✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 फेब्रुवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_17.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟢 *_ या वर्षातील ३२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*२००४: मक्का येथे चालू असलेल्या हज यात्रेत चेंगराचेंगरी होऊन २५१ यात्रेकरू ठार तर २४४ लोक जखमी झाले.**१९९२: भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अॅंडरसन याला फरारी घोषित केले.**१९८१: ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यूझीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रेव्हरने चॅपलने तसा चेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर अंडरआर्म गोलंदाजी बेकायदा ठरवण्यात आली.**१९७९: १५ वर्षे विजनवासात काढल्यानंतर ईराणचे आयातुल्ला खोमेनी तेहरानला परतले.**१९६४: प्र. बा. गजेन्द्रगडकर यांनी भारताचे ७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९५६: सुधी रंजन दास यांनी भारताचे ५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९४६: नऊ शतकांची राजसत्ता बरखास्त करुन प्रजासत्ताक बनण्यास हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली.**१९४१: डॉ.के.बी.लेले यांनी ’गुरुकिल्ली’ हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले.**१८९३: थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली.**१८८४: ’ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.**१८३५: मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत* 🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟢 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: विकी पांडुरंग कांबळे -- कवी**१९९२: वैदेही वैभव परशुरामी -- मराठी चित्रपट अभिनेत्री**१९८१: प्रमोद अंबडकर -- कवी, गीतकार**१९७९: विभावरी देशपांडे -- भारतीय अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शक**१९७५: डॉ. प्रिया प्रवीण मदनकर (धांडे)-- कवयित्री* *१९७४: इंदिरा गोविंदराव चापले-भोयर -- कवयित्री**१९७२: यशवंत गोविंदा निकवाडे -- कवी, लेखक* *१९७२: भगवान मार्तंड पाटील -- कवी**१९७१: मनोज कुमार तिवारी -- भारतीय राजकारणी, गायक आणि अभिनेता**१९७१: अजय जडेजा – प्रसिद्ध क्रिकेटपटू, अभिनेते**१९६३: डॉ. मोहन कुमार दरेकर -- ज्येष्ठ गायक**१९६०: सुरेश प्रल्हाद साबळे -- प्रसिद्ध लेखक, समीक्षक, व्याख्याते, कवी**१९६०: जॅकी श्रॉफ – प्रसिद्ध अभिनेता**१९५९: रामदास लक्ष्मण राजेगावकर -- बालकवी, लेखक, समीक्षक* *१९५५: प्रमोद रानडे -- मराठी उद्योगातील भारतीय पार्श्वगायक, व्हायोलिन वादक आणि संगीत संयोजक**१९४६: सुखलाल नत्थु चौधरी-- लेखक, कवी**१९४५: मधुकर रामदास गजभिये -- कवी**१९४५: प्राचार्य रमेश भारदे -- लेखक* *१९४४: अरुण चिंतामण टिकेकर -- लोकसत्ता या दैनिक वृत्तपत्राचे ११ वर्षे संपादक, लेखक अनुवादक (मृत्यू: १९ जानेवारी २०१६ )**१९४३: मधुकर पांडुरंग खरे -- लेखक**१९३१: बोरिस येलत्सिन – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष (मृत्यू: २३ एप्रिल २००७)**१९३१: पांडुरंग पिलाजी धरत -- लेखक* *१९३१: शशिकांत दत्तात्रय कोनकर -- लेखक**१९२९: जयंत साळगावकर – ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक (मृत्यू: २० ऑगस्ट २०१३ )**१९२७: मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू: २६ जानेवारी २०१५ )**१९२७: प्रा. बन्सीलाल लुकडू सोनार -- लेखक* *१९१७: ए. के. हंगल – चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: २६ ऑगस्ट २०१२ )**१९१२: राजा बढे – संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, गायक, कवी आणि गीतकार (मृत्यू: ७ एप्रिल १९७७ )**१९०४: बाबुराव रामचंद्र घोलप -- शिक्षणतज्ज्ञ (मृत्यु: २६ मे १९८२ )**१९०१: क्लार्क गेबल – अमेरिकन अभिनेता (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६० )**१८८४: सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार (मृत्यू: ६ जानेवारी १९८४ )**१८६४: जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (मृत्यू: ५ जानेवारी १९४३ )* 🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟢 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: अनिल मोहिले – संगीतकार व संगीत संयोजक* *२००३: कल्पना चावला – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (जन्म: १ जुलै १९६१ )**१९९५: मोतीराम गजानन तथा मो.ग. रांगणेकर – नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार (मृत्यू: १० एप्रिल १९०७ )**१९९२: मोहन छोटी -- भारतीय अभिनेता (जन्म: १ जानेवारी १९३५ )**१९७६: वेर्नर हायसेनबर्ग – ’क्वांटम मॅकॅनिक्स’मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९३२) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ५ डिसेंबर १९०१ )**१९६४: नारायण पैकाजी पंडित(बाबाजी महाराज)-- प्रवचनकार,ग्रंथकार(जन्म: १२ जानेवारी १८८६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मार्कंडेय जयंती विशेष लेख*महर्षी मार्कंडेय : पद्मशाली समाजाचे कुलदैवत*ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे भृगु महर्षी. या भृगु महर्षी आणि त्यांची पत्नी कयार्थी यांना भार्गवी, धाता आणि विधाता अशी तीन अपत्ये होती. भार्गवी म्हणजे लक्ष्मी ही विष्णूची पत्नी. धाता व अयाती यांना प्राणूडु नावाचा पुत्र होता. तर विधाता आणि नियती यांच्या पुत्राचे नाव होते मृकंड. भगवान शंकराचे परमभक्त असलेले मृकंडला एकही पुत्र नव्हते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी शंकर भगवानची कठोर तपस्या केली ............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वित्तमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अर्थसंकल्प सादर करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईत सुरू होणार बिबट्या सफारी, संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये सुरू होणार प्रकल्प, पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हवाई क्षेत्रात भारताची मोठी उड्डाण, 2047 पर्यंत 200 विमानतळ, 2026 मध्ये हवाई टॅक्सी सेवा सुरू होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ऐन निवडणुकीच्या काळात आम आदमी पार्टीच्या सात आमदारांनी दिले राजीनामे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेपासून सुरू होणार, पण २०२९ पर्यंत बंद राहणार मुंबईचं T1 टर्मिनल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना BCCI कडून सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर, मुंबईत आज मंडळाच्या वार्षिक समारंभात प्रदान करण्यात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पुणे येथे खेळलेल्या भारत वि. इंग्लंड चौथ्या T20 सामन्यात भारताचा 15 धावानी विजय, पाच सामन्याची मालिका 3-1 ने जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शेख एम. बी. सेवानिवृत्त केंद्रप्रमुख👤 नारायण गायकवाड👤 शिवानंद सूर्यवंशी👤 कवी गजानन काळे👤 अतुल भुसारे👤 शिवम पडोळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अण्णाभाऊ साठे - तुकाराम भाऊराव साठे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दृष्ट लोकांबरोबर शत्रुत्वच चांगले. त्यांच्याबरोबर मैत्री न ठेवलेलीच बरी. - संत तुलसीदास*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वात वेगवान मासा कोणता ?२) १२५ वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो ?३) ग्रामपंचायतीचा प्रशासन प्रमुख कोण असतो ?४) 'भारताचे शांती पुरूष' असे कोणत्या पंतप्रधानाला ओळखले जाते ?५) बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे ? *उत्तरे :-* १) सेलफिश ( ताशी ११० किमी ) २) शतकोत्तर रौप्यमहोत्सव ३) ग्रामसेवक ४) लालबहादूर शास्त्री ५) मुरलीधर देवीदास आमटे *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंतराळवीर कल्पना चावला*• काही लोक निधनांनतरही आपल्या आठवणीत सदैव जिवंत राहतात. अंतराळवीर कल्पना चावला यांचा शेवटचा अंतराळ प्रवास अनेकांच्या मनात कोरला आहे.• 17 मार्च 1962 रोजी जन्मलेली कल्पना चावला यांचं बालपण हरियाणाच्या कर्नालमध्ये गेलं. त्या अंतराळात भरारी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.• 1976 साली कर्नाल टागोर स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर 1982 साली पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून वैमानिक इंजिनीअरिंग (Aeronautical Engineering) मध्ये पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या.• 1984 मध्ये टेक्सास युनिव्हर्सिटीतून वैमानिक इंजिनीअरिंगमध्ये त्यांनी मास्टर्स पूर्ण केलं.• अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था The National Aeronautics and Space Administration (NASA) इथं कल्पना यांनी 1988 पासून फ्ल्युड डायनॅमिक्समध्ये संशोधनाला सुरुवात केली.• नासामध्ये काम केल्यानंतर ओवरसेट मेथड्स कंपनीत उपप्रमुख म्हणून रुजू झाल्या. त्याठिकाणी त्यांनी एरोडायनॅमिक्समध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केलं. त्यांचे रिसर्च पेपर अनेकदा चर्चेत राहिले.• नासाने 1994 साली संभाव्य अतंराळवीराच्या यादीत कल्पना यांचा समावेश केला. मार्च 1995 साली अंतराळ क्षेत्राचा विशेष अभ्यास करण्यासाठी नासाच्या जॉनसन एरोनॉटिक्स सेंटरमध्ये प्रशिक्षण चालू केलं.• त्या दरम्यान त्यांना अंतराळवीरांच्या 15 व्या फळीत ठेवण्यात आलं. तसंच एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर अंतराळयानाच्या नियंत्रण कक्षाच्या देखभालीचं काम देण्यात आलं.• नोव्हेंबर 1996 मध्ये नासानं एक घोषणा केली. त्यामध्ये ATS-87 मिशनच्या संशोधनाची जबाबदारी कल्पना याच्याकडं सोपवण्यात आली.• शेवटी तो दिवस उजाडला. 19 नोव्हेंबर 1997. त्यादिवशी हरियाणाच्या मुलीनं अंतराळात झेप घेतली. त्यावेळी त्यांनी 376 तास आणि 34 मिनिटं अंतराळात घालवली.• एका महत्त्वपूर्ण योजनेचं नेतृत्व करणाऱ्या कल्पना आणि त्यांच्या टीमने पृथ्वीला 252 फेऱ्या मारल्या म्हणजे त्यांनी 1 कोटी 46 हजार किमीहून अधिक प्रवास केला.*कल्पना यांचा शेवटचा प्रवास*• नासाने जेव्हा एक महत्त्वपूर्ण योजना आखली तेव्हा अनुभवी अंतराळवीर कल्पना चावला 7 सदस्यांच्या टीममध्ये महत्त्वाची जबाबदारीही त्याच्याकडं देण्यात आली.• जानेवारी 2003 च्या 16 दिवसांच्या मिशनमध्ये त्यांची विशेषतज्ज्ञ म्हणून नेमणूक केली. अंतराळात केले जाणारे प्रयोग हे कल्पना यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले होते.• 1 फेब्रुवारी 2003 ला कोलंबिया अंतराळयानाने पृथ्वीकडं येण्यासाठी अमेरिकेजवळच्या पॅसिफिक समुद्राकडं झेप घेतली. अंतराळवीरांनी स्पेस सुट घातला. त्यावेळी सर्व योग्यरीत्या सुरू होतं.• त्यावेळी स्थानिक वेळेनुसार सकाळच्या 8.40 वाजता कोलंबिया यानानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. अंतराळवीर आणि नासातल्या अंतराळयान नियंत्रण कक्षातले सगळेजण आनंदी होते.• 22 मिनिटांत ते यान पृथ्वीवर उतरणार होतं. सुमारे 8.54 वाजता यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटायला सुरुवात झाली. 9.16 वाजता काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि कोलंबिया यान इतिहासात जमा झालं.• तेव्हा कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातच सगळ्या अंतराळवीरांचं निधन झालं.।। विनम्र अभिवादन ।।संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••टाळ दिंडी हातीं उभा महाद्वारीं । नामा कीर्तन करी पंढरिये ॥१॥ आवडीचेनि सुखें वोसंडतु प्रेमें । गातों मनोधर्में हरिचे गुण ॥२॥ सांडोनि अभिमान नाचे धरोनि कान । अंतरीं ध्यान विठोवाचें ॥३॥ श्रीहरिची उत्तम जन्मकर्मनामें । घेतलीं त्या प्रेमें सुखरूपें ॥४॥ संतांची विश्रांति ज्ञानियांचें गुज । जें कां मुक्तिबीज मोक्षदानी ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी काहीही म्हणो, आपण आपले कार्य नित्यनेमाने करत रहायचे. पण, हे सर्व करताना आपण एवढे प्रामाणिक रहायचे की त्यावेळी कोणी आपला जाणून, बुजून अपमान केले तरी तो झालेला अपमान आपल्याला सन्मान झाल्यासारखे वाटले पाहिजे. कारण झालेला अपमान हसत, हसत सहन करताना बघून पुढचा व्यक्ती सुद्धा गहिवरून गेला पाहिजे. एवढी सहनशीलता व सर्वां प्रती आदर असायला पाहिजे तेव्हाच केलेल्या कार्याला अर्थ लागत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सम्राट आणि साधू*एक सम्राट रात्रीच्या वेळी राजधानीत फेरफटका मारीत असे आणि काय चालले आहे याचा आढावा घेत असे. फेरफटका मारत असताना सम्राटाला एक साधू जागा असलेला दिसायचा. त्याच्या कुटीत पाण्याचे मडके आणि दोन कपडयाशिवाय काहीच नव्हते तरी तो ‘’जागे रहा, झोपू नका, नाहीतर लुटले जाल’’ असा जोरजोरात आवाज देत असायचा. सम्राटाला वाटले हा साधू वेडा आहे मात्र त्याच्याशी एकदा बोलायला हवे. सम्राटाने एके दिवशी त्याला विचारले,’’तुमच्याकडे धनदौलत, गाडीघोडा, संपत्ती वगैरे काहीही नसतानासुद्धा तुम्ही इतके का जागता आणि सावधान राहता,’’ साधू म्हणाला,’’ राजा, आपण आपल्या महालात जो कचरा जमा केला आहे की, तो जर लुटला गेला तर काही फरक पडणार नाही, कारण आपण तो परत मिळवू शकता, परंतु या माझ्याकडे जे धन आहे ते लुटले गेले तर ते परत मिळणार नाही.त्यामुळे मी सदैव सावध राहतो.’’ राजा म्हणाला,’’ माझ्याकडे असलेल्या हत्ती घोडे, हिरे दागिने, सोने चांदी याला तुम्ही कचरा समजत आहात’’ साधूने उत्तर दिले,’’ ज्याला आपण अमूल्य समजत आहात ते धन, संपत्ती, हत्तीघोडे, राजवाडा कोणीही तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकते पण माझी संपत्ती ही ईश्र्वरदत्त आहे. त्यामुळे मी स्वतला सावधान करतो, माझ्या मनात मोह, लोभ, मद, मत्सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांचा प्रवेश होऊ नये, अर्थात माझे मन हे ईश्वराने दिल्याप्रमाणे, लहान बालकाप्रमाणे कोरे असावे. या मानवी दुर्गुणांचा स्पर्श जर माझ्या मनाला झाला तर माझे कर्म बिघडेल आणि माझ्याकडून पाप घडेल. म्हणून मी रात्री स्वतलाच सांगत असतो नव्हे माझ्या आत्म्याला सांगत असतो झोपू नको, तू झोपलास तर हे विषय तुझ्यावर आक्रमण करतील व तुला गिळंकृत करतील.’’ साधुचे ते विचार ऐकून राजा त्याचे चरणी लीन झाला व साधुला गुरुस्थान दिले.*तात्पर्य :- मोह, लोभ, मद, मत्सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांची संगत न घेता जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर जीवन सुखकर होते. वाईटापासून आपले संरक्षण होते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 31 जानेवारी 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/01/ashok-saraf.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟤 *_ या वर्षातील ३१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟤 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*१९६३: मोर पक्षाला राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता* *१९५०:राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले.यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.**१९५०:अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.**१९४९:बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.**१९४५:युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला.* *१९२९:सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.**१९२०:डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ’मूकनायक’ या पाक्षिकाची सुरूवात**१९११:स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्या जन्मठेपेची शिक्षा झाली.तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.* 🟤 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟤 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: ऋतुराज दशरथ गायकवाड -- भारतीय क्रिकेट खेळाडू**१९९३: गौतमी देशपांडे -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आणि गायिका* *१९८३: सतीश जनाराव अहिरे -- कवी, गझलकार* *१९८१: अमृता अरोरा -- सिने-अभिनेत्री व मॉडेल**१९७५: प्रीती झिंटा – चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका**१९७३: अंकुश चौधरी -- मराठी अभिनेते, पटकथालेखक, दिग्दर्शक**१९६५: प्रा. डॉ. संजय निळकंठ पाटील -- लेखक**१९५९: रमेश गिरीधर महाले -- बालकवी, लेखक**१९५८: प्रा. डॉ. शंकर चव्हाण -- लेखक, संपादक* *१९५२: डॉ. रमेश नारायण वरखेडे -- जेष्ठ समीक्षक, संशोधक, संपादक* *१९५२: डॉ.सतीश शास्त्री -- लेखक (मृत्यू: २६ जानेवारी २०२३ )**१९५०: लीना मेहेंदळे --भारतीय प्रशासन सेवेतील पूर्व सनदी अधिकारी आणि प्रसिद्ध लेखिका**१९४९: सदानंद सिनगारे -- प्रसिद्ध लेखक, कवी**१९४९: राजेश विवेक उपाध्याय -- भारतीय अभिनेता (मृत्यू :१४ जानेवारी २०१६)**१९४८: राजा सखाराम जाधव -- समीक्षक, दलित साहित्याचे अभ्यासक(मृत्यू: १९ डिसेंबर २००८ )**१९३१: गंगाधर महांबरे – गीतकार कवी व लेखक (मृत्यू: २३ डिसेंबर २००८ )**१९२१: प्रा. डॉ. गंगाधर विठ्ठल कुलकर्णी -- कवी, लेखक**१९१९: श्रीराम हरी अत्तरदे --- लेखक**१९१५: हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई -- चरित्र लेखक* *१९०४: मुहम्मद मंसूरुद्दीन -- बंगाली लेखक, निबंधकार, कोशकार (मृत्यू: १९ सप्टेंबर १९८७)**१८९६: दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा ’अंबिकातनयदत्त’ – कन्नड कवी, पद्मश्री (१९६८),त्यांच्या ’नाकु तंती’ या काव्यसंग्रहास १९७३ मधे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १९८१ )* 🟤 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟤••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: इलाही जमादार -- प्रसिद्ध गझलकार आणि महाकवी (जन्म: १ मार्च १९४६ )**२००४: व्ही. जी. जोग – व्हायोलिनवादक (जन्म: २२ फेब्रुवारी १९२२ )**२००४: सुरैय्या जमाल शेख ऊर्फ ’सुरैय्या – गायिका व अभिनेत्री (जन्म: १५ जून १९२९ )**२०००: वसंत कानेटकर – नाटककार (जन्म: २० मार्च १९२० )**२०००: कृष्ण नारायण तथा के. एन. सिंग – हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक (जन्म: १ सप्टेंबर १९०८ )**१९९५: सुरेश शंकर नाडकर्णी – बँकिंग तज्ञ, ’रोखे बाजार नियामक मंडळाचे’ (SEBI) चे अध्यक्ष,पद्मभूषण(जन्म: २२ ऑगस्ट १९३४)**१९९४: वसंत जोगळेकर – मराठी व हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक(जन्म: २५ सप्टेंबर १९१४ )**१९९०: प्रा.श्रीनिवास रघुनाथ कावळे -- मराठी लेखक (जन्म: १३ सप्टेंबर,१९३० )**१९८६: विश्वनथ मोरे – संगीतकार (जन्म: १५ जुलै १९३७ )**१९७२: महेन्द्र – नेपाळचे राजे(जन्म:११ जून १९२०)**१९६९: अवतार मेहेरबाबा – आध्यात्मिक, मौनव्रती संत (जन्म: २५ फेब्रुवारी १८९४ )**१९५४: ई. एच. आर्मस्ट्राँग – एफ. एम. रेडिओचे संशोधक (जन्म: १८ डिसेंबर १८९० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चेहऱ्यावरील हावभावाने विनोद निर्माण करणारा अभिनेता - अशोक सराफ*अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि दमदार अभिनेता म्हणून अवघ्या हिंदुस्थानाला परिचीत आहे. मराठी चित्रपटसृष्टी बरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. अशोक सराफ यांना चार फिल्मफेअर मराठी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अशोक सराफ यांना 2023 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार व नुकतेच भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केले आहे ............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *16 हजार 300 कोटी रुपयाच्या राष्ट्रीय अत्यावश्यक खनिज अभियानाला मंत्रिमंडळाची मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई - म्हाडाच्या माध्यमातून दोन वर्षात सुमारे एक लाख घरे उभारणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *साहित्य निर्मितीचे मूळ समाजातील अस्वस्थतेत, कादंबरीकार शेषराव खाडे यांचे अमरावतीच्या 'लेखक आपल्या भेटीला' कार्यक्रमात मार्गदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *रविवारी 2 फेब्रुवारी ला MPSC ची गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *येत्या 10 फेब्रुवारीला माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे - एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीत भारतीय छात्र संसदेचे आयोजन, केंद्रीय क्रीडामंत्री मांडवीय यांच्या उपस्थितीत 8 फेब्रुवारीला उद्घाटन; 250 आमदार होणार सहभागी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आज पुण्यात रंगणार भारत वि. इंग्लंड यांच्यात चौथी T20 सामना, भारतीय संघात होणार काही बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विनायक सुहास हिरवे, सहशिक्षक, कोल्हापूर👤 राजेश्वर रामपुरे, धर्माबाद👤 जयेश पुलकंठवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संत तुकडोजी महाराज - माणिक बंडोजी इंगळे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्वोत्तम प्रयत्न केले की, यशाचा मार्ग मोकळा होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२४ वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू कोण ठरला आहे ?२) वेगवान गोलंदाज म्हणून वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावणारा जसप्रीत बुमराह हा कितवा भारतीय ठरला ? ३) २०२४ वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू कोण ठरली ?४) 'सुगम' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट संविधानात नमूद करणारा जगातील पहिला देश कोणता ? *उत्तरे :-* १) जसप्रीत बुमराह, भारत २) पहिला ३) अमेलिया केर, न्यूझीलंड ४) सुलभ, सोपा, सुकर ५) भारत *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आम्लपित्त*आम्लता ही नेहमी आढळणारी तक्रार आहे. ब-याच माणसांना कधीना कधी याचा अनुभव येतोच. पण काही जणांना आम्लतेचा नेहमी त्रास होतो. अशांना वैद्यकीय सल्ल्याची गरज असते. आम्लता किंवा आम्लपित्त म्हणजे जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल (आंबट द्रव) तयार होणे. या जादा आम्लामुळे पोटात जळजळ, तोंडात आंबट पाणी येणे, छातीत जळजळ अशा तक्रारी निर्माण होतात. कधीकधी जठरातले पदार्थ उलटीवाटे बाहेर पडतात.खालील कारणांनी आम्लता येऊ शकते. - • नेहमी जास्त तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे. • मानसिक ताण, काळजी, सदैव घाई-गडबड. • अनियमित जेवणाची सवय आणि जागरण • धूम्रपान, तंबाखूसेवन, दारूसेवन, इत्यादी. • काही औषधांमुळे आम्लता होते. उदा. ऍस्पिरीन, सांधेदुखीची औषधे. • हेलिकोबॅक्टर नावाच्या एका जिवाणूंशी आम्लता आणि जठरव्रणाचा संबंध आढळला आहे. जठरव्रणापैकी साठसत्तर टक्के जठरव्रण हे या जिवाणूंमुळे होतात. (यासाठी डॉक्सी किंवा ऍमॉक्सिसिलीन हे औषध पाच दिवस देऊन पहावे.) • आम्लपित्तामुळे पुढे अल्सर (जठरव्रण) निर्माण होऊ शकतो. अल्सर असेल तर पोटात एका ठरावीक जागी दुखत राहते. जेवणामुळे हे दुखणे थांबते तरी किंवा वाढते तरी. आम्लपित्तावर उपचार करताना तो अल्सर नाही याच्याबद्दल खात्री करून घ्यावी.उपचार - • जेवणात नियमितता ठेवावी. • साधा आहार घ्यावा. • तेलकट, तिखट पदार्थ टाळावेत. • मानसिक ताण, काळजी, सदैव चिंता यांच्यावर नियंत्रण ठेवावे. (व्यायाम, विश्रांती, करमणूक वगैरेमुळे उपयोग होईल.) • आम्लविरोधी (ऍंटासिड) गोळया घेतल्यावर जळजळ कमी होते. • दुधामुळे काही जणांची आम्लता कमी होते तर काही जणांची वाढते.( इंटरनेटवर मिळालेली माहिती )••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगदानिया हें ब्रीद आहे जगीं । तें आजि मजलागीं काय जालें ॥१॥ मज पाहतां विसरू पडिला त्या नामाचा । कीं तुज आमुचा वीट आला ॥२॥ सुजाणाच्या राया परिसें केशिराजा । भक्ताचिया काजा लाजों नको ॥३॥ भक्तकाजकैवारी हें ब्रीद चराचरीं । तें ठेविलें क्षीरसागरीं लक्ष्मीपाशीं ॥४॥ मज पाहतां अभिलाष धरिला मानसीं । मग तूं हषिकेशी विसरलासी ॥५॥ दीनानाथ ऐसें नाम बहुतांसी वांटिलें । निर्गुण तें उरलें तुजपाशीं ॥६॥ म्हणोनि केशिराजा विसरलासी आम्हां । विनवितसे नामा विष्णुदासा ॥७॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या विचाराने माणसं जुळतात तर आपल्या विचारानेच माणसं दूर जातात पण, माणसं तेव्हा जास्त तुटतात जेव्हा आपले विचार परखड, ज्वलंत तसेच सत्य असतात. त्याक्षणी आपण दु:खी होऊ नये.कारण गोड बोलून स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी जेव्हा आपला वापर केला जातो तीच आपली खरी फसवणूक असते. पण, आपल्या परखड, ज्वलंत आणि सत्य विचाराने एखाद्या माणसात जेव्हा परिवर्तन होते तेव्हा खऱ्या अर्थाने तेच परिवर्तन इतरांना दिशा सुद्धा दाखवत असतात आणि त्यातूनच विकास होत असतो.म्हणून समाजात विचारांची पेरणी करताना समाजाचे भले झाले पाहिजे असेच विचार पेरण्याचा आपण प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *समयसुचकता*एकदा अरण्याचा राजा सिंह याने आपल्या प्रजाजनांना दरबारात हजर राहण्याचा हुकूम सोडला. त्याप्रमाणे बहुतेक प्राणी सिंहाच्या दरबारी आले. अस्वलाला सिंहाच्या स्वयंपाक घरातून येणारा वास सहन न झाल्याने त्याने आपले नाक दाबून धरले. हा त्याचा उद्धटपणा पाहून सिंह रागावला व त्याने आपल्या पंजाच्या एका तडाख्यात अस्वलाला मारले. हा भयंकर प्रकार पाहून माकड भितीने थरथर कापू लागले. मग काहीतरी बोलायचे म्हणून ते सिंहास म्हणाले, 'राजेसरकारांच्या स्वयंपाक घरातून येणारा सुवास निरनिराळ्या उंची मसाल्याचा आहे. तो त्या मूर्ख अस्वलाला सहन झाला नाही. हे त्याचं दुर्दैव होय. राजे सरकारांचे पंजे तर फारच सुंदर आहेत, तसे इतर कोणाचेही नसतील.' माकडाचे हे बोलणे ऐकून सिंहाचे समाधान तर झाले नाहीच पण तो इतका चिडला की, एका क्षणात त्याने त्या माकडाच्या चिंधड्या उडविल्या. नंतर तो कोल्ह्याकडे वळून त्याला म्हणाला, 'कसे काय कोल्हेदादा ? माझ्या स्वयंपाकघरातून येणारा वास कशाचा असावा असं तुला वाटतं ?' त्यावर तो कोल्हा धूर्तपणे म्हणाला, 'महाराजाधिराज, नुसत्या वासावरून तो वास कशाचा आहे हे सांगता येण्याइतकं माझं नाक आधीच तीक्ष्ण नाही त्यातून मला आज पडसं झालेलं असल्यामुळे आपल्या घरातून येणार्या वासासंबंधाने अभिप्राय देण्याचं धाडस मी करत नाही.'तात्पर्य :- प्रसंगावधान व समयसूचकता या गुणांच्या बळावर माणुस वाटेल तसल्या संकटातून मुक्त होऊ शकतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 जानेवारी 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2022/09/mahatma-gandhi.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟠 *_हुतात्मा दिन_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_कुष्ठरोग निवारण दिन_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_ या वर्षातील ३० वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟠••••••••••••••••••••••••••••••••• *१९९९: पण्डित रविशंकर यांना ’भारतरत्न’**१९९७: महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरूण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. ४७ वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या.**१९९४: पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.**१९३३: अॅडॉल्फ हिटलरचा जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष (चॅन्सेलर) म्हणून शपथविधी झाला.**१६४९: इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याचा शिरच्छेद करण्यात आला.* 🟠 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟠 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: प्रेरणा योगेश देशमुख -- लेखिका, कवयित्री**१९७५: अनुप सोनी -- भारतीय अभिनेता**१९६९: प्रदीप मनोहर पाटील -- लेखक, कवी**१९६६: सुहास किर्लोस्कर -- चित्रपट संगीताचे विविधांगी विश्लेषण करणारे लेखक**१९५९: निर्मिती सावंत -- मराठी अभिनेत्री* *१९५३: सुधीर कोर्टीकर -- नाणे संग्रहाक, छायाचित्रकार, कवी, लेखक**१९५१: जयंत गुणे -- लेखक, अनुवादक**१९४९: डॉ. सतीश आळेकर – प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते**१९४८: स्मिता राजवाडे -- कादंबरी, कथा, ललित, काव्यसंग्रह, अनुवादित कवितासंग्रह, बालसाहित्य, नाटक अशी त्यांची १७ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.(मृत्यू: १८ जानेवारी २०२२ )**१९४५: सदानंद हरी डबीर -- कवी, गीतकार, गझलकार**१९४३: भगवान माधवराव परसवाळे -- कवी**१९३६: पं. दिनकर पणशीकर जयपूर अत्रोली घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक(मृत्यू: ३ नोव्हेंबर २०२० )**१९३३: शांताराम राजेश्वर पोटदुखे -- पत्रकार, माजी खासदार, माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा लेखक (मृत्यू: २३ सप्टेंबर २०१८ )**१९३०: सुनिता भास्कर देवधर -- लेखिका* *१९२९: रमेश देव – हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक(मृत्यू: २ फेब्रुवारी, २०२२ )**१९२७: प्राचार्य मोतीचंद्र गुलाबचंद शहा -- लेखक**१९२७: ओलोफ पाल्मे – स्वीडनचे २६ वे पंतप्रधान (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९८६ )**१९१७: वामन दत्तात्रय पटवर्धन – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ (मृत्यू: २७ जुलै २००७ )**१९११: पं. गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक (मृत्यू: २८ जून १९८७ )**१९१०: सी. सुब्रम्हण्यम – गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल (मृत्यू: ७ नोव्हेंबर २००० )**१८९५: शंकरराव दत्तात्रय देव -- विचारवंत, लेखक (मृत्यू: ३० डिसेंबर १९७५ )**१८९१: गोपाळ रामचंद्र परांजपे -- विज्ञान लेखक (मृत्यू: ६ मार्च १९८१ )**१८८२: फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १२ एप्रिल १९४५ )**१८७४: बाळकृष्ण अनंत भिडे -- मराठी इतिहासकार, कवी व समीक्षक (मृत्यू:२ मे १९२९)* 🟠 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟠••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: नंदू घाणेकर -- ज्येष्ठ संगीतकार व फिल्म मेकर (जन्म: ४ नोव्हेंबर १९५८ )**२०२०: विद्या बाळ -- मराठी स्त्रीवादी लेखिका/संपादिका (जन्म: १२ जानेवारी १९३७ )**२००४: रमेश अणावकर -- मराठी संगीतातील प्रसिद्ध गीतकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३२)**२००१: वसंत शंकर कानेटकर --- लोकप्रिय मराठी नाटककार,लेखक,कादंबरीकार आणि विचारवंत.(जन्म: २० मार्च १९२२ )**२०००: आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर – मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते* *१९९६: गोविंदराव पटवर्धन – हार्मोनियम व ऑर्गन वादक**१९८८: बॅ.शेषराव कृष्णराव वानखेडे -- क्रिकेट प्रशासक आणि माजी अर्थमंत्री (जन्म:२४ सप्टेंबर १९१४)**१९४८: काशीबाई कानिटकर -- मराठी भाषेतील लेखिका व स्त्रीवादी समाजसुधारक होत्या.मराठी समाजात व स्थूलमानाने भारतीय समाजात स्त्रियांवर होणार्या अन्यायाविषयी त्यांनी आपल्या साहित्याद्वारे आवाज उठवला (जन्म: २० जानेवारी १८६१ )**_१९४८: मोहनदास करमचंद गांधी- ’महात्मा’गांधी - राष्ट्रपिता (जन्म: २ ऑक्टोबर १८६९ )_**१९४८: ऑर्व्हिल राईट – आपला भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (जन्म: १९ ऑगस्ट १८७१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता - महात्मा गांधी*महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामतील प्रमुख नेते आणि तत्वज्ञ होते. त्यांनी देशहितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. स्वातंत्र्य चळवळीतील ते असे नेते होते ज्यांनी अहिंसेचा मार्ग अवलंबून ब्रिटीश राज्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडले होते. महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणूनही संबोधले जाते. ............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाकुंभमेळ्यात उत्तर प्रदेशातील संगम तीरावर चेंगराचेंगरी, 30 जणांचा मृत्यू, 60 जण जखमी, मृतांपैकी 25 जणांची ओळख पटली असल्याची माहिती डीआयजी वैभव कृष्णा यांनी दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *प्रयागराज कुंभमेळ्यातील दुर्घटनेबाबत राष्ट्रपती व पंतप्रधान यांनी दुःख व्यक्त केलं, मृताच्या कुटुंबियांना 25 लाख रु. मदत जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात लोककला व लोकवाद्य शिकणाऱ्या 12 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अमरावती येथे 52वे राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उदघाटन, हे प्रदर्शन 2 फेब्रुवारी पर्यंत खुले राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यातील सरकारी शाळांमधील शालेय शिक्षणाची गुणवत्ता घसरलेलीच; तिसरी ते पाचवीच्या 50% विद्यार्थ्यांना वाचताही येईना, असरच्या सर्वेक्षणातून राज्यातील शिक्षण क्षेत्राचे विदारक चित्र समोर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वी व 12 वीच्या परीक्षेला 15 फेब्रुवारी पासून होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रा. बालाजी कोंपलवार, अध्यक्ष बाभळी बंधारा कृती समिती, धर्माबाद👤 शंकर माने👤 राजेश पटकोटवार, धर्माबाद👤 सचिन रामदिनवार, शिक्षक, मुखेड👤 सारिका सब्बनवार, शिक्षिका व लेखिका, कुंडलवाडी👤 बालाजी पुलकंठवार, शिक्षक धर्माबाद👤 मगदूम अत्तार, सहशिक्षक, देगलूर👤 देवराज बायस👤 सुरज एडके👤 सतिश गणलोड👤 शिवकुमार माचेवार👤 सतीश गणलोड👤 रंजना भिसे, शिक्षिका, पालघर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महात्मा गांधी - मोहनदास करमचंद गांधी*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दृष्ट लोकांबरोबर शत्रुत्वच चांगले. त्यांच्याबरोबर मैत्री न ठेवलेलीच बरी. - संत तुलसीदास*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'आद्य शेतकरी / अभियंता'* असे कोणत्या कीटकाला म्हटले जाते ?२) भारत सरकारने समाजकल्याण खाते केव्हा स्थापन केले ? ३) जगात यू-ट्यूबचे सर्वाधिक यूझर्स कोणत्या देशात आहेत ?४) 'साथ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) १९७२ मध्ये कोणत्या संघटनेने महाराष्ट्राला साक्षरता प्रसार गौरवाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिले ?*उत्तरे :-* १) वाळवी, उधई ( Termite ) २) १४ जून १९६४ ३) भारत ४) सोबत , संगत ५) युनेस्को *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••✨ *तारे का लुकलुकतात ?* ✨ """"""""""""""""""""""""""""""""""""""""'ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार' यासारख्या बालगीतांमधून आपल्याला लहानपणापासूनच तारे लुकलुकतात, हे मनावर बिंबवलं जातं. 'टिमटिम करते तारे' सारख्या गीतांमधून हा समाज बळावतोच. तरीही तारे का लुकलुकतात, या सवालाचं मोहोळ घोंगावतच राहतं. तारे स्वयंप्रकाशित असतात. म्हणजे त्यांच्या अंतरंगात धडधडत असणाऱ्या अणुभट्ट्यांमधून जी ऊर्जा बाहेर पडते ती प्रकाशलहरींच्या रूपात उत्सर्जित केली जाते. या प्रकाशाचे किरण अनंत अवकाशातून प्रवास करताना बहुतांश निर्वात पोकळीतून जात असतात. ते जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांना आपल्या या धरतीच्या सभोवती असलेल्या वातावरणातून प्रवास करावा लागतो. वातावरण ज्यांचं बनलेलं आहे त्या वायूंच्या ढगांमधून त्यांना पार पडावं लागतं. हे वायूचे ढग स्थिर नसतात. ते सतत हलत असतात. आकाशात जेव्हा आपण ढग पाहतो तेव्हा ते एका जागी स्थिर तर नसतातच; पण त्यांचे आकारही सतत बदलत असताना आपल्याला दिसतात. याचाच अर्थ वायु स्थिर नसतात. ते सतत हलत असतात. हवाही अशीच सतत हलत असते. त्यांच्यामधून जेव्हा ते किरण पार होतात तेव्हा मग ते किरणच स्थिर नसून सतत हलत असल्यासारखं वाटत राहतं. त्यामुळे तारे लुकलुकत असल्यासारखं वाटतं. वास्तविक हलत असते ती हवा.असं जर आहे तर मग मंगळ, शुक्र, गुरू यांसारख्या ग्रहांवरून परावर्तीत होणारा प्रकाशही त्याच वातावरणातून प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचत असतो. त्यापायी मग ते ग्रहही लुकलुकत असलेले दिसावयास हवे; पण तसं होत नाही. एवढंच कशाला पण जो आपल्याला प्रकाश देतो आणि जो आपला जीवनदाता आहे तो सूर्यही एक ताराच आहे; पण त्याचा प्रकाश तर स्थिर असतो. तो लुकलुकताना दिसत नाही. तेव्हा मग तारेच लुकलुकतात आणि ते हलत्या हवेपायी होतं हे कितपत खरं आहे ? वास्तविक कोणताही ग्रह काय किंवा तारा काय हा बिंदूमात्र नसतो. त्याला विशिष्ट आकारमान असतं. व्याप्ती असते. त्यामुळं आपल्या नजरेत ते बिंबासारखे किंवा चकतीसारखे असतात. त्यांच्यापासून निघणारा प्रकाश झोतासारखा असतो, एकमेव किरणासारखा नसतो. त्यामुळे त्याने झोताचे सर्वच किरण हलत्या हवेतून जातांनाही एकसाथ हालत नाहीत. त्यामुळे तो झोत लुकलूकल्यासारखा वाटत नाही. सूर्यापासून निघणारा प्रकाशही असाच झोतस्वरूप असतो. त्यामुळे तो विशाल पसरतो, लुकलुकत नाही; पण तारे आपल्यापासून लक्षावधी, कोट्यवधी प्रकाशवर्ष अंतरावर असतात, त्यामुळे इतक्या दूरवरून य त्यांचं बिंब एखाद्या बिंदूसारखंच दिसतं. त्यांच्यापासून प्रत्यक्षात जरी प्रकाशझोत निघत नसेल असला तरी तो एखाद्या एकमेव किरणासारखाच वाटतो. क्षीणही झालेला असतो. त्यामुळे मग हलत्या हवेतून येताना तोही हलल्यासारखा होतो. तो तारा लुकलुकतो.*बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जन्मल्यापासूनि सोशिले प्रवास । वियोग पहावया जाले आतां ॥१॥ आतां एक करीं धावणिया धांवा । बुडतों केशवा काढीं मज ॥२॥ लाभ नव्हे हानि जाली भागाभाग । तूंचि पांडुरंग पुरविसी ॥३॥ नामा म्हणे ऐसें सर्वस्व रक्षिलें । पाषाण तारिले जळामाजीं ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••डोळ्यांना काजळ न लावता देखील ते डोळे सुंदर दिसत असतात.फक्त आपला बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असावा. कानाची किंमत तेव्हा असते जेव्हा वाईट ऐकणे टाळणे व चांगले ऐकून इतरांना सांगणे, मुखाचे गुणगान तेव्हा केले जाते ज्यांचे विचार सकारात्मक असतात व त्यातून निघणारे प्रत्येक शब्द मोलाचे असतात.शरीरात जेवढे काही अवयव असतात त्या सर्व अवयवांची काळजी नीट घेतल्याने ते अवयव आपले शेवटपर्यंत आधार होत असतात. म्हणून परिस्थिती कशीही आली तरी चालेल पण आपले विचार व आपला योग्य मार्ग कधीही सोडू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अंगीकारलेली माणुसकीची वागणूक*एका सिंहाने एक हरिण मारले व त्यास तो फाडून खाणार इतक्यात त्या वाटेने एक चोर जात होता. तो चोर सिंहाला म्हणाला, 'अरे सिंहा, या हरणाचं अर्ध मांस तुझ व अर्ध माझं.' हे ऐकून सिंह त्यास म्हणाला, 'अरे, निगरगट्ट माणसा, तुझा इथे काहीही संबंध नसता, एकदम पुढे येऊन मी मारलेल्या हरणाचं अर्ध मांस तू मागतोस, या तुझ्या वागण्याबद्दल मी तुला शिक्षा करण्यापूर्वी तू इथून चालता हो, नाही तर फुकट मरशील.' हे ऐकून तो चोर भिऊन पळून गेला.इतक्यात दुसरा एक भला माणूस त्या वाटेने चालला असता सिंहाला पाहून त्याला टाळण्यासाठी दुसर्या वाटेने जाऊ लागला. ते पाहून सिंहाने त्याला आदराने हाक मारली व म्हणाला, 'अरे भल्या माणसा, भिऊ नकोस. तुझ्या चांगल्या वागण्यामुळे या हरणाच्या मांसाचा अर्धा भाग घेण्यास तू अगदी योग्य आहेस. ये आणि हा वाटा घेऊन जा.' सिंहाने दोन वाटे केले. एक त्यास देऊन दुसरा त्याने स्वतः खाल्ला व अरण्यात निघून गेला.*तात्पर्यः माणसाची एकनिष्ठता आणि प्रामाणिकपणाचे वागणे पाहून सभ्य व भिडस्त लोकांना इतरजण आपण होऊन मान देतात त्या दिलेल्या मानाचा मान टिकवून ठेवणे हे आपल्या वागण्यावर असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1AEYibVoKA/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔴 *_भारतीय वर्तमानपत्र दिवस_*🔴 🔴 *_ या वर्षातील २९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔴 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: हंगेरीने दक्षिण कोरियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.**१९७५: इंडियन नॅशनल थिएटर निर्मित आणि पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ’ती फुलराणी’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.**१९५५: भारतीय कामगार किसान पक्षाची स्थापना**१९५३: संगीत नाटक अकादमी ची स्थापना**१८८६: कार्ल बेंझ याला जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.**१८६१: कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.**१८५३: नासिक येथे नाशिक सार्वजनिक वाचनालयाची स्थापना**१७८०: जेम्स ऑगस्टस हिकी यांनी ’कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर’ या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले. ’हिकी’ज बेंगॉल गॅझेट’ या नावाने ओळखले जाणारे हे वृत्तपत्र म्हणजे भारतातील पत्रकारितेची सुरुवात मानली जाते.* 🔴 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔴••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७१: डॉ. मिलिंद लक्ष्मणराव इंदूरकर -- कवी, लेखक व संगीततज्ञ* *१९७०: राज्यवर्धनसिंग राठोड – ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज पूर्व केंद्रिय क्रीडा राज्यमंत्री**१९६२: गौरी लंकेश -- बंगळूरच्या पत्रकार व कार्यकर्त्या,(मृत्यू: ५ सप्टेंबर २०१७ )**१९६१: संजीव गोयंका -- भारतीय अब्जाधीश उद्योगपती**१९६०: प्रमोद देशपांडे --- कवी, अनुवादक**१९५९: अनिल कुलकर्णी -- प्रकाशक अनुबंध प्रकाशन संस्था**१९५९: डॉ. रेषा अकोटकर -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९५२: दिलीप हरिहरराव देशपांडे -- लेखक* *१९५१: सुलक्षणा महाजन -- मराठी लेखिका आणि अनुवादिका* *१९५१: अँडी रॉबर्टस – वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज**१९५१: इकबाल मुकादम -- प्रसिद्ध लेखक, कवी* *१९४८: भास्कर देशमुख -- मराठी लेखक* *१९३४: प्राचार्य रामदास तुकाराम भगत -- लेखक**१९३२: अंबिका रमेशचंद्र सरकार -- कथालेखिका,अनुवादक**१९२९:भगवान राघवेंद्र नाईक -- लेखक* *१९२६: डॉ.मोहम्मद अब्दूस सलाम – भौतिकशास्त्रज्ञ,नोबेल पारितोषिक विजेते (१९७९) (मृत्यू: २१ नोव्हेंबर १९९६ )**१९२२: प्रो. राजेंद्रसिंग ऊर्फ ’रज्जू भैय्या’– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक (मृत्यू: १४ जुलै २००३ )**१८९१: चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे (कवी चंद्रशेखर) -- मराठी कवी (मृत्यू: १७ मार्च १९३७ )**१८६६: रोमें रोलाँ – साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१५) विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक (मृत्यू: ३० डिसेंबर १९४४ )**१८६०: अंतॉन चेकॉव्ह – रशियन कथाकार व नाटककार. याने मॉस्को विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली होती मात्र वैद्यकीय व्यवसाय कधी केला नाही. (मृत्यू: १५ जुलै १९०४ )**१८५३: मधुसूदन राव – आधुनिक ओडिया साहित्याच्या तीन प्रवर्तकांतील एक प्रवर्तक. ओरिसावर मराठ्यांचे राज्य असताना महाराष्ट्रातून जी कुटुंबे ओरिसात जाऊन स्थायिक झाली,त्यांपैकी एका कुटुंबात जन्म. (मृत्यू: १९१२ )**१८४३: विल्यम मॅक किनले – अमेरिकेचे २५ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १४ सप्टेंबर १९०१ )**१७३७: थॉमस पेन – अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक (मृत्यू:८ जून १८०९ )* 🔴 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔴••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:अरविंद जोशी -- अभिनेता, नाटककार आणि दिग्दर्शक(जन्म: १९३६ )**२०१९: जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस -- भारतीय कामगार संघटना, राजकारणी,आणि पत्रकार (जन्म: ३ जून १९३०)**२०१४: मनोहर बाळकृष्ण कुलकर्णी --प्राध्यापक, लेखक, संशोधक (जन्म: १० सप्टेंबर १९३०)**२०११: श्रीकांत वसंत देशपांडे -- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील गायक (जन्म:१२ जून १९४८)**२००३: पंढरी बाई -- भारतीय अभिनेत्री(जन्म: १९३० )**२००१: प्रा.राम मेघे – महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री* *२०२०: पंडित देवेन्द्र मुर्देश्वर -- ज्येष्ठ बासरी वादक (जन्म: १९ सप्टेंबर १९२३)**१९९५: रुपेश कुमार –रुपेरी पडद्यावरील खलनायक,निर्माते व दिग्दर्शक* *१९९३: रँग्लर गोपाळकृष्ण लक्ष्मण चंद्रात्रेय – गणितज्ञ* *१९६३: सदाशिव आत्माराम जोगळेकर – लेखक व संपादक.अहिल्या आणि इतर कथा,संयुक्त महाराष्ट्राचा ज्ञानकोश,सुलभ विश्वकोश ही त्यांची काही पुस्तके आहेत.(जन्म १९ नोव्हेंबर १८९७ )* *१९६३: रॉबर्ट फ्रॉस्ट – अमेरिकन कवी (जन्म: २६ मार्च १८७४ )**१९३४: फ्रिटझ हेबर – नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले (१९१८) जर्मन रसायनशास्त्रज्ञ. (जन्म: ९ डिसेंबर १८६८ )**१८२०: जॉर्ज (तिसरा) – इंग्लंडचा राजा (जन्म: ४ जून १७३८ )**१५९७: महाराणा प्रताप – मेवाडचा सम्राट (जन्म: ९ मे १५४० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मोबाईल क्रांती आणि जीवन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, पुढील सुनावणी 25 फेब्रुवारी रोजी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *31 जानेवारी पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनला होणार सुरुवात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु संबोधित करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *माजी शिक्षणमंत्र्यांनी घेतलेले निर्णय रद्द, पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण, एक राज्य एक गणवेशातही सुसूत्रता नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात महाविद्यालयात निवडणुका होणार सुरू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात AI विद्यापीठाची होणार स्थापना, विद्यापीठासंदर्भात समिती गठीत करण्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जसप्रीत बुमराह ठरला ICC Men’s Cricketer of the Year पुरस्काराचा मानकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *तिसऱ्या T20सामन्यात भारताचा 26 धावानी पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शशिकांत संगम, शिक्षक, नांदेड👤 सुनील वानखेडे, शिक्षक, किनवट👤 नरेंद्र जोशी, शिक्षक, नांदेड👤 राजेश्वर सुरकूटवार, धर्माबाद👤 वीरभद्र करे👤 कोंडीराम केशवे, शिक्षक, लातूर👤 कु. वेदश्री दर्शन येवतीकर ( दुसरा वाढदिवस )*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सार्वजनिक काका - गणेश वासुदेव जोशी*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रसन्नता हे आत्म्याचे आरोग्य आहे व उदासीनता हे आत्म्याचे विष आहे. - स्टेनिसलास*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'मधमाशांचे कर्दनकाळ'* असे कोणत्या पक्ष्याला म्हटले जाते ?२) भारतामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा केव्हा लागू झाला ?३) वादळाची दिशा आणि गती कोणत्या एककामध्ये मोजली जाते ?४) थरचे वाळवंट भारतातील किती राज्यात पसरले आहे ?५) लपविलेला बॉम्ब शोधण्यासाठी कोणत्या प्राण्याला प्रशिक्षण दिले जाते ? *उत्तरे :-* १) वेडा राघू ( Green bee eater ) २) सन १९७२ ३) नेफोमीटर ४) राजस्थान, गुजरात, हरियाणा ५) कुत्रा *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लोकर* 📙**************** थंडीची चाहूल लागली की लोकरीची आठवण होतेच. उबदार वस्तू, कपडे, पांघरुणे, मोजे, टोप्या या लोकरीच्या बनवल्या जातात. लोकरीचे कपडे महाग असतात; पण नीट वापरले, तर टिकाऊ असतात. हल्ली पर्यायी प्रकार म्हणून कृत्रिम लोकर बाजारात आहे. आॅरलाॅन या कुत्रिम धाग्यांचा वापर त्यात असतो. पण खरी लोकर व तिची उब ही वेगळीच. लोकर ही मुख्यतः मेंढ्यांपासून मिळवली जाते. काही अन्य प्राण्यांची लोकरही जगात वापरतात, पण ते प्राणी व त्यांची लोकर केवळ त्याच भागात वापरली जाते. लामा, याक ही त्यांची काही उदाहरणे. लोकर म्हणजे एक प्रकारचा केसासारखाच धागा असतो. पण हा धागा मुळापासून काढल्यानंतरही म्हणजे मृत झाल्यावरही स्थितिस्थापकत्व राखू शकतो. हवेतील आर्द्रता, पाणी, शरीरातील घाम यांना शोषून घेणे व गरजेप्रमाणे पुन्हा आपोआप कोरडे होणे हा लोकरीचा प्रमुख गुण. त्यामुळेच पावसाची भुरभुर असताना लोकरीचा स्वेटर अंगात असेल, तर वेळ निभावून जाते व स्वेटर आपोआप वाळत जातो. दुसरा लोकरीचा प्रमुख गुण म्हणजे मूळ आकार पुन्हा मिळवणे. त्यामुळे ताणली, दाबली, चुरगाळली, तरी लवकर शक्यतो मूळ आकार घेते. घाण, धूळ, माती, तेलकटपणा यांपासूनही लोकरीचे कपडे झटकन सोप्या रीतीने स्वच्छ होऊ शकतात. या सर्व गुणांमुळेच लोकर आजही स्वतःची मागणी टिकवून आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथील मरीनो जातीच्या मेंढ्या आणि दक्षिण आफ्रिका व अर्जेंटिना येथील मेंढ्या ही जगातल्या लोकर पैदाशीची प्रमुख साधने. पश्मीना जातीच्या मेंढ्या ही याला उपयुक्त असतात. त्यांचा धागा खूप लांब, चिवट व पाहिजे त्या जाडीचा काढता येतो. मेंढीची लोकर यांत्रिक कात्रीने कापून पाण्यात भिजवून मग वाळवतात. एका मेंढीची लोकर शक्यतो सलग एकाच गठ्ठ्याप्रमाणे काढली जाते. हिवाळ्यानंतर हा प्रकार करतात म्हणजे पुढच्या हिवाळ्यापर्यंत मेंढी पुन्हा स्वतःचे संरक्षण करू शकते. कापलेली लोक कार्डिंग मशिनवर कातून तिचे जाड दोर वळले जातात. त्यांना रंग देऊन व त्यांच्यावर प्रक्रिया करून मग योग्य तो ताण देत, पीळ देत त्यापासून लोकरीचे गुंडे बनवले जातात. कापड विणायचे असले, तर लोकरीबरोबर थोडाफार सुताचा वापरही केला जातो. लोकरीला दिलेला रंग पक्का असतो व त्यामुळे तिला चकाकी येते.लोकरीचा कपडा अंगावर घातला की, तिच्यातील धाग्यांमध्ये अडकून राहिलेली हवा हीच मुळी मुख्यत: आपल्या शरीरावरील ऊब व बाह्य गारवा यांमध्ये इन्सुलेशनप्रमाणे काम करते. त्यामुळे निर्माण झालेली ऊब टिकून राहते. चहाच्या किटलीवर टिकोझी (Tea-Cozy) यासाठीच घालतात. लोकरीच्या कपड्यांना ते टोचू नयेत म्हणून आतून मऊ अस्तर लावण्याची ही पद्धत आहे. लोकरीचे कपडे वापरण्याचा काळ हा वर्षांतील थंडीचा काळ एवढाच असतो. अन्य वेळी ते ठेवून दिले जातात. लोकर खाणारे एक प्रकारचे किडे हे कपडे कुरतडतात. त्यामुळे हे कपडे ठेवताना नेहमीच कीटकनाशक औषधांचा वापर आवश्यक ठरतो. अन्यथा हवाबंद कपाटात कपडे ठेवावे लागतात. या प्रकारच्या किड्यांना कसर जातीचे किडे म्हणतात. चकचकीत, लहान, झपाट्याने हालचाल करणारे हे किडे खास करून लोकरीवरच वाढतात. लोकरीचे स्वेटर, शाली हाताने विणणे हे काम जगभराच्या स्त्रिया कलाकुसरीने व आवडीने करत आल्या आहेत. या क्षेत्रात आता यांत्रिक पद्धतीने जरी काम होत असले, तरीही आवडीच्या व्यक्तीने विणलेला स्वेटर जास्त आवडीने वापरला जातो, याला यानंतरही बाधा येईलसे वाटत नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जन्ममरणाचें भय मज दाविसी । तें म्यां ह्रषिकेशी अंगिकारलें ॥१॥ आतां माझी चिंता तुज कां पंढरिनाथा । असो दे भलभलता भलतेंच ठायीं ॥२॥ सुखदुःख भोगणें माझें मी जाणें । तुज तंव भोगणें नलगे कांहीं ॥३॥ नामा म्हणे माझे हेचि मनोरथ । होईन शरणागत जन्मूजन्मीं ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण किती खरे बोलत आहोत हे जरी इतरांना जास्त माहीत नसले तरी आपल्यालाच माहीत असते. पण खोटे बोलून स्वतः चे समाधान कोणत्या रितीने आपण करत आहो हेही आपल्याच जास्त माहीत असते आणि त्याही पलीकडे जो कोणी सभोवताली पसरलेला असतो त्याला तर सर्व काही माहीत असते.म्हणून माणसाने एवढेही खोटे बोलू नये.व इतरांची दिशाभूल करू नये. त्यापेक्षा खरे बोलताना जरी कोणी ऐकले नाही तरी चालेल पण एक दिवस खरेपणाच आपला आधार होत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *नाव मोठे .......* एका बेडकाचे पोर नदीकाठी बसून तेथे एका वेताच्या जाळीकडे मोठ्या कौतुकाने पाहात होते. त्याची आई जवळच होती. तिच्याजवळ त्याने त्या वेताच्या हिरव्या पानांची व त्यांच्या भक्कम कांडांची फार स्तुती केली. काही वेळाने मोठे वादळ झाले आणि त्याच्या जोराने ती वेताची जाळी उपटली गेली व सगळे वेत नदीतून सैरावैरा वाहू लागले. त्यातला एक मोडका वेत त्या बेडकीच्या हाती लागला. तो आपल्या पोरास दाखवून ती म्हणाली, 'मघाशी जो वेत तुला इतका भक्कम दिसत होता, त्याची आता काय स्थिती झाली आहे ती पाहिलीस का ?'तात्पर्यः- नाम बडे दर्शन छोटे ! अशा वस्तू बर्याच असतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 जानेवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~या समुहात join होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 💮 *_ या वर्षातील २८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 💮 *_महत्त्वाच्या घटना:_* 💮••••••••••••••••••••••••••••••••• *२०१०: १९७५ मधे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करणाऱ्या ५ जणांना फाशी देण्यात आले.**१९७७: मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९८६: चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदांनी स्फोट झाला.**१९६१: ’एच. एम. टी. वॉच फॅक्टरी’ हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला**१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला.**१६४६: मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध* 💮 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*💮 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: श्रुती हासन -- तमिळ-भारतीय चित्रपट अभिनेत्री, गायिका, संगीतकार**१९६८: मिलन अर्जुन लुथरिया -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक**१९६१: उदय नागोराव बरडे -- कवी* *१९६१: कमलाकर बापू राऊत -- कवी, लेखक, संपादक**१९५८: दिनेश भैय्यालाल नखाते -- लेखक**१९५३: सुधीर शांताराम थत्ते -- मराठी लेखक**१९५३: रेवती रमेश गोळे -- कथा लेखिका**१९५३: मीना अनिल टाकळकर -- अनुवादक (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००९ )**१९५०: डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी -- महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत, वक्ते, संपादक**१९४८: डॉ अरुणा कौलगुड -- लेखिका**१९४८: प्रा. बी. ए. खरात -- लेखक, संपादक* *१९४८: अरुण तुळजापूरकर -- कवी तथा निवृत्त बँक अधिकारी**१९४२: विजयराव यशवंतराव देशमुख (श्री सद्गुरुदास महाराज) -- प्रसिध्द शिवकथाकार, प्रेरक नि प्रभावी वक्तृत्व, विविध ग्रंथाचे लेखन**१९३९: प्रतापसिंह राणे -- गोव्याचे माजी मुख्यमंत्री* *१९३७: सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर – चित्रपट व भावगीत गायिका. त्यांनी हिन्दी, मराठी, गुजराथी, बंगाली, पंजाबी,इ.अनेक भाषांत गाणी गायिली आहेत.**१९३५: दिगंबर कृष्ण गाडगीळ -- निसर्गप्रेमी, पक्षीमित्र, लेखक* *१९३३: मनमोहन -- भारतीय अभिनेते(मृत्यू:२६ ऑगस्ट १९७९ )**१९३०: पं. जसराज – मेवाती घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक (मृत्यू: १७ ऑगस्ट २०२० )**१९२९: गुलशन नंदा -- भारतीय कादंबरीकार आणि पटकथा लेखक (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९८५)**१९२५: डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष (मृत्यू: २३ सप्टेंबर २००४ )**१९१४: रूप के. शौरी -- भारतीय निर्देशक, निर्माता,अभिनेता(मृत्यू: ३ जानेवारी १९७३ )**१९१३: राजेंद्र केशवलाल शाह -- गुजराती भावकवी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते (मृत्यू: २ जानेवारी २०१० )**१८९९: फील्डमार्शल के.एम.करिअप्पा – स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख (मृत्यू: १५ मे १९९३ )**१८९४: आनंदीबाई जयवंत -- कथालेखिका, कादंबरीकार (मृत्यू: १२ ऑगस्ट १९८४ )* *१८६७: जनार्दन विनायक ओक -- कोशकार (मृत्यू:२२ एप्रिल १९१८)**१८६५: ’पंजाब केसरी’ लाला लजपतराय – स्वातंत्र्यसेनानी (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९२८ )**१४५७: हेन्री (सातवा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: २१ एप्रिल १५०९ )*💮 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💮••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: शंकर सारडा -- साहित्यिक आणि समीक्षक (जन्म: ४ सप्टेंबर १९३७ )**२००७: ओंकार प्रसाद तथा ओ.पी.नय्यर – संगीतकार (जन्म: १६ जानेवारी १९२६ )**१९९७: डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां.वा. सुखात्मे – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ,पद्मभूषण (१९७१) (जन्म: २७ जुलै १९११ )**१९९६: बर्न होगार्थ – जंगलचा सम्राट टारझन याला कार्टुनद्वारे अजरामर करणारे अमेरिकन व्यंगचित्रकार,लेखक,शिक्षणतज्ञ (जन्म: २५ डिसेंबर १९११ )**१९८९: हसमुख धीरजलाल सांकलिया -- भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे एक पुरातत्त्ववेत्ते (जन्म: १० डिसेंबर १९०८ )**१९८४: सोहराब मेहेरबानजी मोदी – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित (१९७९), ’मिनर्व्हा मुव्हीटोन’तर्फे त्यांनी चाळीसहून अधिक चित्रपट निर्माण केले.(जन्म: २ नोव्हेंबर १८९७ )**१८५१: बाजीराव पेशवे (दुसरे) यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले. (जन्म: १० जानेवारी १७७५ )**१६१६: संत दासोपंत समाधिस्थ (जन्म: २४ सप्टेंबर १५५१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फ्रेश मॉर्निंग बुलेटिन समुहात join होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकून सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र देशात अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत मिळणार पैसे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नाशिक - कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा मानाचा जनस्थान पुरस्काराची घोषणा, नाटककार, दिग्दर्शक सतीश आळेकर यांना जाहीर; 10 मार्च रोजी होणार वितरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मत्स्य व्यवसाय विभागाच्या 100 दिवसाच्या नियोजनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला सविस्तर आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर अखेर कॉंग्रेसच्या कविता उईके तर उपाध्यक्षपदावर अजित पवार गटाचे एकनाथ फेंडर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अंजली दमानिया यांनी घेतली अजित पवारांची भेट, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची केली मागणी, सर्व पुरावे केले सुपूर्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अमरावती श्रमिक पत्रकार संघाकडून ज्येष्ठ पत्रकार प्रकाशदादा चौधरी यांना जीवनगौरव, 50 वर्षांच्या पत्रकारितेत सत्य हाच राहिला कर्मयोग*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वेस्ट इंडिजने 34 वर्षांनंतर पाकिस्तानच्या भूमीवर मिळविला पहिला कसोटी विजय, मालिका 1-1 ने बरोबरीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सोपानराव डोंगरे👤 श्रीनिवास सितावार👤 राम पाटील ढगे👤 सलीम शेख, करखेली👤 राजेश अर्गे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चाचा नेहरू - पंडीत जवाहरलाल नेहरू*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दयाशील अंत:करण म्हणजे प्रत्यक्ष स्वर्ग होय. -- स्वामी विवेकानंद*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ड्रोनच्या सहाय्याने टोळधाडीवर नियंत्रण ठेवणारा पहिला देश कोणता ?२) भारतात पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात किती किती खेड्यांचे विद्युतीकरण झाले होते ?३) अरण्यऋषी मारूती चितमपल्ली यांना भारत सरकारने कोणत्या पुरस्काराने गौरविले ?४) 'संहार' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) ग्रामपंचायतीच्या वार्डाची संख्या कोण ठरवतो ? *उत्तरे :-* १) भारत २) ३ हजार ३) पद्मश्री पुरस्कार ४) नाश, विनाश, सर्वनाश, विध्वंस ५) तहसिलदार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *विजेचा धक्का का बसतो ?* 📒 साधा दिवा लावायला जावं किंवा गरम पाण्यासाठी गिझर चालू करायला जावं आणि विजेचा धक्का बसावा, असा अनुभव कित्येक वेळा आलेला असतो. वास्तविक ही उपकरणे चालू करण्यासाठी असलेली बटनं इन्शुलेटेड केलेली असतात. म्हणजेच त्यांच्या बाह्यांगामधून विजेचा प्रवाह खेळणार नाही, अशी व्यवस्था केलेली असते. पण कधी कधी या व्यवस्थेला कुठेतरी तडा जातो आणि केवळ अंतरंगातूनच खेळणारी वीज या बाह्यांगातही प्रवेश करते. तिच्याशी आपला संपर्क आला की मग आपल्याला विजेचा धक्का बसतो. हे असं का होतं ? असा सवाल त्या धक्क्यानं गांगरुन गेल्यावरही आपल्या डोक्यात धुमाकूळ चालत राहतो.विद्युतबल हे विश्वाच्या जन्मापासून अस्तित्वात असलेलं मूलभूत बल आहे. विश्वाचा गाडा सुरळीत चालू राहण्यात ते महत्त्वाची भूमिका वठवत असतं. विद्युतबलामध्ये ऋण आणि धन असे दोन विद्युतभार असतात. सामान विद्युतभार एकमेकांना दूर लोटतात, तर विषम विद्युतभार एकमेकांकडे आकर्षित होतात; पण अशा एकमेकांकडे ओढ असणाऱ्या एक धन आणि दुसरा ऋण अशा विद्युतभारांना आपण एकमेकांपासून काही अंतरावर ठेऊ शकतो. त्यापोटी मग त्या दोन भारांमध्ये स्थितीजन्य ऊर्जा निर्माण होते. यालाच आपण विद्युत पोटेन्शियल म्हणतो. जर ते दोन टोकांवरचे भार एकत्र आले तर ही ऊर्जा व्होल्टेजच्या रूपात मोकळी होते. दूरवर राहूनही त्यांना एकत्र आणण्याचं काम ज्यांच्यामधून विद्युतभार सहजगत्या वाहू शकतो असे विद्युतवाहक करतात. तांब्याची तार किंवा साधं पाणी सुद्धा चांगले विद्युतवाहक आहेत. अशा तारेनं जर ते विद्युत भार जोडले गेले तर त्या वाहकातून म्हणजेच तारेतून विद्युतप्रवाह वाहू लागतो. याउलट लाकूड किंवा पोर्सेलीन यांच्यामधून विद्युतप्रवाह सहजगत्या वाहू शकत नाही. हे पदार्थ त्या प्रवाहाला विरोध करतात. त्यामुळे ते विद्युतरोधक बनतात. प्रवाहापासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी अशा विद्युतरोधकांचा वापर केला जातो.आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपले शरीरही चांगलं विद्युतवाहक असतं. त्यामुळे एका टोकाच्या विद्युतभाराशी आपल्या शरीराचा संपर्क आला तर शरीरातून विद्युतप्रवाह वाहू लागतो. त्यापोटी उद्भवणाऱ्या व्होल्टेजपोटी अनेक शरीरक्रियांमध्ये अडथळे निर्माण होतात. होल्टेजचं प्रमाण जास्त असेल तर या अडथळ्यांची मात्राही जास्त असते. जोरदार धक्का बसल्यासारखी परिस्थिती निर्माण होते.विद्युतप्रवाह नेहमी धन विद्युतभाराकडून ऋण विद्युतभाराकडे वाहत असतो. आपला संपर्क धन विद्युतभार असलेल्या टोकाशी झाला की विद्युतप्रवाह दुसऱ्या टोकाला असलेल्या ऋण विद्युतभाराकडे वाहू लागतो. अर्थात दुसऱ्या टोकाला असा ऋण विद्युतभार असण्याची आवश्यकता असते. जेव्हा आपण जमिनीवर उभे असतो तेव्हा तसा तो असतो; पण आपण लाकडावर जर उभे राहिलो तर दुसऱ्या टोकाला असा विद्युतरोधक असल्यामुळे विद्युतप्रवाह वाहू शकत नाही. त्यामुळे धक्का बसण्यापासून आपली सुटका होते.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जननिये जिवलगे येवो पांडुरंगे । शिणलों भेटि दे गे एक वेळां ॥१॥ त्राहे त्राहे त्राहे कृपादृष्टीं पाहे । येऊनियां राहे ह्रदयामाजीं ॥२॥ वासनेच्या संगें शिणलें माझें चित्त । विषयाचे आघात पडती वरी ॥३॥ नाहीं तुझी सेवा केली मनोधर्में । संसार संभ्रमें भ्रांत सदा ॥४॥ नाहीं तुझें नाम गाईलें आवडी । वाळली कुर्वंडी त्रिविधतापें ॥५॥ नामा म्हणे आई धांवें लवलाही । बुडतों चिंताडोहीं तारी मज ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण, आपले दु:ख इतरांना,आपली माणसं समजून सांगत असतो. पण, आपल्या आजूबाजूलाही समाजात अनेक लोक दु:खी आहेत. म्हणून आपले दु:ख इतरांना सांगण्यापेक्षा समाजात दु:खी असलेल्यांच्या विषयी थोडी विचारपुस करून त्यांना आपलेसे करून घ्यावे या कार्याने संपत्ती मिळत नसली तरी मात्र माणुसकीच्या नात्याने त्यांच्यात सहभागी झाल्याने विशेष समाधान मिळत असते. असे प्रयत्न करून बघायला हरकत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सामर्थ्य*एका मध्यरात्री सहदेव झोपेतून उठला आणि अशेजारच्या जंगलातील झोपडीत राहणाऱ्या पांडुरंग नावाच्या आपल्या मित्राकडे गेला. त्याच्या दारावर थाप मारून मारून सहदेवने त्याला उठविले. पांडुरंग झोपेतून उठला. दार उघडून पाहतो तर, बाहेर हातात कंदील घेऊन सहदेव उभा. पांडुरंग म्हणाला, "काय रे सहदेव ! इतक्या रात्री तुला काय हवंय? का माझी झोपमोड केलीस?" सहदेव म्हणाला, "अरे पांडबा ! मला झोपच येईना. जरा विडी ओढवी म्हणून काडेपेटी शोधली तर सापडेना. तेव्हा मला जरा विडी शिलगावण्यासाठी काडेपेटी कशाला हवी? कंदीलावर का नाही विडी पेटवलीस?" ते ऐकून सहदेव खजील झाला. आपल्या हाती दिवा आहे, हे त्याच्या लक्षातच आले नव्हते.* तात्पर्य : स्वतःकडे असणाऱ्या सामर्थ्याची आपणाला ओळख पटायला हवी.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 जानेवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Avhr7Lmcy/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ राष्ट्रीय भौगोलिक दिवस _*•••••••••••••••••••••••••••••••••• 🟡 *_ या वर्षातील २७ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟡 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟡•••••••••••••••••••••••••••••••••*२००७: बाबुराव रामचंद्र बागुल यांना जन्मस्थान पुरस्कार जाहीर* *१९७३: पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये ३१ वर्षे चालू असलेले ’व्हिएतनाम युद्ध’ संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.**१९६७: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था ’बालभारती’ या नावाने ओळखली जाते.**१९४५: दुसरे महायुद्ध – रशियाच्या _’रेड आर्मी’_ने पोलंडमधील _’ऑस्विच’_ येथील छळछावणीतील बंदिवानांची मुक्तता केली.**१९४४: दुसरे महायुद्ध – ८७२ दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला.**१८८८: वॉशिंग्टन डी. सी. येथे _'द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी'_ची स्थापना* 🟡 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟡 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: अरविंद उन्हाळे -- गझलकार* *१९७९: जितेंद्र जोशी भारतीय अभिनेता**१९७६: श्रेयस तळपदे -- हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता**१९७४: चामिंडा वास -- श्रीलंकेचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू**१९६९: विक्रम भट्ट -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व कथाकार**१९६७: बॉबी देओल – हिन्दी चित्रपट कलाकार**१९६३: डॉ. उत्तम भगवान अंभोरे -- मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी, लेखक**१९६३: आरती अंकलीकर टिकेकर -- भारतीय शास्त्रीय गायिका* *१९५७: अरुणा सुभाष गर्जे -- कवयित्री**१९५५: शशिकांत वसंत तिरोडकर -- कवी**१९५१: आनंद दिघे -- धर्मवीर नावाने प्रसिद्ध शिवसेनेचे ज्येष्ठ नेते (मृत्यू: २६ ऑगस्ट २००१ )**१९४५: चंद्रकला नंदकिशोर भार्गव -- लेखिका**१९३४: मुकुंद विष्णू टेकाडे -- बालसाहित्यिक, लेखक* *१९२७: वसंत विठ्ठल गाडे (गाडे गुरुजी)-- संघटक, संस्थापक, [विनोबा विचार केंद्र नागपूर] (मृत्यु: २४ जुलै २०१४ )**१९२६: जनरल अरुणकुमार वैद्य – भारताचे १३ वे लष्करप्रमुख (मृत्यू: १० ऑगस्ट १९८६ )**१९२४: साबू दस्तगीर -- भारतीय अभिनेता (मृत्यू: २ डिसेंबर १९६३)**१९२२: अजित खान ऊर्फ ’अजित’ – हिन्दी चित्रपटांतील चरित्र अभिनेते (मृत्यू: २२ ऑक्टोबर१९९८ )**१९२०: स्नेहलता यशवंत किनरे -- कवयित्री* *१९०९: डॉ. सविता भीमराव आंबेडकर (माईसाहेब) -- सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका (मृत्यू: २९ मे २००३ )* *१९०९: श्याम नीळकंठ ओक -- चित्रपट समीक्षक, लेखक(मृत्यू: १० मार्च १९८२ )**१९०५: राजाराम प्रल्हाद कानिटकर -- लेखक संपादक* *१९०१: लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी – महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचे एक प्रमुख उद्गाते,विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक आणि साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष, १९२३ मध्ये कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी _’तर्कतीर्थ’_ ही पदवी संपादन केली. (मृत्यू: २७ मे १९९४ )**१८५०: एडवर्ड जे. स्मिथ – आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान (मृत्यू: १५ एप्रिल १९१२ )* 🟡 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟡••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: अनिल अवचट -- सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध लेखक (जन्म: २६ ऑगस्ट १९४४ )**२०१६: दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी -- आधुनिक मराठी साहित्यातील विख्यात समीक्षक आणि ललित निबंधकार (जन्म: २५ जुलै १९३४ )**२०१३: ठाकूरदास बंग -- थोर गांधीवादी विचारवंत (जन्म:१९१७)**२००९: आर. वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती, केन्द्रीय मंत्री, कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी (जन्म: ४ डिसेंबर १९१० )**२००८: डॉ. सुरेश महादेव डोळके -- धर्मशास्त्र व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, महानुभाव साहित्याचे संशोधक व ज्येष्ठ साहित्यिक (जन्म: २१ सप्टेंबर १९२६ )* *२००८: सुहार्तो – इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ८ जून १९२१ )**२००७: कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक (जन्म: ६ डिसेंबर १९३२ )**२०००: पु.वि. बेहेरे ऊर्फ राजाभाऊ बेहेरे --- मेनका, माहेर आणि जत्रा या मराठी मासिकाचे संपादक (जन्म: ११ जून १९३१)**१९९७: झिया सरहदी -- पटकथा लेखक आणि भारतीय उद्योग उद्योग क्षेत्रांचे दिग्दर्शक (जन्म:१९१४)**१९८९: वामन भार्गव पाठक -- मराठीतील सुप्रसिद्ध कवी, समीक्षक आणि साहित्यिक(जन्म: १९ ऑगस्ट १९०५)**१९८६: निखिल बॅनर्जी – मैहर घराण्याचे सतारवादक (जन्म: १४ ऑक्टोबर १९३१)**१९६८: सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ ’कुमुदबांधव’ – नाटककार व साहित्यिक (जन्म: २६ मे १९०२ )**१९४७: पॉल हॅरिस – रोटरी क्लबचे संस्थापक (जन्म: १९ एप्रिल १८६८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुलगी सासरी जाताना एका पित्याने व्यक्त केलेल्या भावनाहृदयस्पर्शी कविता *दिल्या घरी सुखी राहा ....*..... पूर्ण कविता पाहण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देशभरात 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ध्वजारोहण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गजल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्म भूषण तर 11 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आता नरिमन पॉईंट वांद्रे अंतर केवळ १५ मिनिटांत, प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना मोठी भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील उत्कृष्ट कलाकार नम्रता संभेराव यांचा 'सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेत्री' पुरस्काराने सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *धाराशिव जिल्ह्यात आगामी पाच वर्षात गाव तेथे एस टी बस सुरू करण्याचा प्रयत्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, कोल्हापूरची अमृता पुजारी पराभूत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महिला क्रिकेट विश्वचषक मध्ये बांगलादेशला पराभूत करून भारत उपांत्य फेरीत दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 माधव बोमले, बिलोली👤 दत्तराम बोमले👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वसंत बापट - विश्वनाथ वामन बापट*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) गोंदिया जिल्ह्याचे नव्याने नियुक्त झालेले जिल्हा परिषद अध्यक्ष कोण आहेत ?२) महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते ?३) महात्मा फुलेचे ब्रीदवाक्य काय होते ?४) 'समय' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) FTII चे फुल फॉर्म काय आहे ? *उत्तरे :-* १) लायकराम भेंडारकर २) साल्हेर ( १५६७ मी. ) ३) सत्यमेव जयते ४) वेळ ५) फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 केस कुरळे का होतात ? 📒आपले केस केरटीन या प्रथिनाचे बनलेले असतात. त्यातले काही सरळसोट का राहतात, तर इतर वेडीवाकडी वळणे घेत कुरळे का बनतात, याचं रंगीत प्रथिनांच्या रचनेतच सामवले आहे. प्रथिने ही अमिनो आम्लांची बहुवारिक साखळीच असते. प्रथिनांमध्ये एकूण २० वेगवेगळ्या प्रकारची अमिनो आम्ल असतात. त्यातल्या प्रत्येकाच्या रेणूची अंतर्गत तसंच त्रिमिती रचना वेगवेगळी असली तरी प्रत्येक अमिनो आम्लाच्या एका टोकाला आम्लधर्मीय कार्बोक्सील हा रेणूंचा गट असतो, तर दुसर्या टोकाला अल्कलीधर्मीय अमिनो गट असतो. साखळी गुंफण्यासाठी जेव्हा एका अमिनो आम्लाचा रेणू शेजारच्या दुसऱ्या अमिनो आम्लाशी जोडला जातो तेव्हा हे अमिनो आणि कार्बोक्सील रेणू एकमेकांशी पेप्टाइड बंध तयार करतात. अशा रीतीने प्रथिनांची प्राथमिक रचना असणारी हि सरळसोट साखळी तयार होते. या अमिनो आम्लांवर इतर अणुही असतात. ते टोकाला नसून मधल्या अंगाच्या दोन्ही बाजूंना पसरलेले असतात. ते जराशा दूरवर असलेल्या अमिनो आम्लावरच्या दुसर्या रेणूशी संधान बांधून इतर बंध तयार करतात. त्यामुळे मग या साखळ्या सरळसुत न राहता त्यांच्यामध्ये वेटोळी किंवा मोड तयार होतात. प्रथिनांची द्वितीय स्तरावरची रचना तयार होऊ लागते.या प्रकारच्या बंधामध्ये सल्फरचे अणुही सहभागी होतात. कित्येक अमिनो आम्लांच्या मध्यभागावर सल्फरचे अणु असतात. त्यांचा संपर्क दुसऱ्या कोणत्यातरी साखळीत त्यांच्यापासून दूरवर असणाऱ्या अमिनो आम्लाच्या अंगावरच्या सल्फरच्याच अणुशी आला, कि त्यांच्यामध्ये एक पूल तयार होतो. त्याला डायसल्फाईड ब्रिज असे म्हणतात. या पुलांमुळे मग त्या प्रथिनांच्या सरळ असलेल्या साखळीला बाक येतो. त्याची वेटोळी बनतात. केसांमध्ये अशा सल्फरच्या पुलांची संख्या वाढली तर ते कुरळे होतात. जर त्यांची संख्या कमी झाली तर ते सरळ राहतात. केसांमध्ये किती पाणी आहे, यावरही त्यांच्या या रचनेत काही बदल होतात; पण ते कायमचे नसतात. केस कोरडे झाले कि परत आपले मूळ रूप धारण करतात.काही जण केसांवर काही प्रक्रिया करून त्याचे स्वरूप बदलू पाहतात. सरळ केस असलेली व्यक्ती आपले केस कुरळे करून घेते. तसे करताना ती त्यांच्यातल्या सल्फर पुलांची संख्या वाढवत असते; पण हि स्थिती तात्पुरतीच असते. कारण नव्याने वाढलेले केस परत सरळच राहतात. कालांतराने मग सरळ वळण देण्याच्या प्रयत्नांची होते. काही दिवसांनी ते आपले मुळचे कुरळेपण परत मिरवू लागतात.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगात्रजीवना अगा नारायणा । कां नये करुणा दासाची हे ॥१॥ अच्युता केशवा ये गा दीनानाथा । सर्वज्ञ समर्था कृपामूर्ति ॥२॥ चिद्घना चिद्रूपा विरंचीच्या बापा । करावी जी कृपा सर्वांभूतीं ॥३॥ तुझें म्हणविलें उपेक्षिसी जरी । नामा म्हणे हरी ब्रीद काय ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीला मदतीची गरज असेल आणि त्या व्यक्तीला न कळताच नि:स्वार्थ भावनेने मदत केल्याने जो, समाधान आपल्याला मिळत असते तो, समाधान जगावेगळा असतो. आणि याच विषयी जेव्हा त्या व्यक्तीकडून सकारात्मक विचार इतरांकडून ऐकायला मिळत असतात त्यावेळी मात्र आपल्याला सर्वच काही मिळाल्यासारखे वाटते. या प्रकारची भूमिका पार पाडताना तेवढे काळीज मोठे असावे लागते. असे काळीज प्रत्येकांकडे असणे आवश्यक आहे. कारण या जीवनात सर्वच काही कमावता येतो पण, अडचणीत सापडलेल्या माणसांच्या मदतीसाठी धावून जाणे हाच खरा माणुसकी धर्म आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बदलण्याची संधी*सरधोगा जिल्ह्यातील खुशाबनगर येथे दिवाण मदनगोपाल राहत असत. अनेक राजवाड्यांचे मालक असलेल्या मदनगोपाल यांना दारूचा मोठा शौक होता. विलायती दारूच्या अनेक पेट्या त्यांच्या घरी त्यांनी साठवून ठेवलेल्या होत्या. मदनगोपाल एकदा सुगंधित थंड खोलीत विश्रांती घेत पहुडले होते. रखरखत्या उन्हात एका तेजस्वी साधूने त्यांच्या खोलीत प्रवेश केला. दिवाणसाहेबांनी हात जोडून त्या साधूला स्थान ग्रहण करण्यास सांगितले. साधू महाराज म्हणाले, "दिवाणसाहेब, मी इथे आलो आहे ते तुमच्याकडून एक वचन घेण्यासाठी, बोला मला वचन देताल काय" दिवाणजी म्हणाले, "तुम्ही जे मागताल ते जर माझ्याकडे उपलब्ध असेल तर निश्चित वचन देण्यास मी बांधिल असेन. साधू म्हणाले," तुमची सर्वात प्रिय वस्तू म्हणजे दारू तुम्ही सोडून द्याल एवढेच वचन मला द्या." मदनगोपाल पहिल्यांदा कचरले पण वचन पूर्ण करण्यासाठी ते तयार झाले. त्यांनी नोकरांना बोलावले व दारूच्या सगळ्या बाटल्या फोडून टाकायचा आदेश दिला. नोकरांनी साधूच्यादेखतच सर्व बाटल्या फोडून टाकल्या. साधूला आनंद वाटला, त्यांनी परत जाताना दिवाणसाहेबांकडून पुन्हा कधीही दारू पिणार नाही असे वचन घेतले व निघून गेले. साधू गेल्यावर एक नोकर दिवाणजीकडे आला व म्हणाला, "महाराज आजच्या रात्रीपुरती दारू मी एकेठिकाणी लपवून ठेवली आहे, आणू का" दिवाणजींनी त्याला ती बाटली आणावयास सांगून नोकराने ती बाटली आणताच त्यांनी ती बाटलीही स्वतःच्या हाताने फोडली व आयुष्यात पुन्हा कधीच दारूला स्पर्श केला नाही. पुढे वृंदावनला जाऊन त्यांनी दीक्षा घेतली. मदनगोपाल यांच्या आयुष्याची दिशाच त्या एका प्रसंगामुळे बदलून गेली. पुढे श्रीकृष्णप्रेमात बुडालेल्या मदनगोपाल यांनी "निमाईचंद" हे उत्कृष्ट उर्दू पुस्तक लिहीले.तात्पर्य - स्वतःला बदलण्याची संधी मिळाल्यावर प्रत्येकाने त्याचा लाभ घेतला पाहिजे. कदाचित त्या संधीतूनच आपल्या आयुष्याला कलाटणी मिळून आयुष्याचे सोने घडू शकते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 जानेवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1CtV1LU1JW/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔰 *_राष्ट्रीय पर्यटन दिन_*🔰•••••••••••••••••••••••••••••••• 🔰 *_राष्ट्रीय मतदार दिन_* 🔰•••••••••••••••••••••••••••••••• 🔰 *_ या वर्षातील २५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔰 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔰•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना ’भारतरत्न’**१९९५: अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले. रशियन सरकारच्या रडारवर ते दिसू लागताच अमेरिकेने अण्वस्त्र सोडले असावे, असा संशय रशियन अधिकार्यांनी व्यक्त केल्यामुळे रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी अमेरिकेवर अण्वस्त्रे डागण्यासाठी ’न्युक्लिअर ब्रिफकेस’ हातात घेतेली होती!**१९९१: मोरारजी देसाई यांना ’भारतरत्न’**१९८२: आचार्य विनोबा भावे यांना ’भारतरत्न’**१९७१: हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.**१९४१: ’प्रभात’चा ’शेजारी’ हा चित्रपट रिलीज झाला.**१९१९: पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.**१८८१: थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.**१७५५: मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.*🔰 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔰••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: मयूर बाळकृष्ण बागुल -- लेखक**१९८४: स्वाती बाळासाहेब ठुबे-खोडदे -- कवयित्री* *१९७५: एकता अशोक मेनकुदळे --- लेखिका**१९७१: डॉ. मिलिंद चोपकर -- लेखक, संपादक* *१९५९: बाळ कांदळकर -- कवी**१९५८: कविता कृष्णमूर्ती – प्रसिद्ध पार्श्वगायिका**१९५५: मोहन कल्लाप्पा हवालदार -- ज्येष्ठ पत्रकार, लेखक**१९५४: मदन रामसिंह हजेरी -- कादंबरीकार, बालकथाकार**१९५२: प्रकाश नथुभाऊ खरात -- कवी, लेखक (मृत्यू: १९ एप्रिल २०२१ )**१९५१: हेमलता प्रदीप गीते -- प्रसिद्ध कवयित्री**१९५१: अर्चना पंडित -- कवयित्री**१९३८: सुरेश विनायक खरे – मराठी नट, लेखक, दिग्दर्शक, जाहिरातपटकार, चित्रपट पटकथालेखक, नाट्यावलोकनकार, संवादक, मुलाखतकार, आणि मराठी नाटककार व समीक्षक**१९३३: दिनेश वामन वाळिंबे -- कवी**१९३१: डॉ. रामचंद्र विश्वनाथ मंत्री -- लेखक**१९१७: श्रीपाद दत्तात्रेय कुलकर्णी -- लेखक**१९१६: बापूसाहेब गोविंदराव लाखनीकर-- संस्थापक, लेखक (मृत्यू: २६ डिसेंबर २००१ )**१९१४: जगन्नाथ शामराव देशपांडे -- प्राचीन मराठी संशोधक, संपादक* *१८८६: पांडुरंग नरसिंह पटवर्धन -- इतिहास संशोधक (मृत्यू: ६ जुलै १९२१ )**१८८३: आनंदीबाई धोंडो कर्वे ऊर्फ बाया कर्वे -- मराठी सामाजिक-शैक्षणिक कार्यकर्त्या (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९५० )* *१८८२: व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका (मृत्यू: २८ मार्च १९४१ )**१८७४: डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार (मृत्यू: १६ डिसेंबर १९६५ )**१८६२: रमाबाई रानडे – ’सेवा सदन’च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या (मृत्यू: १९२४ )**१७३६: जोसेफ लाग्रांगे – इटालियन गणितज्ञ (मृत्यू: १० एप्रिल १८१३ )**१६२७: रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ३० डिसेंबर १६९१ )* 🔰 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*🔰 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: मधुकर दत्तात्रय तथा म.द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म: १ फेब्रुवारी १९२७ )**१९९६: प्रशांत सुभेदार – रंगभूमी व चित्रपटांतील गुणी अभिनेते* *१९८०: लक्ष्मणशास्त्री दाते – सोलापूरचे ’दाते पंचांग’कर्ते (जन्म: १८९० )**१९६४: शंकरराव रामचंद्र कानिटकर-- शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक(जन्म: ११ जुलै १८८७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वाना हार्दीक शुभेच्छा*26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *“जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान हा नवा नारा आहे. शेती हा फायदेशीर व्यवसाय आहे” - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कारखान्यात स्फोट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मध्यप्रदेश च्या सरकारने राज्यातील 17 धार्मिक शहरात दारूबंदी डॉ. मोहन यादव यांचा ऐतिहासिक निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एस टी च्या तिकिटात 14.97 टक्के वाढ, रिक्षा व टॅक्सीमध्ये ही 3 रुपयांची वाढ, सर्वसामान्य नागरिकांना झटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष'*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बालसाहित्य बोलीभाषेत असावे, मुलांच्या भावविश्वाला समजेल अशी पुस्तके हवीत, बालकुमार साहित्य संमेलनात मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियम मध्ये आज भारत वि. इंग्लंडचा दुसरा T20 सामना रंगणार, पाच T20 च्या मालिकेत भारत 1-0 ने पुढे आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीमती कल्पना दत्तात्रय हेलसकर, उपक्रमशील शिक्षिका, जालना👤 प्रा. वैशाली देशमुख, लेखिका, कुही नागपूर👤 ललेश पाटील मंगनाळीकर, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 रामदास भोकरे, नांदेड👤 गंगाधर ईबीतवार👤 नरेश दंडवते, नांदेड👤 मुजीब फारुखी, उर्दू हायस्कुल धर्माबाद👤 मुजीब पठाण👤 राहुल आवळे, शिक्षक, पुणे👤 अंबादास कदम, नांदेड👤 राजीव सेवेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विंदा करंदीकर - गोविंद विनायक करंदीकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नम्रता माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा देते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *स्वर्गीय नर्तक* हा कोणत्या राज्याचा राज्यपक्षी आहे ?२) स्वर्गीय नर्तक या पक्ष्याला हिंदीमध्ये काय म्हणतात ?३) राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा केला जातो ?४) 'समुद्र' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'जन गण मन' या गीताला 'राष्ट्रगीत' म्हणून केव्हा मान्यता मिळाली ?*उत्तरे :-* १) मध्यप्रदेश २) दूधराज ३) २५ जानेवारी ( २०११ पासून ) ४) सागर, सिंधू, रत्नाकर, जलधी, पयोधी, जलनिधी ५) २४ जानेवारी १९५०*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🐝 *मधमाशी चावल्यावर काय होतं ?* 🐝डासांचा चावा असं म्हटलं जातं, पण मधमाशीचा असतो तो डंख. याचं कारण म्हणजे जेव्हा मधमाशी डसते तेव्हा ती एक विष आपल्या शरीरात सोडत असते. सहसा मधुपर्काच्या शोधात असलेली मधमाशी डंख करत नाही; पण ती तुडवली गेली आणि एखाद्या व्यक्तीपासून तिच्या पोळ्याला धोका आहे असं तिला जाणवलं तर मात्र त्वेषानं तुटून पडते. तरीही मधमाशी एकदाच डंख करू शकते, कारण डंख करण्यासाठी तिच्या अंगी जो एक सुईसारखा अवयव असतो, याला स्टिंग असंच म्हणतात, तो तुटून आपल्या शरीरातच अडकून पडतो. खरंतर ही सुई साधी नसते. या सुईच्या दोन्ही बाजूला तिला जोडलेले दोन काटेरी पट्टे असतात. ते वर खाली होऊ शकतात. यातला एक पट्टा आपल्या कातडीत शिरून तिथे अडकून पडतो. त्यामुळे तो आणखी आत ओढला जाऊन सुईला आपल्याबरोबर ओढून नेतो. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूचा काटेरी पट्टा आपली हालचाल करू लागतो. असं करत ते सुईला कातडी पार करून आपल्या मांसल स्नायूपर्यंत पोचवतात. त्यावेळीच ते विष शरीरात सोडलं जातं. हे सारं सव्यापसव्य करताना त्या काटेरी दातांसकट ती सुई मांसल भागात चांगलीच रुतून बसते. त्यामुळे ती परत बाहेर काढली जाऊ शकत नाही. पण माशी तसा प्रयत्न करते तेव्हा ती सुई तुटते. ती सुई माशीच्या पोटाला जोडलेली असल्यामुळे त्या ओढाताणीत तो पोटाचा भागही तुटून पडतो. ते सहन न होऊन माशी मरून पडते. विषाबरोबरच माशी एक गंधयुक्त रसायन, याला फेरोमोन म्हणतात, तिथं आणि हवेत पसरवते. त्याच्या अोढीनं इतर माशाही तिथं आकर्षित होतात. अशा वेळी मग एकाऐवजी अनेक माशांचा डंख पचवावा लागतो. सहसा या विषाचा फारसा परिणाम होत नाही. मात्र जळजळ आणि खाज येऊ लागते. काही जणांना या विषाची अॅलर्जी असते. त्यांना मात्र सावधगिरी बाळगावी लागते. तातडीने उपचार करून घेणं योग्य ठरतं. अन्यथा या अॅलर्जीची प्रतिक्रिया तीव्र होऊन ती घातकही ठरू शकते. या विषात मेलिटिनबरोबरच हिस्टमिनही असल्यामुळे सहसा हिस्टीमिनला नाकाम करणारी उपाययोजना केली जाते.उतारवयातल्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना जर अनेक मधमाशांचा डंख झाला तर मात्र काही वेळा स्नायूंना इजा होऊ शकते. तसंच मूत्रपिंडांच्या कामातही बाधा आणली जाऊ शकते. तोंडात किंवा गळ्याजवळ डंख झाला तर त्यापायी श्वासनलिकेचं नियंत्रण करणारे स्नायू बाधित होतात व श्वासोच्छ्वासाला अडथळा होऊ शकतो. परंतु अशी परिस्थिती क्वचितच उद्भवते.*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••छंदिस्त हें मन माझें पंढरिनाथा । न सोडीं सर्वथा पाय तुझे ॥१॥ यासि काय करूं सांगा जी विठ्ठला । स्नेह कां लाविला पूर्वीहूनि ॥२॥ कांसवीचीं पिलीं सोडोनि निराळीं । दृष्टि पान्हाइलिं अमृतमय ॥३॥ तैस मी जवळुनि असेन पैं दुरी । दृष्टि मजवरी असों द्यांवी ॥४॥ तान्हें वछ घरीं धेनु चरे वनीं । हंबरे क्षनक्षनां परतोनि ॥५॥ नामा म्हणे देवा सलगी करीं निकट । झणें मज विकुंठ्ह पद देसी ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्याला जे हवे ते मिळविण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न आपण करत असतो.कारण हवं ते मिळविल्या शिवाय पाहिजे तसे समाधान मिळत नाही. पण,जरा आपल्या आजुबाजूलाही थोडी दृष्टी टाकून बघावे. कारण काहींना तर दोन घास खायला अन्न सुध्दा मिळत नाही आणि नेसायला वस्त्र सुद्धा नसते. त्यांचे जीवनही माणसाचेच आहे. मात्र माणूसच, माणसाला ओळखत नसल्याने माणुसकी संपत चालली आहे. यावर विचार करण्याची गरज आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दुस-याबाबतचा दृष्टीकोन*स्टार्मवेल नावाचे एक इंग्रज पत्रकार होते. ते एखाद्याची मुलाखत घेणार असतील तर त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी ते उघडपणे बोलून दाखवत असत.एकदा स्टार्मवेल यांना श्रीकृष्ण मेनन यांची मुलाखत घ्यावयाची होती. स्टार्मवेल यांनी आक्रमकपणे पहिलाच प्रश्न मेनन यांना विचारला," मिस्टर मेनन, तुम्ही अत्यंत गरीबीतून वर आलेला आहात. तुम्ही शाळेत वॉच स्काऊट म्हणून काम करत होता. एका इंग्रज महिलेने तुम्हाला आधार दिला व त्यांनीच तुम्हाला लंडनला पाठविले. तेथे कायदा आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेऊन तुम्ही भारतात परत आला. येथे पुन्हा तुम्हाला संघर्ष करावा लागला. त्याचवेळी पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे तुमच्याकडे लक्ष गेले. त्यांनी तुम्हाला योग्य संधी दिली. आज तुम्ही त्यांच्या जवळचे आहात. नेहरूंच्या मंत्रिमंडळात तुमची वर्णी लागणार आहे असे बोलले जात आहे. म्हणजेच तुम्ही तळातून उठून आकाशात जाऊन ठेपणार आहात. पण मिस्टर मेनन तुम्ही मला खरेच सांगा की, तुम्ही कम्युनिस्ट आहात हे खरे आहे का." मेनन यांनी शांतपणे पण ठाम स्वरात म्हणाले," तुम्ही माझे जे कौतुक केले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मलाही तुमचे कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे तुम्ही रस्तोरस्ती पेपर विकून तुमचे पोट भरत होता. तेथूनच तुम्ही मोठे झालात, आता तुम्हाला चांगला पगार मिळतो आहे. पण मलाही तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की, खरेच सांगा की तुम्ही एक अनौरस संतान आहात काय." मेनन यांच्या सडेतोडपणामुळे स्टार्मवेल यांची बोबडी वळाली आणि त्यांनी तो विषय टाळून दुस-या प्रश्नाकडे वळाले. तात्पर्य – दुस-याच्या खाजगी आयुष्यात डोकावताना त्याला दुःख देणा-या गोष्टींबाबत चर्चा न केलेली बरी असते. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही गोष्टी या अतिखासगी या प्रकारात मोडतात त्यामुळे दुस-याच्या आयुष्यात ढवळाढवळ न केलेलीच चांगली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 जानेवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1CtV1LU1JW/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔰 *_राष्ट्रीय पर्यटन दिन_*🔰•••••••••••••••••••••••••••••••• 🔰 *_राष्ट्रीय मतदार दिन_* 🔰•••••••••••••••••••••••••••••••• 🔰 *_ या वर्षातील २५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔰 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔰•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना ’भारतरत्न’**१९९५: अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले. रशियन सरकारच्या रडारवर ते दिसू लागताच अमेरिकेने अण्वस्त्र सोडले असावे, असा संशय रशियन अधिकार्यांनी व्यक्त केल्यामुळे रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी अमेरिकेवर अण्वस्त्रे डागण्यासाठी ’न्युक्लिअर ब्रिफकेस’ हातात घेतेली होती!**१९९१: मोरारजी देसाई यांना ’भारतरत्न’**१९८२: आचार्य विनोबा भावे यांना ’भारतरत्न’**१९७१: हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.**१९४१: ’प्रभात’चा ’शेजारी’ हा चित्रपट रिलीज झाला.**१९१९: पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.**१८८१: थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.**१७५५: मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.*🔰 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔰••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: मयूर बाळकृष्ण बागुल -- लेखक**१९८४: स्वाती बाळासाहेब ठुबे-खोडदे -- कवयित्री* *१९७५: एकता अशोक मेनकुदळे --- लेखिका**१९७१: डॉ. मिलिंद चोपकर -- लेखक, संपादक* *१९५९: बाळ कांदळकर -- कवी**१९५८: कविता कृष्णमूर्ती – प्रसिद्ध पार्श्वगायिका**१९५५: मोहन कल्लाप्पा हवालदार -- ज्येष्ठ पत्रकार, लेखक**१९५४: मदन रामसिंह हजेरी -- कादंबरीकार, बालकथाकार**१९५२: प्रकाश नथुभाऊ खरात -- कवी, लेखक (मृत्यू: १९ एप्रिल २०२१ )**१९५१: हेमलता प्रदीप गीते -- प्रसिद्ध कवयित्री**१९५१: अर्चना पंडित -- कवयित्री**१९३८: सुरेश विनायक खरे – मराठी नट, लेखक, दिग्दर्शक, जाहिरातपटकार, चित्रपट पटकथालेखक, नाट्यावलोकनकार, संवादक, मुलाखतकार, आणि मराठी नाटककार व समीक्षक**१९३३: दिनेश वामन वाळिंबे -- कवी**१९३१: डॉ. रामचंद्र विश्वनाथ मंत्री -- लेखक**१९१७: श्रीपाद दत्तात्रेय कुलकर्णी -- लेखक**१९१६: बापूसाहेब गोविंदराव लाखनीकर-- संस्थापक, लेखक (मृत्यू: २६ डिसेंबर २००१ )**१९१४: जगन्नाथ शामराव देशपांडे -- प्राचीन मराठी संशोधक, संपादक* *१८८६: पांडुरंग नरसिंह पटवर्धन -- इतिहास संशोधक (मृत्यू: ६ जुलै १९२१ )**१८८३: आनंदीबाई धोंडो कर्वे ऊर्फ बाया कर्वे -- मराठी सामाजिक-शैक्षणिक कार्यकर्त्या (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९५० )* *१८८२: व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका (मृत्यू: २८ मार्च १९४१ )**१८७४: डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार (मृत्यू: १६ डिसेंबर १९६५ )**१८६२: रमाबाई रानडे – ’सेवा सदन’च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या (मृत्यू: १९२४ )**१७३६: जोसेफ लाग्रांगे – इटालियन गणितज्ञ (मृत्यू: १० एप्रिल १८१३ )**१६२७: रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ३० डिसेंबर १६९१ )* 🔰 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*🔰 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: मधुकर दत्तात्रय तथा म.द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म: १ फेब्रुवारी १९२७ )**१९९६: प्रशांत सुभेदार – रंगभूमी व चित्रपटांतील गुणी अभिनेते* *१९८०: लक्ष्मणशास्त्री दाते – सोलापूरचे ’दाते पंचांग’कर्ते (जन्म: १८९० )**१९६४: शंकरराव रामचंद्र कानिटकर-- शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक(जन्म: ११ जुलै १८८७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वाना हार्दीक शुभेच्छा*26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *“जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान हा नवा नारा आहे. शेती हा फायदेशीर व्यवसाय आहे” - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कारखान्यात स्फोट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मध्यप्रदेश च्या सरकारने राज्यातील 17 धार्मिक शहरात दारूबंदी डॉ. मोहन यादव यांचा ऐतिहासिक निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एस टी च्या तिकिटात 14.97 टक्के वाढ, रिक्षा व टॅक्सीमध्ये ही 3 रुपयांची वाढ, सर्वसामान्य नागरिकांना झटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष'*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बालसाहित्य बोलीभाषेत असावे, मुलांच्या भावविश्वाला समजेल अशी पुस्तके हवीत, बालकुमार साहित्य संमेलनात मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियम मध्ये आज भारत वि. इंग्लंडचा दुसरा T20 सामना रंगणार, पाच T20 च्या मालिकेत भारत 1-0 ने पुढे आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीमती कल्पना दत्तात्रय हेलसकर, उपक्रमशील शिक्षिका, जालना👤 प्रा. वैशाली देशमुख, लेखिका, कुही नागपूर👤 ललेश पाटील मंगनाळीकर, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 रामदास भोकरे, नांदेड👤 गंगाधर ईबीतवार👤 नरेश दंडवते, नांदेड👤 मुजीब फारुखी, उर्दू हायस्कुल धर्माबाद👤 मुजीब पठाण👤 राहुल आवळे, शिक्षक, पुणे👤 अंबादास कदम, नांदेड👤 राजीव सेवेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विंदा करंदीकर - गोविंद विनायक करंदीकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नम्रता माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा देते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *स्वर्गीय नर्तक* हा कोणत्या राज्याचा राज्यपक्षी आहे ?२) स्वर्गीय नर्तक या पक्ष्याला हिंदीमध्ये काय म्हणतात ?३) राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा केला जातो ?४) 'समुद्र' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'जन गण मन' या गीताला 'राष्ट्रगीत' म्हणून केव्हा मान्यता मिळाली ?*उत्तरे :-* १) मध्यप्रदेश २) दूधराज ३) २५ जानेवारी ( २०११ पासून ) ४) सागर, सिंधू, रत्नाकर, जलधी, पयोधी, जलनिधी ५) २४ जानेवारी १९५०*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🐝 *मधमाशी चावल्यावर काय होतं ?* 🐝डासांचा चावा असं म्हटलं जातं, पण मधमाशीचा असतो तो डंख. याचं कारण म्हणजे जेव्हा मधमाशी डसते तेव्हा ती एक विष आपल्या शरीरात सोडत असते. सहसा मधुपर्काच्या शोधात असलेली मधमाशी डंख करत नाही; पण ती तुडवली गेली आणि एखाद्या व्यक्तीपासून तिच्या पोळ्याला धोका आहे असं तिला जाणवलं तर मात्र त्वेषानं तुटून पडते. तरीही मधमाशी एकदाच डंख करू शकते, कारण डंख करण्यासाठी तिच्या अंगी जो एक सुईसारखा अवयव असतो, याला स्टिंग असंच म्हणतात, तो तुटून आपल्या शरीरातच अडकून पडतो. खरंतर ही सुई साधी नसते. या सुईच्या दोन्ही बाजूला तिला जोडलेले दोन काटेरी पट्टे असतात. ते वर खाली होऊ शकतात. यातला एक पट्टा आपल्या कातडीत शिरून तिथे अडकून पडतो. त्यामुळे तो आणखी आत ओढला जाऊन सुईला आपल्याबरोबर ओढून नेतो. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूचा काटेरी पट्टा आपली हालचाल करू लागतो. असं करत ते सुईला कातडी पार करून आपल्या मांसल स्नायूपर्यंत पोचवतात. त्यावेळीच ते विष शरीरात सोडलं जातं. हे सारं सव्यापसव्य करताना त्या काटेरी दातांसकट ती सुई मांसल भागात चांगलीच रुतून बसते. त्यामुळे ती परत बाहेर काढली जाऊ शकत नाही. पण माशी तसा प्रयत्न करते तेव्हा ती सुई तुटते. ती सुई माशीच्या पोटाला जोडलेली असल्यामुळे त्या ओढाताणीत तो पोटाचा भागही तुटून पडतो. ते सहन न होऊन माशी मरून पडते. विषाबरोबरच माशी एक गंधयुक्त रसायन, याला फेरोमोन म्हणतात, तिथं आणि हवेत पसरवते. त्याच्या अोढीनं इतर माशाही तिथं आकर्षित होतात. अशा वेळी मग एकाऐवजी अनेक माशांचा डंख पचवावा लागतो. सहसा या विषाचा फारसा परिणाम होत नाही. मात्र जळजळ आणि खाज येऊ लागते. काही जणांना या विषाची अॅलर्जी असते. त्यांना मात्र सावधगिरी बाळगावी लागते. तातडीने उपचार करून घेणं योग्य ठरतं. अन्यथा या अॅलर्जीची प्रतिक्रिया तीव्र होऊन ती घातकही ठरू शकते. या विषात मेलिटिनबरोबरच हिस्टमिनही असल्यामुळे सहसा हिस्टीमिनला नाकाम करणारी उपाययोजना केली जाते.उतारवयातल्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना जर अनेक मधमाशांचा डंख झाला तर मात्र काही वेळा स्नायूंना इजा होऊ शकते. तसंच मूत्रपिंडांच्या कामातही बाधा आणली जाऊ शकते. तोंडात किंवा गळ्याजवळ डंख झाला तर त्यापायी श्वासनलिकेचं नियंत्रण करणारे स्नायू बाधित होतात व श्वासोच्छ्वासाला अडथळा होऊ शकतो. परंतु अशी परिस्थिती क्वचितच उद्भवते.*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••छंदिस्त हें मन माझें पंढरिनाथा । न सोडीं सर्वथा पाय तुझे ॥१॥ यासि काय करूं सांगा जी विठ्ठला । स्नेह कां लाविला पूर्वीहूनि ॥२॥ कांसवीचीं पिलीं सोडोनि निराळीं । दृष्टि पान्हाइलिं अमृतमय ॥३॥ तैस मी जवळुनि असेन पैं दुरी । दृष्टि मजवरी असों द्यांवी ॥४॥ तान्हें वछ घरीं धेनु चरे वनीं । हंबरे क्षनक्षनां परतोनि ॥५॥ नामा म्हणे देवा सलगी करीं निकट । झणें मज विकुंठ्ह पद देसी ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्याला जे हवे ते मिळविण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न आपण करत असतो.कारण हवं ते मिळविल्या शिवाय पाहिजे तसे समाधान मिळत नाही. पण,जरा आपल्या आजुबाजूलाही थोडी दृष्टी टाकून बघावे. कारण काहींना तर दोन घास खायला अन्न सुध्दा मिळत नाही आणि नेसायला वस्त्र सुद्धा नसते. त्यांचे जीवनही माणसाचेच आहे. मात्र माणूसच, माणसाला ओळखत नसल्याने माणुसकी संपत चालली आहे. यावर विचार करण्याची गरज आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दुस-याबाबतचा दृष्टीकोन*स्टार्मवेल नावाचे एक इंग्रज पत्रकार होते. ते एखाद्याची मुलाखत घेणार असतील तर त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी ते उघडपणे बोलून दाखवत असत.एकदा स्टार्मवेल यांना श्रीकृष्ण मेनन यांची मुलाखत घ्यावयाची होती. स्टार्मवेल यांनी आक्रमकपणे पहिलाच प्रश्न मेनन यांना विचारला," मिस्टर मेनन, तुम्ही अत्यंत गरीबीतून वर आलेला आहात. तुम्ही शाळेत वॉच स्काऊट म्हणून काम करत होता. एका इंग्रज महिलेने तुम्हाला आधार दिला व त्यांनीच तुम्हाला लंडनला पाठविले. तेथे कायदा आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेऊन तुम्ही भारतात परत आला. येथे पुन्हा तुम्हाला संघर्ष करावा लागला. त्याचवेळी पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे तुमच्याकडे लक्ष गेले. त्यांनी तुम्हाला योग्य संधी दिली. आज तुम्ही त्यांच्या जवळचे आहात. नेहरूंच्या मंत्रिमंडळात तुमची वर्णी लागणार आहे असे बोलले जात आहे. म्हणजेच तुम्ही तळातून उठून आकाशात जाऊन ठेपणार आहात. पण मिस्टर मेनन तुम्ही मला खरेच सांगा की, तुम्ही कम्युनिस्ट आहात हे खरे आहे का." मेनन यांनी शांतपणे पण ठाम स्वरात म्हणाले," तुम्ही माझे जे कौतुक केले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मलाही तुमचे कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे तुम्ही रस्तोरस्ती पेपर विकून तुमचे पोट भरत होता. तेथूनच तुम्ही मोठे झालात, आता तुम्हाला चांगला पगार मिळतो आहे. पण मलाही तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की, खरेच सांगा की तुम्ही एक अनौरस संतान आहात काय." मेनन यांच्या सडेतोडपणामुळे स्टार्मवेल यांची बोबडी वळाली आणि त्यांनी तो विषय टाळून दुस-या प्रश्नाकडे वळाले. तात्पर्य – दुस-याच्या खाजगी आयुष्यात डोकावताना त्याला दुःख देणा-या गोष्टींबाबत चर्चा न केलेली बरी असते. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही गोष्टी या अतिखासगी या प्रकारात मोडतात त्यामुळे दुस-याच्या आयुष्यात ढवळाढवळ न केलेलीच चांगली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 जानेवारी 2025💠 वार - ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1H1WJwJBJv/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚛️ *_आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन_* ⚛️•••••••••••••••••••••••••••••••• ⚛️ *_राष्ट्रीय बालिका दिवस_* ⚛️••••••••••••••••••••••••••••• ⚛️ *_ या वर्षातील २४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⚛️ *_महत्त्वाच्या घटना:_* ⚛️•••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:अॅपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटर्सची विक्री सुरू झाली.**१९७६:’बर्मा शेल’ या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव ’भारत रिफायनरीज’ असे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून ’भारत पेट्रोलियम’ (BPCL) असे करण्यात आले.**१९७२:गुआममध्ये इ. स.१९४४ पासून लपलेला जपानी सैनिक,शोइची योकोइ सापडला.त्याला दुसरे महायुद्ध संपलेले माहितीच नव्हते.**१९६६:भारताच्या तिसर्या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला.**१९६६:एअर इंडियाचे 'कांचनगंगा' हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ.होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले.**१९४३:पुण्यातील कॅपिटॉल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट होऊन चार जण ठार**१९४२:दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी बँकॉकवर बॉम्बहल्ला केला. यामुळे थायलँडला इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारणे भाग पडले.**१९१६:नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरविला.**१८६२:बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी करण्यात आली.**१८५७:दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.**१८४८:कॅलिफोर्निया गोल्डरश – कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले. या बातमीमुळे जगभरातून लाखो लोक सोने मिळवण्यासाठी कॅलिफोर्नियात दाखल होऊ लागले.* ⚛️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⚛️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: सरोजकुमार सदाशिव मिठारी -- लेखक, पत्रकार**१९८०: अतुल माधवराव राऊत -- कवी**१९७४: जयंत देवाजी लेंझे -- कवी* *१९७३: संदीप प्रभाकर मणेरिकर -- लेखक तथा दैनिक नवप्रभातचे उपसंपादक**१९७१: संतोष चंद्रकांत गायकवाड -- लेखक**१९७१: प्रा. डॉ. गणेश नत्थुजी चव्हाण -- प्रसिद्ध भरकाडीकार, लेखक, वक्ते, संपादक* *१९५६: रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर -- कवी, लेखक, संपादक**१९५६: प्रा. अशोक दगाजी शिंदे -- कवी, लेखक, संपादक* *१९५३: भगवान ठग -- प्रसिद्ध कवी आणि अनुवादक (मृत्यू: २२ जानेवारी२००९ )**१९५२: विजया दयानंद चिंचुरे -- लेखिका, कवयित्री**१९४७: जयप्रकाश बाळकृष्ण म्हात्रे -- विज्ञान चळवळीचे कार्यकर्ते, वक्ते, लेखक* *१९४४: रामदास पाध्ये -- बोलक्या बाहुलीचे निर्माते आणि त्यांचे प्रयोग करणारे कलाकार* *१९४४: अशोक शेवडे -- चित्रपट आणि नाटक विषयांवरील ज्येष्ठ पत्रकार (मृत्यू: १८ मार्च २०२१ )**१९४३: सुभाष घई – प्रसिद्ध हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक**१९३९: नामदेव वासुदेव लोटणकर -- कवी* *१९३६: लक्ष्मण बाकू रायमाने -- मराठी व कानडी साहित्याचे गाढे अभ्यासक, लेखक आणि समीक्षक**१९२६: जय ओम प्रकाश -- प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक(मृत्यू: ७ ऑगस्ट २०१९ )**१९२४: कर्पूरी ठाकुर -- भारतीय स्वतंत्र सेनानी बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री (मृत्यू : १७ फेब्रुवारी १९८८)* *१९२४: मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे – तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष (मृत्यू: २८ डिसेंबर २००० )**१९२३: रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर – मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री ’सांगत्ये ऐका’ नावाचे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७१ )**१९१८: वामन बाळकृष्ण भागवत -- लेखक, संस्कृत भाषातज्ज्ञ (मृत्यू: ९ फेब्रुवारी २००४ )* ⚛️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⚛️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६: आनंद विनायक जातेगावकर --मराठी कथालेखक व कादंबरीकार(जन्म: ६ जून १९४५ )**२०११: स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी – सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक (जन्म: ४ फेब्रुवारी १९२२ )**२००५: अनुताई लिमये – गोवा मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यात सक्रीय सहभाग घेणार्या स्वातंत्र्यसेनानी आदिवासी महिला व बालकांच्या कल्याणासाठी झटणार्याव सामाजिक कार्यकर्त्या**२०००: केशव पांडुरंग जोग -- राष्ट्रीय संस्कृत व्याख्याता, संशोधक (जन्म: २६ मार्च १९२५ )**१९९६: वसंत देव -- भारतीय लेखक, गीतकार आणि पटकथा लेखक (जन्म: २९ सप्टेंबर १९२९)**१९८९: रत्नमाला -- भारतीय चित्रपट सृष्टीतील महिला अभिनेत्री(जन्म: २२ जून १९२४)**१९६६: एअर इंडियाचे ’कांचनगंगा’ हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळुन भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ.होमी जहांगीर भाभा मृत्यूमुखी पडले. (जन्म: ३० ऑक्टोबर १९०९ )**१९६५: विन्स्टन चर्चिल – दुसर्या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक,वृत्तपत्रकार,थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: ३० नोव्हेंबर १८७४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त*मतदार राजा जागा हो .....!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुण्यातील अपार्टमेंटचा अनोखा पॅटर्न, सौर ऊर्जेमुळे दरमहा ३५ हजारांची बचत; राज्यातील पहिले १००% सौर ऊर्जेवर चालणारे अपार्टमेंट*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पाणी व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी, बारामतीच्या काऱ्हाटीसह सहा गावांच्या 'वॉटर वारियर्स'ना प्रजासत्ताक दिनी दिल्लीत विशेष सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दावोसमधून 15 लाख 70 कोटींची गुंतवणूक आणली:विदर्भ, एमएमआर, मराठवाड्यासह नाशिकसाठी करार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एसटी बस अपघात रोखण्यासाठी कठोर पावलं, बसस्थानकांवर तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, परिवहनमंत्री मिसाळ यांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे : मराठी गझलेचा नवा अध्याय:राजन लाखे यांच्या 'गझलायन' संग्रहाचे प्रकाशन, मराठी गझल जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हरित हायड्रोजन उत्पादनाच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी मोठी कामगिरी, भारती विद्यापीठाच्या विज्ञानम संघाला स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये संयुक्त विजेतेपद*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महिला क्रिकेट विश्वकप - भारताने श्रीलंकेचा 60 धावाने हरवून सलग तिसरा सामना जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राहुल तांबे, मुंबई👤 मेघा हिंगमिरे👤 आशिष कोटगिरे👤 सोनू राजेंद्र येरमलवाड👤 प्रशांत उकिरडे, सहशिक्षक, बार्शी👤 रेश्मा कासार, पुणे👤 सिध्दांत मनूरकर, पाथर्डी👤 योगेश फत्तेपुरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मोरोपंत - मोरेश्वर रामचंद्र पराडकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या गावाला *'सैनिकाचे गाव'* म्हणून ओळखले जाते ?२) जागतिक स्तरावरील पहिली मानव - रोबोट मॅरेथॉन स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे ?३) भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे ?४) 'मातीखालची माती' हे व्यक्तीचरित्र कोणाचे आहे ?५) ग्रामसेवकावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते ? *उत्तरे :-* १) कातूर्ली, ता. आमगाव २) चीन ( बीजिंग ) ३) कलम ५२ ४) आनंद यादव ५) गटविकास अधिकारी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चोरा ओढोनियां नेईजे जैं शुळीं । चालतां पाउलीं मृत्यु जैसा ॥१॥ तैसी परी मज जाली नारायणा । दिवसेंदिवस उणा होत असे ॥२॥ वृक्षाचिये मुळीं घालितां कुर्हाडी । वेंचे तैसी घडी आयुष्याची ॥३॥ नामा म्हणे हेंही लहरीचें जल । आटत सकळ भानुतेजें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वयाने लहान असलेल्यांकडून जेव्हा छोटीशी चूक होते तेव्हा सर्वजण त्याला नको त्या शब्दात बोलत असतात.पण,तीच चूक जेव्हा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीकडून होते त्यावेळी वयाने लहान असणारा समजावून सांगतो अशावेळी त्याला शहाणपणा शिकवू नको म्हणून हाकलून लावतात.बरेचदा वयाने मोठा असलेला माणूस समजदार असतोच असे नाही तर वयाने लहान असणारा सुद्धा अनुभवी असू शकतो म्हणून एखाद्याला कमी लेखून त्याचा अपमान करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रामाणिक पहारेकरी*एकदा शिवाजी महाराज तोरण्याहून राजगडाकडे जायला निघाले होते. राजगड अजून खुप दूर होता. पण दिवस मावळायला खूपच थोडा अवधी राहिला होता. राजगडावर पोहचणं शक्य नव्हतं. सहाजिकच महाराजांनी वाटेत असलेल्या एका गढीवजा किल्ल्यावर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात महाराज सोबत्यांसह इच्छित छोट्या किल्ल्यावर पोहचले. परंतु दिवस मावळला होता आणि त्याही गडाचे दरवाजे बंद झाले होते.' आता काय करायचं ?' असाप्रश्न साऱ्यांच्याच चेहऱ्यावर उमटला. पण दिवस मावळून अर्धा घटकाही झाला नव्हता. महाराज सोबत होते. ते काहीतरी मार्ग काढतील असा विश्वास सगळ्यांना होता.गडाचे दरवाजे बंद झालेत हे पाहून महाराज पुढे सरसावले. त्यांनी आवाज दिला, " कोण आहे रे पलीकडे ? दार उघड.""तुमी कोण हायसा ? " पहारेकऱ्यानं दरडावून विचारलं.पहारेकऱ्याचा दरडावणीचा स्वर ऐकून महाराजांना हसू आलं. तरही हसू दाबत महाराज म्हणाले," आम्ही महाराज आहोत."पण दरवाजावरचा पहारेकरी महाराजांनाच ओळखत नव्हता तर महाराजांचा आवाज कुठून ओळखणार. त्याला वाटलं ही काहीतरी शत्रूची चाल आहे. कुणीतरी महाराजांच्या नावाखाली आत घुसायला बघतोय.तो आपला विचार करत राहिला आणि इकडून शिवाजी महाराजांनी पुन्हा आवाज दिला, "आरे, उघड की दरवाजा.""तुमी कुणी बी असा पण दरवाजा उघडाया न्हाय जमायचं पाव्हणं. आवं सांजच्यापासून तांबडं फुटूस्तोवर काय बी झालं तरी गडाचा दरवाजा उघडायचा न्हायी आसा शिवाजी महाराजाचाच हुकुम हाय. आन आमचं महाराज काय बी झालं तरी सवताचा हुकूम सवता कधीच मोडाया सांगत नाहीत असं समदी म्हणत्यात. आवं कुणी बी लुंग्या मुंग्या यईल आन महाराजांचं नाव घिवून दार उघडाया सांगण. आमाला एवढं कळंना व्हय. तवा तुमी कुणी बी असा रातभर भायीरच बसा. दिस उजाडल्यावर बघू आपण काय आसन ते." महाराजांकडे आता कुठलाच मार्ग नव्हता. धाक दडपशाही करून त्यांनीच घालून दिलेला शिरस्ता त्यांना मोडायचा नव्हता. महाराजांनी आख्खी रात्र गडाबाहेर उघड्यावर काढली. सकाळ झाली. गडाला जाग आली. हळूहळू किलकिले होत गडाचे दरवाजे उघडले. पहारेकऱ्यानं रात्रीचे पाहुणे दारातच असल्याचं पाहिलं. त्यांची नीट खातरजमा करूनत्यांना आत घेतलं. पण चौकशी करताना जेव्हा पहारेकऱ्याच्या कळालं कि ज्यांना रात्री आपण दरवाजावर आडवलं ते खरोखरच महाराजच होते तेव्हा मात्र त्याचे धाबे दणाणले. त्याला त्याचा कडेलोट दिसू लागला. चेहरा भीतीने पंधरा पडला. पहारेकऱ्याची अवस्था महाराजांच्या लक्षात आली. तोशांत पावलानं पहारेकऱ्याजवळ गेले. त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. स्वतःच्या गळ्यातला कंठा काढून त्याच्या गळ्यात घातला. आणि म्हणाले, "तुमच्यासारख्या प्रामाणिक सोबत्यांच्या जिवावरच आमचं स्वराज्य उभं आहे. "•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 जानेवारी 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15zLvZsySQ/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••✍️ *_जागतिक हस्ताक्षर दिन_* ✍️••••••••••••••••••••••••••••••••• ✍️ *_ या वर्षातील २३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ✍️ *_महत्त्वाच्या घटना:_* ✍️•••••••••••••••••••••••••••••••••*२००२:वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनिअल पर्ल याचे कराचीतुन अपहरण**१९९७:मॅडलिन ऑलब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनल्या.**१९७३:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम बरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले.**१९६८:शीतयुद्ध – उत्तर कोरियाने अमेरिकेची यू.एस.एस.प्युएब्लो ही युद्धनौका ताब्यात घेतली.**१९४३:दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने त्रिपोली (लिबीयाची राजधानी) शहर जिंकले.**१९३२:’प्रभात’च्या ’अयोध्येचा राजा’ची हिन्दी आवृत्ती’अयोध्याका राजा’ मुंबईत प्रदर्शित झाली.**१८४९:डॉ.एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर बनली.**१७०८:छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.* ✍️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ✍️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: कीर्ति नागपुरे -- भारतीय अभिनेत्री**१९९०: देविदास महादेव सौदागर -- प्रसिद्ध लेखक, कवी(साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार प्राप्त)**१९७१: मेघना जोशी -- कवयित्री* *१९६९: अनिल मनोहर कपाटे (अनिल शेवाळकर) -- कवी, कथाकार, कादंबरीकार* *१९६६: भागवत घेवारे -- कवी* *१९६६: डॉ. विजयकुमार देशमुख -- प्रसिद्ध कवी**१९६२: मेधा इनामदार -- लेखिका* *१९५५: भगवान कृष्णा हिरे -- प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, लेखक,तज्ञ परीक्षक* *१९५३: डॉ. विलास चिंतामण देशपांडे -- प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, संपादक* *१९५२: अशोक बाबुराव लोणकर -- कवी, लेखक, संपादक**१९५०: आसावरी काकडे -- प्रसिद्ध मराठी-हिंदी कवयित्री आणि गद्यलेखिका**१९४७: मेगावती सुकार्नोपुत्री – इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष**१९४७: रमेश सिप्पी -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक व निर्माता**१९४७: डॉ. प्रमिला जरग -- लेखिका**१९४६: विजय पांडुरंग शेट्ये -- कवी, लेखक**१९४६: डॉ. सुभाष सावरकर -- साहित्यिक, समीक्षक, संपादक (मृत्यू: २३ सप्टेंबर २०१३ )**१९३९: अॅड.जयंत काकडे -- प्रसिद्ध साहित्यिक, व्यंगचित्रकार* *१९३५: विलास शंकरराव साळोखे -- लेखक**१९३५: प्रमोद सच्चिनानंद नवलकर --- जेष्ठ साहित्यिक, माजी मंत्री (मृत्यू: २० नोव्हेंबर २००७ )**१९३४: सर विल्यम हार्डी – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ एप्रिल १८६४ )**१९२६: बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे -- महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक,राजकारणी,संपादक, व्यंगचित्रकार (मृत्यू: १७ नोव्हेंबर २०१२ )**१९२०: श्रीपाद रघुनाथ जोशी --- कोल्हापूर येथील मराठी लेखक, शब्दकोशकार व अनुवादक (मृत्यू: २४ सप्टेंबर २००२ )* *१९१५: कमलनयन बजाज – उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव,बजाज आटो,बजाज इलेक्ट्रिकल्स,उदयपूर सिमेंट इ. कंपन्यांचे अध्यक्ष (मृत्यू: १ मे १९७२ )**१८९८: पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक,पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य (मृत्यू: १७ डिसेंबर १९५६ )**१८९७: नेताजी सुभाषचंद्र बोस -- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ )**१८१४: सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९३ )*✍️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ✍️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: प्रा. डॉ. अनिल नितनवरे -- मराठीचे गाढे अभ्यासक, कवी, प्रयोगशील एकांकिकाकार तथा समीक्षक (जन्म: १९६५ )**२०१०: पं. दिनकर कैकिणी – शास्त्रीय गायक (जन्म: २ ऑक्टोबर १९२७ )**२००८: राजाभाऊ देव -- हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातील थोर गायक, गुरू(जन्म: १३ सप्टेंबर १९१७ )**१९९२: ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर– भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढेअभ्यासक (जन्म: १५ मे १९०४ )**१९८९: साल्वादोर दाली – स्पॅनिश चित्रकार. (जन्म: ११ मे १९०४ )**१९८२: मुद्दू बाबू शेट्टी -- हिंदी चित्रपटातील स्टंटमन,अॅक्शन कोरिओग्राफर आणि अभिनेता (जन्म: १ जानेवारी १९३८ )**१९५९: विठ्ठल नारायण चंदावरकर – शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित**१९३१: अॅना पाव्हलोव्हा – ’द डाइंग स्वान’ म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना (जन्म: १२ फेब्रुवारी १८८१ )**१९१९: राम गणेश गडकरी – प्रसिद्ध नाटककार, कवी व विनोदी लेखक(जन्म:२६ मे १८८५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त*सुंदर अक्षर : एक दागिना*कुणाचे सुंदर हस्ताक्षर पाहिले की आपण सहज म्हणून जातो, अरे व्वा ! काय सुंदर मोत्यासारखे अक्षर आहे. त्याच्या लेखनाची खूप तारीफ करतो. सुंदर अक्षर काढण्यासाठी तशी मेहनत आणि सराव करावा लागतो. ते ही एक तपश्चर्या आहे, नाही का ? ............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि सुकन्या समृद्धी योजनेला दहा वर्षे पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रीय आरोग्य अभियानाला पाच वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यभरातल्या सर्व बसस्थानकावर वर्षभर स्वछता मोहीम, मोहिमेला आजपासून होणार सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *रिलायन्स सोबत 3 लाख कोटींचा करार, 3 लाख रोजगार होतील उपलब्ध - मुख्यमंत्री*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक जिल्ह्यात कृषी विभागाची मोठी कारवाई, 3 हजार 600 हेक्टर क्षेत्राचा बोगस पिक विमा रद्द, सरकारच्या तिरोजीचा भुर्दंड वाचला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोलकता येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात भारताने इंग्लंडवर 7 विकेटनी मिळविला विजय, अभिषेक शर्माची जोरदार फटकेबाजी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मुखीत अहमद, शिक्षक, नांदेड👤 एम. बी. ढगे👤 नम्रता उबाळे, तिवसा, आष्टी👤 शंकर नरवाडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*माधव जूलियन- माधव त्र्यंबक पटवर्धन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आदर दिला तरच आपली मूल्ये आणि संस्कार टिकून राहतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ) बाबत धोरण राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे ?२) महाराष्ट्रामध्ये कोणत्या परिसराला 'आल्लापल्ली अरण्य' असे म्हणतात ?३) भारतीय महिला संघाकडून सर्वात जलद एकदिवसीय शतकाचा विक्रम कोणी केला आहे ?४) 'साप या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) मुंबईतील वानखेडे स्टेडियमला १९ जानेवारी २०२५ ला किती वर्षे पूर्ण झाली ? *उत्तरे :-* १) महाराष्ट्र २) चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचा पूर्व भाग ३) स्मृती मानधना ४) सर्प, भुजंग, अही ५) ५० वर्षे *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आपल्याला भूक का लागते ?* 📙 आपलं शरीर सतत काम करत असतं. जेव्हा आपण विश्रांती घेत असतो किंवा झोपेत असतो तेव्हाही श्वसन, रक्ताभिसरण, हृदयाची धडधड यांसारख्या प्रक्रिया चालूच असतात. त्यामुळे शरीराला सतत ऊर्जेची गरज भासते. हिचा पुरवठा अखंड असण्यासाठी शरीराला वेळोवेळी पोषण मिळणं आवश्यक असतं. आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा हे पोषण मिळतं. ते साठवूनही ठेवलं जातं. पण तो साठा संपला की परत पोषक पदार्थ शरीराला मिळण्याची गरज असते. याचीच जाणीव आपल्याला करून देण्यासाठी भुक लागण्याची भावना निर्माण होते.आपल्या मेंदूमधील हायपोथॅलॅमस या अवयवामध्ये भुकेवर नियंत्रण ठेवणारं केंद्र असतं. त्याला संदेश मिळाला की ते कार्यरत होतं आणि भुकेची भावना जागृत करतं. त्या केंद्राला मिळणारे संदेश विविध प्रकारचे असतात. त्यातले काही शरीराच्या आतून उत्पन्न होतात. म्हणजेच ते अंतर्गत असतात, तर काही बाहेरून येणारे असतात.शरीराला ऊर्जा मिळते ते ग्लुकोजच्या ज्वलनातून. त्यामुळे रक्तात ग्लुकोजचं प्रमाण एका निर्धारित पातळीवर नेहमी राहील याची व्यवस्था केलेली असते. ते जर त्या पातळीपेक्षा फारच चढलं तर ते आरोग्याला बाधक असल्यानं इन्सुलीन या संप्रेरकाचा पाझर सुरू होतो. ते संप्रेरक ग्लुकोजची निर्धारित पातळी राखण्यात मदत करतं. जर ग्लुकोजची पातळी या निर्धारित प्रमाणापेक्षा फारच घसरली तर तो संदेश मिळून भुकेचं केंद्र जागृत होतं. त्यावेळी आपण पुरेसं अन्न पोटात टाकलं तर मग भुक मिटल्याची भावनाही याच केंद्रातून निर्माण केली जाते.आपल्या पोटाचं आकारमानही विशिष्ट पातळीवर ठेवण्याची व्यवस्था केली जाते. तसंच ते काही विविक्षित प्रमाणात भरलेलं असेल हेही बघितलं जातं. पोट जर रिकामं झालं तर ते आकुंचन पावून त्याचं आकारमान घटतं. भुकेचं केंद्र जागृत करायला तोही एक संदेश पुरतो. अशा वेळी पाणी पिऊन आकारमान वाढवलं तरीही भुक भागल्याची भावना निर्माण होते.आज जरी आपल्याला हवं तेव्हा अन्न उपलब्ध होत असलं तरी आदिमानवाच्या काळात जेव्हा रानावनात कंदमुळे गोळा करून किंवा शिकार करून मनुष्यप्राणी आपली पोषणाची गरज भागवत होता. तेव्हा अन्न केव्हा मिळेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे असं ते मिळालं की प्रत्यक्ष पोषणाची आवश्यकता असो-नसो, त्याच्या दर्शनाने किंवा गंधानंही भुकेची भावना चाळवली जात असे. उत्क्रांतीच्या ओघात हा गुणधर्म टिकून राहिला आहे. त्यामुळे स्वादिष्ट अन्न दिसलं किंवा त्याचा दरवळ नाकपुड्यांना चाळवून गेला म्हणजेही आपल्याला भूक लागते.*बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घालूनि आसन साधिला पवन । घेतलें जीवन अंतरिक्षीं ॥१॥ पराहस्तें तृप्ति नव्हे जी दातारा । कृपा करुणा करुणा करा केशिराजा ॥२॥ जीवाचें जीवन तूं सर्वांचें कारण । धांव मजालागुन केशिराजा ॥३॥ अनाथाचा नाथ हेंज ब्रीद साचार । झणें माझा अव्हेर करिसी देवा ॥४॥ विष्णुदास नामा अंकियेला तुझा । विनवी केशिराजा प्रेमसुखें ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनेकदा वादळवारा येत असते.आणि नुकसान करून जाते. पण, जे काही नुकसान झाले असते त्याला व्यवस्थितपणे करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. पण, अचानक जेव्हा जीवनात वादळ,वारे न सांगता येतात तेव्हा मात्र तेच वादळ,वारे जगणेच नकोसे करून टाकत असते अशा प्रसंगी एका चांगल्या व्यक्तीची गरज असते. कारण ती व्यक्ती त्या वादळातून बाहेर काढण्यासाठी मदत करत असते म्हणून अशा भयानक प्रसंगी चुकीचे पाऊल उचलू नये तर चांगल्या विचारी माणसाच्या सहवासात रहावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मनःशांतीचे रहस्य*एका गावात एक महात्मा राहत होते. ते अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाचे म्हणून ओळखले जात. त्यांना कोणत्याही गोष्टीचा कधीच राग येत नसे. कुणी त्यांच्याशी कधी उद्धटपणे बोलला किंवा गैर वागला तरी त्यांच्या कपाळावर कधीच आठी उमटत नसे. ते सदैव हसतमुख व आनंदी राहत असत. ज्या लोकांना त्यांचे हे वागणे आवडत नसे ते लोक त्यांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत असत. परंतु महात्म्याच्या तोंडून कधीही एखादा वेडावाकडा उदगार देखील बाहेर पडत नसे कि चेह-यावरही कधी त्रासिक भाव उमटत असे. अनेक लोकांनी जंग जंग पछाडले तरी महात्म्याला राग काही आलेला कुणीच पाहिला नव्हता शेवटी त्यांच्या या संयमशीलतेचे रहस्य काय असावे हे विचारण्यासाठी काही लोक महात्म्याकडे गेले. त्यांच्यातील एकाने विचारले, "महाराज, तुम्ही कधीच रागवत नाही, चिडत नाही, शांत कसे काय राहू शकता. तुमच्यात इतकी सहनशक्ती कोठून आली आहे." महात्म्यांनी उत्तर दिले, "मित्रांनो, ज्यांचे उद्दिष्ट अत्यंत उच्च पातळीवर जायचे असते त्यांना खालच्या पातळीवर जायची कधीच गरज पडत नाही. मी खालच्या पातळीवर कधीच उतरायला तयार नसतो. मला असे वाटते की, माझ्याबद्दल लोकांना काय वाटायचे ते वाटू दे पण आपले मन विरोधी विचारांनी कलुषित करून घ्यायचे नाही. मी जेव्हा जमिनीकडे नजर टाकतो तेव्हा क्षमाशीलतेचे मोठे प्रतिक दिसून येते. लोकांनी किती त्रास दिला जमिन क्षमा करते. आपल्या गरजा किती मर्यादित आहेत हे भान जर प्रत्येकाने ठेवले तर प्रत्येकजण माझ्याइतका शांत होऊ शकतो. ज्यांच्या मनात करूणा आणि सगळयांना सारखे लेखण्याची भावना असते तो निर्विकार वृत्तीनेच राहतो."•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/126o5UjRjsG/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ☸️ *_ या वर्षातील २२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☸️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☸️•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: ’आय.एन.एस.मुंबई’ ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाली.**१९७१: सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९६३: अंधांसाठी देहराडून येथे राष्ट्रीय ग्रंथालयाची स्थापना**१९५८: इजिप्त व सीरिया यांचा संयुक्त राष्ट्र स्थापनेबद्दलचा कौल जाहीर झाला त्यानुसार पहिले अध्यक्ष म्हणून गमाल अब्दुल नासार यांची निवड झाली**१९४७: भारतीय घटनेची रुपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर**१९२४: रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.**१९०१: राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.* ☸️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☸️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७६: प्रतिक पुरी-- मराठी, इंग्रजी, हिंदी भाषांतून लेखन करणारे लेखक आणि मुक्त पत्रकार**१९७५: रितू शिवपुरी -- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल**१९७२: नम्रता शिरोडकर -- भारतीय सिने अभिनेत्री व मॉडेल**१९६८: प्रा. डॉ. शैलेश विश्वनाथ त्रिभुवन -- प्रसिद्ध लेखक, संपादक* *१९६६: सुनील गंगाधरराव वेदपाठक -- लेखक तथा जिल्हा सत्र न्यायाधीश**१९६३: प्रा. दीपक देशपांडे --महाराष्ट्राचे हास्य सम्राट, कॉमेडियन**१९६०: प्रा. डॉ. कृष्णा वसंतराव साकुळकर -- लेखक* *१९५२: विजय कुवळेकर -- माजी माहिती आयुक्त,लेखक,वक्ते**१९४५: प्रा. डॉ. वि. स. जोग -- प्रसिद्ध ज्येष्ठ समीक्षक, विचारवंत**१९४१: गंगाराम महादेव गवाणकर -- लेखक* *१९३७: विश्वनाथ शंकर चौघुले -- लेखक* *१९३६: माधुरी मधुकर किडे -- ज्येष्ठ लेखिका* *१९३५: उषा भास्करराव हस्तक -- लेखिका* *१९३४: विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४ )**१९३२: वसंत वामनराव मून -- संपादक, संशोधक (मृत्यू: १ एप्रिल २००२ )**१९२२: प्रा. शांता बुध्दीसागर -- लेखिका**१९२०: प्रा. ह. श्री. शेणोलीकर – संतसाहित्याचे अभ्यासक (मृत्यू: ८ जुलै २००३ )**१९१६: सत्येन बोस – बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक(मृत्यू: ९ जून १९९३ )**१९१६: हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी (मृत्यू: १५ जानेवारी १९९४ )**१९०९: यू. थांट – संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९७४ )**१८८९: भास्कर पांडुरंग हिवाळे -- लेखक,संस्थापक ( मृत्यू: ७ सप्टेंबर १९६१ )**१५६१: सर फ्रँन्सिस बेकन – इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी (मृत्यू: ९ एप्रिल १६२६ )* ☸️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☸️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: किर्ती शिलेदार -- मराठी गायिका अभिनेत्री व लेखिका (जन्म:१६ ऑगस्ट १९५२)**२०२१: नरेंद्र चंचल -- प्रतिष्ठित भजन आणि हिंदी चित्रपट गीतांचे ते गायक(जन्म: १६ ऑक्टोबर १९४० )**२०१४: अक्किनेनी नागेश्वरा राव -- भारतीय अभिनेता आणि निर्माता (जन्म: २० सप्टेंबर १९२४ )**२००४: अलका इनामदार -- ज्येष्ठ अभिनेत्री**१९७८: हर्बर्ट सटक्लिफ – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २४ नोव्हेंबर १८९४ )**१९७५: ’काव्यविहारी’ धोंडो वासुदेव गद्रे – केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी (जन्म: १६ नोव्हेंबर १८९४ )**१९७३: लिंडन बी.जॉन्सन – अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २७ ऑगस्ट १९०८ )**१९७२: स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ (जन्म: ३ ऑक्टोबर १९०३ )**१९६७: डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे – क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि'गदर पार्टी’ चे शिल्पकार (जन्म: ७ नोव्हेंबर १८८४ )**१९०१: व्हिक्टोरिया – इंग्लंडची राणी,हिने ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य केले.(जन्म: २४ मे १८१९ )**१७९९: होरॅस बेनेडिट्ट डी सास्युरे – ऑस्ट्रियन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक**१६८२: समर्थ रामदास स्वामी (जन्म: १६०८ )**१६६६: ५ वा मुघल सम्राट शहाजहान याचे आपल्याच मुलाच्या (औरंगजेब) कैदेत १० वर्षे राहिल्यानंतर निधन (जन्म: ५ जानेवारी १५९२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्यातील चढ-उतार*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *संभाजीनगरातील मर्मबंधा गव्हाणे यांची भरारी, आंतरराष्ट्रीय अतिथी नेतृत्व कार्यक्रमासाठी निवड, देशातील 5 महिला पटकथा लेखिकांचाही समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुणे - 'मी गीता बोलतीय' पुस्तकाचे प्रकाशन, भगवद्गीतेतून मिळतो आदर्श जीवनाचा मार्ग, लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सरकारी कार्यालयात फेऱ्या मारणे होणार बंद, जन्म-मृत्यू दाखला मिळणार व्हाट्सअप्पवर, आंध्रप्रदेश सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दावोसमध्ये गडचिरोलीसाठी पहिला करार, 5 हजार 200 कोटींची गुंतवणूक, 4 हजार रोजगार निर्मिती होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सीमेवर आणीबाणी ते पॅरिस करारातून माघार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतले निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *संत साहित्याचे अभ्यासक व प्रसिद्ध कीर्तनकार हभप डॉ. किसन साखरे महाराज यांचे पुण्यात निधन, आळंदीत अंत्यसंस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *U19 Womens T20 World Cup 2024 : टीम इंडियाच्या महिला संघाने यजमान मलेशिया संघावर तब्बल 10 विकेट्सने विजय मिळवला असून त्यांनी विजयासाठी दिलेलं टार्गेट अवघ्या 17 बॉलमध्ये केलं पूर्ण केलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संगीता संजय जाधव, मुख्याध्यापिका, KGBV, धर्माबाद👤 हरीश बलकेवाड👤 स्वप्नील ईबीतवार, धर्माबाद👤 श्याम पोरडवाड👤 महेश मुदलोड👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोविंदाग्रज - राम गणेश गडकरी*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आनंद हे अमृत आहे ; परंतु हे अमृत प्राप्त करून घेण्यासाठी मंथन करणे आवश्यक आहे. दुःखाचे मंथन केल्याने आनंदरुपी अमृत प्राप्त होते. - पराशर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पहिला पुरूष खो-खो विश्वकप कोणी पटकावला ?२) पुरूष खो-खो विश्वकपचा उपविजेता संघ कोणता ?३) भारतीय महिलांनी कोणत्या संघाविरुध्द खो-खो सामन्यात १७५ गुण मिळवत विश्वविक्रम रचला ?४) 'समाधान' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारत सरकारने कोणत्या आयोगाच्या जागी निती आयोगाची स्थापना केली आहे ? *उत्तरे :-* १) भारत २) नेपाळ ३) दक्षिण कोरिया ४) आनंद, संतोष ५) नियोजन आयोग*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आपल्याला पाच बोटे का असतात ?* 📙खरं तर हा प्रश्न, आपल्याला पाचच बोटं का असतात, असा विचारायला जायला हवा. आपल्या हातांना तसंच पायांना पाच पाच बोटंच असतात. क्वचित काही जणांना एका किंवा दोन्ही हातांना वा पायांना सहावं बोट असतं. सहापेक्षा अधिक बोटं सहसा आढळत नाहीत; पण सहा बोटं असणंही अपवादात्मकच आहे. ती काही सामान्य स्थिती नाही. बरं, फक्त मनुष्यप्राण्याच्या बाबतीतच ही स्थिती आहे असं नाही. कोंबड्या, उंदीर, मांजर, कुत्रा, वाघ, सिंह, वानर अनेक प्राण्यांच्या पायांना पाच बोटं असतात. खुरं असणाऱ्या जनावरांना पाचापेक्षा कमी बोटं असतात. म्हणजेच त्यांची एकापेक्षा अधिक बोटं जोडली जाऊन त्यांचं एकच एक जाडजूड बोट तयार होतं. त्यामुळे त्यांच्या बोटांची संख्या पाचापेक्षा अधिक होत नाही. हे असं का होतं ? बोटांवर ही पाचाची मर्यादा का पडली ? असे प्रश्न मनात उमटायला लागतात. याला जसं उत्क्रांतीच्या प्रवाहाचं कारण आहे तसंच सर्व प्राणीमात्रांच्या वाढीला कारणीभूत असणाऱ्या जनुकांची प्रणालीही जबाबदार आहे. उत्क्रांतीच्या प्रवाहात ज्या एखाद्या गुणधर्मामुळे जीवनकलह सुसह्य़ व्हायला त्या विशिष्ट पर्यावरणात तगून राहायला मदत होते, त्या गुणधर्माचा जतन होतं. झाडाच्या फांदीवरची पकड घट्ट होण्यासाठी किंवा हातात पकडलेल्या वस्तूवरची पकड घट्ट होण्यासाठी पाच बोटांची मदत होते, हे स्पष्ट झाल्यावर त्या गुणधर्माच्या प्रकटीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जनुकांचं संवर्धन झालं. उत्क्रांतीच्या ओघात प्राण्यांच्या नवनवीन प्रजाती उदयाला येताना या गुणधर्मात बदल होण्याचं टळलं.प्रत्येक प्राण्याची सुरुवात एकमेव फलित पेशीपासून होत असते. प्रथम त्या पेशीचं विभाजन होऊन दोन पेशी जन्माला येतात. याच प्रकारे केवळ विभाजन होऊन पेशींच्या संख्येत वाढ होते. या सर्व पेशी हुबेहुब एकसारख्या असतात. त्यानंतर विशिष्ट काळी या पेशींपासून वेगवेगळ्या अवयवांच्या निर्मितीची मुहूर्तमेढ रचली जाते. ती होण्यासाठी त्याला कारक असणारी जनुकं कार्यान्वित होतात. त्यांना 'होमिओबॉक्स जीन्स' असं म्हणतात. त्याच्या प्रभावापोटी गर्भामधील अवयवांकुराचं पाच भागांमध्ये विभाजन होतं. त्यातील काही भाग शरीराच्या पुढच्या भागातील अवयवांच्या निर्मितीच्या कामाला लागतात, तर इतर पाठीमागील अवयवांच्या निर्मितीचं काम करायला लागतात. या अवयवांकुराचे असे पाचच भाग होत असल्यामुळं मग हातापायांना फुटणाऱ्या बोटांच्या संख्येवरही मर्यादा येते. शिवाय अशी पाच बोटं त्यांच्यावर सोपवल्या जाणार्या पकडीच्या कामासाठी पर्याप्त असल्यामुळं त्यांच्या संकेत काही बदल करण्याचं प्रयोजनच पडलं नाही. जेव्हा कधी या जनुकांमध्ये होणाऱ्या उत्परिवर्तनापायी पाचाहून अधिक बोटं तयार होतात त्या वेळीही ते अतिरिक्त बोट पाचांपैकी कोणत्या तरी एका बोटाला जोडलेलंच राहतं. हृतिक रोशनच्या डावीकडील हाताच्या अंगठ्याकडे पाहा म्हणजे याची खात्री पटेल.*बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुण दोष माझे पाहों नको आतां । तारिसी अनंता मज आतां ॥१॥ अगाध महिमा काय वानूं हरी । गोकुळाभीतरीं गाई राखी ॥२॥ अंबऋषीसाठीं जन्म सोशियले । महत्त्वाचे केले हूड स्वयें ॥३॥ नामा म्हणे तुझे नामाचेनि बळ । प्रसादें केवळ लाधलों मी ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तके नेहमीच वाचून काढावे त्यातून ज्ञान मिळत असते. सोबतच त्यातून मार्गदर्शन सुध्दा मिळत असते. तसेच आपल्या जीवनात जे काही प्रसंग, अडीअडचणी आले असतील त्या परिस्थितीला सुद्धा कधीही विसरू नये. जसं की पुस्तके आपल्याला घडवत असतात तसेच ज्या परिस्थितीतून आपण गेलेलो असतो ती परिस्थिती सुद्धा आपल्याला अनुभवाने परिपूर्ण बनवत असते.तो अनुभव पैशाने विकत घेता येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दुस-याबाबतचा दृष्टीकोन*स्टार्मवेल नावाचे एक इंग्रज पत्रकार होते. ते एखाद्याची मुलाखत घेणार असतील तर त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी ते उघडपणे बोलून दाखवत असत. एकदा स्टार्मवेल यांना श्रीकृष्ण मेनन यांची मुलाखत घ्यावयाची होती. स्टार्मवेल यांनी आक्रमकपणे पहिलाच प्रश्न मेनन यांना विचारला," मिस्टर मेनन, तुम्ही अत्यंत गरीबीतून वर आलेला आहात. तुम्ही शाळेत वॉच स्काऊट म्हणून काम करत होता. एका इंग्रज महिलेने तुम्हाला आधार दिला व त्यांनीच तुम्हाला लंडनला पाठविले. तेथे कायदा आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेऊन तुम्ही भारतात परत आला. येथे पुन्हा तुम्हाला संघर्ष करावा लागला. त्याचवेळी पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे तुमच्याकडे लक्ष गेले. त्यांनी तुम्हाला योग्य संधी दिली. आज तुम्ही त्यांच्या जवळचे आहात. नेहरूंच्या मंत्रिमंडळात तुमची वर्णी लागणार आहे असे बोलले जात आहे. म्हणजेच तुम्ही तळातून उठून आकाशात जाऊन ठेपणार आहात. पण मिस्टर मेनन तुम्ही मला खरेच सांगा की, तुम्ही कम्युनिस्ट आहात हे खरे आहे का." मेनन यांनी शांतपणे पण ठाम स्वरात म्हणाले," तुम्ही माझे जे कौतुक केले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मलाही तुमचे कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे तुम्ही रस्तोरस्ती पेपर विकून तुमचे पोट भरत होता. तेथूनच तुम्ही मोठे झालात, आता तुम्हाला चांगला पगार मिळतो आहे. पण मलाही तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की, खरेच सांगा की तुम्ही एक अनौरस संतान आहात काय." मेनन यांच्या सडेतोडपणामुळे स्टार्मवेल यांची बोबडी वळाली आणि त्यांनी तो विषय टाळून दुस-या प्रश्नाकडे वळाले. तात्पर्य – दुस-याच्या खाजगी आयुष्यात डोकावताना त्याला दुःख देणा-या गोष्टींबाबत चर्चा न केलेली बरी असते. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही गोष्टी या अतिखासगी या प्रकारात मोडतात त्यामुळे दुस-याच्या आयुष्यात ढवळाढवळ न केलेलीच चांगली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 जानेवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2019/10/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌐 *_ या वर्षातील २१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌐 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌐•••••••••••••••••••••••••••••••••*२०००: ’फायर अँड फरगेट’ या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.**१९७२: मणिपूर आणि मेघालय यांना राज्याचा दर्जा मिळाला.**१९६१: इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिंबरो यांची पहिली भारतभेट**१८०५: होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.**१७९३: राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा १६ वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला.**१७६१: थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.* 🌐 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌐••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: लोकनाथ काळमेघ-पाटील -- पत्रकार, स्तंभलेखक**१९८६: सुशांत सिंग राजपूत -- भारतीय प्रसिद्ध सिने-अभिनेता ( मृत्यू: १४ जून २०२०)**१९८३: संतोष वसंत साळवे -- कवी**१९७४: कीर्ती गायकवाड केळकर -- अभिनेत्री**१९६५: गणेश परशराम उदावंत -- कवी, लेखक, दै. सामना वृत्तपत्राचे उपसंपादक* *१९५८: भूपेंद्र गणवीर -- वरिष्ठ संपादक , लेखक**१९५६: जयश्री जोशी -- प्रसिद्ध लेखिका, अनुवादक* *१९४९: रमेश रामकृष्ण बेलगे -- प्रसिद्ध कवी* *१९४८: सरोज सुधीर टोळे -- कवयित्री, लेखिका, संपादिका**१९४८: युसुफ हुसेन -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेता (मृत्यू: ३० ऑक्टोबर २०२१ )**१९४७: डाॅ. अश्विनी रमेश धोंगडे -- प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका* *१९४५: ललिता देसाई ऊर्फ आशू -- मराठी नाट्य-चित्रपटअभिनेत्री**१९४४: वसंत दत्तात्रेय गुर्जर -- मराठीतील प्रसिद्ध कवी* *१९३५: गजानन विठ्ठल साळवी -- लेखक**१९३३: रंगनाथ रामदयाल तिवारी -- मराठी व हिंदी भाषेतील प्रसिद्ध लेखक**१९३३: हनुमंत अनंत ऊर्फ ह.अ.भावे -- दुर्मिळ साहित्य प्रकाशित करून मराठी वाङ्मयामध्ये मोलाची भर घालणारे ‘वरदा’ प्रकाशनचे संचालक (मृत्यू: १८ जून २०१३ )**१९३२: राजदत्त -- ज्येष्ठ दिग्दर्शक**१९२४: अ. ज. राजुरकर-- “चंद्रपूरचा इतिहास” या पुस्तकाचे लेखक (मृत्यू: सप्टेंबर १९९२ )**१९२४: प्रा. मधू दंडवते – रेल्वे मंत्री,अर्थतज्ञ (मृत्यू: १२ नोव्हेंबर २००५ )**१९२१: शरच्चंद्र मुक्तिबोध -- कवी, समीक्षक, कादंबरीकार (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९८४ )**१९१०: शांताराम आठवले – चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार.’ भाग्यरेखा’, ’वहिनीच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ वगैरे अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते.(मृत्यू: २ मे १९७५ )**१८९४: माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ ’माधव जूलियन’ – कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९३९ )**१८८५: वासुदेव कृष्ण भावे --- चरित्रकार (मृत्यू: १९ नोव्हेंबर १९६३ )**१८८२: वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक (मृत्यू: २० जुलै १९४३ )**१८७४: बाळकृष्ण अनंत भिडे -- मराठी इतिहासकार, कवी व समीक्षक (मृत्यू: २ मे १९२९ )**१८५७: गंगाधर रामचंद्र मोगरे -- मराठीतील कवी, मराठीतील उपहासकाव्याचे जनक.(मृत्यू: ११ जानेवारी १९१५ )* 🌐 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌐••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६: मृणालिनी साराभाई -- भारतीय नृत्यांगना (जन्म: ११ मे १९१८)**१९९८: सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख (जन्म: २१ जून १९१६ )**१९८०: माधव भास्कर आचवल -- समीक्षक, ललित लेखक (जन्म: ३ नोव्हेंबर १९२६ )**१९७८: भवानीशंकर श्रीधर पंडित -- कवी, समीक्षक ( जन्म: २८ एप्रिल १९०६ )**१९६५: हरिकीर्तन कौर ऊर्फ ’गीता बाली’ – अभिनेत्री (जन्म: १९३० )**१९५९: सेसिल डी मिल – अमेरिकन चित्रपट अभिनेता,निर्माता व दिग्दर्शक (जन्म: १२ ऑगस्ट १८८१ )**१९५०: एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल – इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार (जन्म: २५ जून १९०३ )**१९४५: रास बिहारी घोष – क्रांतिकारक (जन्म: २५ मे १८८६ )**१९४३: क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली.(जन्म: २३ मार्च १९२३ )**१९२४: ब्लादिमिर लेनिन – रशियन क्रांतिकारक (जन्म: २२ एप्रिल १८७० )**१७९३: लुई (सोळावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: २३ ऑगस्ट १७५४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - बहिणीची शपथ*..... पूर्ण कथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्पने घेतली शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पीएम सूर्यघर योजनेत मोठी संधी:छतावरील सौरऊर्जा प्रकल्पातून दरमहा 360 युनिट मोफत वीज, अनुदानासह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 31 जानेवारी पासून होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, आदिती तटकरेंच्या गोटात सावध भूमिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोल्हापूर : लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचे दर्शन २४ जानेवारीपर्यंत बंद रहाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सरकारच्या माध्यमातून भजनी कलाकारांना मानधन दिले जाईल – मंत्री नितेश राणे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दिल्ली : इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषकात पुरुष आणि महिला संघाने मिळविले पहिले विश्वचषक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कुलदीप सूर्यवंशी, पत्रकार, बिलोली👤 संतोष हेंबाडे, शिक्षक, धर्माबाद👤 विजय माने👤 पिराजी कटकमवार👤 अनिल मुपडे👤 ऋषिकेश एस. पवार👤 साईनाथ जगदमवार👤 विष्णू रावणगावकर👤 कृष्णराज महानुभाव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अनिल - आत्माराम रावजी देशपांडे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यात असणारी अपूर्णता पाहून कधीही निराश होऊ नका , कारण आपल्या दोषांचे भान होण्यानेच आपले दोष कमी होत असतात. -- फॕनेलाॕन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पहिला महिला खो-खो विश्वकप कोणी पटकावला ?२) महिला खो-खो विश्वकपचा अंतिम सामना कोणत्या दोन संघात झाला ?३) पहिला खो-खो विश्वकप कोठे आयोजित करण्यात आला होता ?४) 'ड्रीम रन' हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?५) खो-खो या खेळाची सुरूवात कोणत्या देशात झाली ? *उत्तरे :-* १) भारत २) भारत व नेपाळ ३) भारत ४) खो-खो ५) भारत *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌺 *फुलं रंगीबेरंगी का असतात ?* 🌺➖➖➖➖➖➖➖➖➖अनेक झाडांची फुलं तर्हेतर्हेचे मनोहारी रंग धारण करतात. ते रंग बघायलाही आपल्याला आवडतं. अशा रंगेबिरंगी फुलांनी नटलेली आपली बाग सुंदर दिसते. कित्येक फुलांना अतिशय चांगला सुगंधही असतो. तोही आपला आनंद द्विगुणित करतो. तरीही आपल्या आनंदासाठी फुलांना रंग आणि सुगंध असतो, असं आपल्याला म्हणता येईल का ? कारण जिथं मानववस्ती नाही अशा ठिकाणच्या झाडांनाही रंगेबेरंगी व सुगंधी फुलं असतात. रानावनात वाढणाऱ्या झाडांची शोभाही अशा फुलांनी बहरून येते. याचा अर्थ निसर्गानं दुसऱ्याच कोणत्या तरी कारणांसाठी रंग आणि गंध बहाल केला असणार.ती कारणं समजून घेण्यासाठी फुलांचं मुख्य निसर्गदत्त काम काय असतं, याचा विचार करायला हवा. प्रत्येक सजीवाच्या अंगी आपलं पुनरुत्पादन करण्याची यंत्रणा असते. पुनरुत्पादनाशिवाय तो सजीव तगून राहू शकत नाही. एवढेच काय पण पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेशिवाय नवनव्या प्रजातींचा उगमही अशक्य झाला असता. त्यामुळे प्रत्येक सजीव पुनरुत्पादनाला अतिशय महत्त्व देतो. वनस्पतींच्या पुनरुत्पादनात फुलं कळीची भूमिका बजावतात.फुलांच्या अंतर्गत रचनेकडे लक्ष दिल्यास त्यातील दोन अवयव आपलं लक्ष वेधून घेतात. स्टॅमेन किंवा पुबीजांडातून पुंकेसर बाहेर पडतात. ते पिस्टिल किंवा स्त्रीबीजांडातील स्त्रीकेसरांवर पडले की त्यांच्या समागमातून पुढील पिढीची नांदी म्हटली जाते. पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचं मिलन होणं त्या वनस्पतीच्या पुनरुत्पादनासाठी आवश्यक असतं. कित्येक फुलांमध्ये हे मीलन स्वयंपूर्णरित्या होत असलं, तरी बहुतांश वनस्पतींच्या फुलांमध्ये या प्रक्रियेसाठी दुसर्या कोणीतरी मध्यस्थाच्या मदतीची आवश्यकता भासते. वारा ही कामगिरी पार पाडत असला तरी तो पूर्णांशाने हे काम करू शकत नाही. त्यासाठी मग पक्षी किंवा मधमाश्यांसारख्या कीटकांची गरज भासते. ते काम करावं म्हणून मग पक्षी आणि मधमाशा यांना उद्युक्त करणं जरुरीचं असतं. त्यांना काहीतरी मधाचं बोट लावल्याशिवाय ते तरी या कामगिरीसाठी का तयार व्हावेत ? मधमाशांना तर अक्षरश: मधाचं बोट लावलं जातं. फुलांमध्ये असलेला मधुरस शोषून घेऊन मधमाशा त्याचं मधात रूपांतर करतात. तरीही आपल्याकडे अशा मधुरसाचे कोण आहेत, हे मधमाश्यांना कळावं कसं ? त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी मग ही फुलं रंगीबेरंगी परिवेष धारण करतात. त्यातही मध्यस्थ कोण आहे यावर फुलांचा रंग निर्धारित केला जातो. मधमाशांना निळा रंग आवडतो, तर हमिंगबर्डसारख्या पक्ष्यांना लाल, गुलाबी किंवा जांभळ्या रंगांचं आकर्षण असतं. फुलपाखरं पिवळ्या, नारिंगी रंगांकडे ओढली जातात. काही फुलं दिवसाउजेडी फुलत असली तरी काही सूर्यास्तानंतरच फुलतात. त्या वेळी मग त्यांचा रंग पक्षांना वा कीटकांना दिसावा कसा ? त्यासाठी मग रंगांशिवाय या फुलांना सुगंधही दिला जातो. त्याच्या दरवळापायी मग हे फलनाला मदत करणारे मध्यस्थ त्याच्याकडे खेचून आणले जातात. त्यांना मधुरस मिळता मिळता त्यांच्याकडून पुंकेसराचा शिडकावा स्त्रीकेसरांवर होतो. पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेला चालना मिळते.*बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गाणीं मी गाईलों भाटीं वाखाणिलों । जन्मोनियां जालों दास तुझा ॥१॥ आतां माझी लाज राखें नारायणा । झणीं केविलवाणा दिसों देसी ॥२॥ माये दुर्हाविलों मोहें मोकलिलों । सोये पैं चुकलों संसाराची ॥३॥ आपवर्गिं सांडिलों प्रवृत्ती दंडिलों । मीपना मुकलों मायबापा ॥५॥ नामा म्हणे तुझ्या चरणाची आवडी । लागली न सोडी चित्त माझें ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसं बरेच मोठे असतात. जसे की,वयाने,अनुभवाने, धनसंपत्तीने तर विचारसरणीने. काहीजण मनाने मोठे असतात. पण,जी व्यक्ती शुन्यातून विश्व निर्माण करत असते ती व्यक्ती नि:स्वार्थ भावनेने मदत करत असते. तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने मोठी असते.अशाच व्यक्तीला निसर्ग सुद्धा वंदन करत असतो.म्हणून स्वतः मोठेपणाची बाजी मारण्यापेक्षा लहान व्यक्तीला नेहमीच मोठ्या मनाने समजून घ्यावे. मोठे होण्यासाठी कुठेही धावाधाव करावी लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दुस-याबाबतचा दृष्टीकोन*स्टार्मवेल नावाचे एक इंग्रज पत्रकार होते. ते एखाद्याची मुलाखत घेणार असतील तर त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी ते उघडपणे बोलून दाखवत असत. एकदा स्टार्मवेल यांना श्रीकृष्ण मेनन यांची मुलाखत घ्यावयाची होती. स्टार्मवेल यांनी आक्रमकपणे पहिलाच प्रश्न मेनन यांना विचारला," मिस्टर मेनन, तुम्ही अत्यंत गरीबीतून वर आलेला आहात. तुम्ही शाळेत वॉच स्काऊट म्हणून काम करत होता. एका इंग्रज महिलेने तुम्हाला आधार दिला व त्यांनीच तुम्हाला लंडनला पाठविले. तेथे कायदा आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेऊन तुम्ही भारतात परत आला. येथे पुन्हा तुम्हाला संघर्ष करावा लागला. त्याचवेळी पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे तुमच्याकडे लक्ष गेले. त्यांनी तुम्हाला योग्य संधी दिली. आज तुम्ही त्यांच्या जवळचे आहात. नेहरूंच्या मंत्रिमंडळात तुमची वर्णी लागणार आहे असे बोलले जात आहे. म्हणजेच तुम्ही तळातून उठून आकाशात जाऊन ठेपणार आहात. पण मिस्टर मेनन तुम्ही मला खरेच सांगा की, तुम्ही कम्युनिस्ट आहात हे खरे आहे का." मेनन यांनी शांतपणे पण ठाम स्वरात म्हणाले," तुम्ही माझे जे कौतुक केले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मलाही तुमचे कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे तुम्ही रस्तोरस्ती पेपर विकून तुमचे पोट भरत होता. तेथूनच तुम्ही मोठे झालात, आता तुम्हाला चांगला पगार मिळतो आहे. पण मलाही तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की, खरेच सांगा की तुम्ही एक अनौरस संतान आहात काय." मेनन यांच्या सडेतोडपणामुळे स्टार्मवेल यांची बोबडी वळाली आणि त्यांनी तो विषय टाळून दुस-या प्रश्नाकडे वळाले.तात्पर्य - दुस-याच्या खाजगी आयुष्यात डोकावताना त्याला दुःख देणा-या गोष्टींबाबत चर्चा न केलेली बरी असते. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही गोष्टी या अतिखासगी या प्रकारात मोडतात त्यामुळे दुस-याच्या आयुष्यात ढवळाढवळ न केलेलीच चांगली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 जानेवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/19uQgnauEU/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील २०वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००९:अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.**१९९९:गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर**१९९८:संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा ’पोलार संगीत पुरस्कार’ विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर**१९६३:चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.**१९४४:दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने बर्लिनवर २३०० टन बॉम्बवर्षाव केला.**१९३७:फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर २० जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली.**१८४१:ब्रिटिशांनी हाँगकाँग बेटाचा ताबा घेतला.**१७८८:इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनार्यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:डॉ. कोंडबा भगवान हाटकर-- लेखक**१९८०:दिनेशकुमार रामदास अंबादे-- कवी* *१९७७:अॅड.नीता प्रफुल्ल कचवे-- कवयित्री,कादंबरी,कथालेखिका* *१९७२:भुपेश पांड्या --चित्रपट अभिनेते (मृत्यू:२३ सप्टेंबर २०२०)**१९७०:डॉ.मंजुषा सुनील सावरकर -- कथा लेखिका,संपादिका* *१९६८:प्रा.अन्नपूर्णा अजाबराव चौधरी-- कवयित्री,लेखिका**१९६४:साहेबराव आनंदराव नंदन-- समाज प्रबोधन,लेखक**१९६३:अमोल मारुती रेडीज -- लेखक,कवी* *१९६०:स्टीफन एम.परेरा-- कथाकार* *१९६०:आपा शेर्पा – १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक**१९५४:विजय शं.माळी- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९५१:वसंत सीताराम पाटणकर-- मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी,समीक्षक**१९५०:प्राचार्य डॉ.रमेश अंधारे-- कादंबरीकार,संपादक**१९४७:फुलचंद पत्रुजी खोब्रागडे -- कवी, लेखक* *१९४७:लीला प्रभाकर गाजरे-- कवयित्री**१९४६:डॉ.शोभा अभ्यंकर-- भारतीय संगीतशास्त्रज्ञ आणि मेवाती घराण्याच्या शिक्षिका(मृत्यू:१७ ऑक्टोंबर २०१४)**१९४५:डॉ.माणिक तुकाराम वैद्य-- कवी* *१९३७:प्राचार्य डॉ.दाऊद दळवी-- इतिहासाचे अभ्यासक(मृत्यू:३१ ऑगस्ट २०१६)**१९२४:मनोहर नामदेव वानखडे-- व्यासंगी साहित्यसमीक्षक आणि दलितांच्या वाङ्मयीन-सांस्कृतिक चळवळींचे नेते(मृत्यू:१ मे १९७८)**१९२०:विष्णुपंत पुरुषोत्तम भागवत-- लेखक, संपादक (मृत्यू:२३ डिसेंबर १९७५)**१८९८:कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव’ – प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार (मृत्यू:२० आक्टोबर १९७४)**१८७१:सर रतनजी जमसेटजी टाटा – टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति (मृत्यू:५ सप्टेंबर १९१८)**१८६१:काशीबाई गोविंदराव कानिटकर --आधुनिक मराठी साहित्यातील आद्यलेखिका(मृत्यू:३० जानेवारी १९४८)**१७७५:आंद्रे अॅम्पिअर – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:१० जून १८३६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९:भगवान ठग -- कवी आणि अनुवादक(जन्म:२४ जानेवारी १९५३)**२००२:रामेश्वरनाथ काओ – रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष.काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अध्वर्यू मानण्यात येते.(जन्म:१० मे १९१८)**२००९:बाळ गंगाधर सामंत--मराठी लेखक, विनोदकार व चरित्रकार (जन्म:२७ मे १९२४)**१९९३:ऑड्रे हेपबर्न – ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी,’रोमन हॉलिडे’ या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. (जन्म:४ मे १९२९)**१९८८:खान अब्दुल गफार खान तथा ’सरहद गांधी’सरहद्द प्रांत आणि बलुचिस्तानमधील एक महान राजकारणी,ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला (जन्म:३ जून १८९०)**१९८०:कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण(जन्म:१९ डिसेंबर १८९४)**१९५१:अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ’ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक (जन्म:२९ नोव्हेंबर १८६९)**१९३६:जॉर्ज (पाचवा) – इंग्लंडचा राजा (जन्म:३ जून १८६५)**१८९१:डेविड कालाकौआ – हवाईचा राजा (जन्म:१६ नोव्हेंबर १८३६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* * Chavhan Shriram माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जगात भारतीय कुटुंब संस्कृती श्रेष्ठ*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबई - स्वामित्व योजनेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून सनद वितरणाचा शुभारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पटसंख्या कमी झाल्याने रायगडमधील २६ प्राथमिक शाळांना ठोकले टाळे !*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाकुंभ मेळ्यात मोठी दुर्घटना, अनेक तंबू आगीच्या भक्ष्यस्थानी; आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नांदेड जिल्ह्यात भाजपची ताकद जास्त, स्थानिक संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढू, अशोक चव्हाण यांनी मांडली भूमिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दहावी-बारावीच्या हॉल तिकिटावर केलेला जातीचा उल्लेख रद्द करण्यात आला असून नवीन हॉल तिकीट लवकरच उपलब्ध होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *रत्नागिरी : दवाखाने आणि रुग्णालयांना दरपत्रक लावणे बंधनकारक, अन्यथा परवाना होणार रद्द, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण ! सुवर्ण महोत्सवानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशन तर्फे भव्य कार्यक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निसर्ग रुसल्याने नंदनवन ओस काश्मीर म्हणजे साक्षात पृथ्वीवरील नंदनवन. काश्मीर मधील निसर्गाची संपूर्ण जगाला भुरळ पडली आहे विशेषतः हिवाळ्यात काश्मीर मध्ये जाऊन काश्मीरमधील निसर्ग जीवनात एकदातरी अनुभवावा ही प्रत्येकाची इच्छा असते. निसर्गाने काश्मीरला जे दान दिले आहे तसे दान इतर कोणत्याही प्रदेशाला दिले नाही म्हणूनच काही जण काश्मीरला जमिनीवरचा स्वर्ग असेही म्हणतात. झेलम, चिनाब, निडर आदी नद्यांचे खळखळते पाणी, हिरवीगार जंगलसंपदा आणि बर्फाच्छादित पर्वत, धुक्याने पांघरलेली चादर त्यामुळे काश्मीर हे पर्यटकांचे आवडते थंड हवेचे ठिकाण आहे मात्र याच काश्मीरला गेल्या काही वर्षापासून कोणाची तरी नजर लागली. काश्मीरमध्ये पाकिस्तानने दहशतवाद पोसला सतत होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे पृथ्वीवरील या नंदनवनात पर्यटक जीव मुठीत धरूनच येत असे मात्र केंद्र सरकारने काश्मीरला लागू असलेले ३७० वे कलम हटवल्याने तेथील दहशतवादी कारवाया कमी झाल्या त्यामुळे काश्मीरमध्ये पर्यटक पुन्हा परततील अशी आशा वाटू लागली. झालेही तसेच मागील वर्षी जानेवारीच्या मध्यापर्यंत जवळपास १ लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली होती त्यात परदेशी पर्यटकांची संख्याही लक्षणीय होती. काश्मीरमध्ये पर्यटक परतू लागल्याने स्थानिक काश्मिरी लोकांनाही रोजगार मिळू लागला. काश्मीरचे गेलेले वैभव परत येऊ लागले असे वाटत होते. गेल्या वर्षी पर्यटकांनी काश्मीरला पसंती दिल्याने यावर्षी मागील वर्षापेक्षा अधिक पर्यटक काश्मीरला भेट देतील असे वाटू लागले होते. पर्यटकांनी नंदनवन पुन्हा बहरू लागेल असे वाटत असतानाच काश्मीरला पुन्हा कोणाची तरी नजर लागली. यावर्षी काश्मीरमधील निसर्गाने खप्पा मर्जी केली. निसर्ग रुसल्याने यावर्षी म्हणावी तशी बर्फवृष्टी झाली नाही. गुलमर्ग हे काश्मीरमधील सर्वांचे आवडते थंड हवेचे ठिकाण. काश्मीरला जाणारा पर्यटक आवर्जून गुलमर्गचा निसर्ग अनुभवायला गुलमर्ग ला भेट देतोच मात्र यावर्षी गुलमर्ग बर्फाविना कोरडे पडले आहे. संपूर्ण काश्मीर खोऱ्यात च म्हणावी तशी बर्फवृष्टी झाली नाही. अगदी तुरळक बर्फवृष्टी झाल्याने पर्यटकांना बर्फातील स्कियिंग आणि अन्य खेळ खेळता येत नाहीत त्यामुळेच अनेक पर्यटकांनी काश्मीर चे केलेले बुकिंग रद्द केले आहे. यावर्षी मागील वर्षापेक्षा ५० टक्के पर्यटकही आले नाहीत. पर्यटक नसल्याने हिवाळ्यातील सर्व व्यवसाय थंड पडले आहेत. स्थानिक लोकांचा रोजगार बुडाला. काही चित्रपट निर्मात्यांनी काश्मीरमधील चित्रीकरणही रद्द केले आहे. पर्यटक येत नसल्याचा परिणाम काश्मीरच्या अर्थ्यवस्थेवरही झाला आहे. गेल्या वर्षी पर्यटकांनी बहरलेले हे नंदनवन आज पर्यटकांविना ओस पडले आहे. गेल्या अनेक वर्षात अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती असे तेथील जाणकार सांगतात. इतका कमी बर्फवृष्टी यापूर्वी कधी अनुभवली नव्हती असेही तेथील काही लोक सांगतात. यावर्षी निसर्गाने काश्मीरवर अवकृपा केल्याने काश्मीरच नाही तर देश चिंतेत आहे. यावर्षी जरी निसर्गाने अवकृपा केली असली तरी पुढील वर्षी तरी निसर्ग काश्मीरवर कृपा करेल पृथ्वीवरील हे नंदनवन पर्यटकांनी पुन्हा बहरेल अशी अपेक्षा स्थानिक नागरिकच नव्हे संपूर्ण देशातील नागरिक व्यक्त करत आहेत. श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून , वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे. -- थॉमस फुलर*संकलन :- श्रीमती प्रमिला सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री* म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?२) भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात कोणते राज्य अव्वलस्थानी आहे ?३) आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कोठे साजरा करण्यात आला ?४) 'सज्जन' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) जगातील अत्यंत गरीब देशांमध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे ? *उत्तरे :-* १) बाबासाहेब पाटील, सहकार मंत्री २) केरळ ३) अहमदाबाद ४) संत ५) दक्षिण सुदान *संकलन :- जैपाल ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 किशोर पाटील, युनिक कॉम्प्युटर्स, धर्माबाद👤 शंकर बेल्लूरकर👤 अहमद लड्डा सय्यद, पत्रकार👤 संतोष शेटकार👤 शरयू देसाई 👤 माऊली जाजेवार👤 विशु पाटील वानखेडे👤 नागनाथ दिग्रसकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विनोबा - विनायक नरहर भावे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जन्मल्यापासूनि सोशिले प्रवास । वियोग पहावया जाले आतां ॥१॥ आतां एक करीं धावणिया धांवा । बुडतों केशवा काढीं मज ॥२॥ लाभ नव्हे हानि जाली भागाभाग । तूंचि पांडुरंग पुरविसी ॥३॥ नामा म्हणे ऐसें सर्वस्व रक्षिलें । पाषाण तारिले जळामाजीं ॥४॥।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकालाच एकटे यावे लागते आणि एकटेच जावे लागते हा निसर्गाचा नियम आहे. पण, या जगात जगत असताना आजुबाजूचाही आपण विचार करावा. कोणी आपुलकीने मदत करतात तर कोणाचे सांगता येत नाही. म्हणून कोणी आपुलकीच्या नात्याने मदत केली असेल त्यांना कधीही विसरू नये. व जे, कोणी तिरस्कार करतात त्यांचा राग धरू नये. कारण चांगले करणारेच अजरामर होऊन जातात व जे काहीच करत नाही त्यांचे जीवन व्यर्थ होऊन जाते भलेही सोबत कोणी काहीच घेऊन जात नसले तरी इतरांना केलेली मदत ही माणुसकीची साथ असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कोल्हा आणि नगारा*एकदा एक कोल्हा भुकेने व्याकूळ होऊन जंगलात इकडे तिकडे फिरत होता. तेवढ्यात त्याला मोठा आवाज ऐकू येऊ लागला. त्या आवाजाने कोल्हा चांगलाच घाबरला. पण तो आवाज कोणता प्राणी काढतोय या उत्सुकतेपोटी दबकत दबकत आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. तर त्याच्या नजरेस एक मोठा नगारा पडला. त्या नगार्यावर एका झाडाची फांदी वार्यामुळे आपटत होती. त्यामुळे तो मोठा आवाज येत होता. हे कोल्ह्याच्या लक्षात आल्यावर कोल्हा नगार्यावर आपला पंजा मारून लागला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की नगार्याचे कातडे गुंडाळले आहे. ते ओरबाडले तर आत भरपूर मांस असेल. त्यामुळे निदान दोन दिवसांची तरी भूक शमेल. देवाची कृपा समजून त्याने नगार्याचे कातडे कुरतडून फाडले तर... आत काहीच नाही. नुसता पोकळ नगारा बघून कोल्हा दु:खी झाला, पण कातडे कुरतडताना त्याच्या दाढाही दुखावल्या.उपदेश : प्रसंग आनंदाचा किंवा भीतीचा असला तरी जो शहाणा माणूस मागचा पुढचा विचार करून वागतो त्याला पश्चात्ताप करण्याची पाळी येत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक- स्तंभलेखक ना. सा. येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 जानेवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_25.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील १८वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००५:एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.**१९९९:नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.**१९९८:मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९९७:नोर्वेच्या बोर्ग आऊसलंडने एकट्याने व कोणाच्याही मदतीशिवाय अटलांटिक महासागर पार केला.**१९७४:इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या.**१९५६:संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार**१९११:युजीन बी.इलायने सानफ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु.एस.एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.**१७७८:कॅप्टन जेम्स कूक हा हवाई बेटांवर पोचणारा पहिला युरोपियन बनला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७५:मोनिका बेदी-- भारतीय अभिनेत्री आणि टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता**१९७३:प्रा.डॉ.रंजन दामोदर गर्गे-- विज्ञान लेखक,विविध पुरस्काराने सन्मानित* *१९७२:विनोद कांबळी –भारतीय क्रिकेटपटू**१९७१:महेंद्र भाऊरावजी सुके-- पत्रकार, लेखक**१९६६:अलेक्झांडर खलिफमान – रशियन बुद्धिबळपटू**१९५८:भूपेंद्र दामोदर संखे-- कवी,लेखक**१९५८:तुका उत्तमराव मोहतुरे-- लेखक,कवी**१९४७:प्रकाश गोपाळ सावरकर-- लेखक* *१९४५:डॉ.विजया वाड --प्रसिद्ध लेखिका, बालसाहित्यिक,मराठी विश्वकोश मंडळाच्या पूर्व अध्यक्षा**१९४५:माधवी करमळकर -- लेखिका* *१९३७:अरविंद रघुनाथ मयेकर --ख्यातमान सतारवादक आणि संगीतकार(मृत्यू:३० मार्च २०१९)**१९३३:जगदीश शरण वर्मा – भारताचे २७ वे सरन्यायाधीश (मृत्यू:२२ एप्रिल २०१३)**१९२५:मनोहरराय लक्ष्मणराव सरदेसाय-- कोकणी कवी,निबंधकार व अनुवादक (मृत्यू:२२ जून २००६)**१९२५:गजानन जोहरी-- लेखक* *१९०९:द.ग.देशपांडे (बाबुराव जाफराबादकर)-- लेखक,संगीत,नाटय क्षेत्रात योगदान* *१८९५:वि.द.घाटे तथा विठ्ठल दत्तात्रेय घाटे-- मराठी कवी,लेखक(मृत्यू:३ मे १९७८)**१८८९:शंकर काशिनाथ गर्गे तथा ’दिवाकर’ – नाट्यछटाकार (मृत्यू:१ आक्टोबर १९३१)**१८८९:देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी.व्ही.जी.– कन्नड कवी व विचारवंत (मृत्यू:७ आक्टोबर १९७५)**१८४२:न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक,धर्मसुधारक,अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश (मृत्यू:१६ जानेवारी १९०९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६:आशा पाटील --मराठी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाट्यक्षेत्रातील अभिनेत्री (जन्म:१९३६)**२०१५:शकुंतला महाजन तथा ’बेबी शकुंतला’ –वयाच्या ८२ व्या वर्षी ही ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली.(जन्म:१७ नोव्हेंबर १९३२)**२०११:पुरुषोत्तम दास जलोटा-- भारतीय शास्त्रीय आणि भक्ती संगीत गायक(जन्म :९ सप्टेंबर १९२५)**२००३:हरिवंशराय बच्चन – हिन्दी कवी (जन्म:२७ नोव्हेंबर १९०७)**१९९६:एन.टी.रामाराव – तेलगू अभिनेते, दिग्दर्शक,निर्माते व आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री (जन्म:२८ मे १९२३)**१९८३:आत्माराम रावजी भट – कृतिशील विचारवंत,’मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे संस्थापक (जन्म:१२ मे १९०५)**१९४७:कुंदनलान सैगल – गायक व अभिनेते (जन्म:११ एप्रिल १९०४)**१९३६:रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक (जन्म:३० डिसेंबर १८६५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* * Chavhan Shriram माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एका शेतकऱ्याची आत्मकथा*नमस्कार ....!मी एक शेतकरी आपल्याशी संवाद करीत आहे. या भारतातील जवळपास ७५ टक्के जनता खेड्यांत राहते आणि येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती म्हणूनच भारत देश कृषिप्रधान आहे असे म्हटले जाते. भारतातील संपूर्ण व्यवहार हा शेतीवरच अवलंबून आहे. शेतातून निघणा-या उत्पादनावरच भारताचा विकास अवलंबून आहे. इतरांना जगवणारा, उत्पादक असा मी शेतकरी मात्र फारच बिकट अवस्थेत दिसून येतो. कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ओळीनुसार मी उभ्या जगाचा पोशिंदा आहे. मात्र ..................... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्र्याचे मिशन दावोस, 20 ते 24 जानेवारी मध्ये दौरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नारायणगावाजवळ भीषण अपघात, 9 ठार व 8 जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 65 लाख प्रॉपर्टी कार्डचे वाटप*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बांगलादेश ने लादलेल्या 10 टक्के आयात शुल्कामुळे लासलगावी लाल कांदा घसरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *NTA च्या नियमात बदल, नीटच्या फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची धावपळ, नाव बदल करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *उत्तर भारतात धुक्याची चादर, जनजीवन विस्कळीत, दिल्लीत 117 विमानांना उशीर तर 27 रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *खो-खो विश्वचषकामध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *रेणू* 📙 *************मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात. अणूची रचना काहीशी सूर्यमालेसारखी असते. अणूचे बहुतेक सर्व वस्तुमान अणूकेंद्रात असते. धनविद्युतभारित प्रोटॉन आणि तेवढ्याच वस्तुमानाचे पण विद्युतभार नसलेले न्यूट्रॉन यांनी अणुकेंद्र बनते. त्याच्याभोवती विविध कक्षांत इलेक्ट्रॉन घिरट्या घालीत असतात. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची संख्या समान म्हणून अणू मात्र विद्युतभाराच्या दृष्टीने किंवा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. चांदी, सोने इत्यादी अशा प्रकारची धातूरूप मुलद्रव्ये वगळता सृष्टीतील बाकी सर्व पदार्थ हे रेणूंनी बनलेले असतात. रेणू म्हणजे दोन किंवा अधिक अणू एकत्र गुंफून झालेली रचना. ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन ही मुलद्रव्ये त्यांच्या रेणूंची बनलेली असतात. त्यांच्या प्रत्येक रेणूत दोन अणू असतात. पाणी हे संयुग. ऑक्सिजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे दोन अणू एकत्र आले की, पाण्याचा एक रेणू बनतो. नित्याच्या आढळतील बहुसंख्य पदार्थ संयुग स्वरूपातच असतात. शिवाय अनेक मुलद्रव्येही त्यांच्या रेणूंचीच बनलेली असल्यामुळे आपल्या पर्यावरणातील सारे विश्व रेणूंचे बनले आहे असे म्हणता येईल. रेणूंचे काही गुणधर्म विलक्षण आहेत. ऑक्सिजन आणि हायड्रोजन एकत्र येऊन बनणाऱ्या पाण्याचे गुणधर्म त्याच्या घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्माहून किती वेगळे ! साखर तर हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन यांनी बनते. परीक्षानळीत साखर तापवली की खाली काळा साका आणि नळीच्या तोंडाशी पाण्याचे बारीक थेंब मिळतात. कितीतरी प्रकारचे अणू एकत्र येऊन प्रचंड रेणू बनू शकतात. अमिनो आम्ले, प्रथिने, डीएनए हे सर्व गुंतागुंतीच्या रचनांचे रेणूच आहेत. मात्र तरीही रेणू खूप लहान असतो, हे विसरायचे नाही. घोटभर पाण्यात सहावर तेवीस शून्य इतके रेणू असतात ! असे असंख्य रेणू एकत्र येऊन पदार्थ बनतो. हे रेणू एकमेकांशी कसे गुंफलेले आहेत, यावर पदार्थाचे भौतिक गुणधर्म ठरतात. गुंफण घट्ट असेल, तर पदार्थ घन असतो. अगदी शिथिल असेल, तर द्रवरूप आणि प्रत्येक रेणू सुटा असेल तर पदार्थ वायुरूप असतो. रेणूची हालचाल तापमानावर अवलंबून असल्याने उष्णता देऊन पदार्थ वितळता येतो आणि द्रवाचे वायूत रूपांतर करता येते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम ठाणेदार , पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.*संकलन :- प्रमिला सेनकुडे **ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला *'इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क'* म्हणून मान्यता देण्यात आली ?२) महाराष्ट्रात 'पहिला राज्य क्रीडा दिवस' केव्हा साजरा करण्यात आला ?३) वैनगंगा नदी कोणत्या नदीला मिळते ?४) भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?५) 'भूगोल दिन' केव्हा साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) पेंच व्याघ्र प्रकल्प २) १५ जानेवारी २०२४ ३) वर्धा / गोदावरी ४) रघुराम अय्यर ५) १४ जानेवारी*संकलन :- जैपाल ठाकूर *जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 Vijaya Wad, प्रसिद्ध बालसाहित्यिक👤 Prabhakar Rajeshwar Kamtalwar, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, धर्माबाद👤 रामनाथ खांडरे, करखेली👤 त्र्यंबक आडे, नांदेड👤 Mahesh Govindwar , सहशिक्षक, माहूर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••करी वृत्ती जो संत तो संत जाणा। दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा॥ उपाधी देहेबुद्धीते वाढवीते। परी सज्जना केविं बाधु शके ते॥१६८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आलेल्या दु:खाला कंटाळून जाणे म्हणजे जीवन जगणे नव्हे. दु:ख हे दोन दिवसाचे पाहुणे असतात सदैव लक्षात असू द्यावे. भलेही सुख खूप काही देत असेल तरी जे आपल्याला पाहिजे ते कधीच देत नाही म्हणून सुखाच्या मोहात पडू नये आणि दु:खाला कंटाळू नये . खऱ्या अर्थाने दु:खच जीवन जगण्यासाठी मार्ग दाखवत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राक्षस, चोर आणि ब्राह्मण*एका गावात एक द्रोण नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अतिशय गरीब होता. पूजापाठ करून जे द्रव्य मिळेत, त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे. एके दिवशी एका यजमानने त्या गरीब ब्राह्मणाला दोन चांगल्या दुभत्या गायी दान दिल्या. दानात मिळालेल्या त्या दोनी गायी त्यानं घरी आणल्या अन् त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचं दैन्य पळालं. एके काळी शिळी पोळी भाजी खाणार तो ब्राह्मण! गावात दूध, दही, लोणी, तूप विकून घरातही दूध भाकरी खाऊ लागला. द्रोण ब्राह्मणाच्या त्या दोनही सुंदर गायींवर एका चोराची नजर होती. सुयोग्य संधी बघायची अन् ब्राह्मणाच्या या दोन्ही गायी पळवायच्या, असा त्या चोराचा डाव होता. एका अवसेच्या अंधारात तो चोर त्या गायी चोरून नेण्यासाठी येत असताना वाटेतच त्या चोराची गाठ एका राक्षसाबरोबर पडली. परस्परांनी एकमेकांना 'तू कुठे अन् का जातोस,' ते विचारलं. चोर म्हणाला, 'मी द्रोण ब्राह्मणाच्या गायी चोरायला चाललो आहे. पण तू कुठे चालला आहेस?' अरे, मी तर प्रत्यक्ष त्या ब्राह्मणालाच मारायला, त्याचे भक्षण करायला चाललो आहे. ह्या ब्राह्मणानं मंत्र-तंत्र करून माला दूर घालवायचं, माझं अन्न-पाणी तोडलंय, पण आज मी त्यालाच खाणार आहे झालं! दोघांचही लक्ष एक निघालं. दोघांनी मैत्रीचा हात पुढे केला. तो चोर अन् राक्षस हे दोघं त्या ब्राह्मणाच्या दारांत आले. दोघांनीही घरात डोकावून पाहिले, तर तो ब्राह्मण बिचारा शांत झोपला होता. राक्षस ब्राह्मणाला खायला जाणार, तोच चोर म्हणाला, अरे थांब! मी आधी दोन्ही गायी घेऊन जातो, मग तू त्याला खा. त्यावर राक्षस म्हणाला, वा रे वा! मोठा शहाणाच आहेस की तू!तू गायींना नेताना त्या हंबरल्या, तर तो जागा होणार नाही का ! मग मी काय करू? राक्षसाचं हे म्हणणं चोराला पटेना अन् चोर आपली घाई सोडेना. असं करता-करता हळूहळू त्यांचे एकमेकांचे आवाज तापू लागले. परस्परांतला संवाद संपू लागला. अन् वाद-विवाद भांडणं चालू झाली. त्यात त्या दोघांनी आपल्या मोठ्या आवाजचं भात राहिलं नाही. ते आवाज ऐकून गायी हंबरल्या. मोत्यानं भुंकायला सुरूवात केली. ब्राह्मणही झोपेतून जागा झाला. त्याने राक्षस अन् चोराला पकडून आरडा-ओरडा केला. त्या आवाजानं शेजारी मंडळी काठ्या, मशाली इ. घेऊन धावत आले. त्यांना पाहून राक्षस आगलील आणि चोर लोकांना पाहून धूम पळून गेला. तात्पर्य : फुकट शब्दानं शब्द वाढवून वादविवाद करू नये. भांडणाने फायदा तर होणे दूरच, पण अनेकदा नुकसानच होते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक- स्तंभलेखक ना. सा. येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_15.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील १६वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००८:टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या 'पीपल्स कार'चे अनावरण**१९९८:ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना 'ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर**१९९६:पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड**१९९५:आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले.**१९७९:शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले.**१९५५:पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न**१९४१:नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण**१९२०:अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations) पहिली बैठक झाली.**१९१९:अमेरिकेच्या संविधानात १८ वा बदल करण्यात आला आणि संपूर्ण देशात दारूबंदी लागू करण्यात आली.**_१६८१:छत्रपती संभाजी राजे यांचा ’छत्रपती’ म्हणून राज्याभिषेक झाला._**१६६०:रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९६२:प्रा.विनय अमृतराव पाटील -- कवी**१९६०:साहेबराव विश्वनाथ कांगुणे-- लेखक, वक्ते**१९५८:श्रीकांत सदाशिव मोरे-- प्रसिद्ध कवी, लेखक**१९५६:नारायण भगवानराव पांडव-- कवी* *१९५१:डॉ.जयप्रकाश रामचंद्र कुलकर्णी -- लेखक**१९५०:मधुकर सदाशिव वाघमारे -- कवी, लेखक* *१९४७: सिद्धार्थ यशवंत वाकणकर-- हस्तलिखितशास्त्र व भाषाशास्त्रज्ञ,संशोधक**१९४६:कबीर बेदी – चित्रपट अभिनेते**१९४३:नलिनी भीमराव खडेकर -- कवयित्री, लेखिका**१९४२:कृष्णा चौधरी --कवी,लेखक**१९२८:बाळासाहेब पित्रे--ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक(मृत्यू:१२ जानेवारी २०१८)**१९२८:रामचंद्र दत्तात्रेय लेले--वैद्यकशास्त्रज्ञ**१९२७:कामिनी कौशल-- भारतीय अभिनेत्री**१९२६:ओंकार प्रसाद तथा ओ.पी.नय्यर – संगीतकार (मृत्यू:२८ जानेवारी २००७)**१९२०:नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (मृत्यू:११ डिसेंबर २००२)**१९१९:मधुसूदन ऊर्फ लालजी रघुनाथराव गोखले-- ज्येष्ठ तबलासम्राट(मृत्यू:१६ नोव्हेंबर २००२)**१९०९:विनायक रघुनाथ चितळे -- लेखक**१८५३:आंद्रे मिचेलिन – फ्रेन्च उद्योगपती (मृत्यू:४ एप्रिल १९३१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:अरुण जाखडे-- मराठी ग्रंथप्रकाशक आणि लेखक(जन्म:७ जानेवारी १९५५)**२०१७:प्रा.पुरुषोत्तम पाटील-- मराठी कवी आणि केवळ मराठी कवितांना वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक होते (जन्म:३ मार्च १९२७)**२०११:प्रभाकर कृष्णराव काळे-- कवी, संपादक (जन्म:१९३८)* *२००५:श्रीकृष्ण हरी मेहेंदळे – संगीतकार, ’पेटीवाले’ मेहेंदळे* *२००३:रामविलास जगन्नाथ राठी – सुदर्शन केमिकल्स उद्योगसमुहाचे संस्थापक* *१९९७:कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या (जन्म:१९३३)**१९८८:डॉ.लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ,मुत्सद्दी,कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर,जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत (जन्म:२२ नोव्हेंबर १९१३)**१९६७:रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म:२० डिसेंबर १९०१)**१९६६:साधू वासवानी – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ (जन्म:२५ नोव्हेंबर १८७९)**१९५४:बाबूराव पेंटर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक,चित्रकार,शिल्पकार आणि ’कलामहर्षी’ (जन्म:३ जून १८९०)**१९३८:शरदचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली साहित्यिक,त्यांच्या ‘पथेर दाबी' या कादंबरीतील क्रांतिकारक विचारांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांतही खळबळ उडवून दिली होती. पु.बा.कुलकर्णी यांनी त्या कादंबरीचे ’भारती’ या नावाने मराठीत भाषांतर केले आहे. (जन्म:१५ सप्टेंबर १८७६)**१९०९:न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक,धर्मसुधारक,अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश (जन्म:१८ जानेवारी १८४२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* * Chavhan Shriram माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रत्येक शाळेला संरक्षणभिंत हवे*प्रत्येक गावात स्थानिक स्वराज्य संस्थेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असते. पूर्वीच्या शाळा कोणाच्या घरात, ओसरीवर किंवा झाडाखाली भरविली जात असे आणि सर्वाना शिकवायला एकच शिक्षक असायचा. मात्र ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या दौऱ्यात नौदलाच्या तीन नौकाचे केले राष्ट्रार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अखिल मराठा फेडरेशन कडून खासदार नारायण राणे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द ग्रेट मराठा पुरस्कार जाहीर, अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शिर्डी विमानतळ परिसरात लेझर प्रकाश वापरण्यास बंदी, वैमानिकांच्या सुरक्षितता संबंधी आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई, पुण्यासह राज्यभरात सुरू होणार बाईक टॅक्सी सेवा, सरकारने बनविला कायदा, पुढील दोन महिन्यात लागू होण्याची शक्यता.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कंधारच्या उरूस निमित्ताने उद्या नांदेड जिल्ह्यात कलेक्टर डिक्लेअर सुट्टी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे विद्यापीठात राज्य क्रीडा दिन उत्साहात, खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय महिला संघाचा आयर्लंडवर विक्रमी विजय, एकदिवसीय मालिकेत 3-0 ने व्हाईटवॉश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - Kunal Paware 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 उत्क्रांती म्हणजे काय ? 📙 भाग ५ (५/६) - मानवी वाटचालगोरिला आणि चिंपांझी या माकडांच्या शरीरातील रक्तातील प्रथिने, हिमोग्लोबिन आणि डी.एन.ए. यांचे माणसाच्या शरीरातील याच घटकांची मोठ्या प्रमाणावर साम्य आहे. यावरूनच गोरिला, चिंपांझी आणि माणूस या तीन्ही शाखा सुमारे चाळीस ते पन्नास लाख वर्षांपूर्वी एकाच पूर्वजापासून जन्मल्या असाव्यात, असा अंदाज केला जातो. उत्खननात सापडणाऱ्या जीवाश्मांच्या मदतीने मानवाच्या उत्क्रांतीतील वाटचालीचा खुणा धुंडाळाव्या लागतात.सर्वात प्राचीन जीवाश्म आहे रामपिथेकसचा. भारत आणि पूर्व आफ्रिकेत आढळून आलेल्या अवशेषांवरून आजच्या माणसाशी साम्य सांगणाऱ्या शारीरिक खुणा रामपिथेकसमध्ये होत्या हे लक्षात येते. त्याचा काळ होता सुमारे एक कोटी वीस लाख वर्षांपूर्वीचा.त्यानंतर भेटतो सुमारे पस्तीस लाख वर्षांपूर्वी वावरणारा ऑस्ट्रेलोपिथेकस अफरेनिस. मागच्या दोन पायांवर उभे राहून ताठ चालणे हे मानवी प्राण्याचे वैशिष्ट्य या पूर्वजात पुर्ण रुजलेले आढळते. मात्र मेंदूचा आकार अद्याप लहानच होता. तर जबडा आणि दातांचा आकार मोठा होता. ऑस्ट्रेलोपिथेकस - आफ्रिकॅन्स ऑस्ट्रेलोपिथेकस - रोबोस्ट्स असे बदल होत सुमारे दहा लाख वर्षांपूर्वी 'होमो' या जातीचा जन्म झाला.होमो इरेक्ट्स ही ऑस्ट्रेलोपिथेकस आणि आजच्या मानवाच्या मधली पायरी होती.आजचा मानव म्हणजे होमो सेपियन्स. जीवाश्म स्वरूपात हा होमो सेपियन्स भेटतो साधारण पाच लाख वर्षांपूर्वीच्या काळात.मेंदूच्या आकारात वाढ होत गेली होती.सुरुवातीला होमो सेपियन्स निअँडरथालच्या कवटीची हाडे जाड होती, कपाळ अरुंद होते.हे सगळे शारीरिक बदल होत आजच्या स्वरूपातील माणूस सुमारे चाळीस हजार वर्षांपूर्वीच्या अवशेषांमध्ये भेटतो.सजीव सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, हे कोडे विचारवंतांना अनेक वर्षे पडलेले आहे. 'देवाने प्रत्येक प्रकारच्या प्राण्याची एकेक जोडी बनवली,' या बायबलमधील मताशी सहमत होणे अनेकांना जड जात होते. अनेकांनी या कोड्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला.उपलब्ध पुरावे, सूक्ष्म निरीक्षण आणि साऱ्यांची सांगड घालून मांडलेली तर्कशुद्ध शास्त्रीय उपपत्ती अशा स्वरूपात उत्क्रांतीवाद मांडणारा पहिला शास्त्रज्ञ ‘चार्ल्स डार्विन'क्रमश :- ‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. "**संकलन :- श्रीमती प्रमिला सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वात मोठे धार्मिक सम्मेलन कोठे भरते ?२) प्रयागराज येथील महाकुंभ मेळावा कोणत्या तीन नद्यांचा संगमावर भरतो ?३) प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेला महाकुंभ किती दिवस चालणार आहे ?४) कुंभाचे तीन प्रकार कोणते ?५) महाकुंभ किती वर्षानंतर भरतो ? *उत्तरे :-* १) प्रयागराज, उत्तरप्रदेश २) गंगा, यमुना व सरस्वती ३) ४५ दिवस ४) अर्ध कुंभ, पुर्ण कुंभ व महाकुंभ ५) १२ पुर्ण कुंभ पुर्ण झाल्यावर ( १४४ वर्ष )*संकलन :- जैपाल ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ सायबलू, मुख्याध्यापक, धर्माबाद👤 वैभव तुपे, शिक्षक, नाशिक👤 रमेश सरोदे👤 ज्ञानेश्वर मोकमवार👤 सचिन होरे, धर्माबाद👤 किरण शिंदे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगदानिया हें ब्रीद आहे जगीं । तें आजि मजलागीं काय जालें ॥१॥ मज पाहतां विसरू पडिला त्या नामाचा । कीं तुज आमुचा वीट आला ॥२॥ सुजाणाच्या राया परिसें केशिराजा । भक्ताचिया काजा लाजों नको ॥३॥ भक्तकाजकैवारी हें ब्रीद चराचरीं । तें ठेविलें क्षीरसागरीं लक्ष्मीपाशीं ॥४॥ मज पाहतां अभिलाष धरिला मानसीं । मग तूं हषिकेशी विसरलासी ॥५॥ दीनानाथ ऐसें नाम बहुतांसी वांटिलें । निर्गुण तें उरलें तुजपाशीं ॥६॥ म्हणोनि केशिराजा विसरलासी आम्हां । विनवितसे नामा विष्णुदासा ॥७॥।। संत नामदेव महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याच पहावं वाकून या प्रकारची समाजात एक प्रचलित असलेली म्हण नेहमीच ऐकायला, वाचायला मिळत असते. म्हणजेच असे होत असावे म्हणून कदाचित ही म्हण प्रचलित झाली असावी. पण, त्यात एक गोष्ट अवश्य लक्षात असू द्यावे जेव्हा आपण स्वतः चा समाधान करण्यासाठी काळजीपूर्वक दुसऱ्याकडे वाकून बघत असतो त्यावेळी आपल्याकडेही दहा पटीने लोक वाकून बघत असतात. जर बघायचं असेल तर एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू बघावे,कोणाच्या व्यथा जाणावे ,कोणाचे दु:ख बघून त्या दु:खात माणुसकीच्या नात्याने सहभागी व्हावे पापात जाणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सुंदर माझे घर*बिट्टी बेडकुळी कितीतरी वेळ कमळाच्या पानावर लोळत होती. वरून पावसाच्या धारा येत होत्या. सगळया तळयात 'टिप...टिप..' आवाज येत होता, हवा कशी गार गार झाली होती. बिट्टीला मजेत गाणे गावेसे वाटत होते. तिने त्याप्रमाणे तोंड उघडलेही. इतक्यात पलीकडच्या झाडावरून मंजुळ स्वर ऐकू आले. बिट्टीने तिकडे पाहिले. एक छोटीशी मुनिया आपले घरटे विणीत होती. नाजुक, नाजुक काडयांचे विणकाम करताना मधेच गाणे गुणगुणत होती. आता मात्र बिट्टीला राहवले नाही. एका उडीतच तिने पलीकडचा काठ गाठला. म्हंटले 'माझे घर पाहिले कां केवढे मोठे आहे ते?आत कशी रंगीबेरंगी कमळे फुललीत. 'ती कौतुकाने तळयाकडे पाहत म्हणाली. 'शी! हे कसले सुंदर घर? आत भरला आहे गाळ अन् चिखल!' मुनिया नाक मुरडत म्हणाली. बिट्टी मग टुणटुणत पुढे निघाली. आज सगळीकडे कसा मऊ मऊ चिखल पसरला होता. त्यात घसरगुंडी खेळाविशी वाटत होती. बिट्टीला एक भलामोठा दगड दिसला. त्यावर उडी मारताच आतून आवाज आला, 'कोण आहे?' पाठोपाठ कासवदादा मान बाहेर काढून इकडेतिकडे पाहू लागले. 'अगबाई! कासवदादा तुम्ही त्यात राहता वाटते?' बिट्टीने विचारले. 'तर काय! हेच माझे घर!' पुन्हा आत शिरत ते म्हणाले. मजाच आहे नाही? बिट्टी मनाशी विचार करत पुढे जाऊ लागली. वाटेत झाडावर एक मधाचे मोठ्ठे पोळे लोंबत होते. त्याभोवती मधमाशा उडत होत्या. काही जात होत्या, तर काही येत होत्या. 'बायांनो! तुम्ही इतक्याजणी ह्या छोटयाशा घरात कशा ग राहता?' बिट्टीने विचारले. 'छोटेसे आहे कां ते? आत कशा षट्कोनी खोल्याच खोल्या आहेत! अगदी आरामात राहता येते सर्वांना!'. बिट्टीभोवती गुणगुणत एका माशीने उत्तर दिले. बिट्टी तिथेच थांबून इकडची तिकडची मजा बघत होती. किती गंमतीदार घरे आहेत नाही प्रत्येकाची, ती स्वत:शी म्हणत होती. रस्त्यावर फळांनी लगडलेले एक भलेमोठे झाड होते. त्यावर सुगरणींची लोंबती घरे होती. वाऱ्याने ती इकडून तिकडे हलत! सुगरणबाई उडत येऊन खालून वर जात होत्या. आपल्या इवल्याशा चोचीने विणकाम करत होत्या. बापरे! एवढया वा-यावादळातही घर कसे पडत नाही? बिट्टी वर पाहत असताना जवळून आवाज आला. 'माझे घर कित्ती छान आहे! खाऊच्याच घरात मी राहते.' बिट्टीने ह्या टोकाकडून त्या टोकाकडे डोळा फिरवत शोधाशोध केली.शेजारी एक भलामोठा पेरू पडला होता. त्यातून एक अळी डोके बाहेर काढून बिट्टीशी बोलत होती. 'हो! हे बाकी खरेच!' बिट्टीने मान डोलावली. इतक्यात आभाळातून पुन्हा गडाड-गुडूम आवाज आला व पाऊस पडू लागला. समोर एक भली मोठी छत्री उगवली होती. बिट्टी पळत पळत जाऊन त्याखाली उभी राहिली. आता मात्र तिला पुन्हा एकदा गाणे म्हणावेसे वाटले व त्या आनंदात ती गाऊ लागली. 'गार गार वारा अन् पावसाच्या धारा, भिजलेली राने अन् पानोपानी गाणे, झुळझुळणा-या पाण्यात थेंबांची नक्षी, फांदीवर डुलतात भिजलेले पक्षी, ओल्या मातीत सुगंधाची भर, सगळयात सुंदर सुंदर माझेच घर !! •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक- स्तंभलेखक ना. सा. येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/17Lvzvmj3X/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌼 *_भारतीय लष्कर दिन_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_ या वर्षातील १५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••• *२००१: सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश ’विकीपिडिया’ हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.**१९९९: गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.**१९९६: भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.**१९७३: जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे ९ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.**१९७०: मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा झाले.**१९४९: जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.**१८८९: पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.**१८६१: एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले.**१७६१: पानिपतचे तिसरे युद्ध संपले.**१५५९: राणी एलिझाबेथ (पहिली) हिचा इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अॅबे येथे राज्याभिषेक झाला.* 🌼 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌼 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२: नील नितीन मुकेश चंद माथूर -- भारतीय अभिनेता, निर्माता आणि लेखक**१९८१: रामकृष्ण माधवराव चनकापुरे -- कवी**१९७९: डॉ. आरतीशामल जोशी -- लेखिका**१९७६: प्रा. नेमिचंद चव्हाण -- लेखक**१९७५ नयना निगळ्ये -- कवयित्री तथा अभियंता संचालक न्यूयॉर्क**१९७२: सुरेखा अशोक बो-हाडे -- कवयित्री, ललित लेखिका* *१९७२: गजानन कमल जानराव सोनोने -- कवी, लेखक* *१९६७: भानुप्रिया -- भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना**१९६६: शैलेश हिंदळेकर -- कवी**१९६५: श्रीकांत परशुराम नाकाडे -- लेखक**१९५९: प्रा.डाॅ. भारती निरगुडकर -- लेखिका, कवयित्री**१९५९: प्रभाकर गंभीर -- कवी**१९५७: वंदना पंडित -- मराठी अभिनेत्री**१९५७: सुब्रह्मण्यम जयशंकर(एस. जयशंकर) -- केंद्रीय विदेश मंत्री**१९५६: जीवन बळवंत आनंदगावकर -- प्रसिद्ध कवी, लेखक तथा निवृत्त न्यायाधीश**१९५६: मायावती ( मायावती प्रभुदास) -- उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री* *१९५४: प्रभाकर धनाजी शेळके -- प्रसिद्ध कवी**१९५२: संजीव गोविंद लाभे -- लेखक**१९५१: प्रीतिश नंदी -- भारतीय, चित्रकार, पत्रकार, कवी, लेखक, राजकारणी, प्राणी आणि क्षेत्र, टेलिव्हिजन आणि स्ट्रीमिंग सामग्रीचे निर्माते (मृत्यू: ८ जानेवारी २०२५ )**१९५०: नेताजी राजगडकर -- माजी आमदार तथा आकाशवाणीचे वृत्त निवेदक (मृत्यू: १८ जुलै २०१४ )**१९४३: जयराम पोतदार -- हार्मोनियम आणि आॅर्गन वादक व लेखक**१९३९: निलकांत ढोले -- ज्येष्ठ गझलकार, कवी व लेखक (मृत्यू: १७ सप्टेंबर २०२२ )**१९३१: वासुदेव बेंबळकर -- लेखक* *१९३१: शरच्चंद्र वासुदेव चिरमुले -- कथाकार (मृत्यू: २७ मार्च १९९२ )**१९२९: मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ४ एप्रिल १९६८ )**१९२८: राज कमल -- प्रसिद्ध भारतीय संगीतकार (मृत्यू :१ सप्टेंबर २००५ )**१९२६: कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर] (मृत्यू: १४ ऑगस्ट १९८४ )**१९२३: चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर -- मराठी नाट्य-अभिनेते, चित्रपट अभिनेते (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००९ )**१९२१: बाबासाहेब भोसले – महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री [कार्यकाल: २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ ] (मृत्यू: ६ ऑक्टोबर २००७ )**१९२०: डॉ. आर. सी. हिरेमठ – कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९८ )**१९१२: गजानन काशिनाथ रायकर -- लेखक, संपादक (मृत्यू: १६ मे २००२ )**१९०५: यशवंत कृष्ण खाडिलकर -- कादंबरीकार, संपादक (मृत्यू: ११ मार्च १९७९ )* *१७७९: रॉबर्ट ग्रँट – मुंबई इलाख्याचे राज्यपाल, मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजचे एक संस्थापक, मुंबईतील ग्रँट रोड हा त्यांच्याच नावाने ओळखला जातो. (मृत्यू: १८३८ )* 🌼 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌼 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४: नामदेव लक्ष्मण ढसाळ – ज्येष्ठ साहित्यिक (जन्म: १५ फेब्रुवारी १९४९ )**२०१३: डॉ. शरदचंद्र गोखले – समाजसेवक (जन्म: २९ सप्टेंबर १९२५ )**२०१०: मंदाकिनी कमलाकर गोगटे -- मराठी लेखिका (जन्म: १६ मे १९३६ )**२००२: विठाबाई भाऊ नारायणगावकर – राष्ट्रपतिपदक विजेत्या तमाशा कलावंत (जन्म: १९३५ )**१९९८: गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते (जन्म: ४ जुलै १८९८ )**१९९४: हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी (जन्म: २२ जानेवारी १९१६ )**१९७१: दीनानाथ दलाल – अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार (जन्म: ३० मे १९१६ )**१९१९: लक्ष्मण श्रीधर वाकणकर -- लिपिकार, संशोधक(जन्म: १७ सप्टेंबर १९१२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तरुण भारत देश घडवू या*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत माहिती दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात किमान थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईत एक दिवसीय दौरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार 25 खाटांचे रुग्णालय, 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियांचा खर्चही राज्यशासनाकडे, मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे पर्यटन महोत्सवात 60 हून अधिक टूर कंपन्यांचा सहभाग, 17 ते 19 जानेवारीला होटेल सेंट्रल पार्कमध्ये विनामूल्य प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्टार्टअप्सना गुंतवणूकदारांशी जोडणारा देशव्यापी उपक्रम, एमआयटी पुण्यात 16 जानेवारीला 'उद्योमोत्सव 2025'चे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सैनिक परिवारांसाठी 58 कोटींचे वाटप, माजी सैनिकांसाठी रोजगार, कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू; लष्करप्रमुख द्विवेदींची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 चिं. नीरज रामानंद रामदिनवार, नांदेड👤 साईनाथ अन्नमवार, युवा उद्योजक, नांदेड👤 दत्ता बेलूरवाड👤 एकनाथ पावडे👤 व्ही. एम. पाटील👤 सलीम शेख, बिलोली👤 कोमल रोटे👤 सतिश बोरखडे, शिक्षक👤 शिवशंकर वाघमारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मकरंद - बा.सी.मर्ढेकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जो दुसऱ्याचे नुकसान कसे करावे हे जाणत नाही , त्यालाच परोपकारी म्हणून ओळखावे. -- मुरारी बापू*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पहिल्या खोखो वर्ल्ड कपमध्ये भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?२) शिक्षणासाठी प्रख्यात विद्यापीठे सर्वाधिक कोणत्या देशात आहेत ?३) हिंदीला राजभाषेचा दर्जा केव्हा देण्यात आला ?४) 'शीघ्र' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) १८ व्या 'प्रवासी भारतीय संमेलना'चे आयोजन कोठे करण्यात आले ? *उत्तरे :-* १) प्रियंका इंगळे, बीड २) अमेरिका, १२९ विद्यापीठे ( भारत - १ विद्यापीठ ) ३) १४ सप्टेंबर १९४९ ४) जलद ५) भुवनेश्वर, ओडिशा *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *शिजवणे* 📙 अग्नीचा शोध लागला आणि खाण्याच्या बाबतीत माणसाचे चोचले सुरू झाले. नैसर्गिक पदार्थ खाण्यातला आनंद माणूस खूपसा विसरलेलाच आहे. भारतातील खाण्याच्या सवयींचा विचार केला, तर पदार्थ शिजवणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया झाल्याशिवाय आपले अन्न तयार होत नाही. भात शिजणे, भाजी शिजणे, आमटीसाठी डाळ शिजणे, उसळीला कडधान्य शिजणे वा कोंबडी या प्रत्येक बाबतीत 'शिजणे' हा एक टप्पाच असतो.अन्न शिजणे म्हणजे नेमके काय होते ? प्रत्येक वनस्पतीज पदार्थ हा पेशींनी बनलेला असतो. या पेशींना एक घट्टसर अशी सेल्युलोजची भिंत वा आवरण असते. या पेशींच्या आतमध्ये केंद्रक व पेशीचा अन्नसाठाही असतो. अन्न शिजताना प्रथम नष्ट होते, ते सेल्युलोजचे आवरण. मग अन्नसाठ्याचे घट्ट पदार्थांत रूपांतर होते. केंद्रक तर नष्टच पावते. पेशीमधील द्रवपदार्थ एकमेकांत मिसळून जातात. सूक्ष्मदर्शक यंत्राखाली एखाद्या धान्याचे, भाजीचे, कोंबडीचे निरीक्षण केले, तर शिजवण्यापूर्वी सुस्पष्टपणे आढळणाऱ्या या सर्व गोष्टी शिजवल्यानंतर नाहीशा झालेल्या दिसतात. यामुळेच शिजवण्यापूर्वीची पालेभाजी शिजवल्यावर अगदी मऊ लागते. घट्टसर बटाटा मेणासारखा होतो. तांदळाचे कवच जाऊन त्याची पेस्ट बनू शकते. हे बदल झाल्यानंतर अन्न पुन्हा मूळ स्थितीत येऊ शकत नाही. पण या बदलांमुळे अन्नाच्या पचनासाठी मात्र मदत होऊ शकते. प्रत्येक बाबतीत 'सेलवॉल' नष्ट झाल्याने शरीरातील पाचकरसांची क्रिया सुलभ होते. प्राणिज पदार्थांमधील प्रथिने मानवी जठरातील पाचकरसांनी सहज पचत नाहीत. शिजवण्यामुळे ही क्रिया लवकर शक्य होते.अन्न शिजवणे ही क्रिया साधारणपणे थोडेसे पाणी घालून करण्याची पद्धत आहे. पाण्यामुळे उष्णता सर्वत्र पसरते व शिजणाऱ्या पदार्थातील विविध चवींचे रसही पदार्थात आतपर्यंत पोहोचण्यास मदत होते. अन्न शिजताना निरनिराळे पदार्थ, मसाले, मीठ, तिखट, गोड व साखर घालण्याची पद्धत आहे. यामुळे सर्व पदार्थांची एकजीव एकच चव येते. भाजी खाताना ती नीट शिजली नसेल, तर नुसती कच्चीच लागते, एवढेच नव्हे, तर तिच्या फोडींमध्ये आत्तापर्यंत तिखट मीठही नीट पोहोचलेले नसते. शिजणे या प्रकारामध्ये आणखीही एक खुबी अंतर्भुत आहे. शिजण्यातील नेमकेपणा व त्या पदार्थांची मुळची चव 'खुलुन' येणे हे जेव्हा साधते, तेव्हाच त्या पदार्थांच्या शिजवण्याबद्दल कौतुक होते. एखादा पदार्थ कच्चा राहतो, तसाच जेव्हा जास्त शिजतो, तेव्हाही त्याची चव गेलेली असते. यामुळे शिजण्यातील नेमकेपणा हाही महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यासाठी प्रत्येक पदार्थाची अंगभूत चव व ती स्पष्ट होईपर्यंतच शिजवणे अपेक्षित असते. यासाठी मदत म्हणून प्रत्येक देशात काही पदार्थांची मदतही घेतली जाते. चिनी पद्धतीत अजिनोमोटो, इटालियन पद्धतीत मिरे, भारतीय पद्धतीत आले व हळद, युरोपमध्ये कच्च्या पपईचे तुकडे, अरबी देशांत लवंग यांचा अगदी अल्प प्रमाणात वापर करण्याची पद्धत आहे. पदार्थ शिजताना त्याचे तापमान शंभर डिग्री सेंटिग्रेडच्या वर जात नाही. मंद शिजवल्यावर खुपशी जीवनसत्त्वेही राखली जातात. आपण म्हणतोच ना, शितावरून भाताची परीक्षा होते म्हणून ? अगदी तसेच आहे. पदार्थ चांगला शिजल्यास त्याचे प्रत्येक शीतनशीत छान शिजलेले असते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••छंदिस्त हें मन माझें पंढरिनाथा । न सोडीं सर्वथा पाय तुझे ॥१॥ यासि काय करूं सांगा जी विठ्ठला । स्नेह कां लाविला पूर्वीहूनि ॥२॥ कांसवीचीं पिलीं सोडोनि निराळीं । दृष्टि पान्हाइलिं अमृतमय ॥३॥ तैस मी जवळुनि असेन पैं दुरी । दृष्टि मजवरी असों द्यांवी ॥४॥ तान्हें वछ घरीं धेनु चरे वनीं । हंबरे क्षनक्षनां परतोनि ॥५॥ नामा म्हणे देवा सलगी करीं निकट । झणें मज विकुंठ्ह पद देसी ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या विषयी चांगले सांगताना एकाकी कोणी नावं ठेवत नाही. पण,तेथेच दुसऱ्यांच्या विषयी नको ते, सांगताना मात्र ऐकणारे कान लावून ऐकत असतात.जी व्यक्ती, दुसऱ्या व्यक्तीविषयी एवढे काही सांगू शकते तर स्वतः किती चांगली असेल यावर ऐकणारे विचार करत असतात.त्यावेळी ती व्यक्ती मनातून उतरुन जाते पण, सांगणाऱ्या व्यक्तीच्या मात्र लक्षात येत नाही. एका अर्थाने माणसात असलेली ही सर्वात मोठी वाईट सवय असते. या सवयीमुळे अनेकांचे जीवन उद्धस्त होते म्हणून याप्रकारची सवय लावून स्वतःचेही नुकसान करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••• *मनःशांतीचे रहस्य*एका गावात एक महात्मा राहत होते. ते अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाचे म्हणून ओळखले जात. त्यांना कोणत्याही गोष्टीचा कधीच राग येत नसे. कुणी त्यांच्याशी कधी उद्धटपणे बोलला किंवा गैर वागला तरी त्यांच्या कपाळावर कधीच आठी उमटत नसे. ते सदैव हसतमुख व आनंदी राहत असत. ज्या लोकांना त्यांचे हे वागणे आवडत नसे ते लोक त्यांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत असत. परंतु महात्म्याच्या तोंडून कधीही एखादा वेडावाकडा उदगार देखील बाहेर पडत नसे कि चेह-यावरही कधी त्रासिक भाव उमटत असे. अनेक लोकांनी जंग जंग पछाडले तरी महात्म्याला राग काही आलेला कुणीच पाहिला नव्हता शेवटी त्यांच्या या संयमशीलतेचे रहस्य काय असावे हे विचारण्यासाठी काही लोक महात्म्याकडे गेले. त्यांच्यातील एकाने विचारले, "महाराज, तुम्ही कधीच रागवत नाही, चिडत नाही, शांत कसे काय राहू शकता. तुमच्यात इतकी सहनशक्ती कोठून आली आहे." महात्म्यांनी उत्तर दिले, "मित्रांनो, ज्यांचे उद्दिष्ट अत्यंत उच्च पातळीवर जायचे असते त्यांना खालच्या पातळीवर जायची कधीच गरज पडत नाही. मी खालच्या पातळीवर कधीच उतरायला तयार नसतो. मला असे वाटते की, माझ्याबद्दल लोकांना काय वाटायचे ते वाटू दे पण आपले मन विरोधी विचारांनी कलुषित करून घ्यायचे नाही. मी जेव्हा जमिनीकडे नजर टाकतो तेव्हा क्षमाशीलतेचे मोठे प्रतिक दिसून येते. लोकांनी किती त्रास दिला जमिन क्षमा करते. आपल्या गरजा किती मर्यादित आहेत हे भान जर प्रत्येकाने ठेवले तर प्रत्येकजण माझ्याइतका शांत होऊ शकतो. ज्यांच्या मनात करूणा आणि सगळ्यांना सारखे लेखण्याची भावना असते तो निर्विकार वृत्तीनेच राहतो."•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/17Lvzvmj3X/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तरुण भारत देश घडवू या*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत माहिती दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात किमान थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईत एक दिवसीय दौरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार 25 खाटांचे रुग्णालय, 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियांचा खर्चही राज्यशासनाकडे, मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे पर्यटन महोत्सवात 60 हून अधिक टूर कंपन्यांचा सहभाग, 17 ते 19 जानेवारीला होटेल सेंट्रल पार्कमध्ये विनामूल्य प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्टार्टअप्सना गुंतवणूकदारांशी जोडणारा देशव्यापी उपक्रम, एमआयटी पुण्यात 16 जानेवारीला 'उद्योमोत्सव 2025'चे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 चिं. नीरज रामानंद रामदिनवार, नांदेड👤 साईनाथ अन्नमवार, युवा उद्योजक, नांदेड👤 दत्ता बेलूरवाड👤 एकनाथ पावडे👤 व्ही. एम. पाटील👤 सलीम शेख, बिलोली👤 कोमल रोटे👤 सतिश बोरखडे, शिक्षक👤 शिवशंकर वाघमारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मकरंद - बा.सी.मर्ढेकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जो दुसऱ्याचे नुकसान कसे करावे हे जाणत नाही , त्यालाच परोपकारी म्हणून ओळखावे. -- मुरारी बापू*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पहिल्या खोखो वर्ल्ड कपमध्ये भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?२) शिक्षणासाठी प्रख्यात विद्यापीठे सर्वाधिक कोणत्या देशात आहेत ?३) हिंदीला राजभाषेचा दर्जा केव्हा देण्यात आला ?४) 'शीघ्र' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) १८ व्या 'प्रवासी भारतीय संमेलना'चे आयोजन कोठे करण्यात आले ? *उत्तरे :-* १) प्रियंका इंगळे, बीड २) अमेरिका, १२९ विद्यापीठे ( भारत - १ विद्यापीठ ) ३) १४ सप्टेंबर १९४९ ४) जलद ५) भुवनेश्वर, ओडिशा *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *शिजवणे* 📙 अग्नीचा शोध लागला आणि खाण्याच्या बाबतीत माणसाचे चोचले सुरू झाले. नैसर्गिक पदार्थ खाण्यातला आनंद माणूस खूपसा विसरलेलाच आहे. भारतातील खाण्याच्या सवयींचा विचार केला, तर पदार्थ शिजवणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया झाल्याशिवाय आपले अन्न तयार होत नाही. भात शिजणे, भाजी शिजणे, आमटीसाठी डाळ शिजणे, उसळीला कडधान्य शिजणे वा कोंबडी या प्रत्येक बाबतीत 'शिजणे' हा एक टप्पाच असतो.अन्न शिजणे म्हणजे नेमके काय होते ? प्रत्येक वनस्पतीज पदार्थ हा पेशींनी बनलेला असतो. या पेशींना एक घट्टसर अशी सेल्युलोजची भिंत वा आवरण असते. या पेशींच्या आतमध्ये केंद्रक व पेशीचा अन्नसाठाही असतो. अन्न शिजताना प्रथम नष्ट होते, ते सेल्युलोजचे आवरण. मग अन्नसाठ्याचे घट्ट पदार्थांत रूपांतर होते. केंद्रक तर नष्टच पावते. पेशीमधील द्रवपदार्थ एकमेकांत मिसळून जातात. सूक्ष्मदर्शक यंत्राखाली एखाद्या धान्याचे, भाजीचे, कोंबडीचे निरीक्षण केले, तर शिजवण्यापूर्वी सुस्पष्टपणे आढळणाऱ्या या सर्व गोष्टी शिजवल्यानंतर नाहीशा झालेल्या दिसतात. यामुळेच शिजवण्यापूर्वीची पालेभाजी शिजवल्यावर अगदी मऊ लागते. घट्टसर बटाटा मेणासारखा होतो. तांदळाचे कवच जाऊन त्याची पेस्ट बनू शकते. हे बदल झाल्यानंतर अन्न पुन्हा मूळ स्थितीत येऊ शकत नाही. पण या बदलांमुळे अन्नाच्या पचनासाठी मात्र मदत होऊ शकते. प्रत्येक बाबतीत 'सेलवॉल' नष्ट झाल्याने शरीरातील पाचकरसांची क्रिया सुलभ होते. प्राणिज पदार्थांमधील प्रथिने मानवी जठरातील पाचकरसांनी सहज पचत नाहीत. शिजवण्यामुळे ही क्रिया लवकर शक्य होते.अन्न शिजवणे ही क्रिया साधारणपणे थोडेसे पाणी घालून करण्याची पद्धत आहे. पाण्यामुळे उष्णता सर्वत्र पसरते व शिजणाऱ्या पदार्थातील विविध चवींचे रसही पदार्थात आतपर्यंत पोहोचण्यास मदत होते. अन्न शिजताना निरनिराळे पदार्थ, मसाले, मीठ, तिखट, गोड व साखर घालण्याची पद्धत आहे. यामुळे सर्व पदार्थांची एकजीव एकच चव येते. भाजी खाताना ती नीट शिजली नसेल, तर नुसती कच्चीच लागते, एवढेच नव्हे, तर तिच्या फोडींमध्ये आत्तापर्यंत तिखट मीठही नीट पोहोचलेले नसते. शिजणे या प्रकारामध्ये आणखीही एक खुबी अंतर्भुत आहे. शिजण्यातील नेमकेपणा व त्या पदार्थांची मुळची चव 'खुलुन' येणे हे जेव्हा साधते, तेव्हाच त्या पदार्थांच्या शिजवण्याबद्दल कौतुक होते. एखादा पदार्थ कच्चा राहतो, तसाच जेव्हा जास्त शिजतो, तेव्हाही त्याची चव गेलेली असते. यामुळे शिजण्यातील नेमकेपणा हाही महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यासाठी प्रत्येक पदार्थाची अंगभूत चव व ती स्पष्ट होईपर्यंतच शिजवणे अपेक्षित असते. यासाठी मदत म्हणून प्रत्येक देशात काही पदार्थांची मदतही घेतली जाते. चिनी पद्धतीत अजिनोमोटो, इटालियन पद्धतीत मिरे, भारतीय पद्धतीत आले व हळद, युरोपमध्ये कच्च्या पपईचे तुकडे, अरबी देशांत लवंग यांचा अगदी अल्प प्रमाणात वापर करण्याची पद्धत आहे. पदार्थ शिजताना त्याचे तापमान शंभर डिग्री सेंटिग्रेडच्या वर जात नाही. मंद शिजवल्यावर खुपशी जीवनसत्त्वेही राखली जातात. आपण म्हणतोच ना, शितावरून भाताची परीक्षा होते म्हणून ? अगदी तसेच आहे. पदार्थ चांगला शिजल्यास त्याचे प्रत्येक शीतनशीत छान शिजलेले असते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••छंदिस्त हें मन माझें पंढरिनाथा । न सोडीं सर्वथा पाय तुझे ॥१॥ यासि काय करूं सांगा जी विठ्ठला । स्नेह कां लाविला पूर्वीहूनि ॥२॥ कांसवीचीं पिलीं सोडोनि निराळीं । दृष्टि पान्हाइलिं अमृतमय ॥३॥ तैस मी जवळुनि असेन पैं दुरी । दृष्टि मजवरी असों द्यांवी ॥४॥ तान्हें वछ घरीं धेनु चरे वनीं । हंबरे क्षनक्षनां परतोनि ॥५॥ नामा म्हणे देवा सलगी करीं निकट । झणें मज विकुंठ्ह पद देसी ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या विषयी चांगले सांगताना एकाकी कोणी नावं ठेवत नाही. पण,तेथेच दुसऱ्यांच्या विषयी नको ते, सांगताना मात्र ऐकणारे कान लावून ऐकत असतात.जी व्यक्ती, दुसऱ्या व्यक्तीविषयी एवढे काही सांगू शकते तर स्वतः किती चांगली असेल यावर ऐकणारे विचार करत असतात.त्यावेळी ती व्यक्ती मनातून उतरुन जाते पण, सांगणाऱ्या व्यक्तीच्या मात्र लक्षात येत नाही. एका अर्थाने माणसात असलेली ही सर्वात मोठी वाईट सवय असते. या सवयीमुळे अनेकांचे जीवन उद्धस्त होते म्हणून याप्रकारची सवय लावून स्वतःचेही नुकसान करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••• *मनःशांतीचे रहस्य*एका गावात एक महात्मा राहत होते. ते अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाचे म्हणून ओळखले जात. त्यांना कोणत्याही गोष्टीचा कधीच राग येत नसे. कुणी त्यांच्याशी कधी उद्धटपणे बोलला किंवा गैर वागला तरी त्यांच्या कपाळावर कधीच आठी उमटत नसे. ते सदैव हसतमुख व आनंदी राहत असत. ज्या लोकांना त्यांचे हे वागणे आवडत नसे ते लोक त्यांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत असत. परंतु महात्म्याच्या तोंडून कधीही एखादा वेडावाकडा उदगार देखील बाहेर पडत नसे कि चेह-यावरही कधी त्रासिक भाव उमटत असे. अनेक लोकांनी जंग जंग पछाडले तरी महात्म्याला राग काही आलेला कुणीच पाहिला नव्हता शेवटी त्यांच्या या संयमशीलतेचे रहस्य काय असावे हे विचारण्यासाठी काही लोक महात्म्याकडे गेले. त्यांच्यातील एकाने विचारले, "महाराज, तुम्ही कधीच रागवत नाही, चिडत नाही, शांत कसे काय राहू शकता. तुमच्यात इतकी सहनशक्ती कोठून आली आहे." महात्म्यांनी उत्तर दिले, "मित्रांनो, ज्यांचे उद्दिष्ट अत्यंत उच्च पातळीवर जायचे असते त्यांना खालच्या पातळीवर जायची कधीच गरज पडत नाही. मी खालच्या पातळीवर कधीच उतरायला तयार नसतो. मला असे वाटते की, माझ्याबद्दल लोकांना काय वाटायचे ते वाटू दे पण आपले मन विरोधी विचारांनी कलुषित करून घ्यायचे नाही. मी जेव्हा जमिनीकडे नजर टाकतो तेव्हा क्षमाशीलतेचे मोठे प्रतिक दिसून येते. लोकांनी किती त्रास दिला जमिन क्षमा करते. आपल्या गरजा किती मर्यादित आहेत हे भान जर प्रत्येकाने ठेवले तर प्रत्येकजण माझ्याइतका शांत होऊ शकतो. ज्यांच्या मनात करूणा आणि सगळ्यांना सारखे लेखण्याची भावना असते तो निर्विकार वृत्तीनेच राहतो."•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 जानेवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15Sg3PNj9X/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌏 *_भूगोल दिन_* 🌏•••••••••••••••••••••••••••••••••••• 🌏 *_ या वर्षातील १४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌏 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌏•••••••••••••••••••••••••••••••••*२०००:ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत मुरलीधर देविदास ऊर्फ ’बाबा’ आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान.**१९९८:दाक्षिणात्य गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च सन्मान जाहीर.**१९९४:मराठवाडा विद्यापीठाचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात आला.**१९४८:’लोकसत्ता’ हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.**१९३४:विदर्भ संशोधन मंडळ,नागपूर स्थापना दिवस**१९२३:विदर्भ साहित्य संघाची स्थापना कवीभूषण अण्णासाहेब खापर्डे यांनी केली**१७६१:मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला.* 🌏 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌏 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: प्रफुल्ल राजेंद्र शेजव -- लेखक**१९८३: सुरेश किसनराव भिवगडे -- कवी**१९७९: प्रा. डॉ .पृथ्वीराज भास्करराव तौर -- कवी, अनुवादक, समीक्षक, संपादक, कथाकार, भाषांतरकार आणि संशोधक**१९७७: कुमार राम नारायण कार्तिकेयन-- भारतीय रेसिंग ड्रायव्हर**१९७१: महेंद्र दाजीसाहेब देशमुख -- कवी**१९६६: श्रीनिवास वारुंजीकर -- कवी, पत्रकार,अनुवादक**१९६६: पुष्पराज गावंडे -- प्रसिद्ध कवी, कादंबरीकार* *१९६५:सीमा बिस्वास -- भारतीय अभिनेत्री* *१९६१: निर्मला रामदास पाटील -- कवयित्री* *१९५७: डॉ. शैलेजा शंकर कोरडे -- लेखिका, कवयित्री* *१९५३: प्रा.डॉ.प्रदीप विटाळकर -- लेखक**१९४२: योगेश कुमार सभरवाल -- भारताचे ३६ वे सरन्यायाधीश (मृत्यू: ३ जुलै २०१५ )**१९३९: प्रा. सुरेश श्रीकृष्ण पांढरीपांडे -- लेखक**१९३८: रघुवीरसिंग यादवसिंग राजपूत -- प्रसिद्ध लेखक* *१९३८: राजेंद्र श्रीनिवास बनहट्टी -- कथाकार, कादंबरीकार, नाटककार**१९३५: श्रीकांत शंकरराव सदावर्ते -- कवी, लेखक* *१९३२: डॉ. विठ्ठल बाबू तथा वि.बा. प्रभुदेसाई -- साहित्य संशोधक, मराठी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक तसेच नागपूर विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख (मृत्यू: ३ मे २०१८ )**१९३२: प्रभा पार्डीकर -- प्रसिद्ध साहित्यिक* *१९३१:सईद अहमद शाह ऊर्फ ’अहमद फराज’ – ऊर्दू शायर (मृत्यू:२५ ऑगस्ट २००८)**१९३१: प्राचार्य डॉ. नारायण यशवंत डोळे -- उत्तम लेखक, प्रभावी वक्ते (मृत्यू: ३० ऑक्टोबर २००१ )**१९३०: पंढरीनाथ केशवराव कांबळे -- लेखक**१९२८: अॅड. माधव गणेश सराफ -- लेखक**१९२६: विठ्ठल शंकर पारगावकर -- प्रसिद्ध लेखक**१९२६; महाश्वेता देवी – प्रसिध्द बंगाली लेखिका (मृत्यू: २८ जुलै २०१६ )**१९२३: चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००९ )**१९१९: सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ’कैफी आझमी’ – गीतकार (मृत्यू: १० मे २००२ )**१९१२:द्वारकानाथ भगवंत कर्णिक -- महाराष्ट्र टाइम्सचे पहिले संपादक व लेखक (मृत्यू: १४ ऑक्टोबर २००५ )**१९०५: डॉ. ग. शि. पाटणकर -- लेखक* *१९०५: दुर्गा खोटे – हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री.’मी दुर्गा खोटे’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.(मृत्यू: २२ सप्टेंबर १९९१ )**१८९६: सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी.डी.देशमुख-- ’रिझर्व बँक ऑफ ईंडिया’ चे पहिले गव्हर्नर (मृत्यू: २ ऑक्टोबर १९८२ )**१८९२: शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा.दिनकर बळवंत तथा दि.ब.देवधर –भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. (मृत्यू: २४ ऑगस्ट १९९३ )**१८८३: कृष्णाजी केशव कोल्हटकर -- ग्रंथकार, योग व वेदान्त अभ्यासक (मृत्यु: २६ एप्रिल १९७५ )**१८८३: निना रिकी – जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९७० )**१८८२: रघुनाथ धोंडो तथा र.धों.कर्वे –महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठपुत्र (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९५३ )*🌏 *मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌏 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: शिवाजीराव बापूसाहेब देशमुख -- महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सभापती (जन्म: १ सप्टेंबर १९३५ )**२००१: फली बिलिमोरिया – माहितीपट निर्माते* *१९९१: चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ ’चित्रगुप्त’ – संगीतकार (जन्म: १६ नोव्हेंबर १९१७ )**१९८६: मालती माधव दांडेकर -- कथाकार, कादंबरीकार (जन्म: १३ एप्रिल १९१५ )**१९४६: बाळकृष्ण वामन सावर्डेकर-- लेखक (जन्म: २ जानेवारी १८८६ )* *१७६१: सदाशिवराव भाऊ – पानिपतच्या तिसर्या युद्धातील सरसेनापती (जन्म: ४ ऑगस्ट १७३० )**१७६१: विश्वासराव – पानिपतच्या ३ र्या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव (जन्म: २ मार्च १७४२ )**१७४२: एडमंड हॅले – हॅलेच्या धूमकेतूचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ,भूवैज्ञानिक, गणितज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ८ नोव्हेंबर १६५६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत*तिळगुळ घ्या - गोड गोड बोला*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आशियातील दुसऱ्या सर्वात मोठ्या मंदिराचे नवी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह शिंदे, पवारांची हजेरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सोयाबीन खरेदीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ, मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शालेय शिक्षणात महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास, विभागाच्या वतीने 100 दिवसांचा आराखडा सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात विजेची विक्रमी मागणी, शनिवारी 25,808 मेगावॅट वीज पुरवठा; कृषीपंपांमुळे मागणीत वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रयागराज - जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा कुंभमेळ्याला प्रारंभ, देश-विदेशातून भाविकांची गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बीडमधील केजच्या कन्येकडं भारताच्या खो-खो संघाची धुरा, वर्ल्ड कपमध्ये प्रियंका इंगळेकडं नेतृत्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 स्वप्नील पाटील👤 दीपक उशलवार👤 शिवहार चपळे👤 सुधाकर एम. कदम👤 तानाजी कदम👤 कैलास तालोड👤 रमेश बंडे👤 पवन कुमार तिकटे👤 सुनील मुंडकर👤 राजू वाघमारे👤 गौतम सोनकांबळे👤 मोनाली सोमवंशी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संत तुकाराम - तुकाराम बोल्होबा अंबिले*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फुलाच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फुलाचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही. -- रवींद्रनाथ टागोर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील प्रथम मुस्लीम महिला शिक्षिका कोण ?२) लोणार सरोवराची उत्पत्ती कशामुळे झाली असे मानले जाते ?३) बॉर्डर - गावस्कर कसोटी मालिकेत 'मालिकावीर' पुरस्कार कोणी जिंकला ?४) 'शेज' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती कोण आहेत ? *उत्तरे :-* १) फातिमा शेख २) उल्कापात ३) जसप्रीत बुमराह, भारत ४) बिछाना, अंथरूण, शय्या ५) राम शिंदे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच " गड्डा " यात्रा*सोलापूरात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर हे मंदिर प्रसिद्ध आहे.दरवर्षी १२ जानेवारी रोजी मल्लिकार्जुन मंदिरापासून यात्रेस सुरुवात होते.श्री सिध्दरामेश्वराच्या योग दंडाचे प्रतिक म्हणून नंधीध्व्ज उभारले जातात.चार दिवस चालणार्या या यात्रेस महाराष्ट्रसह कर्नाटक,आद्रप्रदेश येथून लोक येतात. यात्रेत सहभागी होणारे भक्त हे पाढरे वस्र्त परीधन केलेले असतात,यास बाराबंदी असे म्हटले जाते.१२ जानेवारीला सिध्दरामेश्वरानी स्थापन केलेल्या ६८ लिगाना तेलाभिशेक केला जातो.१३ जानेवारीला अक्षता सोहळा पार पडला जातो आणि नंतर पुन्हा ६८ लीगाना प्रदक्षिणा घातले जाते.१४ जानेवारी रोजी रात्री होम मैदानवरील होमकट्टा येते होमविधी सोहळा सपन्न केला जातो.१५ जानेवारी रोजी किंक्रांत असून या दिवशी रात्री शोभेच्या दारूकामाची आतषबाजी होते.१६ जानेवारी रोजी रात्री मालीकार्जुन मंदिरात निदीध्वजाच्या वस्त्रावीसर्जनाने (कप्पडकाळी) यात्रेतील धार्मिक कार्यक्रमाची सांगता होते.सिध्दरामेश्वर हे १२व्या शतकातले एक युग पुरुष होते.एके दिवशी कुंभार कन्येने सिध्दरामेश्वर यांना तिचा मानस सांगीतला कि ती सिध्दरामेश्वर याबरोबर विवाह करू इच्छिते,सिद्धरामेश्वर यांनी तिला सागितले कि मी ब्रम्हचारी आहे , माझे विवाह महादेवाशी झाले आहे.तरीही ती कुंभार कन्या ऐकली नाही ,त्यावर सिद्धरामेश्वर तिला बोले की तू या माझ्या योगदांडा सोबत विवाह कर पण तुला विवाहाच्या दुसऱ्या दिवशी तुझा देह त्याग करावा लागेल.१३ जानेवारीला विवाह झाला आणि १४ जानेवारीला कुंभार कन्याने तिचा देह त्याग केला.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चोरा ओढोनियां नेईजे जैं शुळीं । चालतां पाउलीं मृत्यु जैसा ॥१॥ तैसी परी मज जाली नारायणा । दिवसेंदिवस उणा होत असे ॥२॥ वृक्षाचिये मुळीं घालितां कुर्हाडी । वेंचे तैसी घडी आयुष्याची ॥३॥ नामा म्हणे हेंही लहरीचें जल । आटत सकळ भानुतेजें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणावरही का असेना विश्वास करताना थोडा विचार करावा म्हणतात. पण, एकदा अवश्य विश्वास करून बघावा. बरेचदा असं होतं की, एकाद्या व्यक्तीवर अविश्वास केल्याने नुकसान आपलेच होते कारण काही चांगल्या गोष्टी किंवा मदत प्रत्येकांकडूनच मिळतात असेही नाही म्हणून विश्वास करताना थोडे माणसं वाचूनही विश्वास करावा. बरेचदा त्यातून अनुभव ही येत असतो सोबतच शिकायला सुद्धा मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जीवनाचे सार*एक विलासी बादशहा होता. तो सर्व प्रकारची व्यसने करीत असे आणि आपल्याबरोबरच तो प्रधानालाही म्हणायचा," मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही, त्यामुळे आता जो जन्म मिळाला आहे त्याचा उपयोग करा आणि सर्व प्रकारचे उपभोग करून घ्या." प्रधान हा सन्मार्गी माणूस होता. त्याला बादशहाच्या उपभोगी, चैनी आणि विलासी वृत्तीचे दुःख व्हायचे पण वारंवार समजावूनही बादशहाचे वागणे काही बदलत नव्हते. बादशहा आपल्या मौजमजेच्या इतका आहारी गेला होता की त्याला आपल्या प्रजेची आठवण नसायची. प्रजेमध्ये बादशहाबाबत असंतोष होता मात्र बादशहा फारच कठोर व निर्दयी असल्याने कोणीही काही करू शकत नव्हते. एकेदिवशी प्रधानाने केलेल्या काही कामामुळे बादशहा फारच खुश झाला. त्याने दरबारामध्ये प्रधानाचा सत्कार केला व त्याला एक अत्यंत भरजरी व मौल्यवान अशी शाल भेट म्हणून दिली. पण प्रधानाने दरबाराच्या बाहेर येताच त्या भरजरी शालीला आपले नाक पुसले ही गोष्ट नेमकी प्रधानाच्या विरोधात असलेल्या एकाने राजाला जाऊन सांगितली. बादशहाला राग आला, त्याने प्रधानाला बोलावून एवढ्या मौल्यवान वस्तूचा अनादर करण्याचे कारण विचारले असता प्रधान म्हणाला," बादशहा, मी तेच करत आहे जे तुम्ही मला शिकवत आला आहात." बादशहा विचारात पडला की आपण असे काय शिकवले. प्रधान परत बोलू लागला, "महाराज, देवाने आपल्याला या शालीपेक्षा मौल्यवान असे शरीर दिले आहे पण आपण त्याचा गैरवापर करत आहात. व्यसने, भोग यामुळे या शरीराचा सन्मान न होता मोठा अपमानच आपण करत आला आहात. तो जेव्हा आपणाकडे पाहत असेल तेव्हा परमेश्वराला किती वाईट वाटत असेल की इतक्या मौल्यवान शरीराला आपण कशाप्रकारे वापरून त्याची घाण करत आहात. परमेश्वराचा प्रत्येक हृदयात वास असतो आणि त्याच शरीराला तुम्ही वाईट मार्गाने वापरत आहात." प्रधानाचे हे बोलणे ऐकताच राजाचे डोळे खाडकन उघडले. त्याने प्रधानाची क्षमा मागितली व पुन्हा कधीही त्याने गैरवर्तन केले नाही.तात्पर्य – ईश्वराने दिलेल्या शरीरसंपदेचा योग्य मागनि वापर केला पाहिजे. मानवाला बुद्धी, विवेक आणि ज्ञान याचे वरदान ईश्वराकडून मिळाले आहे. त्याचा योग्य उपयोग करून तो आपले जीवन सार्थकी लावू शकतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 जानेवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/188MvYzWzb/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ☣️ *_ या वर्षातील १३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☣️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☣️••••••••••••••••••••••••••••••••• *२००७: के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९९६: 'पुणे - मुंबई दरम्यान ’शताब्दी एक्सप्रेस’ सुरू झाली.**१९८१: मुंबईतील चुनाभट्टी येथील 'भारतीय कला मनरम" या संस्थेच्या भव्य वास्तूचे उद्घाटन श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले**१९६७: पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री.चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न.**१९५७: हिराकूड धरणाचे पंडित नेहरूंच्या हस्ते उद्घाटन झाले.**१९५३: मार्शल टिटो युगोस्लाव्हियाच्या अध्यक्षपदी**१८९९: गोविन्द बल्लाळ देवल यांच्या ’संगीत शारदा’ या नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.* ☣️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☣️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: वैभव भिवरकर -- प्रतिभावंत कवी, लेखक, वक्ते**१९८७: डॉ. कुणाल मुरलीधर पवार -- कवी* *१९८३: इम्रान खान – भारतीय चित्रपट कलाकार**१९८२: कमरान अकमल – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९७८: प्रा. कीरण नामदेवराव पेठे -- कवयित्री**१९७६: जीवन तळेगावकर -- कवी, लेखक**१९७१: संतोष दत्तात्रय जगताप -- कवी, लेखक**१९७०: स्वाती प्रभाकरराव कान्हेगावकर-- लेखिका* *१९७०: सत्यवान सीताराम देवलाटकर -- लेखक**१९६९: चंद्रशेखर बावनकुळे -- महसूल मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष* *१९६७: डॉ. गीतांजली शर्मा (कसमळकर)-- कवयित्री तथा नेत्रतज्ज्ञ* *१९६३: मोरेश्वर रामजी मेश्राम -- कवी* *१९५५: सरिता रमेश आवाड -- लेखिका**१९४९: राकेश शर्मा – अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय, आणि जगाचे १३८ वे अंतराळवीर**१९४८: आत्माराम कनिराम राठोड (तांडाकार) -- प्रसिद्ध लेखक, कवी (मृत्यू: २३ मे २००५ )**१९४७: प्रा. वसंत मारुतीराव जाधव -- कवी, संपादक* *१९४२: जावेद सिद्दीकी -- भारतातील हिंदी आणि उर्दू पटकथा लेखक,संवाद लेखक आणि नाटककार* *१९३८: पं. शिवकुमार शर्मा – प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार(मृत्यू: १० मे २०२२ )**१९३२: सुलभा ब्रह्मे -- प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, मार्क्सवादी विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्या ( मृत्यू: १ डिसेंबर २०१६ )**१९२६: शक्ती सामंत – हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते (मृत्यू: ९ एप्रिल २००९ )**१९२६:दिनकर बाळू पाटील -- भारतीय वकील, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते(मृत्यू: २४ जून २०१३ )**१९१९: एम. चेन्ना रेड्डी – आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, माजी राज्यपाल(मृत्यू: २ डिसेंबर १९९६ )**१९१८: प्रा. अच्युत केशवराव भागवत -- लेखक संपादक, अनुवादक* *१९१५: प्रा. दत्तात्रय सखाराम दरेकर -- लेखक, चरित्रकार* *१९०८: रावसाहेब म्हाळसाकांत वाघमारे -- कवी, लेखक (मृत्यू: ७ मार्च१९८९ )**१८९६: मनोरमा श्रीधर रानडे -- मराठी कवयित्री,रविकिरण मंडळाच्या सदस्या (मृत्यू: १९२६ )**१८९१: गोपाळ रामचंद्र परांजपे -- विज्ञान लेखक व संपादक ( मृत्यू: ६ मार्च १९८१ )* ☣️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☣️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२४: प्रभा अत्रे -- किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका व लेखिका (जन्म: १३ सप्टेंबर १९३२ )**२०१४: अंजली देवी -- भारतीय अभिनेत्री,चित्रपट निर्माती (जन्म: २४ ऑगस्ट १९२७ )**२०१४: पंडित पुरुषोत्तम वालावलकर -- हार्मोनियम वादक (जन्म:११ जून २०२३)**२०११: प्रभाकर विष्णू पणशीकर –मराठी रंगभूमीवरील अभिनेते,दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते (जन्म: १४ मार्च १९३१ )**२००१: श्रीधर गणेश दाढे – संस्कृत पंडित व लेखक.कालिदासाचे ’मेघदूत’ कवींद्र परमानंद यांचे 'शिवभारत’ यांचे पद्यमय अनुवाद त्यांनी केले आहेत.* *१९९८: शंभू सेन – संगीत दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक* *१९९७: मल्हार सदाशिव तथा ’बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक (जन्म: १५ एप्रिल १९१२ )**१९८९: श्रीकृष्ण जनार्दन जोशी -- लेखक (जन्म: १ ऑगस्ट १९१५ )**१९८५: मदन पुरी – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील चरित्र अभिनेता (जन्म: १९१५ )**१९७६:अहमद जाँ थिरकवा – सुप्रसिद्ध तबला वादक (जन्म: १८९२)**१९६७: हरी दामोदर वेलणकर -- संस्कृत पंडित व ग्रंथकार (जन्म: १८ऑक्टोबर १८९३ )**१८३२: थॉमस लॉर्ड – लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक (जन्म: २३ नोव्हेंबर १७५५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बंधुभावाचा संदेश देणारा सण - मकरसंक्रांत*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सार्वत्रिक निवडणुकात महाराष्ट्र राज्याने केलेल्या कामाचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *प्रयागराज येथे आजपासून महाकुंभमेळा प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महावितरणला मिळाला मोठा सन्मान, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 साठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत 100 हून अधिक कामगारांना विषबाधा, प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात उपचार सुरू, अन्न किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील कोलकास येथील तीन हत्तीणी 15 दिवसांच्या विशेष रजेवर, या काळात पर्यटकांसाठी हत्ती सफारी बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *माजी क्रिकेटपटू देवजित सैकिया यांची BCCI च्या सचिवपदी निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत विरुद्ध इंग्लंड संघातील टी-20 मालिकेला 22 जानेवारीपासून होणार सुरू, म. शम्मीचे पुनरागमन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 व्यंकटेश भांगे, शिक्षक, देगलूर👤 माधव सोनटक्के, शिक्षक, धर्माबाद👤 बालाजी देशमाने👤 विजयकुमार चिकलोड👤 सौदागर जाधव👤 जितेंद्र कुमार👤 संतोष माधवराव पाटील कदम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आनंद - वि.ल.बर्वे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निसर्गामध्ये क्रोध हीच एकमेव अशी गोष्ट आहे की , जी माणसाला पशु बनवते , विकृत करते. ---- जाॕन वेबस्टर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अमेरिकेतील प्रख्यात 'ट्रॅक अँड फील्ड न्यूज' ने *२०२४ मधील जगातील सर्वोत्कृष्ट भालाफेकपटू* म्हणून कोणाची निवड केली ?२) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?३) राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो ?४) देशाचा प्रथम नागरिक कोण असतो ?५) महानगरपालिकेचा प्रथम नागरिक कोण असतो ? *उत्तरे :-* १) नीरज चोप्रा, भारत २) सरपंच ३) राज्यपाल ४) राष्ट्रपती ५) महापौर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚆 *संदेशवहन व्यवस्था आगगाडीची* 🚆 जगातील आगगाड्या विविध वेगाने धावतात. काही ठिकाणी ती पाचशे किलोमीटर ताशी वेग घेते. काही ठिकाणी दर मिनिटाला एक अशी एकामागे एक आगगाडी सुटत असते. कोणतीही आगगाडी पूर्ण वेगात धावत असताना थांबण्यासाठी किमान एक किलोमीटरचे अंतर घेते; तर थोडाही वेग घेतला असला तरीही तिचे ब्रेक कार्यान्वित होऊन ती थांबायला किमान वीस फूट अंतर जावेच लागते.अनेक ठिकाणी आगगाडीच्या रुळांची एकच जोडी उलटसुलट वापरासाठी वापरली जाते. यालाच सिंगल ट्रॅक म्हणतात. काही ठिकाणी फोर वा सिक्स ट्रॅक्स वापरात असतात. पण हे सर्व एकमेकांत बदलता येऊन, सांधे बदलून एका ट्रॅकवरची गाडी दुसरीकडे जाऊ शकते. या ट्रॅकवर एकाच वेळी उलटसुलट, कमी जास्त वेगाने रूळ बदलत गाड्या धावताना पाहून मन थक्क होते. हे सारे शक्य झाले आहे, ते सतत बदलत गेलेल्या अत्याधुनिक संदेशवहन व्यवस्थेमुळेच.रेल्वे सिग्नलिंग हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. पण हा विषय एका पद्धतीने हाताळून सुटसुटीत केला जातो. संपूर्ण रेल्वेमार्गाचे अनेक सेक्शन पाडले जातात. प्रत्येक सेक्शनवर एका वेळी फक्त एकच रेल्वेगाडी धावेल हा मूलभूत नियम पाळला जातो. समजा एखाद्या वेळी एका सेक्शनमध्ये एकापेक्षा अधिक गाड्या रुळावर असल्या तर एकच गाडी पळत राहते. अन्य फक्त उभ्या केल्या जातात व त्याही साइडिंगला असलेल्या रुळांवर.अर्थात हे सारे वाटते तितके सोपे नक्कीच नाही. पण एकदा मूळ तत्त्व ठरले की ते काटेकोरपणे अंमलात आणले जाते. पूर्वी यासाठी मदत घेतली जायची ती खालीवर होणाऱ्या दांडीच्या सिग्नलची. रात्रीच्या वेळी लाल व हिरवे दिवे असत. आता बव्हंशी त्यांची जागा घेतली आहे ती दिव्यांनीच. दिवे मात्र आता फक्त दोनच प्रकारचे नसून अनेक प्रकारचे असतात. वेगाने जा, हळू वेगाने जा, मंद गतीने सरकत जा, पूर्णपणे जागीच थांबा, असे संदेश आता या दिव्यांतर्फे दिले जातात.समजा एखाद्या आगगाडीच्या ड्रायव्हरने हे संदेश पाळलेच नाहीत, तो ते बघायलाच विसरला, त्याला कळले नाही, तर त्याची आगगाडी तशीच पुढे जाते. पण या वेळी पुढच्या सिग्नलपाशी त्याची गाडी अडवण्याची व्यवस्था केली जाते. मार्गावर जर वीजपुरवठ्यावर इंजिन चालू असेल, तर तेही बंद करण्याची व्यवस्था केली जाते. आपोआपच तो मार्ग बंद होतो. अत्यंत गर्दीच्या सर्व मार्गांवर ही व्यवस्था केली गेली आहे.संदेशव्यवस्था कशी चालू आहे, कुठे कोणती आगगाडी किती वेगाने पळते आहे हे सतत दाखवण्याची व्यवस्था केंद्रीय नियंत्रण स्थानकात सतत कार्यरत असते. उदाहरणार्थ, मुंबई ते सोलापूर या मार्गावरील सर्व गाडय़ा मुंबईतील नियंत्रण केंद्रातील अधिकाऱयाच्या नजरेखाली असतात. त्यामुळे तातडीचे काही बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली तर तो तेथूनच सूचना पुरवू शकतो.इतके सर्व असूनही कधीतरी अपघात घडतात. ते भीषणच असतात. याला कारण यंत्रात अचानक उद्भवणारे दोष व धडधडीत मानवी चुका. दोन्ही एकत्रितपणे जर घडून आले तर अपघाताचे स्वरूप वाईट असते. यंत्रात अचानक उद्भवणारे दोष वा यंत्रणेचे अपयश (systems failures) यावर आता मात करण्यात शास्त्रज्ञांना खूपसे यश मिळालेले आहे. मानवी चुकांवर मात्र पूर्ण नियंत्रण मिळालेले नाही.स्वयंचलित 'ड्रायव्हरलेस' ट्रेनही काही ठिकाणी परदेशात वापरण्यास सुरुवात झाली आहे. मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून दिल्या जाणाऱ्या संदेशांवर ती 'ड्रायव्हरलेस' ट्रेन काम करते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घालूनि आसन साधिला पवन । घेतलें जीवन अंतरिक्षीं ॥१॥ पराहस्तें तृप्ति नव्हे जी दातारा । कृपा करुणा करुणा करा केशिराजा ॥२॥ जीवाचें जीवन तूं सर्वांचें कारण । धांव मजालागुन केशिराजा ॥३॥ अनाथाचा नाथ हेंज ब्रीद साचार । झणें माझा अव्हेर करिसी देवा ॥४॥ विष्णुदास नामा अंकियेला तुझा । विनवी केशिराजा प्रेमसुखें ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यासोबत धोका तेव्हा होतो जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपण डोळे झाकून विश्वास करत असतो. ऐन त्याच वेळी जी कोणी व्यक्ती जे काही सत्य सांगत असते.त्यावेळी त्या व्यक्तीला सबूत मागितले जाते. अशा वेळी मात्र सांगणाऱ्या व्यक्तीला गप्प बसावे लागते.म्हणून आपल्या समोर जे काही दिसत असेल त्यावर डोळे झाकून विश्वास करू नये. किंवा आपले कान बंद करू नये. सत्य काय ते समजून घेतले पाहिजे.बरेचदा आपल्या एका चुकीमुळे आपली मेहनत,आपला स्वाभिमान,आपल्यात असलेली सत्यता यावर पडदा पडायला जास्त वेळ लागत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एक हाताची टाळी*वनातील आश्रमात एक संत राहत होता. त्यांच्यासोबत एक अनाथ मुलगाही राहत होता. संतांना पाहून त्या मुलालाही ध्यानसाधना शिकण्याची इच्छा झाली. तो संतांजवळ जाऊन म्हणाला, "गुरुजी मला ध्यानसाधना शिकायची आहे." संतांनी त्याला समजावले की तुझे वय हे ध्यानसाधना करायचे नाही. आता तू भक्ती शिक. पण मुलगा आपल्या जिद्दीवर अडून राहिला. त्याचा हट्ट पाहून संतांनी दोन्ही हातांनी मिळून एक जोरात टाळी वाजवली आणि मुलाला म्हणाले," हा दोन हातांच्या टाळीचा आवाज आहे. आता तू बाहेर जा आणि एका हाताच्या टाळीचा शोध घे." मुलाने विचार केला की, एका हाताची टाळी म्हणजेच ध्यानसाधना असेल तेव्हा तो आवाज अत्यंत मधूर व अद्भूत असेल. मुलगा रात्रंदिवस एका हाताच्या टाळीचा आवाज शोधू लागला. एके दिवशी मुलगा जंगलात एकेठिकाणी बसला होता, तेथे मंद हवेमध्ये झाडांची पाने हलताना एकमेकांवर घासत होती. मुलाला वाटले की पानांच्या ह्या आवाजात दिव्य प्रकारची शांती आहे. हाच एका हाताच्या टाळीचा आवाज आहे. तो मुलगा पळतच संतांकडे गेला आणि संतांना या आवाजाची माहिती दिली. संत म्हणाले," हा तर पानांचा आवाज आहे. एका टाळीचा आवाज नाही. आणखी शोध घे." मुलाचा शोध सुरुच राहिला. प्रत्येक वेळी मुलगा संतांना काहीतरी सांगायचा व प्रत्येक वेळी संत नकार देत गेले आणि मुलाला आणखी शोध घे असे सांगितले. मुलगा आता अठरा वर्षाचा झाला होता. एक दिवस तो गुरुजींकडे जाऊन बसला आणि डोळे बंद करून गहि-या मौनामध्ये डुंबला. जणूकाही त्याची समाधीच लागली होती. गुरुजी काहीच बोलले नाहीत. गुरुजींनी मंदस्मित केले आणि शांत राहिले कारण त्यांच्या शिष्याला आता कुठे एका हाताच्या टाळीचा आवाज ऐकू येऊ लागला होता.तात्पर्य – ध्यान मनाच्या एकाग्रतेवर अवलंबून आहे आणि मनाची एकाग्रता, योग्य गुरुचे मार्गदर्शन यामुळे आपण आतूनबाहेरून पूर्णपणे बदलून जातो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 जानेवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18YUKZZAa9/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ११ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🫧 *_महत्त्वाच्या घटना:_* 🫧•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**२०००: छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना**१९९९: ’कमाल जमीनधारणा कायदा’ रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी**१९९६: नेल्सन मंडेला यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला**१९८०: बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.**१९७२: पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.**१९६६: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.**१९४२: दुसरे महायुद्ध - जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले**१९२२: मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.**१७८७: विल्यम हर्षेल याने ’टिटानिया’ या युरेनसच्या सर्वात मोठ्या चंद्राचा शोध लावला. त्याच दिवशी त्याने ’ओबेरॉन’ या युरेनसच्या दुसर्या मोठ्या चंद्राचाही शोध लावला.*🫧 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🫧 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: डॉ. मयूर बंडू लहाणे -- लेखक* *१९७९: डॉ. रेणुका शरद बोकारे -- लेखिका, संपादिका* *१९७५: दत्तप्रसाद द्वारकादास झंवर -- कवी, लेखक**१९७४: प्रा. डॉ. संभाजी व्यंकटराव पाटील-- लेखक* *१९७३: राहुल द्रविड- भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, प्रशिक्षक,उत्कृष्ट फलंदाज**१९६७: प्रा.नरेश हरिश्चंद्र खोडे -- लेखक**१९६७: मधुकर गणपतराव कोटनाके -- कवी**१९६६: लक्ष्मण शंकर हेंबाडे -- कवी* *१९६५: धनंजय लक्ष्मीकांतराव चिंचोलीकर-- स्तंभलेखक, कथा,कादंबरी, नाटक या वाड:मय प्रकारात लेखन* *१९६१: राधिका मिलिंद राजंदेकर -- कवयित्री* *१९५५: आशा खाडिलकर – उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका**१९५४: चद्रकांत भोंजाळ -- प्रसिद्ध मराठी लेखक आणि ज्येष्ठअनुवादक**१९५०: अरुण गुलाबराव डावखरे -- लेखक, अनुवादक* *१९४४: शिबू सोरेन – झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री**१९४४: सुभाष विनायक पारखी -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९४२: प्रा. डॉ. यशवंत देशपांडे -- विज्ञान कथा लेखक**१९३६: डॉ. नरसिंह महादेव जोशी -- प्रसिद्ध मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक**१९२८: पं. अरविंद रामचंद्र गजेंद्रगडकर -- बासरीवादक, लेखक (मृत्यू: ३० मे २०१० )**१९२५: श्री. के. केळकर -- लेखक (मृत्यू: १० जानेवारी १९९६ )**१९२४: नासिर खान -- भारतीय अभिनेता (मृत्यू: ३ मे १९७४ )**१८९८: विष्णू सखाराम खांडेकर -- सुप्रसिद्ध मराठी कादंबरीकार, ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित (ययाति १९७४ )(मृत्यू: २ सप्टेंबर, १९७६ )**१८५९: लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय (मृत्यू: २० मार्च १९२५ )**१८५८: श्रीधर पाठक – हिन्दी कवी,लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२६ )**१८१५: जॉन ए.मॅकडोनाल्ड – कॅनडाचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: ६ जून १८९१ )* 🫧 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🫧••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: पंडित भालचंद्र दामोदर देव -- ज्येष्ठ व्हायोलीन वादक (जन्म: १९३६)**२०२१: डाॅ. जुल्फी शेख -- संत साहित्याच्या अभ्यासिका,संवेदनशील कवयित्री डी.लिट.पदवीने संन्मानीत (नागपूर विद्यापीठ)(जन्म: ७ मे १९५४ )**२००८: य. दि. फडके – लेखक व इतिहास संशोधक (जन्म: ३ जानेवारी १९३१ )**२००८: सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक (जन्म: २० जुलै १९१९ )**१९९७: भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (जन्म: २१ फेब्रुवारी १९११ )**१९६६: स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते.(जन्म: २ ऑक्टोबर१९०४ )**१९६४: शांताराम गोपाळ गुप्ते -- कादंबरीकार, नाटककार (जन्म: १९०७ )**१९५४: सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या 'सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष.जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. (जन्म: २८ फेब्रुवारी १८७३ )**१९२८: थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी (जन्म: २ जून १८४० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••12 जानेवारी - या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ यांची जयंती त्यानिमित्ताने*राजमाता जिजाऊ भोसले*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनासाठी खास सोय, पुणे-दिल्ली दरम्यान विशेष रेल्वे; 20 डब्यांसह स्लीपर क्लास आणि पँट्री कोच उपलब्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने वस्त्रोद्योग विषयक अभ्यासक्रम - उपक्रम सुरू करावेत - राज्यपाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित तिसरे विश्व साहित्य संमेलन 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान पुण्यात होणार, बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा जनतेशी थेट संवाद, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष बैठक; शेती महामंडळाच्या जमिनींसाठी जिओ टॅगिंगचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सरकारी कर्मचारी भरतीचे 15 वर्षांचे ऑडिट करावे, हिंदू महासंघाची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अपघात रोखणे आपल्या हातात:सुरक्षितता बाळगण्यात आहे ‘हिरोगिरी’ - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शेख निजाम गावंडगावकर👤 बालाजी पुलकंठवार, धर्माबाद👤 शुभम पाटील कदम👤 गणेश हिवराळे पाटील👤 हणमंत पांडे👤 राहुल ढगे👤 साई यादव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अमरशेख - मेहबूब पठाण*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भयाने व्याप्त असणाऱ्या या विश्वात दयाशील वृत्तीचा मनुष्यच निर्भयपणे राहू शकतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशातील कोणत्या ठिकाणी पहिला काचेचा पुल उभारण्यात आला आहे ?२) जिल्हा नियोजन समितीचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?३) सर्वाधिक महिला शिक्षिका प्रमाण असणारे राज्य कोणते ?४) 'शत्रू' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महात्मा फुले यांनी वयाच्या कितव्या वर्षी विवाह केला ? *उत्तरे :-* १) कन्याकुमारी २) पालकमंत्री ३) केरळ ४) अरी, रिपू , वैरी ५) १३ व्या*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 #उत्क्रांती म्हणजे काय ? 📙 भाग - १ (१/६)ही कहाणी सुरू होते खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे जवळजवळ साडेचार अब्ज वर्षांपूर्वी.त्याच काळात केव्हातरी आपल्या पृथ्वीचा जन्म झाला. त्यावेळची पृथ्वी म्हणजे तप्त द्रवरूप धातू, धूळ आणि वायू यांचा गोळा होता. अनेक लक्ष वर्षे गेली आणि गोळ्याचा पृष्ठभाग हळूहळू थंड होत त्याचे रूपांतर कठीण कवचात होत गेले. हे कवच म्हणजेच खडकांनी बनलेला पृथ्वीचा पृष्ठभाग. सुरुवातीच्या काळात हा पृष्ठभाग बनत होता. आतल्या तप्त द्रवाच्या धडकांनी पुन्हा फुटत होता, पुन्हा घडत होता, जागा बदलत होता. पृथ्वीवर सापडलेल्या सर्वात पुरातन खडकाचे वय सुमारे चार अब्ज तीस लाख वर्षे आहे.पृथ्वीचा हा पृष्ठभाग बनत होता, त्याबरोबर त्या पृष्ठभागावर पाणी जमा होत होते आणि भोवती वातावरणाचा थरही बनत होता. मात्र हे वातावरण बनले होते मुख्यतः कार्बन डायऑक्साइड, मिथेन, अमोनिया, हायड्रोजन या वायुंनी. पृथ्वीभोवतीच्या वातावरणात ऑक्सिजन जवळजवळ नव्हताच. वेगवेगळ्या भौतिक व रासायनिक प्रक्रियांमधून हळूहळू अॉक्सिजनचे प्रमाण वाढत गेले. जीवसृष्टीच्या उदयाला हा बदल अत्यंत उपयुक्त ठरला. या सगळ्यांचे मिळून बनलेले हे रसायन पृथ्वीच्या पृष्ठभागावर पसरलेले होते आणि त्यावर सतत आदळत होते सूर्याचे अतिनील किरण. त्या रसायनात घडत होता विजांचा चमचमाट. या भौतिक आणि रासायनिक प्रक्रियांमधूनच केव्हातरी पहिल्या सजीव पेशीच्या जन्माला आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा मुख्यतः प्रथिने बनवणाऱ्या अमिनो अॅसिडचा उद्भव झाला.पृथ्वीच्या जन्मापासून आजपर्यंतच्या काळाचे शास्रज्ञांनी वेगवेगळे भाग पाडले आहेत.अगदी सुरुवातीचा सुमारे दोन अब्ज वर्षांचा काळ आर्चिअन इऑन (आर्चिअन कल्प) या नावाने ओळखला जातो. या काळात पृथ्वीवर सजीव पेशी जन्माला आली नव्हती.आर्चिअन कल्पानंतरचा सुमारे एक अब्ज नव्वद कोटी वर्षांचा काळ प्रोटेरोझोइक इऑन (प्रोटोरोझोइक कल्प) या नावाने ओळखला जातो.या दोन्ही कालखंडांना मिळून प्रिकेंब्रिअन इरा (प्रक्रेंब्रिअन युग) असेही नाव दिले आहे. पृथ्वीच्या आजवरच्या इतिहासापैकी जवळजवळ ८० टक्के काळ हा प्रिकेंब्रिअन युगानेच व्यापलेला आहे.क्रमश : सृष्टी विज्ञानगाथा या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गाणीं मी गाईलों भाटीं वाखाणिलों । जन्मोनियां जालों दास तुझा ॥१॥ आतां माझी लाज राखें नारायणा । झणीं केविलवाणा दिसों देसी ॥२॥ माये दुर्हाविलों मोहें मोकलिलों । सोये पैं चुकलों संसाराची ॥३॥ आपवर्गिं सांडिलों प्रवृत्ती दंडिलों । मीपना मुकलों मायबापा ॥५॥ नामा म्हणे तुझ्या चरणाची आवडी । लागली न सोडी चित्त माझें ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यासोबत धोका तेव्हा होतो जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपण डोळे झाकून विश्वास करत असतो. ऐन त्याच वेळी जी कोणी व्यक्ती जे काही सत्य सांगत असते. त्यावेळी त्या व्यक्तीला सबूत मागितले जाते. अशा वेळी मात्र सांगणाऱ्या व्यक्तीला गप्प बसावे लागते.म्हणून आपल्या समोर जे काही दिसत असेल त्यावर डोळे झाकून विश्वास करू नये. किंवा आपले कान बंद करू नये. सत्य काय ते समजून घेतले पाहिजे.बरेचदा आपल्या एका चुकीमुळे आपली मेहनत,आपला स्वाभिमान, आपल्यात असलेली सत्यता यावर पडदा पडायला जास्त वेळ लागत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *इंद्रियांवर ताबा*एक महात्मा रस्त्यातून घरी चालले होते. वाटेत त्यांना एक लिंबू विक्रेता दिसला. लिंबे रसाळ आणि ताजी होती.महात्म्याच्या तोंडाला पाणी सुटले. लिंबे खरेदी केली पाहिजेत असे त्यांना वाटले. त्यांनी लिंबाना निरखून पाहिले, ती स्वादिष्ट आहेत काय याचीही चौकशी केली पण जिभेच्या या चोचल्याचा मनाने धिक्कार केला. लिंबू पाहून तोंडाला पाणी सुटणे हा एक प्रकारचा लोभ आहे आणि तो साधनेच्या कार्यात अडथळा निर्माण करतो. महात्मा पुढे गेले परंतु त्यांचा जिभेचा शौक हार मानत नव्हता. त्यांची जीभ लिंबांचा स्वाद घेण्यासाठी आसुसली होती. ते परत लिंबूवाल्याकडे आले. त्याच्याकडील लिंबे निरखून पाहू लागले. परत एकदा मनाने धिक्कार केला आणि हातातील लिंबू खाली टाकून महात्मा परतले. चार पावले पुढे गेल्यावर परत एकदा त्यांच्या मनाने उचल खाल्ली आणि ते परत लिंबूवाल्याकडे आले. लिंबूवाला त्यांचे हेलपाटे पाहून आश्चर्यचकित झाला. त्याला हे कळेना की हे महात्मा सारखे का हेलपाटे मारत आहेत. यांना खरेच लिंबू खरेदी करायचे आहे की नुसतेच पाहत आहेत. शेवटी न राहवून त्याने विचारले, "महाराज, तुम्हाला जर लिंबे खरेदी करायची असतील तर अवश्य करा ना पण नुसतेच हेलपाटे का मारत आहात." शेवटी महात्म्यांनी दोन लिंबे खरेदी केली आणि घरी आले. घरी येताच त्यांनी पत्नीला चाकू मागितला. लिंबांचे दोन तुकडे केले. जसा पहिला लिंबाचा तुकडा तोंडाजवळ आणला तसा मनाने टोमणा मारला, "वा रे वा महात्माजी, तू तर या जिभेचा गुलाम झाला. जीभ जशी नाचवेल तसा तू नाचायला लागला. ती जे खायला मागेल तसा तू तिला खायला द्यायला लागला. आता तुझी साधना ही विषयांकडे चालली आहे." तितक्यात त्यांची पत्नी तिथे आली व तिने पतीचा तोंडाजवळ थबकलेला हात पाहून विचारले, "अहो, लिंबाचा स्वाद घेता घेता का थांबलात." महात्म्यांनी ते कापलेले लिंबू आणि उरलेले अर्धे लिंबू दोन्हीही पत्नीच्या हातात देऊन तिला सांगितले," मी आता हे खाणार नाही कारण आता मी जीभेवर विजय मिळवला आहे. आता मला विश्वास पटला आहे की मी इंद्रियावर ताबा ठेवू शकतो."*तात्पर्य - इंद्रियांवर ताबा ठेवता येणे ही फार मोठी साधना आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 जानेवारी 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2025/01/world-hindi-day.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⭕ *_विश्व हिंदी दिवस_* ⭕••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⭕ *_ या वर्षातील १० वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⭕ *_महत्त्वाच्या घटना:_* ⭕••••••••••••••••••••••••••••••••*२००८: शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांना जीवन गौरव पुरस्कार* *१९७५: हिंदी ची महती भारताबाहेर पोचविण्यासाठी राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा तर्फे विश्व हिंदी संमेलन* *१९७२: पाकिस्तानमधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे परतले.**१९६६: भारत व पाकिस्तान यांच्यात ’ताश्कंद करार’ झाला.**१९२९: जगात अमाप लोकप्रियता मिळालेले ’द अॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन’ हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.**१९२६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक मुंबईत सुरू केले.**१९२०: पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.**१८७०: बॉम्बे,बडोदा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे (B.B.C.I.Railway) या ब्रिटिशकालीन रेल्वे कंपनीच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले. या स्थानकावर फक्त एक फलाट होता.**१८६३ :चार्ल्स पिअर्सन याच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.**१८०६: केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.**१७३०: पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.**१६६६: सुरत वरून शिवाजीमहाराज राजगडाकडे निघाले.* ⭕ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⭕ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: सुयश टिळक -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता**१९८२: कालिदास अंकुश शिंदे -- लेखक* *१९८१: दीप्ती श्रेयस तळपदे -- निर्माती, दिग्दर्शिका, मानसशास्त्रज्ञ**१९७५: राजेश गंगाराम जाधव -- कवी* *१९७४: प्रा. विजय काकडे -- कथाकार, लेखक, वक्ते* *१९७४: हृतिक रोशन – प्रसिद्ध सिनेकलाकार**१९७३: रेशम टिपणीस -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री**१९६९: प्रा. डॉ. विठ्ठल लक्ष्मणराव चौथाले -- लेखक* *१९६८: रमेश सूर्यभान डोंगरे -- प्रसिद्ध लेखक**१९६७: माला आनंद मेश्राम -- कवयित्री**१९६५: प्रा. डॉ. विलास विश्वनाथ तायडे -- लेखक, समीक्षक, संपादक* *१९६४: डॉ. समीरण वाळवेकर -- निवेदक, पत्रकारिता, वृत्त टेलिव्हिजन, शैक्षणिक टेलिव्हिजन, मनोरंजन टेलिव्हिजन, मालिका, चित्रपट,सहायक दिग्दर्शन, कादंबरी लेखन , निवेदन,या सर्व क्षेत्रात भरीव काम**१९५९: डॉ. सुरेखा विनोद -- कवयित्री तथा स्त्रीरोगतज्ञ**१९५६: अरुण भालचंद्र धाडीगावकर -- लेखक, संपादक,नाट्य परीक्षक, कलाकार**१९५५: नारायण सुमंत -- कवी**१९५५: डॉ. दिलीप गरुड -- प्रसिद्ध लेखक* *१९५२: सलीम घौस --भारतीय अभिनेते ( मृत्यू: २८ एप्रिल २०२२ )**१९५०: नजूबाई गावित-- आदिवासी, भूमिहीन, शेतकरी, धरणग्रस्त इत्यादींच्या लढ्यात सहभाग घेणाऱ्या आदिवासी समाजातील कार्यकर्त्या**१९४७: प्राचार्य डॉ. पंडितराव एस. पवार-- लेखक, संशोधक, संपादक* *१९४६: निरंजन घाटे -- विज्ञानकथा, कादंबऱ्या लिहिणारे एक मराठी लेखक* *१९४२: डॉ. अशोक प्रभाकर कामत -- हिंदी-मराठी साहित्यिक आणि संतवाङ्मयाचे चिकित्सक अभ्यासक**१९४०: के. जे. येसूदास – पार्श्वगायक व संगीतकार**१९३७: मुरली देवरा,-- उद्योजक, समाजसेवक आणि भारतीय काँग्रेस या राजकीय पक्षाचे नेते (मृत्यू: २४ नोव्हेंबर २०१४ )**१९३५: कमलाकर नाडकर्णी -- ज्येष्ठ मराठी नाट्यसमीक्षक**१९१९:प्रा.श्रीपाद रघुनाथ भिडे -- लेखक* *१९०३: शामाचार्य नरसिंहाचार्य खुपेरकर (कालगावकर, अण्णाबुवा) -- समर्थ संप्रदाय, संस्कृत पंडित, संपादक (मृत्यु: ३ ऑक्टोबर १९९९ )**१९०१: डॉ. गणेश हरी खरे -- इतिहास संशोधक (मृत्यू: ५ जुन १९८५ )**१९००: मारोतराव सांबशिव कन्नमवार – महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३) (मृत्यू: २४ नोव्हेंबर १९६३ )**१८९६: नरहर विष्णू तथा ’काकासाहेब’ गाडगीळ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (मृत्यू: १२ जानेवारी १९६६ )**१८९६: दिनकर गंगाधर केळकर -- कवी, संपादक, संग्रहालयकार (मृत्यु: १७ एप्रिल १९९० )**१७७५: बाजीराव पेशवे (दुसरे) (मृत्यू: २८ जानेवारी १८५१ )* ⭕ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⭕ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: प्रभाकर भावे-- ज्येष्ठ रंगभूषाकार**२०१४: दाजीकाका गाडगीळ ऊर्फ अनंत गणेश गाडगीळ -- पुण्यातील पी.एन. गाडगीळ अँड सन्सचे मालक**२००२: पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास – ख्यालगायक,गुरु व बंदिशकार (जन्म: ९ नोव्हेंबर १९२४ )**१९९९: आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर – स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत* *१७७८: कार्ल लिनिअस – स्वीडीश वनस्पतीतज्ञ,वनस्पतींच्या दुहेरी नामकरणाची आंतरराष्ट्रीय पद्धत त्याने विकसित केली. ही पद्धत त्याला इतकी आवडली की त्याने स्वत:चेही नाव बदलून कॅरोलस लिनिअस असे केले.(जन्म: २३ मे १७०७ )**१७६०: दत्ताजी शिंदे – पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर (जन्म: १७२३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज विश्व हिंदी दिवस त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख*हिंदी आमची राष्ट्रभाषा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जिनोम इंडिया उपक्रम देशाच्या जैव तंत्रज्ञान क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचे - पंतप्रधान नरेंद्र मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकणार गाव, विदर्भातील पहिले मॉडेल सोलर व्हिलेज बनले हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट गाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *वसमत - निपुण हिंगोली उपक्रमात उत्कृष्ठ काम करणाऱ्यांचा सत्कार, मात्र दुर्लक्ष करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नारायणगाव येथे ग्लोबल कृषी महोत्सवाचे उद्घाटन, शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्यासोबतच कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा कृषीमंत्र्यांचा मानस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नांदेड - 52 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास सुरुवात, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनावाल यांच्या हस्ते उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे - संविधान सन्मान दौड 2025 ची नावनोंदणी सुरू, 25 जानेवारी रोजी होणार स्पर्धा, 6 ते 7 हजार स्पर्धक सहभागी होण्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रा. नामदेव राठोड👤 राजेंद्र सोनवणे, साहित्यिक, पंढरपूर👤 शुभम हिवराळे👤 आनंदराव कदम👤 अनिल यादव👤 बालाजी ईबीतवार👤 साईनाथ सोनटक्के👤 शिनू रेड्डी, धर्माबाद👤 विनोद गोरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वसंत सबनीस - रघुनाथ दामोदर सबनीस*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्तव्यकर्म अंत:करणपूर्वक , परिश्रमाने व श्रद्धेने करीत राहणे यातच जीवनाचे सार्थक आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) इस्रोच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?२) दिल्ली विधानसभेची सदस्यसंख्या किती आहे ?३) भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?४) 'शर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'टाईम्स ऑफ इंडिया' हे कोणत्या देशातील प्रमुख वृत्तपत्र आहे ? *उत्तरे :-* १) व्ही. नारायणन, अवकाश शास्त्रज्ञ २) ७० सदस्य ३) राजीवकुमार ४) बाण, तीर, सायक ५) भारत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💉 *रक्त* 💉 **************शरीरात रक्ताचे काम काय असते ? शरीरभर पसरलेल्या सर्व पेशींना सतत प्राणवायूचा पुरवठा करणे, अन्नाचा म्हणजेच ग्लुकोजच्या स्वरूपात ऊर्जेचा पुरवठा करणे व पेशींनी बाहेर टाकलेली दूषित द्रव्ये वाहून नेणे हे काम रक्त करते. रक्तपेशींची निर्मिती हाडांमधल्या पोकळ्यां (Bone Marrow) मध्ये होते. रक्ताच्या कामाचे स्वरूप कळले म्हणजे प्रत्येक प्राण्याच्या शरीरातील रक्ताची गरज लक्षात येते. अगदी सूक्ष्म व छोट्या घडणीचे जीव सोडले, तर इतर प्रत्येकाच्या शरीरात रक्त या ना त्या स्वरूपात असतेच. मग काहींचे रक्त गरम असेल, तर काहींचे गार. हे रक्त शरीरात सतत खेळत राहण्याची व्यवस्था म्हणजेच रक्ताभिसरणसंस्था. रक्तातील घटकद्रव्ये रक्तरसात (प्लाझ्मा) तरंगत असतात. लाल पेशी, पांढऱ्या पेशी व रक्तबिंबिका (प्लेटलेट्स) या तीन प्रकारच्या पेशींकडे वेगवेगळी कामे सोपवलेली असून या तीन्ही पेशी रक्तरसात तरंगत असतात. रक्ताचा लाल रंग हा लाल पेशींमध्ये असलेल्या हिमोग्लोबिन या द्रव्यामुळे येतो. लाल पेशींची संख्या प्रचंड असते, त्यामुळे रक्तातील पांढऱ्या पेशींचे अस्तित्व दृश्य स्वरूपात जाणवत नाही. रक्ताच्या एका घनमिलीमीटरमध्ये सुमारे पन्नास लाख लाल पेशी, पाच हजार पांढऱ्या पेशी तर दोन लाखांच्या आसपास रक्तबिंबिका असतात. स्त्री, पुरुष, लहान मुले, वयस्कर माणूस, आजारी व आजाराचे स्वरूप याप्रमाणे रक्तातील पेशींचे प्रमाण बदलत जाते. सुरुवातीला सांगितलेल्या कामांखेरीज रक्ताचे एक प्रमुख काम म्हणजे शरीरातील जखमा तात्काळ भरून काढणे. अंतर्गत जखम असो, बाह्य कातडी फाटुन रक्त वाहत असो वा एखाद्या आजारात एखादा अवयव निकामी होत चाललेला असो, तेथील दुरुस्तीचे काम सर्वस्वी रक्तातील रक्तबिंबिका व लाल पेशींकडे सोपवले जाते. जखमेवर धरलेली खपली म्हणजे याच दुरुस्तीची एक पायरी असते. शरीरात फुप्फुसात श्वासोच्छ्वास क्रियेत खेळवलेला प्राणवायू रक्तातील लाल पेशी शोषून घेतात. यालाच आपण शुद्ध रक्त म्हणतो. ते लालभडक असते. या प्राणवायूचा पुरवठा शरीरातील सर्व पेशींना रोहिणीद्वारे केला जातो. प्रत्येक पेशीची चयापचयाची क्रिया या प्राणवायुवरच अवलंबून असते. या क्रियेत निर्माण होणारा कार्बन डायऑक्साईड रक्तातील लाल पेशी पुन्हा शोषून घेतात. हे रक्त म्हणजेच अशुद्ध रक्त मग धमन्यांद्वारे फुफ्फुसांकडे पाठवले जाते. ही क्रिया अव्याहत ह्रदयामार्फत चालूच असते. मोठ्या माणसाच्या शरीरात एकूण पाच लिटर रक्त असते. दर मिनिटाला हे रक्त संपूर्ण शरीरात खेळवण्याचे वा फिरवण्याचे काम हृदय करत असते. या एकूण रक्तापैकी दहा टक्के रक्त आपण रक्तदान करतो, तेव्हा घेता येते. खरे म्हणजे त्यापेक्षा कमी म्हणजे तीनशे ते साडेतीनशे मिलिलिटर रक्त काढले जाते. ते रक्त शरीर लगेच भरून काढते. ही क्रिया पाच सहा दिवसांत पूर्ण होते. म्हणूनच रक्तदान अजिबात धोकादायक नाही. जगाच्या पाठीवर रक्त हा प्रकार अजून कृत्रिमरीत्या बनवता आलेला नाही. म्हणूनच जेव्हा शरीरातील वीस टक्क्यांपेक्षा जास्त रक्त वाहून जाते वा शस्त्रकर्म किंवा अपघातात नष्ट होते; तेव्हा पुन्हा कोणाचे तरी रक्त देऊनच ते भरून काढावे लागते. रक्ताचे प्रमुख गट (A,B,AB,O) पाडलेले असून त्या गटातील रक्तच त्या माणसाला चालू शकते. रक्तातील पांढऱ्या पेशीकडे शरीराचे संरक्षण करण्याची कामगिरी सोपवलेली आहे. यालाच आपण शरीराची प्रतिकारयंत्रणा म्हणतो. रक्ताच्या कॅन्सरमध्ये शरीरातील या रक्तपेशींची निर्मिती बिघडते, आकार व संख्या यात बदल घडतात, त्यामुळे नेहमीच्या कामात अडथळा येतो. रक्त कमी झाल्यास व लाल पेशींची संख्या कमी झाल्यास अॅनिमिया वा पंडुरोग झाला आहे, असे म्हणतात.रक्ताचा सततचा पुरवठा प्रत्येक अवयवाला आवश्यक असतो. सर्वात जास्त रक्त मेंदूतील पेशींना लागते. सर्वात कमी रक्त चरबीच्या पेशींचा लागते. हृदय रक्तानेच भरलेले असते, पण त्याच्या स्नायूंनाही रक्ताचा वेगळा पुरवठा लागतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गरुडावरी हरि बैसोनियां यावें । आम्हांसि रक्षावें दीनबंधू ॥१॥ अच्युता केशवा मुकुंदा मुरारी । येई लवकरी नारायणा ॥२॥ ऐकोनियां धांवा धांवला अनंत । उभा गरुडासहित मागें पुढें ॥३॥ वैजयंती माळा किरीट कुंडलें । नामयानें केलें लिंबलोण ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उंची, उंची मध्ये सुध्दा खूप फरक असतो.जी व्यक्ती आपल्या प्रयत्नातून उंचीवर पोहोचत असते पण, त्याला जेव्हा व्यर्थ गोष्टींचा वारा लागतो तेव्हा तीच उंची हळूहळू कमी व्हायला लागते. पण, ज्याने प्रत्येक परिस्थितीचा सामना करुन आपले विचार तसेच स्वतः वरचा विश्वास आणि आपले कार्य नि:स्वार्थ भावनेने चालू ठेवते त्याची उंची भलेही प्रत्येकांना दिसत नसले तरी ती उंची शेवटपर्यंत कायम राहते. अशा उंचीवर पोहोचलेल्या व्यक्तीकडून समाजातील अनेक लोक प्रेरणा घेत असतात. म्हणून ज्यांनी त्या ठिकाणा पर्यत पोहोचविले असतील त्यांना कधीच विसरू नये. कारण उंची जरी प्राप्त झाली असेल तरी त्यात अनेकांचे सहकार्य मोलाचे योगदान असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सुसंवाद*एका शहरात एक दांपत्य राहत होते. पतीचा मोठा व्यवसाय होता. गावात पतीला चांगली प्रतिष्ठा होती. कामाच्या व्यापात तो दिवसभर व्यग्र राहत असे.आपल्या व्यग्र जीवनशैलीमुळे तो पत्नीला वेळ देऊ शकत नसे यामुळे पत्नी एकाकी पडत चालली होती. एकाकीपणाने ती कायमच अस्वस्थ राहायची, आपल्या मनातील गोष्टी ती कोणाला सांगूही शकत नव्हती. पतीला काही सांगायला जावे, तर तो उद्या ऐकू, परवा ऐकू असे सांगून तिच्यासमोरून निघून जायचा. एकेदिवशी दोघांत मोठे भांडण झाले. पती चिडून म्हणाला, " तू तर माझ्या व्यवसायात मला काडीचीही मदत करत नाहीस, त्यामुळे मी माझ्या मुलाला वकीलच बनविणार आहे. तो निदान मला कोर्टाच्या कामात तरी मदत करेल." त्याचे हे बोलणे ऐकताच बायको भडकली आणि म्हणाली," तुम्हाला तर स्वतःचेच पडले आहे, माझ्याकडे लक्ष द्यायला कुठे तुम्हाला वेळ आहे. मी माझ्या मुलाला डॉक्टरच बनविणार आहे. जेणेकरून मी आजारी पडल्यावर तरी तो माझी काळजी घेईल." दोघेही आपल्या मुलाला काय बनवायचे यावरून जोरजोरात भांडू लागले, एकमेकांची उणीदुणी काढू लागले, भांडणाचा शेवट अगदी हातापायीपर्यत येऊन पोहोचल्यावर आजूबाजूचे लोक जमा झाले व त्यांच्यातील एका सज्जन माणसाने मध्यस्थ म्हणून तेथे प्रवेश केला व म्हणाला," अहो तुमचे दोघांचेही ठीक आहे, पण मुलाचा कोणत्या शाखेकडे कल आहे ते तरी बघा. त्याला काय व्हायचे ते त्याला ठरवू द्या ना. तुम्ही काय उगीच ठरवून त्याच्यावर तुमची मते लादत आहात." हे बोलणे ऐकताच नवराबायको एकदम गप्पच झाले. कारण त्यांना अजून मुलबाळ काहीच नव्हते आणि भविष्यात होणा-या मुलाच्या भवितव्याविषयी ते भांडत बसले होते. लोकांना ही गोष्ट कळताच त्यांनी त्या दोघांना अक्षरश वेड्यात काढले व आपला वेळ फुकट गेला म्हणून निघून गेले.तात्पर्य - व्यर्थ गोष्टींवर वाद घालून कोणतीही गोष्ट साध्य होत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 जानेवारी 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2020/06/blog-post_70.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔲 *प्रवासी भारतीय दिवस* 🔲•••••••••••••••••••••••••••••••••••• 🔲 *_ या वर्षातील ९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔲 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔲••••••••••••••••••••••••••••••••• *२००१: नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.**२००१: नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.**१९९२: पहिले मराठी कामगार साहित्य संमेलन नारायण सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे संपन्न**१९१५: महात्मा गांधींचे अफ्रिकेतुन भारतात आगमन**१८८०: क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा**१७८८: कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५ वे राज्य बनले.* 🔲 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔲••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२: अनुषा दांडेकर -- भारतीय मॉडेल चित्रपट अभिनेत्री**१९७४: पंडित रामाजी लोंढे -- कवी* *१९७४: फरहान अख्तर -- भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता, लेखक, संवाद लेखक, गायक**१९६८: नंदिनी सोनवणे -- लेखिका, संपादिका**१९६८: शोभा चित्रे -- लेखिका**१९६७: विजय बाबुराव येलमेलवार -- लेखक**१९६५: फराह खान -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, लेखिका, चित्रपट निर्मात्या, अभिनेत्री, नृत्यांगना आणि कोरिओग्राफर**१९६३: डॉ. लीना पांढरे -- लेखिका, अनुवादक(मृत्यू: २६ सप्टेंबर २०२१)**१९६३: सुरेश कृष्णाजी पाटोळे -- प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक**१९६०: डॉ. किशोर रामचंद्र महाबळ -- अभ्यासू, लेखक तसेच अनेक वृत्तपत्रांतून लेखन (मृत्यू: ५ फेब्रुवारी २०१५ )**१९५८: डॉ. सायन्ना पिराजी मठमवार -- लेखक**१९५१: प्रा.अजित मधुकर दळवी -- प्रसिद्ध नाटककार**१९५१: पं. सत्यशील देशपांडे – ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य**१९४६: सुभाषकुमार अनंतराव बागी -- कवी, लेखक* *१९३८: चक्रवर्ती रामानुजम – गणितज्ज्ञ (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९७४ )**१९३४: महेंद्र कपूर –पार्श्वगायक (मृत्यू: २७ सप्टेंबर २००८ )**१९२७: राजाराम भालचंद्र पाटणकर -- मराठीतील लेखक, समीक्षक आणि सौंदर्यशास्त्रज्ञ (मृत्यू: २४ मे २००४ )**१९२६: कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार – चित्रपट अभिनेते (मृत्यू: २० सप्टेंबर १९९७ )**१९२२: हर गोविंद खुराना – जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०११ )**१९१८: प्रभाकर वामन ऊर्ध्वरेषे -- पत्रकार, समीक्षक, मार्क्सवादी विचारवंत(मृत्यु: १० जुलै १९८९ )**१९१३: रिचर्ड निक्सन – अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २२ एप्रिल १९९४ )**१८७७: केशवराव रघुनाथ देशमुख -- ज्ञानेश्वरी प्रवचनकार व संतकव्याचे अनुवादक (मृत्यू: २७ एप्रिल १९४२ )**१८५४: रावसाहेब गोविंद वासुदेव कानिटकर -- मराठी कवी व भाषांतरकार (मृत्यू: ४ जून १९१८ )**१८३१: फातिमा शेख -- भारतीय शिक्षणतज्ज्ञ, पहिल्या मुस्लिम शिक्षिका, समाजसुधारक,महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या त्या सहकारी (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९०० )* 🔲 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔲••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२४: उस्ताद राशिद खान -- भारतीय शास्त्रीय संगीतकार (जन्म: १ जुलै १९६८ )**२०२३: विश्वास मेहेंदळे -- मराठी लेखक, वृत्तनिवेदक, चरित्रकार आणि अभिनेते (जन्म: १० जुलै १९३९ )**२०१३: जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ (जन्म: ३ ऑक्टोबर १९१९ )**२००४: शंकरबापू आपेगावकर – पखवाजवादक (जन्म: १९११ )**२००३: कमर जलालाबादी – गीतकार व कवी (जन्म: १९१९ )**१९४५: गोविंद रामचंद्र मोघे -- कवी, ग्रंथकार (जन्म: १८६० )**१९२३: सत्येंद्रनाथ टागोर – पहिले भारतीय सनदी अधिकारी(ICS)(जन्म: १ जून १८४२ )**१८४८: कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, ही प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेलची बहिण असून तिनेही ८ धुमकेतू व ३ तारकासमुह शोधले (जन्म: १६ मार्च १७५० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - मायेची ओढ*..... पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्रप्रदेशात 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पाचे उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा शासन आदेश जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशात कुठेही अपघात झाली तरी जखमींना कॅशलेस उपचार मिळतील अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारताला चंद्रावर घेऊन जाणाऱ्या रॉकेटची निर्मीती करणारे वैज्ञानिक ; डॉ. व्ही नारायणन होणार ISRO चे अध्यक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दिल्ली विधानसभेसाठी तृणमूलचा आप ला पाठींबा, अरविंद केजरीवालने मानले दीदीचे आभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कलिंगा फाउंडेशनला वसुंधरा मित्र पुरस्कार, किंग कोब्राच्या संवर्धनासाठी गांभीर्याने प्रयत्न आवश्यक, डॉ. पी. गौरी शंकर यांचे मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *न्यूझीलंडने दुसरा एकदिवसीय सामना 113 धावांनी जिंकला, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी; तीक्षणाची हॅट्ट्रिक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिवकुमार पंतुलवार👤 विष्णुकांत इंगळे👤 हमीद साब शेख👤 सुप्रिया ठाकूर👤 अजित राठोड👤 माधव नरवाडे👤 सुहास अनिल देशमुख👤 आमिर अली शेख👤 राजेश रामगिरवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बाबा कदम - वीरसेन आनंद कदम*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहंकार हा माणसाच्या प्रगतीचा मोठा शत्रू आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) १२०० कोटीच्या क्लबमध्ये सामील होणारा पहिला भारतीय चित्रपट कोणता ?२) भारतीय संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या नावाने कोणत्या देशात 'ए. आर. रेहमान स्ट्रीट' असे रस्त्याचे नामकरण करण्यात आले ?३) महात्मा फुलेंनी 'तृतीय रत्न' ही नाटक कोणत्या साली लिहिली ?४) 'शक्ती' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'मित्रप्रेम' ही कादंबरी कोणी लिहिली ? *उत्तरे :-* १) पुष्पा २ - द रूल २) कॅनडा ( मरखम शहर ) ३) सन १८५५ ४) बळ, जोर, ताकद, सामर्थ्य, ऊर्जा ५) हुतात्मा अनंत कान्हेरे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *एन्डोस्कोपी म्हणजे काय ?* 📙 मानवी शरीराची बाह्यत: तपासणी सहज शक्य असते. काही भागांत छोटेसे उपकरण घालून अंतर्भागातील काही गोष्टी तपासणेही गेली अनेक दशके प्रचारात होतेच. उदाहरणार्थ, घशामध्ये लॅरिंगोस्कोप घालून स्वरयंत्रापर्यंतचा भाग बघणे वा गुदद्वारातून प्रोक्टोस्कोप घालून पाइल्सची तपासणी, योनिमार्गात व्हजायनोस्कोप घालून गर्भाशयमुखापर्यंतच्या भागाची तपासणी करून आजाराचे निदान वा इलाज करणे चालूच होते. संपूर्ण शरीराच्या आतील भागाची क्ष किरण वा अल्ट्रा साऊंडद्वाराही तपासणी करणे काही दशके डॉक्टर्स करीत होतेच. पण या साऱ्यामध्ये एक उणीव कायम जाणवत होती, ती म्हणजे प्रत्यक्ष अवयवाचा तपासायचा भाग डोळ्यांनी पाहता येत नव्हता. त्या जागेपर्यंत पोहोचून त्याचा छोटासा भाग तपासणीसाठी बाहेर काढता येत नव्हता.या अडचणीमागचे महत्त्वाचे कारण होते, प्रकाश हा फक्त सरळ रेषेतच प्रवास करीत असल्याने दृश्यमान करण्याच्या भागात पोहोचताना आलेले कोणतेही वळण, बाक हा अडथळा ठरत होता. या सार्यावर उपाय सापडला, तो फायबरऑप्टिक तंत्रज्ञानाचा सरसकट वापर सुरू झाला त्यावेळी.कोठेही कशीही वळू शकणारी, शरीरातील प्रमुख रंध्रातून वा भोकातून प्रवेश करू शकणारी फायबर ऑप्टिक वायर, तिच्या तोंडाशी असणारा प्रखर उजेड टाकणारा दिवा व या साऱ्यांच्या मदतीने दृश्यमान होणाऱ्या प्रतिमा फायबर ऑप्टिकमुळे दुसऱ्या टोकापर्यंत सहज पोहोचू लागल्या. त्यांना भिंगाद्वारे मोठे करून साध्या डोळ्यांनी तर पाहता येऊ लागलेच, पण आता डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे याच सर्व प्रतिमा शेजारी ठेवलेल्या टीव्हीच्या पडद्यावर प्रत्यक्ष रुग्ण व त्याचे सर्व डॉक्टर्सही पाहू लागले आहेत. गरजेनुसार याचे कॉम्पॅक्ट डिस्कवर आरेखन करून ठेवता येते व दुसर्या कोण्या तज्ञाचे मत घ्यायचे असेल, तर त्यालाही पाठवता येते.याचा महत्त्वाचा फायदा झाला, तो म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंत लांबलचक असलेल्या काही मीटरच्या अन्नमार्गाचे संपूर्ण परीक्षण आता शक्य झाले आहे. अन्ननलिकेची सूज, जठरातील व्रण, छोट्या आतड्यातील अंतस्त्वचेतीलन बदल, मोठ्या आतड्यातील अडथळे एवढेच नव्हे, तर पित्ताशयाची तपासणीही यामुळे शक्य झाली. फुफ्फुसांकडे हवा पोहोचवणाऱ्या नलिकांची तपासणी, तेथे साचलेल्या कफाची विल्हेवाट लावणेही या पद्धतीने शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानात भर पडली, ती लॅप्रोस्कोपी या शल्यप्रकाराची. फायबर ऑप्टिक प्रकाशाचा वापर करून शरीरातील विविध पोकळ्यांमधील कोणत्याही अवयवावर शस्त्रक्रिया करणे आज सहज शक्य झाले आहे. आत घातलेल्या नळीतूनच कात्री, चिमटा, रक्त थांबवणारी इलेक्ट्रिक कॉटरी - जिचा वापर करून तीव्र उष्णतेने रक्तवाहिन्यांची तोंडे बंद केली जातात - इत्यादी उपकरणे थेट अवयवांपर्यंत पोहोचतात. शरीरावर म्हणजेच मुख्यत्वे पोटावर पूर्वी चार ते पाच इंचाचा छेद घेऊन करावी लागणारी अनेक शस्त्रकर्मे आता केवळ दोन वा तीन करंगळीच्या आकाराच्या नळ्या आत सारुन केली जातात. अर्थातच रुग्णाचा बरे होण्याचा काळ जखमा मोठ्या नसल्याने खूपच कमी होतो. पूर्वी ज्या शस्त्रकर्मानंतर किमान पंधरा दिवस रुग्णालयात खाटेवर राहणे गरजेचे होते, तो काळ आता या पद्धतीने जेमतेम एक ते तीन दिवसांपर्यंत येऊन पोहोचला आहे.याही पुढचा टप्पा म्हणजे छोट्या कॅप्सूलच्या आकाराचा 'बग' म्हणजे छुपा कॅमेरा रुग्ण गिळतो. त्याद्वारे पाठवल्या जाणाऱ्या चित्रणाच्या संदेशांचे टीव्हीवर वर मोठ्या पडद्यावर सतत प्रक्षेपण होत राहते. सोळा ते अठरा तासांनंतर हा 'बग' शरीराबाहेर टाकला जातो. आज जरी महागडी व प्रयोगाव्यवस्थेतील ही तपासणी असली, तरी काही वर्षात जगभर तिचा वापर जरूर सुरू होईल.साधी डॉक्टरी तपासणी जर दोन तीनशे रुपयात होत असेल, क्ष किरण व अल्ट्रासाऊंडसाठी चार पाचशे रुपये पडत असतील तर एन्डोस्कोपीसाठी मात्र दोन ते तीन हजार रुपये खर्च येतो. त्याचे कारण सरळच आहे. वापराव्या लागणाऱ्या सामग्रीची किंमत काही लाखांच्या घरात असते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रिया कर्म धर्म तूंचि होसी माझे । राखेन मी तुझें द्वार देवा ॥१॥ मज पाळीसी तैसा पाळीं दीनानाथा । न सोडीं सर्वथा नाम तुझें ॥२॥ गाईन तुझें नाम ह्रदयीं धरुनि प्रेम । हाचि नित्य नेम सर्व माझा ॥३॥ नामा म्हणे केशवा सुखाच्या सागरा । तूं आम्हां सोईरा आदिअंतीं ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे असतेच असेही नाही. कारण काहीजण आपली परीक्षा घेण्यासाठी नको ते,प्रश्न सुध्दा विचारू शकतात. म्हणून काही प्रश्नांची उत्तरे देण्याआधी विचार करावा व आपले कार्य निरंतर सुरु ठेवावे. सत्कार्य हेच आपले उत्तर ठरत असते. त्यातूनच आपली ओळख सुद्धा होत असते.म्हणून नको त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नये. आपले कार्य सतत चालू ठेवावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *व्यंग*चेष्टा कसलीही करावी. पण, ती केवळ गंमत किंवा मस्करी म्हणूनच. एखाद्याच्या व्यंगावर चेष्टा करणे अथवा त्या व्यंगाचा उल्लेख करून चारचौघांत त्याचा अपमान करणे हे गैरच. ते सभ्यतेचे लक्षण नव्हे, पण एखाद्याने असे केलेच तर ती चेष्टा आपल्यावर उलटूही शकते, याचे भान ठेवावे. आपला पांडुरंग एकदा रस्त्यावरून ऐटीत चालला होता, तेवढ्यात समोरून किरण येताना दिसली. ती थोडीशी तिरळी होती. पांडुरंगचा स्वभाव मुळातच खवचट, त्यात तिरळे बघणारी किरण समोरून आलेली. पांडुरंग म्हणाला, "काय किरण ! कसं काय ठीक आहे ना? कुठं चाललीस? आणि तुला म्हणे एका वस्तूच्या दोन वस्तू दिसतात. खरं का?" किरणच्या लक्षात आले की, हा आपली चेष्टा करतोय, आपणाला हिणवतोय. म्हणून ती म्हणाली, "खरं आहे हे ! आता हेच बघ ना, तुला दोन पाय आहेत ना? पण मला तुला चार पाय असल्याचं दिसत आहे !"*तात्पर्य : दुसऱ्याच्या व्यंगाला हसू नये. त्याचा उपहास करू नये.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/12CDWtH6u3E/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🪩 *_ पंचशील ध्वज दिवस _* 🪩 🪩 *_ या वर्षातील ८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🪩 *_महत्त्वाच्या घटना:_* 🪩•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.**२०००: लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड**१९६३: लिओनार्डो डा व्हिन्सिच्या ’मोनालिसा’चे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट,वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.**१९५७: गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली. भारत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे गोवा स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक वर्षे ते पोर्तुगालमधील तुरुंगात खितपत पडून होते. अखेर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री अण्णादुराई यांनी पोपकडे केलेल्या मध्यस्थीमुळे १९६९ मध्ये त्यांची सुटका झाली. त्यांना गोवा पुरस्कार (१९८६), पद्मश्री (२००१) व सांगली भूषण (२००६) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले.**१९४७: राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.**१९४०: दुसरे महायुद्ध – ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.**१८८९: संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले. अमेरिकेच्या जनगणनेत १८९० मध्ये या गणकयंत्राचा उपयोग करण्यात आला.**१८८०: सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय.**१८३५: अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.* 🪩 *_जन्मदिवस /वाढदिवस/जयंती:_* 🪩 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: विनोद शिंदे -- लेखक**१९८०: प्रशांत दत्तात्रय कोतकर -- कवी**१९७४: प्रतिभा रामचंद्र पाटील -- कवयित्री**१९७३: बालाजी पेटेकर खतगावकर -- कवी**१९७३: गणेश सहदेव सांगोळकर - कवी* *१९७१: संध्या विलासराव बोकारे -- कवयित्री, लेखिका* *१९७१: व्यंकटेश कुलकर्णी -- कवी, गझलकार* *१९६२: चंद्रशेखर गोखले -- मराठी लेखक व कवी**१९५९: प्रा.डॉ. कुमार जानराव बोबडे -- लेखक**१९५७: प्रा. दिनकर विष्णू पाटील -- लेखक**१९५६: पंकज बेरी -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता**१९५६: प्रा.डॉ. निलांबर प्रभाकर देवता -- प्रसिद्ध लेखक**१९५५: दिलीप दत्तात्रेय कुलकर्णी -- लेखक* *१९५३: विठ्ठल अर्जुनराव साठे -- कादंबरीकार* *१९४५: डॉ. प्रभा गणोरकर -- मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री, समीक्षक आणि संशोधिका**१९४२: स्टिफन हॉकिंग – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक(मृत्यू: १४ मार्च २०१८)**१९४१: नंदा -- भारतीय सिने-अभिनेत्री (मृत्यू: २५ मार्च २०१४ )**१९३९: कुमुद कृष्ण परांजपे -- लेखिका**१९३६: ज्योतिंद्रनाथ दिक्षीत – परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (मृत्यू: ३ जानेवारी २००५ )**१९३५: पंढरीनाथ धोंडू सावंत -- लेखक संपादक* *१९३५: एल्व्हिस प्रिस्टले – अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि ’किंग ऑफ द रॉक अँड रोल’(मृत्यू: १६ ऑगस्ट १९७७ )**१९३३: सुप्रिया देवी -- बंगाली अभिनेत्री (मृत्यू: २६ जानेवारी २०१८ )**१९२९: सईद जाफरी – अभिनेता ( मृत्यू: १५ नोव्हेंबर २०१५ )**१९२६: केलुचरण महापात्रा – प्रसिद्ध ओडिसी नर्तक (मृत्यू: ७ एप्रिल २००४ )**१९२५: राकेश मोहन – हिन्दी नाटककार (मृत्यू: ५ डिसेंबर १९७३ )**१९२४: गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या,लोकसभा सदस्य (मृत्यू: ४ मार्च २००० )**१८८७: कमलाबाई किबे-- कवयित्री, कथालेखक आणि सामाजिक विषयावर लेखन करणाऱ्या लेखिका* *१८५१: बाळकृष्ण आत्माराम गुप्ते -- लेखक (मृत्यू: १९२५ )*🪩 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🪩••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: पंडित मोहनराव कर्वे -- हिंदुस्तानी कला संगीत मधील ज्येष्ठ गायक ( जन्म:१६ सप्टेंबर १९२५ )**१९९६: फ्रान्सवाँ मित्राँ – फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २६ ऑक्टोबर १९१६ )**१९९५: मधू लिमये – स्वातंत्र्यसैनिक,पत्रकार, समाजवादी नेते व राजकारणी (जन्म: १ मे १९२२ )**१९७६: चाऊ एन लाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ५ मार्च १८९८ )**१९७३: नारायण भिकाजी तथा 'नानासाहेब' परुळेकर – ’सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक,प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व भारतीय पत्रकारितेचे पितामह,स्वच्छ समाजदृष्टी,उक्ती व कृती यातील करडी शिस्त या असाधारण गुणांमुळे नानासाहेब परुळेकर हे स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी पत्रकारितेतील सदैव स्मरणात रहावे असे व्यक्तिमत्त्व ठरले. त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते. ‘निरोप घेता‘ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.(जन्म: २० सप्टेंबर १८९८ )**१९६७: डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर – प्राच्यविद्यातज्ञ,संस्कृत पंडित.अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली.(जन्म: १० डिसेंबर १८८० )**१९६६: बिमल रॉय – प्रथितयश दिग्दर्शक (जन्म: १२ जुलै १९०९ )**१९४१: लॉर्ड बेडन पॉवेल – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७ )**१८८४: केशव चंद्र सेन – ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक (जन्म: १९ नोव्हेंबर १८३८ )**१८२५: एली व्हिटनी – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक (जन्म: ८ डिसेंबर १७६५ )**१६४२: गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १५ फेब्रुवारी १५६४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरे बोलण्याची सवय आपणाला अनेक संकटातून वाचवू शकते. तर एक खोटं लपविण्यासाठी शंभर वेळा खोटं बोलावे लागते. *नेहमी खरे बोलावे*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिल्ली विधानसभा निवडणुकीचं कार्यक्रम जाहीर, 5 फेब्रुवारीला मतदान, 8 तारखेला निकाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्रातील चार चाकी वाहन धारकांना एक एप्रिल २०२५ पासून फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचा अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रकृतीच्या कारणामुळे आसाराम बापूला अंतरिम जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राजधानी एक्स्प्रेस ठरली देशातील सर्वाधिक श्रीमंत ट्रेन !*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्वाधार योजनेची ऑनलाईन अर्ज 15 जानेवारीपर्यंत भरता येणार, तांत्रिक अडचणी येत असल्याने समाज कल्याण विभागाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC कसोटी क्रमवारीत भारताची तिसऱ्या स्थानावर घसरण, 2016 नंतर दुसऱ्यांदा टॉप-2 मधून बाहेर; 10 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका गमावली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी पेटेकर खतगावकर, कवी, चित्रकार तथा कथाकार👤 मारोती गोडगे👤 आकाश गाडे, येवती👤 आसिफ शेख, धर्माबाद👤 आनंदा कुमारे👤 करण भंडारी👤 पोतन्ना मुदलोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गिरीश - शंकर केशव कानेटकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रश्न विचारणे ही ज्ञानाच्या शोधाची पहिली पायरी आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या तेलबियाला *'गरीब माणसाचे बदाम'* असे म्हणतात ?२) अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?३) नुकतीच झालेली ५ कसोटी सामन्यांची 'बॉर्डर - गावस्कर चषक' ऑस्ट्रेलियाने किती फरकाने जिंकली ?४) 'व्याकूळ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केव्हा केली ? *उत्तरे :-* १) शेंगदाणे २) प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम ३) ३ - १ ने ४) दुःखी, कासावीस ५) सन १८६३*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *माणूस कोणकोणते अवयव दुसऱ्याला दान करू शकतो ?* 📙 """""""""""""""""""""""""""""""""""""""""""दानाचे महात्म्य फारच मोठे आहे. अन्नदान, वस्त्रदान, तसेच आर्थिक मदत इत्यादींना आपल्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. दानशूर कर्णाच्या गोष्टी तुम्ही वाचल्या असतीलच; परंतु या सर्व दानापेक्षाही मौल्यवान असे दान सामान्यातला सामान्य माणूस देऊ शकतो. आश्चर्य वाटले ना ? पण हे अगदी खरे आहे. हृदय, नेत्र, यकृत, मूत्रपिंड, अस्थिमज्जा, त्वचा इत्यादी अवयवांचे माणूस दुसऱ्याला दान करू शकतो. मेंदूचे कार्य थांबल्यास व्यक्तीला मृत समजावे, असा कायदा भारतीय संसदेने मंजूर केल्यामुळे इंद्रियदान करणे वा इंद्रियारोपण करणे शक्य झाले आहे.डोळ्यात फुल पडल्याने वा जखम झाल्याने नेत्रपटल निकामी झालेल्या लोकांना मृत व्यक्तीचे नेत्रपटल बसवतात. त्यामुळे त्यांना दृष्टी प्राप्त होते. यालाच नेत्रदान असे म्हणतात. मूत्रपिंड खराब झालेल्या व्यक्तीचे जवळचे रक्ताचे नातेवाईक त्याला स्वतःचे मूत्रपिंड दान करू शकतात. सामान्यपणे सर्व व्यक्तींना दोन मूत्रपिंडे असल्याने त्यापैकी एक दान केले तरी एका मुत्रपिंडाच्या द्वारे आयुष्यभर कार्य केले जाते. साहजिकच एका रुग्णाचे प्राण वाचतात. अपघातांमध्ये मेंदूला जबर दुखापत झाल्याने मेंदू निकामी झालेल्या रुग्णांचे हृदय नेत्र, यकृत, मूत्रपिंड असे अवयव काढून घेऊन गरजू रुग्णांचे प्राण वाचवता येतात. मरणोत्तर काही व्यक्ती देहदानही करू शकतात. यासाठी मरणोत्तर पोस्टमार्टेम झालेले नसावे. तसेच शरीरातील अवयव शस्त्रक्रियेने काढलेले नसावे. वैयक्तिक विद्यार्थ्यांना शरीररचना शास्त्राच्या अभ्यासासाठी त्याची मदत होते. अस्थिमज्जा नष्ट झालेल्या व्यक्तींना अस्थिमज्जा दुसर्या निरोगी व्यक्तीने दान करावी लागते.अशा प्रकारे माणूस अनेक अवयवांचे दान करू शकतो. काही जिवंतपणी तर काही मरणोत्तर. "मरावे परि कीर्तीरुपी उरावे" या उक्तीची प्रचिती या दानामुळे येऊ शकते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोण होईल आत्मज्ञानी । जो बा राहे त्याच्या ध्यानीं ॥१॥ मज तो चरणांची आवडी । जन्मोजन्मीं मी न सोडी ॥२॥ होईल सिद्धीचा साधक । त्यासी देई स्वर्गसुखा ॥३॥ कोण होईल देहातीत । त्यासी करी संगरहित ॥४॥ नामा म्हणे जीवें साठीं । तुज मज जन्में पडिली गांठी ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• कोणत्याही परिस्थितीत स्वतः हसत राहणे तसेच इतरांना हसवत ठेवणे ही एक प्रकारची उत्तम कला आहे सोबतच हे महान कार्य सुध्दा आहे. पण, त्यातच स्वतः च्या आनंदात हसत राहणे व दुसऱ्यांची टिंगल, टवाळी करून त्यांना दु:खी करणे याला माणुसकी म्हणत नाही. निदान माणुसकीच्या नात्याने तरी या प्रकारचे वागणे आपल्यात नसायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गर्वहरण*नदीच्या काठावर एक नारळाचे झाड होते. या झाडावर लागलेल्या नारळांना एक प्रकारचा गर्व चढला होता. तो नेहमी येणा-या जाणा-या वस्तूंना चिडवायचा पण त्याचा स्वभाव सगळेजण ओळखून होते. त्यामुळे त्यालाच कोणीच प्रत्युतर देत नसत. नदीमध्ये पडलेल्या दगडांचा तर नारळ खूप अपमान करीत असे. एकदिवशी तो नदीतल्या दगडाला म्हणाला," तुझी किती केविलवाणी परिस्थिती आहे, पहा! इथेच पडल्या पडल्या झिजून झिजून जाशील पण नदीचे पाय काही तू सोडणार नाहीस. ही नदी तुला देते तरी काय रे, अपमानालाही काही परिसीमा असते की नाही, मला पहा कशा प्रकारे उंच जागेवर आणि उच्च पदावर बसविले आहे." दगडाने त्याची बडबड ऐकून घेतली पण तो काही बोलला नाही. दोघेही आपापल्या स्थानी निघून गेले नारळ आता पूजेच्या थाळीत गेला होता. मंदिरात गेल्यावर नारळाने पाहिले की नदीतला दगड आता पूजास्थानी पोहोचला होता व शाळीग्राम म्हणून लोक त्याला पूजत होते. नारळाचा खूप संताप झाला की एका यः कश्चित दगडाच्या पूजेसाठी आपल्याला आणले गेले आहे पण तो काहीच करू शकत नव्हता. दगडाने त्याची मनस्थिती ओळखली व म्हणाला," नारळा, पहा झिजल्याचा कोणता परिणाम होतो. तेव्हा कधीच गर्व बाळगू नकोस."तात्पर्य : वेळ सारखी राहत नसते. गर्वाने वागणा- यांवरही कधी ना कधी मान खाली घालण्याची परिस्थिती येऊ शकते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 जानेवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Gun1NBkub/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟣 *_ या वर्षातील सातवा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*१९७८: एम.व्ही.चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्यांसह होनोलुलूजवळील महासागरात बेपत्ता झाली.**१९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.**१९५९: क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.**१९३५:ज्ञकोलकाता येथे ’इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमी’चे (INSA) उद्घाटन झाले. पुढे १९५१ मधे तिचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आले.**१९२७: न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.**१९२२: पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.**१७८९: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची पहिली निवडणूक होऊन त्यान जॉर्ज वॉशिंग्टन विजयी झाले.**१६८०: मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.* 🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟣••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: तुकाराम परसराम डोके -- कवी**१९८४: राजेश्वर वसंतराव जुबरे -- लेखक अनुवादक, संपादक**१९८३: प्रा. रत्नाकर प्रभाकर चटप -- लेखक, कवी* *१९८०: श्रीकांत रामभाऊ साबळे -- प्रसिद्ध लेखक, संपादक**१९७९: बिपाशा बासू – अभिनेत्री व मॉडेल**१९७२: अजय बारकू दानवे -- कवी, लेखक* *१९७१: सरला भिरुड -- कवयित्री,लेखिका* *१९६८: अनिल राव -- लेखक, कवी* *१९६७: प्रा.डॉ. संगिता अरुण खुरद -- लेखिका* *१९६७: इरफान खान -- भारतीय अभिनेता (मृत्यू: २९ एप्रिल २०२० )**१९६६: डॉ. सुधीर अणासाहेब कुंभार -- लेखक* *१९६५: अभिराम भडकमकर -- प्रसिद्ध मराठी-हिंदी नाटककार, पटकथालेखक, अभिनेते आणि चित्र-नाट्य दिग्दर्शक* *१९६२: वंदना बोकील कुलकर्णी -- लेखिका, संपादिका* *१९६२: प्रा.डॉ.रजनी नकुल लुंगसे -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, संशोधिका* *१९६१: सुप्रिया पाठक – अभिनेत्री**१९६०: श्रीनिवास गडकरी -- प्रसिद्ध कवी, लेखक, पत्रकार* *१९५७: तुकाराम ज्योतीराम पाटील (टी.जे)- कवी तथा निवृत्त उपविभागीय अभियंता**१९५७: रीना रॉय -- प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री**१९५६: डॉ. किशोर सानप -- ललित आणि वैचारिक समीक्षा क्षेत्रात लेखन करणारे मराठी साहित्यातील सिद्धहस्त लेखक (मृत्यू: २१ मे २०२३ )**१९५६: हरी मल्हारराव धारकर -- कवी* *१९५६: टी.एस.चव्हाण -- कादंबरीकार, वेदनाकार**१९५५: अरुण जाखडे -- पद्मगंधा प्रकाशनाचे ज्येष्ठ प्रकाशक, प्रसिद्ध लेखक, संपादक (मृत्यू: १६ जानेवारी २०२२ )**१९५३: रमेश कृष्णराव भोयर -- कवी**१९५२: आनंद विंगकर (शंकर नारायण ढोणे)-- प्रसिद्ध लेखक, कवी**१९५०: विलास मानेकर - सरचिटणीस विदर्भ साहित्य संघ**१९४८: शोभा डे – विदुषी व लेखिका**१९४६: कुमार केतकर -- पत्रकार, लेखक आणि व्याख्याते, अनेक मराठी दैनिकांची संपादकपदे त्यांनी भूषविली.( दैनिक लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स आणि लोकमत )**१९४३: डॉ. गो. तु. पाटील -- प्रसिद्ध लेखक संपादक, 'ओल अंतरीची' आत्मचरित्रास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार (मृत्यू: १८ ऑगस्ट २०२४ )**१९४२: श्याम प्रभाकर तारे -- प्रसिद्ध लेखक कवी अनुवादक तथा स्तंभलेखक पुण्यनगरी* *१९४२: सुधाकर माधवराव दोखणे -- लेखक**१९२३: गंगाप्रसाद बालाराम अग्रवाल-- संपादक, लेखक (मृत्यू: ११ ऑक्टोबर २०१८ )**१९२१: चंद्रकांत गोखले – अभिनेते (मृत्यू: २० जून २००८ )**१९२०: सरोजिनी बाबर – प्रसिद्ध लेखिका, संत साहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी (मृत्यू: १९ एप्रिल २००८ )**१९१७: रामभाऊ विजापुरे -- हिंदुस्थानी शास्त्रीय परंपरेतील भारतीय हार्मोनियम वादक (मृत्यू: १९ नोव्हेंबर २०१० )**१८९४: वासुदेव विनायक जोशी -- कादंबरीकार, नाटककार, निबंधकार(मृत्य: १९ मे १९६५ )**१८९३: जानकीदेवी बजाज – स्वातंत्र्य वीरांगना,पद्म विभूषण पुरस्कारांनी सन्मानित. (मृत्यू: २१ मे १९७९ )**१८८५: माधव नारायण जोशी -- मराठीतील एक विनोदी नाटककार (मृत्यू: १६ ऑक्टोबर १९४८ )* 🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟣••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४:चिंतामणी सदाशिव ऊर्फ अण्णासाहेब लाटकर -- ज्येष्ठ ग्रंथ मुद्रक आणि कल्पना मुद्रणालयाचे संस्थापक**२०००: डॉ. अच्युतराव आपटे – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची व त्याद्वारे सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आयुष्य वेचलेले,विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ८ जानेवारी १९१९ )**१९९१: नरहरि भानुदास काळे (नरहरिप्रभू, काळे महाराज )-- दत्तसंप्रदाय, प्रवचनकार (जन्म: २२ मे १९१० )**१९८९: मिचेनोमिया हिरोहितो – दुसर्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट (जन्म: २९ एप्रिल १९०१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वछता आणि आरोग्य*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणा, ओरिसा आणि जम्मू-काश्मीरमधील विविध रेल्वे पायाभूत सुविधांचे ऑनलाईन उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *HMPV ने चिंता वाढवली, कर्नाटकात सापडले भारतातले पहिले 2 रुग्ण; महाराष्ट्र सरकारनेही जारी केल्या सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महिलांना सक्षम बनवणे ही आपल्या देशाची खरी ताकद - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यात HMPV रोखण्यासाठी खबरदारी, हॉस्पिटल बेड राखीव ठेवण्याच्या हालचाली, आरोग्य विभाग अलर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे - आनंदाश्रम संस्थेतर्फे दुर्मिळ संस्कृत हस्तलिखितांचे प्रदर्शन, 10 ते 12 जानेवारी दरम्यान रसिकांसाठी खुला होणार खजिना*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आचार्य बाळशास्त्री जांभेकर अध्यासन मुंबई विद्यापीठात सुरू करावे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महिला क्रिकेट :- आयर्लंड विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामान्यासाठी स्मृतीकडे नेतृत्व, 10 जानेवारीपासून होणार प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कुणाल पवारे, शिक्षक तथा पत्रकार, कुंडलवाडी👤 संतोष कोयलकोंडे, शिक्षक, देगलूर👤 संजय पवार, मा. नगरसेवक, धर्माबाद👤 आबासाहेब निर्मले, शिक्षक तथा साहित्यिक👤 धनराज बनसुडे, उपक्रमशील शिक्षक, उस्मानाबाद👤 रमेश माने👤 शिवाजी गुजेवार👤 फारुख शेख👤 रघुनाथ नोरलावार, धर्माबाद👤 परविंदर कौर महाजन, कोल्हापूर👤 धनाजी माडेवार, नायगाव👤 पद्माकर रामराव मुळे👤 रामानंद रामदिनवार, नांदेड👤 पंढरी यंगलोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ग्रेस - माणिक शंकर गोडघाटे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्तव्यकर्म अंत:करणपूर्वक , परिश्रमाने व श्रद्धेने करीत राहणे यातच जीवनाचे सार्थक आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *३७ वे महाराष्ट्र पक्षिमित्र सम्मेलन* कोठे आयोजित करण्यात आले आहे ?२) राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरा केला जातो ?३) कोणते वर्ष हे भारताचे हवामानाच्या इतिहासात १९०१ नंतरचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे ?४) 'व्रण' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) कोणता धातू विजेचा सर्वश्रेष्ठ सुवाहक आहे ? *उत्तरे :-* १) शेवगाव, जि. अहिल्यानगर ( अहमदनगर ) २) ५ जानेवारी ३) सन २०२४ ४) खूण, क्षत ५) कॉपर ( तांबे )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *यकृत* 📙 ***************आपल्या शरीरातील फार मोठी रसायनशाळा असे यकृताबद्दल सहज म्हणता येते. यकृताच्या कामात अगदी किरकोळ अडथळा आला किंवा विकृती निर्माण झाली, तर साऱ्याच शरीरातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर परिणाम होतो. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. श्वासपटलाच्या खाली उजव्या बाजूला बरगडीच्या आत यकृत सुरक्षित असते. यकृतदाह झाल्यास यकृताचा आकार वाढतो. तो पोटावरुन हाताला खालची कड लागून समजू शकतो. यकृतात मुख्यतः पित्ताची निर्मिती होत असते. ते पित्ताशयात साठवले जाते. अन्नपचनक्रियेत गरजेनुसार ते पाझरून आतड्यातील अन्नपदार्थात मिसळते. आहारातील स्निग्ध पदार्थांवर त्याची प्रक्रिया होऊन त्याचे दुधासारखे मिश्रण तयार होते. स्निग्ध पदार्थांच्या शोषणालाही पित्त हातभार लावते. अन्नमार्गातून शर्करा शोषून घेतल्यावर शिलकीतील साठा ग्लायकोजेन या रूपाने यकृतात साठवला जातो. जेव्हा शरीराला गरज असेल, तेव्हा ग्लायकोजेनचे पटकन ग्लुकोजमध्ये रूपांतर केले जाते. याशिवाय यकृतामध्ये शरीरातील लाल पेशी तयार करणे व नष्ट करणे हाही उद्योग सतत चालू असतो. रक्त गोठवण्यासाठी आवश्यक फायब्रिनोजेन द्रव्याची निर्मिती यकृतातच होते. जीवनसत्त्वांचा साठा येथेच केला जातो. रक्तातील विषारी द्रव्ये नष्ट करणे, प्रथिनांच्या चयापचयानंतर युरिया व युरिक आम्लाची निर्मिती व स्निग्ध पदार्थांचा शरीरव्यापारासाठी उपयोग ही कामे येथेच घडतात. एखाद्या माणसाचे यकृत काम करेनासे झाले, आक्रसले, तर त्याला लिव्हर सिरॉसिसचा आजार आहेत झाला आहे, असे म्हणतात. हळूहळू पण निश्चितपणे मृत्यूकडे वाटचाल करणारा हा आजार ठरतो. याची लक्षणे म्हणजे उदरपोकळीत पाणी भरणे, त्याला जलोदर असे नाव आहे. यकृतारोपणाची शस्त्रक्रिया हा एकमेव इलाज यावर गेल्या दशकात उपलब्ध आहे. पण तो सामान्यांच्या आवाक्याबाहेरचा व भारतातही अगदी मोजक्या रुग्णालयांत उपलब्ध आहे. रक्ताच्या विविध चाचण्यांतून, अल्ट्रासोनोग्राफीतून किंवा आवश्यक असेल तर यकृताचा छोटा तुकडा बाहेर बारीक सुईवाटे तपासायला काढून (लिव्हर बायोप्सी) यकृताच्या कार्याबद्दल आपण जाणून घेऊ शकतो. अतिमद्यपान, वरचेवर झालेली कावीळ, पित्ताशयात खडे साचून त्याचा झालेला परिणाम यांमुळे यकृतात गंभीर विकृती निर्माण होतात. या विकृतींचा इलाज आजही आधुनिक वैद्यकाला सापडलेला नाही, तर आयुर्वेददीय इलाजांचे प्रमाणीकरण झालेले नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कैसा पांडुरंगा करावा विचार । सांग बा विर्धार साक्षरूपा ॥१॥ काय आलें देवा कैचें थोरपण । आकारासि कोणी आणियलें ॥२॥ आणियलें आतां आपणासारिखें । गोपिकांसी रूपें दावी नाना ॥३॥ काय जीवेंभावें सकाळां संमता । सगुण अनंत म्हणे नामा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्याला अनेक पर्यटन स्थळे बघायला आवडतात आणि त्यातून आनंद मिळत असतो. चांगल्या व्यक्तींची भेट घ्यायला आवडते. कारण त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायचे असते. पण ह्या दोघांकडून बरेच काही मिळत असले तरी जे, आपल्याला पाहिजे ते मात्र मिळत नाही. कारण आईची माया आणि बापाचा तो कणकर हात पाठीवर मिळत नसतो म्हणून जगात कितीही चांगले शोधण्याचा प्रयत्न करावा पण, घरच्या असलेल्या जिवंत देविदेवतांना क्षणभरासाठी सुद्धा विसरू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गर्वहरण*नदीच्या काठावर एक नारळाचे झाड होते. या झाडावर लागलेल्या नारळांना एक प्रकारचा गर्व चढला होता. तो नेहमी येणा-या जाणा-या वस्तूंना चिडवायचा पण त्याचा स्वभाव सगळेजण ओळखून होते. त्यामुळे त्यालाच कोणीच प्रत्युतर देत नसत. नदीमध्ये पडलेल्या दगडांचा तर नारळ खूप अपमान करीत असे. एकदिवशी तो नदीतल्या दगडाला म्हणाला," तुझी किती केविलवाणी परिस्थिती आहे, पहा! इथेच पडल्या पडल्या झिजून झिजून जाशील पण नदीचे पाय काही तू सोडणार नाहीस. ही नदी तुला देते तरी काय रे, अपमानालाही काही परिसीमा असते की नाही, मला पहा कशा प्रकारे उंच जागेवर आणि उच्च पदावर बसविले आहे." दगडाने त्याची बडबड ऐकून घेतली पण तो काही बोलला नाही. दोघेही आपापल्या स्थानी निघून गेले नारळ आता पूजेच्या थाळीत गेला होता. मंदिरात गेल्यावर नारळाने पाहिले की नदीतला दगड आता पूजास्थानी पोहोचला होता व शाळीग्राम म्हणून लोक त्याला पूजत होते. नारळाचा खूप संताप झाला की एका यः कश्चित दगडाच्या पूजेसाठी आपल्याला आणले गेले आहे पण तो काहीच करू शकत नव्हता. दगडाने त्याची मनस्थिती ओळखली व म्हणाला," नारळा, पहा झिजल्याचा कोणता परिणाम होतो. तेव्हा कधीच गर्व बाळगू नकोस."तात्पर्य : वेळ सारखी राहत नसते. गर्वाने वागणा-यांवरही कधी ना कधी मान खाली घालण्याची परिस्थिती येऊ शकते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 जानेवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15VnyfPhkK/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📝 *_पत्रकार दिन_* 📝••••••••••••••••••••••••••• 📝 *_ या वर्षातील सहावा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 📝 *_महत्त्वाच्या घटना:_* 📝•••••••••••••••••••••••••••••••••*१९४४: दुसरे महायुद्ध – रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले.**१९२९: गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन**१९२४: राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता**१९१२: न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७ वे राज्य बनले.**१९०७: मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरूकेली.त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.**१८३२: पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र ’दर्पण’ सुरू केले**१६७३: कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांनिशी पन्हाळा जिंकुन महाराजांचे १३ वर्षे अपुर्ण असलेले स्वप्न पूर्ण केले.**१६६५: शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील देवळासमोर ही सुवर्णतुला झाली.* 📝 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*📝 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००३: गोविंद तुकाराम भांड-मानोलिकर -- कवी**१९८४: दिलजीत सिंह दोसांझ -- पंजाबी व हिंदी चित्रपटाचे गायक**१९८१: मुरहारी कराड -- कवी, लेखक संपादक* *१९७३: किरण दत्तात्रय दशमुखे -- लेखक, संपादक* *१९७१: श्रीकांत अनंत उमरीकर-- कवी, संपादक* *१९६९: शिवा कांबळे -- लेखक तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक**१९६६: स्वाती संदीप दाढे -- कवयित्री, अनुवादक**१९६६: सदाशिव नारायण जोशी -- प्रसिद्ध लेखक, कवी**१९६६: ए. आर. रहमान – संगीतकार**१९६४: विनोद जनार्दन शिंदे -- कवी, लेखक**१९६३: प्रशांत प्रकाशचंद्र पनवेलकर -- प्रसिद्ध कवी**१९६२: बिंदिया गोस्वामी -- भारतीय माजी अभिनेत्री* *१९५९: कपिल देव निखंज – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार समालोचक व प्रशिक्षक**१९५८: डॉ. प्रज्ञा प्रकाश पुसदकर -- लेखिका**१९५८: तल्लुरी रामेश्वरी(रामेश्वरी) -- भारतीय अभिनेत्री* *१९५५: रोवान अॅटकिन्सन – विनोदी अभिनेते व पटकथालेखक**१९३१: डॉ. आर. डी. देशपांडे – पर्यावरण क्षेत्रातील शा’स्त्रज्ञ,’महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’चे (आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट) अध्यक्ष**१९२८: विजय धोंडोपंत तेंडुलकर -- प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक,पटकथालेखक,तथा राजकीय विश्लेषक(मृत्यू: १९ मे २००८ )**१९२७: राम तेलंग-- कवी, लेखक**१९२६: डॉ. पद्मिनी भांडारकर -- लेखिका (मृत्यू: ४ मार्च २०१३ )* *१९२५: रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक (मृत्यू: १९ जून १९९८ )**१८८३: खलील जिब्रान – लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार (मृत्यू: १० एप्रिल १९३१ )**१८६८: गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ 'दासगणू महाराज' – आधुनिक संतकवी, ’भक्तिरसामृत’,’भक्तकथामृत’ आणि ’संतकथामृत’ हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत.(मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६२ )**१८१२: बाळशास्त्री जांभेकर – मराठी पत्रकारितेचे पितामह,१८३२ मधे 'दर्पण' हे वृत्तपत्र काढून त्यांनी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घातला.’दिग्दर्शन’हे मराठीतील पहिले मासिकही त्यांनीच १८४० मधे सुरू केले. (मृत्यू: १८ मे १८४६ )* 📝 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*📝••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: तुलसीदास हरिश्चंद्र बेहेरे -- लोकसाहित्याचे अभ्यासक,नाटककार, दिग्दर्शक आणि दशावतार या लोकनाट्याचे अभ्यासक आणि संशोधक.(जन्म: १५ मे १९५२ )**२०१७: ओम प्रकाश पुरी -- भारतीय अभिनेते(जन्म: १८ ऑक्टोबर १९५०)* *२०१०: प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे – लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक (जन्म: १६ जुलै १९४३ )**१९८७: जयदेव(जयदेव वर्मा) -- हिंदी चित्रपटांतील संगीतकार (जन्म:३ ऑगस्ट १९१८)**१९८४: ’विद्यानिधी’ सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय,वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार (जन्म: १ फेब्रुवारी १८८४ )**१९८१: ए. जे.क्रोनिन – स्कॉटिश लेखक (जन्म: १९ जुलै १८९६ )**१९७१: प्रफुल्लचंद्र तथा पी.सी.सरकार – जादूगार (जन्म: २३ फेब्रुवारी १९१३ )**१९१९: थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २७ आक्टोबर १८५८ )**१९१८: जी. कँटर – जर्मन गणितज्ञ (जन्म: ३ मार्च १८४५ )**१८८५: भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक,१८५० ते १९०० हा काळ हिन्दी साहित्यात’भारतेंदू काळ’ म्हणून ओळखला जातो.(जन्म: ९ सप्टेंबर १८५० )**१८८४: ग्रेगोर मेंडेल – जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ (जन्म: २० जुलै १८२२ )**१८५२: लुई ब्रेल–अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (जन्म: ४ जानेवारी १८०९ )**१८४७: त्यागराज – दाक्षिणात्य संगीतकार (जन्म: ४ मे १७६७ )**१७९६: जिवबा दादा बक्षी – महादजी शिंदे यांचे सेनापती,मुत्सद्दी*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मराठी वृत्तपत्राचे जनक -----*दर्पणकार : बाळशास्त्री जांभेकर*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उत्तरेकडील अतिशीत वारे राज्यात धडकणार, येत्या तीन दिवसात थंडीचा कडाका वाढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 19 जानेवारी दरम्यान होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *एक ही उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील बिजनेस जत्रेच्या समारोपप्रसंगी व्यक्त केले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बालसाहित्य संमेलनाचे उद्घाटन, नवीन ज्ञान दृष्टी देणाऱ्या बालसाहित्याची गरज - ज्येष्ठ लेखिका मंगला वरखेडे यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अक्कलकोट - गेल्या 15 दिवसांत 15 लाख भाविकांनी अन्नछत्रचा लाभ घेतल्याची माहिती श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऑस्ट्रेलियन संघाने भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सिडनी कसोटी सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पॅट कमिन्सने रचला इतिहास ! WTC मध्ये 200 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. शीला पठारे👤 मोहन घोसले👤 रितेश जोंधळे👤 सुदर्शन कोंपलवार👤 अभिषेक अडकटलवार, नांदेड👤 इंजि. सुरेश दासरवार, नांदेड👤 अरुण गादगे, नांदेड👤 बजरंग माने👤 भगवान चव्हाण👤 शिवकुमार गंगुलवार👤 विजयकुमार भंडारे, शिक्षक, धर्माबाद👤 बाबुराव आगलावे👤 अंकुश आरेकर👤 शुद्धोधन कैवारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संजीवनी - संजीवनी रामचंद्र मराठे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन म्हणजे एक अनंत आव्हान , प्रदीर्घ साहस व पात्रतेची खरोखर कसोटीच असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान कोणता ?२) क्रीडा मंत्रालयाने यंदा 'मेजर ध्यानचंद खेलरत्न' पुरस्कारासाठी किती खेळाडूंच्या नावाची घोषणा केली ?३) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे ?४) 'वेश' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) अर्जून पुरस्काराचे स्वरूप काय आहे ? *उत्तरे :-* १) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार २) चार - मनू भाकर, डी. गुकेश, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार ३) पदक, प्रमाणपत्र व २५ लाख रु. ४) पोशाख ५) अर्जुनाची मूर्ती, प्रमाणपत्र व १५ लाख रु.*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ऊर्जा म्हणजे काय ?* 📙ऊर्जा म्हणजे सजीवाच्या प्रत्येक गोष्टीकरता लागणारी मूलभूत गरज आहे. ऊर्जेलाच एनर्जी असे म्हणतात. अचल वा अचेतन वस्तूची कोणतीही हालचाल घडवण्यासाठीसुद्धा उर्जा लागतेच. पृथ्वीवर कोणतीही ऊर्जा तयार होत नाही वा कोणतीही ऊर्जा पूर्णत: नष्ट होऊ शकत नाही. फक्त ऊर्जेचे नेहमीच रूपांतर होत असते.हे झाले ऊर्जेबद्दलचे थोडक्यात ज्ञान. व्यवहारात ऊर्जेबद्दलचे गैरसमज शास्त्रीय प्रगतीला फार मोठी खीळ घालण्याची शक्यता अनेकदा निर्माण झाली आहे. त्यांतील आपल्या देशातील मोजक्या काहींचा येथे उल्लेख करून प्रत्यक्ष स्थिती काय आहे, हे जाणून घेऊ या.धरणाचे पाणी वीजनिर्मितीकेंद्राने वापरून नदीत सोडले तर ते शेतीला उपयुक्त ठरत नाही, हा गैरसमज; कारण पाण्याची 'पॉवर' गेलेली असते, हे त्यामागच्या प्रचाराचे कारण. पाण्याचा वापर फक्त गुरुत्वाकर्षणाच्या वेगाने मिळणाऱ्या ताकदीचा वापर करून जनित्राचे टर्बाइन फिरवणे एवढाच केलेला असतो. यात पॉवरचा दुरान्वयानेही संबंध येत नाही. एखाद्या खडकावर पाणी आदळावे तसेच येथे टर्बाईनवर आदळते व पुढे जाते. या गोष्टी अगदी सरळ वाटल्या तरीही किमान पंचवीस ते तीस वर्षे आपल्या देशात असे पाणी शेतकऱ्यांनी नाकारले आहे, ही सत्यस्थिती आहे.गोबरगॅस वापरला असता स्वयंपाकघरात वास सुटुन हवा दूषित होते हा गैरसमज. गॅस जळतो, तेव्हा फक्त कार्बन डाय ऑक्साइड हवेत राहतो. गोबर गॅस फक्त जळण्यापुरताच स्वयंपाकघरात येतो व ज्वलनानंतर त्याचा कसलाही वास सुटणे, हवा दूषित होणे यांचे कारणच राहत नाही. प्रदूषणाचे तर कारणच नसते. शेगडी वा लाकडे जाळल्यावर जितका कार्बन डायाक्साईड पसरतो, त्याचा दहा टक्केही गोबरगॅस ज्वलनाने निर्माण होत नाही. धूर तर नसतोच. ज्वलनाला आच उत्तम मिळते, हे वेगळेच. तेव्हा गोबरगॅस वापरावा, हे उत्तम. 'अधिक चरबी, तेल तूप असलेले पदार्थ खाऊन ऊर्जा मिळते, ती जास्त पौष्टिक असते,' हा गैरसमज पसरण्याचे कारण तसेच आहे. पहेलवान मंडळी खुराक म्हणून अनेकदा भरपूर तूप, लोणी व चरबीयुक्त पदार्थ खात असतात. सामान्य माणूस त्याचेच आंधळे अनुकरण करू बघतो. स्निग्ध पदार्थातून जास्त ऊर्जा मिळते, हे अर्धेच बरोबर; कारण ही ऊर्जा लगेच उपलब्ध कधीच होत नाही, तर शरीरात चरबीच्या रूपात साठवली जाते. पहेलवान मंडळी अनेकदा थुलथुलीत दिसतात, त्याचे हेच कारण. संतुलित आहार प्रथिनयुक्त ऊर्जा घेतली, तर तिचा वापर लगेच केला जातो. जागतिक कीर्तीचे मल्ल बघितले तर त्यांच्या अंगावर चरबीचा कणही दिसत नाही, हे त्यामुळेच. ग्लुकोजची साखर खाल्ल्यामुळे तात्काळ खूप ऊर्जा मिळून तरतरी येते, हा एक गोड गैरसमज मुद्दाम पसरवला गेला आहे. ग्लुकोज, शुक्रोज, फ्रुक्टोज, माल्टोज या विविध साखरेच्या प्रकारांचे ग्लुकोजमध्येच रूपांतर होते. शिरेतून ग्लूकोज भरल्याने ताकद मिळते, हा एक भल्याभल्या शिकलेल्यांचाही गैरसमज आहे. पोटभर चौरस आहार हेच खरे ऊर्जेचे साधन होय. असे काही गैरसमज व ते दूर करायचा हा अल्पसा प्रयत्न.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••केशवचरणीं मनें दिली बुडी । इंद्रियें बापुडीं धांवती पाठीं ॥१॥ संसार संभ्रम नको सुखलेश । भातुकें सरिसें पाठविसी ॥२॥ जन्मजन्मांतरीं जाणावें कवणें । नेणोनि भोगणें कवणें स्वामी ॥३॥ नामा म्हणे केशवे भक्तवत्सले । आम्हांसि वेगळे होऊं नका ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या विषयी कोणी एकाकी खोटे सांगत नाही. कारण त्या विषयी त्याला चांगल्याप्रकारे अनुभव आलेला असतो. म्हणून ते, दुसऱ्यांदा चुकीचे घडू नये यासाठी सावध करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून सांगणाऱ्या व्यक्तीला कोणाच्या सांगण्यावरून नको त्या शब्दात बोलून त्याचा अवमान करू नये. बरेचदा सत्य न ऐकून घेतल्याने आपलेच नुकसान होण्याची शक्यता असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वाईट सवयींचा त्याग*एक व्यापारी होता. तो जितका व्यवहारी, विनम्र आणि मनमिळाऊ होता तितकाच त्याचा मुलगा उद्धट आणि गर्विष्ठ होता. त्याला सुधारण्याचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरले. एकदा ही गोष्ट त्याने एका मित्राला सांगितली. मित्र म्हणाला, त्याला माझ्याकडे काही दिवस राहण्यासाठी पाठवून दे. मी तुझ्या मुलाला ठिकाणावर आणून दाखवेन. त्या व्यापा-याचा मुलगा मित्राच्या घरी राहण्यास गेला. त्याच्या वडिलांच्या मित्रांनी त्याला अतिशय चांगली वागणूकदिली. एकदा ते त्याला बागेत फिरावयास घेऊन गेला असता, एक फूट उंचीचे रोप त्याला उपटण्यास सांगितले. मुलाने ते रोप सहजच उपटले, त्यानंतर त्याने मुलाला सहा फूट उंचीचे रोप उपटण्यास सांगितले, मुलाला ते उपटण्यास खूप ताकद लावावी लागली. शेवटी ते एका उंच वृक्षाजवळ आले व मित्रांनी मुलाला तो वृक्ष उपटून टाकण्यास सांगितला. मुलाने ते शक्य नसल्याचे सांगितले. त्यावेळी मित्रांनी मुलाला उपदेश केला तो म्हणजे असा की,' आपण एखादे वाईट कामाला सुरुवात करत असतो तेव्हा त्यापासून दूर जाणे शक्य असते पण मात्र त्या कामात जर आपण खोलवर गुंतून गेलो की आपल्याला त्यापासून सुटका करणे अशक्य असते. वाईट सवयी किंवा वाईट वर्तनाचे सुद्धा असेच आहे, जोपर्यंत सहज शक्य आहे तोपर्यंत वाईट वर्तन किंवा सवय सोडलेली चांगली असते." मुलाला त्याच्या मित्रकाकांचा उपदेश सहजपणे लक्षात आला व त्याने चांगले वागण्याचे ठरवले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 जानेवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔵 *_जागतिक ब्रेल दिवस_* 🔵••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_ या वर्षातील चौथा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या ’बिंब प्रतिबिंब’ या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.**१९५९: लूना - १ हे अंतराळयान चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले.**१९५८:१९५३ मध्ये माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे सर एडमंड हिलरी दक्षिण धॄवावर पोहोचले.**१९५४: मेहेरचंद महाजन यांनी भारताचे ३ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९५२: ब्रिटिश सैन्याने सुएझ कालव्याची नाकेबंदी केली.**१९४८: ब्रम्हदेश (म्यानमार) ला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९४४: १० वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करुन घेण्याबद्दलचा हिटलरचा वटहुकूम जारी झाला.**१९३२: सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरूंना दोन वर्षांची शिक्षा**१९२६: क्रांतिकारकांच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली.**१८८१: लोकमान्य टिळक यांनी पुणे येथे ’केसरी’ या वृत्तपत्राची सुरूवात केली.**१६४१: कर भरायला नकार देणार्या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स हाऊस ऑफ कॉमन्समध्ये शिरला.या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली.त्यात चार्ल्सचा पराभव होऊन मग त्याचा शिरच्छेद करण्यात आला.* 🔵 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔵••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७१: प्रा. डॉ. विजय मेरसिंग जाधव -- लेखक, संपादक**१९७१: सुनील राम गोसावी -- लेखक, कवी**१९६७: जयश्री अनिल पाटील -- कवयित्री* *१९६७: श्रीमंत माने -- ज्येष्ठ पत्रकार, लोकमत नागपूरचे संपादक तथा लेखक* *१९६५: प्रा. गोविंद जाधव -- कवी**१९६४: प्रसाद कुलकर्णी - लोकप्रिय कवी, उत्तम व्याख्याते* *१९६४: मिलिंद शांताराम गांधी -- कवी, गीतकार* *१९६३: प्राचार्य डॉ. जगन्नाथ शामराव पाटील -- प्रसिद्ध लेखक**१९५९: सुनंदा सुहास भावसार -- कवयित्री, लेखिका**१९५९: मोतीराम रुपसिंग राठोड - लेखक**१९५७:गुरदास मान -- भारतीय गायक, गीतकार आणि अभिनेता* *१९५५: प्राचार्य डॉ. श्रीकांत तिडके -- विदर्भातील प्रसिद्ध लेखक व वक्ते**१९५०: पुरुषोत्तम खेडेकर -- मराठा सेवा संघ या संघटनेचे संस्थापक* *१९५०: वासंती प्रभाकर मार्कन्डेयवार -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९४५: शैलजा राणे-घोरपडे -- कवयित्री, लेखिका**१९४१: कल्पनाथ राय – माजी केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार काँग्रेसचे नेते (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९९ )**१९४०: श्रीकांत वसंत सिनकर -- प्रसिद्ध कथालेखक**१९३३: प्रा.मनोहर सप्रे-- प्रसिद्ध व्यंगचित्रकार, लेखक (मृत्यू: १३ डिसेंबर २०२४ )**१९३१: दिगंबर कुलकर्णी -- कथाकार कादंबरीकार* *१९३१: निरूपा रॉय -- भारतीय सिने-अभिनेत्री, पडद्यावर प्रामुख्याने नायकाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या निरूपा रॉयने सुमारे ४७५ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या ( मृत्यू: १३ ऑक्टोबर २००४ )**१९२५: प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता (मृत्यू: २७ आक्टोबर २००१ )**१९२४: विद्याधर गोखले – नाटककार व संपादक (मृत्यू: २६ सप्टेंबर १९९६ )**१९२२: भालचंद्र शंकर भणगे-- लेखक, शिक्षणतज्ञ, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू (मृत्यू: २९ मार्च१९८० )**१९१४: इंदिरा संत –साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध कवयित्री व लेखिका (मृत्यू: १३ जुलै २००० )**१९०९: प्रभाकर आत्माराम पाध्ये -- संपादक, प्रसिद्ध साहित्यिक, सौंदर्यमीमांसक, समीक्षकज्ञ (मृत्यू: २२ मार्च १९८४ )**१९०५: कृष्णाजी बाबुराव मराठे -- चरित्रकार(मृत्यू: १९ नोव्हेंबर १९८७ )* *१८१३: सर आयझॅक पिटमॅन – शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक (मृत्यू: १२ जानेवारी १८९७ )**१८०९: लुई ब्रेल – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (मृत्यू: ६ जानेवारी १८५२ )* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: सिंधूताई सपकाळ -- सामाजिक कार्यकर्त्या, अनाथाची माय पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म: १४ नोव्हेंबर १९४८ )**२०१७: अब्दुल हलीम जाफर खान -- भारतीय सितार वादक (जन्म: १८ फेब्रुवारी १९२७ )**१९९४: राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (जन्म: २७ जून १९३९ )**१९६५: टी. एस. इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २६ सप्टेंबर १८८८ )**१९६१: आयर्विन श्रॉडिंगर – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १८८७ )**१९१७: सखाराम कृष्ण देवधर(बापूसाहेब देवधर) -- गायत्री मंत्राचे उपासक,ज्ञानेश्वरीचे अभ्यासक**१९०८: राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, संपादक (जन्म: ११ नोव्हेंबर १८५१ )**१९०७: गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक, 'सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (जन्म: २० आक्टोबर १८५५ )**१७५२: गॅब्रिअल क्रॅमर – स्विस गणिती (जन्म: ३१ जुलै १७०४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बोलण्याचे संस्कार*आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार.................... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भुवनेश्वर येथे 7 जानेवारीपासून प्रवासी भारतीय दिवस परिषद, पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 10 समारंभाला उपस्थित राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दिल्लीतल्या विविध विकास कामांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी व उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नर्सी नामदेव येथील विकास कामे वेळेत पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना, विकास कामांच्या दुसऱ्या टप्प्यातील आराखडा शासनाला सादर करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सरकार्यवाहपदाची जबाबदारी स्वीकारली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मानवी अधिकाराच्या मूल्याची स्थापना फुले दाम्पत्यांनी केली, डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपदान; पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती साजरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दुचाकी घेताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणं अनिवार्य, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाचव्या कसोटी सामन्यात भारताची निराशाजनक सुरुवात, पहिल्या दिवशी भारत सर्व बाद 185 धावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी डिघोळे , सहशिक्षक, अहमदपूर👤 अंकुशराजे जाधव👤 माधव बोइनवाड, येवती👤 चंद्राभिम हौजेकर, पत्रकार, धर्माबाद👤 राजेश कुकूटलवार👤 निलेश आळंदे👤 माधव सूर्यवंशी, मुंबई*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*रघुनाथ पंडित - रघुनाथ चंदावरकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वकर्तव्यदक्ष राहिल्याने मनुष्य नेहमी सर्वोच्च आणि पूर्णावस्थेत पोचतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता ?२) प्रो कबड्डी लीग ( सीजन ११ ) चा विजेता संघ कोणता ?३) प्रो कबड्डी लीग ( सीजन ११ ) चा उपविजेता संघ कोणता ?४) PKL सीजन ११ चा बेस्ट रेडर कोण ठरला ?५) PKL सीजन ११ चा बेस्ट डिफेंडर कोण ठरला ? *उत्तरे :-* १) कबड्डी / हुतूतू २) हरियाणा स्टीलर्स ३) पटना पायरेट्स ४) देवांक दलाल, पटना पायरेट्स ( ३०१ रेड पॉइंट ) ५) नितेश कुमार, तमील थलायवाज ( ७७ टॅकल )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बोटं मोडताना आवाज का येतो ?*📙एखाद्यावर राग काढायचा असला, की त्याच्या नावानं बोटं मोडली जातात. त्या प्रत्येक वेळी आवाज का येत नाही हे नाही सांगता यायचं; पण बोटांमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी तो मोकळा करण्यासाठी आपण बोटात ताणतो त्यावेळी मात्र हमखास कडकड असा आवाज येतो. कोणाच्या बाबतीत मोठ्यानं येतो, कोणाच्या बाबतीत ऐकू येईल न येईल असा येतो; पण येतो खरा. वास्तविक असा आवाज केवळ बोटांच्या बाबतीतच येतो असं नाही. कोणत्याही हाडांच्या सांध्याच्या बाबतीतही तो येत असतो. सांध्याच्या ठिकाणी दोन हाडं एकमेकांशी जोडलेली असतात; पण या सांध्यांची हालचाल होते तेव्हा ही हाडं निरनिराळ्या कोनांमधून फिरतात. ते सहजसाध्य व्हावं म्हणून जिथं ही हाडं जोडलेली असतात तिथे एक स्नायूंचा जाडसर थर असतो, अस्तरासारखा. तो नसला तर ती हाडं एकमेकांवर घासून त्यांची झीज होईल. शिवाय त्यांची मोडतोडही होण्याची शक्यता असते. तरीही ते थर एकमेकांवर घासतात ते घर्षणापायी उष्णता निर्माण होतेच. आपले तळवे आपण एकमेकांवर घासले तर ते गरम होतात. त्याचं कारणही हेच.या उष्णतेचा त्या थरांवर अनिष्ट परिणाम होतोच. त्यांची हालचालही मोकळी होत नाही. तशी ती व्हावी म्हणून तिथं एक प्रकारचं वंगण असतं. एक तेलासारखा पातळ स्निग्ध पदार्थ असतो. त्या वंगणात ऑक्सिजन, कार्बन डायॉक्साइड, नायट्रोजन यांसारखे वायू विरघळलेल्या स्थितीत असतात.बराच वेळ वापर झाला की ते सांधे थकल्यासारखे होतात. त्यांची मोकळी हालचाल होत नाही. कारण त्या हालचालीला मदत करणारे स्नायू जखडल्यासारखे होतात. त्या स्थितीत ते जरा ताणले तर सैलावतात. त्यांची परत मोकळी हालचाल होऊ शकते. पण तसे ते ताणले की त्या वंगणाच्या पिशव्याही फुगल्यासारख्या होतात. त्यांच्यामध्ये विरघळलेल्या स्थितीत असलेले वायू मोकळे होऊन त्यांचे बुडबुडे तयार होतात. ते फुटतात आणि त्यांचाच तो आवाज होतो. किती वेगानं हे बुडबुडे तयार होऊन फुटतात तसंच किती बुडबुडे तयार होतात, त्यावर किती मोठा आवाज होणार हे अवलंबून असतं. कोणत्याही सांध्याच्या वंगणाच्या बाबतीत हीच परिस्थिती असते; पण बोटांच्या सांध्यामध्ये बुडबुडे लवकर तयार होतात आणि पटकन फुटतातही. त्यामुळे त्यांचा आवाजही सहजगत्या होतो. शिवाय बोटांना तीन पेरं असतात. त्या तिन्ही पेरांची स्वतंत्र हालचाल होऊ शकते. म्हणजेच प्रत्येक बोटाला एकूण तीन सांधे असतात. ते जवळजवळही असतात. आपण जेव्हा बोटं ताणतो तेव्हा ते सगळेच सांधे ताणले जातात. सर्व ठिकाणच्या वंगणातल्या वायुंचे बुडबुडे तयार होऊन ते फुटतात. त्यामुळे बोटं ताणल्यानं नेहमीच कडकड असा आवाज होतो.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कृपा करोनि त्वां मज प्रसना व्हावें । आणि म्यां मागावें बुद्धिज्ञान ॥१॥ ऐसी भुली मज न घालीं पांडुरंगा । बिघड संत्संगा न करीं मज ॥२॥ मोक्षासी साधन एका ते उपाधी । दाखवुनि बुद्धिभ्रंश केलें ॥३॥ एका पुत्र कलत्र राज्यचा संभ्रर्म । दावोनी दुर्गम भ्रम केला ॥४॥ नामा म्हणे तुझ्या प्रेमालागीं भक्ति । घेतली म्यां सुतीं जन्ममरणें ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांचे विचार सकारात्मक असतात अशी माणसे त्याच सकारात्मक विचारांना आत्मसात करून नित्यनेमाने कार्य करत असतात. कारण त्यांना वेळेचे भान असते सोबतच आपण इतरांसाठी काय केले पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील असतात. अशा विचारी माणसांना कशाचीही अपेक्षा नसते किंवा कोण काय म्हणतील याकडे लक्ष देण्यासाठी त्याच्याकडे वेळ नसतो. तीच माणसे अभिमानाचे दुसरे नाव असतात.म्हणून जे कोणी चांगले कार्य करत असतील त्यांचे गुणगान करता येत नसेल तर त्यांना नाव ठेवून स्वतः च्या नावाची प्रसिद्धी करू नये. माणसाचे जीवन एकदाच मिळते त्या मानवी जीवनाचे महत्व जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अतिरेक नको*एकदा एक राजहंस एका बगळ्यास म्हणाला, 'काय रे तू आधाशी ! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागेपुढे पहात नाहीस. बरं-वाईट, नासकं हा फरकसुद्धा तुझ्या खादाड जिभेला समजत नाही. माझं पहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतु तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा असणं बरं नव्हे. ज्या वेळी जे मिळेल ते खावं अन् सुखी राहावं. खाण्याचा पदार्थ दिसला की तो खावा हेच शहाणपणाचं. असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला एक मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे दुसऱ्या कमळे असलेल्या तळ्यात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे लावले होते, त्यात तो सापडला.तात्पर्य - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 जानेवारी 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2016/12/savitribai-phule.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟢 *_बालिका दिन, महिला मुक्तिदिन_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_ या वर्षातील तिसरा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*२००४: नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राष्ट्रीय स्मारक घोषित करुन राष्ट्राला अर्पण करण्यात आले.**१९५७: हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.**१९५०: पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्घाटन झाले.**१९४७: अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.**१९२५: बेनिटो मुसोलिनी इटलीचा हुकूमशहा बनला.**१४९६: लिओनार्डो डा व्हिन्सीने उडणाऱ्या यंत्राची अयशस्वी चाचणी केली.*🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: मधुकर बाळासाहेब जाधव -- लेखक, कवी**१९७९: गुल पनाग (जन्म (गुलकीरत कौर पनाग) -- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल* *१९७५: प्रा. डॉ. विजय फकिरा राठोड -- कवी लेखक, व्याख्याते* *१९७१: सरिता सुवास परसोडकर -- कवयित्री**१९७१: अशोक गणपतराव पाठक -- कवी**१९६५: धनंजय माधवराव मुळे -- लेखक,कवी**१९६२: डॉ. मेघा उज्जैनकर -- लेखिका**१९६१: राजेंद्र खेर - सुप्रसिद्ध कादंबरीकार**१९६०: डॉ. वृषाली किन्हाळकर -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका तथा प्रसुती व स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर* *१९५८: दिगंबर पवार -- कवी**१९५६: शिरीष श्रीकृष्ण गंधे -- कवी, लेखक, चित्रकार, व्याख्याते, अभिनेते**१९५४: सुभा आत्माराम लोंढे -- प्रसिद्ध लेखिका, कवयित्री**१९५२: श्रीराम वसंतराव ढवळीकर -- लेखक, पत्रकार**१९५१: अशोक निळकंठ सोनवणे -- प्रसिद्ध कवी लेखक तथा विविध पुरस्काराने सन्मानित**१९५०: प्रभाकर निलेगावकर -- मराठीतले एकपात्री कार्यक्रम करणारे एक कलावंत* *१९४९: प्रसाद तुकाराम सावंत -- लेखक**१९४७: मनोहर गणपत भारंबे -- लेखक**१९४६: प्रा. डॉ. दीनानाथ सिद्धराम फुलवाडकर -- कवी, कथाकार, संपादक* *१९४३: श्रीकांत दत्तात्रेय निंबवीकर -- प्रसिद्ध कथाकार**१९४१: संजय खान (शाह अब्बास अली खान) -- भारतीय अभिनेता, निर्माता* *१९४१: अमिताभ ( वामन नगराळे)-- प्रसिद्ध कवी, लेखक**१९३७: सिंधू सदाशिव डांगे -- संस्कृत संशोधक, लेखिका,संपादक**१९३१: डॉ. य. दि. फडके – लेखक, विचारवंत व इतिहाससंशोधक (मृत्यू: ११ जानेवारी २००८ )**१९२६: हरिश्चंद्र भास्कर उजगरे -- लेखक, संपादक**१९२१: चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक (मृत्यू: ६ जुलै १९९७ )**१८८३: क्लेमंट अॅटली – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९६७ )**१८५३: कृष्णाजी नारायण आठल्ये -- संपादक,चित्रकार, टीकाकार, निबंधकार, कवी (मृत्यु: २९ नोव्हेंबर १९२६ )**_१८३१: सावित्रीबाई फुले – भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.(मृत्यू: १० मार्च १८९७ )_*🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: डॉ.चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी -- भारतीय न्यायाधीश, लेखक (जन्म: २० नोव्हेंबर १९२७ )**२०१५: सरिता मंगेश पदकी -- कवयित्री, कथालेखिका, बालसाहित्यकार, नाटककार आणि अनुवादिका (जन्म: १३ डिसेंबर १९२८ )**२००२: सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष (जन्म: २५ सप्टेंबर १९२० )**२०००: डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे. (जन्म: २६ डिसेंबर १९१४ )**१९९८: प्रा. केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (जन्म: ८ फेब्रुवारी १९०९ )**१९९४: अमरेन्द्र गाडगीळ – मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक (जन्म: २५ जून १९१९ )**१९८७: अरविंद देशपांडे -- प्रसिद्ध भारतीय चित्रपट, थिएटर आणि टेलिव्हिजन अभिनेता आणि थिएटर दिग्दर्शक (जन्म: ३१ मे १९३२ )**१९७५: ललितनारायण मिश्रा--बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकावरील बॉम्बहल्यात जखमी झालेले रेल्वेमंत्री ललितनारायण मिश्रा यांचे निधन.(जन्म: २ फेब्रुवारी १९२३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मी सावित्री बोलतेय....!*....!*नमस्कार .....मी सावित्रीबाई फुले माझा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकविले आणि घडविले. पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. पण तिथे मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेंव्हा ज्योतिबानी मला याठिकाणी शिकविण्यासाठी पाठविण्याचे ठरविले. मात्र मी होते अक्षरशत्रू, मला वाचताही येत नव्हते आणि लिहिताही. पण ............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मंत्र्यांच्या दौऱ्यात आता पुष्पगुच्छ व मानवंदना बंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या यात्रेत नागरिक व भाविकांची गर्दी, प्राण्यांचे बाजारही फुलले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *23 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 13 ते 20 फेब्रुवारी कालावधीत होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अखेर पैठणचे उद्यान 5 वर्षांनी होणार सुरू, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना कडक सुचना, 26 तारखेपासून पर्यटकांसाठी होणार खुले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यातील 12 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, त्यामध्ये 2 महिला अधिकारीचा समावेश, सातारा व पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बदलण्यात आले आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लाडकी बहीण योजनेतील अर्जाची होणार पुन्हा पडताळणी, सरकारी नोकरीसह दुचाकीसह अन्य वाहने नावावर असणारे महिला ठरतील अपात्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *केंद्राच्या खेलरत्न पुरस्काराची घोषणा, मनू भाकर, डी. गुकेश सह अन्य दोघांना खेलरत्न पुरस्कार, 34 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार तर 5 प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. वृषाली किन्हाळकर, साहित्यिक, नांदेड👤 ज्ञानेश्वर विजागत , शिक्षक👤 वर्षा भोळे , नांदेड👤 शुभांगी परळकर , नांदेड👤 संदीप जाधव👤 माधव पवार👤 योगेश पाटील👤 उत्तम जोंधळे👤 राजेश पिकले👤 डॉ. प्रशांत बोड्डेवाड, येवती👤 विठ्ठल सुवर्णकार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अनंत फंदी - शाहीर अनंत घोलप*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयशाच्या दगडाला लागलेली ठेच म्हणजे उद्याच्या यशाची ग्वाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणाच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारीला बालिका दिवस* साजरा केला जातो ?२) महाराष्ट्रातील प्रथम महिला मुख्याध्यापिका कोण ?३) भारतातील प्रथम महिला शिक्षिका कोण ?४) भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या कोण ?५) पुणे विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे ? *उत्तरे :-* १) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले २) सावित्रीबाई फुले ३) सावित्रीबाई फुले ४) सावित्रीबाई फुले ५) सावित्रीबाई फुले *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *समुद्रकिनाऱ्यावरचे प्राणिजीवन* 📙 समुद्र अनेकांनी नक्कीच पाहिला असेल. कदाचित अनेकांचा जन्मच समुद्राकाठी गेला असेल. विविध वेळी समुद्राची विविध रूपे न्याहाळत असताना, लाटांकडे बघत असताना त्याच्या पोटातील समुद्र प्राणीजीवनाची मात्र अजिबात जाणीव होत नाही. अगदी क्वचित एखादा मासा लांबवर सुळकांडी मारताना लाटेबरोबर दिसतो किंवा त्याला टिपण्यासाठी गलपक्ष्यांची झेप नजरेत भरते, एवढेच. जी गोष्ट समुद्राची तीच समुद्रकिनाऱ्याची. शिंपले, रंगीबेरंगी शंख, चमकते अभ्रकाचे पापुद्रे गोळा करण्यात किंवा समुद्रावर वाळूचे किल्ले बांधण्यात अनेकांनी ओहोटीच्या वेळी तासंतास घालवलेले असतील. पण याच किनाऱ्यावर विविध प्राण्यांचे वास्तव्य असते, हे फारसे कधी जाणवणार नाही. मात्र वस्तुस्थिती वेगळीच असते.किनाऱ्याजवळच्या उथळ पाण्याचा भाग हा अत्यंत विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांनी खच्चून भरलेला असतो, असे म्हटले तर अजिबात चुकीचे ठरू नये. जिथे खडकाळ किनारा असेल, तेथे तर हे प्रमाण कितीतरी जास्त असते, कारण मऊ माती व रेतीपेक्षा खडकाळ किनाऱ्याचा आधार घेऊन अल्गी, प्रवाळ, शिंपल्यातील प्राणी वाढतात. स्वतःची घरे करतात. त्याचा सलग असा सुंदर पृष्ठभाग खडकांवर तयार होत जातो. रेतीच्या किनार्यातही प्राणी असतातच; पण ते सर्व मऊशार शरीराचे असतात.किनाऱ्याचे ढोबळमानाने चार भाग केले जातात. लाटा फुटून विरतात, तो एक भाग. नंतरचा सर्वात उंच लाट ते तेथपासून भरतीच्या वेळच्या सर्वात कमी उंचीच्या लाटेपर्यंतचा दुसरा टप्पा. तिसरा भाग म्हणजे ओहोटीची सर्वात मोठी लाट व भरतीची सर्वात लहान लाट यांमधला. शेवटचा टप्पा ओहोटीच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान लाटेदरम्यानचा. या प्रत्येक टप्प्यातील पाण्याच्या मार्यानुसार, गरजेनुसार विविध प्राणी वास्तव्य करतात. वरवर पाहता फारसा पत्ता न लागणाऱ्या किनाऱयावर पूर्ण ओहोटी असताना सावकाशपणे हिंडत निरीक्षण केले, तर यांतील काही मंडळी दृष्टीला पडतात. निळसर गोलाकार डॉलरच्या आकाराचे गोल बिळात शिरताना दिसतात, तर दोहोबाजूंना असंख्य पाय असलेले आयसोपॉड्स हिंडताना व खाद्याच्या शोधात दिसतात. खिडक्यांची बिळेही दिसतात, तर ओहोटीच्या पाण्यात स्टारफिशही वळवळताना सापडतात. शिंपल्यांचे विविध प्रकार याच वेळी दिसतात, तर पाठीवर शंखांचे ओझे घेऊन चालणारे कोळसपण या वेळी हलताना दिसतात.या विविध प्राण्यांच्या गरजांप्रमाणे त्यांनी किनाऱ्याचे मघाशी सांगितलेले चार टप्पे आपलेसे केले आहेत. प्रत्येकजण वास्तव्यासाठी आपापला टप्पा पकडूनच राहतो, हे किनाऱ्याचे वैशिष्टय़ म्हणता येईल.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कृपणाचें धन असे भूमि आंत । तेथें जाय चित्त जेथें धन ॥१॥ ऐसी मज देवा लावावी हे सवे । हेंचि मज द्यावें पांडुरंगा ॥२॥ जेथें जेथें मन जाईल हें माझें । तेथें तेथें तुझें रूप भासे ॥३॥ नामा म्हणे मी सर्वांपरी अज्ञान । विनवी आस करून पांडुरंगा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रोध हा माणसाचा शत्रू आहे म्हणतात. या क्रोधामुळे आपण कधी, कधी उलट, सुलट बोलल्याने समोरील व्यक्तीचे मन दुखावत असते. अशा व्यक्तीशी संवाद ठेवण्यात अनेक इच्छुक नसतात. म्हणून बोलताना पुढच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेवून संयमाने बोलण्याचा प्रयत्न करावा.विणाकारण किंवा लहान, सहान गोष्टीवरून कोणाचे मन दुखावेल अशा शब्दात बोलू नये.क्रोध हा क्षणासाठी असतो मात्र ज्यावेळी आपल्याच माणसाला बोलून दु:खी केले जाते दुसऱ्यांदा त्याच व्यक्तीच्या मनात तो स्थान असेलच असे नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दृष्टीकोन बदला*एक झाड सुंदर फळाफुलांनी बहरून गेले होते. सुंदरता आणि संपन्नतेमुळे पक्षी अधिक प्रमाणात त्या झाडावर राहत होते. झाडही आनंदाने आश्रय आणि भोजन देत होते. तसेच वाटसरूंना सावली देण्याचे कार्यही झाड प्रामाणिकपणे करत होते त्यामुळे वाटसरूंचे आशीर्वाद झाडाला मिळत असत. त्यामुळे झाडाजवळ सदैव प्रसन्नता असायची मात्र कालांतराने झाडाला या गोष्टीचा गर्व झाला आणि माझ्यासारखे दुसरे झाडच नाही, सगळ्या झाडात मीच श्रेष्ठ आहे असा भ्रम त्याला झाला. काही काळाने झाडाला फळे फुले येण्याचे बंद झाले, पानांची गळती सुरु झाली. सावली नसल्याने वाटसरू येईनात, फळे नसल्याने पक्षी राहिनात अशी अवस्था झाली. झाडाला वाईट वाटले त्याने तेथून जाणा-या एका सिद्धपुरुषाला विचारले की माझ्या आयुष्यभर मी सर्वांची सेवा केली पण माझ्या या वृद्धापकाळी माझी कोणी साधी विचारपूस सुद्धा का करीत नाहीत. काही लोक तर मला तोडण्याची भाषा करत आहेत. सिद्धपुरुष म्हणाले, अरे वृक्षराजा, तू विचार करण्याची पद्धत बदल, जीवनभर लोकांच्या कल्याणसाठी राबणारा हा तुझा डोलारा आता तुझ्या मृत्युनंतरही उपयोगी पडणार आहे. तुझ्या लाकडाचे अनेक उपयोग माणसाच्या कल्याणासाठी होणार आहेत. मरूनही तू चिरंतन माणसाच्या स्मरणात राहणार आहेस. तेव्हा तू तुझ्या मरणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदल. हे ऐकून वृक्षाला आनंद वाटला व त्याने दुःख न मानण्याचे ठरवले.तात्पर्य : कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास त्यातील चांगल्या बाबी लक्षात येतात. मात्र नकारात्मक विचारसरणीने नुकसान होण्याचीही शक्यता असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 जानेवारी 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1EDAFxa7UU/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🏵️ *_ या वर्षातील दुसरा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🏵️ *_महत्त्वाच्या घटना:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••• *२०००: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.**२०००: पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.**१९९८: डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी.लिट.पदवी प्रदान**१९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या**१९५४:राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी ’भारतरत्न’ पुरस्कारांची स्थापना केली.**१९४५: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी न्यूरेम्बर्ग, जर्मनी येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.**१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.**१९३६:मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना**१९०५: मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची घटना होती.**१८८५: पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.**१८८१: लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.**१७५७: प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.*🏵️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🏵️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: शाल्मली खोलगडे -- भारतीय पार्श्वगायिका**१९८४: माणिक प्रल्हादबुवा गिरी -- लेखक* *१९८४: डॉ. चंदू हरी पवार -- कवी* *१९८०: गजानन नत्थुजी कावडे -- कवी* *१९७८: डॉ. शुभांगी गणेश गादेगावकर -- कवयित्री, लेखिका**१९७५: डॉ.देवेंद्र शेषराव तातोडे -- कवी लेखक* *१९६७: महेश गोविंद आफळे -- कवी, लेखक**१९६४: नंदू सामंत -- कवी* *१९६४: प्रा. राम कदम -- कथाकार**१९६३: अविनाश शरदचंद्र चिंचवडकर -- लेखक, कवी**१९६२: प्रा. मधुकर बळीरामजी वडोदे -- लेखक, कवी* *१९६०: रमण लांबा – क्रिकेटपटू (मृत्यू:२३ फेब्रुवारी १९९८ )**१९५९: किर्ती आझाद – क्रिकेटपटू आणि माजी खासदार**१९५७: उर्मिला देशपांडे -- कथा, कादंबरी, नाट्य लेखन* *१९५६: प्रा. डॉ. दीपक गोपाळराव कासराळीकर -- समीक्षक* *१९५५: जनार्दन नारायण ठाकूर-शिंदे -- कवी, लेखक**१९५२: श्रीनिवास गेडाम -- कवी, गझलकार, लेखक**१९५०: प्रा. श्याम विद्याधरराव पाठक -- कवी, लेखक* *१९४९: निरंजन कचरुजी पाटील -- लेखक, कवी, संपादक* *१९४५: प्रा. आनंद जामवंतराव कदम -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९३२: हरचंदसिंग लोंगोवाल – अकाली दलाचे अध्यक्ष (मृत्यू: २० ऑगस्ट १९८५ )**१९३१: दिगंबर तुकारामजी होले -- लेखक, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक**१९२०: आयझॅक असिमॉव्ह – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक (मृत्यू: ६ एप्रिल १९९२ )**१९०१: महादेव मल्हार जोशी -- संस्कृत भाषेचे व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक (मृत्यू: १९७८ )**१८९२: गणेश पांडुरंग परांजपे -- वैद्यकशास्त्र विषयक ग्रंथाचे कर्ते (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९७३ )**१८८६: बाळकृष्ण वामन सावर्डेकर -- लेखक (मृत्यू: १४ जानेवारी १९४६ )**१८७६: भा. वा. भट -- इतिहास अभ्यासक (मृत्यु: २७ डिसेंबर १९५२ )* 🏵️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: प्रा. डॉ. भालचंद्र रामचंद्र अंधारे -- प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ, संस्थापक संचालक इतिहास संशोधन केंद्र नागपूर, विदर्भ संशोधन महर्षी, जीवन साधना, विदर्भ भूषण पुरस्कारांनी सन्मानित (जन्म: ७ सप्टेंबर १९३५ )**२०१६: अर्धेन्दु भूषण वर्धन -- भारतीय कम्युनिस्ट नेते, स्वतंत्र सेनानी (जन्म: २४ सप्टेंबर १९२४ )**२०१५: वसंत रणछोड गोवारीकर -- आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ (जन्म: २५ मार्च १९३३ )**२०१३: डाॅ. विनय वाईकर -- गझल या विषयावर अनेक पुस्तके लिहिणारे लेखक ,भूलतज्ज्ञ (जन्म: १९४१ )**२००२: अनिल अग्रवाल – पर्यावरणवादी (जन्म: १९४७ )**१९९९: विमला फारुकी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या* *१९८९: सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक,कवि आणि गीतकार (जन्म: १२ एप्रिल १९५४ )**१९८७: हरे कृष्ण महाताब -- भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते,ओडिशाचे माजी मुख्यमंत्री (जन्म: २१ नोव्हेंबर १८९९ )**१९४४: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक (जन्म: २३ एप्रिल १८७३ )**१९३५: मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक,टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते,वकील (जन्म: १९ ऑगस्ट १८८६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बावनकशी : सावित्रीबाई फुले*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी अन् सुरक्षेसाठी राबवणार तंत्रज्ञान; मंत्रालयाच्या सर्व प्रवेशद्वारावरती बसवणार यंत्रणा; सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एसटी महामंडळासाठी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजनेला 2025-26 पर्यंत चालू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गडचिरोलीला "स्टील सिटी ऑफ इंडिया" करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *येत्या काळात महाराष्ट्रातून माओवाद हद्दपार झालेला असेल, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास, 11 माओवाद्यांचं आत्मसमर्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सरकारकडून वीजबील थकवलेल्यांना पुन्हा अभय; घरगुती-व्यवसायिक ग्राहकांना 31 मार्चपर्यंत मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *जसप्रीत बुमराहचा सन्मान, 2024 च्या ऑस्ट्रेलियनं XI च्या कॅप्टनपदी निवड, दमदार कामगिरीची अनोखी दखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मोगरे शंकर👤 शहाजी पालवे👤 कविता जोशी, नांदेड👤 म. विखार👤 साईनाथ ईबीतवार👤 संदीप ढाकणे, शिक्षक, छ. संभाजीनगर👤 श्रीकांत काटलेवार👤 संजय फडसे👤 नरसिंग पेंटम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आरती प्रभु - चिंतामण त्र्यंबक खानोलकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कष्ट आणि प्रयत्नाशिवाय यश कधीच मिळत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद - २०२४ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले ?२) नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवैतच्या कोणत्या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले ?३) PKL इतिहासात १८०० रेड पॉइंट बनवणारा एकमेव खेळाडू कोण ?४) 'व्यथा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) कुवैतचा सर्वोच्च सन्मान कोणता ? *उत्तरे :-* १) कोनेरू हम्पी, भारत २) द ऑर्डर ऑफ मुबारक अल - कबीर ३) परदीप नरवाल ४) दुःख ५) द ऑर्डर ऑफ मुबारक अल - कबीर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आजारानंतर केस का गळतात ?* 📙 """""""""""""""""""""""""""""""""""""""""""केस निरोगी, चमकदार, दाट असण्यासाठी त्यांचे पोषण होणे आवश्यक असते. हे पोषण आहारातील स्निग्धांश, प्रथिने याद्वारे होत असते. प्रथिनांचा उपयोग केसातील केरॅटिन, मेलानिन या प्रथिनांची झालेली झीज भरून काढण्यासाठी होतो. जीवनसत्त्व अ, ई, प्रथिने, स्निग्धांश यामुळे तेथील त्वचेचे पोषण होऊन मुळे मजबूत राहण्यास मदत होते.तसे दररोजच आपले केस थोड्या प्रमाणात गळत असतात. ते नैसर्गिक असते ; परंतु समतोल आहार न घेतल्यास, त्वचेचे काही आजार झाल्यास, केसात कोंडा झाल्यास, विंचरताना ओढाताण झाल्यास केस गळतात. वर सांगितल्याप्रमाणे आजारानंतर केस गळण्याचे कारण पोषण न होणे हे असते. आजारात आहार योग्य प्रकारे घेतला जात नाही. त्यासोबतच आजाराच्या प्रतिकारासाठी शरीरातील पोषक घटक वापरले जाऊन त्याची कमतरता निर्माण होऊन केसांचे पोषणही खालावते व त्यांची मुळे सैल होऊन ते गळावयास लागतात. लहान मुलांमध्ये प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या क्वाशिअोरकाॅर या आजारात केस भुरकट होतात आणि थोडे वाढले तरी पटकन उपटले जातात.*डॉ. जगन्नाथ दीक्षित**डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कीटकीतें भयें स्वयें भृंगी ध्यातां । तैसा तूं अनंता करी आतां ॥१॥ भजनें पाठविलें श्रीहरिरूपासी । नेतो वैकुंठासी नारायण ॥२॥ नाम नारायण अंतीं उद्धारक । नामा म्हणे देख भाक माझी ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••साहित्य कोणत्याही प्रकारचे असोत वरवर वाचून काढल्याने त्याचा खरा अर्थ कळत नाही. तसंच एखाद्याच्या जीवनातील व्यथा, वेदना, दु:ख,अडचणी आपुलकीने जाणून घेतल्याशिवाय तेही पूर्णपणे कळत नाही म्हणून कोणाला उगाचच नाव ठेवण्याऐवजी त्यांना समजून घेणे आवश्यक आहे. या प्रकारे समजून घेतल्याने त्यांच्या व्यथा, वेदना,अडचणी आपल्या होऊन जातात. आणि हेच एकदा आपले झाले की, त्यातून अनेक मार्ग निघत असतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खरं सत्य*एका साधूला पितळेच्या धातूचे सोन्यात रूपांतर करण्याची कला अवगत होती. पण याचा उपयोग तो गरजुंना करण्यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्याच्याकडे आला. त्याला मुलीच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता होती. साधूने त्याची अडचण ओळखून त्याला एका पितळेच्या भांड्याचे रूपांतर सोन्यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्याच्याकडे सोन्याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्याची चौकशी केली केली तेव्हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्या मनात लोभाची भावना उत्पन्न झाली. त्याने साधूला ती विद्या शिकविण्याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15 दिवसांची मुदत दिली अन्यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्याच्याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्या येथे राहून त्याची सेवा करू लागला. साधूने राजाच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याला पितळापासून सोने तयार करण्याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्या दिवशी साधूला बोलावून त्याला विद्या शिकविण्याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्हा राजा गर्वाने म्हणाला," साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे." साधू म्हणाला, "महाराज तुम्ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते." *तात्पर्य :- ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नव्हे*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)