✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 सप्टेंबर 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/bPyz9XZudVeRbD7J/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟦 *_ या वर्षातील २५५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••• 🟦 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟦•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: अमेरिकेत ठिकठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २९९६ लोक ठार झाले. यावेळी अध्यक्ष जॉर्ज बुश यांना तातडीने अज्ञातस्थळी हलवले गेले. अमेरिकेचे जर एखाद्या देशाशी अणूयुद्ध झालेच तर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षिततेसाठी अमेरिकेत ७५ हून अधिक ठिकाणी जमिनीखाली विषेश व्यवस्था तयार ठेवण्यात आलेली आहे. पेंटॅगॉन या अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात सुमारे दहा कोटी डॉलरचे नुकसान झाले.**१९७२: नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित ’तरुण तुर्क, म्हातारे अर्क’ या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला. थिएटरमधील पहिला प्रयोग ५ आक्टोबर १९७२ रोजी मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदिरात झाला.**१९६५: भारत पाक युद्ध - भारतीय सैन्याने लाहोरजवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.**१९६१:’विश्व प्रकृती निधी’ (World Wildlife Fund) ची स्थापना झाली.**१९१९: अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.**१८९३: स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.* 🟦 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟦 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: डॉ. वैभवकुमार भगवानराव शिंदे -- लेखक, गीतकार**१९८०: प्रणाली देशमुख -- कवयित्री, लेखिका**१९७६: मुरली कार्तिक -- भारतीय क्रिकेट समालोचक आणि माजी क्रिकेटपटू**१९७५: गोपाल शिरपूरकर -- कवी, लेखक**१९७२: अपर्णा केळकर -- गायिका**१९६३: निलिमा क्षत्रिय -- लेखिका**१९६२:प्रा. डॉ. विद्यागौरी टिळक-- लेखिका**१९६१: राजेंद्र शहा -- गझलकार* *१९५९: प्रा. उत्तम हरिभाऊ बलखंडे -- कवी, लेखक**१९५७: राजू खेर -- भारतीय अभिनेता* *१९५३:श्यामलता काकडे-- अनुवादक**१९५०: डॉ. मोहन मधुकर भागवत -- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक**१९३५: रघुनाथ जगन्नाथ तावरे -- कवी* *१९३१: माधव नारायण आचार्य --मराठी लेखक(मृत्यू: २७ जून २०१४ )* *१९१७: फर्डिनांड मार्कोस – फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २८ सप्टेंबर १९८९ )**१९१५: पुपुल जयकर – सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या (मृत्यू: २९ मार्च १९९७ )**१९१४: प्रा. मधुकर विठ्ठल फाटक -- लेखक* *१९१३: वामन गणेश तळवलकर-- लेखक, संपादक* *१९१२: अप्पासाहेब बाळासाहेब पंत -- लेखक आणि स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ५ऑक्टोबर१९९२ )**१९११: गोपाळ दामोदर देऊसकर -- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९४ )**१९११: अपर्णा सदाशिव देशपांडे -- कवयित्री, लेखिका* *१९११: नानिक अमरनाथ भारद्वाज ( लाला अमरनाथ) -- भारतीय क्रिकेट खेळाडू भारतीय क्रिकेट संघाकडून शतक ठोकणारे ते पहिले फलंदाज (मृत्यू: ५ ऑगस्ट २००० )**१९०१: बाळकृष्ण रघुनाथ देवधर-- भारतीय शास्त्रीय गायक,संगीततज्ज्ञ, संपादक, चरित्रकार (मृत्यू: १० मार्च १९९० )**१९०१: आत्माराम रावजी देशपांडे तथा 'कवी अनिल’ – सुप्रसिद्ध कवी साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, साहित्य संमेलनाचे व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष,(मृत्यू: ८ मे १९८२ )**१८९५: आचार्य विनोबा भावे – भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य, भारतरत्‍न -१९८३ मरणोत्तर,१९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या केलेल्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली.भूदान यज्ञात विनोबांनी देशभर पदयात्रा केली.(मृत्यू: १५ नोव्हेंबर १९८२ )**१८८५: डी. एच. लॉरेन्स – इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार (मृत्यू: २ मार्च १९३० )**१८७९: नरहर शंकर रहाळकर -- मराठी कवी( मृत्यू: ७ डिसेंबर १९५७ )**१८६७: श्रीपाद दामोदर सातवळेकर-- भाष्यकार,संपादक(मृत्यू: ३१ जुलै १९६८ )* 🟦 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟦 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०: माधव कोंडविलकर-- जेष्ठ लेखक, कवी, कादंबरीकार (जन्म: १५ जुलै १९४१ )* *२०१३: मधुबाला जव्हेरी-चावला -- मराठी गायिका(जन्म: १९ मे १९३५ )**१९९८: क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक (जन्म: १० आक्टोबर १९०९ )**१९८७: महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ,प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, ’यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला.(जन्म: २६ मार्च १९०७ )**१९७१: निकिता क्रूश्चेव्ह – सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १५ एप्रिल १८९४ )**१९६४: गजानन माधव मुक्तिबोध – हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७ )**१९४८: बॅ. मुहम्मद अली जिना – पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल(जन्म: २५ डिसेंबर १८७६ )**१९२१: सुब्रम्हण्यम भारती – तामिळ साहित्यिक (जन्म: ११ डिसेंबर १८८२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कोरोना काळात पालक बनले शिक्षक*कोरोना काळातच नाहीतर पालकांनी नेहमीच शिक्षक बनून आपल्या पाल्याकडे लक्ष द्यावे. ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. जयशंकर बर्लिन इथं होणाऱ्या वार्षिक राजदूत परिषदेत सहभागी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *इंजिनिअर रशीद यांना जामीन मंजूर ! जम्मू काश्मीर निवडणूक प्रचारासाठी मैदानात उतरणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *खासगीसह सर्व क्षेत्रातील नोकरदार महिलांना मातृत्व रजेचा अधिकार - उच्च न्यायालय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *काँग्रेसकडून पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला ! नांदेड लोकसभेच्या जागेवर दिवंगत वसंत चव्हाणांच्या चिरंजीवाचीच शिफारस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मोटार वाहन विभागातील कर्मचारी जाणार संपावर, सुधारित आकृतीबंध लागू करण्याची मागणी, 24 सप्टेंबरपासून करणार बेमुदत संप*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकणार ! मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूला मिळणार सर्वाधिक 75 लाखांचे बक्षीस; क्रीडामंत्री मनसुख मालविया यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *थंडीच्या दिवसांत आपण का कुडकुडतो ?* 📕थंडीचे दिवस, सकाळची शाळा, अशावेळेस उठणे जीवावर येते. नाईलाजाने उठून कुडकुडत आपण शाळेत जातो. थंडी असल्यावरच का कुडकुडतो ? उन्हाळ्यात का नाही ?कुडकुडणे ही आपल्या शरीराची थंडीपासून संरक्षण करण्यासाठीची क्रिया आहे. आपण कुडकुडतो म्हणजे आपले स्नायू थरथरत असतात. आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित राखणे आवश्यक असते. फार उष्णता वा फार थंडी यामुळे शरीरातील अवयवांना हानी पोहोचू शकते. यामुळेच बेडकासारखे थंड रक्ताचे प्राणी अशा काळात हायवरनेशनमध्ये जातात व स्वतःला खोल पुरून घेतात. या थंड रक्ताच्या प्राण्यांना शरीराच्या तापमानाचे नियंत्रण करता येत नाही, म्हणून ते असे करतात; परंतु मानव हा गरम रक्ताचा प्राणी आहे. शरीराच्या तापमानाचे नियंत्रण वातावरणातील बदलाप्रमाणे तो करू शकतो. त्यामुळेच उष्णता वाढली की धाम येऊन व थंडी वाढली की कुडकुडण्याच्या क्रियेने शरीराचे संरक्षण केले जाते.कुडकुडणे म्हणजे स्नायुंच्या थरथरण्याच्या हालचालीने स्नायूंतून ऊर्जा निर्माण केली जाते व तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा तापातही व्यक्तीचे हातपाय थडथड उडतात. हिवतापामध्ये रोगजंतूमुळे मेंदूच्या तापमान नियंत्रण केंद्राचे कार्य बिघडते. याचा परिणाम म्हणून ताप असतानाही कुडकुडण्याच्या क्रियेतून शरीरातील उष्णता वाढवायचा प्रयत्न केला जातो!डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*U. P. S. C. - Union Public Service Commission.*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनात जर विश्वास व विजयाची भावना असेल तर, यश मिळवता येईल. जर विचार दुर्बल असतील तर अपयश पदरी पडेल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *फुटबॉल इतिहासात ९०० गोल पूर्ण करणारा पहिला खेळाडू* कोण बनला आहे ?२) जगात सर्वाधिक प्लॅस्टिकचा कचरा निर्माण करणारे पहिले तीन देश कोणते ?३) गोदावरी नदी बंगालच्या उपसागराला कोणत्या ठिकाणी मिळते ?४) 'पारंगत' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) २०२४ ची मिस युनिव्हर्स स्पर्धा कोठे होणार आहे ? *उत्तरे :-* १) ख्रिस्तियानो रोनाल्डो, पोर्तुगाल २) भारत, नायजेरिया, इंडोनेशिया ३) राजमहेंद्री, आंध्रप्रदेश ४) निपुण, तरबेज ५) मेक्सिको*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 कांचन जोशी, शिक्षिका, नांदेड👤 प्रशांत करखेलीकर, धर्माबाद👤 ऋषिकेश बच्छाव👤 प्रशांत कोकाटे👤 सुनील महामुनी👤 भगवान वाघमारे👤 गणेश यादव👤 अमोल वसंतराव पाटील👤 दिगंबर वंगरवार, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाधि हरिची सम सुखेंवीण । न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥ बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एका केशवराजें सकळ सिद्धि ॥२॥ ऋद्धि सिद्धि निधी अवघीच उपाधि । जंव त्या परमानंदीं मन नाहीं ॥३॥ ज्ञानदेवी रम्य रमलें समाधान । हरिचें चिंतन सर्वकाळ ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपमानाचे मानकरी तीच व्यक्ती बनते. जी व्यक्ती नेहमीच सत्याच्या वाटेवर चालत राहते. किंवा एखाद्या व्यक्तीमधील योग्यता बघून माणुसकीच्या नात्याने तिला साथ देते. मानाचे मानकरी होण्यासाठी माणूस कोणताही मार्ग निवडत असतो. पण, सत्याच्या वाटेवर चालून अपमानाचा किंवा टिकेचा मानकरी होण्यासाठी पदोपदी काट्यातून प्रवास करावा लागतो. खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीला मिळालेला तो खरा सन्मान असतो. प्रत्येक व्यक्तीला तो सन्मान पात्र होत नाही त्याचे नाव संघर्षमय जीवन आहे .म्हणून जीवनात काहीही झाले तरी चालेल पण,चुकूनही असत्याला साथ देऊ नये कारण, असत्य, सत्यासमोर जास्त काळ पर्यत टिकून राहत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• .आईचे प्रेम*सुरिली नावाचा पक्षी आंब्याच्या झाडावर राहत होती. तिने खूप सुंदर घरटे बनवले होते. ज्यात त्याची लहान मुले एकत्र राहत होती. त्या मुलांना अजून कसे उडायचे ते माहित नव्हते, म्हणूनच सुरिली त्यांना खायला आणून खायला घालायची. एके दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे सुरिलीच्या मुलांना खूप भूक लागली होती. मुलं जोरजोरात रडू लागली, सगळी मुलं एवढ्या मोठ्याने रडत होती. मुलं रडणारी तिला आवडत नव्हती. ती त्यांना शांत करत होती, पण मुलांना भूक लागली होती त्यामुळे ते गप्प बसत नव्हते. सुरिली विचारात पडली, एवढ्या मुसळधार पावसात जेवण कुठून आणणार. पण जेवण आणले नाही तर मुलांची भूक कशी भागणार ? बराच वेळ विचार केल्यावर सुरिलीने लांब उड्डाण केले आणि पंडितजींच्या घरी पोहोचले. पंडितजींनी प्रसादात सापडलेला तांदूळ, डाळ आणि फळे अंगणात ठेवली होती. पक्ष्याने पाहिले आणि मुलांसाठी तोंडात भरपूर तांदूळ ठेवले. आणि लगेच तिथून उडून गेला. घरट्यात पोहोचल्यानंतर पक्ष्याने सर्व मुलांना तांदळाचे दाणे दिले. मुलांची पोटे भरली होती, सगळे गप्प झाले आणि आपापसात खेळू लागले.नैतिक – आईच्या प्रेमाची जगात बरोबरी नाही, जीव धोक्यात घालूनही ती आपल्या मुलांच्या हितासाठी काम करते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment