जीवन विचार

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

   *🌺 जीवन विचार* 🌺
〰〰〰〰〰〰〰
*शिक्षणाचा उदात्त हेतू केवळ ज्ञान अपेक्षित करणे नसून तर त्या ज्ञानाचे कृतीत रुपांतर करणे हे आहे.खरी गुरुभक्ती ही ज्ञानभक्तीच असते. कारण शिष्याला जोपर्यंत ज्ञानाची तहान असते  तोपर्यंत या जगात गुरूभक्ती चाललेलीच असते.ज्ञान हे आपल्या मानवी जीवनाचे सार आहे असे म्हणायला काही हरकत नाही.*

   *आपलं जीवन सुंदर करणं, निष्काम करण ही तर फार मोठी विद्या आहे.जीवनातील ही विद्या आपण सद्गुरुकडून प्राप्त करून घेतो. सद्गुरु आपणांस नव वैचारिकता , सर्जनशीलता  यांना जन्म देतो.असे हे ज्ञान  आपण ज्यांच्याकडून प्राप्त करून घेतो त्यांस आपला गुरू मानावे.*

 *गुरु म्हणजे अनंत ज्ञानाची तळमळ असते.सत्याचा प्रयोगाची उत्कटता असते.गुरू हा आपल्या जीवनरुपी बागेचा माळी आहे.आणि आपल्या ज्ञानमृताने तो ती बाग फुलवीत असतो.अशा सर्व ज्ञानरुपी गुरुस शतशः वंदन*🙏👏
〰〰〰〰〰〰〰
*🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼*

1 comment: