जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁जीवन विचार  🍁🌺
〰〰〰〰〰〰〰
आपलं जीवन अनमोल आहे.आपलं जीवन निर्भय, निष्काम, प्रसन्न आणि आनंदी ठेवण्यातच खरं यश आहे.
जीवनात आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण करण्यातच खरं मर्म आहे.
          यासाठी माणसांना सतसंगतीची गरज असते. माणसाला जर सतसंगती लाभली तर त्याला परोपकाराचा आणि सदवर्तनाचा धडा शिकवून जाते.दुसऱ्याशी प्रेमानं कसं वागावं हे शिकवते आपण निःस्वार्थी राहून कार्य कसं करावं हे सांगते. सुख-दुःखात आपण मनाचा समतोल कसा राखावा हे समजावते.

    सज्जनांच्या संगतीत एखादा दुर्जन मनुष्य आला तर सज्जन आपले सारे गुण त्याच्यावर बहाल करत असतो.चंदनाच्या झाडावर कु-हाड कोसळली तरी चंदन आपल्या सुंगधाने ती कु-हाड देखील सुगंधीत करून सोडत असतो.या विचाराच मर्म ओळखून माणसानं दुर्जनापासून दूर राहावं.

  🙏 समर्थ रामदासांनी म्हणूनच सांगितले की,
   
' घडीने घडी सार्थकाची करावी l सदा संगती सज्जनाची धरावी ll
====================
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✍〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in

No comments:

Post a Comment