✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 सप्टेंबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2015/10/blog-post_83.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟫 *_ या वर्षातील २५० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟫 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: अमेरिकेतील ’नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस’ या संस्थेतर्फे विख्यात सरोदवादक अमजद अली खाँ यांची ’नॅशनल हेरिटेजफेलोशिप’साठी निवड**१९९३: ज्येष्ठ कवी गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड**१९६८: स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.**१९६६: दक्षिण अफ्रिकेचे पंतप्रधान हेन्ड्रिक व्हरवोअर्ड यांची संसदीय बैठक चालू असतानाच हत्या.**१९६५: पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल अयुब खान यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारले. ’ऑपरेशन ग्रँड स्लॅम’ ही त्यांची दिल्लीपर्यंत धडक मारण्याची योजना होती. पॅटन रणगाडे आणि सेबरजेट विमाने असलेल्या पाकिस्तानच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानवर हल्ला चढवला व पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरूवात झाली.या युद्धात भारताने पाकिस्तानला सपाटून मार दिला.**१९५२: कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केन्द्र माँट्रिअल येथे सुरू झाले.**१९३९: दुसरे महायुद्ध – दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.* 🟫 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟫 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८: सरगुन मेहता -- भारतीय अभिनेत्री**१९८६: पुष्कराज चिरपुटकर -- मराठी अभिनेता* *१९६८: प्रा. डॉ. सुनंदा शेळके -- प्रसिद्ध कवयित्री, गझलकार* *१९६८: पद्माकर दत्तात्रय वाघरुळकर -- लेखक* *१९६८: सईद अन्वर – पाकिस्तानी फलंदाज**१९६५: प्रदीप त्र्यंबकराव चौधरी -- कवी, लेखक* *१९५९: सय्यद जबाब स.रहेमान पटेल -- कवी* *१९५८: श्रीकृष्ण उर्फ आबासाहेब कडू -- प्रसिद्ध कथाकार**१९५४:आतांबर शिरढोणकर (आतांबर बापू सौदंडे) -- प्रसिद्ध लोकशाहीर तथा लेखक**१९५२: दिवाकर केशव म्हात्रे -- प्रसिद्ध लेखक**१९४९: राकेश रोशन -- चित्रपट निर्माता, निर्देशक व अभिनेता**१९४६: डॉ.स्नेहसुधा कुलकर्णी -- ज्येष्ठ लेखिका**१९३७: डॉ. पी. व्ही. काटे -- इतिहास संशोधक**१९३७: वसंत गोविंद पोतदार -- लेखक, कथाकथनकार आणि स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार (मृत्यू: ३० एप्रिल २००३ )**१९३६: डॉ. सुहास बाळ देव -- कवयित्री, लेखिका* *१९३६: प्रा. रामकृष्ण रघुनाथ डिघोळकर-- कवी**१९३२: शकुंतला बाळकृष्ण फाटक -- लेखिका* *१९३१: शांताराम काशिनाथ राऊत -- बोधचिन्ह संकल्पनकार (मृत्यू: १८ ऑक्टोबर २०१५ )**१९२९: यश जोहर – हिन्दी चित्रपट निर्माता (मृत्यू: २६ जून २००४ )**१९१८: जगमोहन सुरसागर -- भारतीय गायक आणि संगीतकार(मृत्यू: ४ सप्टेंबर२००३ )**१९०१: कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार. ’राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या मूकपटात त्यांनी भूमिका केली होती. (मृत्यू: १८ मे १९९७ )**१८८९: बॅ. शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू (मृत्यू: २० फेब्रुवारी १९५० )**१७६६: जॉन डाल्टन – इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २७ जुलै १८४४ )* 🟫 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: मालिनी राजूरकर -- हिदुस्तानी संगीतातील मराठी गायिका (जन्म: ८ जानेवारी १९४१ )**२०२०: बक्षी मोहिंदर सिंग सरना -- व्यावसायिकरित्या एस.मोहिंदर म्हणून ओळखले जाणारे ,भारतीय संगीतकार(जन्म: २४ फेब्रुवारी १९२५ )**२००५: मेजर धनसिंग थापा -- भारतीय लष्करी अधिकारी, परमवीर चक्र सन्मानाने सन्मानित (जन्म: २८ एप्रिल १९२८ )**१९९०: सर लिओनार्ड तथा ’लेन’ हटन – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २३ जून १९१६ )**१९७२: अल्लाउद्दीन खाँ – हिन्दुस्थानी शास्त्रीय संगीतातील महर्षितुल्य कलाकार व संगीतकार,सरोदवादक(जन्म: १८६२ )**१९६३: मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै – कन्‍नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक,त्यांना कन्‍नड,कोंकणी,इंग्लिश,संस्कृत,तेलुगू, तामिळ,मराठी,कन्‍नड,बंगाली,पर्शियन,पाली, ऊर्दू,ग्रीक,जपानी इ. २५ भाषा अस्खलित येत असत. त्यांनी अनेक जपानी ग्रंथांचे कन्‍नडमध्ये भाषांतर केले. (जन्म: २३ मार्च १८८३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्री गणेश चतुर्थी निमित्ताने लेख*आधी वंदू तुज मोरया ....*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देवस्थानांच्या विकासासाठी 275 कोटी मंजूर; बीड, जालना, नागपूर अन् कोल्हापूरमध्ये सुशोभीकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नवी मुंबईतील सर्व शाळांना गौरी-गणपती उत्सवासाठी ( 7 ते 14 सप्टेंबर ) आठ दिवसाची सुट्टी जाहीर, मुंबई पालिकेचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हिंगोली : नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडून पाहणी, नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात 1 लाख 17 कोटींच्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मान्यता, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रीक वाहन निर्मितीत गुंतवणूक; 29 हजार रोजगार निर्मिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईत ८ ते १५ सप्टेंबर दरम्यान साजरा होणार ‘माउंट मेरी फेस्टिव्हल’*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एस. टी. महामंडळाच्या सर्व बसेस मध्ये दिव्यांगांना कायमस्वरूपी आरक्षण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सर्वाधिक टॅक्सपेयरच्या यादीत अभिनेता शाहरुख खान आघाडीवर, 92 कोटी रुपये आयकर भरला, तमिळ अभिनेता विजय 80 कोटी, तर विराट कोहलीकडून 66 कोटीचा कर अदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुळामध्ये अनेक पोषक तत्व असतात. जसे की, आयर्न, फॉस्फोरस, कॅल्शिअम आणि बरेचसे व्हिटॅमिन्स यात असतात. अनेकदा जेवण केल्यानंतर एक तुकडा गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण जेवण केल्यावर गूळ खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतातपचन तंत्र होतं मजबूत -गूळ पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी फार फायदेशीर मानला जातो. रोज जेवण केल्यावर गूळ खाल्ल्याने पचन तंत्र मजबूत होतं. याने गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी अशा समस्या दूर होतात. इम्यूनिटी वाढते -जेवण केल्यावर एक तुकडा गूळ खाल्ल्याने एनर्जी मिळते. तसेच याच्या सेवनाने इम्यूनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. ज्यामुळे अनेक आजार आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो.हाडं होतात मजबूत -जेवण केल्यावर गूळ खाल्ल्याने हाडं मजबूत होतात. गुळामध्ये अनेक पोषक तत्व असतात. जसे की, कॅल्शिअम, फॉस्फोरस जे हाडं मजबूत करण्यास मदत करतात. ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं -ब्लड प्रेशरच्या रूग्णांसाठी गूळ रामबाण उपाय मानला जातो. गुळाच्या सेवनाने हाय ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत मिळते.वजन होईल कमी -गुळाच्या नियमित सेवनाने वजन कमी करण्यास मदत मिळते. जेवण केल्यावर गूळ खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.एनीमियामध्ये फायदेशीर -गुळाच्या नियमित सेवनाने शरीरात रक्ताची कमतरता होत नाही. गुळाचं सेवन एनीमियाच्या रूग्णांसाठी फार फायदेशीर आहे. गुळामध्ये आयर्न आणि फॉस्फोरस असतं ज्यामुळे शरीरात रक्त वाढतं. ज्या लोकांमध्ये रक्त कमी आहेत त्यांनी गुळाचं सेवन करावं.*गुगल वरून संकलन केलेली माहिती आहे.*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*K. Y. C. - Know Your Customer*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीच मिळणार नाही*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सलग दोन पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा *सुमित अंतिल* कितवा भारतीय भालाफेकपटू ठरला आहे ?२) CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारे गोव्यातील पहिले व्यक्ती कोण बनले आहे ?३) 'सत्याचे प्रयोग' या पुस्तकाचे लेखक कोण ?४) 'पशू' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'गंभीरा' हा नृत्यप्रकार कोणत्या राज्यातील आहे ? *उत्तरे :-* १) पहिला २) ख्रिश्चन जोसेफ परेरा ३) महात्मा गांधी ४) प्राणी, जनावर, श्र्वापद ५) पश्चिम बंगाल *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 👤 सुनील ठाणेकर, शिक्षक, देगलूर👤 जयेश वाणी👤 सचिन पाटील👤 आनंद गायकवाड👤 विठ्ठल तुकडेकर👤 अनिल सोनकांबळे👤 विकास डुमणे👤 रितेश पोकलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ॥१॥ नामासी विन्मुख तो नर पापिया । हरिवीण धांवया न पावे कोणी ॥२॥ पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मीक । नामें तीन्ही लोक उद्धरती ॥३॥ ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी व्यसन करत असतील किंवा आळसाला जवळ करत असतील किंवा कोणी चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्यांच्या ह्या वाईट सवयी सोडविण्यासाठी त्यांच्या पाठीमागे हात धुवून लागावे. हे माणूसकीचे लक्षणे आहेत. पण, एखाद्याचे जीवन उद्धस्त करण्यासाठी किंवा त्याला मुद्दाम मागे खिचण्यासाठी किंवा त्याचा अपमान करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे हात धुवून लागू नये. कारण, अशा व्यक्तीच्या पाठीमागे हात धुवून लागण्याचा प्रयत्न केल्यावर क्षणभरासाठी समाधान मिळेल पण, शेवटी आपल्यात असलेल्या काही अनमोल संपत्ती मात्र हळूहळू लोप पावायला सुरूवात होतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*साधू आणि यक्ष*एक साधू तपश्‍चर्येस एका निर्जन स्‍थळी बसले होते. त्‍या ठिकाणी एका यक्षाचे वास्‍तव्‍य होते. या गोष्‍टीची साधूला कल्‍पना नव्‍हती. ते जेव्‍हा तेथे पोहोचले तेव्‍हा निर्जन स्‍थान पाहून त्‍यांनी तेथेच ध्‍यानधारणा सुरु केली. त्‍या वेळी यक्ष तेथे नव्‍हता. रात्री जेव्‍हा यक्ष तेथे आला तेव्‍हा आपल्‍या जागेवर दुस-यास व्‍यक्तीला पाहून त्‍याला राग आला. त्‍याने मोठ्याने आरडाओरड सुरु केली, पण समाधी अवस्‍थेत असलेल्‍या साधूवर त्‍याचा काहीच परिणाम झाला नाही. यक्षाने मग हत्तीचे रूप घेऊन त्‍यांना भीती दाखविण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु ते ध्‍यानस्‍थ असल्‍याने त्‍यांच्‍यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. मग यक्षाने वेगवेगळी रूपे घेऊन साधूला घाबरविण्‍याचा प्रयत्‍न केला. कधी तो वाघ, सिंह, तरस, कोल्‍हा अशा जंगली प्राण्‍यांची रूपे घेतली तरी साधूच्‍या ध्‍यानात काहीच खंड पडेना. शेवटी त्‍याने विषारी सापाचे रूप धारण करून त्‍यांना दंश केला तरीही त्‍यांच्‍यावर याचा काहीच परिणाम दिसेना. इतक्‍या प्रयत्‍नानंतरही साधूवर कोणताही परिणाम न झाल्‍याने यक्ष झालेल्‍या श्रमाने थकून सर्परूपातच विश्रांती घेऊ लागला. थोड्याच वेळात साधूंची समाधी अवस्‍था पूर्ण झाली व ते जागे झाले व त्‍यांची नजर सर्परूपी यक्षावर पडली. त्‍या नजरेत इतके प्रेमभाव भरलेले होते की त्‍या कृपादृष्‍टीने सापाच्‍या अंगातील विष अमृत बनले. यक्ष साधूंना शरण गेला व त्‍याने त्‍यांना आदरपूर्वक वंदन केले. *तात्‍पर्य – एकाग्रता, स्‍नेह आणि प्रेमभावनेने कोणावरही विजय प्राप्त करता येतो.*वर्तमानपत्रातून संग्रहीत•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment