जीवन विचार


*माझी शाळा माझे उपक्रम*

 🌺 *जीवन विचार* 🌺
➖➖➖➖➖➖➖➖
*आपल जीवन अनेकदा युध्दक्षेञ बनत असतं.त्यावेळी मनात मोठा संघर्ष चालू असतो.मनात विसंवादाच वादळ सुरू असतं तेव्हा आपल्या मनात सुसंवाद स्थापन करण्याचा प्रवृत्तीस विवेक असं म्हणावं !*

*विवेक आपल्या मनाचं सुकाणू आहे तर विचार आपल्या मनाचं शीड आहे.सुकाणू आणि शीड नीट जागेवर राहून काम करत असतील तर समुद्रात इकडं - तिकडं सुरक्षितपणे फिरता येईल नाहीतर क्षणार्धात जलसमाधी मिळेल.विवेक ही मर्यादशील शक्ती आहे.समुद्राला मर्यादा असते.*

      *मर्यादा ही मनाच्या कुंपणासारखी असते. संयमाचा लगाम हाती असल्यानंतर जीवन अश्व इकडं - तिकडं कसा उधळेल?*
*ज्याप्रमाणे फळावरुन झाडाला ओळखतात, सोन्याला कस लावून सोन्याची पारख करतात, आवाजावरुन घंटेची किंमत ठरवातात; त्याप्रमाणे मनुष्याच्या मनुष्यत्वाची पारख त्याच्या विवेकावरुन करतात.*
〰〰〰〰〰〰〰〰


http://www.pramilasenkude.blogspot.in

No comments:

Post a Comment