✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/03/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९६४ - कॉन्स्टन्टाईन दुसरा ग्रीसच्या राजेपदी. १९७५ - अल्जियर्सचा तह - ईराण व इराकने सीमाप्रश्नी संधी केली. १९९२-'मायकेल अँजेलो' नावाचा संगणक विषाणू पसरण्यास झाली सुरुवात. १९९८- गझलगायक जगजितसिंग यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा 'लता मंगेशकर पुरस्कार' जाहीर. १९९९-जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर समूहाच्या सहस्रब्दीसोहळ्याचे राष्ट्रपती  के आर नारायणन यांच्या हस्ते उद्धघाटन २०००-शहर निर्वाह भत्ता ,महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता म्हणून मिळणारी रक्कम करपात्र असल्याचे सर्वोच्च  न्यायालयाचे शिक्कामोर्तब 💥 जन्म :- १९५७-अशोक पटेल-  भारतीय क्रिकेट खेळाडू १९६५-देवकी पंडित-गायिका 💥 मृत्यू :- १९८२-रामभाऊ म्हाळगी- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठप्रचारक, भाजप चे महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष १९९२-प्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई १९९९- सतीश वागळे-चित्रपट निर्माते २०००-नारायण काशीनाथ लेले-कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई - राज्यातील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरचा भाऊ मुफ्ती अब्दुर रौफसह बंदी असलेल्या या संघटनेच्या ४४ दहशतवाद्यांना पाकिस्तानने केली अटक* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे जेम एंड ज्वेलरी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दुष्काळ निवारणासाठी दुष्काळग्रस्त भागात २६०० टँकर्स सुरू करण्यात आले असून पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठय़ासाठी १४७ कोटी रुपये निधी वितरीत करण्यात आला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जम्मू-काश्मीर- राजौरीतल्या सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार, दिवसभरात तिसऱ्यांदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली - भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी घेतली अमेरिकन सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांची भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नागपूर : चित्तथरारक ठरलेल्या सामन्यात 'टीम इंडिया'ने ऑस्ट्रेलियाचा ८ धावांनी पराभव करीत पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-0 अशी विजयी आघाडी घेतली. भारताचा हा पाचशेवा विजय होता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रदूषण एक समस्या* लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_10.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *रणजित देसाई*       रणजित रामचंद्र देसाई (एप्रिल ८, १९२८ - मार्च ६, १९९२) हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती  शिवाजी  महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे. त्यांना स्वामीकार या नावाने ही ओळखले जाते.  *त्यांना मिळालेले पुरस्कार -* १९६३ - स्वामी कादंबरीसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९६३ - स्वामी कादंबरीसाठी हरी नारायण आपटे पुरस्कार १९६४ - स्वामी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार १९७३ - पद्मश्री पुरस्कार १९९० - महाराष्ट्र गौरव पुरस्कार *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे. आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1)  *भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान कोण आहे ?*       विराट कोहली 2)  *क्रिकेटमधील खेळाडूंची संख्या किती असते ?*       11 3)  *कबड्डी खेळात खेळाडूंची संख्या किती असते ?*       9 4)  *सायना नेहवाल कोण आहे ?*       बॅडमिंटनपटू 5)  *आपण कोणत्या खंडात राहतो ?*       आशिया *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • अशोक पा. दगडे, सरपंच • सुरेश कटकमवार • सुरेश बावनकुळे, शिक्षक • माधव गोटमवाड • शेख जुबेर • कैलास वाघमारे • प्रकाश राजफोडे • राजू कांबळे • अविनाश गायकवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *दुभंगलेले* वरवर एक,मने दुभंगलेले आहेत प्रत्येकजण आपल्या रंगात रंगलेले आहेत वरवर कितीही जोडा जोडलेले ते जोडलेले रहाते वरवर चिकटलेले सांगा कुठे एकजीव होते     शरद ठाकर   सेलू जि परभणी   8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *सारा अंधारच प्यावा*        *अशी लागावी तहान ॥*        *एका साध्या सत्यासाठी*        *देता यावे पंचप्राण ॥* *असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.* *खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   ज्ञानी तो निर्भय भया, मानै नहीं संक इन्द्रिन केरे बसि परा, भुगते नरक निशंक। सारांश       ज्ञानवंता भय नसे       शंका नसे तया मना ।       इंद्रिया आहारी जाता       निशंक नरक जाणा ।।       महात्मा कबीर ज्ञानी माणसाचे वैशिष्ट्य कथन करतात.  ज्ञानी माणसाचे ठायी सारासार विचार शक्ती असते. तो विवेकाने निर्णय घेतो. घाई गडबडीने निर्णय घेवून पुन्हा विचारात पडण्याची त्याची प्रवृत्ती नसते. तो पूर्णपणे आपल्या विचारावर ठाम असतो. पुढे काय होणार ? अशा द्विधा व संदिग्धावस्थेत तो गुरफटत नाही. व यशापयशा प्रती शंकाही घेत नाही. तो स्थिर असतो. मात्र जो षडविकारांना बळी पडून इंद्रियांच्या अधीन  गेलेल्या बद्दल काय सांगावे. क्षणोक्षणी त्याच्या विचारात बदल होत असतो. त्याची अस्थिर विचार सरणी त्याला कोणत्याही मतावर ठाम होऊ देत नाही म्हणून तो सदा सर्वकाळ साशंक मनाने जगत असतो. ही साशंकताच त्याचा घात करते. तो निसर्गाच्या शाश्वत सत्यांवरही शंका घ्यायला लागतो. त्याच जगणं जटील बणतं . तो स्वतःच जीवनानंदापासून अलिप्त होवून जीवनानंदाला नरकात ढकलून नैराश्यात्मक यातनामय जगणे पदरी ओढून घेतो.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात आतापर्यंत विद्वान माणसे शरीराने जरी या जगातून गेली असली तरी ती आपल्या विचारांनी अमरच झालेली आहेत.कारण त्यांचे विचार हे सर्वसामान्य माणसेही आपल्या जीवनात आदर्श विचार मानून त्या विचारांच्या मार्गावरुन चालतात म्हणजे विचार रुपाने ते सदैव आपल्या जीवनात पाठराखण करत असतात.म्हणतात ना ' मरावे परी कीर्तीरुपी उरावे ' म्हणजेच विद्वान माणसे आपल्या जीवनात सदैव आपल्या विचारांच्या,कार्याच्यारुपाने आपल्यामध्येच असतात हे ध्यानात ठेवून आपणही त्यांचा मार्ग अनुसरावा म्हणजे आपणासही विचाररुपी अमरत्व प्राप्त होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..9421839590/ 8087917063. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दिनानात हा राम कोदंडधारी। पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥ मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥२८॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *उंदराचे सिंहाशी लग्न* उंदरामुळे जाळ्यातून सुटलेला सिंह खूश होऊन त्या उंदराला म्हणाला, ''अरे, तू माझ्यावर फार उपकार केले आहेस त्यासाठी तुला जे काय हवे असेल ते माझ्याजवळ माग, मी देतो.'' ते ऐकून उंदीर गर्वाने फुगला व आपल्या योग्यतेचा विचार न करता म्हणाला, ''महाराज, ज्या अर्थी आपण आनंदाने काय पाहिजे ते माग म्हणता त्या अर्थी काहीही भीती न धरता मी मागतो की तुमची मुलगी मला द्यावी.'' हे ऐकताच सिंहाला फार वाईट वाटले, पण तो वचनात गुंतल्यामुळे त्याला नाही म्हणता आले नाही. त्याने आपली मुलगी आणून उंदराच्या स्वाधीन केली. ती तरुण मुलगी मोठय़ा डौलाने चालत असता तिचा पाय उंदरावर पडून तो तात्काळ मरण पावला. तात्पर्य : जे मागायचे ते विचारपूर्वक व आपल्या योग्यतेला साजेल असे मागावे, नाहीतर भलतेच मागणे मागितल्यामुळे संकट निर्माण होईल. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment