✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/03/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८५७ - मंगल पांडे या ब्रिटिशांच्या बंगाल पलटणीतील शिपायाने बराकपूर छावणीत अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो. १९६२ - भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या पेनिसिलिन कारखान्यातील स्ट्रेप्टोमायसिनच्या उत्पादन प्रकल्पाचे अनावरण झाले. १९६८- महात्मा फुले विद्यापीठाची राहुरी येथे स्थापना १९८२ - एन.टी. रामाराव यांनी तेलुगू देसम पक्षाची स्थापना केली. २००४ - भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तान विरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्यात ३०९ धावांची खेळी केली व त्रिशतक झळकवणारा पहिला भारतीय फलंदाज झाला. 💥 जन्म :- १९२९ - उत्पल दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता १९४३-जॉन मेजर,इंग्लंडचे पंतप्रधान १९४८-नागनाथ कोत्तापल्ले, साहित्यिक, शिक्षणतज्ञ 💥 मृत्यू :- १९६२ - करमचंद थापर, भारतीय उद्योगपती. १९६४ - शंकर नारायण जोशी, भारतीय इतिहाससंशोधक. १९९३ - उत्पल दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 31 उमेदवारांची यादी जाहीर; यादीत राजस्थानमधील 19 आणि गुजरात व उत्तर प्रदेशातील प्रत्येकी 6 उमेदवारांची नावे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नॅककडून मुल्यांकन जाहीर; विद्यापीठाचा 'अ' दर्जा कायम* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्यात आला असून भावी डॉक्टरांना पेशंटशी कसे वागावे याचे आणि एकूणच नैतिकतेचे धडेही अभ्यासावे लागणार आहेत. २०१९-२० च्या शैक्षणिक सत्रापासूनच याची अंमलबजावणी होणार आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळणार साक्षांकित शैक्षणिक कागदपत्रे; मुंबई विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ * राज्यातील शासकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी अखेर प्रलंबित विद्यावेतनाच्या मागणीसाठी कामबंद आंदोलनाचा दिला इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *महाराष्ट्र तापला; बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४० ते ४२ अंशाच्या घरात, मुंबईला किंचित दिलासा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *IPL 2019 मुंबई आणि बंगळुरूच्या सामन्यात मुंबईचा निसटता विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अतिथी देवो भव* https://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_9.html स्तंभलेखक नासा येवतीकर 9423625769 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी २९ मार्च १९४८ रोजी झाला. हे मराठी भाषेतील लेखक, कवी, व समीक्षक आहेत व राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष होते. शालेय शिक्षण मुखेडच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आणि बीए मराठीचे शिक्षण देगलूर महाविद्यालय येथे पूर्ण केले. त्यात ते मराठवाड्यात तिसरे तर मराठी विषयात पहिले आले. त्यांनी १९८० मध्ये पीएच. डी. मिळवली. नागनाथ कोतापल्ले हे इ.स. १९७७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख बनले. २००४ पासून २००९ पर्यंत कोतापल्ले मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते. नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बालपुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असे कामही त्यांनी केले आहे. याउपर, नागनाथ कोतापल्ले हे १९८८ ते ९५ या काळात मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह, १९९५ ते ९६मध्ये साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मयकोशाचे समन्वय संपादक होते. मुंबईतले युवक साहित्य संमेलन, श्रीगोंद्यात आठवे ग्रामीण साहित्य संमेलन आणि कराडजवळ उंडाळे येथील साहित्य संमेलन या संमेलनांची अध्यक्षपदे नागनाथ कोतापल्ले यांनी भूषविली आहेत. याशिवाय, ते २०१२ मध्ये चिपळूण येथील ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते.  *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• विद्येवाचून मान नाही, विद्येवाचून द्रव्य नाही अन्‌ विद्येवाचून मनुष्यपण ही नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?* अरबी समुद्र 2) *भारताच्या पूर्वेला कोणता समुद्र आहे ?* बंगालचा उपसागर 3) *भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे ?* हिंदी महासागर 4) *विमानाचा शोध कोणी लावला ?* राईट बंधू 5) *विद्युत बल्बचा शोध कोणी लावला ?* थॉमस अल्वा एडिसन *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144              •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • पंकजकुमार पालिवाल • प्रदीप मनुरकर • बाबाराव पडलवार • पिराजी शेळके *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डावपेच* राजकारण म्हणजे डावपेचाचा खेळ आहे डावपेच जमले की एकदम सोपा मेळ आहे मतभेद निर्माण करून ज्याला मत पळवता येते हे गणित जमले की सहज यश मिळवता येते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼● ••• *खरेपणा, प्रामाणिकपणा, वास्तवता, अस्सलपणा आणि यथार्थपणा अशी आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख ठेवणं चांगलं. हीच तर आपल्या जीवनाची खरीखुरी गुणसंपदा असते. माणसाने आपल्या ठायी असलेल्या गुणांची जाणीव विसरली तरी चालेल; परंतु आपल्या ठायी असलेल्या दोषांची चांगली जाणीव ठेवावी. जसं दगडातील नको असलेला भाग काढून टाकला की, सुंदर मूर्ती तयार होते, तसं आपल्या स्वभावातील दोष काढून टाकले की, निखळ आणि सुंदर व्यक्तिमत्व झळकत असतं. खरंतर गुणी माणसं लोखंडाचं सोनं बनविणा-या परिसासारखी असतात, ओसाड जमिनीचं नंदनवन करणारी असतात. म्हणून जीवनात यश मिळविण्यासाठी सत्य, पामाणिकपणा, कठोर परिश्रम, न्याय आणि चारित्र्याची गरज असते हे विसरता येणार नाही.* *सत्य म्हणजे सत्यवाणी, सत्य विचार, सत्य आचार आणि सत्य उच्चार होय. सत्य म्हणजे जीवन. असत्य म्हणजे मरण. अनेक माणसं अशी जगता जगता मरत असतात आणि अनेक माणसं मरूनदेखील जगत असतात. यासाठी आपण स्वत: सत्यभाषी झाले पाहिजे. समाज सत्याचा आदर करतो. प्रामाणिकपणाची कदर करतो. न्यायची चाड बाळगतो. श्रमाची महती गातो आणि चारित्र्याची पूजा करतो. आज 'सत्यमेव जयते' हाच आपल्या जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. यासाठी सत्याचे महत्व आपल्या मनाच्या पाटीवर कायमचे कोरून ठेवले पाहिजे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• राम  पियारा  छड़ी  करी ,  करे  आन   का  जाप  | बेस्या  कर  पूत  ज्यू , कहै  कौन  सू  बाप  || अर्थ       महात्मा कबीर जीवनात कृतज्ञतेवर भर देतात. आपल्यावर ज्यांनी ज्यांनी उपकार केले त्यांना माणसानं कधीच विसरू नये. आई, वडिल, गुरूंसह अवतीभोवतीच्या सर्व घटकांनी आपल्या जडणघडणीत योगदान दिलेलंच असतं. त्यामुळे त्यांना विसरून कसं चालणार बरं ! वरील बाबी  मानवी कक्षेतल्या आहेत. त्याही पलीकडील काही अलौकिक , अमानवीय शक्ती आपल्या जीवनाला साकारण्यामध्ये फार मोठ्या सहभागी आहेत. त्यांना पंचमहाभूते म्हणतात. पृथ्वी, आप, तेज , आकाश व वायू या पाच महाशक्तींना विश्वचालक शक्ती माणले गेले आहे. या शक्ती नसत्या तर सजीवांचं अस्तित्वंच राहिलं नसतं. या सर्वांचं नियंत्रण करणारी जी शक्ती आहे तिलाच आपण विधाता किवा ईश्वर माणतो. अलिकडे स्वार्थापायी दगडधोंडे पुजणे. पशू पक्ष्यांची देवाच्या नावावर हत्त्या करणे. हे सारं कळत्यांचं ढोंगीपण अज्ञानी लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा उठवणारं असतं. अंधरूढी व अंधश्रद्भा वाढवतात. अशा लोकांबाबत कबीरजीच सांगतात,  'जत्रा में बिठाया फतरा,  तीरथ बनाया पानी।  दुनिया भयी दीवानी,  ये सब है पैसे की धुलधानी॥'      अशा ढोंगांच्या मागं न लागता खर्‍या विधात्याप्रति कृतज्ञभाव जपला पाहिजे. खर्‍या विधात्याला सोडून जे इत्तरांना त्या मार्गावरून भरकटवतात व नको त्याच ढोंगाच्या मागे लागतात. त्यांबाबतीत कबीर म्हणतात , वेस्येच्या लेकानं खर्‍या बापाला विसरावं. तशी  त्यांची गत झालेली असते.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• तुमच्याजवळ जे आहे ते इतराजवळ नाही किंवा इतरांजवळ जे आहे ते तुमच्याजवळ नाही. असे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला कदाचित वाटेलही आपल्या जीवनात असं का बरं होतं आणि त्याबाबतीत नसल्याचीही मनाला खंत वाटते. खंत वाटून घ्यायचेही कारण नाही. पहिल्यांदा तुम्ही थोडा विचार करा असे जर सगळ्यांना सारखेच मिळाले असते तर आपण काहीच प्रयत्नही केले नसते. इतरांच्यासोबतही आपण तुलना करु नये. ज्याच्या त्याच्या कर्माचा आणि ज्याला आपण कधी कधी नशिब म्हणतो कदाचित नशिबाचाही भाग असू शकते. पण एक लक्षात असू द्यावे पहिल्यांदा आपण इतरांची बरोबरी करु नये आणि जर करायचीच असेल तर आपण आपल्या कामात आणि प्रयत्नात कसूर करायची नाही. इतर जर पुढे जात असतील तर आपण त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि आपणही आपल्या प्रयत्नाने कसल्याही प्रकारचे मन खचून जाऊ न देता समोरच्या परिस्थितीला सामोरे जाऊन यशस्वी होण्याचा संकल्प करायचा. अशा कृतीमुळे आपलेही जीवन इतरांपेक्षा सुखी व समाधानी होऊ शकेल. इतरांबरोबर स्पर्धा करायची काही गरज नाही किंवा इतरांसोबत तुलनाही करायची गरज नाही. आपल्यालाही आपल्या कर्माने आणि आत्मविश्वासाने प्रयत्न केल्यामुळे आपणही आपल्या जीवनात खूप पुढे जाऊ शकतो हे निश्चित. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना जे घडी राघवेवीण गेली। जनीं आपुली ते तुवां हानि केली॥ रघूनायकावीण तो शीण आहे। जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे॥४६॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *आशेची थोरवी* एक भुकेलेला डोमकावळा एका उंबराच्या झाडावर बसला होता. तो वाट पाहात होता. उंबराची फळे अजून पिकली नाहीत. ती कधीतरी पिकतील याची वाट पाहात तो तिथेच बसून होता. हा डोमकावळा बराच काळ तिथेच बसला आहे, असे एका कोल्ह्याच्या लक्षात आले. तेंव्हा त्याने त्याला कारण विचारले. डोमकावळयाने कारण सांगितल्यावर कोल्हा त्याला म्हणाला, 'अरे वेडया, आशेने असा वाहून जाऊ नकोस. आशेमुळे माणसाला भ्रम तेवढा होतो. अशाने वाट पाहून कुणाचेच पोट भरत नाही. तात्पर्य - केवळ आशा करणे व्यर्थ आहे. प्रयत्न हवा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

1 comment: