जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁जीवन विचार 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰
आजच्या जगात जी विषमता दिसते , दुःखे , पापे दिसतात ती कां ?
त्याचे कारण हे आहे की मणुष्याने श्रमाचे स्थान पैशाला दिले आहे. पैशामुळे स्पर्धा निर्माण झाली आणि त्यातूनच तंटे निर्माण झाले.
प्रसिद्ध रशियन लेखक टाँल्स्टाय लिहितो ,  " जोवर नाणी चालत राहतील , तोवर जगात शांतता असणार नाही."
श्री शंकराचार्य म्हणतात ,  'अर्थमनर्थ भावय नित्यम्.'
अर्थाला म्हणजे पैशाला अनर्थ माना.हे तंटे नाहीसे करावयाचे असतील , तर भूक लागते त्या प्रत्येकाने शरीरश्रमाचे व्रत घेतले पाहिजे.कर्म केल्याशिवाय उत्पादन होत नाही आणि जीवनही चालत नाही हे सगळ्यांना ठाऊक आहे.

      कर्म न करता जे चिंतन होते ते माणसाला योग्य मार्गाला लावत नाही , अयोग्य मार्गाला लावते,  विकासा ऐवजी विनाशाकडे घेऊन जाते. 'Empty mind devil's  workshop '  अशी म्हणच आहे.
श्रमाने बुद्धी अधीक सात्त्विक व तेजस्वी होते.
दुसऱ्याचे शोषण न करता आपल्या स्वतःच्या श्रमाने मिळवलेले खाद्यच शुद्ध , पवित्र आहार होय. तोच मानवाच्या नैतिक , आत्मिक उन्नतीला पोषक असतो.
〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✍  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰

No comments:

Post a Comment