जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
प्रकाश आणि अंधार ही सृष्टीची दोन रुपे आहे.अगदी परस्परविरोधी गुणधर्माने त्यांनी सर्व सृष्टीचा चराचराला व्यापले आहे आणि अशा युगायुगाचा काळ्यापांढर्या वाटेचा माणूस प्रवाशी आहे.युग संपतात पण अंधार उजेडाचा प्रवास माञ चालूच राहतो.एक पिढी दुसऱ्या पिढीला मार्ग मोकळा करून देते.खरे तर माणसाच्या यशपयशाची , सुखदुःखाची ही प्रतीके मानवी कर्तृत्वाला गती निर्माण व्हावी यासाठीच त्यांची निर्मिती झाली असेल.काहीजरी असले तरी माणसाची तेजस्वी बुद्धी आणि मनगट कधीच खचता कामा नये प्रयत्नांच्या काटेरी वाटा बिनधास्तपणे ओलांडून आपल्या आयुष्यातील ध्येय गाठायची असतात.

*तेची म्हणावे दीप जे*
*वादळातही टिकतात*
*अंधाराशी लढा देत*
*जळत राहणे शिकतात.*

जे प्रतिकुलतेवर मात करून आकाशाकडे भरारी घेतील तेच टिकतील.जे संकटाला घाबरून वादळाला भिऊन दरीतील अंधाराला पाहून जागीच  बसतील ते संपले.
आव्हानाचा वादळांना जे स्वीकारतील त्यांचीच स्वप्ने प्रत्यक्षात उतरतील.
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन*

No comments:

Post a Comment