✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 19/03/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८४२-लोकहितवादी यांनी "शतपत्र"लेखनास प्रारंभ केलं १९७२-भारत-बांग्लादेश मैत्री करार २००३-अमेरिकेचे अध्यक्ष जार्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले २००४ - तैवानच्या राष्ट्राध्यक्ष चेन शुइ-बियान वर हल्ला. २०१३ - राष्ट्रीय महामार्ग १७वरील खेडजवळ जगबुडी नदीवरील पुलावरुन बस नदीपात्रात कोळून ३७ ठार, १५ जखमी. 💥 जन्म :- १९३८-सई परांजपे, लेखिका व चित्रपट दिग्दर्शिका १९५४- इंदू शहानी, भारतीय शिक्षणतज्ञ १९८४ - तनुश्री दत्ता, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :- २००८-सरआर्थर सी क्लार्क,विज्ञान कथालेखक व संशोधक २००२-नरेन ताम्हाणे,यष्टीरक्षक आणि फलंदाज १९९८-इ एम एस नंब्रूदीपाद,केरळ चे माजी मुख्यमंत्री १९८२-"आचार्य" कृपलानी, गांधीवादी ,स्वातंत्रसेनानी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत प्रदीर्घ काळ चाललेल्या चर्चा आणि वाटाघाटींनंतर अखेर भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *लंडन - पीएनबी बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीला अटक होणार, 25 मार्च रोजी लंडन कोर्टात नीरव मोदीला हजर करणार, सूत्रांची माहिती* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *दिल्ली - भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक, 180 लोकसभा उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *भंडारा - गोंदिया लोकसभा मतदार संघात सोमवारी पहिल्याच दिवशी २० जणांनी ४७ नामनिर्देशन अर्जांची उचल केली. एकही नामांकन दाखल नाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अनंत तात विलीन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : म्हाडाच्या घरांसाठीची 21 एप्रिलची सोडत पुढे ढकलली, लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर सोडत जाहीर होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पटियाला येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक वरिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेचा राष्ट्रीय विक्रम, आशियाई व जागतिक स्पर्धेसाठी पात्र * ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नासा येवतीकर लिखित *कथा :- नावाची लक्ष्मी* http://nasayeotikar.blogspot.com/2017/03/blog-post_42.html कथा वाचून आपले मत पोस्ट करायला विसरु नका •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *सई परांजपे* सई परांजपे (१९ मार्च, इ.स. १९३८) या एक मराठी लेखिका, नाटककार, बालनाट्ये लिहून रंगमंचावर सादर करणाऱ्या, पटकथाकार व चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्या आहेत. समांतर चित्रपट या वर्गवारीत येणारे अनेक चित्रपट त्यांनी प्रामुख्याने दिग्दर्शित केले आहेत. सई परांजपे हे नाव त्यांच्या बालवयापासूनच लोकांना परिचयाचे आहे. कारण, ज्या वयात मुले लंगडी, लपाछपी खेळतात त्या वयात म्हणजे वयाच्या ८व्या वर्षी, सई परांजपे यांचे पहिले पुस्तक -मुलांचा मेवा- केवळ लिहून नव्हे तर, छापून प्रकाशित झाले होते. त्यामुळे त्यांची सुरूवातच मुळात बाल वयातील लेखिका म्हणून झाली. पुढे त्यांच्या लेखणीला सखोलता प्राप्‍त झाली आणि अल्पावधीतच त्या यशस्वी आणि लोकप्रिय लेखिकाही झाल्या. बालसाहित्य लेखिका, बालनाट्य लेखिका, नाटककार, पटकथाकार तसेच, निर्मात्या अश्या एकापेक्षा एक अश्या सरस कामगिर्‍या सई परांजपे यांनी पार पाडल्या आहेत. चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. (इंटरनेट वरून साभार )    *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येक मनुष्य आपल्या पापाचे ओझे स्वत:च्याच खांद्यावर वाहत असतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचा जिल्हा कोणता ?* सिंधुदुर्ग 2) *महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता ?* गडचिरोली 3) *महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोठे स्थापन करण्यात आली ?* पुणे 4) *महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण ?* आनंदीबाई जोशी 5) *महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा कोणता ?* सोलापूर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144              •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •  प्रकाश गताडे •  व्यंकटी पावडे •  प्रेमराज रावसाहेब त्रिभुवन •  केदार ढगे, चिरली •  अशोक सोनवणे, धुळे •  आमरजुल इस्लाम •  मनोज शेटकर •  मंजुषा देशमुख, अमरावती •  रघुवेध तेहरा •  गंगाधर गुरलोड •  शंकर कंदेवाड, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भांडण* दिवसा वाद रात्री मनोमिलन असते भांडणात पडणारा उगी व्हिलन असते लुटूपुटूच्या भांडणात कधी कोणी पडू नये त्यांची होते क्षणात मैत्री आपण दुश्मन घडू नये शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनाचे अध्यात्म समजून घेताना रोज जगण्यातील प्रत्येक घटनेचा ऊहापोह चिंतनाच्या पातळीवर करणे आवश्यक असते. तेव्हांच दैनंदिन जीवनप्रवाहात अध्यात्म उतरू शकते. योग्यायोग्यतेचा निवाडा करून सुयोग्य मार्गावरून चालणे आणि आपल्यांसह इतरांनाही त्या मार्गावरून घेऊन जाणे जमायला हवे. याची सुरूवात आपल्यापासून करून मग ते इतरांना शिकविले, तर ते आचरणशील होते. अलीकडे लग्न व इतर उत्सवादी कार्यक्रमात अन्न टाकू नये, असे सांगितले जाते. जेवताना अन्न टाकायचे नसतेच, तो सुसंस्कृत जगण्याचा अविभाज्य भाग आहे; पण तरीही भराभर वाढून घेणे आणि नुसतीच चव चाखून ते टाकणे, असा*  *त-हेवाईकपणा वाढतो आहे.*  *आपले तत्वज्ञान तर अन्न प्राशनाविषयी खूप खोलवर जावून बोलते. अन्नाची निंदा करू नये आणि ते टाकू नये, असे साक्षात् उपनिषदांनी नोंदवून ठेवले आहे. त्याचे पालन होत नाही. बाहेरील मोठा कार्यक्रम तर जाऊ द्या: पण घरातही खूप अन्न वाया जाते. त्याचा विचार व्हावा. रोज हजारो भुकेल्यांचे पोट भरेल एवढे अन्न राज्यात वाया जात असेल. ते जर आपण वाचवले, तर 'अन्नदान श्रेष्ठदान' सारखी अध्यात्मिक कृती घडेल. Money saved is money earned याचा अर्थ पैसा वाचविणे हे पैसा मिळविण्यासारखेच असते. तसेच अन्नाचा काटकसरीने वापर करणे हे अन्न निर्माण करण्यासारखेच आहे.*    ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●••             🔥🔥🔥🔥🔥🔥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      कबीर कलि खोटी भाई , मुनियर मिली न कोय | लालच लोभी मस्कारा , टिंकू आदर होई || अर्थ : हल्लीच्या सामाजिक भानाचं वर्णन करताना महात्मा कबीर ढोंगाला भुलणार्‍या अर्थात वास्तव न पाहता वरवरच्या सोंगालाच सत्य मानणार्‍या समाजमनाचं निरीक्षण नोंदवतात. भूगोल सांगतं पृथ्वीचं वय साडे चार अब्ज वर्षापेक्षा जास्त जास्त. भारतीयांच्या मानण्याप्रमाणे गतकाळ ते सांप्रत असे चार युग . १ कृत युग, २ त्रेता युग , ३ द्वापार युग, व ४ कली युग अशी काल विभागणी सांगितली जाते. हल्ली म्हणजे कलीयुगी पूर्वीपेक्षा खोटारडेपणा खूपच वाढलाय. हे युग महाभारताच्या लढाईपासून ते सांप्रतपर्यंत चालूच आहे. या युगी खरे खुरे मुनी , ऋषी , संत भेटणे कठीण झाले आहे. स्वार्थासाठी त्यांची नाटकं करणारे अनेक जण भेटतील. लालचीपणा, मोह यांनी ग्रासलेल्यांना हेच ढोंगी , पाखंडी , खरंं अध्यात्म सोडून थट्टा मस्करी करणारे, द्रव्य लुटणारे, वासनांधच साधू, मुनी म्हणून मिरवत आहेत. अन भक्तजण त्यांनाच डोक्यावर घेवून मिरवतात अन फसगत झाली की वैफल्यग्रस्त होतात. तेव्हा खरा साधून ओळखून त्याच्या ठायी लिन व्हायला सांगितलेला संतांचा कानमंत्र विसरू नये. म्हणजे झालं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनव्यवहारासाठी जसा सुखदुःखाचा,कामाचा आणि वेळेचा अनुभव पाठीशी असावा लागतो तसा आपल्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानाचा अनुभव पाठीशी असावा लागतो.ते ज्ञान मिळविण्यासाठी मनाची तयारी असायला पाहिजे. मनाच्या परिपक्वतेसाठी व माणूस म्हणून चांगले आणि संस्कारीत जीवन फुलवण्यासाठी ज्ञानाची कास धरायलाच हवी.ज्ञान हे जीवनाला योग्य दिशा देण्याचे आणि मानव कल्याणाच्या  प्रगतीकडे नेण्याचे काम करते. - व्यंकटेश काटकर,नांदेड. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे। जयाचेनि योगें समाधान बाणे॥ तयालागिं हें सर्व चांचल्य दीजे। मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३९॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *घोडा आणि नदी* एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले. मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल". मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला. कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत." उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या.... प्रत्येकजण आपआपल्या अनुभवाने सल्ला देतात. तो सल्ला कितपत योग्य आणि बरोबर आहे ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment