✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 एप्रिल 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/12H7wso5zHu/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌐 *_राष्ट्रीय सागरी दिवस_* 🌐 •••••••••••••••••••••••••••••••••••• 🌐 *_ या वर्षातील ९५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌐 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌐••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००: अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. - १० या मराठी उपग्रह वाहिनीचे ’सह्याद्री’ असे नामकरण करण्यात आले.**१९५७: कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस.नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.**१९५५: प्रकृती अस्वास्थ्यामुळे विन्स्टन चर्चिल यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला**१९४९: भारत स्काऊट आणि गाईडची स्थापना झाली**१९३०: २४१ मैल प्रवास करुन महात्मा गांधी यांनी दांडीयात्रा संपविली.**१६७९: राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेले. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले. [चैत्र व.१०]**१६६३: दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात आक्रमण केले. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्‍नात त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत ’जिवावरचे बोटावर निभावले’ हा शब्दप्रयोग रुढ झाला.*🌐 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌐••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००: मुग्धा वैशंपायन -- झी मराठी वाहिनी वरील सारेगमपा लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातील आघाडीची गायिका**१९९३: प्रा. केशरचंद नारायण राठोड -- लेखक, कवी* *१९८५: आरती सिंग -- अभिनेत्री* *१९८०: नरेंद्र पाटील --- कवी**१९७९: प्रज्ञाधर ढवळे -- कवी**१९७७: रुपाली गांगुली -- भारतीय अभिनेत्री**१९७५: प्रा. डॉ. विनोद देवचंद राठोड -- लेखक, कवी तथा कादंबरी सूचीकार**१९७१: संदीप नारायण राक्षे -- कवी, लेखक, चित्रपट निर्माता**१९६९: महेश रामराव मोरे -- कवी, कादंबरीकार* *१९६३: उषा नाईक -- भारतीय अभिनेत्री, मराठी चित्रपटांमध्ये काम* *१९६१: प्रशांत पुरुषोत्तम दामले -- प्रसिद्ध मराठी अभिनेता**१९६०: महावीर शाह -- हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम करणारे प्रसिद्ध भारतीय टेलिव्हिजन आणि रंगमंच अभिनेता (मृत्यू: ३१ ऑगस्ट २००० )* *१९५३: अनुराधा कौतिकराव पाटील -- सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका व विविध पुरस्काराने सन्मानित**१९५१: डॉ. सर्जेराव जयवंतराव भामरे -- लेखक**१९४९: डॉ. राम पंडित-- प्रसिद्ध मराठी गझलकार**१९४७: प्रकाश देशपांडे -- इतिहास-साहित्य संस्कृतीचे गाढे अभ्यासक* *१९४७: शाहीर विजय रामचंद्र जगताप -- प्रसिद्ध शाहीर, लेखक, संपादक**१९४६: आनंद बाबू हांडे -- प्रसिद्ध लेखक**१९४६: ललिता इनामदार -- लेखिका**१९४२: मधुकर सीताराम जोशी (मधू जामकर) -- प्रतिभावंत कवी व उत्तम समीक्षक**१९४०: वासंती अरुण मुझुमदार -- ललितलेखिका, कवयित्री (मृत्यू: ७ नोव्हेंबर २००३ )**१९३६: वसंत कोकजे -- लेखक, कवी**१९३०: राम विठ्ठल नगरकर -- विनोदी नट, रामनगरी प्रसिद्ध आत्मचरित्र (मृत्यू: ८ जून १९९५ )**१९२३: शांता मुकुंद किर्लोस्कर -- कथाकार, कादंबरीकार, संपादक(मृत्यू: १५ सप्टेंबर २००७ )**१९२०: डॉ. रफिक झकारिया – महाराष्ट्राचे माजी नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य (मृत्यू: ९ जुलै २००५ )**१९२०: आर्थर हॅले – इंग्लिश कादंबरीकार (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००४ )**१९०९: अल्बर्ट आर.ब्रोकोली – ’जेम्स बाँड’ पटांचे निर्माते (मृत्यू: २७ जून १९९६ )**१९०८: बाबू जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक,राजकारणी,माजी केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान (मृत्यू: ६ जुलै १९८६ )**१८९०: आनंदराव कृष्णाजी टेकाडे -- कवी, गीतकार (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९६४ )**१८७७: माधवराव विनायक किबे (सरदार) -- संशोधक, लेखक (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९६३ )**१८५६: बुकर टी.वॉशिंग्टन – अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९१५ )**१८२७: सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद (मृत्यू: १० फेब्रुवारी १९१२ )*🌐 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌐••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: सुधीर सखाराम नाईक -- भारतीय क्रिकेटपटू(जन्म: २१ फेब्रुवारी १९४५ )**२०२१: अनिस चिस्ती -- इस्लाम धर्माचे व तत्त्वज्ञानाचे, तसेच उर्दू भाषेचे ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखक**२०१३: राम उगावकर -- कवी, शाहीर, गीतकार (जन्म: ५ मार्च १९२९ )**२००२: मनोहर राजाराम तथा मनू छाबरिया – दुबईस्थित भारतीय उद्योगपती, जम्बो ग्रुपचे संचालक (जन्म: १९४६ )**१९९८: रुही बेर्डे – चित्रपट व नाट्य अभिनेत्री**१९९६: भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन – बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक**१९९३: दिव्या भारती – हिन्दी,तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री (जन्म: २५ फेब्रुवारी १९७४ )**१९९२: सॅम वॉल्टन -- वॉलमार्टचे संस्थापक (जन्म: २९ मार्च १९१८ )**१९६४: गोपाळ विनायक भोंडे – नकलाकार**१९४०: चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते (जन्म: १२ फेब्रुवारी १८७१ )**१९२२: पंडिता रमाबाई – विधवा,परिक्त्यक्ता आणि स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक आणि ’आर्य महिला समाज’ च्या संस्थापिका,संस्कृत पंडित (जन्म: २३ एप्रिल १८५८ )**१९१७: शंकरराव निकम – स्वातंत्र्यशाहीर*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तोडणे सोपे पण जोडणे अवघड*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यसभेतही वक्फ विधेयक झाले मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्रातल्या गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला केंद्र शासनाची मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई :- गोराई येथे नवीन 'बर्ड पार्क' सुरू ! 70 प्रजातींच्या 500 हून अधिक पक्षांना पाहता येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई : नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील ८ मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई - ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या ८७व्या वर्षी निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *शिक्षकांच्या सिंगापूर दौऱ्यामुळे अध्यापन पद्धती अधिक प्रभावी होण्यास मदत होईल - शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संग्राम निलपत्रेवार , नांदेड👤 हणमंत पवार👤 काझी मुजाहिद सय्यद👤 मोहमंद अफजल शेख👤 गोविंद दळवी👤 लोकेश शिंदे👤 गोविंद सोनपीर👤 गणेश सावंत , शिक्षक, भोकर👤 ईश्वर वाडीकर, शिक्षक, देगलूर👤 सुरेश घाळे👤 अनिल ईबीतदार👤 राजश्री संगपवाड👤 निलेश चंदेकर👤 लक्ष्मण सिरमलवार, धर्माबाद👤 नागेश यमेवार👤 संतोष पाटील चंदनकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 34*रंग आहे माझा श्वेत**ज्यात जीवनसत्व अनेक**प्रथिनांचा आहे मी राजा**पूर्णान्न खाऊन येईल मजा**ओळखा पाहू मी कोण*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - साप ( नाग )••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची खरोखरच कसोटीच असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?२) १९९१ मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान श्रीलंकेतील कोणत्या संघटनेने राजीव गांधींची हत्या केली ?३) कोणाच्या प्रयत्नांमुळे १ जानेवारी १८८२ पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून एक दिवस 'रविवार' सुट्टी देण्यात आली ?४) 'अंग राखून काम करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) १९ जुलै १८६९ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी किती बँकांचे राष्ट्रीयीकरण केले ? *उत्तरे :-* १) पं. जवाहरलाल नेहरु २) लिट्टे LTTE ३) नारायण मेघाजी लोखंडे ४) अंगचोर ५) १४ बँक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *फंगस / बुरशी* 📙एखादा अन्नपदार्थ उघडा राहिला, तर त्यावर बुरशी धरू लागते. एखादे लाकूड पावसात भिजत राहिले, तर त्यावर सुद्धा झपाट्याने बुरशी धरते. या बुरशीमुळे अनेक गोष्टींचा वापर करणे अशक्य होऊन बसते. एवढेच नव्हे तर या बुरशीमुळे मानवांत, प्राण्यांत, वनस्पतीत कित्येक आजारांचाही उद्भव झालेला दिसतो.पिकांवर पडणारे बुरशीजन्य रोग बघताबघता सर्व पीक नष्ट करतात. ज्वारी - बाजरीवर पडणारा काळा बुरा, आंब्याच्या मोहरावर धरणारा चिकटा, मक्यावर पडणारी कोळशी ही बुरशीजन्य रोगांची काही उदाहरणे. पावसाळ्याच्या दिवसांत कातडीचे होणारे विकार, पायाला होणाऱ्या चिखल्या, डोक्यातील कोंडा, प्राण्यांचे झडणारे केस हेही आजार बुरशीजन्य. म्हणजे बुरशी ही वाईटच असते, असे मानायची गरज मात्र नाही. खरे सांगायचे म्हणजे बुरशीकडे निसर्गाने एक फार मोठे काम सोपवलेले आहे. नको असलेली प्रत्येक गोष्ट नष्ट करायला, पुन्हा जमीन समृद्ध करायला सर्व प्रकारची बुरशी मदत करत असते.फंगस ही वेगळी जीवसृष्टी आहे. आता सजीवांच्या सहा सृष्टी मानल्या जातात. अशा या वनस्पतीला स्वतःच्या पोषणासाठी कोणत्यातरी जिवंत वा मृत सजीवावर अवलंबून राहावे लागते. तिचे अस्तित्व त्यामुळेच फक्त सजीव वा त्यांचे अवशेष यांच्याशी संबंधित राहते. बुरशी एकपेशीय असेल व बहुपेशीय. एकपेशीय म्हणजे आपल्या माहितीचे यिस्ट वा किण्व. बहुपेशीय बुरशीचे उदाहरण कुत्र्यांच्या छत्र्या किंवा मशरूम. यालाच अळंबी पण म्हणतात. अळंबी खायला चविष्ट लागतात. म्हणून त्यांची लागवडही केली जाते. मोठाल्या तंतुरूप पेशींनी अळंबी वाढतात. एखाद्या मेलेल्या झाडाच्या खोडावर पावसाळ्यात बघता बघता अळंबी वाढलेली दिसतात. पण याआधी त्या खोडाच्या आतील चहूबाजूंनी बुरशीचे प्रवेश करून ते खोड पोखरलेले असते.बुरशीच्या असंख्य जाती निसर्गात आढळतात. मोजदाद अशक्य व्हावी एवढ्या जाती आज ज्ञात आहेत; पण नवीन जातींचा पत्ता ज्या वेगाने लागतो, तो लक्षात घेतला तर किमान 'तीन एक लाख प्रकारच्या जाती' पृथ्वीवर असाव्यात. बुरशीचे सर्व पुनरुत्पादन साध्या द्विभाजन पद्धतीने होत जाते. जेव्हा प्रतिकूल हवामान असेल तेव्हा स्पोअर जमिनीवर विखुरली जातात. बुरशीचा सलग पसरत गेलेला थर कित्येक मीटरपर्यंत जमिनीवर आढळतो. तसेच काही मीटर खोलवर ही बुरशी आढळते. बुरशीचा एखादा तंतू किंवा एखादे स्पोअर अनुकूल हवामानात इतक्या प्रचंड वेगाने तंतूनिर्मिती करते की या वेगापुढे अन्य कशाचीही पुनरुत्पादनाची गती कमीच पडावी. एखाद्या बुरशीच्या कणापासून जेमतेम चोवीस तासांत एक किलोमीटर लांबीची पुनर्निर्मिती होऊ शकते. बुरशीसाठी कवक हाही शब्द वापरला जातो.अळंबी खाण्यासाठी, यीस्ट पदार्थ फसफसण्यासाठी, चीजला चव आणण्यासाठी, सर्व प्रकारच्या प्रतिजैविकांच्या निर्मितीसाठी बुरशी वापरली जाते. उपयुक्त बुरशीचे वापर आठवले म्हणजे बुरशीबद्दलची किळस जरा कमी होईल.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून !*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देव दगडाचा भक्त हा मावेचा । संदेह दोघांचा फिटे कैसा ॥१॥ ऐसे देव तेहि फोडिले तुरकीं । घातले उदकीं बोभातीना ॥२॥ ऐसिया देवासी वाहिले टिळे डोळे । भक्त बाळे नागविले ॥३॥ ऐसीहि दैवतें नको दावूं देवा । नामा म्हणे केशवा विनवितसे ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी आपल्या मताने कसेही बोलत असतील आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला हो ला हो असं प्रतिसाद देत राहिल्याने त्यांना आनंद होतो आणि ते, आपल्याला जवळ करत असतात.पण, एखाद्या वेळी त्यांचे बोलणे आपल्या मनाला पटले नाही की लगेच आपला विरोध करायला सुरूवात करतात. कदाचित या विषयी आपल्याला अनुभव आला असेलच. म्हणून जे कोणी चांगले सांगत असतील त्यांचे विचार आवर्जून ऐकून घ्यावे. पण,काही विचार पटत नसतील तर एकदाचे बाजूला झालेले बरे कारण, बरेचदा असं होतं की, हो ला हो लावल्याने कधी काळी अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा म्हणाला " महाशय तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ? काही त्याला शिकवा. त्याला सोने आणि चांदी यात जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही " आणि मोठ्याने हसू लागला ....हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ... तो घरी गेला .... त्याने मुलाला विचारले " बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!माझी चार लोकात खिल्लीउडवली जाते .. तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!मुलगा म्हणालाराजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहेमी दिसताचं राजा मला बोलावून घेतो .. त्याच्या सोबत गावातीलसारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात .... राजा एका हातातसोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोरधरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल ..आणि मी चांदीचे नाणे उचलतो .. त्यामुळे तिथे असलेले सगळेमोठ्याने हसतात ... सार्‍यांना मजा वाटते ....... असे रोज घडतेमुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही. न राहून त्याने मुलाला विचारले " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ?असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेलाकपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्यानाण्यांनी भरलेली होती ...हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..मुलगा म्हणाला " ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल .. त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेलतर येवू द्या .. पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही. मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 एप्रिल 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/sLZfHuz1NoyP6od8/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔆 *_ या वर्षातील ९४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔆 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔆••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार**१९८४: भारताचा पहिला अवकाशयात्री राकेश शर्मा यांचे सोविएत अवकाशायन सोयुझ टी- ११ द्वारे उडान**१९६८: मेम्फिस,टेनेसी येथे जेम्स अर्ल रे याने मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) यांची हत्या केली**१९६८: ’नासा’ने ’अपोलो-६’ चे प्रक्षेपण केले**१९४९: पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी संरक्षणविषयक सामंजस्य करार करुन ’नाटो’ची (NATO) स्थापना केली.**१९४४: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.*🔆 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔆••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: विजय गंगाप्रसाद देवडे -- लेखक* *१९८०: शेख पीरपाशा ईसाक -- कवी* *१९७६: विजय निळकंठ वाटेकर -- कवी**१९७२: अजय देशपांडे -- लेखक, कवी, गझलकार, समीक्षक* *१९७१: हेरंब कुलकर्णी -- मराठी वैचारिक आणि शिक्षणविषयक लेखन करणारे लेखक**१९६९: पल्लवी जोशी -- भारतीय अभिनेत्री, लेखिका आणि चित्रपट निर्माती* *१९६८: बबन मारोतराव आव्हाड -- लेखक, कवी* *१९६६: स्मिता श्रीनिवास आपटे -- लेखिका**१९६१: डॉ. सुधीर अनंत काटे -- कवी, लेखक* *१९६०: राजेंद्र विश्राम देसले -- चरित्रकार, कथा लेखक* *१९५९: नामदेव राठोड -- कवी**१९५८: नारायण वामनराव जोशी -- लेखक, धडपड मंच संयोजक तथा निवृत्त शिक्षण उपसंचालक* *१९५८: अरुण धोंडिबा घोडे (देशमुख) -- प्रसिद्ध लेखक, चित्रकार , अनुवाद, पत्रकार**१९५६: प्रकाश (अप्पा) जाधव -- लेखक* *१९५५: प्रेमा नारायण -- अभिनेत्री-नर्तिका**१९५४: परवीन बाबी -- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल (मृत्यू: २० जानेवारी २००५ )**१९५३: सुरेश माणिकराव कुलकर्णी -- मुक्त पत्रकार, लेखक**१९५२: चंद्रशेखर नार्वेकर(एन.चंद्रा) -- भारतीय निर्माता, लेखक आणि दिग्दर्शक* *१९४९: नंदकुमार जयराम मुरडे -- कवी, लेखक**१९४८: महावीर रामचंद्र जोंधळे -- प्रसिद्ध कवी, कथाकार, बालसाहित्यकार, पत्रकार**१९४७: मच्छिंद्र कांबळी -- मालवणी नटसम्राट मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते,प्रसिद्ध नाट्यनिर्माते (मृत्यू: ३० सप्टेंबर २००७ )**१९४६: प्रभाकर लक्ष्मण मयेकर -- मराठी नाटककार, कथाकार (मृत्यू: १८ ऑगस्ट २०१५ )**१९३०: निळू फुले -- प्रसिद्ध मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते (मृत्यू : १३ जुलै २००९ )**१९३८: किशोर दिपचंद हिवाळे -- लेखक* *१९३८: प्रा. डॉ.अजीज नदाफ -- मराठी साहित्यिक, मराठी शाहिरीचे अभ्यासक, पुरोगामी वैचारिक चळवळीतील कार्यकर्ते* *१९३३: रामचंद्र गंगाराम तथा ’बापू’ नाडकर्णी – डावखुरे मंदगती गोलंदाज (मृत्यू: १७ जानेवारी २०२० )**१९२६: प्रा. बाळ केशव सावंगीकर -- लेखक**१९२१: हरि कृष्ण लाल भगत -- माझी केंद्रीय मंत्री (मृत्यू: २९ ऑक्टोबर २००५ )**१९१९: भालचंद्र महाराज कहाळेकर -- व्यासंगी अध्यापक,कुशल संघटक,प्रभावी भाषोपासक (मृत्यू: २८ मे १९७५ )**१९०२: पं नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (मृत्यू: १ एप्रिल १९८४ )**१८४२: एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (मृत्यू: ३ ऑक्टोबर  १८९१ )**१८२३: सर कार्ल विल्हेम सिमेन्स – जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता,(मृत्यू: १९ नोव्हेंबर १८८३ )* 🔆 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔆••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१: गोविंद मल्हार कुलकर्णी -- समीक्षक( जन्म: २१ डिसेंबर १९१४ )**२०००: नरेश कवडी -- भाषातज्ञ, कथाकार, समीक्षक, ज्ञानेश्वरीचे चिकित्सक अभ्यासक आणि अनुवादक (जन्म: ५ ऑगस्ट १९२२ )* *१९९६: आनंद साधले – संस्कृत वाङ्‌मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक (जन्म: ५ जुलै १९२० )**१९८७: सच्‍चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ’अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४) विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार (जन्म: ७ मार्च १९११ )**१९७९: पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भूट्टो यांना फाशी (जन्म: ५ जानेवारी १९२८ )**१९६८: मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते यांची हत्या (जन्म: १५ जानेवारी १९२९ )**१९२३: जॉन वेन – ब्रिटिश गणितज्ञ (जन्म: ४ ऑगस्ट १८३४ )**१६१७: जॉन नेपिअर – स्कॉटिश गणितज्ञ, लॉगॅरिथम सारणीचे जनक (जन्म: १५५०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मतदार राजा जागा हो ....!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना मोठा झटका; दरकपातीला स्थगिती, 850 रुपयांचे वीजबिल 1000 रू. राहणार *•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अमेरिकेतील टॅरिफ टॅक्सप्रणालीचा जगभरातील देशांना शॉक; भारतावर डिस्काउंटेड रेसिप्रोकल टॅरिफ धोरणाचा होणार परिणाम*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सोलापूर जिल्ह्यात 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के; 2.6 रेक्टर स्केलचा हादरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्रात वादळवारे.. राज्यातील अनेक जिल्ह्यात गारांसह अवकाळी पाऊस; भंडाऱ्यात दोन शेतमजूरांचा मृत्यू, फळबागा कोलमडल्या, जनावरं होरपळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू कक्षात आग, सतर्कतेनं 66 बाळं सुखरुप*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रात जागतिक कौशल्य केंद्र, रोजगाराच्या आंतरराष्ट्रीय संधी; ओंग मिंग फुंग यांची मुंबईला भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सारा तेंडुलकर झाली मुंबई फँचायझीची मालकीण; सचिन तेंडुलकरच्या लेकीचं क्रिकेटच्या मैदानावर पहिलं पाऊल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 हेरंब कुलकर्णी , शिक्षणतज्ञ👤 अंकुश शिंगाडे , साहित्यिक, नागपूर👤 भोजराज शंकर , जारीकोट👤 प्रताप रायघोळ 👤 रमेश येलमे मंगनाळीकर 👤 चंद्रकांत अमलापुरे, शिक्षक, नायगाव👤 बापूराव वाघमारे 👤 राजेंद्र देसले 👤 श्याम पांचाळ 👤 गणेश G. कोकुलवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 डूमणे शिलवंत 👤 शिवाजी भोसले 👤 श्याम लोलापोड 👤 राम गंगाधर नाइनवाड👤 प्रवीण पाटील *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 33*वळणावळणाची धरती मी वाट**पाय नाहीत तरी धावतो सुसाट**बदलून कपडे फिरतो सारे रान**घेतो मी चाहूल जरी नसतील कान**जेंव्हा मी बघतो उंचावून मान**सर्वच धावतात वाचविण्यास प्राण**ओळखा पाहू मी आहे कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आलेल्या संधीचा योग्य फायदा घेणारे व्यक्ती जीवनात यशस्वी होते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) "हाथी घोडे, तोफ तलवारे, फौज तो तेरी सारी है, पर जंजिर मे जकडा राजा मेरा, अब भी सब पे भारी है!" या काव्यपंक्ती कोणत्या चित्रपटातील आहेत ?२) सन १९६९ मध्ये 'मिझो नॅशनल फ्रंट' ( MNF ) या संघटनेची स्थापना कोणी केली ?३) मुंबईत ११ जुलै १८५९ रोजी पहिली कापड गिरणी कोणी सुरु केली ?४) 'भाषण ऐकणारे' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) जम्मू काश्मीरला मिळणारी पहिली वंदे भारत ट्रेन केव्हापासून धावणार आहे ? *उत्तरे :-* १) छावा २) लालडेंगा ३) कावसजी दावर ४) श्रोते ५) १९ एप्रिल २०२५*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पॅरॅसिटॅमॉल कशासाठी वापरतात ?* 📙 औषधांच्या दुकानात जाऊन बर्‍याचदा तुम्ही तापासाठीच्या गोळ्या आणल्या असतील. क्रोसिन, मेटॅसीन, पॅमाॅल अशा विविध नावांनी विकल्या जाणाऱ्या या गोळ्यांमध्ये 'पॅरॅसिटॅमॉल' नावाचे एक औषध असते हे तुम्हाला ठाऊक आहे काय ?पॅरासिटेमॉल हे औषध गोळ्यांच्या तसेच पातळ औषधाच्या स्वरूपात मिळते. या औषधामुळे ताप कमी होतो. मेंदूतील तापमानाचे संतुलन करणाऱ्या केंद्रावर या औषधामुळे परिणाम होतो व ताप कमी होतो. साहजिकच कोणत्याही तापासाठी पॅरासिटामॉल हे औषध घेतल्यास ताप कमी होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ताप हा रोग नाही तर ते केवळ रोगाचे लक्षण आहे. घरात मेलेल्या उंदराचा वास येत असेल तर अत्तर टाकून व सेंट फवारून काही काळ तो वास घालवता येईल; पण दुर्गंधी कायमची घालावयाची असल्यास मेलेला उंदीर शोधून तो फेकून देण्याखेरीज दुसरा उपाय नाही. तसेच ताप ज्या रोगामुळे होतो तो रोग बरा केल्याखेरीज ताप कायमचा बरा होणार नाही.ताप केव्हा येतो, किती वेळ राहतो, जास्त असतो वा कमी, यावर रोगांचे (जसे हिवताप, क्षयरोग) निदान अवलंबून असते. त्यामुळे ताप आल्या आल्या पॅरासिटेमॉलच्या गोळ्या घेतल्याने निदानात अडचण येऊ शकते. ताप आल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याखेरीज औषध घेऊ नये. कोणतेही औषध दुष्परिणामरहित नसते. त्यामुळे आवश्यकता असल्यासच औषध घ्यावे. खरे तर अंग थंड पाण्याने पुसणे, कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे या घरगुती उपायांनीही ताप उतरतो. प्रसंगी या उपायांचा वापर करावा.सर्दी, खोकला अशा सामान्य रोगात येणार्या तापासाठी हे औषध घ्यायला हरकत नाही. ताप उतरण्याखेरीज हे औषध वेदनाशमनही करते व सूजही उतरवते.डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षितयांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देव दगडाचा भक्त हा मावेचा । संदेह दोघांचा फिटे कैसा ॥१॥ ऐसे देव तेहि फोडिले तुरकीं । घातले उदकीं बोभातीना ॥२॥ ऐसिया देवासी वाहिले टिळे डोळे । भक्त बाळे नागविले ॥३॥ ऐसीहि दैवतें नको दावूं देवा । नामा म्हणे केशवा विनवितसे ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी आपल्याकडे रागाने बघण्याऐवजी आपल्याकडे बघून हसत असेल तर जास्त मनावर घेऊ नये.निदान ती व्यक्ती हसण्याचा तरी प्रयत्न करत असते. म्हणजेच त्या हसण्यामागे काहीतरी दडले असणार. ज्या व्यक्तीला या प्रकारचे गुण दिसत असतात ती समोरची व्यक्ती वाईट असेलच असेही नाही. म्हणून लहान, सहान गोष्टीवरून वाद करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्तअसण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हाराजा त्यात विजयी झाला. काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होतचालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेमकाही कमी झाले नाही. एके दिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्येपाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढे पुढे गेला आणि दलदलीत फसला. वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्यनव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावतआले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली.कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पणहत्ती बाहेर येऊ शकला नाही.भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊलागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला,राजा शेजारीच उभा होता. त्याने राजाला असा सल्ला दिला, "महाराज! तत्काळ युद्धाचे नगारेवाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा." राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुमदिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले, सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेरपडला. त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते.राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले. ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणीअसल्यास प्रगती होते. जर नशीब काही 'चांगले' देणार असेल तर त्याची सुरुवात 'कठीण' गोष्टीने होते .. आणि नशीब जर काही 'अप्रतिम' देणार असेल तर त्याची सुरुवात 'अशक्य' गोष्टीने होते....!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 एप्रिल 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/wgv78RucPVxLfzas/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ☢️ *_ या वर्षातील ९३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☢️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☢️•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०००: आय.एन.एस.आदित्य हे नौकांना इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.**१९७५: बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्ह विरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव हा बुद्धिबळात जगज्जेता बनला.**१९७३: मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाईल टेलिफोन कॉल बेल लॅब्जमधील डॉ.जोएल अँगेल याला केला**१९४८: ओरिसा उच्‍च न्यायालयाची स्थापना* ☢️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☢️ •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८२: निरंजन मुडे -- कवी* *१९७७: डॉ. रमेश तुळशीराम रावळकर -- कवी, लेखक, संपादक* *१९७१: माधुरी मगर-काकडे -- कवयित्री, लेखिका* *१९७१: रवींद्र सूर्यभान साळवे -- कवी, लेखक**१९७१: आशिष नंदकिशोर जायस्वाल -- राज्य मंत्री म.राज्य**१९७०: विनोद पितळे -- पत्रकार, लेखक, कवी**१९६७: सुधीर फाकटकर -- विज्ञान तंत्रज्ञान प्रचारक तथा लेखक* *१९६५: नाझिया हसन – पाकिस्तानी पॉप गायिका (मृत्यू: १३ ऑगस्ट २००० )**१९६५: लीलाधर सदाशिव महाजन -- कवी, लेखक* *१९६४: श्रीकांत बोजेवार -- प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार, चित्रपट पटकथाकार* *१९६२: जयाप्रदा – प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री**१९६१: डॉ. शंकर किसन बोराडे -- स्तंभलेखक, समीक्षक (मृत्यू: २६ नोव्हेंबर २०२३ )**१९५९: संदीप वासलेकर -- मराठी तत्त्वज्ञ, संघर्ष निवारण आणि जगाचे भवितव्य या विषयांवर आपले विचार मांडतात**१९५५: हरिहरन अनंत सुब्रमणी -- भारतीय पार्श्वगायक,भजन आणि गझल गायक* *१९५१: रवीप्रकाश कुलकर्णी-- चरित्र लेखक, पत्रकार* *१९५१: डॉ. किशोर रघुनाथ पवार -- प्रसिद्ध विज्ञान लेखक,व्याख्याते* *१९५१: बन्सीलाल तुकाराम कदम -- कवी, लेखक**१९५१: अलका शशांक कुलकर्णी -- सुप्रसिद्ध लेखिका* *१९४८: रमेश नारायण गोळे -- लेखक**१९४१: दत्ता बाळ -- तत्त्वचिंतक, ग्रंथकार (मृत्यू: ३ सप्टेंबर १९८२ )**१९४१: कृष्णराव पंढरीनाथ ऊर्फ शशिकांत देशपांडे -- मराठी लेखक, संपादक**१९३४: जेन गुडॉल – इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ**१९२९: सर्वोत्तम ठाकूर -- प्रसिद्ध लेखक**१९१४:फील्ड मार्शल सॅम माणेकशा (मृत्यू: २७ जून २००८)**१९०४: रामनाथ गोएंका – ’इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीतील नेते (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९९१)**१९०३: कमलादेवी चट्टोपाध्याय– मॅगसेसे पुरस्कार विजेत्या(१९६६) स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९८८ )**१८९५: कृष्णराव भाऊराव बाबर -- प्रसिद्ध लेखक ( मृत्यू:९ जून १९७४)**१८८२: द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार.(मृत्यू: २१ जून १९२८ )*☢️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☢️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७: किशोरी आमोणकर --- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका(जन्म: १० एप्रिल १९३१ )* *१९९८: हरकिसन मेहता – प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार, ’चित्रलेखा प्रकाशन’चे मुख्य संपादक**१९९८: मेरी कार्टराइट – इंग्लिश गणितज्ञ (जन्म: १७ डिसेंबर १९०० )**१९९२: उद्धव जयकृष्ण शेळके -- प्रसिद्ध कथाकार,कादंबरीकार (जन्म: ८ ऑक्टोबर १९३१ )**१९८८: डॉ.विष्णू श्रीधर वाकणकर -- एक श्रेष्ठ भारतीय पुरातत्त्वज्ञ, संशोधक, शैलचित्रे अभ्यासक (जन्म: ४ मे १९१९ )* *१९८५: डॉ. वासुदेव विष्णू मिराशी – महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक (जन्म: १३ मार्च १८९३ )**१८९१: एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (जन्म: ४ एप्रिल १८४२ )**_१६८०: छत्रपती शिवाजी राजे भोसले (जन्म: १९ फेब्रुवारी १६३०)_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आईच्या हातचे जेवण*वेगवेगळ्या कारणामुळे जी व्यक्ती आपल्या घरापासून दूर राहतात. त्यांना प्रत्येक वेळी जेवण करताना प्रामुख्याने आईच्या हातच्या जेवणाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *तेलंगणा ओबीसी आरक्षण- संसदेच्या मंजुरीसाठी दिल्लीत निदर्शने, राहुल गांधी उपस्थित राहणार; सीएम रेड्डी यांनी विधानसभेत 42% आरक्षण केले जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ (दुरुस्ती) विधेयक, 2024 केले सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात जुनी वाहनं स्वच्छेने स्क्रॅप केल्यास नव्या वाहनावर १५ टक्के कर सवलत देण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा राज्य सरकारने केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जुनी पेन्शन योजना, शिक्षण क्षेत्रातील मागण्यांसाठी तीव्र आंदोलन उभारणार, माध्यमिक शिक्षक महामंडळाच्या सभेत निर्धार, सर्वांना एकत्रही करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अवयवदानासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना 42 दिवसांची रजा:सरकारी डॉक्टरांची परवानगी आवश्यक; अवयवदानाला प्रोत्साहन देण्याचा केंद्राचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेत बदल ; शाळा व्यवस्थापन समितीला गणवेश खरेदी करण्याचे दिले अधिकार, शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडने मालिका जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भागवत जेटेवाड , केंद्रप्रमुख👤 चक्रधर शिंदे 👤 माधव धुप्पे 👤 प्रकाश साखरे , धर्माबाद👤 तुकाराम पचलिंग👤 संतोष अंबालगोंडे 👤 शिराळे माधव 👤 रंगराव वाकोडे 👤 संभाजीराव गुनाळे 👤 नागभूषणम M बुसा 👤 कामाजी सरोदे 👤 गंगाधर सुगांवकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 32*दळणवळणाचे महत्वाचे साधन**वाहून नेते भारदार वजन**धावते धातूच्या रस्त्यावर**पोहचते नेहमी अचूक वेळेवर**शरीर माझे लांबच फार**शिट्टी वाजवून होते पसार**ओळखा पाहू मी आहे कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - कोकिळा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नशिबाचे चक्र सतत फिरत असते, म्हणूनच कोणी हरखून जाऊ नये किंवा हतबलही होऊ नये.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1) 'भारतीय संविधानाचे शिल्पकार' असे कोणास म्हटले जाते ?2) संविधानाचे कायदे सल्लागार कोण होते ?3) भारतीय संविधान केव्हा स्वीकारण्यात आले ?4) संविधानाची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आले ?5) भारतीय प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* 1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 2) बी. एन. राव 3) 26 नोव्हेंबर 1949 4) 26 जानेवारी 1950 5) 26 जानेवारी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ॲस्पिरिन कशासाठी वापरतात ?* 📙 *************************सध्याच्या काळात अॅस्पिरिनचा उपयोग ठाऊक नसलेला माणूस सापडणे ही बाब परग्रहावर जीवसृष्टी सापडण्याइतकीच कठीण आहे ! पण तरीही या औषधाचा योग्य वापर कसा करायचा, या गोळीचे दुष्परिणाम काय होऊ शकतात; याची शास्त्रशुद्ध माहिती मात्र फारच थोडय़ा जणांना असते.अॅस्पिरिन या औषधातील मूलभूत घटक म्हणजे अॅसेटाइल सॅलिसिलीक अॅसिड. एका गोळीत त्याचे प्रमाण ३०० मिलीग्रॅम इतके असते. अॅस्पिरिनचा वापर डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, दातदुखी, कानदुखी, मासिक पाळीच्या वेळी होणारी पोटदुखी, मुक्कामार लागल्यावर, लचक, मुरगळणे इत्यादीसाठी वेदनाशामक म्हणून होतो. या खेरीज ताप कमी होण्यासाठी आणि सूज कमी होण्यासाठीही ॲस्पिरिन वापरतात. ॲस्पिरिन हे एक स्वस्त असे बहुगुणी औषध आहे.परंतु अॅस्पिरीनचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. पोटात आम्लता वाढते, जळजळ होते. मळमळ, आंबट ढेकर, उलटी व क्वचित उलटीतून रक्त पडणे अशी लक्षणेही दिसून येतात. अॅस्पिरीनचे वावडे असणाऱ्यास खाज सुटणे, दम लागणे अशी लक्षणे दिसतात. ॲस्पिरिनमुळे रक्तस्रावाची प्रवृत्ती वाढते. अॅस्पेरीनचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी गोळी रिकाम्या पोटी घेऊ नये. एकतर काहीतरी खाऊन मगच घ्यावी किंवा एक ग्लास पाणी व त्याबरोबर थोडासा खायचा सोडा घेऊन मगच घ्यावी. आम्लपित्ताचा त्रास असेल, जठरात अल्सर असेल, रक्तस्रावाची प्रवृत्ती असेल किंवा गरोदरपणात दिवस भरत आले असतील; तर ही गोळी घेऊ नये. अॅस्पिरीनमुळे ताप, सूज, वेदना कमी झाल्या तरी मूळ रोग बरा होत नाही. त्यामुळे मूळ रोगावर उपचार करणे जास्त महत्त्वाचे ठरते. दम्याच्या रुग्णांनी ही गोळी घेताना विशेष काळजी घ्यावी लागते. शक्यतो न घेतलेलीच बरी.डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षितयांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुर्घट तें दुःख लागों नेदी भक्ता । त्याची तुज चिंता असे फार ॥१॥ आणि प्रकार घडे तो निकट । पैठणीं प्रकट रूप दावीं ॥२॥ जेथुनि सत्वर निघाले स्वदेशा । मुक्त केलें महिषा मार्गीं जाण ॥३॥ जाणती प्रेमळ कीर्तानासी नर । समाधि निरंतर म्हणे नामा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••व्यक्ती मग ती कोणीही असो, ज्या परिस्थितीतून बाहेर पडते त्या परिस्थितीत असताना तिला जे काही अनुभव आलेले असतात त्याच अनुभवाच्या आधाराने व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असते एवढेच नाही तर त्या अनुभवाला आपला गुरू मानून आपले संपूर्ण जीवन समर्पित करत असते. म्हणून म्हणतात ना की, प्रत्येकांचा अनुभव हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो म्हणून कोणाला तुच्छ लेखून त्याची टिंगलटवाळी करू नये. कोणाची वेळ कधी बदलेल हे कधीच सांगून येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणुसकी*इसाप हा एक गुलाम होता, पण आपल्‍या विद्वत्तेच्‍या जोरावर त्‍याने समाजात अत्‍युच्‍च स्‍थान निर्माण केले होते, ज्‍या धनाढ्याने इसापला विकत घेतले होते त्‍याचे नाव होते क्‍झेनथस, इसाप आपल्‍या आचरणातून क्‍झेनथसला सतत शिकवण देत असे.ज्‍या काळी रोममध्‍ये सार्वजनिक स्‍नानगृहे असत, सज्‍जन लोक सार्वजनिक स्‍नानगृहात जाऊन आंघोळ करत असत. एकदा क्‍झेनथसने इसापला स्‍नानगृहात गर्दी आहे की रिकामे आहे हे पाहून येण्‍यास सांगितले. इसापने जाऊन पाहिले तर तेथे बरेच लोक आंघोळीसाठी जमा झाले होते. तेवढयात त्‍याचे लक्ष स्‍नानगृहाच्‍या दारासमोर पडलेल्‍या एका मोठ्या दगडाकडे गेले. अनेक लोक त्‍या दगडाला अडखळून पडत होते, दगड रस्‍त्‍यात कसा म्‍हणून शिव्‍या देत होते. तेवढ्यात एक माणूस आला तोही त्‍या दगडाला अडखळून पडला, त्‍यानेही शिवी हासडली पण तो दगड त्‍याने उचलून दूर फेकला आणि मगच तो स्‍नानगृहात गेला.हे सर्व पाहून इसाप घरी गेला व मालकाला सांगितले की, स्‍नानगृहात फक्त एकच माणूस आंघोळीसाठी आला आहे. आंघोळीच्‍या पूर्ण तयारीनिशी क्‍झेनथस स्‍नानगृहात पोहोचला आणि पाहतो तर काय, तेथे तर प्रचंड गर्दी आहे. क्‍झेनथसने इसापला विचारले तू तर म्‍हणाला इथे फक्त एक माणूस आहे पण इथे तर प्रचंड गर्दी दिसते. इसाप उत्तरला,'' इथे रस्‍त्यात एक दगड पडला होता, येथे येणारा प्रत्‍येकजण दगडाला अडखळून पडत होता, शिव्‍या देत होता पण दगड उचलून टाकण्‍याचे शहाणपण फक्त एकानेच दाखविले. त्‍यामुळे फक्त एकच माणूस असल्‍याचे मी आपणास सांगितले.'' क्‍झेनथस निरूत्तर झाला.तात्‍पर्य- फक्त जीवंत असणे ही ओळख नसून जीवनाचा सदुपयोगच तुम्‍हाला स्‍वतंत्र ओळख देऊ शकते. आपल्‍या जीवनाचा इतरांनाही उपयोग व्‍हावा हेच खरे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 एप्रिल 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/dmDpjpYGtDVvmEc2/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 💮 *_ या वर्षातील ९२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 💮 *_महत्त्वाच्या घटना:_* 💮•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०११: क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा २८ वर्षांच्या कालखंडानंतर विजय**१९९८: कोकण रेल्वे वरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्सप्रेस या गाडीचा शुभारंभ दिल्लीतील निजामुद्दीन स्थानकातुन झाला**१९९०: स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) ची स्थापना**१९८४: सोयुझ टी-११ या अंतराळयानातुन राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. तो ७ दिवस २१ तास व ४० मिनिटे अवकाशात होता**१९८२: फॉकलंडचे युद्ध - अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.**१८७०: गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली*💮 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💮 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८५: सचिन शिवाजीराव बेंडभर पाटील-- प्रसिद्ध कवी,कादंबरीकार,कथाकार, बालसाहित्यिक* *१९८१: मायकेल जॉन क्लार्क -- ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू* *१९७९: गणेश भारतराव रासने -- लेखक* *१९७६: अनधा जोशी मुधोळकर -- लेखिका* *१९७३: श्याम श्रीराम ठक -- प्रसिद्ध वऱ्हाडी कवी**१९७१: बबन शिंदे -- प्रसिद्ध लेखक, कवी**१९७०: नारायण ऊमाजी खरात -- कवी* *१९६९: अजय वीरु देवगण – प्रसिद्ध अभिनेता**१९६७: सुनील किसनराव गायकवाड- उंब्रजकर -- मराठी व हिंदीमध्ये लेखन करणारे लेखक**१९५९: भीमराव संपतराव सरवदे -- लेखक* *१९५७: प्रा. अविनाश राजाराम कोल्हे -- प्रसिद्ध लेखक**१९५३: रवींद्र दामोदर लाखे -- कवी आणि नाट्यदिग्दर्शक**१९५२: दीपक पराशर -- भारतीय अभिनेता**१९५२: भारती बाबुराव हेरकर -- कवयित्री, लेखिका**१९५२: प्रा.अशोक नारायणराव आहेर -- सुप्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार* *१९५१: डॉ.अलका सर्वोत्तम चिडगोपकर -- प्रसिद्ध लेखिका, समीक्षक* *१९५०: मोहन गणुजी नाईक ( भीमणीपुत्र) -- प्रसिद्ध लेखक,गोरबोली(बंजारा)अभ्यासक**१९४२: किरण नगरकर -- भारतीय इंग्रजी कादंबरीकार,नाटककार आणि पत्रकार.(मृत्यू: ५ सप्टेंबर २०१९ )* *१९२६: सूर्यकांत रामचंद्र खांडेकर – कवी व गीतकार (मृत्यू: १५ जून १९७९ )**१९२०: नानासाहेब शिरगोपीकर -- ट्रीकसीन्ससह भक्तिप्रधान नाटकं सादर करणारे कलाकार (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९४ )**१९१०: शंकर दत्तात्रय भोसले -- कवी, लेखक(मृत्यू: १६ जून १९७२ )**१९०७: गजानन जहागीरदार --- मराठी व हिंदी भाषांतील चित्रपट-अभिनेते आणि दिग्दर्शक(मृत्यू: १३ ऑगस्ट १९८८ )**१९०२: बडे गुलाम अली खाँ ऊर्फ ’सबरंग’ – पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक, त्यांच्या’याद पियाकी आये’,’का करु सजनी’ इ. ठुमर्‍या लोकप्रिय आहेत.(मृत्यू: २५ एप्रिल १९६८ )**१८९८: हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय – भारतीय इंग्रजी कवी,नाटककार,संगीतकार हिन्दी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते.(मृत्यू: २३ जून १९९० )**१८८४: विनायक सीताराम सरवटे -- स्वातंत्र्यसैनिक,राजकीय नेते आणि लेखक (मृत्यू: २६ जानेवारी १९७२ )**१८७५: वॉल्टर ख्राइसलर – ’ख्राइसलर’ कंपनीचे संस्थापक (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४० )**१८०५: हान्स अँडरसन – डॅनिश परिकथालेखक (मृत्यू: ४ ऑगस्ट १८७५ )* 💮 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💮•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१७: अजय झनकर-- प्रख्यात लेखक आणि चित्रपट निर्माते(जन्म: १ सप्टेंबर १९५९ )**२००९: गजाननराव वाटवे – गायक व संगीतकार (जन्म: ८ जून १९१७ )**२००५: पोप जॉन पॉल (दुसरा) (जन्म: १८ मे १९२० )**१९९२: आगाजान बेग ऊर्फ आगा – आपल्या निखळ विनोदानी रसिकांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते**१९८८: मनू गंगाधर नातू -- समीक्षक, निबंधकार,संपादक (जन्म: ११ नोव्हेंबर १९१९ )**१९३३: के. एस. रणजितसिंहजी – कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा,यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून ’रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा’ खेळल्या जातात.(जन्म: १० सप्टेंबर १८७२ )**१८७२: सॅम्युअल मोर्स – ’मोर्स कोड’ व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार (जन्म: २७ एप्रिल १७९१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लोकसहभागातून शाळेची प्रगती*गावाला शाळेचा आधार असावा आणि शाळेला गावाचा आधार असावा, असे म्हटले जाते. यातूनच मग दोघांचाही विकास होतो. शाळेला प्रत्येक वेळी धनाने म्हणजे आर्थिक साहाय्य करावे असे ही काही नाही. तनाने व मनाने केलेले सहकार्य देखील शाळेच्या विकासात मोलाची भूमिका असू शकते. म्हणूनच लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक नागरिकांनी सरकारी शाळा म्हणजे आपली शाळा समजून त्या शाळेविषयी आत्मीयता जपली पाहिजे, तरच भविष्यात ह्या शाळा टिकू शकतील.................... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'गुड न्यूज', जीएसटी कलेक्शनमधून सरकारच्या तिजोरीत 1.96 लाख कोटी रुपये झाले जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई : हवामान खात्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरातसह १४ राज्यांमध्ये पुढील दोन दिवस पाऊस आणि वादळाचा अंदाज वर्तवला*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *डिपेक्स 2025 मध्ये 400 श्रेष्ठ प्रकल्पांचे प्रदर्शन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्रासाठी तब्बल 854 समर स्पेशन ट्रेन; मुंबई, पुण्यातून भारताच्या कानाकोपऱ्यात जाता येणार फिरायला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जेजुरी गडावरील भंडाऱ्याचा भाविकांच्या आरोग्यावर परिणाम, माजी विश्वस्तांची भेसळ रोखण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रसरकारने पेन्शनचे नियम बदलले, NPS किंवा UPS पैकी एकाचच घेता येणार लाभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 - लखनऊ मध्ये खेळलेल्या सामन्यात PBKS ने LSG ला 8 विकेटने हरवले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दादाराव शिरसाठ पाटील, SSA, नांदेड👤 राघवेंद्र कट्टी , फोटोग्राफर, नांदेड👤 जीवनसिंग खासावत , साहित्यिक, भंडारा 👤 कृष्णा येरावार , शिक्षक, धर्माबाद👤 बबन शिंदे , साहित्यिक, नांदेड👤 दिलीप नागोराव जाधव👤 मारोती होरके👤 रितेश चव्हाण👤 रविंद्र भागडे👤 वैजनाथ जाधव👤 सूर्यकांत भोगेवार👤 नामदेव जाधव👤 दिलीप भद्रे👤 कवी प्रशांत गवई👤 राजेश्वर माळगे, धर्माबाद👤 शेख समीर👤 प्रभाकर पवार👤 विलास थोरमोठे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 31*आम्रवृक्षावर बसून गातो**पक्षी हा मधुर आवाजात**अंडी कधी उबवत नाही**ठेवतो दुस-यांच्या घरट्यात*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - मोर ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देठापासून गळलेले फळ परत जोडता येत नाही. तद्वतच तोंडातून बाहेर पडलेला शब्द परत घेता येत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1) जगातील सर्वात मोठे लिखित संविधान कोणत्या देशाचे आहे ?2) संविधान सभेचे पहिले सत्र केव्हा भरविण्यात आले होते ? 3) मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?4) संविधान तयार होण्यासाठी किती कालावधी लागला ?5) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?*उत्तरे :-* 1) भारत 2) 9 डिसेंबर 1946 3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 4) 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस. 5) डॉ. राजेंद्र प्रसाद*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *केंद्रशासित प्रदेश*केंद्राच्या शासनव्यवस्थेखाली असलेला प्रदेश. भारतीय संविधानाच्या ३६६ अनुच्छेदान्वये पहिल्या परिशिष्टात केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्देशिलेले भारतीय भूभाग आणि सदर परिशिष्टात न उल्लेखिलेले परंतु भारतभूमीत समाविष्ट असलेले इतर प्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेश होत.भारतीय संविधानात सुरुवातीस राज्याचे चार वर्ग पाडण्यात आले होते. ब्रिटिश अमदानीत चीफ कमिशनर प्रमुख अधिकारी असलेल्या अजमीर, कूर्ग व दिल्ली ह्या प्रांतांना ‘क’ राज्याचा दर्जा देण्यात आला. भारतात विलीन झालेल्या संस्थानांपैकी रेवा, बुंदेलखंड व बधेलखंड ही मध्य प्रदेशातील व पंजाबच्या उत्तर सीमेजवळील संस्थाने अतिशय मागासलेली असल्यामुळे आणि शेजारच्या प्रांतात त्यांना विलीन करण्यासंबंधी एकमत नसल्यामुळे त्यांचे अनुक्रमे विंध्य प्रदेश व हिमाचल प्रदेश असे दोन प्रांत करण्यात आले. कच्छ, मणिपूर, त्रिपुरा ही संस्थाने पाकिस्तानच्या सीमेलगत असल्याने ती केंद्र सरकारच्या अधिकाराखाली असणे आवश्यक वाटले. भोपाळमध्ये मुसलमानांची संख्या जास्त असल्यामुळे आणि विलासपूर येथे भाक्रानानगल हे प्रचंड धरण बांधले जात असल्यामुळे त्यांनाही वेगळ्या ‘क’ राज्याचा दर्जा मिळाला. अंदमान आणि निकोबार बेटांना ‘ड’ राज्य संबोधण्यात आले.या अकरा केंद्रशासित प्रदेशांपैकी भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भात अनेकांना शेजारच्या राज्यांत विलीनीकरण झाले. १९५६ मध्ये अंदमान बेटे, लक्षद्वीप बेटे, हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा आणि दिल्ली एवढेच केंद्रशासित प्रदेश उरले. दाद्रा व नगरहवेली (१९६१), गोवा, दीव, दमण (१९६२), पाँडिचेरी (१९६२) ही राज्ये भारतात सामील झाल्यावर त्यांची भर वरील राज्यांत पडली. पंजाब राज्यातून हरयाणा राज्य वेगळे झाल्यावर (१९७०) त्यांची संयुक्त राजधानी म्हणून चंडीगढ शहर केंद्रशासित बनले. तसेच आसाममधील मिझो जिल्हा आणि अरुणाचल प्रदेश यांस हा दर्जा १९७२ मध्ये देण्यात आला. याउलट १९७० मध्ये हिमाचल प्रदेश, १९७२ मध्ये मणिपूर, त्रिपुरा यांना संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. अशा रीतीने १९७४ मध्ये ९ केंद्रशासित प्रदेश राहिले, ते असे: अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप, चंडीगढ, दाद्रा व नगरहवेली, दिल्ली, गोवा, दीव, दमण, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि पाँडिचेरी.या प्रदेशांचे प्रशासन संविधानाच्या २३९ ते २४१ अनुच्छेदांन्वये चालविण्यात येते. राष्ट्रपती हाच या प्रदेशाचा कार्यकारी प्रमुख असतो. यांतील काही प्रांतांत, उदा., गोवा, पाँडिचेरी व मिझोराम यांत, विधानसभा व मंत्रिमंडळे स्थापन करण्यात आली असली, तरीही या सर्व राज्यांच्या संबंधी कायदे करण्याचा अंतिम अधिकार संसदेला आहे.(स्रोत : मराठी विश्वकोश)*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुरुनि आलों तुझिया भेटी । सांगावया जिवींच्या गोष्टी गा विठोबा ॥१॥ बोल गा बोल मजशी कांहीं । दृष्टी उघडुनी मजकडे पाही गा विठोबा ॥२॥ अरे तूं कृपाळु दीनाचा । महा उदार थोरा मनाचा गा विठोबा ॥३॥ भक्तें पुंडलिकें गोविलासी लोभें । प्रेमें प्रीतीच्या वालभें गा विठोबा ॥४॥ युगें अठ्ठावीस भरलीं । धणी अजुनी नाहीं पुरली गा विठोबा ॥५॥ प्राण होती माझे कासाविस । नामा म्हणे कां धरिलें उदास गा विठोबा ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळ्या प्रकारचा असतो म्हणूनच म्हणतात ना की, स्वभावाला औषध नसते. प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात म्हणून विचार जुळत नाही. पण, ज्यांच्या विचारातून किंवा स्वभावातून आपल्याला थोडेतरी शिकायला मिळत असेल तर आपण त्यांच्याकडून शिकून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करावे. भलेही आपण कितीही हुशार किंवा अनुभवी असले तरी एखाद्या वेळी, आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता पडत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कोल्हा आणि कोंबडी*एक कोल्हा एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येईना. खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.’ याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असता कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, ‘खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून माझ्यानं खाली येववत नाही. तरी आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील.’तात्पर्य – वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसर्‍याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~