✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 23/03/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शहीद दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९३१ -सँडर्सचा वध करणारे भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना लाहोरच्यातुरूंगात फाशी. 💥 जन्म :- १९१९- डॉ राम मनोहर लोहिया १९३८ - मेनार्ड जॅक्सन, अटलांटाचा पहिला श्यामवर्णीय महापौर. १९५३ -किरण मुजुमदार शॉ-भारतीय उद्योजक 💥 मृत्यू :- १९३१-भगतसिंग -क्रांतिकारक १९३१-सुखदेव थापर-क्रांतिकारक १९३१-शिवराम हरी राजगुरू-क्रांतिकारक २००७ - श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक. २००८ - गणपत पाटील, मराठी चित्रपट अभिनेते *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *शिवस्मारकाच्या प्रकल्पामध्ये अनियमितता झाली असून त्याचे स्पेशल ऑडिट करण्यात यावं अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने कॅगच्या महाराष्ट्रातील प्रधान महालेखापालांना पत्र पाठवून केली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पुरातत्व क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल डॉ. गो. बं. देगलूरकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सातवी यादी प्रसिद्ध, सातव्या यादीत 35 उमेदवारांचा समावेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघासाठी संजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर, खुद्द शरद पवारांचीच घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कर्नाटक नगरोत्थान मंत्री सी एस शिवळ्ळी यांचे हृदयविकाराने हुबळीत निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली. शिवसेनेनं 21 उमेदवारांची यादी केली प्रसिद्ध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयपीएलच्या बाराव्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज संघ विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाशी खेळणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आरोग्यदायी चांगल्या सवयी* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंकला टच करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_54.html - नागोराव सा. येवतीकर •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *राम मनोहर लोहिया* समाजवादी पक्षाचे प्रभावी कार्यकर्ते म्हणून स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला त्या राम मनोहर लोहिया यांची आज जयंती. देशात लोकशाही समाजवादी विचारसरणीचे लोण पसरविणारा हा स्वातंत्र्यपर्वातील आघाडीचा कार्यकर्ता. 23 मार्च 1910 रोजी जन्मलेल्या राम मनोहर लोहिया यांचे यांचे शिक्षण कोलकाता, मुंबई आणि बर्लिन येथे झाले. बर्लिनमधून पीएच.डी मिळवून ते भारतात परतले आणि सरकारी नोकरीचे आमिष लाथाडून स्वातंत्र्याच्या ध्येयप्राप्तीसाठी ‘चले जाव’ आंदोलनात उतरले.  1942 च्या ‘चलेजाव’ आंदोलनादरम्यान झालेल्या प्रतिकार सामर्थ्याचे जनक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. या आंदोलनादरमन्या आपल्या उपरोधिक शैलीत, विशिष्ट व्यक्ती व घटनांचे विश्लेषण करणारी भाषणे त्यांनी लिहिली. ती गुप्त रेडिओ केंद्रातून प्रसारित होत. 1955 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. 1963 पासून ते संसद सदस्य होते. समाजवादी चळवळीचे नेतृत्व करणार्‍या लोहियांनी समस्यांच्या संदर्भात स्वदेशी समाजवाद विकसित करण्याची भूमिका मांडली. त्यांनी इंग्रजी आणि हिंदीतून लेखन केले. 12 ऑक्टोबर 1967 रोजी ते आपल्यातून निघून गेले.      *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बालमनाची कळी प्रेमाच्या फुंकराने फुलवीत असतात तेच गुरु. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्राचा राज्यखेळ कोणता ?* कबड्डी 2) *भारताचे चलन कोणते ?* रुपया 3) *भारताचे खेलमंत्री कोण आहेत ?* मा राज्यवर्धन सिंह राठोर 4) *आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?* पं. जवाहरलाल नेहरू 5) *फेसबुकची स्थापना कोणी केली ?* मार्क जुकेरबर्ग *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144              •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •  विनायक नरवाडे •  अशोक गड्डमवार •  संजय मनुरे •  आचार्य सूर्यकांत •  नरसिंग येम्मेवार •  अनिता पांढरे •  कालिदास देशमुख •  चंद्रकांत जाधव  •  प्रकाश मटके *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पंचाईत* प्रत्येकाचिच इथे आपाआपली त-हा आहे सामान्याला कळत नाही यातला कोण खरा आहे खरा खोटा ओळखताना सामान्य ची पंचाईत होते खरं-खोटं ओळखण्यातच सारी ऊर्जा वाया जाते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परिक्षेत वरचा नंबर हवा, टक्केवारी चांगली हवी; म्हणून क्लास लावला जातो. मात्र, आपल्यातला माणूस घडला पाहिजे, त्याला चांगलं वळण लागलं पाहिजे यासाठी शोधला जातो का एखादा क्लास? संतानी माणसातला माणूस जागविण्यासाठी अभंगांचा शब्द न् शब्द खर्ची घातला. तो समजून घेण्याच्या फंदात कुणी पडत नाही. आपल्याला डाॅक्टर, वकील, इंजिनीयर व्हायचं! पण त्याबरोबर कधी आपण हा विचार केला की मला बाबा आमटे यांच्यासारखी रुग्ण्सेवा करायचीयं. सिंधूताई सपकाळांसारखी अनाथांची माय व्हायचंय.* *'समाजसेवा' घडवेल असा धडाच आपल्या पाठ्यपुस्तकात नाही किंवा असलाच तर समजून घेतला गेला नाही. तसं झालं असतं तर अमानुषतेचं एकही उदाहरण सापडलं नसतं. म्हणूनच-* *"माणूस माणूस, तुझी नियती बेकार*   *तुझ्याहून बरं, गोठ्यातलं जनावर"* *असा समाचार बहिणाबाई घेतात. संयम, विनम्रता, सौहार्द, सहिष्णुता हे फक्त निबंधातील शब्द आहेत. ते माणसाने आचरणातून हद्दपार केले आहेत. मातीत उगवून आलेल्या पिकांच्या अवतीभवतीचं तण-तणकट निंदणी-खुरपणी करून निर्मळ करावं लागतं. तसंच माणसाचं, माणसाचा सहजी माणूस बनत नाही. संस्काराच्या शाळेत माणूस घडतो. मात्र, माणूस संस्काराच्या शाळेत हजर राहण्यास नाखूष असल्याने, त्याची अॅब्सेंटी वाढत चाललीयं. मग कसा होऊ शकेल त्याचा माणूस ?* संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नहाये  धोये  क्या  हुआ ,  जो  मन  मेल  न  जाय  | मीन  सदा  जल  में  रही ,  धोये  बॉस  न  जाय  || अर्थ :  नहाणे धुणे देखावा गेला न मनीचा मळ सदा पाण्यात मासळी दुर्गंध न काढी जळ       महात्मा कबीर दिखाऊ पणाला फटकारतात. नहाणे , धुणे  व सुंगधाने सजणे हा  तर केवळ बाह्य देखावा आहे. जर मनाचीच सफाई झाली नाही तर विवेकी व  निरामय जीवनशैली  विकसित होणार नाही व त्याशिवाय विश्वात्मक भाव दृढ कसा होणार ? मासा सदा सर्वकाळ पाण्यात राहूनही अंगीचा दुर्गंध त्यागीत नाही. तिथे पाण्याचा काय दोष असणार आहे. बाह्य बदलापेक्षा आंतरिक बदल महत्त्वाचा असतो. तो अवगुण कायमचे दूर करतो.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काही लोकांच्या बाबतीत पैसा म्हणजे सर्वस्व आहे आणि पैशामुळे काहीही मिळवता येते. पैशामुळे तुम्हाला तुमच्या भौतिक सुविधा मिळवता येतात परंतु इतरांचे मन मिळवता येत नाही.इतरांचे मन जिंकायचे असेल तर या ठिकाणी पैसा चालत नाही.त्यासाठी हवे तुमचे उदार अंतःकरण,तुमची दुस-याबद्दलची आत्मियता,प्रेम इतरांना दिलात तर तेही तुमच्यावर अधिक प्रेम करायला लागतील.यासाठी तुमच्या जवळ असलेल्या पैशाची गरज नाही.एवढे सत्य आहे पैशाने सारे काही खरेदी करता येईल पण जगात असलेल्या सर्व जीवांचे मन आणि प्रेम कधीच खरेदी करता येत नाही.मग तुमच्या जगण्याला काय अर्थ आहे ? © व्यंकटेश काटकर, नांदेड ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बहुतांपरी हेंचि आतां धरावें। रघूनायका आपुलेसे करावें॥ दिनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४२॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *माणुसकीचे फळ* एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे. कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होते. तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला. म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला. त्याला काम करण्यात खुप उशीर लागला. तोपर्यंत प्लांट बंद झाला. लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले. अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे, निश्चित होते. त्या माणसाला काही सुचेनासं झालं, पण तासा भरात एक चमत्कार झाला. आणि कोणी तरी दरवाजा उघडला. तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता. त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला. प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले, “तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय.” सुरक्षा रक्षक म्हणाला, “या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे आहात की जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत. म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो.” त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे, एक दिवस त्याचा जिव वाचवेल. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मान पूर्वक बोलून मग पुढे जा. माणूसकीच तुम्हांला शेवट पर्यंत साथ देईल… म्हणून सर्वांबरोबर माणूसकीने वागा… *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment