जीवन विचार

*माझी शाळा माझे उपक्रम*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *जीवन विचार* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖
काळाच्या उदरातुन ऋतू जन्म घेतात आणि जातात. या सार्या जगाला व्यापून राहीलेला हा *काळ* कधी संपतच नाही. मानवी मनाला  अनेकदा असं वाटतं की संध्याकाळच्या वेळी पश्चिमेकडील आकाशात उधळलेल्या सप्तरंगाची छटा बघतच रहावे !  पण क्षणार्धात *काळ*  त्या रंगाना गिळून टाकतो!

    आपण जेव्हा जीवनाचं सुरेल गाणं गात असतो तेव्हा काळ आपल्या जीवनसतारीच्या तारा केव्हा तोडतो तेच समजत नाही. हा कठोर *काळ*  म्हणजे साक्षात  मृत्यू होय.

*''काळ फिरला की सुवर्ण मेरूही मातीचा बनतो".*

अशा अनंत आणि अपरिमित काळाचं मोजमाप करन कशाने कराव तेच कळत नाही.
  म्हणून *मानवाने उद्याचा भविष्यकाळ आजच्या चांगल्या  कर्मातून निर्मावा.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻जय महाराष्ट्र🌻*

No comments:

Post a Comment