कथा क्रमांक २०३

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग २०३*
〰〰〰〰〰〰〰
*🌺 थोड जगुया समाजासाठी*🌺〰〰〰〰〰〰〰
तीन वाटसरू एका धर्मशाळेत एका रात्रीसाठी एकत्र आले असतात. तिथे स्वयंपाकासाठी एकच चूल आणि एकच भांडं असतं. तिघांनाही भूक लागलेली असते. मग ते एकत्र स्वयंपाक करायचा असं ठरवतात. चुलीवर भांडं ठेवून त्यात पाणी उकळायला ठेवतात आणि त्यात प्रत्येकानं आपापल्या जवळच्या तांदुळाची एक एक मूठ टाकायची असं त्यांचं ठरतं.

पाण्याला उकळी फुटल्यावर त्यात तांदूळ टाकायची वेळ येते. पहिला वाटसरू विचार करतो तसंही बाकीचे दोघं एक एक मूठ तांदूळ टाकतीलच, तेवढा भात तिघांना पुरेल. मी कशाला माझे तांदूळ वाया घालवू? म्हणून तो स्वतःच्या पिशवीत हात घालून रिकामीच मूठ घेऊन येतो आणि पातेल्यावरचं झाकण बाजूला सारून तांदूळ आत टाकल्याचं नाटक करतो. गंमत म्हणजे exactly असाच विचार बाकीचे दोघंही करतात आणि पातेल्यात तांदूळ टाकल्याचा नुसता अभिनयच करतात.

थोड्या वेळानं ते झाकण दूर करून बघतात तेंव्हा अर्थातच पातेल्यात फक्त गरम पाणी असतं, भाताचा पत्ताच नसतो !!! तिघांनाही चडफडत आणि एकमेकांना शिव्या देत उपाशीच झोपायला लागतं.

तात्पर्यः

आपण वेळ, पैसा किंवा कष्ट अशी कोणत्याही प्रकारची तांदुळाची मूठ contribute न करता,
ह्या समाजातले सर्व प्रश्न, इतर कोणाच्या तरी प्रयत्नातून आपोआप सुटतील असं ज्यांना वाटतं त्यांनी आपला हा भ्रम दूर सारून आपलीही मदत समाजात कशी उपयोगी येईल त्यानुसार समाजाच्या उपयोगी येण्याचा प्रयत्न करावा.
*-----------------------------------*
*📝 संकलन*

2 comments:

  1. आपले कथालेखन व कथासंग्रह उत्कृष्ट आहे.

    ReplyDelete
  2. आपले कथालेखन व कथासंग्रह उत्कृष्ट आहे.

    ReplyDelete