लांबीची पुनर्निर्मिती होऊ शकते. बुरशीसाठी कवक हाही शब्द वापरला जातो.अळंबी खाण्यासाठी, यीस्ट पदार्थ फसफसण्यासाठी, चीजला चव आणण्यासाठी, सर्व प्रकारच्या प्रतिजैविकांच्या निर्मितीसाठी बुरशी वापरली जाते. उपयुक्त बुरशीचे वापर आठवले म्हणजे बुरशीबद्दलची किळस जरा कमी होईल.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून !*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देव दगडाचा भक्त हा मावेचा । संदेह दोघांचा फिटे कैसा ॥१॥ ऐसे देव तेहि फोडिले तुरकीं । घातले उदकीं बोभातीना ॥२॥ ऐसिया देवासी वाहिले टिळे डोळे । भक्त बाळे नागविले ॥३॥ ऐसीहि दैवतें नको दावूं देवा । नामा म्हणे केशवा विनवितसे ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी आपल्या मताने कसेही बोलत असतील आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला हो ला हो असं प्रतिसाद देत राहिल्याने त्यांना आनंद होतो आणि ते, आपल्याला जवळ करत असतात.पण, एखाद्या वेळी त्यांचे बोलणे आपल्या मनाला पटले नाही की लगेच आपला विरोध करायला सुरूवात करतात. कदाचित या विषयी आपल्याला अनुभव आला असेलच. म्हणून जे कोणी चांगले सांगत असतील त्यांचे विचार आवर्जून ऐकून घ्यावे. पण,काही विचार पटत नसतील तर एकदाचे बाजूला झालेले बरे कारण, बरेचदा असं होतं की, हो ला हो लावल्याने कधी काळी अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा म्हणाला " महाशय तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ? काही त्याला शिकवा. त्याला सोने आणि चांदी यात जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही " आणि मोठ्याने हसू लागला ....हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ... तो घरी गेला .... त्याने मुलाला विचारले " बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!माझी चार लोकात खिल्लीउडवली जाते .. तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!मुलगा म्हणालाराजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहेमी दिसताचं राजा मला बोलावून घेतो .. त्याच्या सोबत गावातीलसारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात .... राजा एका हातातसोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोरधरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल ..आणि मी चांदीचे नाणे उचलतो .. त्यामुळे तिथे असलेले सगळेमोठ्याने हसतात ... सार्‍यांना मजा वाटते ....... असे रोज घडतेमुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही. न राहून त्याने मुलाला विचारले " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ?असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेलाकपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्यानाण्यांनी भरलेली होती ...हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..मुलगा म्हणाला " ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल .. त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेलतर येवू द्या .. पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही. मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 एप्रिल 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/sLZfHuz1NoyP6od8/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔆 *_ या वर्षातील ९४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔆 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔆••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार**१९८४: भारताचा पहिला अवकाशयात्री राकेश शर्मा यांचे सोविएत अवकाशायन सोयुझ टी- ११ द्वारे उडान**१९६८: मेम्फिस,टेनेसी येथे जेम्स अर्ल रे याने मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) यांची हत्या केली**१९६८: ’नासा’ने ’अपोलो-६’ चे प्रक्षेपण केले**१९४९: पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी संरक्षणविषयक सामंजस्य करार करुन ’नाटो’ची (NATO) स्थापना केली.**१९४४: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.*🔆 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔆••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: विजय गंगाप्रसाद देवडे -- लेखक* *१९८०: शेख पीरपाशा ईसाक -- कवी* *१९७६: विजय निळकंठ वाटेकर -- कवी**१९७२: अजय देशपांडे -- लेखक, कवी, गझलकार, समीक्षक* *१९७१: हेरंब कुलकर्णी -- मराठी वैचारिक आणि शिक्षणविषयक लेखन करणारे लेखक**१९६९: पल्लवी जोशी -- भारतीय अभिनेत्री, लेखिका आणि चित्रपट निर्माती* *१९६८: बबन मारोतराव आव्हाड -- लेखक, कवी* *१९६६: स्मिता श्रीनिवास आपटे -- लेखिका**१९६१: डॉ. सुधीर अनंत काटे -- कवी, लेखक* *१९६०: राजेंद्र विश्राम देसले -- चरित्रकार, कथा लेखक* *१९५९: नामदेव राठोड -- कवी**१९५८: नारायण वामनराव जोशी -- लेखक, धडपड मंच संयोजक तथा निवृत्त शिक्षण उपसंचालक* *१९५८: अरुण धोंडिबा घोडे (देशमुख) -- प्रसिद्ध लेखक, चित्रकार , अनुवाद, पत्रकार**१९५६: प्रकाश (अप्पा) जाधव -- लेखक* *१९५५: प्रेमा नारायण -- अभिनेत्री-नर्तिका**१९५४: परवीन बाबी -- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल (मृत्यू: २० जानेवारी २००५ )**१९५३: सुरेश माणिकराव कुलकर्णी -- मुक्त पत्रकार, लेखक**१९५२: चंद्रशेखर नार्वेकर(एन.चंद्रा) -- भारतीय निर्माता, लेखक आणि दिग्दर्शक* *१९४९: नंदकुमार जयराम मुरडे -- कवी, लेखक**१९४८: महावीर रामचंद्र जोंधळे -- प्रसिद्ध कवी, कथाकार, बालसाहित्यकार, पत्रकार**१९४७: मच्छिंद्र कांबळी -- मालवणी नटसम्राट मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते,प्रसिद्ध नाट्यनिर्माते (मृत्यू: ३० सप्टेंबर २००७ )**१९४६: प्रभाकर लक्ष्मण मयेकर -- मराठी नाटककार, कथाकार (मृत्यू: १८ ऑगस्ट २०१५ )**१९३०: निळू फुले -- प्रसिद्ध मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते (मृत्यू : १३ जुलै २००९ )**१९३८: किशोर दिपचंद हिवाळे -- लेखक* *१९३८: प्रा. डॉ.अजीज नदाफ -- मराठी साहित्यिक, मराठी शाहिरीचे अभ्यासक, पुरोगामी वैचारिक चळवळीतील कार्यकर्ते* *१९३३: रामचंद्र गंगाराम तथा ’बापू’ नाडकर्णी – डावखुरे मंदगती गोलंदाज (मृत्यू: १७ जानेवारी २०२० )**१९२६: प्रा. बाळ केशव सावंगीकर -- लेखक**१९२१: हरि कृष्ण लाल भगत -- माझी केंद्रीय मंत्री (मृत्यू: २९ ऑक्टोबर २००५ )**१९१९: भालचंद्र महाराज कहाळेकर -- व्यासंगी अध्यापक,कुशल संघटक,प्रभावी भाषोपासक (मृत्यू: २८ मे १९७५ )**१९०२: पं नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (मृत्यू: १ एप्रिल १९८४ )**१८४२: एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (मृत्यू: ३ ऑक्टोबर  १८९१ )**१८२३: सर कार्ल विल्हेम सिमेन्स – जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता,(मृत्यू: १९ नोव्हेंबर १८८३ )* 🔆 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔆••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१: गोविंद मल्हार कुलकर्णी -- समीक्षक( जन्म: २१ डिसेंबर १९१४ )**२०००: नरेश कवडी -- भाषातज्ञ, कथाकार, समीक्षक, ज्ञानेश्वरीचे चिकित्सक अभ्यासक आणि अनुवादक (जन्म: ५ ऑगस्ट १९२२ )* *१९९६: आनंद साधले – संस्कृत वाङ्‌मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक (जन्म: ५ जुलै १९२० )**१९८७: सच्‍चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ’अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४) विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार (जन्म: ७ मार्च १९११ )**१९७९: पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भूट्टो यांना फाशी (जन्म: ५ जानेवारी १९२८ )**१९६८: मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते यांची हत्या (जन्म: १५ जानेवारी १९२९ )**१९२३: जॉन वेन – ब्रिटिश गणितज्ञ (जन्म: ४ ऑगस्ट १८३४ )**१६१७: जॉन नेपिअर – स्कॉटिश गणितज्ञ, लॉगॅरिथम सारणीचे जनक (जन्म: १५५०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मतदार राजा जागा हो ....!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना मोठा झटका; दरकपातीला स्थगिती, 850 रुपयांचे वीजबिल 1000 रू. राहणार *•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अमेरिकेतील टॅरिफ टॅक्सप्रणालीचा जगभरातील देशांना शॉक; भारतावर डिस्काउंटेड रेसिप्रोकल टॅरिफ धोरणाचा होणार परिणाम*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सोलापूर जिल्ह्यात 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के; 2.6 रेक्टर स्केलचा हादरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्रात वादळवारे.. राज्यातील अनेक जिल्ह्यात गारांसह अवकाळी पाऊस; भंडाऱ्यात दोन शेतमजूरांचा मृत्यू, फळबागा कोलमडल्या, जनावरं होरपळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू कक्षात आग, सतर्कतेनं 66 बाळं सुखरुप*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रात जागतिक कौशल्य केंद्र, रोजगाराच्या आंतरराष्ट्रीय संधी; ओंग मिंग फुंग यांची मुंबईला भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सारा तेंडुलकर झाली मुंबई फँचायझीची मालकीण; सचिन तेंडुलकरच्या लेकीचं क्रिकेटच्या मैदानावर पहिलं पाऊल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 हेरंब कुलकर्णी , शिक्षणतज्ञ👤 अंकुश शिंगाडे , साहित्यिक, नागपूर👤 भोजराज शंकर , जारीकोट👤 प्रताप रायघोळ 👤 रमेश येलमे मंगनाळीकर 👤 चंद्रकांत अमलापुरे, शिक्षक, नायगाव👤 बापूराव वाघमारे 👤 राजेंद्र देसले 👤 श्याम पांचाळ 👤 गणेश G. कोकुलवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 डूमणे शिलवंत 👤 शिवाजी भोसले 👤 श्याम लोलापोड 👤 राम गंगाधर नाइनवाड👤 प्रवीण पाटील *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 33*वळणावळणाची धरती मी वाट**पाय नाहीत तरी धावतो सुसाट**बदलून कपडे फिरतो सारे रान**घेतो मी चाहूल जरी नसतील कान**जेंव्हा मी बघतो उंचावून मान**सर्वच धावतात वाचविण्यास प्राण**ओळखा पाहू मी आहे कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आलेल्या संधीचा योग्य फायदा घेणारे व्यक्ती जीवनात यशस्वी होते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) "हाथी घोडे, तोफ तलवारे, फौज तो तेरी सारी है, पर जंजिर मे जकडा राजा मेरा, अब भी सब पे भारी है!" या काव्यपंक्ती कोणत्या चित्रपटातील आहेत ?२) सन १९६९ मध्ये 'मिझो नॅशनल फ्रंट' ( MNF ) या संघटनेची स्थापना कोणी केली ?३) मुंबईत ११ जुलै १८५९ रोजी पहिली कापड गिरणी कोणी सुरु केली ?४) 'भाषण ऐकणारे' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) जम्मू काश्मीरला मिळणारी पहिली वंदे भारत ट्रेन केव्हापासून धावणार आहे ? *उत्तरे :-* १) छावा २) लालडेंगा ३) कावसजी दावर ४) श्रोते ५) १९ एप्रिल २०२५*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पॅरॅसिटॅमॉल कशासाठी वापरतात ?* 📙 औषधांच्या दुकानात जाऊन बर्‍याचदा तुम्ही तापासाठीच्या गोळ्या आणल्या असतील. क्रोसिन, मेटॅसीन, पॅमाॅल अशा विविध नावांनी विकल्या जाणाऱ्या या गोळ्यांमध्ये 'पॅरॅसिटॅमॉल' नावाचे एक औषध असते हे तुम्हाला ठाऊक आहे काय ?पॅरासिटेमॉल हे औषध गोळ्यांच्या तसेच पातळ औषधाच्या स्वरूपात मिळते. या औषधामुळे ताप कमी होतो. मेंदूतील तापमानाचे संतुलन करणाऱ्या केंद्रावर या औषधामुळे परिणाम होतो व ताप कमी होतो. साहजिकच कोणत्याही तापासाठी पॅरासिटामॉल हे औषध घेतल्यास ताप कमी होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ताप हा रोग नाही तर ते केवळ रोगाचे लक्षण आहे. घरात मेलेल्या उंदराचा वास येत असेल तर अत्तर टाकून व सेंट फवारून काही काळ तो वास घालवता येईल; पण दुर्गंधी कायमची घालावयाची असल्यास मेलेला उंदीर शोधून तो फेकून देण्याखेरीज दुसरा उपाय नाही. तसेच ताप ज्या रोगामुळे होतो तो रोग बरा केल्याखेरीज ताप कायमचा बरा होणार नाही.ताप केव्हा येतो, किती वेळ राहतो, जास्त असतो वा कमी, यावर रोगांचे (जसे हिवताप, क्षयरोग) निदान अवलंबून असते. त्यामुळे ताप आल्या आल्या पॅरासिटेमॉलच्या गोळ्या घेतल्याने निदानात अडचण येऊ शकते. ताप आल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याखेरीज औषध घेऊ नये. कोणतेही औषध दुष्परिणामरहित नसते. त्यामुळे आवश्यकता असल्यासच औषध घ्यावे. खरे तर अंग थंड पाण्याने पुसणे, कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे या घरगुती उपायांनीही ताप उतरतो. प्रसंगी या उपायांचा वापर करावा.सर्दी, खोकला अशा सामान्य रोगात येणार्या तापासाठी हे औषध घ्यायला हरकत नाही. ताप उतरण्याखेरीज हे औषध वेदनाशमनही करते व सूजही उतरवते.डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षितयांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देव दगडाचा भक्त हा मावेचा । संदेह दोघांचा फिटे कैसा ॥१॥ ऐसे देव तेहि फोडिले तुरकीं । घातले उदकीं बोभातीना ॥२॥ ऐसिया देवासी वाहिले टिळे डोळे । भक्त बाळे नागविले ॥३॥ ऐसीहि दैवतें नको दावूं देवा । नामा म्हणे केशवा विनवितसे ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी आपल्याकडे रागाने बघण्याऐवजी आपल्याकडे बघून हसत असेल तर जास्त मनावर घेऊ नये.निदान ती व्यक्ती हसण्याचा तरी प्रयत्न करत असते. म्हणजेच त्या हसण्यामागे काहीतरी दडले असणार. ज्या व्यक्तीला या प्रकारचे गुण दिसत असतात ती समोरची व्यक्ती वाईट असेलच असेही नाही. म्हणून लहान, सहान गोष्टीवरून वाद करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्तअसण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हाराजा त्यात विजयी झाला. काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होतचालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेमकाही कमी झाले नाही. एके दिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्येपाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढे पुढे गेला आणि दलदलीत फसला. वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्यनव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावतआले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली.कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पणहत्ती बाहेर येऊ शकला नाही.भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊलागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला,राजा शेजारीच उभा होता. त्याने राजाला असा सल्ला दिला, "महाराज! तत्काळ युद्धाचे नगारेवाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा." राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुमदिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले, सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेरपडला. त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते.राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले. ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणीअसल्यास प्रगती होते. जर नशीब काही 'चांगले' देणार असेल तर त्याची सुरुवात 'कठीण' गोष्टीने होते .. आणि नशीब जर काही 'अप्रतिम' देणार असेल तर त्याची सुरुवात 'अशक्य' गोष्टीने होते....!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 एप्रिल 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/wgv78RucPVxLfzas/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ☢️ *_ या वर्षातील ९३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☢️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☢️•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०००: आय.एन.एस.आदित्य हे नौकांना इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.**१९७५: बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्ह विरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव हा बुद्धिबळात जगज्जेता बनला.**१९७३: मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाईल टेलिफोन कॉल बेल लॅब्जमधील डॉ.जोएल अँगेल याला केला**१९४८: ओरिसा उच्‍च न्यायालयाची स्थापना* ☢️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☢️ •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८२: निरंजन मुडे -- कवी* *१९७७: डॉ. रमेश तुळशीराम रावळकर -- कवी, लेखक, संपादक* *१९७१: माधुरी मगर-काकडे -- कवयित्री, लेखिका* *१९७१: रवींद्र सूर्यभान साळवे -- कवी, लेखक**१९७१: आशिष नंदकिशोर जायस्वाल -- राज्य मंत्री म.राज्य**१९७०: विनोद पितळे -- पत्रकार, लेखक, कवी**१९६७: सुधीर फाकटकर -- विज्ञान तंत्रज्ञान प्रचारक तथा लेखक* *१९६५: नाझिया हसन – पाकिस्तानी पॉप गायिका (मृत्यू: १३ ऑगस्ट २००० )**१९६५: लीलाधर सदाशिव महाजन -- कवी, लेखक* *१९६४: श्रीकांत बोजेवार -- प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार, चित्रपट पटकथाकार* *१९६२: जयाप्रदा – प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री**१९६१: डॉ. शंकर किसन बोराडे -- स्तंभलेखक, समीक्षक (मृत्यू: २६ नोव्हेंबर २०२३ )**१९५९: संदीप वासलेकर -- मराठी तत्त्वज्ञ, संघर्ष निवारण आणि जगाचे भवितव्य या विषयांवर आपले विचार मांडतात**१९५५: हरिहरन अनंत सुब्रमणी -- भारतीय पार्श्वगायक,भजन आणि गझल गायक* *१९५१: रवीप्रकाश कुलकर्णी-- चरित्र लेखक, पत्रकार* *१९५१: डॉ. किशोर रघुनाथ पवार -- प्रसिद्ध विज्ञान लेखक,व्याख्याते* *१९५१: बन्सीलाल तुकाराम कदम -- कवी, लेखक**१९५१: अलका शशांक कुलकर्णी -- सुप्रसिद्ध लेखिका* *१९४८: रमेश नारायण गोळे -- लेखक**१९४१: दत्ता बाळ -- तत्त्वचिंतक, ग्रंथकार (मृत्यू: ३ सप्टेंबर १९८२ )**१९४१: कृष्णराव पंढरीनाथ ऊर्फ शशिकांत देशपांडे -- मराठी लेखक, संपादक**१९३४: जेन गुडॉल – इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ**१९२९: सर्वोत्तम ठाकूर -- प्रसिद्ध लेखक**१९१४:फील्ड मार्शल सॅम माणेकशा (मृत्यू: २७ जून २००८)**१९०४: रामनाथ गोएंका – ’इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीतील नेते (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९९१)**१९०३: कमलादेवी चट्टोपाध्याय– मॅगसेसे पुरस्कार विजेत्या(१९६६) स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९८८ )**१८९५: कृष्णराव भाऊराव बाबर -- प्रसिद्ध लेखक ( मृत्यू:९ जून १९७४)**१८८२: द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार.(मृत्यू: २१ जून १९२८ )*☢️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☢️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७: किशोरी आमोणकर --- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका(जन्म: १० एप्रिल १९३१ )* *१९९८: हरकिसन मेहता – प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार, ’चित्रलेखा प्रकाशन’चे मुख्य संपादक**१९९८: मेरी कार्टराइट – इंग्लिश गणितज्ञ (जन्म: १७ डिसेंबर १९०० )**१९९२: उद्धव जयकृष्ण शेळके -- प्रसिद्ध कथाकार,कादंबरीकार (जन्म: ८ ऑक्टोबर १९३१ )**१९८८: डॉ.विष्णू श्रीधर वाकणकर -- एक श्रेष्ठ भारतीय पुरातत्त्वज्ञ, संशोधक, शैलचित्रे अभ्यासक (जन्म: ४ मे १९१९ )* *१९८५: डॉ. वासुदेव विष्णू मिराशी – महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक (जन्म: १३ मार्च १८९३ )**१८९१: एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (जन्म: ४ एप्रिल १८४२ )**_१६८०: छत्रपती शिवाजी राजे भोसले (जन्म: १९ फेब्रुवारी १६३०)_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आईच्या हातचे जेवण*वेगवेगळ्या कारणामुळे जी व्यक्ती आपल्या घरापासून दूर राहतात. त्यांना प्रत्येक वेळी जेवण करताना प्रामुख्याने आईच्या हातच्या जेवणाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *तेलंगणा ओबीसी आरक्षण- संसदेच्या मंजुरीसाठी दिल्लीत निदर्शने, राहुल गांधी उपस्थित राहणार; सीएम रेड्डी यांनी विधानसभेत 42% आरक्षण केले जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ (दुरुस्ती) विधेयक, 2024 केले सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात जुनी वाहनं स्वच्छेने स्क्रॅप केल्यास नव्या वाहनावर १५ टक्के कर सवलत देण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा राज्य सरकारने केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जुनी पेन्शन योजना, शिक्षण क्षेत्रातील मागण्यांसाठी तीव्र आंदोलन उभारणार, माध्यमिक शिक्षक महामंडळाच्या सभेत निर्धार, सर्वांना एकत्रही करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अवयवदानासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना 42 दिवसांची रजा:सरकारी डॉक्टरांची परवानगी आवश्यक; अवयवदानाला प्रोत्साहन देण्याचा केंद्राचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेत बदल ; शाळा व्यवस्थापन समितीला गणवेश खरेदी करण्याचे दिले अधिकार, शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडने मालिका जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भागवत जेटेवाड , केंद्रप्रमुख👤 चक्रधर शिंदे 👤 माधव धुप्पे 👤 प्रकाश साखरे , धर्माबाद👤 तुकाराम पचलिंग👤 संतोष अंबालगोंडे 👤 शिराळे माधव 👤 रंगराव वाकोडे 👤 संभाजीराव गुनाळे 👤 नागभूषणम M बुसा 👤 कामाजी सरोदे 👤 गंगाधर सुगांवकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 32*दळणवळणाचे महत्वाचे साधन**वाहून नेते भारदार वजन**धावते धातूच्या रस्त्यावर**पोहचते नेहमी अचूक वेळेवर**शरीर माझे लांबच फार**शिट्टी वाजवून होते पसार**ओळखा पाहू मी आहे कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - कोकिळा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नशिबाचे चक्र सतत फिरत असते, म्हणूनच कोणी हरखून जाऊ नये किंवा हतबलही होऊ नये.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1) 'भारतीय संविधानाचे शिल्पकार' असे कोणास म्हटले जाते ?2) संविधानाचे कायदे सल्लागार कोण होते ?3) भारतीय संविधान केव्हा स्वीकारण्यात आले ?4) संविधानाची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आले ?5) भारतीय प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* 1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 2) बी. एन. राव 3) 26 नोव्हेंबर 1949 4) 26 जानेवारी 1950 5) 26 जानेवारी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ॲस्पिरिन कशासाठी वापरतात ?* 📙 *************************सध्याच्या काळात अॅस्पिरिनचा उपयोग ठाऊक नसलेला माणूस सापडणे ही बाब परग्रहावर जीवसृष्टी सापडण्याइतकीच कठीण आहे ! पण तरीही या औषधाचा योग्य वापर कसा करायचा, या गोळीचे दुष्परिणाम काय होऊ शकतात; याची शास्त्रशुद्ध माहिती मात्र फारच थोडय़ा जणांना असते.अॅस्पिरिन या औषधातील मूलभूत घटक म्हणजे अॅसेटाइल सॅलिसिलीक अॅसिड. एका गोळीत त्याचे प्रमाण ३०० मिलीग्रॅम इतके असते. अॅस्पिरिनचा वापर डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, दातदुखी, कानदुखी, मासिक पाळीच्या वेळी होणारी पोटदुखी, मुक्कामार लागल्यावर, लचक, मुरगळणे इत्यादीसाठी वेदनाशामक म्हणून होतो. या खेरीज ताप कमी होण्यासाठी आणि सूज कमी होण्यासाठीही ॲस्पिरिन वापरतात. ॲस्पिरिन हे एक स्वस्त असे बहुगुणी औषध आहे.परंतु अॅस्पिरीनचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. पोटात आम्लता वाढते, जळजळ होते. मळमळ, आंबट ढेकर, उलटी व क्वचित उलटीतून रक्त पडणे अशी लक्षणेही दिसून येतात. अॅस्पिरीनचे वावडे असणाऱ्यास खाज सुटणे, दम लागणे अशी लक्षणे दिसतात. ॲस्पिरिनमुळे रक्तस्रावाची प्रवृत्ती वाढते. अॅस्पेरीनचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी गोळी रिकाम्या पोटी घेऊ नये. एकतर काहीतरी खाऊन मगच घ्यावी किंवा एक ग्लास पाणी व त्याबरोबर थोडासा खायचा सोडा घेऊन मगच घ्यावी. आम्लपित्ताचा त्रास असेल, जठरात अल्सर असेल, रक्तस्रावाची प्रवृत्ती असेल किंवा गरोदरपणात दिवस भरत आले असतील; तर ही गोळी घेऊ नये. अॅस्पिरीनमुळे ताप, सूज, वेदना कमी झाल्या तरी मूळ रोग बरा होत नाही. त्यामुळे मूळ रोगावर उपचार करणे जास्त महत्त्वाचे ठरते. दम्याच्या रुग्णांनी ही गोळी घेताना विशेष काळजी घ्यावी लागते. शक्यतो न घेतलेलीच बरी.डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षितयांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुर्घट तें दुःख लागों नेदी भक्ता । त्याची तुज चिंता असे फार ॥१॥ आणि प्रकार घडे तो निकट । पैठणीं प्रकट रूप दावीं ॥२॥ जेथुनि सत्वर निघाले स्वदेशा । मुक्त केलें महिषा मार्गीं जाण ॥३॥ जाणती प्रेमळ कीर्तानासी नर । समाधि निरंतर म्हणे नामा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••व्यक्ती मग ती कोणीही असो, ज्या परिस्थितीतून बाहेर पडते त्या परिस्थितीत असताना तिला जे काही अनुभव आलेले असतात त्याच अनुभवाच्या आधाराने व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असते एवढेच नाही तर त्या अनुभवाला आपला गुरू मानून आपले संपूर्ण जीवन समर्पित करत असते. म्हणून म्हणतात ना की, प्रत्येकांचा अनुभव हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो म्हणून कोणाला तुच्छ लेखून त्याची टिंगलटवाळी करू नये. कोणाची वेळ कधी बदलेल हे कधीच सांगून येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणुसकी*इसाप हा एक गुलाम होता, पण आपल्‍या विद्वत्तेच्‍या जोरावर त्‍याने समाजात अत्‍युच्‍च स्‍थान निर्माण केले होते, ज्‍या धनाढ्याने इसापला विकत घेतले होते त्‍याचे नाव होते क्‍झेनथस, इसाप आपल्‍या आचरणातून क्‍झेनथसला सतत शिकवण देत असे.ज्‍या काळी रोममध्‍ये सार्वजनिक स्‍नानगृहे असत, सज्‍जन लोक सार्वजनिक स्‍नानगृहात जाऊन आंघोळ करत असत. एकदा क्‍झेनथसने इसापला स्‍नानगृहात गर्दी आहे की रिकामे आहे हे पाहून येण्‍यास सांगितले. इसापने जाऊन पाहिले तर तेथे बरेच लोक आंघोळीसाठी जमा झाले होते. तेवढयात त्‍याचे लक्ष स्‍नानगृहाच्‍या दारासमोर पडलेल्‍या एका मोठ्या दगडाकडे गेले. अनेक लोक त्‍या दगडाला अडखळून पडत होते, दगड रस्‍त्‍यात कसा म्‍हणून शिव्‍या देत होते. तेवढ्यात एक माणूस आला तोही त्‍या दगडाला अडखळून पडला, त्‍यानेही शिवी हासडली पण तो दगड त्‍याने उचलून दूर फेकला आणि मगच तो स्‍नानगृहात गेला.हे सर्व पाहून इसाप घरी गेला व मालकाला सांगितले की, स्‍नानगृहात फक्त एकच माणूस आंघोळीसाठी आला आहे. आंघोळीच्‍या पूर्ण तयारीनिशी क्‍झेनथस स्‍नानगृहात पोहोचला आणि पाहतो तर काय, तेथे तर प्रचंड गर्दी आहे. क्‍झेनथसने इसापला विचारले तू तर म्‍हणाला इथे फक्त एक माणूस आहे पण इथे तर प्रचंड गर्दी दिसते. इसाप उत्तरला,'' इथे रस्‍त्यात एक दगड पडला होता, येथे येणारा प्रत्‍येकजण दगडाला अडखळून पडत होता, शिव्‍या देत होता पण दगड उचलून टाकण्‍याचे शहाणपण फक्त एकानेच दाखविले. त्‍यामुळे फक्त एकच माणूस असल्‍याचे मी आपणास सांगितले.'' क्‍झेनथस निरूत्तर झाला.तात्‍पर्य- फक्त जीवंत असणे ही ओळख नसून जीवनाचा सदुपयोगच तुम्‍हाला स्‍वतंत्र ओळख देऊ शकते. आपल्‍या जीवनाचा इतरांनाही उपयोग व्‍हावा हेच खरे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 एप्रिल 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/dmDpjpYGtDVvmEc2/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 💮 *_ या वर्षातील ९२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 💮 *_महत्त्वाच्या घटना:_* 💮•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०११: क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा २८ वर्षांच्या कालखंडानंतर विजय**१९९८: कोकण रेल्वे वरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्सप्रेस या गाडीचा शुभारंभ दिल्लीतील निजामुद्दीन स्थानकातुन झाला**१९९०: स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) ची स्थापना**१९८४: सोयुझ टी-११ या अंतराळयानातुन राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. तो ७ दिवस २१ तास व ४० मिनिटे अवकाशात होता**१९८२: फॉकलंडचे युद्ध - अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.**१८७०: गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली*💮 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💮 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८५: सचिन शिवाजीराव बेंडभर पाटील-- प्रसिद्ध कवी,कादंबरीकार,कथाकार, बालसाहित्यिक* *१९८१: मायकेल जॉन क्लार्क -- ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू* *१९७९: गणेश भारतराव रासने -- लेखक* *१९७६: अनधा जोशी मुधोळकर -- लेखिका* *१९७३: श्याम श्रीराम ठक -- प्रसिद्ध वऱ्हाडी कवी**१९७१: बबन शिंदे -- प्रसिद्ध लेखक, कवी**१९७०: नारायण ऊमाजी खरात -- कवी* *१९६९: अजय वीरु देवगण – प्रसिद्ध अभिनेता**१९६७: सुनील किसनराव गायकवाड- उंब्रजकर -- मराठी व हिंदीमध्ये लेखन करणारे लेखक**१९५९: भीमराव संपतराव सरवदे -- लेखक* *१९५७: प्रा. अविनाश राजाराम कोल्हे -- प्रसिद्ध लेखक**१९५३: रवींद्र दामोदर लाखे -- कवी आणि नाट्यदिग्दर्शक**१९५२: दीपक पराशर -- भारतीय अभिनेता**१९५२: भारती बाबुराव हेरकर -- कवयित्री, लेखिका**१९५२: प्रा.अशोक नारायणराव आहेर -- सुप्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार* *१९५१: डॉ.अलका सर्वोत्तम चिडगोपकर -- प्रसिद्ध लेखिका, समीक्षक* *१९५०: मोहन गणुजी नाईक ( भीमणीपुत्र) -- प्रसिद्ध लेखक,गोरबोली(बंजारा)अभ्यासक**१९४२: किरण नगरकर -- भारतीय इंग्रजी कादंबरीकार,नाटककार आणि पत्रकार.(मृत्यू: ५ सप्टेंबर २०१९ )* *१९२६: सूर्यकांत रामचंद्र खांडेकर – कवी व गीतकार (मृत्यू: १५ जून १९७९ )**१९२०: नानासाहेब शिरगोपीकर -- ट्रीकसीन्ससह भक्तिप्रधान नाटकं सादर करणारे कलाकार (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९४ )**१९१०: शंकर दत्तात्रय भोसले -- कवी, लेखक(मृत्यू: १६ जून १९७२ )**१९०७: गजानन जहागीरदार --- मराठी व हिंदी भाषांतील चित्रपट-अभिनेते आणि दिग्दर्शक(मृत्यू: १३ ऑगस्ट १९८८ )**१९०२: बडे गुलाम अली खाँ ऊर्फ ’सबरंग’ – पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक, त्यांच्या’याद पियाकी आये’,’का करु सजनी’ इ. ठुमर्‍या लोकप्रिय आहेत.(मृत्यू: २५ एप्रिल १९६८ )**१८९८: हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय – भारतीय इंग्रजी कवी,नाटककार,संगीतकार हिन्दी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते.(मृत्यू: २३ जून १९९० )**१८८४: विनायक सीताराम सरवटे -- स्वातंत्र्यसैनिक,राजकीय नेते आणि लेखक (मृत्यू: २६ जानेवारी १९७२ )**१८७५: वॉल्टर ख्राइसलर – ’ख्राइसलर’ कंपनीचे संस्थापक (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४० )**१८०५: हान्स अँडरसन – डॅनिश परिकथालेखक (मृत्यू: ४ ऑगस्ट १८७५ )* 💮 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💮•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१७: अजय झनकर-- प्रख्यात लेखक आणि चित्रपट निर्माते(जन्म: १ सप्टेंबर १९५९ )**२००९: गजाननराव वाटवे – गायक व संगीतकार (जन्म: ८ जून १९१७ )**२००५: पोप जॉन पॉल (दुसरा) (जन्म: १८ मे १९२० )**१९९२: आगाजान बेग ऊर्फ आगा – आपल्या निखळ विनोदानी रसिकांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते**१९८८: मनू गंगाधर नातू -- समीक्षक, निबंधकार,संपादक (जन्म: ११ नोव्हेंबर १९१९ )**१९३३: के. एस. रणजितसिंहजी – कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा,यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून ’रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा’ खेळल्या जातात.(जन्म: १० सप्टेंबर १८७२ )**१८७२: सॅम्युअल मोर्स – ’मोर्स कोड’ व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार (जन्म: २७ एप्रिल १७९१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लोकसहभागातून शाळेची प्रगती*गावाला शाळेचा आधार असावा आणि शाळेला गावाचा आधार असावा, असे म्हटले जाते. यातूनच मग दोघांचाही विकास होतो. शाळेला प्रत्येक वेळी धनाने म्हणजे आर्थिक साहाय्य करावे असे ही काही नाही. तनाने व मनाने केलेले सहकार्य देखील शाळेच्या विकासात मोलाची भूमिका असू शकते. म्हणूनच लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक नागरिकांनी सरकारी शाळा म्हणजे आपली शाळा समजून त्या शाळेविषयी आत्मीयता जपली पाहिजे, तरच भविष्यात ह्या शाळा टिकू शकतील.................... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'गुड न्यूज', जीएसटी कलेक्शनमधून सरकारच्या तिजोरीत 1.96 लाख कोटी रुपये झाले जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई : हवामान खात्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरातसह १४ राज्यांमध्ये पुढील दोन दिवस पाऊस आणि वादळाचा अंदाज वर्तवला*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *डिपेक्स 2025 मध्ये 400 श्रेष्ठ प्रकल्पांचे प्रदर्शन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्रासाठी तब्बल 854 समर स्पेशन ट्रेन; मुंबई, पुण्यातून भारताच्या कानाकोपऱ्यात जाता येणार फिरायला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जेजुरी गडावरील भंडाऱ्याचा भाविकांच्या आरोग्यावर परिणाम, माजी विश्वस्तांची भेसळ रोखण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रसरकारने पेन्शनचे नियम बदलले, NPS किंवा UPS पैकी एकाचच घेता येणार लाभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 - लखनऊ मध्ये खेळलेल्या सामन्यात PBKS ने LSG ला 8 विकेटने हरवले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दादाराव शिरसाठ पाटील, SSA, नांदेड👤 राघवेंद्र कट्टी , फोटोग्राफर, नांदेड👤 जीवनसिंग खासावत , साहित्यिक, भंडारा 👤 कृष्णा येरावार , शिक्षक, धर्माबाद👤 बबन शिंदे , साहित्यिक, नांदेड👤 दिलीप नागोराव जाधव👤 मारोती होरके👤 रितेश चव्हाण👤 रविंद्र भागडे👤 वैजनाथ जाधव👤 सूर्यकांत भोगेवार👤 नामदेव जाधव👤 दिलीप भद्रे👤 कवी प्रशांत गवई👤 राजेश्वर माळगे, धर्माबाद👤 शेख समीर👤 प्रभाकर पवार👤 विलास थोरमोठे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 31*आम्रवृक्षावर बसून गातो**पक्षी हा मधुर आवाजात**अंडी कधी उबवत नाही**ठेवतो दुस-यांच्या घरट्यात*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - मोर ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देठापासून गळलेले फळ परत जोडता येत नाही. तद्वतच तोंडातून बाहेर पडलेला शब्द परत घेता येत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1) जगातील सर्वात मोठे लिखित संविधान कोणत्या देशाचे आहे ?2) संविधान सभेचे पहिले सत्र केव्हा भरविण्यात आले होते ? 3) मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?4) संविधान तयार होण्यासाठी किती कालावधी लागला ?5) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?*उत्तरे :-* 1) भारत 2) 9 डिसेंबर 1946 3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 4) 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस. 5) डॉ. राजेंद्र प्रसाद*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *केंद्रशासित प्रदेश*केंद्राच्या शासनव्यवस्थेखाली असलेला प्रदेश. भारतीय संविधानाच्या ३६६ अनुच्छेदान्वये पहिल्या परिशिष्टात केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्देशिलेले भारतीय भूभाग आणि सदर परिशिष्टात न उल्लेखिलेले परंतु भारतभूमीत समाविष्ट असलेले इतर प्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेश होत.भारतीय संविधानात सुरुवातीस राज्याचे चार वर्ग पाडण्यात आले होते. ब्रिटिश अमदानीत चीफ कमिशनर प्रमुख अधिकारी असलेल्या अजमीर, कूर्ग व दिल्ली ह्या प्रांतांना ‘क’ राज्याचा दर्जा देण्यात आला. भारतात विलीन झालेल्या संस्थानांपैकी रेवा, बुंदेलखंड व बधेलखंड ही मध्य प्रदेशातील व पंजाबच्या उत्तर सीमेजवळील संस्थाने अतिशय मागासलेली असल्यामुळे आणि शेजारच्या प्रांतात त्यांना विलीन करण्यासंबंधी एकमत नसल्यामुळे त्यांचे अनुक्रमे विंध्य प्रदेश व हिमाचल प्रदेश असे दोन प्रांत करण्यात आले. कच्छ, मणिपूर, त्रिपुरा ही संस्थाने पाकिस्तानच्या सीमेलगत असल्याने ती केंद्र सरकारच्या अधिकाराखाली असणे आवश्यक वाटले. भोपाळमध्ये मुसलमानांची संख्या जास्त असल्यामुळे आणि विलासपूर येथे भाक्रानानगल हे प्रचंड धरण बांधले जात असल्यामुळे त्यांनाही वेगळ्या ‘क’ राज्याचा दर्जा मिळाला. अंदमान आणि निकोबार बेटांना ‘ड’ राज्य संबोधण्यात आले.या अकरा केंद्रशासित प्रदेशांपैकी भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भात अनेकांना शेजारच्या राज्यांत विलीनीकरण झाले. १९५६ मध्ये अंदमान बेटे, लक्षद्वीप बेटे, हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा आणि दिल्ली एवढेच केंद्रशासित प्रदेश उरले. दाद्रा व नगरहवेली (१९६१), गोवा, दीव, दमण (१९६२), पाँडिचेरी (१९६२) ही राज्ये भारतात सामील झाल्यावर त्यांची भर वरील राज्यांत पडली. पंजाब राज्यातून हरयाणा राज्य वेगळे झाल्यावर (१९७०) त्यांची संयुक्त राजधानी म्हणून चंडीगढ शहर केंद्रशासित बनले. तसेच आसाममधील मिझो जिल्हा आणि अरुणाचल प्रदेश यांस हा दर्जा १९७२ मध्ये देण्यात आला. याउलट १९७० मध्ये हिमाचल प्रदेश, १९७२ मध्ये मणिपूर, त्रिपुरा यांना संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. अशा रीतीने १९७४ मध्ये ९ केंद्रशासित प्रदेश राहिले, ते असे: अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप, चंडीगढ, दाद्रा व नगरहवेली, दिल्ली, गोवा, दीव, दमण, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि पाँडिचेरी.या प्रदेशांचे प्रशासन संविधानाच्या २३९ ते २४१ अनुच्छेदांन्वये चालविण्यात येते. राष्ट्रपती हाच या प्रदेशाचा कार्यकारी प्रमुख असतो. यांतील काही प्रांतांत, उदा., गोवा, पाँडिचेरी व मिझोराम यांत, विधानसभा व मंत्रिमंडळे स्थापन करण्यात आली असली, तरीही या सर्व राज्यांच्या संबंधी कायदे करण्याचा अंतिम अधिकार संसदेला आहे.(स्रोत : मराठी विश्वकोश)*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुरुनि आलों तुझिया भेटी । सांगावया जिवींच्या गोष्टी गा विठोबा ॥१॥ बोल गा बोल मजशी कांहीं । दृष्टी उघडुनी मजकडे पाही गा विठोबा ॥२॥ अरे तूं कृपाळु दीनाचा । महा उदार थोरा मनाचा गा विठोबा ॥३॥ भक्तें पुंडलिकें गोविलासी लोभें । प्रेमें प्रीतीच्या वालभें गा विठोबा ॥४॥ युगें अठ्ठावीस भरलीं । धणी अजुनी नाहीं पुरली गा विठोबा ॥५॥ प्राण होती माझे कासाविस । नामा म्हणे कां धरिलें उदास गा विठोबा ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळ्या प्रकारचा असतो म्हणूनच म्हणतात ना की, स्वभावाला औषध नसते. प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात म्हणून विचार जुळत नाही. पण, ज्यांच्या विचारातून किंवा स्वभावातून आपल्याला थोडेतरी शिकायला मिळत असेल तर आपण त्यांच्याकडून शिकून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करावे. भलेही आपण कितीही हुशार किंवा अनुभवी असले तरी एखाद्या वेळी, आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता पडत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कोल्हा आणि कोंबडी*एक कोल्हा एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येईना. खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.’ याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असता कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, ‘खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून माझ्यानं खाली येववत नाही. तरी आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील.’तात्पर्य – वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसर्‍याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~