✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 सप्टेंबर 2023💠 वार - मंगळवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_भारतीय शिक्षक दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २४८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••*२००५:इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे ’फ्लाईट ०९१’ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.**२०००:ज्येष्ठ दिग्दर्शक हृषीकेश मुकर्जी यांना ’दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर**१९६७:ह.वि.पाटसकर पुणे विद्यापीठाचे सातवे कुलगुरू झाले.**१९४१:इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.**१९३२:फ्रेन्च अपर व्होल्टा या प्रांताचे विभाजन करुन आयव्हरी कोस्ट, फ्रेन्च सुदान आणि नायगर असे देश निर्माण करण्यात आले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७७:डॉ.रामकिशन दहिफळे-- लेखक, संपादक* *१९७३:प्रमोद बाबुराव चोबीतकर-- लेखक**१९६९:धोंडोपंत शंकरराव मानवतकर--कवी लेखक**१९६७:कविता महाजन-- मराठी लेखिका, कवयित्री (मृत्यू:२७ सप्टेंबर २०१८)**१९६४:ग्यानचंद ताराचंद जांभुळकर- लेखक**१९६३:सुनंदन लेले-- क्रिकेटर ते पत्रकार अशी ओळख असलेले सुप्रसिद्ध क्रीडा समीक्षक**१९५५:स्मिता तळवलकर-- मराठी चित्रपट,नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री, निर्मात्या आणि दिग्दर्शक(मृत्यू:६ ऑगस्ट २०१४)**१९५५:पुष्पा देवीदास कांबळे-- कवयित्री* *१९५४: लक्ष्मीकांत देशमुख-- भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी,सुप्रसिद्ध साहित्यिक व बडोदा येथील ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९५२:विधू विनोद चोप्रा-- लेखक,निर्माता, दिग्दर्शक,संपादक,गीतकार,अभिनेता**१९४७:महादेव श्रीराम इलामे -- लेखक व कवी* *१९४४:देविदास श्रीगिरीवार -- निवृत्त शिक्षण सहसंचालक तथा लेखक* *१९४२:डॉ.पं.केशव गिंडे--भारतीय शास्त्रीय बासरीवादक**१९३०:अण्णा शिरगावकर -- लेखक व नामवंत इतिहास संशोधक(मृत्यू:११ ऑक्टोबर २०२२)**१९२८:दमयंती जोशी – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना (मृत्यू:१९ सप्टेंबर २००४)**१९२०:लीला पोतदार तथा लीलावती भागवत – बालसाहित्यिका.ओघवती भाषा, चित्रमय वर्णन व बोलकी संवादशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये...(मृत्यू:२५ नोव्हेंबर २०१३)**१९०७:जयंत पांडुरंग तथा ’जे.पी.’नाईक – शिक्षणतज्ञ, ’इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन’चे संस्थापक,’नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’चे संस्थापक,(मृत्यू: ३० ऑगस्ट १९८१)**१९०४: भालचंद्र पंढरीनाथ बहिरट-- संत साहित्याचे अभ्यासक,तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ(मृत्यू:१४ आक्टोबर १९९८)**१८९५:अनंत काकबा प्रियोळकर – भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक (मृत्यू:१३ एप्रिल १९७३)**_१८८८:डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन – भारताचे दुसरे राष्ट्रपती,पहिले उपराष्ट्रपती आणि तत्त्वज्ञ, त्यांच्या गौरवार्थ त्यांचा जन्मदिन हा भारतात ’शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो.(मृत्यू:१७ एप्रिल १९७५)_**१८७७: कृष्णाजी पांडुरंग लिमये-- जुन्या पंडिती वळणाचे कवी (मृत्यू:१ नोव्हेंबर १९२२)**१८७२:त्रिंबक नारायण आत्रे-- महाराष्ट्रातील ग्रामीण समाजाचे व मागासलेल्या जातिसंस्थांचे अभ्यासक तसेच ग्रामव्यवस्था व गुन्हेगारी जगत या विषयांचे तज्ज्ञ लेखक(मृत्यू :फेब्रुवारी १९३३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१९:किरण नगरकर-- मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिणारे आधुनिक लेखक,नाटककार, समीक्षक(जन्म:२ एप्रिल १९४२)* *२०००:रॉय फ्रेड्रिक्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (जन्म:११ नोव्हेंबर १९४२)**१९९७:मदर तेरेसा – भारतरत्‍न व नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका (जन्म:२६ ऑगस्ट १९१०)**१९९५:सलील चौधरी-- हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध संगीतकार(जन्म:१९ नोव्हेंबर १९२३)**१९९२:अतूर संगतानी – उद्योगपती व दानशूर व्यक्ति* *१९९१:शरद जोशी – हिन्दी कवी, लेखक व उपहासकार (जन्म:२१ मे १९३१)**१९७८:रघुनाथ रामचंद्र तथा रॉय किणीकर – कवी,संवादलेखक, नाटककार व पत्रकार. (जन्म:१ जानेवारी १९०८)**१९१८:सर रतनजी जमसेटजी टाटा – टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति (जन्म:२० जानेवारी १८७१)**१९०६:लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:२० फेब्रुवारी १८४४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिक्षक दिनानिमित्त कविताओळखलंत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी.. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून , गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून... माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत राहिली, मोक्ल्याहती जाईल कशी बायको मात्र वाचली ... भिंत खचली चूल विझली होते नवते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले... कार्भारीनीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे... खिशाकडे हात जाताच हासत हासत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा  वाटला... मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा.. - कुसुमाग्रजसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात 5 सप्टेंबरनंतर पुन्हा मान्सून सक्रिय होणार; भारतीय हवामान विभागाचा दिलासादायक अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *चांद्रयान-3 चं मोठं यश, इस्रो आता चंद्रावर माणूसही पाठवण्यास सक्षम; विक्रम लँडरचा प्रयोग यशस्वी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जालन्यातील लाठीमारप्रकरणी फडणवीसांनी मागितली माफी तर राज्य सरकार मराठा समाजाच्या पाठीशी, शिंदेंची ग्वाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *"काहीही झालं तरी खचणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही"; पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा पोहचली कोपरगावमध्ये*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारतात घुसखोरी करुन 50 हून बांगलादेशींना घुसखोरीसाठी मदत, बनावट दस्तऐवजांचा वापर; नागपुरातून एका मास्टरमाइंडला एटीएसकडून अटक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याने मुलगा जखमी; भंडारा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषक 2023 - नेपाळचे भारतासमोर 231 धावाचे लक्ष्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *ठाणे* महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचे पूर्वीचे नाव श्रीस्थानक होते. सागरी, डोंगरी आणि नागरी अशी वैशिष्टयपूर्ण रचना ठाणे जिल्ह्याला लाभलेली आहे. सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. सर्वाधिक धरणं असल्यामुळे पाणी पिकवणारा जिल्हा अशी ठाणे जिल्ह्याची ओळख आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुक्या प्राण्यावर सदैव प्रेम करा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *"शिक्षक दिवस"* केव्हा साजरा केला जातो ?२) जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेला वयाने सर्वात लहान खेळाडू कोण ?३) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे ?४) जगातील सर्वात जुने शहर कोणते ?५) सफरचंदात कोणते आम्ल आढळते ?*उत्तरे :-* १) ५ सप्टेंबर २) प्रज्ञानंद ( १८ वर्ष ), भारत ३) आर्द्र प्रदेशांचे संवर्धन ४) वाराणसी, भारत ५) Malic acid*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 राजकुमार काळे, सहशिक्षक, बिलोली👤 रत्नाकर चिखले, मुंबई👤 धोंडोपंत मानवतकर, औरंगाबाद👤 लक्ष्मीनारायण येरकलवार, सहशिक्षक, चंद्रपूर👤 नितीन शिंदे, सहशिक्षक, पुणे👤 नरेश रेड्डी, धर्माबाद👤 सौरभ सावंत, नांदेड👤 बालाजी आरेवार, येवती👤 गंगाधर मरकंटवाड, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नको दैन्यवाणें जिणे भक्तिऊणे। अती मुर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे॥ धरीं रे मना आदरें प्रीति रामी। नको वासना हेमधामीं विरामीं॥६५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाजात अशा अनेक प्रकारच्या गोष्टी, आचार, विचार आजही रूढ झाल्या दिसतात.जसे की, एखाद्याची निंदा करणे, वारंवार अपमान करणे, कुणाची निंदा करू नये,असे असतानाही अनेक जण सतत निंदा करत असतात.मात्र ह्याच निंदेमुळे स्वतःचा विकास होत नाही मात्र,अनेकांना त्यातून नवी वाट सापडत असते.असा त्यांचा समज होऊन जातो. जर...दुसऱ्यांचा विचार करणे योग्यच आहे. मात्र तो, सकारात्मक असावा. आपण आपल्यात त्याच प्रकारचे बदल घडवून आणायला पाहिजेत. पण, व्यर्थ गोष्टींच्या आधाराने नाही तर. ..माणुसकीच्या नात्याने केलेले नि:स्वार्थ भावनेचे कार्य असावेत‌ ते,कधीही मिटत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सिंहाचे आसन*सिंह हा जंगलाचा राजा आहे. तो सगळ्यांना घाबरवून त्याच्या जंगलात राहतो. सिंह उग्र आणि बलवान आहे . एके दिवशी नगरचा राजा जंगलात फिरायला गेला. सिंहाने पाहिले की राजा हत्तीवर बसला आहे . सिंहाच्या मनातही हत्तीवर बसण्याचा मार्ग सुचवा. सिंहाने जंगलातील सर्व प्राण्यांना सांगितले आणि हत्तीवर बसण्याची आज्ञा दिली. बस काय, मला पटकन आराम मिळाला. सिंह उडी मारून हत्तीच्या आसनावर बसला. हत्ती पुढे सरकताच आसन हलतो आणि सिंह जोरात खाली पडतो. सिंहाचा पाय मोडला, सिंह उभा राहिला आणि म्हणाला – ‘चालणे चांगले. ,नैतिक शिक्षण –सिंहाने त्या माणसाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला ज्याचे काम त्याला अनुकूल होते आणि त्याचा परिणाम चुकीचा ठरला.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment