✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 सप्टेंबर 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/JZnHrQxtrJvasnTQ/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟫 *_ या वर्षातील २६२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟫 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*२००९: टेलिव्हिजनवर सलग ७२ वर्षे आणि त्याआधी रेडिओवर सलग १५ वर्षे सुरू असलेल्या ’द गायडिंग लाईट’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला.**२००२: चित्रपट क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केलेले दिग्दर्शक हृषिकेश मुकर्जी यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्‍च पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.**१९९९: साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर**१९९७: महाराष्ट्र सरकारने कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली.**१९६२: बुरुंडी, जमैका, र्‌वांडा आणि त्रिनीदाद व टोबॅगो यांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश**१९४८: निझामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ’ऑपरेशन पोलो’ स्थगित करण्यात आले.**१९४७: अमेरिकन गुप्तचर संघटना सी.आय. ए.(CIA) ची स्थापना.**१९२७: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना**१९२४: गांधीजींनी हिदू मुस्लीम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.**१९१९: हॉलंडमधे स्त्रियांना मतदानाचा हक्‍क मिळाला.**१८८५: कॅनडातील माँट्रिअल शहरात कांजिण्यांची लस घेणे सक्तीचे केल्याने शहरात दंगली उसळल्या**१८१०: चिलीला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.* 🟫 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 🟫 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: सचिन रामचंद्र मस्कर -- कवी**१९८५: मयुर मधुकर जोशी -- कवी, लेखक**१९८०: किरण केन्द्रे -- किशोर मासिकाचे कार्यकारी संपादक ( बालभारती )तथा प्रसिद्ध लेखक**१९७९: मनीषा रायजादे पाटील -- कवयित्री**१९७३: सोनाली लोहार -- लेखिका**१९६५: शुचिता नांदापूरकर-फडके -- लेखिका, अनुवादक**१९५६: छगन चौगुले -- मराठी लोकगीत गायक(मृत्यू: २१ मे २०२० )* *१९५३: डॉ.जयश्री रत्नाकर पाटणकर -- कवयित्री, लेखिका* *१९५०: शबाना आझमी -- प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री* *१९५०: रामचंद्र सडेकर -- मराठी कथालेखक, कादंबरीकार,पटकथा लेखक आणि प्रकाशक**१९४८: अनुराधा महादेव फाटक -- बाल साहित्यावर लेखन करणाऱ्या लेखिका**१९४७: सुधाकर गायधनी -- मराठी साहित्यातील प्रसिद्ध महाकवी, लेखक**१९४५: अशोक मनोहर भोले -- लेखक, कवी* *१९२०: भीमराव लक्ष्मीकांत परतूरकर -- जेष्ठ इतिहास संशोधक (मृत्यू: ५ जानेवारी १९६८ )* *१९१६: वसंतराव बलवंत अरगडे-- शैक्षणिक आणि धार्मिक पुस्तके लिहिणारे लेखक तथा पूर्व उपशिक्षणाधिकारी**१९१२: गजानन हरी तथा राजा नेने – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७५ )**१९०६: प्रभूलाल गर्ग ऊर्फ 'काका हाथरसी' – हिन्दी हास्यकवी, पद्मश्री (१९८५). ते विडंबन काव्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांची सुमारे दीडशे पुस्तके प्रसिद्ध झाली.(मृत्यू: १८ सप्टेंबर १९९५ )**१९०५: ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ’ग्रेटा गार्बो’ – हॉलिवूड अभिनेत्री (मृत्यू: १५ एप्रिल १९९० )**१९०२: सदाशिव विनायक देशपांडे -- चरित्रकार प्रवचनकार (मृत्यू: ५ मे१९६९ )**१९०२: दत्त रघुनाथ कवठेकर -- कथाकार कादंबरीकार (मृत्यू: १६ ऑगस्ट १९७९ )**१९००: शिवसागर रामगुलाम – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री (मृत्यू: १५ डिसेंबर १९८५ )**१८८३:मदनलाल धिंग्रा-- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक(मृत्यू:१७ ऑगस्ट १९०९)**१८५१: डाॅ. विष्णू गोपाळ आपटे -- वैद्यकीय विषयावर लिखाण करणारे मराठी लेखक (मृत्यू: २९ जुलै, १८९९ )**१७०९: सॅम्युअल जॉन्सन – ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत (मृत्यू: १३ डिसेंबर १७८४ )*    🟫 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* 🟫••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: विद्याधर विष्णू चिपळूणकर-- महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक,जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत(जन्म :१३ एप्रिल १९२९ )* *२००४: डॉ.भालचंद्र दिनकर फडके – दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक (जन्म: १३ मे १९२५ )**२००२: शिवाजी सावंत – साहित्यिक. त्यांची 'मृत्यूंजय’ ही कादंबरी इंग्रजी, कन्नड, गुजराती, मल्याळी इ. भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीला महाराष्ट्र, गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यशासनांचे पुरस्कार (जन्म: ३१ ऑगस्ट १९४० )**१९९९: अरुण वासुदेव कर्नाटकी – मराठी चित्रपट दिग्दर्शक(जन्म: ४ ऑक्टोबर, १९३३ )**१९९५: प्रभूलाल गर्ग ऊर्फ 'काका हाथरसी' – हिन्दी हास्यकवी, पद्मश्री (१९८५). ते विडंबनकाव्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांची सुमारे दीडशे पुस्तके प्रसिद्ध झाली. (जन्म: १८ सप्टेंबर १९०६ )**१९९३: असित सेन – विनोदी अभिनेते व दिग्दर्शक, त्यांनी सुमारे ५०० चित्रपटांतून भूमिका केल्या**१९९२: मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती (२० ऑगस्ट १९७९ - २० ऑगस्ट १९८४) आणि ११ वे सरन्यायाधीश (२५ फेब्रुवारी १९६८ - १६ डिसेंबर १९७० ) (जन्म: १७ डिसेंबर १९०५ )**१७८३: लिओनार्ड ऑयलर – स्विस गणितज्ञ (जन्म: १५ एप्रिल १७०७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*यंदा कर्तव्य आहे*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिल्ली सरकारमधील अनेक विभाग सांभाळणारे आतिशी मार्लेना सिंग आता केंद्रशासित प्रदेश आणि राष्ट्रीय राजधानी दिल्लीचे नव्या मुख्यमंत्री होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सलग दुसऱ्यांदा विदर्भ दौरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अमित शहा यांच्याकडून मोदी सरकारचे 100 दिवसाचे रिपोर्ट कार्ड सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; भाजपची साथ सोडणाऱ्या मेहुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मनोज पाटील जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषणाला केली सुरुवात; आरक्षण न दिल्यास गुडघे टेकायला लावू, सरकारला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ई-पीक नोंदणीसाठी दोन दिवस विशेष मोहीम, हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या सूचना, गावस्तरावर युवकांची मदत घेणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशियाई चॅम्पियन्स ट्रॉपीच्या अंतिम सामन्यात भारताने चीनचा पराभव करत पाचव्यांदा विजेतेपद पटकावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦙 शेळ्या 🦙 सर्वत्र दिसणारा, अत्यंत गरीब, एकटा तसेच कळपाने राहू शकणारा, पाळीव तसेच जंगली, घरगुती किंवा मोकाट, भटक्या अशा अवस्थेत राहणारा प्राणी आठवतोय ? हा प्राणी म्हटले, तर उपयुक्त आहे; म्हटले तर त्रासदायक. गरम हवेत किंवा गार प्रदेशात सारख्याच सहजतेने टिकणारा, कुरणात वा डोंगरात कुठेही पोट भरू शकणारा तो प्राणी म्हणजे शेळी.शेळी इतकी सहजपणे अनेक वेळा दिसते, पण तिच्याबद्दल माहिती मात्र फारशी नसते. एखाद्या अगम्य डोंगरकपारींमध्ये सहजपणे शेळी चरु शकते. तेथील उतारावरचे कोवळे खुरटे गवत खाण्याचे धाडस अगदी सहजपणे फक्त तीच करू जाणे. साऱ्या माळरानावरचे गावात संपले, तर बाभळीच्या झाडांवर, खुरट्या काटेरी झुडपांवर ती सहज चढेल. फांदीफांदीवरचा पाला अलगद खाऊन वेळप्रसंगी धडपडत उडी मारून खाली उतरेल, अंग झटकून दुसरीकडे चालू लागेल. खाण्यासाठी गवत शेळीला आवडतेच. पण कोवळा असा जवळपास कोणताही पाला तिला आवडतो. शेळी खात नाही, असा पाला अक्षरश: शोधावा लागतो. याच तिच्या सवयीने शेळी त्रासदायक ठरते. एखादा कळप जेव्हा एखाद्या भागात चरतो, तेव्हा वाढीला लागलेली सर्व प्रकारची झुडपे बघता बघता नष्ट होत जातात. शेळी पाळीव प्राणी आहे. शहरात वा गावात निर्माण होणारा सर्व प्रकारचा घरगुती ओला टाकाऊ कचरा शेळी आवडीने खाते. याचा मोठा फायदा म्हणजे अनेक गोरगरीब शेळ्या पाळतात. खायला फार घालावे लागत नाही, खायला नाही घातले, तरी ती तक्रार करत नाही. कुठेही हिंडली, तरी संध्याकाळी पुन्हा दारात शेळी उगवतेच. त्या वेळेला मिळणारे भांडे, दोन भांडे दूध लहान मुलांना प्यायलाही देता येते. शेळीच्या जमणाऱ्या लेंड्या साठवून ठेवून त्या खत म्हणूनही विकल्या जातात. शहरी झोपडपट्टी असो वा खेड्यातले एखादे खोपटे, अगदी लहान जागेतही एखादी शेळी अनेक ठिकाणी दिसते, ती यामुळेच.शेळीला वर्षात दोन वेळा करडी म्हणजे पिल्ले होतात. ही पिल्लेसुद्धा बघता बघता आईपासून सुटी होतात, मोठी होतात. एका शेळीपासून पाच वर्षात सहज तीस ते पस्तीस शेळय़ांचा कळप तयार होऊ शकतो. सांगितले तर विश्वास बसणार नाही, अशी ही सहज वाढ असल्याने शेळी पाळणार्‍याला नवीन करडे विकूनही पैसे मिळत असतात. शेळ्यांचे मांस मुख्यतः आशिया खंडात आवडीने खाल्ले जाते.शेळ्या जशा सरसकट आढळतात, तसा बोकड मात्र सरसकट दिसत नाही. आपल्याच मस्तीत ढुशा देत हिंडणारा बोकड तसा वजनदार, ताकदवान असतो. बोकडाच्या शिंगांची लांबीही वयानुसार वाढत जाते. त्याची एखादी धडक माणसाला सहज पाडू शकेल, एवढी जोरात असते. कळप जेव्हा मोकळा चरत असतो, तेव्हा एखादा बोकड त्यात असतोच. पाळीव शेळ्यांच्या जोडीला बोकडांची संख्या मात्र फारच अल्प आढळते. एखाद्या खास प्रसंगी बोकड मारला जातो व त्याचे मांस खातात. त्याच्या अंगाला एक उग्र दुर्गंधी येत असते. त्यामुळे बांधलेला बोकडही वस्तीपासून बराच लांब ठेवला जातो.पंधरा वीस वर्षांचे आयुष्य असलेली शेळी कुठल्याही अडचणीच्या जागी जाऊ शकते वा झाडावर चढू शकते, याचे कारण म्हणजे तिच्या खुरांची रचना. खुरांचा पुढचा अर्धा गोल कडक, पण एखाद्या खोबणीची पकड घेईल, असा असतो, तर मागचा भाग मऊ रुतणारा असतो. त्याचाच उपयोग शेळीला पकड मिळवण्यास करता येतो.शेळी ज्या भागात वावरत असेल, तेथील हवामानाप्रमाणे तिचे केस कमी जास्त होतात. थंडीत लव वाढते. शेळीचे रंगही तपकिरी, करडे, काळे, मातकट असे मिश्र असतात. डोळ्यांचे पण अनेक रंग आढळतात. गावठी खुरटी शेळी पस्तीस चाळीस किलो वजनाची भरते, तर पोसलेला उत्तम बोकड अनेकदा दोनशे किलोपर्यंतही असू शकतो. कुरणात चरणारी तगडी शेळी ऐंशी किलो वजनाची असू शकते. शेळीची कातडी वापरून आपल्या वापरातील पाकिटे, पर्सेस, पाऊच इत्यादी गोष्टी बनवल्या जातात. मऊ कातडे टिकाऊ व वापरायलाही सोयीचे असते. दुकानात गेल्यावर शमाय लेदरचे पाकीट मागितले जाते ना ते हेच.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*B. H. M. S. - Bachelor of Homeopathic Medicine and Surgery*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सेवा ही हृदय व आत्मा पवित्र करते, सेवेने ज्ञान प्राप्त होते आणि सेवा हेच जीवनाचे लक्ष्य आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोणत्या ठिकाणावरून मतदान करणार आहे ?२) 'सायन्स डायरेक्ट'च्या अहवालानुसार जगातील किती टक्के लोक आजारी आहेत ?३) टायटॅनिक जहाज समुद्रात कोणत्या साली बुडाली ?४) 'प्रकाश' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) बॉडीगार्डला सर्वात जास्त मानधन ( २.७ कोटी ) देणारा बॉलीवूडचा पहिला अभिनेता कोण बनला आहे ? *उत्तरे :-* १) अंतराळ २) ९५ टक्के ३) सन १९१२ ४) उजेड, तेज ५) शाहरूख खान *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*      👤 किरण इंदू केंद्रे, संपादक, किशोर मासिक, पुणे👤 देवेंद्र रेड्डी गडमोड, सामाजिक कार्यकर्ते, येताळा👤 सुदर्शन वाघमारे, पत्रकार, धर्माबाद👤 सचिन महाजन, ग्राव्हिटी कोचिंग क्लासेस, नांदेड 👤 योगेश सुधाकर मुक्कावार👤 साईनाथ वाघमारे👤 सुनील पाटील बोमले👤 योगेश शंकरोड👤 रामकृष्ण काकानी *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन । हरिविण सौजन्य नेणें कांहीं ॥१॥ त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळ घडलें तीर्थाटन ॥२॥ मनोमार्गें गेला तो तेथे मुकला । हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥३॥ ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवडि सर्वकाळ ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या आयुष्यात जे काही आपल्यासोबत चांगले, वाईट घडून गेले आहे ते कधीच विसरता येत नाही. उलट त्या प्रसंगाची आठवण काढून आपण सांगत असतो. पण आपल्याच आयुष्यात पुढे काय होणार आहे या विषयी मात्र आपण सांगू शकत नाही हे सुद्धा तेवढेच सत्य आहे. म्हणून जे, काही आपल्यासोबत चांगले, वाईट घडून गेले आहे त्यातूनही शिकण्याचा प्रयत्न करावा. कारण समोर काय होणार आहे या विषयी पूर्णपणे कोणीच सागू शकत नाही म्हणून डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरी मैत्री*अजनारच्या जंगलात सूर सिंह आणि सिंह राज हे दोन पराक्रमी सिंह राहत होते . सूर सिंग आता म्हातारा होत होता. आता तो जास्त शिकार करू शकत नव्हता. सिंहराज त्याची शिकार करून अन्न आणत असे. सिंहराज जेव्हा शिकारीला जायचे तेव्हा सूर सिंग एकाकी व्हायचे. भीतीपोटी एकही प्राणी त्याच्या जवळ जात नव्हता. आज सुरसिंगला एकटा पाहून कोळ्यांचा कळप फुटला. आज कोल्हाला मोठी शिकार मिळाली होती. कोल्हाळांनी सुरसिंगला चारी बाजूंनी ओरबाडून जखमी केले होते. तो बेशुद्ध झाला. तेवढ्यात सिंहराज गर्जना करत तिथे आला. सिंहराजाला तिथे येताना पाहून कोल्हाळांचा जीव गेला. सिंह राजने काही वेळातच सर्व कोल्ह्यांचा पाठलाग केला. त्यामुळे त्याचा मित्र सुरसिंग याचा जीव वाचला.नैतिक – खरी मैत्री नेहमीच उपयोगी असते, जीवनात खरा मित्र असणे आवश्यक आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment