✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/08/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती* *लोकमान्य टिळक पुण्यतिथी* 💥 ठळक घडामोडी :- ■ १९९४- भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.जगातील अशा तऱ्हेची पहिली योजना. ■ २००१-सोलापूर विद्यापीठाची स्थापना. ■१९९६ - मायकेल जॉन्सनने २०० मीटर अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला. 💥 *जन्म* :- ◆ १८९९-कमला नेहरू, जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी. ◆ १९१० - मोहम्मद निसार, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९२० - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ◆ १९५२ - यजुर्वेन्द्रसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆ १९५५ - अरूणलाल, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 *मृत्यू* :- ● १९२० - बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक. ●२००८-हर किशन सिंग सुरजित, मार्क्सवादी नेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई - महाविद्यालयीन निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर; मुंबई विद्यापीठाच्या निवडणूक प्रक्रियेला 19 ऑगस्टपासून सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मोदी सरकारचे मोठे निर्णय, जम्मू-काश्मीरमध्येही 10 टक्के आरक्षण लागू, सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या संख्येत वाढ, 31 वरुन 34 होणार* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *शेतकऱ्यांच्या खात्यात आता थेट पोहोचणार भरघोस सबसिडीचा फायदा; पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जिल्हा नियोजन समितीअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेसाठी नागपूर जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांना ६२ कोटी ४६ लक्ष रुपयांचा निधी वितरित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : मुंबई विद्यापीठाचा दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या अभ्याक्रमास विद्यापीठ अनुदान आयोगाने दिली मान्यता काल जाहीर झालेल्या यूजीसीच्या यावर्षीच्या दुसऱ्या यादीत मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलचे नाव समाविष्ट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पीक विम्याची नुकसान भरपाई न मिळाल्याच्या बहुसंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य सरकारने गावोगावी शिबिरांचे आयोजन करावे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि आंध्र प्रदेश संघाचा कर्णधार वेणुगोपाळ राव याने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• श्रावण मासारंभ निमित्ताने प्रासंगिक लेख *श्रावण पाळा ; आजार टाळा* हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे. या महिन्यात बहुतांश लोकं देव देव करण्याकडे वळतात. मांसाहार खाणारे ह्या महिन्यात वर्ज्य करतात. काही लोकं या महिन्यात केस कापणे देखील टाळतात. पूर्ण महिनाभर हिंदू धर्मातील मंडळी कोणतेही अधर्म होऊ नये याची काळजी घेतात. यामागे धार्मिकसोबत काही वैज्ञानिक कारणे आहेत. जसे की या महिन्यात मांसाहार वर्ज्य करणे........ https://nasayeotikar.blogspot.com/2019/07/blog-post_31.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *औषधांनी स्मरणशक्ती वाढते का ?* 📙 आजकाल अनेक वृत्तपत्रांमध्ये व केबल चॅनल्सवर स्मरणशक्ती / बुद्धी वाढवणाऱ्या औषधांचे पेव फुटले आहे. आमचे औषध घेतल्याने नापास होणारा मुलगा मेरिटमध्ये आला असे दाखलेही दिलेले असतात. साहजिकच मुले व त्यांचे पालक या दोहोंनाही अशा औषधांचे आकर्षण वाटू लागते. स्मरणशक्ती तसेच बुद्धिमत्ता हे मोठ्या मेंदूचे कार्य आहे. सर्व व्यक्तींच्या मेंदूचा आकार व वजन जवळपास सारखेच असतात. तरीही काही व्यक्ती हुशार तर काही मठ्ठ का बरे असाव्यात ? बुद्धिमत्ता म्हणजे एखाद्या विशिष्ट परिस्थितीचे यथायोग्य आकलन करून, प्राप्त परिस्थितीत जास्तीत जास्त प्रभावी, उपयुक्त असा निर्णय घेण्याची क्षमता. म्हणूनच औपचारिक शिक्षण न घेतलेला निरीक्षर शेतकरीही पढीक पंडितापेक्षा बुद्धिवान असू शकतो. माहिती व ज्ञान मिळवणे, जीवनात विविध अनुभव घेता येणे, मार्गदर्शन मिळणे या सर्वांवर बुद्धिमत्ता अवलंबून असते. मेंदू हा एखाद्या संगणकाप्रमाणे काम करतो. खरे तर संगणक मेंदूप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करतो असे म्हणायला हवे ! दोन वस्तूंचा परस्पर संबंध जोडून तर्काद्वारे मेंदू त्या लक्षात ठेवतो. दोन असंबद्ध गोष्टी लक्षात राहत नाहीत ते याचमुळे. त्यामुळे स्मरणशक्ती वाढवायची असेल, तर दोन गोष्टीत संबंध तर्क लढवून निर्माण करावा लागेल व एकात एक अशी त्यांची साखळी तयार करून कोणतीही क्लिष्ट गोष्ट लक्षात ठेवता येईल. म्हणजे स्मरणशक्ती वाढवणे आपल्या हातात आहे. वाचन वाढवणेही आपल्या हातात आहे. मग दररोज २५० मिलिग्रॅम गोळी वा औषधे खाऊन एखाद्या शॉर्टकटने बुद्धी वा स्मरणशक्ती वाढवणे शक्य आहे का याचा विचार तुम्हीच करायचा आहे ! *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा तीन तास लवकर येणे चांगले.”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *राज्यपालाची नेमणूक कोण करतो ?* राष्ट्रपती 2) *ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते ?* 7 ते 17 3) *ग्रामपंचायतीचा सचिव कोणाला म्हणतात ?* ग्रामसेवक 4) *तलाठयाच्या कार्यालयास काय म्हणतात ?* सज्जा / साजा 5) *गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो ?* पोलीस पाटील *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  सौ.कुसुम कवठाळे मॅडम कै.गं.पो.सब्बनवार मा.विद्यालय. ●  गोविंद पाटील जाधव रोशनगावकर ●  एकनाथ डुमणे, मुखेड ●  मंगेश हनवत्ते, नरसी ●  साईनाथ पाटील मोकलीकर ●  दिलीप साळुंके ●  नागेश टिपरे ●  विश्वनाथ चन्ने, कळमनुरी ● बालाजी गायकवाड ● शिवसांब गणाचार्य, नांदेड ● यादव एकाले ● पवनकुमार भाले, धर्माबाद ● आनंद पेंडकर, माहूर ● बंडू पाटील मोरे ● संजीवकुमार हामंद, करखेली ● मुखीत अहमद, नांदेड ● सतीश दरबस्तेवार, कुंडलवाडी ● शिनू दर्शनवाड, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'दिवा' हा अशी एक शक्ती आहे ज्याशिवाय जग उजळून निघूच शकत नाही आणि उजाडल्याशिवाय वास्तवाचा प्रकाश पडत नाही. 'दिवा' हा वास्तवाची लख्ख जाणीव करून देणारा दृष्टीदाता, घनघोर अंधारातला विश्वासाचा सोबती असतो. तो प्रकाश देऊन सत्य उजागर करीत असतो. उजेडालाच एकमेव सत्याचा चेहरा लाभलेला आहे म्हणून प्रत्येकजण त्याचा याचक बनून आराधना करतो. सर्वच चांगल्या कार्याचा आरंभ करताना दिवे लावले जातात. ही गोष्ट हेच प्रतीत करते की, अजूनही आमच्या जगण्यातला अंधार पूर्णत्वाने नाहीसा झालेला नाहीये.., पण तो आम्हाला निश्चितपणे दूर करायचा आहे, या निश्चयाचे हे प्रतीक.* *प्रत्येकाच्या मनातही असा उजेड निर्माण होण्यासाठी म्हणून माणुसकीचा दिप लावायला मात्र आम्ही सपशेल विसरून जातो. तशी तर प्रत्येकाला उजेडाची आस असते, पण डोक्यात कुठल्या न कुठल्या प्रकारचा अंधार असतो. जेव्हा हा अंधार पूर्णत्वाने दूर होतो, त्यावेळी ती व्यक्ती तेजाने उजळते आणि अनेक पिढ्यांना प्रकाशमान करते..आपल्या मेंदूतले असे सारे अंधारकोपरे उजळून निघावेत नि आपल्यातला माणूस तेजाने तळपू लागावा, यासाठी आपण 'दिपपूजन' का करू नये? जळणं वा तेवणं हे जिवंत असल्याचं द्योतक, परंतु दिव्याचं जळणं हे कधी स्वत:साठी नसतं. ते इतरांना प्रकाश देण्यासाठीच जळत असतात. इतरांना उजाळण्यातच त्यांच्या जळण्याची सार्थकता असते. आज-उद्या 'दिप अमावस्या आहे. व्यसनाधीन होऊन बेशुद्ध होण्यापलीकडेही आयुष्य असतं हे ठळकपणे दर्शवणारी 'दर्श-अमावस्या'! आपल्या ह्रदयात निरंतर ज्ञानाचा दिवा तेवत ठेवायला याहून उत्तम दिवस नाही..शुभेच्छा!* *॥ रामकृष्णहरी ॥* 💡💡💡💡💡💡💡💡💡 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सज्जनहो,* *तुम्हीच ठरवा, कसं जगायचं।* *कण्हत कण्हत की गाणं म्हणत।* *त्यासाठी* *मनात काही भरून* *जगू नका* *नाहीतर मन भरून जगता* *येणार नाही...!* *वळून कुणी पाहिलं नाही म्हणून* *माळरानावरच्या चाफ्याचं अडलं नाही* *शेवटी पानांनीही साथ सोडली* *पण पठ्ठ्यानं बहरणं सोडलं नाही !* *तुमच्या आयुष्यातही असेच बळ* *साठवा जेणे करून एक दिवस तुम्ही* *जगाचे आकर्षण व्हाल.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते* ) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जी व्यक्ती सातत्याने कष्ट करते त्या व्यक्तीमध्ये प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, नम्रता, आपल्या माणसांविषयी व इतराविषयी आत्मियता हे गुण नक्कीच असतात. तो कधीही इतरांची बरोबरी करत नाही. ती आपली सारी स्वप्ने आपल्या हातातच आहेत आणि त्या हातातून जे काही घडते तेच आपले प्रारब्ध आणि तेच आपले विश्व समजते. अशा व्यक्तीच्या मनामध्ये कधीही कुणाचे वाईट व्हावे आणि आपलेच चांगले व्हावे असे विचार आणत नाही. म्हणून अशा व्यक्ती जीवनात पूर्णतः समाधानी असतात. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 ••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तिहेरी फिल्टर* एके दिवशी एक व्यक्ती महान चाणक्याला भेटली आणि म्हणाली, 'मी तुमच्या मित्राबद्दल जे काय ऐकले ते तुम्हाला मी सांगूं का? 'एक मिनिट थांबा' चाणक्यने उत्तर दिले. 'काही सांगण्यापूर्वी मी थोडीशी तुमची परीक्षा घेतो, परीक्षेत उत्तीर्ण झालात तरच सांगा, आपण याला.' ट्रिपल फिल्टर चाचणी असे म्हणू...... चालेल? ती व्यक्ती म्हणाली, 'तिहेरी फिल्टर?'ठीक आहे. चाणक्य पुढे म्हणाला. 'माझ्या मित्राबद्दल माझ्याशी बोलण्यापूर्वी, तुम्ही जे काय म्हणणार आहात, ते फिल्टर करणे चांगले आहे, म्हणूनच मी त्याला तिहेरी फिल्टर चाचणी म्हणतो, आता पहिला फिल्टर, तुम्ही जे सांगणार आहात, ते सत्य आहे का? ' थोडस थांबून ती व्यक्ती म्हणाली 'नाही,' 'खरंच मी त्याबद्दल ऐकले आणि .......' 'ठीक आहे,' चाणक्य म्हणाले तुम्ही जे मला सांगणार आहात ते खर आहे, याची खात्री नाही तुम्हाला?, आता दुसरा फिल्टर, आता चांगुलपणाचे फिल्टर वापरून पाहूया. आपण माझ्या मित्राबद्दल काहीतरी सांगणार आहात ते त्याच्या बद्दलचे चांगले विचार आहेत काय?' ती व्यक्ती म्हणाली 'नाही, उलट ........' 'मग, मधेच तोडत चाणक्य पुढे म्हणाले,' तू मला त्याच्याबद्दल काहीतरी वाईट सांगू इच्छित आहेस आणि ते खरे आहे की नाही याची शाश्वती नाही, ठीक आहे, आता उपयुक्तता फिल्टर हा शेवटचा फिल्टर..... जे तू मला माझ्या मित्राबद्दल सांगणार आहेस ती माहिती मला उपयोगी असणार आहे काय?' 'नाही, तशी तुम्हाला ती उपयुक्त खरंच नाही' ती व्यक्ती ओशाळत म्हणाली. 'ठीक आहे,' म्हणजे 'जर तुम्ही मला सांगू इच्छिता, ते ना सत्य आहे,ना चांगले आहे , ना मला उपयोगी देखील आहे, तर मला ते का सांगता आहात?' प्रत्येक वेळी आपल्या जवळच्या प्रिय जनाबद्दल, मित्रा बद्दल ऐकताना या तिहेरी फिल्टरचा वापर करा. मैत्रीवर भरवसा ठेवा, हे तिहेरी फिल्टरचे शास्त्र खरोखर खूप उपयुक्त आहे. आपसातील गैरसमज दूर ठेवायचे असतील तर प्रत्येक व्यक्तीने हे तिहेरी फिल्टर आचरणात आणायला पाहिजे . हीच आहे चाणक्य-नीती. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बुलेटीन विषयी वाचकांची प्रतिक्रिया* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सप्रेम नमस्कार, मी मधुकर चिंतामण पवार, प्रेरणा विद्यालय सोनावळे, ता.मुरबाड, जिल्हा ठाणे. सर्वप्रथम चार वर्षांचा प्रवास अविरत पूर्ण केल्या बद्दल "फ्रेश मॉर्निंग बुलेटीन "टिमचे मनपुर्वक अभिनंदन 🌹🌹 2 सप्टेंबर 2018 रोजी "फ्रेश मॉर्निंग बुलेटीन "गृपला जोडलो गेलो आणि वाचक बनलो."सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट".या वाक्याच्या अक्षरशः प्रेमात पडलो.शालेय परिपाठासाठी वाहून घेतलेल्या या गृपच्या सहवासात परिपाठाचं महत्व खर्या अर्थाने कळलं.गृपमधलं सर्व संकलन,निवेदन अगदी प्रमाणबद्ध व अर्थपुर्ण. नासाजिंच वृत्त निवेदन व स्तंभलेखन अप्रतीम. संतोषजिंच दिनविशेष संकलन, कुणालजिंच्या बातम्या संकलन, राजेंद्रजींची विशेष माहिती. सौ.भारतीजींचा फ्रेश सुविचार. संगीताजींची प्रश्नमंजुषा , वाढदिवसाच्या शुभेच्छा.. एकनाथजींच कबिरांचे बोल, व्यंकटेशजिंच विचारधन, प्रमिलाताईंची बोधकथा सारं सारं अप्रतीम.माझं महतभाग्य मी आपल्या गृपचा सदस्य आहे. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🙏💐🍫❤🌹🌷💛💚🧡👍 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment