जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

   *🌺 जीवन विचार* 🌺
〰〰〰〰〰〰〰
*ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे, त्याचा भविष्यकाळ उत्तम आहे.माणूस आयुष्यात प्रगतीसाठी अनेक कामे करत असतो. त्यासाठी प्रचंड मेहनत घेतो. कष्ट सहन करतो. अनेक प्रसंगांना त्याला सामोरं जावं लागतं. हे सर्व करत असताना प्रतिकूल परिस्थितीच्या माराणं जो खचत नाही, माघार घेत नाही, तोच जीवनात यशस्वी होतो. जे या परिस्थितीच्या बसणाऱ्या घावांना घाबरतात, मनानं खचून जातात, ते मात्र अपयशी होतात. त्यांची अवस्था घडवलेल्या आणि हिऱ्या सारख्या दिसणाऱ्या चमकत्या काचेच्या थोड्या-थोड्या आघाताने तडकणाऱ्या, चुरा होणाऱ्या कच्या वस्तुप्रमाणे होते.*

*जेवढा संघर्ष बिकट , तेवढेच यश अधिक उज्वल.म्हणून जेवढं तुम्ही सहन कराल, तेवढं तुम्ही यशस्वी व्हाल.*
〰〰〰〰〰〰〰

No comments:

Post a Comment