जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
*〰〰〰〰〰〰〰〰*
कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अदभूत कार्य घडतात.आपल्या जीवनप्रवासात अनेकदा संधी येते.संधीची ही पाऊलवाट पकडून माणसाला आपल्या जीवनाचा राजमार्ग शोधता येतो फक्त त्यासाठी आपणास योग्य त्या संधीची निवड करून पुढं चालण्याच सामर्थ्य आपल्याला उमजलं पाहिजे.सर्वोत्तम माणूस तोच म्हटला पाहिजे जो आपल्या जीवनात आलेल्या योग्य संधीच सोनं करतो अशा योग्यमय संधीचा फायदा घेऊन आपलं जीवन यशस्वी करतो.
 *संधी* म्हणजे काळाच्या भुमीत कर्माचं बीज पेरणं होय. त्या बीजाचा वृक्ष होईल तेव्हा तो सर्वांना सावली आणि फळे देईल.
*संधी* आपल्याला नवं ज्ञान , नवी दिशा दाखविते.
*चालणाऱ्याला त्याचं नशीब भेटतं.थांबणार्याचं नशीबही थांबतं.*
*संधी* म्हणजे निराश माणसाला भेटलेली हिंमत होय.
म्हणून माणसाने कोणत्याही प्रसंगाला न डगमगता निराशावादी न राहता आलेल्या योग्य संधीचा फायदा करून घ्यावा व आपल्या जीवनात यशस्वी व्हावे.
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन

No comments:

Post a Comment