✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/03/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २००९-Capeler Space Observatory या संशोधन संस्थेची स्थापना २००६-लष्कर-ए-तैय्यब्बा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले २००५ - स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी कुवैतच्या संसदेसमोर निदर्शने. 💥 जन्म :- १९३४ - नरी कॉँट्रॅक्टर, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४२ - उमेश कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५२-व्हिवीयन रिचर्ड्स ,वेस्ट इंडीज क्रिकेटपटू १९५५-अनुपम खेर ,चित्रपट अभिनेता 💥 मृत्यू :- १६४७ - दादोजी कोंडदेव १९५२ - परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञ. १९६१ - गोविंद वल्लभ पंत, भारताचे दुसरे गृहमंत्री. २०००-प्रभाकर तामणे,साहित्यिक २०१२-रवी शंकर शर्मा उर्फ रवि-संगीतकार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये स्वच्छतेच्या बाबतीत देशातले तिसरे सर्वाधिक चांगली कामगिरी करणारे राज्य होण्याचा मान महाराष्ट्राने मिळवला आहे.इंदोर सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांकावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना लोकसभा निवडणुका या ईव्हीएमच्या माध्यमातूनच घेतल्या जातील असे स्पष्ट केले* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *या वर्षीचा उन्हाळा देशाच्या बहुतांश भागात सर्वसाधारण राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *धनगर समाजाला आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून याबाबत होणार्‍या कोणत्याही अपप्रचारास समाज बांधवांनी बळी पडू नये, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी केले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कॉम्रेड गोविंद पानसरे प्रेरित नववे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन ९ व १0 मार्च रोजी स्थानिक मातोश्री विमलाबाई सभागृह, अमरावती येथे आयोजित केले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राज्यात १0 मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येणार असून सुमारे १ कोटी २२ लाख बालकांना पो असे आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा नामांतर सोहळा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे झाले नामांतर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *मुलांच्या प्रगतीसाठी .........!* शाळेची गुणवत्ता खराब आहे किंवा शाळेतील मुलांना काही न येणे ह्यासाठी फक्त शिक्षक जबाबदार नाहीत असे यूनेस्कोने नुकतेच आपल्या न्यू ग्लोबल एजुकेशन मॉनिटेरिंग रिपोर्टमध्ये म्हटले आहे. शिक्षक हा एक .................... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_23.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गोविंद वल्लभ पंत*     गोविंद वल्लभ पंत हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक नेते होते. त्यांचा जन्म १0 सप्टेंबर १८८७ रोजी अल्मोड.ा जिल्हयात श्यामली पर्वतीय क्षेत्रातील खूंट या गावात मूळच्या महाराष्ट्रीय कुटुंबात झाला. त्यांचे पुर्वीचे आडनाव पराडकर होते. डिसेंबर १९२१ मध्ये गांधीजींच्या आवाहनामुळे असहकार चळवळीच्या माध्यमातुन ते सक्रिय राजकारणात आले.पंत हे उत्तर प्रदेशाचे प्रथम मुख्यमंत्री आणि भारताचे दुसरे गृहमंत्री होते. भारत सरकारने इ.स. १९५७ साली त्यांना भारतर% ने सन्मानीत केले. हिंदी भाषेला राष्ट्रभाषा करण्याबाबत ते विशेष आग्रही होते. जमिनदारी पद्धत समाप्त करण्यात व कुळ कायदा अस्तित्वात आणण्यात त्यांचे मुख्य योगदान होते.अल्पसंख्यकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी कुमाऊउ परिषदेची स्थापना केली. १९0५ च्या बनारस काँग्रेस अधिवेशनास ते हजर होते. १९१६ मध्ये ते काँग्रेसचे सक्रीय सभासद झाले. त्यांनी भिकार्‍यांची व्यवस्था, मजुरांची सक्तीने भरती, जंगलवासीयांवरील अत्याचार इ. प्रश्न कुमाऊँ परिषदेतर्फे हाताळले. उत्तर प्रदेशाच्या विधान परिषदेत ते निवडून आले (१९२३). त्याच वर्षी मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास आदींनी स्वराज्य पक्षाची स्थापन केली. स्वराज्य पक्षाचे ते सात वर्षे सचिव होते. १९२७ मध्ये ते प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांना दोन वेळा तुरूंगावास घडला. कृषी विषयक सुधारणांसाठीच्या कामगिरीमुळे ते पार्लमेंटरी काँग्रेसच्या संसदीय मंडळाचे चिटणीस झाले (१९३४)       *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *सर्वात मोठा खंड कोणता ?* आशिया 2) *सर्वात लहान खंड कोणता ?* ऑस्ट्रेलिया 3) *जगातील एकूण सार्वभौम देश किती ?* 231 4) *जगातील सर्वात मोठा देश ( क्षेत्रफळ ) कोणता ?* रशिया 5) *जगातील सर्वात लहान देश कोणता ?* व्हॅटिकन सिटी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • गोवर्धन शिंदे • शिवम जाधव • भीमराव रेणके • अविनाश मोटकोलू • मनोज घोगरे • कन्ना कनकमवार • महेश कोकरे • मारोती लोणेकर • विश्वनाथ स्वामी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुकाळ* सभा-संमेलनात आता घोषणांचा सुकाळ आहे प्रत्यक्षात मात्र कुठेही नेहमीचा दुष्काळ आहे घोषणांच्या सुकाळात तो झोडपून गेला आहे असल्या या दुष्काळाने हवालदिल झाला आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरीब माणसाला घरापासून दूर राहून पोटाच्या चार घासासाठी प्रचंड मरमर करावी लागते. पण पैशावाल्याच्या बाबतीत हे होत नाही. "एका बसल्या ठिकाणी त्याचा व्यापार चालतो. त्याला घर सोडून कुठेही जावं लागत नाही." गरीबाला एका वस्तूसाठी पैशाअभावी कुढत मरावं लागतं. शेवटपर्यंत ती वस्तू मिळेलच असं होतं नाही. पण "श्रीमंताला मात्र पाहिजे असणारी कोणतीही वस्तू रानावनातच काय या पृथ्वीतलावर कुठंही असली तरी पैशाच्या जोरावर मिळवणं सोपं असतं आणि वस्तू कोणतीही असू द्या, कितीही अनमोल असू द्या, कितीही महत्वाची असू द्या, शक्यतो जास्तीचे पैसे देऊन मिळवता येणार नाही, इतकी ती अवघड नसतेच." थोडे जास्त पैसे देऊन अति मौल्यवान वस्तुसुद्धा पैश्यावाल्याला सहज मिळवता येते.* *म्हणून, पैसा माणसाच्या आयुष्यात यासाठी महत्वाचा आहे. पैसा वाईट मार्गाने कमवायचा तर नाहीच, पण चांगल्या मार्गाने खूप पैसा कमवून तो वाईट मार्गावर खर्च सुद्धा नाही करायचा. चांगल्या मार्गाने कमावलेला खूप पैसा 'आनंदी आणि सुखकर आयुष्य' जगण्यासाठी खर्च करायचा आहे. पैशाचा लोभ नाही आणि तिरस्कारही नाही. त्याची हाव नको आणि त्याच्याविषयी विरक्ती नको. पैसा कमवताना आनंदाने कमवायचा तसाच तो खर्च करतानासुद्धा जीवनात आनंदच असला पाहिजे. एवढा सुंदर असा 'मध्यम मार्ग' संतानी आपल्याला दिला आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      आतम अनुभव जब भयो, तब नहि हर्श विशाद चितरा दीप सम ह्बै रहै, तजि करि बाद-विवाद। सारांश आत्म अनुभव होता नुपजे हर्ष-विशाद । चित्रदीपासम स्थिर त्यागून वाद-विवाद ।। महात्मा कबीर आत्मानुभवाची महत्ती विशद करतात. ज्याला आत्मानुभवाचा साक्षात्कार झालेला आहे. त्याच्या ठायी कोणताही भेदभाव उरत नाही. निसर्गातील उदात्त भावाची अभिव्यक्ती त्याच्याकडून प्रत्ययास येवू लागतात. वृक्ष संगोपक व संहारक दोघांनाही समान वागणूक देतो. दोघांवरही शितलता (सावली) सारखीच धरीत असतो. तशी वागणूक आत्म अनुभव्याची असते. तो आप-परभाव बाळगित नाही. आनंद व खेद अशा भावनाही त्याच्याठायी उपजत नाहीत. चित्रातील ज्योत स्थिरता धारण करते. तिच्यावर बाह्य घटकांचा काहीही परिणाम जाणवत नाही. जिथे परमात्म्याचं विशाल रूप ध्यानात आलेलं आहे. त्या विशाल रूपाचे आपण एक सुक्ष्म अंश आहोत. तेव्हा त्याबद्दलची मत मतांतरं कशी काय उत्पन्न होतील. सारे वाद-विवाद कधीच मिटलेले अाहेत.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सायंकाळच्यावेळी थोडं तळ्याकाठी जाऊन पहा आणि काही क्षण त्याकडे पाहिले तर असे लक्षात येते की, तळ्यातल्या पाण्यावर तरंगणा-या लाटा एकामागून एक संथगतीने तळ्याच्या काठाकडे जणू हातात हात घालून येत आहेत आणि आम्ही एक आहोत असं सांगून जातात. त्यातून प्रत्येक लाटेच्या एकीचे दर्शन घडताना दिसते.त्यांच्या एकीबरोबरच निसर्गाचं सौंदर्य खुलताना दिसते.हे विहंगम दृश्य मानवी मनाला भुरळ पाडल्यावाचून राहत नाही.यातून निसर्गातील प्रत्येक घटक एकमेकांशी संवाद साधून एक मौलिक संदेश सा-या सजीवांना देतात.ज्याप्रमाणे एकमेकांच्याद्वारे निसर्गाच्या एकरुपतेचे दर्शन घडते.असे दर्शन मानवी जीवनाचे का दिसून येत नाही ? त्यात फक्त माणूसच असा आहे की,तो निसर्गाचे अनुकरण करायला थोडा विसरतो, निसर्गापासून दूर जाऊ पाहतो आणि आपले काही इतरांपेक्षा वेगळे आहे असे समजून जगायला पाहतो.तो अहंभाव मनात ठेवून जगण्याचा प्रयत्न करतो आणि कुठेतरी फसतो.पण एक माणसाने थोडे निरीक्षण करायला शिकले पाहिजे.शिकल्यानंतर असे लक्षात येईल की,निसर्गातला प्रत्येक घटक एकमेकांशी जुळवून घेऊन एक आगळेवेगळे विलोभनीय सौंदर्य निर्माण करुन आपले अस्तित्व टिकवून ठेवतो तर आपण का करत नाही.जर आपणही प्रयत्न केले तर आपल्याही जीवनात,जगण्यात, जीवनशैलीत भर पाडू शकतो.मग तरंगणा-या लाटा असतील किंवा अन्य घटक असतील. त्याचप्रमाणे मानवाने निसर्गावर प्रेम करत करत त्यातून मन शांत ठेवून, विचार करून आपणही एकमेकांतला असणारा भेद, तिरस्कार न करता एकतेने जीवन जगायला शिकले पाहिजे. इतरांनाही आपल्यात सहभागी करून घेऊन कुणालाही कमी न देता आपण सारे समान आहोत आपण सा-यांनी मिळून मिसळून राहून आपणही चांगली मानवसृष्टी निर्माण करु शकतो. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• समर्थाचिया सेचका वक्र पाहे। असा सर्व भुमंडळी कोण आहे॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३०॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *शिंपले* एक 6 वर्षाचा मुलगा आपल्या 4 वर्षाच्या लहान बहिणीसोबत बाजारातून जात असतो. अचानक त्याला जाणवते की त्याची बहीण मागे राहिली आहे. तो थांबतो व मागे वळून पाहतो तर त्याला दिसते की, त्याची बहीण एका खेळण्याच्या दुकानासमोर उभी राहून अतिशय कुतूहलाने काहीतरी पहात आहे. तो मुलगा मागे जातो व तिला विचारतो, "तुला काही हवे आहे का?" ती एका बाहुलीकडे बोट दाखविते. तो मुलगा तिचा हात धरतो व एका जबाबदार मोठ्या भावा प्रमाणे तिला ती बाहुली देतो. ती बहीण अत्यानंदीत होते. हे सर्व तो दुकानदार पहात असतो व त्या मुलाचे प्रगल्भ वागणे पाहून आश्चर्यचकित होतो.इतक्यात तो मुलगा काउंटर कडे येतो व त्या दुकानदाराला विचारतो "काका, किती किंमत आहे या बाहुलीची?" दुकानदार एक शांत माणूस असतो व त्याने जीवनाचे अनेक चढ उतार पाहिलेले असतात. तो त्या मुलाला प्रेमाने व आपुलकीने विचारतो "बोल तू काय देशील?" मुलगा आपल्या खिशातील सर्व शिंपले,जे त्याने व त्याच्या बहिणीने नुकतेच समुद्रकिनाऱ्यावर गोळा केलेले असतात ते बाहेर काढतो व दुकानदाराला देतो. दुकानदार ते घेतो व जणूकाही पैसे मोजत आहे या अविर्भावात मोजायला सुरु करतो. शिंपले मोजून झाल्यावर त्या मुलाकडे पाहताच मुलगा म्हणतो " कमी आहेत का ?" दुकानदार म्हणतो " नाही नाही, हे बाहुलीच्या किमतीपेक्षा जास्त आहेत. ज्यादाचे मी परत करतो. असे म्हणून तो केवळ 4 शिंपले घेतो व बाकी सर्व शिंपले त्याला परत करतो. मुलगा एकदम आनंदात ते शिंपले आपल्या खिशात ठेवतो व बहिणीसोबत निघून जातो. हे सर्व त्या दुकानातील कामगार पहात होता. त्याने आश्चर्याने मालकाला विचारले, " मालक ! इतकी महागडी बाहुली तुम्ही केवळ 4 शिंपल्यांच्या मोबदल्यात दिलीत ?" दुकानदार एक स्मित हास्य करीत म्हणाला, "आपल्यासाठी हे केवळ शिंपले आहेत. पण, त्या मुलासाठी हे शिंपले अतिशय मौल्यवान आहेत. आणि आत्ता या वयात त्याला नाही समजणार पैसे काय असतात. पण जेंव्हा तो मोठा होईल ना, तेंव्हा नक्कीच समजेल. आणि जेंव्हा त्याला आठवेल कि आपण पैश्यांच्या ऐवजी शिंपल्यांच्या मोबदल्यात बाहुली खरेदी केली होती, तेंव्हा त्याला माझी आठवण होईल आणि तो हा विचार करेल कि हे विश्व चांगल्या माणसांनी भरलेले आहे.हीगोष्ट त्याच्यातील सकारात्मक दृष्टीकोन वाढण्यासाठी मदतीची ठरेल आणि तो सुद्धा चांगला माणूस बनण्यासाठी प्रेरित होईल." *तात्पर्य* -- " पेरावे तसे उगवते." म्हणून केवळ पैशांच्या मागे न लागता, असे काहीतरी चांगले काम करा, जे पुढच्या पिढयांना चांगले काम करण्याची प्रेरणा देईल, सकारात्मक दृष्टीकोन देईल..... *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment